* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: सिसीचा साधू फ्रेंन्सिस / Francis of Assisi

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

३/१०/२५

सिसीचा साधू फ्रेंन्सिस / Francis of Assisi

नऊ रक्ताळ क्रूसेडस् झाली.त्यांत भर म्हणून सेंट फॅन्सिसचे रक्तहीन दहावे क्रूसेडही झाले. मुसलमानांनाच नव्हे तर ख्रिश्चनांनाही खऱ्या ख्रिस्ती धर्माकडे वळविण्यासाठी सेंट फ्रेंन्सिस जीवनभर धडपडला.तो प्रभूचा खरा भक्त,प्रभुसंदेश गाणारा सौम्यमूर्ती संत होता.त्याने सारे जीवन प्रेमाने धर्मप्रसार करण्यात घालविले;पण त्या प्रयत्नांत त्याला फारसे यश आले नाही.

सेंट फ्रेंन्सिसचे पूर्ण नाव फॅन्सिस्को बर्नार्डोनो.तो इटॅलियन होता.ख्रिस्ताच्या जीवनाचे अनुकरण करावे,अशी त्याला इच्छा होती.पण खरोखर तो बुद्धाच्या (कॅथॉलिक पंथी बंडखोर : सिसीचा साधू फ्रेंन्सिस, मानव जातीची कथा हेन्री थॉमस,अनुवाद - साने गुरुजी) जीवनाप्रमाणे जगला.बुद्धाचे नावही त्याने कधी ऐकले नसेल.पण बुद्धाचेच जीवन न कळत का होईना,त्याच्या डोळ्यांसमोर होते. बुद्धाच्या जीवनातील प्रसंगांशी सेंट फ्रेंन्सिसच्या जीवनातील प्रसंगांचे आश्चर्यकारक साम्य आहे. दारिद्र्याशी समरस होण्यासाठी दोघांनीही आपापले वैभव झुगारून दिले ! दोघेही खासगी मालमत्ता म्हणजे पाप - पापांचे मूळ असे समजतात.मानवांच्या कपाळावरील दुःखांच्या रेषा पुसून टाकण्यासाठी दोघेही आमरण परिव्राजक होऊन भटकत राहिले.दोघांनीही जीवनातील सौंदर्य व करुणा ही नीट जाणली होती.

अखिल मानवजातीच्या चालू असलेल्या अफाट सहानुभूतीच्या संगीतातला आपण केवळ एक सूर आहोत,फक्त एक अंश आहोत असे त्या दोघांसही वाटे.दोघेही मरणप्रसंगी आपल्या मित्रांस म्हणाले, "आम्हांला जमिनीवर निजवा." संसारातील वस्तूंचे ओझे त्यांना नको होते.त्यांचा स्पर्श त्यांना पापमय वाटे." नको हा संग्रह,नकोत या भौतिक चिजा!" असे ते म्हणत.फॅन्सिस हा पिएट्रो बनोर्डोचा मुलगा.पिएट्रो हा कापडाचा सुखवस्तू व्यापारी होता.फ्रेंन्सिस उधळ्या,बंडखोर व भावनाप्रधान होता.तो एकदम उसळे,उफाळे.तथापि तो अत्यंत उदार होता.त्याला पैशाची किंमत कळत नसे.पैसा देण्यासाठी असतो, असेच जणू त्याला वाटे.डाव्याउजव्या हातांनी तो बेसुमार पैसे खर्ची,पण स्वतःसाठी नव्हे तर दुसऱ्यांच्या सुखासाठी.पित्याच्या पेटीत पैसा उगाच पडून राहण्यापेक्षा मित्रांना आनंद देण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा,हे त्याला पसंत पडे.त्याचा बाप काटकसरी होता,आईही जपून खर्च करणारी होती. ती म्हणे,"फ्रेंन्सिस जसा काही राजाच्या मुलासारखा वागतो ! आपण एका इटॅलियन दुकानदाराचा मुलगा आहोत हे जणू त्याच्या ध्यानीही नसते!" आई फ्रेंन्सिसबाबत थोडे प्रेमाने बोले;पण बापाने त्याच्याविषयी आशाच सोडली होती. फ्रेंन्सिस कधी काळी सुधारेल याची त्याला मुळीच शक्यता वाटत नसे.

