* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: एक खिडकी अचानक उघडते / A window suddenly opens

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२१/१०/२५

एक खिडकी अचानक उघडते / A window suddenly opens

" ग्रहम ग्रीननं म्हटलं आहे की प्रत्येकाच्या बालपणात किंवा पौगंडावस्थेत एक क्षण असा येतो की एक खिडकी अचानक उघडते आणि सारा भविष्यकाळ आत येतो." - डॉ.श्रीराम लागू


शाळा म्हणजे खासगीवाल्यांचा वाडा.काळेकभिन्न कोरीव काम केलेले खांब,तुळया,कमानी आणि त्यांनी बंदिस्त केलेल्या अंधेऱ्या खोल्या.खोल्यांत काही बाकडी आणि मास्तरांची टेबल-खुर्ची.

अतिशय मारकुटे आणि परपीडनात आसुरी आनंद घेणारे मास्तर.बास. शाळेतल्या चार वर्षांत काही शिकल्याचे आठवतच नाही.परीक्षाही आठवत नाही.पण चौथीच्या परीक्षेत नापास झालो एवढे नक्की ! कारण त्यामुळेच माझी शाळा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.


मी मराठी चौथीत नापास झालो तेव्हा आमच्या म्युनिसिपल शाळेच्या हेडमास्तरांनी आमच्या वडिलांना बोलावून घेऊन त्यांना सांगितले होते म्हणे की,"मुलाचे शिक्षण नीट करायचे असेल तर त्याला म्युनिसिपल शाळेतून काढून दुसऱ्या चांगल्या शाळेत घाला.मात्र मराठी चौथीचे वर्ष त्याला पुन्हा करू द्या !" वडिलांनाही ते पटले.कारण त्यांना व्यवसायामुळे माझ्या अभ्यासाची चौकशी करायलाही कधी वेळ मिळत नसे.


म्युनिसिपल शाळेतून भावे स्कूलमध्ये मला अक्षरशः अंधार

कोठडीतून स्वच्छ प्रकाशमय जगात आल्यासारखे वाटले.मोड्डी थोरली,लांबलचक तीन मजली दगडी इमारत.अर्ध्या भागात मुलांची शाळा आणि अर्ध्या भागात मुलींची शाळा.प्राथमिक शाळेच्या चार इयत्ता - प्रत्येकीच्या तीन-तीन तुकड्या.प्राथमिक शाळा मात्र मुलांमुलींची एकच होती.हायस्कूलच्या सात इयत्ता प्रत्येकीच्या तीन-तीन तुकड्या.प्रत्येक तुकडीला वेगळा वर्ग आणि वर्गावर झोकदार पाटी 'इ. ४ थी अ.' आणि प्रत्येक वर्गात प्रकाश म्हणजे किती ? अगदी डोळे दिपून जायचे.मराठी चौथीच्या वर्गात पुन्हा बसावे लागले याचे मला काहीच सोयरसुतक नव्हते । नव्या शाळेवर मी एकदमच खूश होतो.आणि त्या वेळी लक्षात आले नाही, पण पहिल्या शाळेतल्या चार वर्षांत माझा नकळत काहीतरी अभ्यास झाला असणार ! कारण म्युनिसिपल शाळेत 'ढ' समजला गेलेला मी नव्या शाळेच्या चौथीच्या वर्गात एकदम 'स्कॉलर' म्हणून ओळखला जाऊ लागलो ! मी खूश होतो ! शिकवायला बाई होत्या. छान दिसायच्या,खूप छान शिकवायच्या,पण त्यांचे कुंकू नसलेले कपाळ फार केविलवाणे वाटायचे.


मराठी चौथीची परीक्षा मी हां हां म्हणता पास झालो आणि इंग्रजी पहिलीत गेलो. (STD. IA) अशी इंग्रजीतली पाटी वर्गाच्या दारावर होती ! आमचे वर्गशिक्षक मुंडले नावाचे होते.इंग्रजी,मराठी दोन्ही छान शिकवायचे.शिकवताना छान छान गोष्टी सांगायचे. 


