* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: देवांचे स्वर्गीय देदीप्यमान रथ

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१३/६/२३

देवांचे स्वर्गीय देदीप्यमान रथ

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पुराणवस्तू संशोधनात एक अत्यंत खळबळजनक शोध लागला.तो म्हणजे बारा मृत्तिकापत्रांवर लिहिलेल्या गिलगामेशच्या अप्रतिम महाकाव्याचा.अक्काडियन भाषेत लिहिलेले हे महाकाव्य असीरियन राजा असुरबानिपालच्या पौराणिक ग्रंथसंग्रहालयात मिळाले.


गिलगामेशच्या महाकाव्याचा उगम सुमेरियन संस्कृतीत झाला ही गोष्ट सिद्ध झालेली आहे. तेच रहस्यमय सुमेरियन लोक,कुठून आले ते कळत नाही.पण १५ आकडी संख्या आणि खगोलशास्त्राच्या अफाट ज्ञानाचा वारसा जगाला देऊन गेले.गिलगामेशच्या महाकाव्याचा मुख्य धागा आणि बायबलमधील विश्वाची उत्पत्ती हा भाग अगदी समान आहे.


पहिल्या मृत्तिकापत्रात विजयी गिलगामेशने बांधलेल्या राजेशाही प्रासादाचे वर्णन आहे. गिलगामेश म्हणजे देव आणि मानव यांचा संगमच ! दोन तृतीयांश देवाचा अंश आणि एक तृतीयांश मानवाचा अंश.महाकाव्याच्या सुरुवातीलाच देव आणि मानव यांच्या संयोगाचा

उल्लेख पुन्हा आलाच आहे.याचा प्रासाद उरूक येथे होता.सभोवती तटबंदी आणि पहारेकरीही असत. येणारे यात्रेकरू त्यांच्याकडे पाहूनच भयभीत होत.त्यांची अफाट ताकद त्यांच्याकडे पाहताच ध्यानात येत असे.


दुसऱ्या मृत्तिकापत्रात अरूरू या स्वर्गीय देवतेने निर्माण केलेल्या एन्किडूचा उल्लेख आहे पण हा एन्किडू तसा विचित्रच प्राणी होता.त्याच्या सर्वांगावर केस होते.तो जनावरांच्या कातड्यांची वस्त्रे घालायचा,शेतातले गवतच खायचा आणि एकूण गुराढोरातच असायचा.एन्किडूबद्दल ऐकल्यावर गिलगामेश सुचवतो की त्याला एखाद्या सुंदर स्त्रीच्या पाशात गुंतवावा म्हणजे तो आपोआप इतर प्राण्यांचा नाद सोडेल म्हणून आणि एन्किडू सहा दिवस आणि सहा रात्री एका सुंदरीबरोबर काढतोही.


तिसऱ्या मृत्तिकापत्रात दूरवरून धुळीच्या ढगातून प्रचंड गडगडाट करीत आणि धरणी हलवत येणाऱ्या सूर्यदेवाचे वर्णन आहे.सूर्यदेव आपल्या पंखात आणि नखात एन्किडूला पकडतो आणि वेगाने आकाशात झेप घेतो.

त्यावेळी एन्किडूला आपल्या शरीरावर सूर्यदेवाचे वजन शिशाच्या गोळ्याप्रमाणे जड जड वाढल्यासारखे वाटते.


आज आपल्याला गुरुत्वाकर्षणाच्या विरूद्ध दिशेने अंतराळात उडताना गुरुत्वाकर्षणाचा परिणाम म्हणून अंतराळवीर अंतराळयानातून पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाईपर्यंत त्यांच्या शरीरावर गुरुत्वाकर्षणाने किती वजनाचा दाब येतो हे आधीच मोजता येते आणि त्याप्रमाणे संरक्षक व्यवस्था करता येते.पण या दाबाची माहिती हजारो वर्षांपूर्वी कुणाला होती? जुन्या लेखकांची प्रगल्भ कल्पनाशक्ती,भाषांतरकर्ते व प्रती काढणारे यांनी घातलेली भर सोडून देऊ या.पण या जुन्या वृत्तांतात ठराविक वेगाने आकाशात जायला लागल्यावर शरीराचे वजन शिशासारखे जड होईल ही माहिती आली कशी हे आश्चर्यच आहे.ही गोष्ट कल्पनेला ताण देऊन लिहिली असणे.अशक्य आहे.कोणी तरी खरा अनुभव घेतला असल्याशिवाय असे लिहिता येणे कधीही शक्य नाही.


