* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: गोष्ट चांगुलपणा सांगणारी..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१४/४/२३

गोष्ट चांगुलपणा सांगणारी..

फार जुनी गोष्ट नाहीये.ज्युलिओ डियाझ हा तरुण समाजसेवक कामावरून घरी सबवेने न्यू यॉर्कमधील ब्रॉक्स येथे चालला होता.तो दररोज एक स्थानक आधी उतरायचा आणि त्याच्या आवडत्या हॉटेलात जेवून घरी जायचा.परंतु आजची रात्र नेहमीसारखी नव्हती.

सबवेच्या निर्मनुष्य स्थानकावरून तो हॉटलकडे जाऊ लागला,तेव्हा सावल्यांत दडलेली एक व्यक्ती बाहेर आली.तो हातात चाकू घेतलेला किशोरवयीन मुलगा होता.नंतर ज्युलिओने एका पत्रकाराला सांगितलं की,मी त्याला लगेचच पाकीट देऊन टाकलं.'चोरी फत्ते झाल्यामुळे मुलगा पळून जात होता तेवढ्यात ज्युलिओनं एक अनपेक्षित गोष्ट केली.

त्याला हाक मारून तो म्हणाला,"ए,थांबरे,मुला,

तू रात्रभर लोकांना लुटत राहणार असशील तर माझा कोटही घे म्हणजे थंडी वाजणार नाही." मुलगा मागे वळून ज्युलिओकडे अविश्वासाने पाहू लागला आणि म्हणाला,"पण तुम्ही असं का करत आहात?" त्यावर ज्युलिओ म्हणाला,"काही डॉलर्ससाठी तू तुझं स्वातंत्र्य गमवायला तयार आहेस, याचा अर्थ तुला पैशांची नक्कीच फार गरज आहे.मी काय म्हणतोय की,मला आत्ता फक्त जेवायचं आहे. तुला माझ्यासोबत जेवायला यायचंय का? तर जरूर ये.'मुलगा तयार झाला.त्यानंतर काही क्षणांत ज्युलिओ आणि त्याचा हल्लेखोर असे दोघं त्या रेस्टॉरंटमधील टेबलाशी बसलेले होते. वेटर्सनी त्यांचं आपुलकीने स्वागत केलं. मॅनेजरही गप्पा मारायला थांबला.अगदी भांडी घासणाऱ्यांनीही येऊन 'हॅलो' म्हटलं.


तेव्हा मुलगा आश्चर्याने म्हणाला,"तुम्ही इथं सर्वांना ओळखता? तुमच्या मालकीच आहे का हे हॉटेल ?" 


"नाही रे बाबा,मी इथं पुष्कळ वेळा जेवतो म्हणून ओळखतात ते मला.' "पण तुम्ही त्या भांडी घासणाऱ्यांशीही किती चांगलं बोललात?" 


"पण सर्वांशी चांगलंच वागायचं असतं हे शिकवलेलं नाही का तुला कुणी ?" "शिकवलेलं तर आहे," मुलगा म्हणाला, "परंतु लोक प्रत्यक्ष तसं वागतात कुठं?"


ज्युलिओ आणि हल्लेखोरांचं खाऊन झाल्यावर बिल आलं;परंतु पाकीट नव्हतं.त्यानं मुलाला म्हटलं,"हे बघ,तुलाच हे बिल भरावं लागेल कारण माझे पैसे तुझ्याकडे आहेत.त्यामुळे मला तर हे बिल भरता येणार नाही;पण पाकीट परत दिलंस तर मी आनंदाने दोघांचं बिल देईन.' मुलाने पाकीट परत दिल,ज्युलिओने बिल भरलं आणि त्याला २० डॉलर्सही दिले.मात्र एका अटीवर,ती म्हणजे त्याने चाकू ज्युलिओला कायमचा द्यायचा.पत्रकाराने नंतर ज्युलिओला विचारल की,तू त्या चोरट्याला जेवायला का घातलस? तेव्हा किंचितही न अडखळता तो म्हणाला,

"मला वाटलं की तुम्हाला याचं उत्तर माहिती असेल.आपण लोकांना चांगलं वागवलं तर तेही आपल्याशी चांगलेच वागतील अशी आशा धरायला काहीच हरकत नसते.या गुंतागुंतीच्या जगातली सगळ्यात सोपी गोष्ट हीच असेल."