दिवाळीच्या सुट्टीत 'फराळाचं काय काय खाल्लं,सिनेमा कुठला पाहिला ?' असले प्रश्न विचारायचे म्हणजे अभ्यासाशी काही संबंध नसलेले - त्यामुळे अगदी घरच्यासारखे वाटायचे.


एक दिवस ते तासाला आले आणि त्यांनी एकदम घोषणा केली की,"शाळेचं गॅदरिंग जवळ आलेले आहे आणि त्यात करमणुकीच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला एक 'नाटिका' करायची आहे !" नाटिका म्हणजे काय हे आम्हांला कुणालाच माहीत नव्हतं.मग त्यांनी पेंडसे आणि सुखात्मे,आणि मी तिघांना उभं राहायला सांगितलं आणि म्हणाले, "तू (म्हणजे मी) गोपाळ कृष्ण गोखले व्हायचंस,तू लोकमान्य टिळक आणि तू दादाभाई नौरोजी."अशी तिघांना तीन कामं वाटून दिली आणि पुढे म्हणाले,"तुम्ही तिघांनी संवाद पाठ करायचे आणि मी सांगीन तसे एका पाठोपाठ म्हणायचे. आणखी एक 'सरोजिनी नायडू' लागेल.ती मुलींच्या शाळेतून आणू." मुलींची शाळा आमच्या शाळेला लागूनच होती.गॅदरिंगला चांगला महिनाभर अवकाश होता.मुंडले सरांनी स्वतःच ती नाटिका लिहिलेली होती. ( नापास मुलांचे प्रगतिपुस्तक,संपादन अरुण शेवले, प्रकाशक - ऋतुरंग प्रकाशन मुंबई)


आणि स्वतःच ते बसवणार होते.बसवणार म्हणजे काय तर आमच्याकडून भाषणं पाठ करून घेणार ! मला पाठांतराची सवय होती कारण घरी रोज संध्याकाळी 'शुभंकरोति', 'शांताकारम्', 'रामरक्षा', 'भीमरूपी' वगैरे देवासमोर बसून म्हणायला लागायचंच,मुंडले सर वर्गात तर नाटिका आमच्याकडून पाठ करून घ्यायचेच पण दुसऱ्या एखाद्या वर्गावर तास घेत असले आणि तास घ्यायचा कंटाळा आला की आम्हां तिघांना आमच्या वर्गातून बोलावून घ्यायचे आणि त्या वर्गातल्या मुलांसमोर उभे राहून आमच्याकडून भाषणं पाठ म्हणून घ्यायचे.आम्हांला आमचा तास चुकला (विशेषतः तो गणिताचा असला) तर मजाच वाटायची.क्वचित 'सरोजिनी नायडू' ही शेजारच्या शाळेतून बोलावली जायची.तिचं नाव मात्र आता आठवत नाही.लहानपणी पाठांतराला वेळ लागत नाही.त्यामुळे लवकरच आमची चौघांचीही ती सबंध नाटिकाच पाठ झाली !


