* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: गौतम बुद्ध - त्रिपिटक (इ.स.पू.पहिलं शतक) भाग २

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२२/४/२३

गौतम बुद्ध - त्रिपिटक (इ.स.पू.पहिलं शतक) भाग २

'त्रिपिटक' या ग्रंथामध्ये आयुष्य चांगल्या रीतीनं कसं जगावं याविषयी सांगितलं आहे.बुद्धानं दुःख,

समुदय,निरोध आणि मार्ग अशी चार आर्यसत्ये सांगितली आहेत.बुद्धानं सांगितलेल्या आर्य

सत्यांमध्ये पहिल्यांदा दुःख आहे.त्यानंतर त्या दुःखाचा समुदय म्हणजेच त्या दुःखाची कारणं आहेत आणि नंतर त्या दुःखाचा निरोध म्हणजेच त्या दुःखाचं निवारण आहे.त्या दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग म्हणजे दुःख निवारणाचा मार्गही सांगितला आहे. बुद्ध म्हणतात,आनंद दोन प्रकारचे असतात.

आपल्याला हवं ते मिळालं की आनंद होतो.खरं तर हा आनंद क्षणिक असतो आणि काही क्षण यात आनंद मिळाल्याचा केवळ भास होतो.खरं तर आपण या क्षणिक आनंदाच्या हव्यासासाठी दुःखालाच आमंत्रण देत असतो आणि दुसरा आनंद समाधी अवस्था प्राप्त झाल्यावर मिळतो.हा खरा आनंद असल्याचं बुद्ध सांगतो.तसंच दुःखाचं कारण मनुष्य नेहमीच दुसऱ्याकडे बोट दाखवून सांगतो.दुसऱ्या कोणामुळे तरी आपल्याला दुःख भोगावं लागतंय असं त्याला वाटत राहतं.तो नेहमी याबाबतीत दुसऱ्याला दोष देत राहतो.मात्र आपली स्वतःची न संपणारी तृष्णा आणि भूक हेच खरं तर दुःखाचं कारण असतं आणि तेच मनुष्याला समजत नाही.

त्याला जे हवं,ते मिळाल्यावर त्यानं सुखी व्हायला हवं;पण प्रत्यक्षात तसं होत नाही.ती गोष्ट मिळाल्या

नंतर पुन्हा दुसऱ्या गोष्टीची तहान त्याच्या मनात निर्माण होते.तसंच इतरांपेक्षा मी जास्त चांगला आहे असं दाखवत राहणं या हव्यासापोटीदेखील मनुष्य दुःखाला आमंत्रण देत राहतो.त्यामुळे बुद्ध सांगतात की,इतरांना दोष न देता,स्वत:च्या अंतर्मनात माणसानं डोकावून बघायला हवं.'मी' आणि 'माझा' हे शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाकले पाहिजेत आणि अंतर्मनात डोकावून बघितलं तर दुःखाचं निवारण करण्याचा मार्ग सहजपणे सापडतो. 


दुःखाच मूळ कारण समोरचा नसून आपणच आहोत हे सत्य जेव्हा मनुष्याला कळतं,तेव्हा त्याला त्या दुःखाला दूर करण्याचा मध्यम मार्ग किंवा उपायही सापडतो.


गौतम बुद्धांनी 'त्रिपिटक' या ग्रंथामध्ये अष्टांग योगाविषयी सांगितलं आहे.खरं तर महर्षी पतंजलीनं या अष्टांग योगाविषयी पहिल्यांदा माहिती दिली.यम,नियम,आसन,

प्रत्याहार, प्राणायाम,ध्यान,धारणा आणि समाधीविषयी सांगितलं;पण सर्वसामान्य लोकांना समाधी म्हणजे काय हे नीटपणे समजलं नव्हतं.ते बुद्धानं त्यांना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितलं.बुद्धान आयुष्यात येणाऱ्या दुःखाविषयी वक्तव्य केलं.त्यानं दुःखाच्या निवारणासाठी अष्टांग मार्ग (उपाय) सांगितले.

