* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: शोधायचं आहे प्रत्येकाला आपल्यापुरतं उत्तर - " तत्वमसि "

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१८/४/२३

शोधायचं आहे प्रत्येकाला आपल्यापुरतं उत्तर - " तत्वमसि "

परवा पुण्याला नरभक्षकाच्या मागावर या पुस्तकाचे लेखक संजय बापट यांना खास भेटण्यासाठी गेलो.छान गप्पा झाल्या,सोबत खाणं झालं.नरभक्षकाच्या मागावर या पुस्तकाच्या निर्मिती बद्दल उत्कंठावर्धक माहिती मिळाली.

त्याचबरोबर त्यांनी काही आपल्या कविता म्हणून दाखवल्या.येताना सोबत त्यांचं भरपूर प्रेम व काही पुस्तक त्यांनी भेट म्हणून दिली.जी त्यांनी माझ्यासाठी राखीव ठेवली होती.त्यातीलच एक पुस्तक परवा वाचून हाता वेगळे केलं.हे मूळ पुस्तक गुजराती लेखक ध्रुव भट्ट यांचे आहे.मराठी अनुवाद अंजनी नरवणे यांनी केलेला आहे तर मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशक आहेत.


प्रोफेस ररुडॉल्फ,सुपरिया,ल्युसी,जिमी,गुप्ताजी,

बित्तबुंगा,पार्वती माँ,कालेवाली,माँ,पुरिया,झुरको,

वनिता,नारदी अशा व्यक्ती आहेत.ज्या आपले जीवन सहजपणे सांगत आहेत.


भारतवर्षाच्या उत्तर आणि दक्षिण भागांना जोडणाऱ्या,एकत्र बांधणाऱ्या,उभयान्वयी, भुवनमोहिनी महानदी नर्मदेला हे पुस्तक समर्पित केलेले आहे.


नदी काठावर झुकलेली झाड रंगीबेरंगी रत्नासारखे गोल दगड पसरलेला किनारा आणि सृष्टीच्या निर्मितीपासून अबोल असलेल्या टेकड्यांमधून अखंड वाहत राहिलेले हे स्वच्छ निर्मळ पाणी (पाणी हेच जीवन या सिध्दांताची ओळख करुण देणारे सतिश खाडे यांची या ठिकाणी प्रखरतेने याद आली.) या सर्वाच्या साक्षीने ज्याला आरंभ नाही आणि अंतही नाही अशा एखाद्या महाकाव्यासारखे हे शब्द दे आणि घे ही अनंत म्हणून इथं एवढ्यातच कुठेतरी वाहत असतात.प्रोफेसर रुडॉल्फ यांनी आदिवासींमध्ये मिसळून त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी निवडलेला तरुण व त्याचा प्रत्यक्ष जिवंत अनुभव जो जागोजागी इथे मिळतो.

गंगा,यमुना,ब्रह्मपुत्रा या भारतातल्या मोठ्या नद्या आहेत.त्या नद्या कुठे उगम पावतात ते ठाऊक असलं,तरी कुठून वाहत जाऊन,किती अंतर कापून मग समुद्राला मिळतात,याबद्दल माहिती नाहीच.तेव्हा आता भारतातल्या मोठ्या,लांब नद्यांच्या यादीत,या तीन नद्यांशिवाय आणखी एक नाव आज नवं आलं - नर्मदा ! नर्मदा परिक्रमणा समजावून सांगण्याचे कार्य हे पुस्तक करतं.फिजिक्सचा एखादा सिद्धांत समजावून सांगत असताना.ल्युसी म्हणते


एवढं मोठं हे अनंत विश्व एकाच मूलतत्त्वातून उत्पन्न झाले हा विचार किती रोमांचकारी आहे नाही?


गुप्ता,हीच गोष्ट विचार करण्यासारखी आहे.ज्या कोणी हा देश,ही संस्कृती जिवंत ठेवली आहे, त्यांनी धर्माला जीवनाचा पाया मानलेला नाही !"