पाचव्या मृत्तिकापत्राप्रमाणे गिलगामेश आणि एन्किडू देवाच्या शोधासाठी निघतात.ज्या मनोऱ्यात इर्निसीस ही देवता राहत असते तो लांबवरूनच झगमगताना दिसत असे.ते देवांच्या राहण्याच्या ठिकाणी पोहोचतात तर गर्जनेसारखा आवाज येतो 'परत फिरा! कोणत्याही मर्त्य मानवाने आमच्याकडे पाहिले तर तो जिवंत राहणार नाही. '


सातव्या मृत्तिकापत्रात अंतराळ प्रवासाचा पहिला उल्लेख आहे.एन्किडू याने स्वतः केलेल्या अंतराळ प्रवासाचे ते वर्णन आहे.गरुडाने एन्किडूला आपल्या नखात घट्ट पकडून हा प्रवास घडवला होता.घडलेला वृत्तांत जवळ

जवळ शब्दश: असा आहे.तो मला म्हणाला, 'आता खाली जमिनीकडे बघ. जमीन कशी दिसते? समुद्र बघ.तो कसा दिसतो? जमीन टेकडीसारखी तर समुद्र एखाद्या सरोवरासारखा वाटत होता.आणखी चार तास भ्रमण केल्यावर तो पुन्हा म्हणाला,खाली जमिनीकडे बघ.कशी दिसते? समुद्राकडे बघ, कसा दिसतो? जमीन एखाद्या बागेसारखी आणि समुद्र बागेत काम करणाऱ्या माळ्याने काढलेल्या पाण्याच्या पाटासारखा वाटत होता. आणखी चार तास भ्रमण करून खूप उंच गेल्यावर तो म्हणाला, खाली जमिनीकडे बघ. आता ती कशी वाटते तुला? समुद्राकडे बघ.तो कसा भासतो आता? जमीन आता लापशीसारखी तर समुद्र पाण्याच्या उघड्या टाकीसारखा वाटत होता. '


खूप उंचीवरून पाहिलेल्या पृथ्वीचे वर्णन आपले अंतराळवीर आज अगदी याच शब्दात करतात. वेगवेगळ्या उंचीवरून कोणी तरी खरोखर पृथ्वी बघितली असल्याशिवाय अशा तऱ्हेचे वर्णन करता येणे शक्य नाही.

हा वृत्तांत इतका अचूक असल्यानेच केवळ कल्पनेने तो लिहिला असणे अशक्य आहे.


आणि त्याच मृत्तिकापत्रात एक दरवाजाच माणसासारखा बोलतो,असा उल्लेख आल्यावर तिथे लाऊडस्पीकर -

शिवाय दुसऱ्या कशाचाही उल्लेख असणे शक्य नाही हे आपल्याला कळते.


आणि मग ज्या एन्किडूने खूप उंचीवरून पृथ्वी बघून तिचे अचूक वर्णन केलेले असते.तो एन्किडू अत्यंत रहस्यमय अशा रोगाने मरण पावतो.आपल्या अचूक वर्णन मित्राच्या मरणाचे गिलगामेशला फार दुःख होते.अंतराळातील कुठल्या तरी विषारी प्राण्याच्या फुत्कारानेच आपला मित्र मरण पावला आहे आणि नंतर आपलीच पाळी येणार आहे असे गिलगामेशला वाटायला लागते.नवव्या मृत्तिकापत्रात या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे.गिलगामेश ठरवतो की आता देवाचीच गाठ घ्यायची नाहीतर आपला मृत्यू अटळ आहे.अखंड प्रवास करीत तो दोन पर्वतांशी येतो.त्या दोन पर्वतांनीच स्वर्ग पेलून धरलेला असतो.