पहिला अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी!बुद्धानं प्रत्येक वेळी 'सम्यक' हा शब्द वापरला आहे. सम्यक या शब्दाचा अर्थ म्हणजे मध्यम मार्ग होय,तर पहिला अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी म्हणजे जे आहे ते तसंच बघणं.आपले पूर्वग्रह, आपली समजूत त्यामध्ये न आणता निरपेक्षपणे ती गोष्ट बघणं.दुसरा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक संकल्प ! जे करण्यायोग्य आणि करण्यासारखं आहे त्याचा संकल्प करणं.तिसरा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक वाक् होय.जसं आहे तसं आणि तेच बोलणं.थोडक्यात,मनात एक आणि बाहेर एक असं बोलायचं नाही.चवथा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक कर्म.याचा अर्थ आपलं अंतःकरण जे सांगतं त्याप्रमाणे कृती करणं. इतरांचं ऐकून कुठलीही गोष्ट न करणं.पाचवा मार्ग सम्यक जीविका,सम्यक जीविका म्हणजे उपजीविकेसाठी उत्पन्न मिळवण्याचा मार्ग शोधणं.मात्र हे करताना कुठल्याही हानिकारक मार्गाचा अवलंब न करणं.

सहावा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक प्रयास,सम्यक प्रयास म्हणजे कुठल्याही कामासाठी आळस न बाळगता आवश्यक ते प्रयत्न करणं.सातवा अष्टांग

मार्ग म्हणजे सम्यक स्मृती,सम्यक स्मृतीनुसार योग्य गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि निरर्थक गोष्टी विसरून जाव्यात.आठवा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक समाधी,

सम्यक समाधी म्हणजे कुठल्याही मादक द्रव्याचा आधार न घेता समाधीवस्थेला पोहोचणं होय.


'त्रिपिटक' या ग्रंथामध्ये बुद्धकाळातल्या भारताची राजनीती,अर्थनीती,सामाजिक आहेत.व्यवस्था,

शिल्पकला,संगीतकला,वेशभूषा, पेहराव,रीतिरिवाज,

ऐतिहासिक,भौगोलिक आणि व्यापाराची परिस्थिती असे अनेक विषय मांडले आहेत.तसंच बौद्ध भिक्खूंनी कसं आचरण केलं पाहिजे याविषयीचे नीतिनियमही यात सांगितले आहेत.यात जातककथाही सामील आहेत.हिंदू धर्मामध्ये रामायण आणि महाभारत यातल्या कथांना जे महत्त्व किंवा जे स्थान आहे,तेच स्थान बौद्ध धम्मामध्ये जातक कथांना आहे.जातक गोष्टींचा आधार घेऊन सांगितला आहे.यातून माणसाला अनेक दृष्टांत दिले आहेत.या कथांचं साहित्यिक मूल्यही खूप महत्त्वाचं आहे.जातक कथा एक प्रकारे बोधकथाच आहेत.जातक कथा आज जगभर पसरल्या.गौतम बुद्धानं कुठल्याही चमत्कारांकडे माणसाचं लक्ष वेधलं नाही. आकाशात कुठली तरी शक्ती आहे किंवा कुठला तरी गुरू बसलेला आहे किंवा कुठल्या तरी मंत्राचं पठण करा,अशा कुठल्याही गोष्टींचं अवडंबरसुद्धा बुद्धानं सांगितलं नाही.

अशा गोष्टी करून सगळं काही आलबेल होईल,अशी खोटी आशा बुद्धानं दाखवली नाही,तर प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपलीच असल्याचं बुद्धानं सांगितलं.आपली चूक निस्तरणं,आपली चूक कळल्यावर ती पुन्हा न करणं या गोष्टी आपल्याच हातात असतात,असं बुद्ध सांगतो. स्वर्ग,नरक आणि पुनर्जन्म अशा गोष्टींना बुद्धानं पूर्णपणे नाकारलं आहे.


