* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२/५/२५

प्रारंभी / initially

" छोटा असो किंवा मोठा पण आपला प्रवास अगदी स्वतःपासून सुरू व्हावा."


सर्वांना धन्यवाद व नमस्कार,या लेखापासून एक नवीन लेखनमाला आपण सुरु करीत आहोत.सॉक्रेटिस यांनी म्हटल्याप्रमाणे,तुमचा मौल्यवान वेळ पुस्तके वाचण्यात घालवा,यामुळे या पुस्तकांच्या लेखकांना मोठ्या कष्टाने जाणून घेता आलेली प्रत्येक गोष्ट जाणून घेणे तुम्हाला सोपे होईल.


सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल,स्वाधारित कलासामग्री,डॉन बिलिंग्ज,अनुवाद - दिशा केळकर EMBASSY BOOK DISTRIBUTORS


माझं वय 80 वर्षे असताना आणि वकिली सुरू करून 52 वर्षे झालेली असताना माझं आयुष्य कायमस्वरूपी बदलून टाकणाऱ्या एका दिव्यातून मला जावं लागलं.


बोस्टनमधल्या मध्यवर्ती भागात माझे ऑफिस आहे. वरच्या मजल्यावरच्या एका कोपऱ्यातल्या खोलीत एका मोठ्या महॉगनी लाकडाच्या टेबलाशी मी बसलो होतो. संगमरवरी प्रवेशदालनाच्या दारावरच्या पितळी जुनाट पाटीवर हॅमिल्टन,हॅमिल्टन आणि हॅमिल्टन असं नाव दिसतं.मी त्यातला पहिला हॅमिल्टन म्हणजेच थिओडर जे.हॅमिल्टन.उरलेले दोघे म्हणजे माझा मुलगा आणि माझा नातू.


अवघ्या बोस्टनमध्ये आमची फर्म सर्वात प्रतिष्ठित फर्म आहे असं नाही,असं मी म्हटलं तर तो माझा सावधपणे बोलण्याचा गुण असं म्हणेल कोणी,पण दुसरं कोणी असं काही म्हटलं तर मी अगदी सहमत होईन त्याच्याशी.


एकदा असाच मी माझ्या प्रशस्त आणि जरा जुनाट झालेल्या ऑफिसमध्ये बसलो होतो.मनात विचार घोळत होता,आपण कुठवर येऊन पोचलो ? सुरुवात विधि-महाविद्यालयातल्या त्या धडपडीच्या दिवसांची होती.भिंतीवर माझे फोटो होते.ते पहातांना मला गंमतच वाटली.पाच तर अमेरिकेच्या गेल्या पाच अध्यक्षांबरोबरचे आणि इतर अशाच महत्वाच्या व्यक्तींबरोबर घेतलेले.


मग नजर गेली पुस्तकांच्या शेल्फांकडे.जमिनीपासून छतापर्यंत उंचीची ती कपाटे चामड्याच्या बांधणीतल्या पुस्तकांनी गच्च भरली होती.ते खानदानी चामड्याचं फर्निचर काय, शपूर्वेकडून आणलेला तो भला थोरला गालिचा काय,सारं माझ्यापेक्षाही आधीचं.हे ओळखी-ओळखीचं वातावरण मनात घोळवत मी आनंदात होतो.तोच टेबलावरचा फोन खणाणला. 


परिचित आणि विश्वासाचा मागरिट हेस्टिंग्जचा आवाज मी ओळखला. ती म्हणाली,"सर,जरा आत येऊन थोडं बोलू का तुमच्याशी ? "


आम्ही चाळीस वर्षांपेक्षा जरा जास्तच एकमेकांबरोबर काम केलं होतं.जेव्हा एखादी गंभीर बाब सांगायची असते तेव्हा तिचा हा उदासवाणा आवाज ती वापरते. "प्लीज आत ये." मी लगेच उत्तरलो.


मागरिट लगेच आत आली,दरवाजा लोटून माझ्या समोर येऊन बसली.तिच्या हातात कॅलेंडर,पत्रव्यवहार किंवा कागदपत्रे काहीच नव्हते.केव्हा बरं यापूर्वी ही अशी काही न येता माझ्या केबिनमध्ये आली होती असं मी आठवत होतो.तेवढयात काही प्रास्ताविक न करता ती एकदम म्हणाली, " मिस्टर हॅमिल्टन,थोड्यात वेळापूर्वी रेड स्टीव्हन्स मेला."