त्यांच्यामध्ये सूर्यद्वारही दिसत असते.पण तिथले दोन पहारेकरी त्याला अडवतात.त्यांच्याशी तो खूप हुज्जत घालतो. शेवटी त्याला ते आत सोडतात.नाही म्हटले तरी गिलगामेशमध्ये दोन तृतियांश तरी देवाचा अंश असतोच.

गिलगामेश शेवटी एका सागर किनाऱ्यावर येतो.देव सागरापलिकडे राहत असतो आणि देवाशिवाय कोणाचेही वाहन या सागरावरून जात नसते.


त्यावेळी गिलगामेशला दोन वेळेला देव गंभीर परिणामांची धमकी देतो आणि सांगतो 'अरे गिलगामेश! तू जे अमरत्व शोधत आहेस ते तू तुला कधीच मिळणार नाही.देवाने मानव निर्माण केला.तेव्हा त्याचे मरणही लिहून ठेवले

आहे.अमरत्व देवाने स्वतःकडेच राखून ठेवले आहे.'


पण देवाला भेटण्याचा गिलगामेशचा निर्धार अटळ

असतो.अनेक संकटांना तोंड देत तो सागर पार करून जातोच आणि शेवटी त्याची आणि मानवाच्या निर्मात्याची गाठ पडते.त्यांची गाठ पडल्यावर गिलगामेशला कळते की त्या दोघात तसा काहीच फरक नाही.देव त्याच्यासारखाच उंच आणि धिप्पाड असतो.पिता-पुत्र शोभावेत असेच ते दोघे दिसत असतात.


देव त्याला स्वतःच्या आयुष्याबद्दल माहिती देतो. 'मी' म्हणून एक वचनात.आत्यंतिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो गिलगामेशला झालेल्या महान जलप्रलयाचीही माहिती देतो.देवांनी नोहाला या जलप्रलयाची आगाऊ सूचना कशी दिली होती, त्याने बोट कशी बांधली,त्यात सर्व तऱ्हेचे प्राणी, नातेवाईक,स्त्रिया,मुले,प्रत्येक जातीचा कारागीर यांना कसे घेतले हे तो सर्व सांगतो.तुफान वादळ आणि पाऊस,काळाकुट्ट अंधार,पूर,ज्यांना तो वाचवू शकत नव्हता.त्यांच्या किंकाळ्या, जगण्याची धडपड हे सर्व वर्णन त्यात इतके अप्रतिम आहे की वाचायला घेतल्यावर खाली ठेववत नाही.


पूर ओसरला की नाही हे कळण्यासाठी आधी एक गिधाड सोडणे आणि मग कबूतर सोडणे अशी गोष्ट गिलगामेशच्या महाकाव्यात आहे, तशीच ती बायबलमध्येही आहे.गिलगामेशच्या महाकाव्यातील जलप्रलयाचे वर्णन आणि बायबलमधील वर्णन यात फारच साम्य आहे ही गोष्ट विद्वान लोक मान्य करतात.

नवलाची गोष्ट म्हणजे आपण वेगवेगळे देव लक्षात घेतो आहोत. हा प्रकार विलक्षण नाही का?


गिलगामेशच्या महाकाव्यातील हे वर्णन त्या संहारातून वाचलेल्या माणसानेच केले आहे,ती चक्षुर्वैसत्य हकिगत आहे यात शंकाच नाही. याच्या उलट बायबलमधील वर्णन हा दुसऱ्याने सांगितलेला वृत्तांत आहे.


