* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: देव अंतराळवीर होते का?

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२४/४/२३

देव अंतराळवीर होते का?

बायबलमध्ये गूढ गोष्टी खूप आहेत आणि परस्पर विरोधीही,जिनिसीस म्हणजे जग निर्मितीची सुरुवात,पण ती अगदी भूरचनेच्या शास्त्राला धरूनच लिहिलेली आहे.हे लिहिणाऱ्याला कसे माहीत होते की प्रथम खनिजे निर्माण झाली,मग वनस्पती जीवन आणि नंतरच प्राणी निर्माण झाले म्हणून ?

मानव प्राण्याच्या निर्मितीची वेळ आल्यावर देव म्हणतो,'आता आपण मानव प्राणी निर्माण करू या की जो अगदी आमचीच प्रतिकृती असेल.'

देव अनेक वचनात का बोलतो?

'मी' नाही, 'आम्ही !'

'माझ्यासारखा' नाही तर 'आमच्यासारखा ! '

जगातला एकमेव देव बोलत असेल तर त्याने एक वचनात

का बोलू नये?

'मग पृथ्वीवरील लोकसंख्या वाढायला लागली आणि मुलीही जन्माला यायला लागल्या.जेव्हा देवपुत्रांनी या मुली पाहिल्या तेव्हा स्वतःच्या बायका म्हणून त्यांनी त्यांचा स्वीकार केला.' एकच अति प्राचीन देव इस्रायलमध्ये असताना हे देवपुत्र कुठून आले?


 पूर्वी पृथ्वीवर धिप्पाड माणसे होती.पृथ्वीवरील स्त्रिया आणि देवपुत्रांची मुलेही तशीच धिप्पाड होती.


सर्व जगातील सर्व देशांच्या महाकाव्यात, टिआहुआन्को,

एस्किमो यांच्या पुराणकथात,सारखे हे धिप्पाड लोक पानापानातून डोकावत असतात.ही धिप्पाड माणसे होती कोण?अजस्त्र दगड सहज एकमेकांवर चढवून प्रचंड इमारती बांधणारे हेच आपले पूर्वज होते ?की तांत्रिक ज्ञानात तरबेज असलेले परग्रहांवरील अंतराळवीर ते हेच?


बायबलमध्ये सोडोम आणि गोमारा या शहरांवर कोसळलेल्या आपत्तीचे अत्यंत खळबळजनक वर्णन आहे.या शहरातले लोक इतके पापी बनलेले असतात की त्यांचा नाश करण्याचे देवाने ठरविलेले असते.मात्र लॉट कुटुंबातील माणसांना वाचविण्याची देवाला इच्छा असते.


शहराच्या वेशीवरच लॉट बसलेला असताना देवाने पाठविलेले दोन 'देवदूत' त्याच्याकडे येतात.हे देवदूत दिसायला तरी माणसांसारखे असावेत;कारण लॉट त्यांना ओळखतो आणि आग्रहाने घरी घेऊन जातो.शहरात अनाचार तर इतका बोकाळलेला की या पाहुण्यांवर सुद्धा सोडोममधल्या लोकांची 'वाईट' नजर पडते.पण पाहुणे पडले शेवटी देवदूतच! त्यांच्यामागे लागलेल्या एका टोळक्यातील सर्वजणांना ते एक फटक्यात आंधळे करून टाकतात.


देवदूत लॉटला सांगतात की,या शहरात तुझी मुले,मुली,

जावई,नातेवाईक वगैरे कोणी असतील तर त्यांना ताबडतोब शहराबाहेर काढ.या शहराचा नाश होणार आहे. लॉट त्याप्रमाणे इतरांना सांगतो पण लॉटची कुणीच नातेवाईक मंडळी लॉटने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवीत नाहीत.सहाजिकच आहे;अशा बातमीवर कोण एकदम विश्वास ठेवणार !


