* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: विस्कळीत एकत्रित/Disruptive aggregates

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१/१०/२५

विस्कळीत एकत्रित/Disruptive aggregates

झाडावरून गळून पडलेलं एक कोमेजलेलं, सुगंध मालवलेलं निस्तेज फूल हळुवार मातीवर पहुडलं. 


मातीने त्याच्या नाजूक पाकळयांना जोजवत विचारलं, "काही त्रास नाही ना झाला ?"


सुकून गेलेल्या फुलाने देठापासून देह हलवण्याचा यत्न केला आणि पाकळयांनीच नाही म्हणून खुणावलं. 


काही क्षण असेच गेले...


आपल्या कुशीत घेण्यास आतुर झालेल्या मातीने पुन्हा कातर आवाजात विचारलं, "झाडावरून गळून पडल्याचं खूप दुःख होतंय का ? फार वाईट असतं का हे सर्व ?"


म्लान पाकळ्यावर मंद स्मित झळकलं. फुल म्हणालं, "निमिषार्धासाठी वाईट वाटलं.. कारण झाडाशी, पानांशी, गुच्छातल्या सोबती फुलांशी, उमलत्या कळ्यांशी, ओबड धोबड फांद्यांशी आता ताटातूट होणार म्हणून वाईट वाटलं. पण पुढच्याच क्षणाला आनंदही वाटला. जितका काळ झाडावर होतो तेंव्हा वारा येऊन कानात गुंजन करायचा, पाकळयांशी झटायचा, झोंबायचा. कधी त्याचा राग यायचा तर कधी त्याच्यासोबत अल्लड होऊन उडत जावं असं वाटायचं. 


पण तेंव्हा मी झाडाचा एक भाग होतो त्यामुळे माझा एकट्याचा निर्णय घेण्यास मी स्वतंत्र नव्हतो... "


"तू आता स्वतंत्र झालास खरा पण आता तू क्षणा क्षणाला कोमेजत चाललायस .... आता काय करणार ?" - मातीचा प्रश्न.

 

दीर्घ उसासा टाकत फूल म्हणालं, "आता हवा जिकडे नेईल तिकडे मी जाईन... वाऱ्यावर स्वार होऊन जीवात जीव असे तोवर जमेल तितके जग पाहून घेईन... मग एकेक पाकळ्या झडतील, देठापासून तुटून पडेन. 


पण जिथं अखेरचे श्वास घेईन तिथल्या मातीशी एकरूप होईन.त्या मातीचं एक अंग होऊन जाईन आणि तिच्या कुशीत येऊन पडणाऱ्या नव्या बीजासाठी खत होऊन जाईन, त्या बीजातून अंकुरलेल्या झाडावर कोवळ्या फुलांचा एक टवटवीत गुच्छ असेल,माझं कर्म चांगलं असेल तर मीही त्या गुच्छात असेन !"


फुलाचं उत्तर ऐकून सद् गदीत झालेल्या मातीने त्याच्या सुरकुतल्या पाकळयांचे हलकेच चुंबन घेतले. 


काही वेळ निशब्द शांतता राहिली आणि पुढच्याच क्षणी मंद वाऱ्याची एक झुळूक आली आणि फुलाला त्याच्या अंतिम सफरीवर घेऊन गेली... 


आपलं आयुष्यही असंच आहे.


संसार कुटुंब आप्तेष्ट मित्र ही सगळी त्या झाडाची भिन्न अंगे.आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या की कुणी स्वखुशीने त्यातून बाहेर पडतो तर कुणा कमनशिबींना परागंदा व्हावं लागतं. 


मग सुरु होतो एका जीवाचा एकाकी सफर... जो आपल्याला आयुष्यातलं अंतिम सत्य दाखवून देतो. 


आयुष्यातली सत्कर्माची शिदोरी मजबूत असली की हा प्रवास सुसह्य असतो, इथं आपल्याला मदत करायला कुणी येत नसतं.


नियतीच्या वाऱ्यावर आपल्याला उडावं लागतं. आपणही असेच पंचतत्वात विलीन होतो आणि प्रारब्धात असलं तर जीवनाच्या पुष्पगुच्छात पुन्हा अवतिर्ण होतो !


जीवन सुंदर तर आहेच...

पण ते अर्थपूर्णही आहे !