वयाची ऐंशी वर्षे ओलांडली की सवय होते मनाला कुटुंबातल्या किंवा मित्रांपैकी कोणाचा मृत्यू ऐकण्याची. पण काहींचे मृत्यू सहन करणं कठीण जातं.या मृत्यूने मी हादरलोच,साऱ्या भावना,सगळ्या आठवणी यांचा कल्लोळ होत असतानाच मला माझं कर्तव्य करायला हवं आहे याची जाणीव मला झाली.रेडची माझ्याकडून हीच तर अपेक्षा होती.


मी लगेच माझ्या वकिलाच्या भूमिकेत जाऊन मागरिटला म्हणालो,"आपल्याला त्याच्या सर्व कुटुंबियांना बोलवायला लागेल.निरनिराळ्या कार्पोरेट बोर्डाचे लोक,धंद्यातले लोक यांना सांगायला हवं.आणि हे बघ,त्या विविध वार्ताहरांना कसं काबूत ठेवायचं याची तयारी कर.ते आता केव्हाही टपकतील."


मिस हेस्टिंग्ज उभी राहून दाराकडे वळली. बाहेर जाण्याआधी वळून म्हणाली,"मी सांभाळते सर्व काही."


अस्वस्थता आली होती,व्यक्तिगत भावना आणि व्यावसायिक कठोर कर्तव्य यातील सीमारेषेचे भान ठेवत ती म्हणाली, "मिस्टर हॅमिल्टन,तुमच्या हानीबद्दल मला वाईट वाटतंय."


तिनं दरवाजा बंद केला.आणि मी एकटाच माझ्या विचारात गुरफटून गेलो.


दोन आठवड्यांनंतर रेड स्टीव्हन्सच्या निरनिराळ्या नातेवाईकां -

सोबत मी एका मोठ्या कॉन्फरन्स टेबलासमोर बसलो होतो.


मंडळी अटकळी बांधत होती. आणि ही लोभानं गुंतलेली

अटकळबाजीच जणू त्या खोलीत प्रत्यक्ष व्यापून राहिली होती. पुष्कळशा नातेवाईकांबद्दलच्या रेडच्या भावनांची मला कल्पना होतीच.त्याला हवं होतं तसं मी केलं.हा हळहळीचा काळ शक्य तेवढा लांबवला. 


मंडळींना चहा,कॉफी,सरबत किंवा आणखी काही हवं असेल तर द्यायला मागरिटला सांगितलं.समोरची प्रचंड कागदपत्रे मी पुन्हा पुन्हा चाळली.आणि अनेकदा माझा घसा साफ केला.आता जास्त ताणणे बरं दिसलं नसतं म्हणून उभा राहून मोट बांधलेल्या त्या गर्दीला उद्देशून बोललो.


"सभ्य स्त्रीपुरूष हो,तुम्हाला माहीत आहेच की हावर्ड रेड स्टीव्हन्स याचं मृत्युपत्र आणि इतर महत्त्वाचे कागद यांचं वाचन करायला आपण येथे जमलो आहोत.मला समजतंय की आपल्याला हे जड जातंय.आणि या कायदेशीर आर्थिक बाबींच्या काळजीपेक्षा तुमचं वैयक्तिक दुःख कितीतरी जास्त आहे."


मला माहीत होतं की जिथे कुठे रेड असेल तिथे त्याची या खोचक बोलण्यानं करमणूकच झाली असणार.


"या कायदेबाज प्रास्ताविक मजकुराला मी फाटा देतो आणि थेट मुद्याकडे वळतो.रेड स्टीव्हन्स सर्वच दृष्टींनी एक यशस्वी माणूस होता.त्याच्या सारखंच त्याचं हे मृत्युपत्रातलं मिळकतदानपत्र आहे.अगदी साधं, सरळ आणि स्पष्ट."


"मिस्टर स्टीव्हन्सने मागच्या वर्षीच पंचाहत्तरावा वाढदिवस साजरा केला आणि तेव्हाच मी त्याचे सुधारित मृत्युपत्र तयार केले.

आमच्या दोघांतील वारंवार होणाऱ्या बोलण्यानंतर त्याची अंतिम इच्छा या कागदोपत्री अवतरली.मी आता ते प्रत्यक्षच वाचतो. आणि तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल की या कायदेशीर आणि बंधनकारक बाबींमधले काही उतारे प्रत्यक्ष रेडच्या शब्दांमध्ये येतात." "पॅनहँडल ऑइल अ‍ॅण्ड गॅस ही माझी पहिली कंपनी मी माझा सर्वात मोठा मुलगा जॅक स्टीव्हन्स याला देत आहे.हे मृत्युपत्र लिहीत असताना पॅनहॅडल कंपनीचं मोल 600 दशलक्ष डॉलरच्या आसपास आहे."


