* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: माझ्या वातावरणातला मुलगा / A boy in my environment

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

३१/१/२६

माझ्या वातावरणातला मुलगा / A boy in my environment

ते बाह्य बदल क्युबामध्ये रोजच घडत होते.या क्रांतीबद्दल जाणून घेण्याची,जी ताकद खूप काळासाठी दाबून ठेवण्यात आली होती.त्या लोकांमधल्या ताकदीला जाणून घ्यायचा एक मार्ग म्हणजे क्युबामधल्या सर्व संघटनांना,कार्यस्थळांना भेट देणं. आणि वैद्यकीय प्रश्नातील मन ओळखण्याचा एक मार्ग म्हणजे नुसती माहिती करून घेणं किंवा स्थळांना भेट देणं नव्हे तर ज्यांनी या संघटना,कार्यस्थळे उभारली त्यांच्याबद्दल जाणून घेणं.तिथे जा आणि त्यांना कोणते आजार आहेत,कोणते रोग झाले आहेत हे शोधा,त्यांनी इतकी वर्षे किती तीव्र गरिबी अनुभवली आहे,वारसा म्हणून मिळालेली दडपशाही आणि शरणागती सहन केली आहे ते पाहा.डॉक्टर,वैद्यकीय कर्मचारी अशा समाजातल्याच व्यक्तींनी मनापासून त्यांच्या नवीन कामावर जायला हवे.


डॉक्टरांचं काम नेहमीच महत्त्वपूर्ण असतं.जगामध्ये जे काही घडतंय त्याबद्दल माहिती असणं,रुग्णाच्या संबंधित काय घडतंय,रुग्णाची मानसिकता काय आहे, वेदनेचं दुःख काय आहे हे सगळं समजून घेणं हे डॉक्टरांच्या सामाजिक जीवनातलं.फार मोठ्या जबाबदारीचं काम आहे.


काही महिन्यांपूर्वी हॅवानामधल्या काही विद्यार्थ्यांच्या गटानं,काही नुकत्याच उत्तीर्ण झालेल्या डॉक्टरांच्या गटानं ग्रामीण भागात जायला नकार दिला आणि तिथे जायला जास्त पैशांची मागणी केली. मागच्या अनुभवावरून.हे असं घडणं स्वाभाविक होतं, कमीतकमी माझ्यासाठी तरी आणि मला ते समजले. मला आठवतं तसंच हे काही वर्षांपूर्वी होतं.पुन्हा एकदा हा एक बंडामधील योद्धा आहे.एका चांगल्या भविष्याची खात्री हवी असलेला हा एकाकी सेनानी आहे.चांगली स्थिती आणि त्यानं किंवा तिनं केलेल्या कामाची पावती त्याला हवी आहे.


जर हे ते लोक नसते तर काय झालं असतं? बहुतेक करून ज्यांची कुटुंबे त्यांच्या शिक्षणासाठी पैसे देऊ शकत होते,ज्यांनी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि आता ते व्यावसायिक सराव सुरू करत होते. जादूनं म्हणा किंवा कसंही,जर विद्यापीठाच्या व्याख्यान हॉलमधून २०० किंवा ३०० शेतकरी बाहेर पडले असते तर काय झालं असतं ?


सोप्या भाषेत सांगायचं,तर ते शेतकरी त्यांच्या भावाला किंवा बहिणीला भेटण्यासाठी अतिशय आनंदाने लगेचच पळाले असते.त्यांनी शिक्षणासाठी दिलेली अनेक वर्षं वाया गेली नाहीत हे दाखवण्यासाठी त्यांनी सर्वाधिक जबाबदारी आणि सर्वाधिक काम असलेल्या पदांची विनंती केली असती.जेव्हा नवीन विद्यार्थी, कामगार आणि शेतकरी वर्गाची मुलं कोणत्याही प्रकारची

पदवी प्राप्त केल्यावर घडतं; ते तेव्हा तसंच घडलं असतं.


पण आपल्याला भविष्याकडे भीतीनं पाहण्याची गरज नाही आणि माणसांना कामगार वर्ग किंवा शेतकरी वर्गाच्या मुलांमध्ये आणि प्रतिक्रांती-विरोधकांमध्ये विभाजित करायला नको.ते सरळ आहे,

खरं नाही आणि क्रांतीत राहणाऱ्या माननीय व्यक्तीला त्यात शिकण्यासारखं काहीही नाही.


आमच्यापैकी जो पहिला गट ग्रॅन्वाला पोहोचला होता, ज्यांनी स्वतःला सिएरा मेस्त्रामध्ये स्थापित केलं होतं,जे त्यांच्यासोबत राहणाऱ्या शेतकरी आणि कामगारांचा आदर करायला शिकले,त्या कोणालाही शेतकरी किंवा कामगार असण्याचा भूतकाळ नव्हता.