हजारो वर्षांपूर्वी प्राचीन पूर्वेत अचानकपणे जलप्रलयाने थैमान घातले होते,हे ऐतिहासिक सत्य आहे,सिद्ध झालेली गोष्ट आहे. महाप्रलयातून वाचण्यासाठी मुख्यतः लाकडाचा वापर करून बांधलेल्या बोटीचे अवशेष कमीत कमी ६००० वर्षांनी सापडतील ही गोष्ट खरी म्हणजे अशक्य असली तरी बाबिलोनियातील मृत्तिकापत्रे या बोटीचे अवशेष कुठे सापडतील याच्या स्पष्ट खाणाखुणा सांगतात. त्याचप्रमाणे अरारत पर्वतावर संशोधकांना ज्या जागी पुरानंतर बोट लागली असेल असा संशय होता त्याच ठिकाणी लाकडाचे तीन तुकडेही सापडले होते.


आजच्या विज्ञान युगाच्या दृष्टीने विचार केला तर गिलगामेशच्या महाकाव्यात अशा कित्येक गोष्टींचा समावेश आहे की अत्यंत प्रगल्भ बुद्धीच्या हुशार माणसालाही मृत्तिकापत्रे लिहिली गेली;त्या काळात या गोष्टींची माहिती असणे सर्वस्वी अशक्य आहे.ज्यांनी या महाकाव्याच्या फक्त प्रतीच काढल्या किंवा भाषांतर केले त्यांनीही अशा गोष्टींची नंतर त्या महाकाव्यात भर घातली असेल असे म्हणता येत नाही. कारण सरळ आहे.ते त्यांच्या आवाक्याबाहेरचे काम होते.


पण आजपर्यंत आपण समजत आहोत त्याप्रमाणे गिलगामेशच्या महाकाव्याचा उगम समजा प्राचीन पूर्वेत झालाच नसला आणि टिआहुआन्को येथे झाला असला तर? गिलगामेशच्या वंशजांनी दक्षिण अमेरिकेतून येताना ते महाकाव्यही बरोबर आणले असले तर? या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील तर अनेक गोष्टींचा उलगडा होतो.सूर्यद्वाराचा उल्लेख,सागर पार करून जाणे आणि सुमेरियन संस्कृतीचा अचानक उगम या गोष्टींचा शोध मग नक्कीच लागतो.त्याच भागातील बाबिलोनियन संस्कृती ही सुमेरियन लोकांच्या नंतरची आहे. त्यांच्या बहुतेक सर्व निर्मितीचा उगम सुमेरियन संस्कृतीतच आहे ही गोष्टही वादातीत आहे. गिलगामेशच्या महाकाव्याचा प्रवास मग सुमेरिया,बाबिलोनिया,इजिप्त असाच होऊ शकतो.

इजिप्शियन संस्कृती अत्यंत पुढारलेली होती.फॅरोह राजांची ग्रंथालये प्रचंड होती आणि त्यांनी सर्व जुन्या गुप्त ज्ञानाचा साठा जतन करून ठेवला होता.मोजेस इजिप्तच्या राजदरबारातच लहानाचा मोठा झाला.या ग्रंथालयांचा उपयोग त्याने हक्काने केला असणार.अशा दृष्टीने विचार केला तर गिलगामेशच्या महाकाव्यातील जलप्रलयाचा वृत्तांत मूळ वृत्तांत ठरतो,खरा वृत्तांत ठरतो, बायबलमधला नव्हे!आणि या टप्प्यापर्यंत विचार करीत आलो तर प्राचीन इतिहासाचे संशोधन नीट का होत नाही.