आई-बाप फ्रेंन्सिसवर नाराज असले,तरी अ‍ॅसिसीचे सारे तरुण मात्र त्याला जीव की प्राण करीत.तो पैशाची किंवा स्वतःच्या प्राणाचीही पर्वा करीत नसे. तो हडकुळा होता,त्याचे डोळे काळेभोर व तेजस्वी होते.तो नेहमी आनंदी व उल्हासी असे.तो तरुणांचा खेळातला नेता म्होरक्या असे.तरुणांच्या फॅशन्स, त्यांच्या खोड्या,त्यांचे प्रेम-प्रकार या सर्वांत तो पुढे असे.तरुण टॉलस्टॉयप्रमाणे,यौवनारूढ बुद्धाप्रमाणे त्यालाही त्याचे मित्र 'खरा सवंगडी, जानी दोस्त' असे म्हणत.फॅन्सिस तारुण्य ओलांडून पलीकडे जात होता.त्या वेळी त्याचे शहर इटलीतील दुसऱ्या एका शहराशी युद्ध करण्यात गुंतले होते.त्या काळात अशी युद्धे नेहमीच चालत.पूर्वीचे रोमन साम्राज्य जाऊन त्याची अनेक लहानलहान स्वतंत्र संस्थाने प्रदेशांवर राज्य करीत.शेजारच्या राजांशी अखंड युद्ध सुरू असत.जगाचे एकीकरण तलवारीने करणाऱ्या रोमनांनी स्वतःच्या राष्ट्राचे मात्र शत खंड केले ! त्यांच्या त्या मूर्खपणामुळे उद्भवलेल्या मोठमोठ्या युद्धांतून छोटी-छोटी युद्धे पैदा झाली.पूर्वी एकजात घाऊक कत्तली होत आता किरकोळ कत्तली होऊ लागल्या.प्रत्येक शहर दुसऱ्या कोणत्यातरी शहराविरुद्ध लढत होते. व्हेनिस फ्लॉरेन्सविरुद्ध,फ्लॉरेन्स सिसीविरुद्ध,होती.
अ‍ॅसिसी पेरुगियाविरुद्ध,पेरुगिया व्हेनिसविरुद्ध अशी अखंड युद्धमालिका इटलीभर चालू होती.सर्व युरोपभरच हा मारणमरणाचा प्रकार बोकाळला होता म्हणा ना ! पहिल्या सीझरची महत्त्वाकांक्षा हजारो छोट्या सीझरांनी उचलली;पण एकाजवळही त्याची प्रतिभा नव्हती.लहानलहान शहरांमधील कधी न संपणाऱ्या या यादवीत मध्ययुगातील संस्कृती नष्टप्राय होत होती.

पेरुगिया व सिसी यांमध्ये जेव्हा हे मूर्खपणाचे द्वंद्वयुद्ध सुरू झाले,तेव्हा हा तरुण सिसी भावनांनी पेटून आपल्या शहरातर्फे स्वयंसेवक म्हणून नाव नोंदविता झाला.त्याने आतापर्यंत अनेक साहसाच्या व शांततामय गोष्टी केल्या होत्या.त्याला आता जरा बदल हवा होता.तो युद्धातील चैतन्यमय अशी तेजस्वी साहसे करायला,त्यांची चव घ्यायला उत्सुक झाला होता.पण युद्धातील ही साहसे त्याला फार पसंत पडली नाहीत.

तो एका युद्धात पकडला गेला; व मध्यकाळातल्या तुरुंगाचाही अनुभव त्याला चाखायला मिळाला.
युद्धाइतका तेजोमय तो नसला तरी रानवट तर होताच.तुरुंगवासामुळे त्याची युद्धोत्सुकता कायमची नष्ट झाली.

तुरुंगातून घरी आल्यावर तो फार आजारी पडला. क्षणभर तर तो मरणारसेदेखील भासले;पण शेवटी तो वाचला.तथापि तो अशक्त असल्यामुळे अंथरुणात पडून राही.पडल्या पडल्या तो जीवनाकडे एका नवीन दृष्टीने पाहू लागला.या जगात वायफळ बडबडच फार;करणे थोडे,मचमच फार! हे जग निरुपयोगी वस्तूंच्या पाठीमागे उगीचच धावत असते.हे लोक क्षुद्र गोष्टींसाठी उगीचच भांडत वा लढत असतात.असले क्षुद्र जीवन अतः पर जगायचे नाही,असा त्याने निश्चय केला; व मानवाला शोभेसे वैचारिक जीवन जगण्याचे ठरविले.बरा झाल्यावर त्याने पुन्हा सैनिक होण्याचे नाकारले.त्याचे पूर्वीचे सारे मित्र एकामागून एक त्याला सोडून गेले.ते त्याला भित्तुरडा,मागे मागे राहणारा,
नेभळट म्हणून निदीत;पण त्यांची निंदा ऐकून तो शांतपणे स्मित करी.त्याला ती निंदा जणू मुकुटाप्रमाणे वाटे,दूषणे भूषणे वाटत. तो दुसऱ्यांना पीडा देण्यास तयार नव्हता व म्हणून स्वतः कष्ट सोसण्यास सिद्ध झाला.हे एक नवीनच साहस होते. कष्ट सोसण्याचा हा नवीनच आनंद नवाच अनुभव होता.आजपर्यंतच्या सर्व साहसांपेक्षा दुसऱ्यास त्रास न देता स्वतः
हालअपेष्टा भोगण्याचे साहस त्याला अधिक रोमांचकारी वाटले.