साहजिकपणे ते असे होते,ज्यांना काम करायचंच होतं,ज्यांना लहानपणापासून काहीतरी हवं होतं.पण भूक,खरी भूक काय असते हे कोणालाही माहीत नव्हतं, आणि आम्हाला तात्पुरत्या,दोन वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर ते समजायला लागलं होतं. 


आणि त्या नंतर खूप गोष्टी स्पष्ट होत गेल्या.एका माणसाच्या आयुष्याची किंमत पृथ्वीवरच्या सर्वांत श्रीमंत व्यक्तीच्या संपत्तीपेक्षा करोडो पटींनी जास्त आहे हे आम्ही उत्तम प्रकारे शिकलो.आम्ही कामगार किंवा शेतकऱ्यांची मुलं नव्हतो,ही गोष्ट आम्ही तिथे शिकलो. मग आम्ही हे कशासाठी चार दिशांना ओरडून सांगायला हवं की आम्ही कोणीतरी विशेष आहोत आणि बाकी उरलेले क्युबन लोक शिकूदेखील शकत नाहीत? होय ते शिकू शकतात.खरंतर क्रांतीची हीच अपेक्षा आहे की त्यांनी शिकायला हवं,अपेक्षा आहे की त्यांना हे समजायला हवं की चांगल्या उत्पन्नापेक्षा आपल्या नेत्याची सेवा करणं जास्त महत्त्वाचं आहे,कृतज्ञता कायमस्वरूपी टिकणारी आहे,एखाद्याने जमा केलेल्या सोन्यापेक्षा जास्त काळ टिकणारी आहे.प्रत्येक डॉक्टरने त्याच्या कार्यवर्तुळातही लोकांची कृतज्ञता मिळवली पाहिजे.हा मौल्यवान खजिना मिळवू शकतो आणि त्यानं तो मिळवायला हवा.


आपण आपल्या जुन्या संकल्पना पुसून टाकायला हव्यात आणि लोकांच्या जास्तीतजास्त जवळ जायला हवे.आधीसारखे नाही,

कारण तुम्ही सर्व असे म्हणाल, नाही,मी तर लोकांचा मित्र आहे.

मला कामगार आणि शेतकरी लोकांशी बोलायला आवडते,आणि मी रविवारी अशा अशा ठिकाणी असं... असं बघायला जातो. प्रत्येक जण ते करतो.पण ते लोक दानधर्मासाठी करतात आणि आपण हे एकतेसाठी करतो.आपण पण "हे बघा आम्ही आलो आहोत", हे सांगण्यासाठी जायला नको."आम्ही इथे तुम्हाला काही द्यायला आलो आहोत,तुम्हाला आमचे विज्ञान शिकवण्यासाठी आलो आहोत,तुमच्या चुका दुरुस्त करण्यासाठी,तुम्हाला सुसंस्कृत बनवण्यासाठी,तुमच्या प्राथमिक ज्ञानाचा अभाव दूर करण्यासाठी आलो आहोत.आपण शोधात्मक भावनेच्या उत्साहाने जायला हवं, शहाणपणाच्या अशा महान स्रोतापासून शिकण्यासाठी लोक आहेत," हे आपण सांगायला हवं.


आपल्याला बऱ्याचदा अशी जाणीव होते की,आपण किती चुकीच्या संकल्पनांमध्ये होतो ज्या आपल्याला माहीत होत्या.त्या आपल्यातल्याच एक भाग झाल्या होत्या आणि साहजिकच आपल्या चेतनेचाही भाग झाल्या होत्या.प्रत्येक वेळेस आपण आपल्या सर्व संकल्पना बदलल्या पाहिजेत,केवळ सामान्य किंवा तांत्रिक संकल्पनाच नव्हे,तर काही वेळा वैद्यकीय संकल्पना

देखील.एखाद्या मोठ्या शहरात रोगांवर केले जातात तसे उपचार खेड्यात उपलब्ध नाहीत असं आपण नेहमीच पाहतो.आपण असं बघू की डॉक्टरांनासुद्धा शेतकऱ्यासारखं बनावं लागेल,त्याला किंवा तिला नवीन पदार्थांची लागवड करणं शिकावं लागेल,आणि आता एक गरीब देश असलेला क्युबा कदाचित जगातील सर्वांत श्रीमंत कृषिदेश असू शकतो, त्याच्या अन्नरचनेत विविधता आणण्यासाठी त्याच्या किंवा तिच्या उदाहरणातून नवीन प्रकारचे अन्न खाण्याची कला जोपासावी लागेल.आपण पाहू की अशा परिस्थितीत आपल्याला थोडं शैक्षणिक बनावं लागेल,कधी थोडं जास्तदेखील;कधी इतके राजकीयदेखील की आपण आपला शहाणपणा गमावणार नाही,आपल्याला हे दाखवून द्यावं लागेल की आपण लोकांसोबत शिकायला तयार आहोत.नवीन क्युबाच्या निर्मितीसाठी तो महान सुंदर अनुभव घ्यायला आम्ही तयार आहोत.