शास्त्रीजी बोलता बोलता थांबले.नर्मदेकडे बघत राहिले.त्यांना काय म्हणायचं होतं ते मला समजत नव्हतं.शिवाय रोज न चुकता टिळा लावणारा हा ब्राह्मणच हे बोलतोय,याचंही आश्चर्य वाटत होतं.'श्रीहरि' म्हणून गुप्ताजी गप्प बसून राहिले.शास्त्रीजी गंभीर स्वरात पुढे म्हणाले,"बिहारी,ते काय किंवा मी काय,आपण ईश्वराचे भक्त आहोत,धर्माचे नाही आणि हा सारा देशही त्याचप्रमाणे जगतो." दूरच्या एका खडकाकडे बोट दाखवत मग ते पुढे म्हणाले, "तो समोर खडक दिसतोय ना? जा,त्याच्यावर शेंदूर लाव आणि देऊन टाक त्याला कुठलंही देवाचं नाव आणि कर एक नवा संप्रदाय सुरू! तुला कोणी अडवलं किंवा तुला अनुयायी नाही मिळाले,

तर मग येऊन सांग मला,माझं चूक होतं म्हणून!"


स्तब्ध होऊन ऐकत असताना पुढील विचार ऐकून थोडावेळ मी थांबलो.


दिवसातून दोनदा संध्या आणि पूजा करणारा एकांतात राहणारा हा ब्राह्मण आज मला काही वेगळाच वाटला.शास्त्रीजी पुढे म्हणाले, "हे बघ बिहारी,मी काय विचारतोय ते नीट ऐक आपल्या ऋषीमुनींनी जर धर्माला आपल्या आयुष्याशीच जोडलं असतं,तर आपण आपल्याच धर्मामध्ये इतके सगळे संप्रदाय उभे होऊ दिले असते का?"

एवढं विचारून शास्त्री थांबले आणि नंतर ते जे म्हणाले, ते बोलणं मला एक नवीच दिशा दाखवून गेलं! शास्त्री म्हणाले, "धर्म एकत्र आणतो.आज्ञा देतो,असं करा,असं करू नका, यावर श्रद्धा ठेवा,यावर श्रद्धा ठेवू नका वगैरे शिकवतो बिहारी,तुम्ही सगळी तर मुक्तीची लेकरं आहात,परम मुक्तीची;आणि जी मुक्तीची संतानं आहेत,ती बंधनं आणि आज्ञा,यांना जीवनाचं मूलभूत ज्ञान समजून वागतील,असं कसं होईल? शास्त्री पुन्हा थांबले.

गुप्ताजींच्या विचारात गढलेल्या चेहऱ्याकडे बघितलं; शेजारच्या कळशीतून थोडं पाणी घेऊन प्यायले आणि पुढे म्हणाले, "अरे, जी संस्कृती तुम्हांला इतकं स्वातंत्र्य देते, ती संस्कृती धर्माला जीवनाचा पाया मानते, असं कसं म्हणता येईल ?"

मला त्यांचं बोलणं ऐकण्यात खूप गोडी वाटत होती. गुप्ताजी जरा वेळ विचारात मग्न राहिले. मग म्हणाले, "गणेश, तू जो कहे सो.भाई, में तो धरम तू ध्याननो आदमी लागुं हुं. बीजा मन्त्रे समज ना आवे." ("गणेश, तू काही म्हण.बाबा रे, मी आपला पूजाअर्चा मानणारा माणूस, मला हे दुसरं काही समजत नाही.")

"तू तर येता जाता 'श्रीहरि' म्हणत असतोस की! तेच तर कळत नाही,की तुझा तर रोजच त्याच्याशी संबंध आहेच की! एक गोष्ट लक्षात घे बिहारी,आपला या देशातल्या प्रत्येकाचा संबंध सरळ ब्राह्मतत्त्वाशी आहे.मघाशी मी म्हटलं, तशी मुक्तीची लेकरं आहोत आपण.हा देश टिकून आहे ना,तो अध्यात्मावर,धर्मावर नाही." गुप्ताजींचा हात हातात घेऊन शास्त्री पुढे म्हणाले, "अरे, तुझा श्रीहरीही ब्रह्माचंच स्वरूप आहे. ईश्वराला जन्म घ्यावा लागलाय या देशात, आपल्याबरोबर,आपल्यामध्येच राहून आपली सुखदुःखं अनुभवावी लागली आहेत.

आईची अंगाई गीतं ऐकत ईश्वर इथं लहानाचा मोठा झाला आहे.ज्या देशातल्या आया मुलाच्या रक्तात परमब्रह्माच्या संदेशाचंच सिंचन करत असतील,

त्या देशाला धर्म आणि निषेधाचा देश म्हणायचंय कसं? ऐक बिहारी,तू तर व्यापारी आहेस,शिकलेला आहेस.जरा विचार करून बघितलंस,तर तुझ्या लक्षात येईल,की या देशातल्या अडाणी आणि लहानातल्या लहान माणसाला हे उपजतच माहीत असतं की हे जग ब्रम्हांडातून उत्पन्न झालं आहे आणि त्याच्यामध्ये लय पावणार आहे.आपल्या रक्तातच ही उमज आहे.गुप्ताजी व शास्त्रीजी यांच्यातील संवाद विचार करायला लावणारा आहे.