याची खरी मेख इथेच असावी असा संशय घ्यायला निश्चित जागा मिळते.प्राचीन काळाबद्दलच्या संशोधनाची परिस्थिती तरी कशी आहे? आजपर्यंत सांगण्यात आलेल्या इतिहासामध्ये अनेक कालखंडांची माहिती मिळतच नाही.त्या काळात 'अशक्य' अशा गोष्टींचे अस्तित्व कसे होते याचे उत्तर मिळत नाही.साचेबंद पद्धतीने केलेले कोणतेही संशोधन एकही नवीन गोष्ट सांगू शकत नाही,कोणत्याही नवीन गोष्टीवर प्रकाश पाडू शकत नाही. तेच तेच विचार,त्याच त्याच संशोधनाच्या पद्धती कुचकामी ठरत आहेत;कारण कोणत्याही तऱ्हेची नवीन कल्पना,नवीन तर्क,नवीन सिद्धान्त या गोष्टींना थाराच मिळत नाही.प्राचीन पूर्वेबाबतच्या संशोधनाच्या अनेक संधी आजपर्यंत वाया गेल्या कारण बायबलसारख्या अति पवित्र ग्रंथात सांगितलेल्या गोष्टींबद्दल वेगळ्या तऱ्हेचे विचार उघडपणे मांडण्याची कुणाचीच प्राज्ञा नव्हती.


एकोणिसाव्या विसाव्या शतकातील विद्वानांनी अनेक जुन्या समजुती आणि रूढी यांच्यातून आपली मुक्तता करून घेतली.तरी बायबलमध्ये म्हटले की मनावर येणाऱ्या शेकडो वर्षांच्या मानसिक दडपणातून त्यांचीसुद्धा सुटका झाली नाही.


बायबल संबंधात कुठलाही प्रश्न निर्माण करण्याचे,

विचारण्याचे धैर्य त्यांनाही झाले नाही.याचमुळे प्राचीन काळाबद्दलचे कुठलेही संशोधन बायबलपर्यंत पोहोचले की तिथेच त्याला पूर्णविराम मिळत होता.पुढल्या संशोधनात बायबलच्या काही भागांबद्दल तरी अविश्वास दाखविणे अपरिहार्य ठरत होते आणि हीच गोष्ट कुणाला जमत नव्हती.


पण अगदी धार्मिक ख्रिस्ती विद्वानांना सुद्धा कधी जाणीव झाली नसेल की सर्वज्ञ,सर्वसंचारक देवाच्या प्रतिमेस विसंगत अशा गोष्टी बायबलमध्ये आहेत म्हणून?अगदी कर्मठ, बायबलवर संपूर्ण विश्वास ठेवणाऱ्या माणसाला प्राचीन काळातील आपल्या पूर्वजांना आधुनिक तंत्रज्ञान कुणी दिले,स्वच्छतेचे,समाजसुधारणेचे प्राथमिक नियम कोणी घालून दिले,मानव जातीचा विनाश एकदा कोणी घडवून आणला, या प्रश्नांबद्दल आणि त्यांच्या उत्तरांबद्दल कधीच कुतूहल निर्माण झाले नसेल?


अशा तऱ्हेचा विचार करण्याने खरे म्हणजे आपल्यावर नास्तिकपणाचा शिक्का बसण्याचे मुळीच कारण नाही.

आपल्या भूतकाळातील सर्व प्रश्नांची उत्तरे ज्या क्षणी मिळतील त्या क्षणापासून दुसरे कुठले नाव देता येत नाही म्हणून आपण 'देव' मानतो ते 'काही तरी' अनंत काळापर्यंत अस्तित्वात राहणारच आहे.


ज्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अंतराळयानासारख्या वाहनाची जरुरी लागत होती,प्राचीन मागासलेल्या स्त्रियांशी संबंध ठेवून ज्याने नवीन प्रजा निर्माण केली,जो आपला मुखवटा कधीही दूर करून स्वतःचा चेहरा दाखवायला तयार नव्हता असा देव तरी नक्कीच अस्तित्वात होता या सिद्धांताला 'पुरावा' देणारी,दुजोरा देणारी एक तरी गोष्ट आहे का? मुळीच नाही.