भूकंप म्हणजे नक्की काय हे समजून घेण्याआधी आपल्याला ( प्लेट टेटॉनिक्स ) भुकवच आणि त्याच्या हालचालींची माहिती करून घ्यावी लागेल. यासोबतच शतकभरापूर्वी,आल्फ्रेड वेगेनेर ह्या जर्मन शास्त्रज्ञाने, खंड सरकतात अशी एक बंडखोर कल्पना मांडली. बऱ्याच जणांनी त्याला वेड्यात काढलं प्रचंड गलबतासारखे खंड हलत असतात असे त्याने सुचवले. वेगनरच्या मते आफ्रिका,दक्षिण अमेरिका,ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका हे सारे खंड आधी एकत्र होते.पुढे ते सरकत सरकत लांब लांब गेले. वेगेनेरची भरपूर चेष्टा झाली. पण अखेर त्यांचं म्हणणं खरं ठरलं. व जे हसले त्यांचे दात दिसले. हा नवीन सिद्धांत मला बदलाची व समजून घेण्याची जाणीव देऊन गेला.


"तथागत गौतम बुद्धांएवढा बुद्धिमान,प्रगल्भ,परिपूर्ण माणूस जगाने आजवर पाहिलेला नाही.बुद्धांच्या सामर्थ्याचा एक थेंब माझ्याकडे असता,तरी खूप झाले असते! एवढा थोर तत्त्वचिंतक कोणीच आजवर बघितला नाही.असा शिक्षक यापूर्वी कधी होऊन गेला नाही. काय सामर्थ्य होते पाहा. जुलमी ब्राह्मणांच्या सत्तेसमोरही हा माणूस वाकला नाही.उभा राहिला. तेवत राहिला…"


हे कोण म्हणतंय? 


साक्षात स्वामी विवेकानंद. हिंदुत्वाचा ध्वज जगभर घेऊन जाणारे विवेकानंद १९०० मध्ये तथागत गौतम बुद्धांविषयी कॅलिफोर्नियात बोलत होते. 


भारताची जगभरातली खरी ओळख आजही 'बुद्धांचा देश' हीच आहे.भलेही त्यांचे जन्मगाव असणारे लुंबिनी आता नेपाळमध्ये असेल,पण बुद्ध आपले आणि आपण सारे बुद्धांचे. 


'बुद्धांशी तुलना होईल,असा एकही माणूस नंतर जन्मलाच नाही',असे आचार्य रजनीशांनी म्हणावे! 


बुद्ध थोर होतेच,पण बुद्धांची खरी थोरवी अशी की, आपण प्रेषित असल्याचा दावा त्यांनी कधी केला नाही. येशू,पैगंबर,कृष्ण यांच्याविषयी आदर स्वाभाविक आहे. पण,बुद्ध हे या इतरांप्रमाणे प्रेषित नव्हते.स्वतःला परमेश्वर मानत नव्हते.मला सगळं जगणं समजलंय, असा त्यांचा दावा नव्हता.मीच अंतिम आहे,असे बुद्ध कधीच म्हणाले नाहीत.डॉ.आ.ह.साळुंखे म्हणतात त्याप्रमाणे,

"अन्य धर्मसंस्थापकांनी लोकांना कर्मकांडाची चाकोरी दिली.त्या चाकोरीने बांधून टाकले. तथागतांचा धम्म ही विचारांची चाकोरीबद्ध मांडणी नव्हती.चाकोरी तोडून मुक्त करणारा धर्म बुद्धांनी सांगितला."


'प्रत्येकामध्ये पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्णत्व दडलेले आहेच,

असे विवेकानंद म्हणाले,तो प्रभाव बुद्धांचाच तर होता.तुम्ही सगळं जग ओळखलं,पण स्वतःला ओळखलं नाही.म्हणून तर स्वतःला शरण जा,असे तथागत म्हणाले 'बुद्धं सरणं गच्छामि' म्हणजे अन्य काही नाही. स्वतःला शरण जा,हाच त्याचा अर्थ."कोणी काही सांगेल,म्हणून विश्वास ठेऊ नका.

उद्या मीही काही सांगेल.म्हणून ते अंतिम मानू नका.पिटकात एखादी गोष्ट आली आहे,म्हणून विश्वास ठेऊ नका",असं म्हणाले बुद्ध. 


जगातला एक धर्म सांगा,एक धर्मसंस्थापक सांगा,की जो स्वतःची अशी स्वतःच चिरफाड करतो! चिकित्सेची तयारी दाखवतो! 'भक्त' वाढत चाललेले असताना, विखार ही मातृभाषा होत असताना आणि 'व्हाट्सॲप फॉरवर्ड' हेच ज्ञान झालेलं असताना बुद्धांचा हा दृष्टिकोन आणखी समकालीन महत्त्वाचा वाटू लागतो. माणूस बदलतो,यावर बुद्ध विश्वास ठेवतात.


कोणीही मानव बुद्ध होऊ शकतो,याची हमी देतात.