साऱ्या जगा व प्रेम करायला शिकलेली माणसं स्वतःच आपल्याच माणसांबद्दल इतका तिरस्कार मनात कसा ठेवू शकत असतील हे एक न उलघडलेलं कोडं आहे.


अगदी स्वच्छ समजलं,की या भोळ्याभाबड्या आदिवासींनी जे गहाण टाकलेलं असतं,ते घर नसतंच.घर हे आपलं नावापुरतंच.हे लोक गहाण टाकतात स्वतःलाच! कर्जदार घर नसतं,कर्जदार असतं गुप्ताजींकडे पैसे,धान्य,कापड असं काहीतरी आणायला,आपल्या पायांनी चालत आलेलं त्या आदिवासीचं अस्तित्व आणि त्याचं नाव.ते अस्तित्व आणि ते नाव,हे बंधन मानतं,की त्यानं स्वत:ला असलेलं कर्ज आणि व्याज दोन्ही फेडायचं आहे! पौर्णिमेच्या दिवशी जंगलं तुडवत चालत येऊन रस्त्याच्या कडेला थांबण्याची आज्ञा त्यांना त्यांच्या अंतरात्म्यातूनच मिळत असते; दुसरं कोणी सांगत नाही.


"सुमारे दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.मी एका कॉन्फरन्ससाठी दिल्लीला आलो 'होतो.तिथल्या एका बँकेत मी गेलो आणि सही करून चेक दिला." - प्रोफेसर हळूहळू बोलत होते,मी ऐकत होतो.

"बँकेच्या कारकुनानं चेक मला परत देत म्हटलं, 'बॉलपेननं केलेली सही चालत नाही,तुम्हांला शाईनं सही करावी लागेल." बिचारे प्रोफेसर रूडॉल्फ! त्याचं काय मत झालं असेल असं माझ्या मनात येत होतं,तेवढ्यात त्यांचे पुढचे शब्द ऐकू आले.


"ते ऐकून मला आनंद झाला.जगातली एक तरी प्रजा अशी आहे, की जे काही नवं येईल, ते डोळे मिटून स्वीकारत नाही.सुरुवातीला विरोध करेल,मग ज्ञान पारखून बघेल,विचारपूर्वक समजून घेईल,आणि मग स्वीकारण्यायोग्य वाटलं,तर आवडीनं स्वीकारेल."


बोलताना प्रोफेसर जरा थांबले असावेत.टेप जराशी नुसतीच पुढे गेली आणि मग पुन्हा त्यांचा आवाज आला - "आज पुन्हा इथं आलो आहे, तेव्हा बघतो तर तुम्ही सगळेच बॉलपेन वापरायला लागले आहात.पूर्ण विचारांती आता तुम्ही त्याचा स्वीकार केला आहे. इथल्या प्रजेच्या या गुणानं मला नतमस्तक करून विचारात टाकलं आहे."अशा प्रजेचीच संस्कृती हजारो वर्षांची असू शकते.'ती स्वत:ची परंपरा टिकवून धरू शकते. इथून पुढे संपूर्ण जगामध्ये खूप वेगानं परिवर्तन होत जाईल.संस्कृत लोप होण्याची भीती फक्त येथेच उभी होईल असं नाही, सर्वत्रच तसं होणार आहे."


"जे आर्थिकदृष्ट्या निर्बल आहेत,त्यांना ही भीती जास्त आहे.कदाचित मजूर म्हणून किंवा माणूस म्हणून असे लोक टिकून राहतील,पण एक प्रजा म्हणून त्यांची संस्कृती टिकून राहील किंवा नाही, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.म्हणून तुम्हा तरुणांना माझी अशी सूचना आहे,की अशा या प्रजेच्या संस्कृतीला अनुरूप असे उद्योग तुम्ही शोधा.असे काही तुम्ही जर करू शकलात, तर ते तुम्ही स्वतःसाठीच काहीतरी केलंत असं म्हणता येईल.

आफ्रिकेत आम्ही अशी कामं हाती घेतली आहेत आणि तिथल्या तरुण पिढीलाच या कामात गोवलं आहे.बदल हेच जीवन आहे हे यातून समजले.