टेबलाच्या भोवताली कित्येकांचा आ वासला.तर त्याच वेळी एका दिशेने लांबलेला हर्षोद्गार ऐकू आला.मी टेबलाच्या कडेवर हातातली कागदपत्रं ठेवली आणि माझ्या वाचायच्या चष्म्याच्यावरून भुवया उंचावून बघितले.ती माझी नेहमीची कोर्टरूममधील लकब होती.


थोडं थांबून मी परत कागदपत्र उचलून वाचू लागलो.


"जरी कंपनीचा मालक पूर्णतःजॅक असला तरी सर्व कारभार आणि व्यवस्थापन पॅनहँडल कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या सभासदांच्या हाती असेल.या लोकांनी गेली बरीच वर्षे उत्तम काम बजावलंय.मी जिवंत असताना,जॅक तू कंपनीच्या कामात काहीच रुची दाखवली नाहीस.मी मेल्यावर आता तुला ती नसणारच असे मी मानतो.तुझ्यासारख्या माणसाच्या हातात पॅनहँडल सारखी कंपनी सोपविणे म्हणजे तीन वर्षाच्या बालकाच्या हातात भरलेली बंदूक देण्यासारखे होईल.तुला जाणवून देतो की मी मिस्टर हॅमिल्टनला सूचना दिल्या आहेत की जेणेकरून तू जर कंपनीवर ताबा मिळावा म्हणून लढलास किंवा बोर्डाच्या कामात ढवळाढवळ केलीस,एवढंच काय पण जरी नुसती माझ्या मृत्युपत्रान्वये मिळालेल्या देणगीबाबत तक्रार केलीस तरी पॅनहँडल ऑइल अ‍ॅण्ड गॅस कंपनी तत्काळ धर्मादायला दिली जाईल."


कागदांवरची नजर मी जॅक स्टीव्हन्सकडे वळवली. शक्य तेवढ्या सर्व भावनांचा कल्लोळ त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता.सत्तावन्न वर्षांच्या त्या खुशालचेंडू माणसाला कधी स्वतःची रोजीरोटी कमावण्यातलं सुख कळलंच नव्हतं. त्याच्या हाती पॅनहँडल ऑईल अ‍ॅण्ड गॅस कंपनीची सूत्रं न ठेवण्याने त्याच्या बापाने त्याच्यावर काय उपकार केले आहेत याची त्याला कल्पनाच नव्हती.आणखी एकदा आपण आपल्या प्रसिद्ध बापाच्या नजरेत नापास झालो एवढंच त्याला वाटलं हे मला ठाऊक होते.


मला जरा जॅकची दयाच आली.मी त्याला म्हणालो, 


"मिस्टर स्टीव्हन्सने मृत्युपत्रात असं सांगितलंय की क्रमाक्रमाने मृत्युपत्र वाचतांना संबंधित माणसांचा भाग वाचून झाल्यावर त्यांनी निघून जावे."


गोंधळलेल्या नजरेने माझ्याकडे बघून तो उद्‌गारला, "काय?"


तत्परतेने मिस मागरिटने त्याचा हात धरला आणि म्हणाली,"मिस्टर स्टीव्हन्स,मी तुम्हाला दारापर्यन्त सोडते." सर्वजण आपापल्या जागी बसल्यावर अटकळी बांधणे पुन्हा तापू लागले.मी चालू केले."माझी एकुलती कन्या रूथ हिला राहते घर,ऑस्टिन-टेक्ससमधले रँच आणि त्यातली गुरेढोरे यांचा व्यवहार यांची मालकी मिळेल." रूथ टेबलाच्या टोकाशी,तिचा संभ्रमावस्थेतला नवरा आणि अपत्य यांच्यासह बसली होती.एवढ्या अंतरावरूनही हावरटासारखं टाळी वाजवून वाजवून खुषीत हातावर हात चोळणं ऐकू येत होते.ती मंडळी स्वतःतच इतकी दंग होती की एकूण कारभारापासून त्यांना दूर ठेवलंय आणि ते स्वतःचे किंवा दुसऱ्या कोणाचे भलं बुरं काही करू शकणार नाहीत हे त्यांना कळलं की नाही कोण जाणे.मिस् हेस्टिंग्जने त्यांना तत्काळ दारापर्यंत पोचवले.


मी घसा साफ करून वाचन चालू केले."राहता राहिला माझा सर्वात धाकटा मुलगा बिल.त्याला मी माझे सर्व शेअर्स,बॉण्ड्स आणि निरनिराळ्या ठिकाणची गुंतवणूक यांचे उत्पन्न देतो.पण याची सर्व देखभाल मिस्टर हॅमिल्टन आणि त्यांची फर्म यांच्याकडे राहील.