देव कुणाला कुठल्या स्वरूपात दर्शन देईल आणि कुणाचा नक्षा कसा उतरवील हे सांगता येत नाही,हे ब्रह्मज्ञानी आणि धर्मज्ञानी लोकांचे उत्तर मूळ मुद्दा डावलणारे आहे.म्हणूनच या उत्तराने आपले समाधान होऊ शकत नाही. काही वर्षांतच मानव कुठल्या तरी ग्रहावर पाय ठेवील.त्या ठिकाणी ओळखता येईल असे एखादेच खडकावर कोरलेले चित्र,अज्ञात, बुद्धिमान जमातीचे अस्तित्व दर्शवणारी एखादीच खूण,एखादीच भव्य,प्राचीन वास्तू मिळाली तर आपल्या सर्व धर्मांचा पायाच ढासळून पडेल आणि आपल्या भूतकाळाच्या इतिहासाबद्दल अपरिमित गोंधळ माजेल.असा फक्त एकच शोध मानवाचा सर्व इतिहासच संपूर्णपणे बदलण्याइतका क्रांतिकारक ठरेल.


नवनवीन सत्यांकडे डोळेझाक करूनही भविष्यकाळातील नव्या-जुन्या विचारांचा संघर्ष आता टळू शकणार नाही.आपण नास्तिक असण्याचे कारण नाही.

पण म्हणून काय सर्व खुळचट गोष्टींवर अगदी भोळसटपणे अंधविश्वास ठेवायचा? प्रत्येक धर्माची काही वैशिष्ट्ये आहेत आणि त्याचमुळे त्या धर्माचे विचार त्या वैशिष्ट्यांभोवती घुटमळतात.हे अपरिहार्यपणे घडत आहे.


आजच्या अंतराळ युगात आपली बौद्धिक कसोटी लागण्याचा दिवस जवळ येत आहे आणि त्याच दिवशी सर्व ब्रह्मज्ञान व्यर्थ ठरेल. आतापर्यंतचे मानवाच्या प्राचीन इतिहासाबद्दलचे चित्र कसे आहे याबद्दलचा आपला सिद्धान्त काय म्हणतो?


नक्की सांगता येत नाही अशा आपल्या प्राचीन इतिहासकाळात एका अज्ञात अंतराळयानाने पृथ्वीचा शोध लावला.पृथ्वीवर जीवन निर्माण होण्यासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टी उपलब्ध आहेत याची जाणीवही त्या अज्ञात अंतराळवीरांना अभ्यासपूर्वक विचार केल्यावर झाली.


अर्थात,त्यावेळी मानवसदृश प्राणी अस्तित्वात नव्हता तर काही वेगळ्या तऱ्हेच्या प्राण्यांचेच अस्तित्व होते.अशा या जमातीतील स्त्रियात त्यांनी कृत्रिम गर्भधारणा केली व ते निघून गेले. हजारो वर्षांनी ते परत आले त्यावेळी त्यांना विखुरलेल्या मानवसदृश प्राण्यांचे अस्तित्व आढळायला लागले होते.पुनः पुन्हा तसेच प्रयोग करून या अंतराळवीरांनी समाजव्यवस्थेची दीक्षा देण्याइतका बुद्धिमान मानवसदृश प्राणी शेवटी या पृथ्वीवर निर्माण केला.तरीही त्यावेळी तो जंगली प्राण्यांत गणना व्हावी इतपतच होता. इतर जनावरांशी संबंध ठेवून त्याची पिछेहाट होऊ नये व त्याचे प्रगतीचे पाऊल मागे हटू नये या हेतूने त्यांनी अशा इतर प्राण्यांचा एक नाश तरी केला किंवा त्यांची इतरत्र तरी रवानगी केली.मानवाच्या प्रगतीला कोणताही धोका निर्माण होऊ नये याची ते सतत काळजी घेत राहिले.


मग पहिला समाज अस्तित्वात आला,पहिले कुशल कारागीर निर्माण झाले.काहींनी गुहेत चित्रे रंगवली,

काहींनी मातीची भांडी तयार करण्याची कला आत्मसात केली,तर कोणी बांधकामांना हात घालण्याचा प्रयत्न सुरू केला.