बित्तबुंगा हे एक व्यक्तीचे नाव नाही तर ते दोघा व्यक्तींची नावे आहेत.ही जरा कडमडी आहेत.म्हणजे त्यांनी शिकुन वेगळपण जपल आहे.व्याध ग्रह व दोन ठिपके या अकल्पित,आश्चर्यकारक आकृत्या या दोघांनीच काढल्या होत्या.त्यांच्याबाबतीत एक गमतीशीर प्रसंग आहे.


या दोघांना एक डॅम तयार करायचा होता.या डॅमसाठीची सर्व सामग्री ही अरण्यं विनामूल्यच पुरवतील ! पण तो लोखंडाचा दरवाजा तर इथं कोणी बनवू शकणार नाही.!त्यासाठी हे दोघं चौदा किलोमीटर चालत शहरात जातील आणि पैसे तर दरवाजासाठी द्यावेच लागतील.लक्षात

घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट ही होती,की डॅमसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूचं नाव बित्तुबंगाला माहीत होतं,पण त्या वरखाली होणाऱ्या दरवाजाला काय म्हणायचं,ते ठाऊक नव्हतं!आणि ते कोणाला जाऊन विचारलं,तर ते बित्तुबंगा कसले? स्वत:च त्याचं नाव ठेवून दिलं - 'गलसंटा !' अशा तऱ्हेनं सारं जग ज्याला डॅमचा दरवाजा म्हणतं त्या रचनेला नवं नाव मिळालं 'गलसंटा'!


यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी एक पत्र महत्त्वाचे आहे.


प्रिय ल्यूसी,

आपण एकमेकांना विसरून गेलो आहोतसं वाटावे,इतक्या दिवसांत तुला मी पत्र लिहिले नाहीये,तुझ्या मनांनाही मी उत्तर पाठवली नव्हती.आज अचानक त्यांची उत्तरं मिळाली, म्हणून पत्र लिहायला घेतलंय,गेले

कित्येक महिने मी इथे बित्तबुंगाच्या गावात आहे.आज त्यांच्या घरी राहणार आहे.बित्तुची बायको तिचं छोटंसं शेणामातीचं घर स्वच्छ करत होती.तिथे सामानात मला एक लांबट आकाराची लाकडाची पेटी दिसली.त्या पेटीवर ते मृगनक्षत्र आणि व्याध असे कोरलेले आहे.पेटीमध्ये सुतारकामाची,कोरीव कामाची आणि अशीच काही आणखी हत्यार आहेत,जी नेहमी सगळ्यांच्या वापरात असतात,त्याहून काहीशी वेगळी आहेत.जोगाला ती त्या पेटीबद्दल विचारलं,तर तिनं सांगितलं,की साठसाली

जातीच्या आदिवासींनी ही पेटी बित्तुची आई नारदी हिला तिच्या लग्नात माहेरून येणाऱ्या स्त्रीधनासारखी भेट म्हणून दिली होती.नारदी तर आता हयात नाही,पण जोगानं काही खूपच महत्त्वाची माहिती सांगितली.


खूप वर्षांपूर्वी,जेव्हा नारदी लहान होती तेव्हा,तिनं साठसाली जातीच्या एका लहान मुलाला,लांडग्याच्या तोंडून वाचवला होता.त्याच्या जखमा बांधून मग स्वत: जाऊन ती मुलाला त्याच्या आईबापांकडे सोपवून आली.आता तुला तर साहजिकच वाटेल,की यात काय मोठंसं? पण इथली ही माणसं,जातीजातींमधले भेदभाव, त्यांचे संशय, शंका आणि अंधश्रद्धा यांच्या जाळ्यांमध्ये अशी काही गुंतलेली आहेत,की दुसऱ्या जातीच्या जखमी झालेल्या लहान मुलाला थेट त्यांच्याच वस्तीत पोचतं करायला एकटं जाण्यात नारदीनं जी हिंमत दाखवली,ती खरोखरच प्रशंसनीय आहे.पुरियाचं काय झालं, ते तू वाचलं असलंस,तर नारदीच्या या साहसाचं तुला नक्कीच कौतुक वाटेल.तेव्हापासूनच नारदीला साठसाली आदिवासींच्या प्रमुखानं स्वत:ची मुलगी मानली.

सणावारांना नारदी साठसालींकडे राहायलाही जायची आणि मग नारदीचं लग्न झालं,तेव्हा साठसालींनी तिला ही पेटी भेट म्हणून दिली होती.जोगा म्हणते,की साठसाली लोकांचे रीतिरिवाज खूप वेगळे असतात,असं नारदी सांगायची.मी जोगाला विचारलं,की ही अशी चित्राकृती साठसाली लोक काढतात का,त्यावर ती 'होव' म्हणाली.