असं करून तुझं मृत्युपत्र कोणी जेव्हा वाचेल तेव्हा काही वाटणी करायला शिल्लक असेल."


दूरच्या नातेवाईकांना काही ना काही मिळाले. उत्सुकतेने ते इतका वेळ ताटकळत बसले होते.खोली बरीचशी रिकामी झाली मी आणि मिस मागरिट सोडून आता फक्त एक जणच उरला.


चोवीस वर्षाच्या जेसन स्टीव्हन्सला मी टेबलाशी बसलो असतानाच पाहिले.माझ्या आयुष्यभराच्या जिगरी दोस्ताचा तो पुतणनातू होता.राग,अनादर आणि अवज्ञा यांनी ओतप्रोत भरलेल्या नजरेने मो माझ्याकडे टक लावून बघत होता.

आयुष्यभर स्वयंकेन्द्रीपणा आंगवळणी पडलेल्यालाच तसं बघणं जमणार होतं.


टेबलावर त्याने हात आपटला आणि गुरकावत मला म्हणाला,"त्या खवचट थेरड्याने मला काहीच ठेवलं नसणार.माझी नेहमी निर्भर्त्सनाच करायचा तो." उभा राहून तो जायला निघाला सुद्धा.


"अरे,अशी घाई नको करू.तुझं नाव आहे या मृत्युपत्रात." मी म्हणालो.


पुन्हो तो खुर्चीत येऊन बसला.वाटलेली आशा लपवण्याचा प्रयत्न करीत मख्ख चेहऱ्याने माझ्याकडे टक लावून बघू लागला.


मी पण तशाच मख्खपणे त्याच्याकडे पाहिले.मी ठरवलं होतं की हा बोलेपर्यंत आपण बोलायचं नाही.ऐशी वर्षांचं वय झाल्यावर धीर धरणे सोपे जाते.


असह्य झाल्यावर तो म्हणाला, "ठीक आहे.काय दिलं आहे मला त्या बुढ्याने ?"


मी खाली बसून कागद चाळू लागलो.जेसन स्टीव्हन्स पुटपुटला, " काहीही नसणार."


मी माझ्या खुर्चीतून त्याच्याकडे स्मित करून म्हटले, "अरे गड्या,म्हटलं तर सगळं काही आणि म्हटलं तर काहीच नाही असं एकाच वेळी आहे बघ."


शिल्लक राहीलेले भाग क्रमशःप्रसारित होतील..।

३०/४/२५

ते २१ दिवस : To 21 days

योसी घिन्सबर्गने लिहिलेल्या पुस्तकांपैकी 'जंगल: अ हॅरोइंग ट्रू स्टोरी ऑफ सर्व्हायव्हल इन अ‍ॅमेझॉन' हे पुस्तक सध्या उपलब्ध आहे. या पुस्तकावर आधारित ग्रेग मॅक्लीन दिग्दर्शित आणि डॅनियल रेडक्लिफची मुख्य भूमिका असलेला 'जंगल' हा सिनेमाही हॉलिवुडमध्ये प्रसिद्ध झाला आहे.


जंगलात अडकून एक आठवडा झाल्यावर मात्र केव्हिनच्या शोधात मागे जावं की कार्लने सांगितलेल्या रस्त्याने पुढे चालत राहावं हे योसीला ठरवता येत नाही. बॅगेतला अर्धाकच्चा नकाशा काढून आपण कुठे असू याचा अंदाज बांधायचा तो प्रयत्न करतो.आणखी एक दिवस चाललो तर कार्लने सांगितलेलं क्युरिप्लाया लागेल,

तिथून आणखी चार दिवस चाललो तर सॅन जोसे गावात पोहोचू,

या आशेवर योसी पुढे चालत राहतो.वाटेत एखादं फळांचं झाड दिसलं तर फळं खायची आणि थोडी सोबत घेऊन पुढे जायचं.

एखाद्या झाडावर कुणाची अंडी दिसली तर मनावर दगड ठेवून ती खाऊन घ्यायची,असं करत तो जीव तगवतो.


हे झालं शरीराचं,पण मनाचं काय ?


हिंमत हरता कामा नये,असं योसी सतत स्वतःला सांगत असतो.कधी झोपायला त्यातल्या त्यात कोरडी जागा मिळाली,खायला चांगलं फळ मिळालं,पाऊस थांबला की लगेच त्याच्या मनात येतं,'कुणाचं तरी माझ्याकडे लक्ष आहे.कोणी तरी माझी काळजी घेतंय.सगळं ठीक होणारंय.