पहाट होते.मग मात्र देवदूत सांगतात की आता तू निदान तुझी बायको आणि दोन मुली यांना बरोबर घे आणि वेळ न दडवता इथून निघ. शहराच्या नाशाची वेळ जवळ येत आहे.तरीही लॉट कांकू करायला लागल्यावर ते या सर्वांचा हात धरूनच शहराबाहेर येतात आणि सांगतात की जीव वाचवायचा असेल तर आता धावत सुटा मागे सुद्धा वळून बघू नका आणि पर्वतात पळून जा.घाई करा.याहून जास्ती आम्ही काहीच करू शकणार नाही.


हे सर्व वाचल्यावर सोडोमच्या रहिवाशांना नव्हती अशी माहिती त्या देवदूतांना होती असे नाही वाटत ? शहराच्या नाशाची वेळ ठरलेली होती. जवळ येत होती.आणि त्याची कल्पना देवदूतांना होती असे नाही वाटत ? 


सोडोमला खरोखर काय घडले ? सर्व शक्तिमान देवाला शहराचा नाश करण्यासाठी वेळापत्रकाची जरुरी का भासावी ? देवदूतांच्या घाईचा दुसरा अर्थ काय लावायचा? घटके घटकेला शहराचा नाश होण्याचा क्षण जवळ येत होता याची पूर्ण जाणीव त्या देवदूतांना होती असे यावरून नाही वाटत? मग ती वेळ निश्चितपणे आधीच ठरलेली असली पाहिजे.


पर्वतांवरच का जायचे? मागे वळून का पहायचे नाही ? गंभीर गोष्टींबद्दल विचारू नयेत असे प्रश्न आहेत खरे हे.


जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब पडल्यापासून त्यांच्या विध्वंसक शक्तीची पूर्ण कल्पना आपल्याला आली आहे.

किरणोत्सर्गाने काय हाहा:कार उड़तो हे आपल्याला ठाऊक आहे.क्षणभर समजा की सोडोम आणि गोमारा या शहरांचा नाश अगदी विचारपूर्वक,ठरवून करण्याचे ठरविले होते.धोकादायक किरणोत्सर्गी पदार्थ आणि त्याचबरोबर शहरातील लोक यांचा नाश करण्याची कालबद्ध योजना आखली होती. त्यामुळेच शहराच्या नाशाचा क्षण अगदी अटळ होता.लॉटसारख्या कुटुंबातील जे लोक वाचावेत अशी देवाची इच्छा होती ते स्फोटाच्या केंद्रबिंदूपासून कित्येक मैल लांब पर्वतात असणेच आवश्यक होते.कारण अणुस्फोटापासून निर्माण होणारा धोकादायक किरणोत्सर्ग पर्वतावरील खडकच शोषून घेऊ शकतात,अडवू शकतात.


तरीही लॉटची बायको मागे वळून पाहते आणि क्षणार्धात मरून पडते.मग गंधक आणि अग्नी यांच्या वर्षावाने देव शहराचा संपूर्ण नाश घडवतो.दुसऱ्या दिवशी एखाद्या भट्टीतून येणाऱ्या धुरासारखा धूर सर्व शहरावर पसरलेला दिसत होता असे वर्णन आहे.


आपल्या पूर्वजांपेक्षा आपण कमी धार्मिक आहोत असे मुळीच नाह.पण अंधश्रद्धा आपल्याकडे कमी आहे.

भोळसटपणाही कमी आहे.देवाने मानवाची निर्मिती केली खरी पण आपल्या कृत्याचा त्याला नंतर पश्चात्तापच झाला असावा.कारण नंतर त्यानेच स्वतःच्या निर्मितीचा नाश केला.अपरंपार दयाळू देवाने पक्षपातीपणा करून त्याच्या आवडत्या काही जणांवर दया दाखवावी आणि इतरांचा नाश घडवून आणावा ही कल्पना आपल्या डोळ्यांसमोर,मनासमोर देवाची म्हणून जी प्रतिमा हजारो वर्षापासून आहे तिच्याशी संपूर्णतः विसंगत आहे असे नाही वाटत?


