* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: जेव्हा वेळप्रसंग येतो तेव्हा आपण एकाकीच असतो.ही सांगणारी गोष्ट.. भाग २

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

८/४/२३

जेव्हा वेळप्रसंग येतो तेव्हा आपण एकाकीच असतो.ही सांगणारी गोष्ट.. भाग २

किटी जिनोवेजेबद्दल पहिल्यांदा वाचलं तेव्हा मी विद्यार्थी होतो.माल्कम ग्लॅडवेलचं पदार्पणातील पहिलं वहिलं पुस्तक द टिपिंग पॉइंट हे लाखो लोकांप्रमाणे मी ही अधाश्यासारखं वाचून काढलं होत.त्या पुस्तकाच्या २७व्या पानावर मला त्या ३८ साक्षीदारांबद्दल कळलं.मिलग्रामचं शॉक मशिन आणि झिबार्डोच्या तुरुंग कहाणीसारखीच यादेखील कहाणीने माझ्या मनाची पकड घेतली. त्यानंतर कित्येक वर्षांनी रोझेन्थालने म्हटलं की,'अजूनही मला या कहाणीसंबंधी मेल येतात.लोकांना ही कहाणी पछाडते.ती एखाद्या जादुई रत्नासारखी आहे.तुम्ही तिच्याकडे बघत राहता आणि दर वेळेस नवनव्या गोष्टी तुम्हाला जाणवू लागतात.'१३ एप्रिल शुक्रवारचा तो दुर्दैवी दिवस नाटकं आणि गीतांचा विषय बनला.

सनफिल्ड,गर्ल्स अँड लॉ अँड ऑर्डर या मालिकेचे सगळे भाग याच विषयाला वाहिलेले होते.क्यू गार्डन येथे १९९४मध्ये केलेल्या भाषणात अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी किटीच्या हत्येच्या रक्त गोठवून टाकणाऱ्या संदेशाची आठवण जागवली.अमेरिकेच्या संरक्षण खात्याचे उपसचिव पॉल बुल्फोवित्झ यांनी तर २००३ साली अमेरिकेने इराकवर आक्रमण केलं,त्याचं समर्थन करताना या प्रकरणाचा उल्लेख करून सुचवलं की,या युद्धास विरोध करणारे अमेरिकन लोक हे त्या ३८ साक्षीदारांसारखे निष्क्रिय बघे आहेत.या कहाणीचं तात्पर्य स्पष्ट आहे असं मला वाटत होतं.'किटी जिनोवेजेच्या मदतीला कुणीही का गेलं नसावं ? तर लोक निष्काळजी आणि बेपर्वा होते म्हणून.'या संदेशाने गती पकडल्याने किटी जिनोवेजे हे नाव घरोघरी पोहोचलं होतं तो काळ आणि लॉर्ड ऑफ द फ्लाइज हे पुस्तक सर्वाधिक खपाचं होण्याचा काळ एकच होता.याच काळात आईकमनवर खटला दाखल झालेला होता, स्टॅन्ली मिलग्रामचे 'विजेचे झटके' जगभर पोहोचले होते आणि झिबार्डीने आपल्या कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवली होती.परंतु मी किटीच्या मृत्यूभोवतीच्या परिस्थितीवरील संशोधन वाचू लागलो,

तेव्हा मला एका पूर्णतया वेगळ्याच कहाणीचा सुगावा लागला,पुन्हा एकदा तसं घडलं होतं.बिच तटाने आणि जॉन डालें हे दोन तरुण मानसशास्त्रज्ञ होते.

'आणीबाणीच्या प्रसंगी प्रेक्षक किटीच्या हत्येनंतर लगेचच त्यांनी एक प्रयोग करायचं ठरवलं.प्रयोगातले सहभागी कसलीही आगाऊ पूर्वसूचना न दिलेले कॉलेज विद्यार्थी होते.

त्यांना एका बंद खोलीत एकटच बसून इंटरकॉमवरून सहाध्यायांशी कॉलेज जीवनाबद्दल गप्पा मारा,असं सांगण्यात आलं.फक्त तिथं पलीकडच्या बाजूला कुणीही विद्यार्थी नव्हता.संशोधकांनी त्याऐवजी एक आधीपासून ध्वनिमुद्रित केलेली टेप लावली होती. कुठल्यातरी क्षणी एक आवाज विनवणी करून म्हणत होता,"मला मदतीची गरज आहे,मला कुणीतरी मदत करा.कऽरा मऽदऽत" मग जरा घुसमटल्यासारखा आवाज काढून,"मी मरतोय रे मरतोयऽऽऽ..." त्यानंतर पुढे काय झालं? जेव्हा त्या सहभागी व्यक्तीला वाटायचं की,आपण एकट्यानेच ही मदतीची हाक ऐकली आहे तेव्हा ती धावत धावत बाहेरच्या मार्गित येत असे.एकही अपवाद न वगळता त्या सर्वांनी मार्गिकत धाव घेतली होती;परंतु ज्या मुलाना सांगितलं होतं की,जवळपासच्या खोल्यांमध्ये आणखी पाच विद्यार्थी बसलेले आहेत,त्यांच्यापैकी फक्त ६२ टक्क्यांनी प्रत्यक्ष कृती केली होती... अरेच्चा ! म्हणजे हाच होता का तो निष्क्रिय बघेपणा...

