* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: हारजीत। / defeat

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१०/१/२६

हारजीत। / defeat

दुसऱ्या पहाटे सूर्य उजाडला,गवतावरच्या दवबिंदूंची वाफ झाली.नोकोबी परिसरातली सर्व वारुळं जागी होऊन आपापल्या कामाला लागली.ओढा-मुंग्यांनी पायवाट वारुळावरचा हल्ला नव्यानं सुरू केला. वारुळाच्या द्वाराभोवती पायवाट-सैनिक मुंग्या वर्तुळात उभ्या होत्या.

आता त्यांना मदत करायला कामकरी मुंग्या नव्हत्या.

सैनिकांना मिळणारा तो आधार आता नाहीसा झाला होता.उलट ओढा-हल्ला जोरदार होता.तासाभरातच त्यांचं पूर्ण सैन्य पायवाट-दाराभोवती एकत्रित झालं.एकेक पायवाट सैनिक मुंगी मरत होती,आणि तिची जागा घ्यायला वारुळातून कोणी येत नव्हतं.लवकरच सर्व पायवाट-सैनिक संपले,आणि ओढा-सैन्य पायवाट वारुळात घुसलं.


('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,

मनोविकास प्रकाशन)


मुख्य बोगद्यानं खाली उतरत ओढा सैनिक, ओढा-कामकरी आजूबाजूंच्या बोगद्यांमध्ये आणि दालनांमध्ये पसरले.सगळं वारूळ त्यांच्या 'हल्ला बोल' फेरोमोन्सनं भरून गेलं.आता पायवाट मुंग्यांच्या मनात वारुळाचा विचार नव्हता.प्रत्येक मुंगी सुटीसुटी स्वतःला वाचवू पाहात होती. एकमेकींना कोणतेही संदेश दिले जात नव्हते.राणी नाही,वारूळ शत्रूनं व्यापलेलं,अशा स्थितीत सामाजिकता मुळीच शिल्लक नव्हती.


काही मुंग्या पळून बाहेर पडल्या.पानांआड, खड्यांमागे लपायचा प्रयत्न करत होत्या,त्या.पण एकेक एकेक मुंगी मरत होती.कोणाला कोळ्यांनी खाल्लं,काही पाण्यात पडून मेल्या.एकीला लष्करी-मुंग्यांच्या जथ्यानं खाल्लं.बहुतेक सगळ्या एकदोन दिवसांत मारल्या गेल्या.आठवड्याभरात एकही पायवाट-मुंगी कुठेही जिवंत उरली नव्हती.


ओढा-मुंग्यांनी पायवाट वारुळाचा कोपरा-न्-कोपरा तपासला.एका संगोपन दालनात त्यांना नुकत्याच कोषाबाहेर पडलेल्या काही कामकरी मुंग्या आढळल्या.त्यांना सांभाळून ओढा वारुळात नेलं गेलं.काही थोड्यांना मारून खाल्लं गेलं.पण बहुतेक सगळ्यांना गुलाम म्हणून राखलं गेलं.अगदी लहान वयाच्या मुंग्या असल्यानं त्यांना पायवाट वारुळाचा वास नीटसा समजला नव्हता.त्या सहज ओढा वारुळाचा वास आपला मानू लागल्या.यानंतर कोणतीही इतर वासाची मुंगी भेटली,तर या पायवाट-गुलाम मुंग्या अगदी मूळ ओढा-

मुंग्यांइतक्याच वारुळप्रेमानं त्यांच्याशी लढायच्या!


या परक्या मुंग्यांना आपल्या करून घेतल्यानं ओढा-वारुळाची कामगारसंख्या वाढली.पायवाट वारुळाशी लढाईत झालेलं नुकसान भरून निघालं.