बौद्ध धम्म ईश्वर आणि आत्मा अशा संकल्पनांवर विश्वास ठेवत नाही.आपलं कर्म हेच आपल्या जीवनात सुख आणि दुःख आणतं,असं बौद्धधम्मीय मानतात.'क्रोधाला प्रेमानं,वाईटाला चांगुलपणानं,

स्वार्थाला औदार्यानं आणि खोटारड्या व्यक्तीला खरेपणानं जिंकलं जाऊ शकतं,असं बुद्धानं सांगितलं. 

चांगल्या आणि आपल्याला आवडणाऱ्या कामाचा शोध घ्या आणि त्या कामात स्वतःला झोकून द्या आणि मग बघा तुम्हाला निर्भेळ आनंद कसा भरभरून मिळतो,असंही बुद्ध म्हणत असे.


गौतम बुद्धानं जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श करत त्यावर सखोल भाष्य केलं आहे.मनुष्याचा आहार कसा काय आणि किती असला पाहिजे यावरही त्यानं 'त्रिपिटक'मध्ये सांगितलं आहे. खरं तर,सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शेती आणि शेतकरी,या विषयात बुद्धाचा अभ्यास आजही चकित करणारा आहे असं म्हटलं जातं,की राजा शुद्धोधन हा शाक्यवंशीय असल्यानं ही मंडळी व्यापक प्रमाणात शेती करत आणि त्यामुळे राजपुत्र सिद्धार्थचा बराच काळ शेतजमिनीवरची निरीक्षणं करण्यात गेला होता. 'त्रिपिटक' या ग्रंथात चांगली पिकं येण्यासाठी कशा प्रकारची जमीन असायला हवी याविषयी बोलताना त्यानं सुपीक आणि नापीक जमिनीविषयी सांगितलं आहे.तसंच शेतजमिनीतले आठ प्रकारचे दोष सांगितले आहेत.कधी,कुठल्या प्रकारची पिके घ्यायला हवीत,त्यात पाण्याचं प्रमाण कसं असायला हवं इथपासून अनेक बारीकसारीक गोष्टी गौतम बुद्धानं सांगितल्या आहेत.त्यामुळेच बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी गौतम बुद्धाला 'भूमिपुत्र' असं म्हटलं आहे. 'भूमिपुत्र', 'तथागत' प्रमाणेच गौतम बुद्धाला 'सुगत' या नावानंही संबोधलं जातं.ज्यानं सत्यापर्यंत, सर्वोत्तम ध्येयापर्यंत सम्यक रीतीनं गमन केलं आहे त्याला 'सुगत' असं म्हटलं जातं! व्यापाराविषयीदेखील बुद्धान 'त्रिपिटक' मध्ये सविस्तर विवेचन केलं आहे.स्त्री-पुरुष समानतेचा स्पष्ट उल्लेखही त्यानं या ग्रंथात केला आहे.


जगविख्यात मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम यानं 'टू हॅव ऑर टू बी' या आपल्या ग्रंथात गौतम बुद्धाविषयी सातत्यानं गौरवोद्गार काढले आहेत.दुःखाच्या प्रश्नावर बोलताना एरिक फ्रॉमनं आवर्जून बुद्धाच्या विचारांचा दाखला घेऊन मांडणी केली आहे.