ओल्ड टेस्टमेंटमध्ये देव किंवा देवदूत प्रचंड आवाज करीत आणि धुराचे लोट सोडीत कसे येत याची अनेक वर्णने आहेत.कल्पकतापूर्ण पण स्पष्ट आणि वास्तव अशी वर्णने इझिकेलची आहेत.


इझिकेल हा एक धर्मगुरू होता.कोणत्याही गोष्टीचे वर्णन करण्याची त्याची हातोटीही विलक्षण होती.त्याच्या शिकवणुकीचा छोटासा भागच पुस्तकरूपाने बायबलमध्ये आहे.


उत्तरेकडून प्रखर प्रकाश पाडीत,धुराचे लोट सोडीत,वाळवंटातील वाळू उडवीत देवांचे चमकदार अंतराळयान कसे येते याचे तो वर्णन करतो.

सर्वशक्तिमान देव आपली अंतराळयाने ठराविक दिशेनेच का आणत होते ? ते सर्वशक्तिमान असतील तर त्यांना केव्हाही, कसेही,कुठेही जाता यायला पाहिजे.सामर्थ्यशाली देवांना काहीच अशक्य नसावे ना? पृथ्वीचे भ्रमण लक्षात घेऊन आज आपण आपली अंतराळयाने ठराविक दिशेने सोडतो आणि परत आणतो पण देवांनासुद्धा ही गोष्ट का लक्षात ठेवावी लागत होती.? देवांचे रथ उतरताना किंवा उडताना होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे वर्णन इझिकेलने केलेले आहे. एवढेच नव्हे तर त्या रथातून दुसरी वाहने कशी बाहेर पडतात यांचीही वर्णने तो करतो. अमेरिकेने वाळवंटात किंवा दलदलीच्या प्रदेशात उपयोगी पडणारी जी वाहने बनवली आहेत,त्या वाहनांचीच आठवण इझिकेलच्या वर्णनावरून येते.


आणि शेवटी एक दिवस इझिकेल अंतराळातून देववाणी ऐकतो, 'मानवपुत्रा ऊठ! मी तुझ्याशी बोलतो आहे.'

आणि इझिकेलने आवाज ऐकले.घोंघावणाऱ्या वाऱ्यासारखे,फडफडणाऱ्या पंखांसारखे आणि निरनिराळ्या चाकांचे.या गोष्टी तरी इझिकेलने अनुभवानेच लिहिल्या आहेत याबद्दल आपल्याला शंका नसावी.


देव त्याला सांगतात की जगात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे काम आता त्यांचेच आहे. त्यांनी इझिकेलला अंतराळयानातून वर नेऊन सांगितले की त्यांनी मानवजातीचा पूर्ण त्याग केलेला नाही.डोळे असून आंधळेपणाने आणि कान असून बहिरेपणाने वागणाऱ्या लोकांमध्ये तो राहत आहे.एकूण मानवजातीची सुधारणा करण्याचे काम त्यालाच करायला पाहिजे. त्याप्रमाणे त्याला ते सल्ला देतात.या सर्व अनुभवांचा इझिकेलवर झालेला परिणाम नेहमीच त्याच्या लिहिण्यात दिसतो.


इझिकेलशी कोण बोलले? कोणत्या तऱ्हेचे देव होते ते? परंपरेनुसार आपली जी देवांची व्याख्या आहे तसे ते देव नसावेत.कारण ते सर्वशक्तिमान वाटत नाहीत.एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरता त्यांना वाहनांची जरुरी पडत होती. मग कोण होते ते?


मोजेस इजिप्तमधून ज्यू लोकांना घेऊन बाहेर पडतो त्यावेळी इजिप्शियन सेना त्याच्या पाठलागावर असतेच.एकदा समुद्र दुभंगून हे लोक पुढे जातात.आणि तो पुन्हा जोडला जातो आणि पाठलाग करणाऱ्या इजिप्शियन सेनेचा नाश होतो;ही गोष्ट सर्वांना ठाऊक आहे.या संबंध प्रवासात देवाने ज्यू लोकांना कशी मदत केलेली असते?