जर लढाईच्या वेळी पायवाट राणी जिवंत असती आणि ओढा-मुंग्यांनी तिला पकडलं असतं,तर मात्र तिच्या ताबडतोब खांडोळ्या उडवल्या गेल्या असत्या.हरलेल्या वारुळांच्या राण्यांना क्षणभरही जिवंत ठेवलं जात नाही.एक म्हणजे एकच राणी चालू शकते.त्या बाबतीत मुंग्यांची मनं कठोर असतात.माणसांमध्ये याला एकचालकानुवर्तित्व म्हणतात;एकाच चालकाच्या सांगण्यानुसार वागायचं असतं! म्हणूनच दोन वारुळांमध्ये कधीच तह होत नाही की मैत्री होत नाही. वारुळाची जागा एकेरी मालकीखाली राखणं,हे वारुळ-महाप्राण्याच्या दृष्टीनं अटळ,अपरिहार्य असतं. आणि वारुळाचं क्षेत्र काहीही करून,प्रसंगी जीव देऊनही राखावं लागतं.पण मुंग्यांच्या विश्वाबाहेरच्या घडामोडींचेही मुंग्यांवर परिणाम होत असतात.पायवाट वारुळाला हरवल्यानंतर तीनच आठवड्यांनी ओढा-वारुळाजवळ हलती झाडं येऊन गेली.मागे पायवाट वारुळाला जसे अनुभव आले होते,तसेच आता ओढा-वारुळाला आले.काही मुंग्या मेल्या,आणि विचित्र अन्नाचे ढिगारे हाती आले.ओढा-मुंग्यांना ही आपल्यावर देवांनी केलेली कृपाच वाटली.त्यांनाही वाटलं,की देव आपले सहकारी आहेत.देवही आपल्यासारखाच विचार करत असणार,अशी ओढा-मुंग्यांची खात्री पटली.त्यांना विचार करायची इतर कोणती पद्धत माहीतच नव्हती.तशी पद्धत त्यांना सुचूच शकत नव्हती.त्यांची खात्री पटली,की देवही आपल्या ताकदीचा भागच आहेत.


पायवाट वारुळाला हरवून,तिथल्या सर्व मुंग्यांना मारून किंवा गुलाम बनवून ओढा-मुंग्यांनी युद्ध थांबवलं.शत्रू पुन्हा उभा राहू शकत नाही अशी खात्री झाल्यावर त्यांनी पायवाट क्षेत्र पादाक्रांत केलं.त्या क्षेत्रभर कुठेकुठे विष्ठा टाकून फेरोमोन-

संदेश पसरवले,"हे क्षेत्र ओढा-मुंग्यांचं आहे." क्षेत्रातल्या वाटा-रस्त्यांवर आता ओढा वारुळाच्या फेरोमोन्सचा दरवळ होता.

पण त्यांनी नवीन क्षेत्र व्यापलं नाही.गरजेनुसार त्या अन्न शोधत तिकडे जायच्या.मावा कीटकांची विष्ठा,मेलेले कीटक, भरपूर नवं अन्न मिळायचं.आणि वाढीव अन्नामुळे ओढा-वारुळाची प्रजाही झपाट्यानं वाढत गेली.


ज्या मुंग्यांना लढायला बोलावलं गेलं,त्या आपण लढाईत जगणार की मरणार याचा विचार न करता आदेश पाळत लढायला गेल्या.आपल्या वारुळाला, आपल्या महाप्राण्याला त्यांनी जिंकवून दिलं.क्षेत्र मिळवून दिलं.अन्न मिळवून दिलं.गुलाम मिळवून दिले.आपली जीवजात जगायला आवश्यक ती सर्व चक्रं पुरी करत होत्या त्या.आणि त्यांना हे करायचा आदेश देणाऱ्या होत्या त्यांच्या मूलप्रवृत्ती.समाप्त …


सगळ्यांना शिकवणारा 'शहाणा,माणूस…


🔍 स्कॅन करा आणि भेट द्या 


www.vijaygaikwad.com


 ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करा,डिजिटल युगात विजय गायकवाड यांच्यासोबत !


आज आमचे प्रेम मार्गदर्शक मित्र तरुण शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांचा जन्मदिवस असं म्हणतात…एक अनोळखी माणूस,पुस्तक वाचत असताना उघडलं जाणार पान व त्या पानावरील एक वाक्य,तसंच येणारा अनोळखी फोन तुमचं आयुष्य झपाट्याने प्रकाशमय करू शकतो.असंच माझं आयुष्य बदलून टाकायला सुरुवात केली ती म्हणजे विष्णू गाडेकर यांनी आणि दररोज काही ना काही मला शिकवून शिकवतच असतात. माधव गव्हाणे चांगली माणसं जोडून देण्यामध्ये यांचा हातखंडा आहे.

त्यानेच सोडून दिलेला हा माणूस अजूनही माझ्या आयुष्याशी जोडला गेलेला आहे.फोन आला आणि व्हाट्सअप वरती काहीतरी लिहितो त्याला मर्यादा आहेत म्हणून एका रात्रीत न झोपता मला विजय गायकवाड हा ब्लॉग तयार करून दिला. हे लिहून कधीच न संपणारी अशी वही…