गॅदरिंगचा दिवस उजाडला.शाळेच्या चारी बाजूंनी दगडी इमारतींच्या मध्यभागी भला थोरला चौक होता.त्याच्या एका बाजूला स्टेज बांधले होते आणि समोर चौकात प्रेक्षकांना बसायला,पुढे भारतीय बैठक आणि मागे खुर्चा अशी व्यवस्था होती.पाचएकशे प्रेक्षक मावत असत.दुपारी तीन-चारच्या सुमारास कार्यक्रम सुरू व्हायचा होता.आम्ही एक वाजल्यापासूनच हजर होतो. प्रेक्षागृह रिकामेच होते.आम्ही 'कलाकार' मंडळी स्टेजच्या मागच्या बाजूला जमलो.मास्तरांनी आम्हांला स्टेजवर नेऊन स्टेज दाखवले.लाकडाच्या फळ्यांचे स्टेज केलेले होते.वर एक सतरंजी टाकलेली होती.मागे कसल्या तरी देखाव्याचा भव्य पडदा लावलेला होता. स्टेजवर एक कोच आणि एक खुर्ची मांडलेली होती. पुढच्या बाजूला लाल रंगाचा दुपाखी पडदा होता.त्या पलीकडे प्रेक्षक बसणार होते.पण पडदा पडलेला असल्याने प्रेक्षागृह दिसत नव्हते.स्टेजच्या डाव्या-उजव्या बाजूला झाडांची चित्रे काढलेल्या विंगा होत्या. त्यांच्यामधून स्टेजवर प्रवेश करायचा किंवा बाहेर जायचे.आम्ही स्टेजवर बागडलो,कोचावर हुंडदलो, मास्तरांनी आमच्याकडून एकदा नाटिका म्हणवून घेतली.कुठे कुणी बसायचे,कुणी उभे राहायचे हे सांगितले.सगळे खेळीमेळीत चालले होते.दोन तास कसे गेले कळलेही नाही.


चारच्या सुमारास कार्यक्रम सुरू झाला.पहिलीच नाटिका आमची होती.नाटिकेच्या सुरुवातीला टिळक, दादाभाई आणि सरोजिनी स्टेजवर असतात.गोखले (म्हणजे मी) आत विंगेत उभे असतात.

पडदा वर गेला की स्टेजवर तिघांचे संभाषण सुरू होते.थोडा वेळ त्यांचे संभाषण झाले की गोखले प्रवेश करतात आणि पुढे बाकीची नाटिका होते.प्रत्यक्ष पडदा वर जाऊन नाटिका सुरू होण्याच्या वेळी मी विंगेत उभा राहून माझ्या प्रवेशाची वाट पाहत होतो. मनावर दडपण कसलंच नव्हतं.ठरावीक वाक्यानंतर प्रवेश करायचा आणि पुढचे संवाद बोलायचे.पाठांतर चोख होते.पण पडदा वर गेला मात्र आणि विंगेतून मला, समोर बसलेला प्रचंड समुदाय दिसला ! जगातली सगळी माणसे पोरे बनून तिथे कोलाहल करताहेत आणि मी दिसल्याबरोब्बर झडप घालून ती मला गिळंकृत करणार अशी दरदरून भीती मला वाटली. क्षणार्धात हातपाय गारठले,तोंड कोरडे पडले,जीभ टाळ्याला लागली.जीव वाचवण्याच्या आदिम प्रेरणेने माझा संपूर्ण कब्जा घेतला आणि मी विंगेला घट्ट धरून थरथरत उभा राहिलो.


थोड्या वेळाने लक्षात आले की स्टेजवरचे माझे सहकारी माझ्याकडे पाहून मला जोरजोराने हातवारे करून प्रवेश करण्याकरिता खुणावताहेत.समोरच्या विंगेत हातात शिट्टी घेऊन सर उभे होते.तेही जोरजोराने खुणावताहेत.माझ्या डोक्यात स्टेजवरच्या संवादाचा एक शब्दही शिरला नव्हता.डोक्यात घोंघावत होता समोर बसलेल्या प्रेक्षकांचा भयानक कोलाहल.