मात्र,स्वतःला शरण जा,हीच पूर्वअट सांगतात. 


ज्याला बुद्ध समजला,त्याला 'सो कॉल्ड सक्सेस'वरची गल्लाभरू पुस्तकं वाचण्याची काही गरज नाही.'अत्त दीप भव' म्हणणारे बुद्ध तुमच्या आत असलेला दिवा प्रकाशमान करत असतात.दिवा असतोच आत,पण काजळी एवढी चढते की,आपण आपल्यालाच अंधारकोठडीत ढकलून देतो. 


बुद्ध जगात दुःख आहे, हे मान्य करतात.पण दुःखावर मात करण्याचं बळ देतात.दुःख आहे,हे समजायला तर हवंच.मग त्याचं स्वरूप शोधायला हवं,अशा वाटेनं जात तुमच्या आयुष्यात बुद्ध आनंदाची उधळण करतात. जन्मापूर्वी काय आणि मृत्यूनंतर काय,अशा कोणत्याही हुबासक्या न मारता,बुद्ध जीवनाविषयी बोलतात. जगण्याविषयी बोलतात.त्यातला प्रत्येक पदर उलगडून दाखवतात.अगदी झोपेवर बोलतात आणि आहारावरही. मैत्रीवर बोलतात आणि संसारावरही.आधुनिक मानसशास्त्रज्ञांनाही बुद्ध थक्क करतात.मनाची गुपितं उघड करतात आणि मानवी मनाचं विश्वरूपदर्शन घडवतात. बुद्ध माझ्या आयुष्यात आले ते डॉ.प्रदीप आवटे यांच्या 'धम्मधारा' या पुस्तकामुळे.बुद्ध एवढा रसाळ,सोपा आहे;तो कोणी परका नाही.


तो तर 'मित्र' आहे,असे वाटले 'धम्मधारा' हा कवितासंग्रह वाचताना. डॉ.आवटे म्हणजे तेच जे आज 'कोरोना'विषयी अखंड बोलताहेत आणि अथक लढताहेत.त्यांच्या शब्दातून मी बुद्धाची 'करूणा'ही वाचलीय! विनोबांनी जे 'गीताई'त केलं,गदिमांनी 'गीतरामायणा'त केलं,त्यापेक्षाही महत्त्वाचं काम बुद्धांच्या संदर्भानं 'धम्मधारा'नं केलं. मलाच काय,अनेक साध्यासुध्या मराठी माणसांना बुद्ध त्यामुळं समजला. 


बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचं संस्कृत भाषांतर करावं,अशी इच्छा काही शिष्यांनी व्यक्त केली होती.त्यावर बुद्ध भडकले होते.संस्कृतला त्यांचा विरोध नव्हता.पण,जी कोणाचीच मातृभाषा नाही,त्या भाषेत माझे तत्त्वज्ञान कशाला? मूठभरांना मिरवण्यासाठी हे तत्त्वज्ञान नव्हतेच.सर्वसामान्य माणसासाठी बुद्ध मांडत होते. त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवू पाहात होते. भाषेवरून आठवलेःसंवादाची आवश्यकताही बुद्ध एके ठिकाणी सांगतात.

आणि,मतभेद असले तरीही भाषेचा स्तर घसरता कामा नये,हेही स्पष्ट करतात. 


बुद्धांनी सगळ्यात महत्त्वाचे काय केले? 


एक प्रसंग आहे.बुद्ध कोसल देशात विहार करत होते. झाडाखाली झोपले होते.तेव्हा एक ब्राह्मण तिकडे अग्निहोत्र करत होता.तो ब्राह्मण बुद्धांना प्रसाद देण्यासाठी गेला.

पण,आधी त्याने बुद्धांना जात विचारली.तेव्हा,बुद्ध म्हणाले, "जात नको विचारूस. आचरण विचार." पुढे बुद्ध त्याला म्हणाले, "हे ब्राह्मणा, यज्ञात लाकूड जाळून शुद्धी मिळत नाही.मी लाकूड जाळत नाही.आंतरिक ज्योती उजळवतो.

माझा हा अग्नी नित्य प्रज्वलित असतो!" त्यांचे हे विचार ऐकून ब्राह्मण प्रभावित होतो आणि त्यांना भोजनाचा आग्रह करू लागतो.तेव्हा,बुद्ध म्हणतातः "जेथे मी धम्माचा उपदेश करतो,तेथे भोजन करत नाही." 