www.vijaygaikwad.com हे माझं नाव अमेरिकेतल्या फ्रॉक्झी या कंपनीने घेतलेलं होतं ते आम्ही पंधराशे रुपयेला विकत घेतलं हे विष्णू गाडेकर यांनीच केलं.दरवर्षी पंधराशे रुपये भरून हा ब्लॉग रिन्यूव करावा लागतो. पण माझ्याकडे पैसे नव्हते,तसेच साहेबांच्याकडेही नव्हते त्यांनी एक मार्ग काढला आपली चालू असणारी स्वतः ची एक वेबसाईट बंद केली.आणि www.vijaygaikwad.com हे वेबसाईट सुरू केली. अशा या मित्राला जन्मदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा.आम्ही ब्लॉग सुरू केला त्या वेळेला आम्हाला प्रश्न पडला होता. वाचक मिळतील का ? पण वाचकांना मला भरभरून प्रेम दिलं त्या सर्वांचेही आभार त्यावेळेला त्यांनी मला सांगितले शंभर वाचक ही मिळवायला फार वेळ लागेल आपल्याला पण आज ६४३८१ वाचक तर लेख ६१४ लेख,२३९ भाषा व किमान २० देशांमध्ये तो सन्मानाने वाचला जातो.


त्यांनी ज्या वेळेला मला विचारलं,वाचक मिळतील का ? मी ठामपणे सांगितलं एक जरी वाचक मला मिळाला तरी मी आयुष्यभर त्या एका वाचकांसाठी लेखन करीन. आज ठामपणे मी त्यांना हे सांगू इच्छितो की त्यांच्या सोबत केलेला हा प्रवास माझ्यासाठी खरोखर अविस्मरणीय असा आहे,आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी लिहित राहिन….धन्यवाद


मॅट्रिक फेल विजय गायकवाड,टोप,कोल्हापूर


संक्षिप्त वाढदिवस शुभेच्छा


आयुष्याला दिशा देणारा,

लेखनावर विश्वास ठेवायला शिकवणारा

आणि न शिकवता शहाणं करणारा माणूस—

विष्णू गाडेकर सर.

मित्रत्व,समर्पण आणि विश्वास यांचा

खरा अर्थ तुमच्याकडून शिकायला मिळाला.

तुमच्यासोबतचा प्रवास माझ्यासाठी सदैव प्रेरणादायी आहे.

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

— डॉ. दिपक शेटे (गणितायन)


विजय गायकवाड : न थांबणाऱ्या लेखणीचा उत्सव


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

विजय गायकवाड

शब्दांना अर्थ देणारा,

विचारांना दिशा देणारा,

आणि माणसांना माणूसपणाशी जोडणारा

विजय गायकवाड —

जगण्याच्या कठीण वाटांवरून चालताना

लेखणीला कधी थांबू न दिलेला,

अपयशालाही अनुभव मानून

यशाला माणुसकीची किनार देणारा

तुमचा हा प्रवास खरोखर प्रेरणादायी आहे.

एक जरी वाचक मिळाला

तरी आयुष्यभर लिहिण्याचा दिलेला शब्द

आज हजारो वाचकांच्या विश्वासात

परावर्तित होताना दिसतो आहे.

शब्दांची ही न संपणारी वही

समाजाला प्रकाश देत राहो,

हीच सदिच्छा.

तुमच्या लेखणीतून

सत्य,संवेदना आणि सामाजिक भान

असंच अखंड वाहत राहो.

नवे विचार, नवी माणसं

आणि नवे क्षितिजे

तुमच्या लेखनातून जन्माला यावीत.

 वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

आरोग्य,आनंद,समाधान

आणि लेखणीला अखंड बळ लाभो.


— शुभेच्छुक

डॉ. दिपक शेटे (गणितायन) 


काही वर्षापूर्वी एका *विद्यापीठाची*ओळख एका सन्मित्रा मुळे झाली.त्या विद्यापीठात जगातील सर्वच ज्ञानाचं भांडार आहे.हे विद्यापीठ म्हणजे आदरणीय *विजयजी गायकवाड साहेब*.ज्यांच्या शब्दाचा मी चाहता.माझ्यासारख्या अनेकांचे आदर्श असणाऱ्या साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा - दादासाहेब ताजणे,(लाडके शिक्षक)


आदरणीय **विजय गायकवाड सर


आपले व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानाचा असा एक 'कल्पवृक्ष'आहे,ज्याच्या आश्रयाला येणाऱ्या प्रत्येकाला प्रगतीची नवी दिशा आणि समृद्धी मिळते.आपल्या अफाट बुद्धिमत्तेचा आणि अनुभवाचा हा 'ज्ञानवृक्ष आम्हा सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी ठरला आहे.आपल्या ज्ञानाच्या भांडारातून आपण दिलेल्या मार्गदर्शनामुळे आम्ही स्वतःला नेहमीच समृद्ध समजतो.


आज आपल्या *वाढदिवसानिमित्त*आपल्याला उदंड आयुष्य,उत्तम आरोग्य आणि सुख-समृद्धी लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.आपल्या मार्गदर्शनाचा हा वटवृक्ष असाच उत्तरोत्तर बहरत राहो.आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


पार्थ राजे गाडेकर युवा तंत्रज्ञ,सेलू