मी ज्युलिओच्या चांगुलपणाची गोष्ट एका मित्राला सांगितली तेव्हा तो पटकन म्हणाला, "थांब जरा,मी उलटी करून येतो,एवढं सौजन्य झेपत नाही मला.' ठीक आहे,ही कहाणी वाजवीपेक्षा जास्तच गोड आहे,ती ऐकताना लहानपणी चर्चमध्ये ऐकलेल्या आणि घासून घासून गुळगुळीत झालेल्या धड्यांची आठवण येते.हे खरंय,


मॅथ्यू ५ मधील 'सर्मन ऑन माऊंट मध्ये असंच काहीसं सांगितलं आहे.'डोळ्याचा बदला डोळ्याने आणि दाताचा बदला दाताने घ्या'असं म्हटलेल तुम्ही ऐकलं असेल; परंतु मी आपणास सांगतो,दुष्टपणे वागणाऱ्यांचा बदला घेऊ नका.कुणी उजव्या गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करा.कुणी जबरदस्तीने तुमचा अंगरखा काढून घेतला तर त्याला आतली बंडीही काढून द्या.कुणी एक मैल चालायची जबरदस्ती केली तर त्याच्याबरोबर दोन मैल चाला.


तुम्हाला नक्कीच वाटेल की,येशू हे सांगतोय तरी काय?असं वागायला आपण साधुसंत आहोत की काय ? प्रश्न असा आहे की आपण सगळे माणसं आहोत आणि खऱ्या जगात दुसरा गाल पुढे करणं म्हणजे भोळसटपणाची परिसीमा गणली जाईल,हो ना?परंतु अगदी हल्लीच मला कळलं की,येशू एक अत्यंत तर्कशुद्ध तत्त्व मांडत होता.

आधुनिक मानसशास्त्रज्ञ त्या वर्तनास 'जशास तसे' छापाचं किंवा पूरक नसलेलं (नॉन कॉप्लिमेंटरी) वर्तन म्हणतात.मी अगोदर उल्लेख केल्यानुसार,माणसांच्या मनात एकमेकांच्या भावनांची प्रतिबिंबे पडत असतात.

कुणीतरी तुमचं कौतुक केलं की तुम्हीही त्याचं उलट कौतुक करता.कुणीतरी तुम्हाला वेडावाकडा टोमणा मारतं,तेव्हा तुम्हालाही त्याला खणखणीत सुनवायची इच्छा होते.आधीच्या प्रकरणांत आपण पाहिलं की, शाळांत,कंपन्यांत आणि लोकशाही व्यवस्थांत सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिसादाचे बंध किती सामर्थ्यशाली असतात.तुमच्याशी लोक प्रेमानं वागतात तेव्हा योग्य वागणं सोपं असतं; परंतु सोपं असलं तरी ते पुरेसं नसतं.येशूच्या शब्दांत सांगायचं तर जे तुमच्यावर प्रेम करतात, त्यांच्यावर तुम्हीही प्रेम केलंत तर त्याचं बक्षीस काय मिळणार ? कर गोळा करणारे लोकही तेच करतात की,तुम्ही फक्त तुमच्या भावाबहिणींचंच प्रेमानं स्वागत केलंत तर इतरांपेक्षा तुम्ही वेगळं काय वागलात ?' प्रश्न असा आहे की,आपण त्याहून एक पाऊल पुढे जाऊ शकतो का?आपण फक्त आपली मुलं,सहकर्मचारी,शेजारी यांचंच भलं न चिंतता आपल्या शत्रूचंही भलं चिंतू शकतो का? ते कठीण असतं आणि आपल्या सहजप्रेरणेच्या विरुद्धही असतं. महात्मा गांधी आणि मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्याकडे पाहा.विसाव्या शतकातले हे दोन महानायकच आहेत.समोरच्याला त्याच्याच भाषेत उत्तर न देण्याच्या बाजूने ते असले तरी ते असामान्य व्यक्ती होते हेही तितकंच खरं आहे.पण मग तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांचं काय? एका गालावर मारलं तर दुसरा गाल पुढे करायला आपल्याला जमणार का ?तसंच मोठ्या स्तरावर म्हणजे तुरुंगात आणि पोलीस ठाण्यांत दहशतवादी हल्ले झाल्यावर आणि युद्धकाळात तसं वागायला जमणार का? हा प्रश्नच आहे.


'एखाद्या माणसाला त्याच्या अपराधाचा दंड द्यायचा असल्यास त्याला शिक्षा करावीच लागते. त्याच्यात परिवर्तन घडवून आणायचं असल्यास त्याच्यात सुधारणा करावी लागते आणि मारून मुटकून कुणीही सुधारत नसतं.'


जॉर्ज बर्नार्ड शॉ (१८५६-१९५०)


ह्युमनकाइंड मधून..