बुद्ध तपस्वी खरेच,पण तसेच जिप्सीही.ते विलक्षण संघटकही होते.अमोघ वक्ते होते.अभिव्यक्तीची अनेक माध्यमे त्यांनी प्रातिभ शैलीने हाताळलेली दिसतात. तुकडोजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे,हातात तलवार न घेता बुद्धांनी जगावर राज्य केले.

अशोकासारखे जगज्जेते सम्राटही बुद्धाच्या वाटेने चालू लागले.

तेही त्या काळात. (इ.स.पू ६२३ - ५४३ हा बुद्धांचा काळ मानला जातो. ८० वर्षांचे आयुष्य बुद्ध जगले.) बुद्धांनी संघ स्थापन केला.संघामुळेच धम्म जगभर पोहोचला.बुद्धांचे अपहरण करणा-यांनी बुद्धाला विष्णूचा अवतार तर केलेच,पण पुढे 'संघ' हा शब्दही चोरला.बुद्धांना 'भगवान' म्हणतात,ते 'भगवा' यावरून आले आहे.पण, या भगव्या रंगाचेही अपहरण झाले.माणूस मोठा झाला की त्याचे अपहरण करायचे,पण त्याच्या विचारांच्या विपरित वागायचे! हा डाव कळला नाही,म्हणून बुद्धाचेही बोट आपण सोडले.बुद्धांच्या निधनानंतर चारशे वर्षांनी 'मनुस्मृती' येते, याची आणखी कारणपरंपरा कोणती सांगणार? 


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला पुन्हा ख-याखु-या बुद्धाची वाट दाखवली.प्रज्ञा,शील,करूणा आणि स्वातंत्र्य,समता,बंधुता सांगणारा- 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' सांगणारा बुद्ध बाबासाहेबांना प्रकाशमान करणे अगदीच स्वाभाविक होते.बुद्ध म्हणजे असा प्रकाश आहे,जो अनुभवता येतो.भरून घेता येतो, असे बाबासाहेब सांगतात.  


रजनीश म्हणतात त्याप्रमाणे,बुद्धाचे खरे वेगळेपण हेच की त्याला स्पर्श करता येतो.बाकी सगळे धर्म धमकावत असताना,हा आईच्या मायेने जवळ घेतो. मनात घर करतो.आणि,मुख्य म्हणजे,त्याला शोधायला कुठे हिमालयात जावे लागत नाही.अगदी बाहेरच्या चौकात बुद्ध भेटतो. 


बुद्ध बाहेर भेटत असला,तरी तो असतो तुझ्या-माझ्या मनात. 


गोंधळलेल्या अर्जुनाला साक्षात परमेश्वर विश्वरूपदर्शन देतात.परमेश्वराला शरण ये,असे सांगत स्वतःच्या दैवी प्रकाशाने थक्क करतात.मग,युद्धाचा मार्ग सांगतात.इथे मात्र गोंधळलेल्या अर्जुनांना 'तू स्वतःलाच शरण जा. तुझ्यातला प्रकाश तुला सापडेल', असे समजावत बुद्ध युद्धाची नव्हे, तर शांतीची- प्रेमाची दिशा दाखवतात. 


बाबासाहेब म्हणतात त्याप्रमाणे,संपन्न शेतकरी कुटुंबातला हा सिद्धार्थ.आपल्यासारखाच गोंधळलेला सिद्धार्थ 'बुद्ध' होऊ शकतो.तर, तू का नाही? मी का नाही?


व्यवस्थेला शरण जाणारे तू नि मी स्वतःला शरण का जात नाही?गृहत्यागानंतर सिद्धार्थला समजले,ते बुद्ध सोबत असताना गृहवासात आपल्याला का समजणार नाही? आजचा दिवस आहे, हाच प्रश्न या गृहवासात स्वतःला विचारण्याचा. 'अत्त दीप भव' हाच तर 'पासवर्ड' आहे 'बुद्ध' होण्याचा! 


- संजय आवटे 


(संदर्भः १. डॉ. बाबासाहेब आंबेडकरः बुद्ध आणि त्यांचा धम्म,२. डॉ. आ. ह. साळुंखेः सर्वोत्तम भूमिपुत्रः गोतम बुद्ध,३. डॉ. प्रदीप आवटेः धम्मधारा)


गरज ही शोधाची जननी बनण्यापेक्षा शोध हाच गरजेचा पिता ठरतो..!


जेम्स वॅटने १७६९ साली वाफेच्या इंजिनाचा शोध लावला, कारण ब्रिटिश कोळसा खाणीत भरलेले पाणी बाहेर काढण्याची समस्या त्याला सोडवायची होती. जेम्स वॅटन खाणीतलं पाणी बाहेर काढण्यासाठी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला खरा, परंतु लवकरच त्याचा वापर कापड गिरण्यांना ऊर्जा देण्यासाठी होऊ लागला. नंतर रेल्वे इंजिन आणि बोटीच्या इंजिनासाठी अधिक नफ्यावर त्याचा वापर होऊ लागला.