दिवसा आकाशातील ढगांचा एक स्तंभ ज्यू लोकांना मार्गदर्शन करायचा तर रात्रीच्या वेळी एक अग्निचा स्तंभ की ज्यामुळे त्यांना प्रकाशही मिळत असे.हे काही हवामानाचे चमत्कार नव्हते.आपल्याला देवाने कशी मदत दिली आहे याबद्दल मोजेसने दिलेलीच ही माहिती आहे.


देव जेव्हा सिनाई पर्वतावर उतरतो तेव्हा तो ज्वाळा आणि धूर सोडीतच उतरतो.सर्व परिसर हलल्यासारखा वाटतो.

पुन्हा उतरल्याबरोबर तो मोजेसला सांगतो की या टेकडीभोवती कुंपण घाल म्हणजे कोणीही माझ्याजवळ येऊ शकणार नाही.


या गोष्टीतून देव अंतराळवीर होते असे नाही वाटत? पण बहुधा त्यांची संख्या कमी असावी. त्यांच्याकडे अंतराळयानेही कमी असावीत. नाहीतर या सर्व लोकांना त्यांनी अंतराळयानातूनच हलवले असते की! ढगांचा स्तंभ आणि अग्निचा स्तंभ ही अंतराळयानेच असू शकतात,नाहीतर कित्येक दिवस आणि कित्येक रात्री त्यांनी त्यांच्याबरोबर प्रवास केला नसता.इजिप्शियन सैन्याचा नाश करण्यात त्यांचाही हात होताच.बरेच जण म्हणतात, ओहोटीच्या वेळेला ज्यू लोकांनी समुद्र पार केला.

आणि भरतीच्या समुद्राने इजिप्शियन सैन्याचा नाश झाला.ज्या इजिप्शियन लोकांनी पहिल्या प्रथम वर्षांचे ३६५ दिवस असे भाग पाडले.


ज्यांना नाईल नदीचे पूर वगैरेसारख्या गोष्टींची पुरेपूर माहिती होती,त्यांना भरती ओहोटी आणि त्यांच्या वेळा माहीत नसणे असे म्हणणे अगदी हास्यास्पद आहे,नाही? इजिप्शियन सैन्य वेड्यासारखे त्यांच्या मागे लागल्याने त्यांचा नाश झाला नाही.तर देवाने योजना आखूनच त्यांचा संपूर्ण निःपात घडवून आणला होता.ढगांचा स्तंभ ज्यू लोकांच्या पुढून मागे आला,ढगांच्या स्तंभामुळे इजिप्शियन लोकांना काही दिसेनासे झाले पण ज्यू लोकांच्या मागे असलेल्या अग्निच्या स्तंभामुळे त्यांना मात्र प्रकाशही मिळत होता.हे सर्व वर्णन काय दर्शविते?


निघण्यापूर्वी देव मोजेसला 'आर्क ऑफ दि कव्हेनन्ट' बांधण्याच्या स्पष्ट सूचना देतो आणि ती कशी बांधायची याची प्रतिकृतीही दाखवतो. भक्कम काठ्या किती घ्यायच्या,कुठल्या मापाच्या घ्यायच्या,किती किती अंतरावर बांधायच्या,ती उचलणाऱ्यांनी वस्त्रे कशाची बनवलेली घालायची,चपला कुठल्या घालायच्या याबद्दल अगदी सविस्तर आणि तपशिलवार सूचना देवाने दिलेल्या असतात.