या पहिल्या जमातींना अंतराळवीरांबद्दल अगदी जबर लोकविलक्षण असा आदर होता.ते कुठल्या तरी अज्ञात ठिकाणाहून येत होते आणि परत जात होते.

अंतराळयानातून,दैदिप्यमान रथातून संचार करणाऱ्या या अज्ञात अंतराळवीरांनाच पृथ्वीवरील जमातींनी देव मानले.कोणत्या गूढ, रहस्यमय कारणाने ते कळत नाही.

पण आपले ज्ञान पृथ्वीवरील जमातींना द्यायची इच्छा त्या अंतराळवीरांना निश्चित होती.अंतराळवीरांनी त्यांनी निर्माण केलेल्या प्रजेचे सर्व वाईट गोष्टींपासून संरक्षण केले.या समाजाची सुधारणा व्हावी हा त्यांचा कायमचा प्रयत्न होता.जेव्हा जेव्हा चांगला मानव निर्माण करण्याच्या प्रयत्नात विचित्र,अनैसर्गिक नमुने जन्माला आले,त्यांचे प्रयत्न फसले,तेव्हा त्यांचा तात्काळ नाश करण्यात आला.


हा सिद्धान्तही अनेक तर्कावरच आधारित आहे हे मान्य आहे आणि तसा सबळ पुरावा नसल्याने तो संपूर्ण सत्य नसेलही.पण निरनिराळ्या धर्मांच्या सिद्धांतांच्या छायेखाली निरनिराळ्या धर्मांचे लोक सुखाने हजारो वर्षे वावरताना पाहिल्यावर देव हे परग्रहांवरील अंतराळवीरच होते या सिद्धान्ताला तशी थोडी यशाची आशा दिसते.


प्रत्येक धर्म 'सत्य' हे त्याच धर्माच्या शिकवणुकीत आहे असे प्रतिपादन करतो. ईश्वराचा साक्षात्कार घडवून आणणारे तत्त्वज्ञानी, धर्मज्ञ,त्यांच्या गुरुंची,त्यांच्या शिकवणीची भलावण करीत असतात.खरे 'सत्य' त्यांनाच उमगले आहे या गोष्टीवर त्यांचा दृढ विश्वास असतो.

अर्थातच प्रत्येक धर्माला त्याचा इतिहास, त्याचे देव,देवांची वचने,देवांचे प्रेषित आहेत, धर्मगुरू आहेत.खरे म्हणजे कोणत्याही एका धर्माच्या शिकवणुकीतूनच फक्त सत्याचा शोध लागणार आहे ही वृत्ती संपूर्ण पक्षपाती आहे.

आणि तरीही लहानपणापासून आपल्या प्रत्येकाच्या मनावर बिंबवली गेली आहे. तरीसुद्धा पिढ्यान्पिढ्या सत्य फक्त आपल्यालाच गवसले आहे यावर पूर्ण विश्वासाने त्या जगल्या आहेत,जगत आहेत.


पण सत्य ही काही आपण 'पकडू' शकू अशी गोष्ट नाही.आपण त्यावर फक्त विश्वास ठेवू शकतो.


जुनी प्राचीन शहरे,खेडी वगैरे पुराणवस्तू संशोधकांनी शोधून काढली की आपल्याला कळत असतो तिथल्या लोकांचा इतिहास.ही खरी गोष्ट आहे.मेसापोटेमियात बायबलसंबंधी हेच घडत आहे.पण त्यामुळे असे सिद्ध होत नाही की बायबलमधला धर्म हाच त्यांचा धर्म होता किंवा बायबलमधला देवच त्यांचाही देव होता म्हणून! त्यांचा देव एखादा अंतराळवीरच असण्याची शक्यता आहे.


जगात सर्वत्र चाललेल्या उत्खननात जुन्या आख्यायिका त्या त्या काळातील वस्तुस्थिती खरी ठरवीत आहेत.पण एक तरी ख्रिस्ती माणूस खात्रीपूर्वक सांगू शकेल का ? की पेरूमध्ये उत्खननात मिळालेल्या अवशेषांमुळे इंका लोकांच्या आधीच्या ऐतिहासिक काळातील देव हाच ख्रिश्चनांचा एकमेव देव ठरत आहे म्हणून ?