लटाने आणि डालें यांच्या शोधांनी 'सामाजिक मानसशास्त्र' विषयात दिलेलं योगदान भरीवच म्हणावं लागेल.'आणीबाणीच्या प्रसंगी बघे लोक कसं वर्तन करतात.' यावर पुढील वीस वर्षांत हजारहून अधिक लेख आणि पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.क्यू गार्डनमधील - ३८ जणांच्या निष्क्रियतेचं स्पष्टीकरणही या निष्कर्षांमुळे मिळालं आहे किटी जिनोवेजेच्या 

किंकाळ्यांनी 'संपूर्ण वस्ती जागी झाली होती'आणि तरीही किटी मेली होती या मागचं कारण 'संपूर्ण वस्ती जागी झाली होती.'हेच होतं.बाजूच्या इमारतीत राहणाऱ्या महिलेने नंतर एका वार्ताहराला सांगितलेल्या माहितीतून ही गोष्ट उदाहरणासहीत समोर उभी राहते.

तिचा नवरा पोलिसांना बोलवायला निघाला होता तेव्हा तिने त्याला अडवलं होतं,'मी त्याला म्हणाले की,त्यांना तीस बत्तीस फोन गेले असतील आत्तापर्यंत,नको करूस फोन.' याचा अर्थ किटीवरचा हल्ला एखाद्या निर्मनुष्य गल्लीत एकाच साक्षीदारासमोर घडला असता तर ती त्यातून कदाचित वाचलीही असती.

या सगळ्यामुळे किटीच्या प्रसिद्धीत भर पडली. तिच्या कहाणीला मानसशास्त्राच्या 'अव्वल दहा' पुस्तकांत जागा मिळाली.आजही पत्रकार आणि व्यासंगी विद्वान त्या कहाणीचा संदर्भ देतात. महानगरातील धोकादायक 'बिनचेहरे'पणाची ती आधुनिक बोधकथाच बनली आहे.

बरीच वर्षं मी समजत होतो की,'निष्क्रिय बघे प्रवृत्ती' ही महानगरीय जीवनाचा अटळ भाग आहे;पण त्यानंतर मी ज्या शहरात काम करत होतो, तिथंच काहीतरी घडलं,

त्यामुळे मला माझी गृहीतकं पुन्हा एकदा तपासून पाहावी लागली.९ फेब्रुवारी,२०१६चा दिवस होता तो.दुपारी पावणेचार वाजता अँमस्टरडॅममधील कालव्याला लागून असलेल्या स्लोटरकेड रस्त्यावर सॅनीने तिची पांढरी अल्फा रोमियो गाडी लावली. गाडीतून बाहेर पडून ती बाजूच्या आसनावर बसवलेल्या लहान बाळाला घ्यायला वळली. तेवढ्यात तिला जाणवलं की,गाडी तर पुढे पुढेच चालली आहे.सॅनी कशीबशी उडी मारून स्टिअरिंगमागे जाऊन बसली;परंतु ब्रेक दाबायला तोवर उशीर झाला होता त्यामुळे गाडी कालव्यात खाली पडली आणि बुडू लागली.वाईट बातमी-डझनावारी बघे ते घडताना नुसतेच बघत राहिले.तिथे आणखीही काही लोकांनी सॅनीचा आक्रोश ऐकला होता.क्यू गार्डनप्रमाणेच याही ठिकाणी संकट दिसू शकेल अशी अपार्टमेंट्स होती. हीसुद्धा एक टुमदार,उच्च मध्यमवर्गीय वस्तीच होती.परंतु नंतर काहीतरी अनपेक्षित घडलं. 

कोपऱ्यावरील इस्टेट एजन्सीचा मालक रुबेन अब्राहम्स याने नंतर स्थानिक टीव्ही वार्ताहराला सांगितलं,'ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती.मोटार पाण्यात जातेय,हे काही चांगलं नाही.असा विचार मनात येऊन मी ऑफिसातल्या टूलबॉक्समधून हातोडा घेतला आणि त्या थंडगार पाण्यात उडी मारली.