स्टेजवरचा संवाद थांबलाच होता कारण माझ्या प्रवेशाशिवाय नाटिका पुढे जाणे शक्यच नव्हते.समोरच्या विंगेतले सर एकदम दिसेनासे झाले.ते मागच्या पडद्याच्या मागून धावत माझ्या विंगेत आले.त्यांनी मला बकोटीला धरून विंगेपासून ओरबाडून काढले आणि एखाद्या मांजराच्या पिल्लाला फेकतात तसे एकदम स्टेजवर फेकून दिले.मी स्टेजवर धडपडत उभा राहिलो.समोर लाखो हिंस्र जनावरांचा समुदाय,त्यांच्या लसलसत्या लाल जिभा आणि भीषण गोंगाट.कोणत्या क्षणी मला फाडून मटकावून टाकतली याचा नेम नाही ! मला नाटिकेतील एक शब्द आठवेना.मी घाबरण्याच्याही पलीकडल्या अवस्थेला गेलो होतो - बधिर झालो होतो.स्टेजवर लोकमान्य टिळक,दादाभाई नौरोजी,सरोजिनी नायडू माझ्याकडे पाहून प्रचंड हातवारे,खुणा करत होते.त्यांचे ओठ हलताना दिसत होते पण ऐकू काहीच येत नव्हते. टाळ्याला चिकटलेली जीभ सुटत नव्हती.असा किती वेळ गेला कुणास ठाऊक.शंभर दोनशे वर्षं असावीत बहुधा ! नाटिका थांबून राहिली होती.पुढे जात नव्हती. मी बोलू लागल्याशिवाय पुढे जाणे शक्य नव्हते.


आणि मग एकदम कसे कुणास ठाऊक,मला भाषण आठवले.

टाळ्याला चिकटलेली जीभ सुटली आणि मी भडाभडा बोलायला लागलो.आणि एकदा बोलायला लागल्यावर मला थांबवण्याची कुणाची टाप होती ? मी माझे स्वतःचेच केवळ नव्हे तर इतर सगळ्यांचीही भाषणे न चुकता,धाडधाड नाटिकेच्या शेवटापर्यंत म्हणून टाकली ! टिळक,दादाभाई,सरोजिनी सगळे आ वासून बघायला लागले आणि बघतच राहिले.नाटिका संपली ! पडदा पडला.समोरच्या प्रेक्षकांना काहीच सोयर सुतक नव्हते.सर स्टेजवर आले, 'छान केलंत हं सगळ्यांनी' म्हणाले आणि पुढच्या नाटिकेच्या तयारीला लागले ! नाटिकेत काम करण्याबद्दल आम्हांला प्रत्येकाला दोन दोन लिमलेटच्या गोळ्या मिळाल्या.मला सायकलवरून कुणीतरी घरी पोचवले.मी मात्र इतका हादरलो होतो की मी मनोमन प्रतिज्ञाच करून टाकली,'पुन्हा जन्मात नाटकाच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाही !'


आमच्या शाळेच्या गॅदरिंगला दर वर्षी दोन नाटके व्हायची.एक आजी विद्यार्थ्यांचे आणि एक माजी विद्यार्थ्यांचे.आमच्या शाळेतले फाटक सर आणि परचुरे सर दर वर्षी फार मेहनतीने ही नाटके बसवायचे.अगदी संगीतासकट.मी जसजसा मोठा व्हायला लागलो तसतसा ही नाटकं पाहायला लागलो.लांब कुठेतरी बसून बघायचं.

मी १९४४ साली मॅट्रिक झालो आणि फर्ग्युसन कॉलेजात गेलो.त्याचं असं झालं,मॅट्रिक झाल्यावर वडिलांनी रीतीप्रमाणे विचारलं,"आता पुढे काय करायचा विचार आहे ?" म्हणून. मी म्हटलं, "मला आर्ट स्कूलमध्ये चित्रकला शिकायला जायचंय." (मी चित्रं बरी काढायचो – आणि एकूणच मला कला विषयामध्ये स्वारस्य होतं.शास्त्रीय विषयांची काही गोडी नव्हती.)वडील क्षणभर अवाक् झाले.एका प्रतिष्ठित डॉक्टरच्या आणि काँग्रेसच्या गांधीवादी पुढाऱ्याच्या मुलाकडून त्यांची ही अपेक्षा सुतराम् नव्हती,काही तरी शिष्टसंमत प्रतिष्ठित व्यवसायाचं मी नाव घेईन अशी त्यांची खात्री असावी.थोड्या वेळानं ते बोलते झाले, "हे पहा,पेंटर बिंटर होणं म्हणजे भिकेची लक्षणं आहेत. तुम्ही यावर काहीच विचार केलेला दिसत नाहीये. 