एका तऱ्हेची 'आर्क ऑफ दि कव्हेनन्ट' या नावाने ओळखली जाणारी ही पेटी नेहमीच वेगळ्या तंबूत ठेवली जायची आणि फक्त ठराविक लोकांनाच त्या तंबूत जायची परवानगी होती.इतरांना मज्जाव होता.ही आर्क सर्वांनाच पुढे अत्यंत त्रासदायक आणि धोकादायक ठरते. नंतरच्या कथेप्रमाणे फिलीस्टाईन ही दुसरी जमात एकदा इस्त्रायलच्या ज्यूंचा पराभव करते. या आर्कचे त्यांना किती महत्त्व वाटत असते हे फिलीस्टाईन या दुसऱ्या जमातीने नेहमीच पाहिलेले असते.ती आर्क ते प्रथम 'लुटून' घेऊन जातात.पण ती काय आहे,कशी वापरायची याची त्यांना माहिती नसते.त्यांच्या एकच गोष्ट ताबडतोब लक्षात येते.

तिच्याजवळ जाणारे नेहमी आजारी पडत आहेत तर कधी कधी मृत्युमुखीही पडत आहेत.


तेव्हा ती कोणीच जवळ ठेवेना.प्रत्येक जण ती पुढल्या शहरात पाठवून द्यायला लागला.प्रत्येक शहरात तोच प्रकार घडू लागला.तिच्याशी संबंध येणाऱ्यांचे केस झडत असत,त्यांना ओकाऱ्या ( देव ?छे! परग्रहावरील अंतराळवीर ! बाळ भागवत मेहता पब्लिशिंग हाऊस ) व हालहाल होऊन लोक मरत असत.बघता बघता पन्नास हजार लोक या आर्कचे बळी झाले. ही 'लूट' फिलीस्टाईन जमातीला पचेना.त्यांनी शेवटी ती गाडीत घालून तिला दोन गायी बांधल्या व ती चक्क परत केली.


"आर्क ऑफ दि कव्हेनन्ट' हा खरोखर काय प्रकार होता? इलेक्ट्रॉनिक्स तज्ज्ञ जॉर्ज ससून आणि प्राणीशास्त्रज्ञ रॉडनी डेल यांनी अनेक जुन्या धर्मग्रंथांवरून कसून शोध केला. त्याप्रमाणे त्यांनी ती बांधली व त्यांच्या लक्षात आले की ती पेटी म्हणजे एक प्रकारचे यंत्रच होते.त्याचा उपयोग इजिप्तमधून पळणाऱ्या ज्यू लोकांना अन्नपुरवठा करण्यासाठी केला जात होता.प्रोटीनने समृद्ध असे अन्न ! मन्ना! आणि हे बनवण्याचे यंत्र,मन्ना मशीन- आर्क ऑफ दि कव्हेनन्टमधून नेण्यात येत होते.


हजारो स्त्री,पुरूष,मुले वाळवंटातून प्रवास करीत निघाली.त्यांच्या अन्नपाण्याची काय सोय होती? त्या उजाड वाळवंटात होतेच काय? मग कोणत्या विश्वासावर मोजेस त्यांना घेऊन निघाला होता? कारण एकच! देवांनी (अंतराळवीरांनी) या सर्वांना पोसण्याची आधीपासूनच तयारी केली होती आणि मोजेसला ते माहिती होते. 


(+)५०° सेंटिग्रेड आणि (-) १०० सेंटिग्रेड एवढा उष्णतामानात एका दिवस, रात्रीत फरक करणाऱ्या त्या उजाड वाळवंटात हजारो लोकांना घेऊन जाण्याचा धोका नाहीतर मोजेसने पत्करलाच नसता.

आज आपल्याला माहीत आहे की काही प्रकारच्या बुरशी पेट्रोलसुद्धा गिळंकृत करतात आणि त्यामधून प्रोटीनयुक्त खाण्यालायक अन्न निर्माण करतात.

माणूस शरीरातून जी घाण बाहेर टाकतो त्यातूनही प्रक्रिया केल्यावर प्रोटीनने समृद्ध असे अन्न निर्माण करता येते.


राहिलेला लेख पुढील भागात..