आपण आधीच महत्त्वाची पावलं उचलली आहेत. १ जानेवारी १९५९ आणि आजमधील अंतर पारंपारिक पद्धतीने मोजता येणार नाही.काही काळापूर्वीच लोकांना समजलंय की इथे फक्त हुकूमशहाच पडला नाही तर इथली पूर्ण व्यवस्थाच कोलमडली आहे.आता लोकांनी हे समजून घ्यायला हवं की या कोसळलेल्या व्यवस्थेच्या अवशेषांवरच अशी व्यवस्था उभी राहायला हवी-जी लोकांना परिपूर्ण आनंद देईल.


आमची अशी खात्री पटली आहे की शत्रू एक आहे. आपल्याला माहीत आहे की,प्रत्येक जण याची वाट बघत आहे की कोणीतरी त्यांचे ऐकून घेईन,आपला आणि संपूर्ण लॅटिन अमेरिकेचा शत्रू,युनायटेड स्टेटमधलं एकाधिकारशाहीचं सरकार आहे असं सांगण्यापूर्वी एकाधिकारशाहीच्या विरोधातलं आपलं मत स्पष्टपणे मांडण्यापूर्वी,दूतावासात कोणीतरी आपलं म्हणणं ऐकून घेऊन ते प्रसारित करेल.


जेव्हा सगळ्यांना माहीत आहे की शत्रू कोण आहे, जेव्हा शत्रूच्या विरोधात लढणाऱ्या लोकांमध्ये समान धागा असणं आपला सुरुवातीचा मुद्दा असेल,तेव्हा दुसरा मुद्दा येतो.आपलं क्युबामध्ये काय ध्येय आहे? आपल्याला काय हवं आहे? आपल्याला लोकांचा आनंद हवा आहे की नको? आपण क्युबाच्या संपूर्ण आर्थिक मुक्तीसाठी लढत आहोत की नाही? आपण कोणत्याही लष्करी गटाशिवाय,कोणताही अंतर्गत किंवा विदेशी निर्णय घेण्यासाठी पृथ्वीवरच्या कोणत्याही मोठ्या शक्तीच्या दूतावासाच्या सल्ल्याशिवाय,इतर अनेक मुक्त देशांप्रमाणे आपला देश मुक्त करण्यासाठी लढत आहोत का? आपण ज्यांच्याकडे जास्त आर्थिक सुबत्ता आहे त्यांच्याकडून ज्यांच्याकडे अजिबात नाही अशांना परत वाटप करण्याबद्दल विचार करत आहोत का? आपण कलात्मक कामाबद्दल,रोज आनंद देणाऱ्या गोष्टी करण्याबाबत विचार करत आहोत का? जर करत असू,तर आपल्याकडे आधीच आपली ध्येयं आहेत. मोठ्या धोक्याच्या वेळेस,मोठ्या चिंतेच्या वेळेस आणि मोठ्या निर्माणाच्या वेळेस जे काही ग्राह्य धरले जाते ते म्हणजे मोठे शत्रू आणि मोठी ध्येयं.जर आपण सहमत असू तर आपल्याला माहीत आहे की आपल्याला कुठे जायचं आहे,नंतर आपल्याला आपलं काम सुरू करायचं आहे.


मी सांगत होतो की क्रांतिकारी बनण्यासाठी क्रांती होणं गरजेचं आहे.आपल्याकडे ती आधीच झाली आहे. आणि क्रांतिकारी व्यक्तीला हेदेखील माहीत असायला हवं की त्याला किंवा तिला कोणत्या लोकांसोबत काम करायचं आहे.मला असं वाटतं की आपण अजूनही एकमेकांना व्यवस्थित ओळखत नाही.

आपल्याला अजूनही थोडा प्रवास करायला हवा आहे. जर आपल्याला ध्येय माहीत असेल,आपला शत्रू माहीत असेल आणि जर कुठे प्रवास करायचा आहे ती दिशा माहीत असेल,तर बाकी फक्त उरते,ते म्हणजे


रोजचा रस्ता माहीत असणं आणि त्यावर चालणं. कोणीही त्या रस्त्याकडे बोट दाखवू शकत नाही,तो रस्ता प्रत्येकाचा वेगळा असतो,हा तो रस्ता आहे ज्यावरून तो किंवा ती रोज प्रवास करत असतात,रोज वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जात असतात आणि आपल्या व्यावसायिक जीवनात त्याचा अवलंब करत असतात, लोकांच्या चांगल्यासाठी ते समर्पित असतात.


जर आपल्याकडे आधीच हे पैलू असतील,ज्यांद्वारे आपल्याला भविष्याकडे वाटचाल करायची आहे,तर मग चला जोसर्तीमाच्या एका वाक्याचं स्मरण करू या, 'जे सध्या माझ्या आचरणात आलं नसलं,तरी ते आपण आपल्या आचरणात आणलं पाहिजे', 'सांगण्याचा उत्तम मार्ग म्हणजे करणं.' आणि चला तर मग... क्युबाच्या भविष्याकडे वाटचाल करू या.


समाप्त..