तो उंच,कमावलेल्या शरीराचा,दाढीचे केस पांढरे होऊ लागलेला रुबेन जानेवारीतल्या एका थंडगार दिवशी मला भेटला.हा प्रसंग कुठे घडला ते त्यानं मला दाखवलं.'तो अगदी विचित्र योगायोगच होता,सगळ्या गोष्टी अगदी निमिषार्धात घडून आल्या.' रुबेननं कालव्यात उडी मारली तेव्हा आणखी एक प्रेक्षक रिंक केंटी यानंही पाण्यात उडी मारलेली होती आणि तो बुडत्या मोटारीकडे जात होता.

त्याशिवाय रायनर बॉश हा आणखीही एक प्रेक्षक पाण्यात शिरला होता.अगदी शेवटच्या क्षणी रायनरच्या हातात एका महिलेनं एक वीट दिली होती,काही

क्षणांनी त्या विटेचं महत्त्व कळणार होतं. त्याशिवाय बित्झे मॉल हा चौथा प्रेक्षकही आणीबाणीच्या वेळेस वापरायचा त्याच्या गाडीतला हातोडा घेऊन सर्वांत शेवटी पाण्यात गेला होता.रुबेननं सांगितलं,'आम्ही खिडक्यांवर हातोडा मारू लागलो.'रायनरनं कडेची खिडकी फोडण्याचा प्रयत्न केला;पण ते काही केल्या जमेना.

दरम्यानच्या काळात गाडी वळून इंजिनाच्या बाजूनं खाली गेली.तेव्हा रायनरनं मागच्या खिडकीवर जोरात वीट हाणली,सरतेशेवटी ती खिडकी फुटली.त्यानंतर सगळं काही विजेच्या वेगानं घडलं.आईनं तिचं बाळ मागच्या खिडकीतून माझ्या हातात दिलं.क्षणभर ते मूल अडकलं.'परंतु काही सेकंदांतच रुबेन आणि रायननं बाळाला बाहेर काढलं.रायनर बाळाला घेऊन सुरक्षित जागी गेला;पण आई अजूनही गाडीतच होती.गाडी पाण्यात पूर्णपणे बुडणार एवढ्यात रुबेन,रिंक अणि वित्झे यांनी तिला बाहेर यायला मदत केली.

त्यानंतर दोनपेक्षाही कमी सेकंदांत गाडी कालव्याच्या त्या शाईसारख्या काळ्याशार पाण्यात दिसेनाशी झाली.तोपर्यंत पाण्याच्या बाजूला प्रेक्षकांचा मोठा जमावच गोळा झाला होता.त्यांनी आई,बाळ आणि त्या चार पुरुषांना पाण्यातून बाहेर यायला मदत केली,अंगाभोवती गुंडाळायला टॉवेल दिले.ही सुटकेची कारवाई केवळ दोन मिनिटांतच घडून आली होती.या सगळ्या काळात ते चार अनोळखी पुरुष एकमेकांशी एक शब्दही बोलले नव्हते.त्यांच्यातील एकालाही हालचाल करायला एखाद्या सेकंदाचाही विलंब झाला असता तर मग काहीही उपयोग झाला नसता.त्या चौघांनी पाण्यात उडी मारली नसती तर सुटकेत अपयश येऊ शकलं असतं.त्या निनावी महिलेनं शेवटच्या क्षणी रायनरला वीट दिली नसती तर त्याला गाडीची मागची खिडकी फोडता आली नसती आणि आईला व बाळाला बाहेर काढता आलं नसतं.वेगळ्या शब्दांत सांगायचं तर सॅनी आणि तिचं बाळ पुष्कळ मोठ्या संख्येनं प्रेक्षक असूनही वाचले नव्हते,तर ते प्रेक्षक मोठ्या संख्येनं हजर होते म्हणून वाचले होते.आता तुम्ही विचार कराल की,ही अगदी हृदयस्पर्शी कहाणी आहे;पण मग हा निष्क्रिय बघ्यांच्या नियमाचा अपवाद आहे की डच संस्कृतीतच असं काहीतरी खास होतं किंवा अँमस्टरडॅममधील त्या वस्तीत किंवा अगदी त्या चार माणसांतच काहीतरी खास होतं आणि त्यामुळे हे नियम विसंगत कृत्य घडून आलं?