केवळ आजपर्यंतच्या धर्माच्या चौकटीत बसत नाहीत,पिढ्यानपिढ्या ठेवलेल्या अंधविश्वासाला तडा जातो म्हणून कोणत्याही नवीन विचार प्रवाहाकडे दुर्लक्ष करून सत्य कधीच उजेडात येणार नाही.


आपल्या पूर्वजांच्या कारकीर्दीत अंतराळ प्रवास ही कल्पना,हा प्रश्न कधी उद्भवलाच नव्हता. त्याचमुळे त्यांच्याही प्राचीन काळातील पूर्वजांच्या मनात कोणत्या तरी परग्रहावरील अंतराळवीरांनी आपल्याला भेटी दिल्या होत्या असाच विचार निर्माण होण्याची सुतराम शक्यता नव्हती.गेल्या उद्भवलाच नव्हता. त्याचमुळे त्यांच्याही प्राचीन काळातील पूर्वजांच्या मनात कोणत्या तरी परग्रहावरील अंतराळवीरांनी आपल्याला भेटी दिल्या होत्या असाच विचार निर्माण होण्याची सुतराम शक्यता नव्हती. गेल्या ४० वर्षांत आपण जे ज्ञान प्राप्त करून घेतले आहे,जे अनुभव आपण स्वतः घेत आहोत, त्यामुळेच आपल्या मनात असे विचार येत आहेत ही गोष्ट खरी आहे.


समजा की मानवाच्या दुर्दैवाने अणुयुद्ध झालेच आणि आपल्या सर्व संस्कृती नष्ट झाल्या म्हणून. पाच हजार वर्षांनंतरच्या पुराणवस्तू संशोधकांना न्यूयॉर्क येथील स्वातंत्र्य देवतेच्या पुतळ्याचे अवशेष मिळाले.तर आपण आज करीत आहोत तसाच विचार तेही करतील.

पुतळ्याच्या हातातील मशाल बघून त्यांना वाटेल की ती कोणी अग्निदेवता आहे म्हणून! किंवा स्वातंत्र्य देवतेच्या डोक्याभोवतालचे किरण पाहून त्यांना वाटेल की कोणत्या तरी सूर्योपासक लोकांची ती देवता आहे म्हणून! कोणत्याही धर्माशी किंवा कोणत्याही पंथाशी संबंध नसलेला भव्य असा स्वातंत्र्य देवतेचा तो पुतळा होता,ही कल्पना मात्र त्यांच्या मनात येईल अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे.


आजपर्यंतच्या धार्मिक शिकवणीवर अंधविश्वास ठेवून भूतकाळातील सत्य बाहेर येऊ शकत नाही.ज्या धोपटमार्गाने आपण विचार करीत होतो त्या मार्गाचा त्याग करण्याचे,जुन्या सर्व गोष्टी सत्यच आहेत हे आंधळेपणाने खरे न मानता आवश्यक तिथे त्यांच्याही बाबतीत संशय दाखविण्याचे धैर्य आता तरी आपल्यात निर्माण व्हायला पाहिजे.डोळे आणि कान बंद ठेवून, बुद्धी गहाण ठेवून कोणत्याही नवीन कल्पना या पाखंडी आहेत,मूर्खपणाच्या आहेत हेच पुनः पुन्हा म्हणत राहून अंतिम सत्याचा शोध लागणार नाही.आणि आजच्या युगात ही गोष्ट आपल्याला परवडणारी नाही.


विचार करा ! पन्नास वर्षांपूर्वी चंद्रावर माणूस उतरेल ही कल्पना करणाऱ्या माणसाला जग वेडेच म्हणत होते की ! 


२ मार्च २०२३ या लेखमालेतील पुढील लेख