जोगाला अगदी संपूर्ण माहिती नाही, पण नारदीनं तिला सांगितलं होतं,की आकाशातला कुठला तरी एक तारा,हा साठसाली लोकांचा देव आहे.त्या ताऱ्याचं नावही साठसाली आहे आणि साठसालींचा प्रमुख तीनदा वीस-वीस,एवढ्या (म्हणजे साठ) वर्षांचा झाला,की तो या देवाच्या नावानं उत्सव करतो.


ल्सूसी,मला वाटायचं,की 'साठसाली' या शब्दाला काही अर्थ असा नसेल.पण आता एवढं ठाऊक झालं आहे,की साठ वर्षांच्या कालावधीचा या जातीच्या नावाशी नक्कीच काहीतरी संबंध आहे. जोगाला सगळं ठाऊक नाही,

त्यामुळं तिला आणखी काही विचारलं, की लगेच म्हणते, 'मुं नीं जाणुं हुं' म्हणजे I do not know ! मी साठसालींच्या जंगलात जाणार आहे,तिथे जे काही समजेल,ते नक्की कळवेन.हे एवढं मला समजलं.ते तुला कळवलं.बित्तुबंगांमध्ये जे कलाकुसरीचं कसब आहे,ते त्यांची आई नारदी हिच्याकडून मिळालेलं आहे,हेही आता लक्षात आलं आहे.लहानपणापासून या पेटीतल्या लहान मोठ्या अवजारांशी खेळून त्यांच्यातला तो गुण विकास पावला असणार."


पुढील प्रसंग प्रार्थना समजावून सांगणारा आहे.


सुपरिया क्रॉसजवळ गेली आणि गुडघ्यावर बसून,पदर पसरून तिनं डोकं टेकवलं.तिला अशी प्रार्थना करताना मी प्रथमच बघत होतो. चर्चमध्ये प्रार्थना करण्याची पद्धतही अशी नसते, पण या घटकेला आम्ही सर्वचजण प्रणाम आणि प्रार्थनांच्या वेगवेगळ्या पद्धतींचा विचार करण्याच्या पलीकडे जाऊन पोचलो होतो.एक सुजाण,

समंजस हिंदू स्त्री प्रभू येशूचे आशीर्वाद मागेल,तेव्हा धर्म आपोआप मार्ग दाखवेल हे स्वाभाविक होतं.अशा वेळी कोण कुठल्या धर्माचं आहे,याची कुंपणं नसतात,धर्मांच्या व्याख्या नसतातशकसल्याही सीमा नसतात.असते फक्त एक इच्छा,अशा कुठल्यातरी दैवी शक्तीच्या आशीर्वादाची,

जी घायाळ आणि आर्त मनानं प्रार्थना करणाऱ्या माणसाला त्याच्या दुःखामध्ये शांती देईल आणि त्याला हिंमत देईल.ती शक्ती मग ईश्वराची असो,कुठल्या जिंदा सागबानच्या सावलीची असो,एखाद्या डॉक्टरच्या हाताची असो,मित्राच्या हृदयातून आलेली असो की अश्वमेधपुन्या नर्मदेच्या पाण्याची असो कुठूनही मिळत असो.


अरण्यात वणवा पेटतो.अशाच पेटलेल्या वणव्याचे वर्णन मनाला वेदना देवून गेले.


पेटलेली अरण्यं भडभडणाऱ्या ज्वाळांच्या आवाजात स्वतःचा विनाशकारी आवाजही मिसळतात.

गवत,पानं,फांद्या आणि कोण जाणे आणखी काय काय,पेट घेण्यापूर्वी स्वतःच्या अस्तित्वाची अखेरची ओळख दिल्यासारखी एक भयानक किंचाळी फोडतात.

प्रचंड आग तिच्या नुसत्या पेटण्याच्या आवाजानंही भीती उत्पन्न करते.आत्ता या मध्यरात्री तिचं असं दर्शन आणि श्रवण किती भयानक वाटतंय,ते मी शब्दांमध्ये कधीही पूर्णपणे वर्णन करू शकणार नाही!


वेड्या फकिरानं सुरुवात केली.


मैं हूं बंदा तेरा, मैं हूं आशिक तेरा 

मैं तो दीवाना हूं मेरे सिजदों का क्या ? 