तर तसं काहीही झालं नव्हतं म्हणजे निष्क्रिय बघ्यांचा नियम अजूनही बऱ्याच शैक्षणिक पुस्तकात शिकवला जात असला तरी २०११ साली प्रकाशित झालेल्या एका तौलनिक विश्लेषणात (मेटा अँनेलिसिस) संकट समयी बघे लोक काय करतात,यावर नव्याने प्रकाश टाकण्यात आला आहे

तौलनिक विश्लेषण म्हणजेच मेटा अँनेलिसिस हे वेगवेगळ्या संशोधनांवर केलेलं संशोधन असतं. त्यात वेगवेगळ्या गटांनी केलेल्या अभ्यासांचा समावेश असतो.संकटकाळातील बघ्यांच्या वर्तनावर मागील ५० वर्षांत महत्त्वाचे असे १०५ अभ्यास करण्यात आले त्या सर्व अभ्यासांचा 'अभ्यास' या तौलनिक विश्लेषणात करण्यात आला होता.त्यात लटाने - डार्ले यांनी केलेल्या (खोलीतील विद्यार्थ्यांच्या) अगदी सुरुवातीच्या प्रयोगाचाही समावेश होता.त्यातून दोन महत्त्वाचे निष्कर्ष निघाले.एक निष्क्रिय बघ्यांचा परिणाम अस्तित्वात असतो. कधी कधी बघे विचार करतात की,संकट समयी आपण मध्ये पडण्याची गरज नाही,कारण दुसऱ्या कुणीतरी ती जबाबदारी घेणं अधिक उपयुक्त ठरेल.कधी कधी त्यांना भीती वाटते की, आपण काहीतरी चुकीचं करून बसू,त्यामुळे टीकेला घाबरून ते पुढे येत नाहीत.तर कधी कधी तिथं काही चुकीचं घडतंय असं त्यांना वाटत नाही.कारण,बाकीचे कुणीच पुढे येऊन कृती करताना दिसत नाहीत.आणि दुसरा निष्कर्ष ? जर संकट जीवावरचं असेल म्हणजे कुणीतरी बुडतंय अथवा कुणावर तरी हल्ला होतोय,अशा वेळेस बघे लोक एकमेकांशी संवाद साधू शकले (म्हणजे ते वेगवेगळ्या खोल्यांत एकेकटे नसले तर ते असण्याचा परिणाम बरोब्बर उलटा होतो.त्या लेखकाने लिहिलं होतं की,'जास्तीच्या संख्येने बघे असले तर कमी मदत मिळण्याऐवजी जास्तच मिळते.' हे तेवढंच नाही.रुबेननं उत्स्फूर्तपणे मदत करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मी त्याची मुलाखत घेतली,त्यानंतर मी डॅनिश मानसतज्ज्ञ मेरी लिंडगार्ड यांना अँमस्टरडॅममधल्या एका कॅफेत भेटलो. अंगावरील पावसाचे थेंब झटकतच त्या खुर्चीवर बसल्या आणि लॅपटॉप उघडून माझ्यासमोर कागदाचा गठ्ठा टाकून त्यांनी जवळ जवळ व्याख्यानच द्यायला सुरुवात केली.

हे सगळे उफराटे प्रयोग,प्रश्नावल्या भरून घेणं, मुलाखती वगैरे भानगडी का करायच्या असा प्रश्न विचारणाऱ्या पहिल्या संशोधकांत लिंडगार्ड यांचं नाव आहे.त्यांचं म्हणणं होतं की,त्याऐवजी आपण खऱ्या परिस्थितीत सापडलेल्या खऱ्या लोकांचं खरं चित्रीकरणच का नाही बघत? शेवटी काय,आधुनिक शहरांत सगळीकडे कॅमेरे तर लावून ठेवलेले असतातच.'खूपच उत्तम कल्पना! परंतु आपल्याला ते चित्रीकरण मिळणारच नाही.'मेरीला सहकाऱ्यांनी उत्तर दिलं.त्यावर मेरी म्हणाली,'आपण पाहू या ते.' त्यामुळे नंतरच्या काळात मेरीकडे भरपूर माहिती

संग्रह जमला.त्यात कोपनहेगन, केपटाऊन, लंडन आणि अँमस्टरडॅम येथील हजारभर व्हिडिओ होते.त्यात हमरीतुमरीवरील भांडणं,बलात्कार,खुनाचे प्रयत्न अशा प्रकारची चित्रणं होती.त्यांनी काढलेल्या निष्कर्षांतून सामाजिक शास्त्रात एक छोटीशी क्रांतीच घडून आली.त्यांनी माझ्या दिशेनं लॅपटॉप सरकवून म्हटलं, "पाहा, उद्या आम्ही हा लेख एका आघाडीच्या मानसशास्त्रावरील नियतकालिकाकडे पाठवत आहोत.'

मी त्यावरचा कच्चा मथळा वाचला - निष्क्रिय बघ्यांच्या परिणामाबद्दल आपल्याला बरंच काही माहिती आहे,असं जे वाटतं ते सगळं चुकीचं आहे.लिंडगार्डनी कर्सर खाली सरकवला आणि एका सारणीकडे निर्देश केला,

"हे बघा,इथे तुम्हाला दिसेल की,नव्वद टक्के प्रकरणांत लोकांनी एकमेकांना मदत केलेली आहे." नव्वद टक्के.

थांबा अजून गोष्ट पुढे आहे...