तर मी सांगतो,मॅट्रिक झाल्यावर पुढे कॉलेजात दोन शाखा असतात - आर्टस् आणि सायन्स.आर्टस् घेतलंत तर एक तर वकील व्हाल किंवा प्रोफसर.आजकाल वकील सगळीकडे बेकार हिंडताहेत आणि प्रोफेसर म्हणजे दीडदोनशे रुपये पगारावर आयुष्य काढावं लागेल.तेव्हा आर्ट्सचा विचार डोक्यातून काढून टाका. आता सायन्स.त्यात दोन शाखा - एंजिनिअरिंग आणि मेडिकल.

एंजिनिअरिंगला जायचं म्हणजे गणित फार पक्कं हवं – तुमचा गणितात काय उजेड आहे तो दिसतोच आहे,तेव्हा एंजिनिअरिंग रद्द.आता म्हणजे मेडिकलशिवाय पर्याय नाही.तेव्हा मेडिकलला जायचं !" त्यांच्या वक्तृत्वानं आणि तर्कशुद्ध विश्लेषणानं मी फार प्रभावित झालो आणि फर्ग्युसनला सायन्समध्ये नाव दाखल केलं.


वडील स्वतः डॉक्टर असून राजकारणात रस घेत असल्यामुळे,

आपला व्यवसाय शक्य तितक्या लवकर आपल्या थोरल्या मुलानं चालवायला घेऊन आपल्याला मुक्त करावं असं त्यांना वाटणं अगदी साहजिक होतं !


'एकच प्याला' नाटक करून त्यात मी सुधाकरची भूमिका करावी असा प्रस्ताव मी आमच्या कमिटीपुढे मांडला. (माझ्या बाथरूम-अ‍ॅक्टिंगमुळे मी स्वतःला फारच मोठा नट समजू लागलो होतो !) पण एवढं गंभीर,शोकात्म नाटक गॅदरिंगसारख्या आनंदाच्या प्रसंगी लोक - विशेषतः विद्यार्थी – पाहून घेणार नाहीत;तेव्हा काहीतरी विनोदी नाटक करावं असं कमिटीचं मत पडलं.मग मी नाटक निवडलं आचार्य अत्र्यांचं 'वंदे मातरम्'.ते विनोदी तर होतंच पण मुख्य म्हणजे त्यातलं 'त्रिभुवन' हे काम मला करायला फार छान वाटलं ! जुने,स्कूलचे जे विद्यार्थी होते त्यातले काही चांगले,हौस असलेले नट होते.त्यांतले काही आम्हा कॉलेजवाल्यांतले काही असे मिळून नटसंच तयार करण्यात फारशी अडचण आली नाही.


'नटीसंच' जमवताना मात्र फार मुलींचे पाय धरावे लागले ! माझ्या स्वभावात ही पायधरणी बसणारी नव्हती.पण आता नाटक होणे आणि त्यात मी काम करणे हा जीवनमरणाचा प्रश्न झालेला होता.तेव्हा धरले पाय आणि तीन मुली तयार केल्या.दिग्दर्शक शोधण्याचा प्रश्नच नव्हता कारण मेडिकल स्कूलची सगळी नाटकं बरीच वर्षं पुण्याचे एक वयस्क आणि नाटकाचे शौकीन डॉक्टर बसवत असत.ते स्कूलचे माजी विद्यार्थीच होते. त्यांना नुसता निरोप पाठवला की ते येत असत. कुठलंही नाटक त्यांना चालत असे.


….. उर्वरित शिल्लक राहिलेला भाग पुढील लेखामध्ये