मैं नमाजी बनूं, या शराबी बनूं 

बंदगी मेरे घरसे कहां जायेगी ?


(भक्त-भगवान, सेवक-स्वामी, पामर-परम या सर्व नात्यांना छेद देणाऱ्या अशा मस्तीपूर्ण साध्या,सरळ मैत्री संबंधात त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असतं.या देशाच्या संस्कृतीचा पाया कशात आहे? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधातला एक महत्त्वाचा दुवा त्याला सापडला असता.ब्रह्म या संकल्पनेशी असा साधा,सरळ प्रेम करण्याचा,भांडायचा,रुसण्या-मनवण्याचा, अंगाई गीत गाऊन पाळण्यात झोके देण्याचा संबंध,हा या प्रजेला एका दोरीनं बांधून ठेवणाऱ्या अदृश्य धाग्याचा एक तंतू आहे,हे त्याच्या लक्षात आलं असतं. 'बंदगी मेरे घरसे कहां जायेगी'च्या मस्तीत हिंडणारे सुफी संत,'ना मैं कोई क्रिया करम में'चा संदेश हातमागावर विणणारे महामानव, 'अंते तो हेमनुं हेस' म्हणत सर्व भेदभाव विसरून सर्व चराचराकडे एकाच भावनेनं बघणारी मानवरत्नं - या सर्वांचे या प्रजेवर अनंत उपकार आहेत. हजारो वर्षांची संस्कृती जिवंत ठेवण्याची कुवत या प्रजेत आणण्याचं काम अशा ज्ञात आणि अज्ञात अनेकांनी केलं आहे.)


निसर्ग व मानवाचं अनादी आहे.


निसर्गाच्या मांडीवरच बागडत मोठ्या होणाऱ्या या माणसांना निसर्गानं मुक्त आनंदाचं महान दान दिलं आहे.देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा,या आनंदाची मुळं सापडतीलच.निसर्गाशी असलेला हा तादात्म्य भाव प्रत्येक भारतीयाला,प्रत्येक पिढीत,वारशातच मिळत आला आहे.

कदाचित या अशा मनाच्या गाभ्यात असणाऱ्या आनंदालाच आध्यात्मिकता म्हणत असतील? तसंही असेल,पण एवढं खरं,की प्रत्येक माणसाच्या मनात ही भावना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात असतेच.कुठेतरी एखाद्या मनुष्यात हा आनंद त्याच्या परम स्वरूपात प्रकट होतो,तेव्हा तो मनुष्य दैवत्व घेऊन उभा होतो आणि म्हणतो, "अहं ब्रह्मास्मि!" असा माणूस पूजा,धर्म, विधी,कर्मकांड या सर्वांच्या पलीकडे जाऊन पोचतो.तो स्वत:ही निसर्गासारखाच निर्मल आणि श्रद्धावान होऊन जातो. मग तो नमाज पढो,किंवा न पढो,बंदगी त्याला सोडून जाऊच शकत नाही! 'अहं ब्रह्मास्मि' समजावतानाच हेही समजतं,की खरोखर 'अहं' असं काही अस्तित्वातच नाही! जे काही आहे,ते सगळंच 'तत्त्वमसि' आहे!


 "तुम्ही जर झाडाचे पान झालात तर झाड तुम्ही होईल."


जाता.. जाता.. निरोप घेण्यापूर्वी शेवटचा घटना प्रसंग


 " 'Beautiful!" ल्यूसी म्हणाली आणि तिनं नकाशा उघडला.लक्षपूर्वक नर्मदेचं स्थान बघत ती म्हणाली, "सबंध भारताचे बरोबर मध्यावर दोन भाग करते नर्मदा." "माझं मत वेगळं आहे." शास्त्री म्हणाले,"ही या देशाला जोडते.उत्तराखंड आणि दक्षिणपथाला जोडून एकत्र ठेवते रेवा." शास्त्री जरा थांबले आणि दूरवर बघत पुढे म्हणाले, "बेटा,अमरकंटकहून निघून समुद्राला जाऊन मिळते,

तोपर्यंत ही नदी किती श्रद्धा, किती सांत्वना,किती प्रेम, किती आदर,किती पुण्यं आणि अगणित दंतकथांचं सर्जन करते. सर्व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या घरात बसून स्नान करणारे लोकही या नदीचं नाव घेत अंगावर पाणी ओतत असतात.


माणसाचं आयुष्य ही एक मूल्यवान गोष्ट आहे.हीच गोष्ट हे पुस्तक शेवट पणे सांगत आहे.