'त्रिपिटक' ग्रंथ अभ्यासला,तर मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा केलेला अभ्यास यात सापडतो.'आळस आपल्याला आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू देत नसल्यानं तो टाळा.कोणी निंदा केली तर वाईट वाटून घेऊ नका,कारण स्वत:चा शोध


गौतम बुद्धानं कुठल्याही चमत्कारांकडे माणसाचं लक्ष वेधलं नाही.आकाशात कुठली तरी शक्ती आहे किंवा कुठला तरी गुरू बसलेला आहे किंवा कुठल्या तरी मंत्राचं पठण करा,अशा कुठल्याही गोष्टींचं अवडंबरसुद्धा बुद्धानं सांगितलं नाही.अशा गोष्टी करून सगळं काही आलबेल होईल,अशी खोटी आशा बुद्धानं दाखवली नाही,तर प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपलीच असल्याचं बुद्धानं सांगितलं. आपली चूक निस्तरणं,आपली चूक कळल्यावर ती पुन्हा न करणं या गोष्टी आपल्याच हातात असतात.

असं बुद्ध सांगतो.


स्वर्ग,नरक आणि पुनर्जन्म अशा गोष्टींना बुद्धानं पूर्णपणे नाकारलं आहे.बौद्ध धम्म ईश्वर आणि आत्मा अशा संकल्पनांवर विश्वास ठेवत नाही. आपलं कर्म हेच आपल्या जीवनात सुख आणि दुःख आणतं, असं बौद्धधम्मीय मानतात. 'क्रोधाला प्रेमानं, वाईटाला चांगुलपणानं, स्वार्थाला औदार्यानं आणि खोटारड्या व्यक्तीला खरेपणानं जिंकलं जाऊ शकतं, असं बुद्धानं सांगितलं. चांगल्या आणि आपल्याला आवडणाऱ्या कामाचा शोध घ्या आणि त्या कामात स्वतःला झोकून द्या आणि मग बघा तुम्हाला निर्भेळ आनंद कसा भरभरून मिळतो, असंही बुद्ध म्हणत असे.


गौतम बुद्धानं जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श करत त्यावर सखोल भाष्य केलं आहे. मनुष्याचा आहार कसा काय आणि किती असला पाहिजे यावरही त्यानं 'त्रिपिटक'मध्ये सांगितलं आहे. खरं तर, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शेती आणि शेतकरी. या विषयात बुद्धाचा अभ्यास आजही चकित करणारा आहे.असं म्हटलं जातं,की राजा शुद्धोधन हा शाक्यवंशीय असल्यानं ही मंडळी व्यापक प्रमाणात शेती करत आणि त्यामुळे राजपुत्र सिद्धार्थचा बराच काळ शेतजमिनीवरची निरीक्षणं करण्यात गेला होता.'त्रिपिटक' या ग्रंथात चांगली पिकं येण्यासाठी कशा प्रकारची जमीन असायला हवी याविषयी बोलताना त्यानं सुपीक आणि नापीक जमिनीविषयी सांगितलं आहे.तसंच शेतजमिनीतले आठ प्रकारचे दोष सांगितले आहेत.कधी, कुठल्या प्रकारची पिके घ्यायला हवीत,त्यात पाण्याचं प्रमाण कसं असायला हवं इथपासून अनेक बारीकसारीक गोष्टी गौतम बुद्धानं सांगितल्या आहेत.त्यामुळेच बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी गौतम बुद्धाला 'भूमिपुत्र' असं म्हटलं आहे. 'भूमिपुत्र', 'तथागत' प्रमाणेच गौतम बुद्धाला 'सुगत' या नावानंही संबोधलं जातं.ज्यानं सत्यापर्यंत, सर्वोत्तम ध्येयापर्यंत सम्यक रीतीनं गमन केलं आहे त्याला 'सुगत' असं म्हटलं जातं! व्यापाराविषयीदेखील बुद्धान 'त्रिपिटक' मध्ये सविस्तर विवेचन केलं आहे.स्त्री-पुरुष समानतेचा स्पष्ट उल्लेखही त्यानं या ग्रंथात केला आहे.