एकदा उंब्रिया गावच्या शेतातून घोड्यावर बसून जात असताना त्याला वाटेत एक महारोगी भेटला. पूर्वी या जिवंत मढ्यांना पाहून त्याला शिसारी वाटत असे,तो डोळे मिटीत असे.त्याला जी जी कुरूप वस्तू दिसे,त्या त्या वस्तूपासून तो भिऊन व विटून दूर सरे.तो जणू कवी होता.शारीरिक दुःख म्हणजे काय,कशामुळे कुरूपता येते,याचा अनुभव त्याने घेतला होता.त्यामुळे त्याला लोकांच्या कष्टांची,हालअपेष्टांची व रोगांची करुणा वाटू लागली.जेव्हा त्याच्याकडे येणारा महारोगी त्याला दिसला,तेव्हा तो एकदम प्रेमाने व करुणेने घोड्यावरून उतरला.त्याने त्या दुःखीकष्टी रोग्याला जवळचे पैसे दिले,एवढेच नव्हे,तर स्वतःलाही त्याला देऊन टाकले.त्याने त्याला आपल्या बाहुंनी कवटाळले व प्रेमाने त्याच्या सुखदुःखांची चौकशी केली.आतापर्यंत त्याने पांढरपेशा,सुखी मंडळींतील आदळआपटीचे,खाण्यापिण्याचे सुख अनुभवले होते;पण आता त्याला निराळेच शांत व दान्त असे सुख अनुभवावयास मिळू लागले.परित्यक्तांवर प्रेम करण्यात व दुःखी कष्टी लोकांच्या संगतीत राहण्यात तर अधिकच खोल,गंभीर व अत्यंत शांत असा आनंद असतो,हे त्याच्या अनुभवास आले. त्याने वरिष्ठ वर्गाचा त्याग केला व गरिबांच्या अनाथांच्या कार्यास आपणास वाहून घेतले.ज्यांना जीवनात अपयश आलेले आहे असे,जे कुठेच नीट बसू शकत नसत,ज्यांना पुढे जाता येत नसे,ज्यांना अशक्तपणामुळे कामकाज करता येत नसे,दरिद्री व दुबळे असल्यामुळे ज्यांच्याकडे कोणी कधी लक्ष देत नसे,अशांकडे तो आपली सारी सहानुभूती घेऊन जाई.कोणी तरी लिहिले आहे,"ईश्वरही ज्यांची हाक ऐकणार नाही,अशांचेही तो ऐके." इतकेच नव्हे; तर तो याहीपलीकडे जाई.जरी तो निष्ठावंत कॅथॉलिक होता,तरी देवाने दुःखी कष्टी केलेल्यांना सुखी करून देवाची चूकही दुरुस्त करण्याचे धाडस तो करी.

तो निष्ठावंत कॅथॉलिक असला,तरी चर्चचा एवढेच नव्हे;तर आपल्या पित्याचाही,आज्ञाधारक पुत्र नव्हता.तो आपल्या मनोदेवतेचा हृदयातील सूर ऐकायला उत्सुक असे.वरिष्ठांपेक्षा त्याचे हृदयच बहुधा अधिक बरोबर असे.एकदा त्याला कोणालातरी मदत करण्यासाठी पैसे हवे होते.त्याने आपला घोडा विकला,तद्वतच पित्याच्या दुकानातील कापडाचा एक गठ्ठाही विकला.बापाने त्याला चोर म्हटले व उपदेशाचे लोटे पाजले. आई-बाप किती कष्ट करतात,मुलांना किती प्रेमाने वागवतात,परंतु मुले कशी कृतघ्न निपजतात हे बापाने जळजळीत वाणीने सांगितले.तो फॅन्सिसला म्हणाला, "अरे, तुझे सारे, तुझ्या अंगावरचे हे कपडेही तुझ्या आई-बापांच्या कृपेमुळे आहेत, समजलास?" पित्याचे शब्द ऐकूण….अपुर्ण 
राहिलेला उर्वरित शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…?