जेम्स वॅटने १७६९ साली वाफेच्या इंजिनाचा शोध तेव्हा चहाच्या किटलीच्या तोंडातून बाहेर येणारी वाफ पाहून त्याला प्रेरणा मिळाली होती.या तथाकथितदंतकथेमागचं सत्य हे आहे की वॅटला आपल्या वाफेच्या इंजिनाची कल्पना थॉमस न्यूकॉमेननं बनवलेल्या वाफेच्या इंजिनाच्या मॉडेलमध्ये दुरुस्ती करताना मिळाली होती. ते इंजिन न्यूकॉमेनने ५७ वर्षापूर्वी शोधलं होतं आणि वॅटचं दुरुस्ती काम अवतरेपर्यंत तशी शंभराहून अधिक इंजिनं इंग्लंडमध्ये बनलीसुद्धा होती.न्यूकॉमेननंही थॉमस सॅव्हरी या इंग्रज व्यक्तीने १६९८ साली स्वामित्वहक्क घेतलेल्या वाफेच्या इंजिनाच्या आधारे आपलं इंजिन बनवलं होतं, तर सॅव्हरीने आपलं इंजिन डेनिस पॅपिन या फ्रेंच माणसानं १६८० साली डिझाईन केलेल्या परंतु प्रत्यक्षात न बनलेल्या वाफेच्या इंजिनाच्या आधारे बनवलं होतं. त्या फ्रेंच माणसानंही डच शास्त्रज्ञ ख्रिस्टियन हायगेन्स आणि अन्य लोकांच्या मूळ कल्पनेवरून डिझाइन केलं होतं.वॅटनं न्यूकॉमेनच्या इंजिनात ( स्वतंत्र स्टिम कंडेन्सर आणि डबल ॲक्टिंग सिलिंडर बसवून ) भरीव सुधारणा केली.(गन्स,जर्म्स अँड स्टील) आपल्या डाव्या आणि उजव्या भागात कोऑर्डिनेशन नसेल तर काय होऊ शकतं याविषयी ईस्ट सक्सेसमधल्या प्रायोगिक मानसशास्त्राचे प्राध्यापक ॲलन जे.पार्किन ( Parkin ) यांनी सांगताना एका केसविषयी लिहून ठेवलयं. यामध्ये त्या पेशंटचा डावा हात ज्या वेगानं कपडे काढत असे त्याच वेगानं उजवा हात ते घालत असे आणि हे तासन् तास चालायचं. कितीही तास प्रयत्न केला तरी कपडेच घालून होत नाहीयेत अशी तक्रार घेऊन तो पेशंट डॉक्टरकडे आला होता ! या आजाराला ' एलियन हंँड सिंड्रोम ( Alien Hand Syndrome )' असं म्हणतात. आपल्या शरीराच्या डाव्या भागाशी उजव्या मेंदूचा, तर उजव्या भागाशी डाव्या मेंदूचा भाग जोडलेला असतो. त्यांच्यातच एकसूत्रता आणि एकवाक्यता नसेल तर असं होतं.अल्बर्ट आइन्स्टाइन मेडिकल कॉलेजच्या 'डॉ.फाईनबर्ग (Dr.Feinberg) यानंही अशीच एक केस त्याच्या टेलिव्हिजनच्या मुलाखतीत सांगितली होती.एका बाईला म्हणे रात्री झोपच यायची नाही.सारखं तिला,कुणी तरी आपला गळा दाबतयं असा भास व्हायचा.उजव्या हातानं,पूर्ण शक्ती लावून ती तो हात बाजूला करायचा प्रयत्न करायची,पण ते तिला शक्य व्हायचं नाही. शेवटी तो गळा दाबणारा हात दुसरा-तिसरा कोणी नसून तिचा डावा हात होता हे तिच्या लक्षात आलं;पण तरीही तिनं पुढची अनेक महिने,वर्ष अर्धवट झोपेतच काढले !



या बहुतेक ए.एच.एस.च्या पेशंट्सना पूर्वी फीट्स येत असल्यानं त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती. कित्येकदा त्यांचा 'कॉर्पस कॅलॉसम' हा मेंदूचा डाव्या आणि उजव्या भागांना जोडणारा भाग काढून टाकण्यात आला होता.त्यामुळे या दोन भागांतली एकवाच्यता गेली होती.("मेंदू आणि मज्जा संस्था (शरीर)" पुस्तकातून)