जगविख्यात मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम यानं 'टू हॅव ऑर टू बी' या आपल्या ग्रंथात गौतम बुद्धाविषयी सातत्यानं गौरवोद्गार काढले. आहेत. दुःखाच्या प्रश्नावर बोलताना एरिक फ्रॉमनं आवर्जून बुद्धाच्या विचारांचा दाखला घेऊन मांडणी केली आहे. 'त्रिपिटक' ग्रंथ अभ्यासला, तर मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा केलेला अभ्यास यात सापडतो. 'आळस आपल्याला आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू देत नसल्यानं तो टाळा.कोणी निंदा केली तर वाईट वाटून घेऊ नका,कारण स्वत:चा शोध घेण्याची ती एक चांगली संधी आहे असं समजा,'असं बुद्धानं म्हटलंय. 


आपल्या मतांच्या बाबतीत दुराग्रही न राहता लवचीक राहण्याचा सल्ला बुद्ध देतो.'अत्तदीप व्हा,'असं गौतम बुद्धानं म्हटलं.याचा अर्थ अत्तदीप म्हणजे हा माणसाला स्वतःचा कणा देणारा विचार असून जीवन जगण्यासाठी स्वतः च्या प्रत्येक कृतीची जबाबदारी माणसानं स्वत च घेतली पाहिजे आणि निर्भयपणे,प्रसन्नपणे जीवनाला सामोरं गेलं पाहिजे.'मी सांगतो म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका,तर कुठल्याही प्रश्नाची चिकित्सा करा,प्रश्न विचारा आणि त्यानंतर डोळसपणे निर्णय घ्या'असंही बुद्ध म्हणतो. आपल्या वाणीची चार दुश्चरितं बुद्धानं सांगितली आहेत.ती म्हणजे खोटं बोलणं,चहाडी करणं,कठोर बोलणं आणि वायफळ बोलणं! याउलट वाणीची चार सुचरितं म्हणजे सत्य बोलणं,चहाडी न करणं,मधुर बोलणं आणि अर्थपूर्ण बोलणं.! विख्यात भारतीय इतिहासकार डी. डी. कोसंबी यांनी बोधिसत्त्व हे बुद्ध आणि त्यांच्या धम्मावर मराठीतून नाटक लिहिलं आणि १९४५ मध्ये ते ग्रंथरूपात प्रसिद्धही केलं.हे नाटक चार अंकी आहे.इतिहासातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातल्या अनेक धर्माचा खोलवर अभ्यास केला आणि त्यांना बौद्ध धम्मातल्या तत्त्वांची व्यापकता भावली. त्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी अस्पृश्यतेचा कलंक मिटवत बौद्ध धम्माचा स्वीकार केला. ज्या वेळी स्त्रिया आणि शूद्र यांना समाजात अतिशय दुय्यम स्थान होतं,अशा वेळी बौद्ध धम्मानं या वर्गाला आपलंसं केलं,त्यांच्यात समतेचं मूल्य पेरलं.आज जगभरात ५३. कोटी इतकी बौद्धधम्मीय लोकांची लोकसंख्या आहे. एकूण लोकसंख्येच्या ७% लोक बौद्धधम्मीय आहेत.बौद्ध धर्माचा प्रसार करण्यात सम्राट अशोकाचं प्रचंड मोठं योगदान आहे.भारत,चीन, जपान,इंडोनेशिया,कंबोडिया असा हा जगभर पसरलेला एक मोठा आणि महत्त्वाचा आणि तिसऱ्या क्रमांकाचा धम्म आहे.म्हणूनच बौद्ध धम्माचे संस्थापक गौतम बुद्ध आणि 'त्रिपिटक' या ग्रंथाला मार्गदर्शक मानून बौद्ध धम्माचे अनुयायी आज वाटचाल करतात!


एक क्षण एका दिवसाला बदलू शकतो. एक दिवस एक जीवन बदलू शकतो आणि एक जीवन संपूर्ण जगाला बदलू शकतं.


गौतम बुद्ध


समाप्त..