चार दिवसांत आपण सॅन जोसेला पोचू आणि केव्हिनला शोधायला बाहेर पडू.पण आधी आपल्याला नदीपाशी जायला हवं.'


पण एखादा दिवस वाईट गेला की योसीचं तेच आशावादी मन त्याच्या विरोधात जातं.'आपण मूर्खपणा करून या जंगलात आलो न् स्वतःचा जीव तर धोक्यात घातलाच,पण केव्हिन आणि मार्कसलाही मृत्यूच्या दारात नेऊन सोडलं.'असे विचार येऊ लागले की त्याच्या डोळ्यांसमोर भविष्यातले प्रसंग साकारू लागत.तो जंगलातून बाहेर पडलाय,पण मार्कस आणि केव्हिन मात्र वाचू शकलेले नाहीत.तो ही बातमी द्यायला दोघांच्याही घरी चालला आहे.त्या प्रवासाचे छोटे छोटे तपशील रेखाटत योसी ते प्रत्यक्ष घडत असल्यासारखे अनुभवतो.तो बसने केव्हिनच्या घरी चालला आहे. वाटेत मॅकडोनाल्ड्समध्ये तो थांबतो.तिथे भरपूर चीज असलेलं बर्गर खातोय.आठवड्याहून जास्त काळ उपाशी असलेलं त्याचं मन त्या बर्गरमधला प्रत्येक घास अनुभवतं.बर्गर खाऊन झाल्यावर तो केव्हिनच्या घरी जातो.त्याच्या आई-वडिलांना कळवळून सांगतो,


'माझी काही चूक नाहीये.मी त्याला एकटं सोडलं नाही.मी त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला.'एकीकडे शक्ती न उरलेलं त्याचं शरीर यंत्रवत पुढे पुढे चालतं आहे आणि त्या वेदनांकडे दुर्लक्ष करण्यासाठी त्याचं मन अशा अगणित नव्या कहाण्या रचतं.कधी कळत,कधी नकळत.


कधी भानावर,तर कधी बेभान असा योसीचा प्रवास सुरू असतो.

फारसं न खाता,रोज बारा तास पायपीट करत,असंख्य जखमा अंगावर वागवत,पूर्ण एकट्याने आणि मुख्य म्हणजे आपण जगू की नाही याची अनिश्चितता सहन करत माणूस किती दिवस जगू शकतो? योसीने ती मर्यादा कधीच ओलांडलेली असते. शहरात,

सर्वसामान्य परिस्थितीमध्ये जे अशक्य वाटलं असतं ते त्याच्या बाबतीत घडून गेलेलं असतं तरीही त्याची कसोटी संपलेली नसते.

ना त्याची सुटका होते ना मृत्यू त्याला जवळ करतो.अशा वेळी माणूस काय करतो? मृत्यूची वाट पाहतो की जगणं सहन करत राहतो? जगत राहण्याचं अशक्यप्रद काम करण्यासाठी कोणाचा आधार शोधतो ? आता आणखी सहन करणं अशक्य आहे याची खात्री पटू लागलेली असतानाच एकदा योसीला झाडांमधून दिसणाऱ्या आकाशाच्या छोट्या तुकड्यातून विमान गेल्याचा भास होतो.अंगातली सर्व शक्ती एकवटून तो ओरडू लागतो.पळू लागतो.गळ्याशी बांधलेला स्कार्फ हलवून विमानाचं लक्ष वेधू लागतो,पण झाडांच्या दाटीत लपलेला योसी विमानातून दिसणं शक्यच नसतं. जंगलात पडलेली सुई शोधण्याइतकंच अशक्य.बराच वेळ आरडाओरडा केल्यावर योसीच्या लक्षात येतं,

विमान कधीचंच गेलंय आणि आपल्या अंगात आता उभं राहण्याचंही त्राण नाहीये.सगळं अंग जखमांनी भरलंय.पायांच्या जागी केवळ कुजलेल्या मांसाचे गोळे राहिलेत आणि आगीवरून चालल्यासारखे ते जळताहेत.त्या क्षणी तो तिथेच खाली चिखलात कोसळतो.किती काळ कोण जाणे,


तो तसाच पडून राहतो.मनाच्या तळातून तो देवाची प्रार्थना करतो.आता ही प्रार्थना सुटका लवकर व्हावी किंवा जंगलात टिकाव लागावा यासाठी नसते,तर लवकरात लवकर मृत्यू यावा यासाठी असते.'देवा,काहीही कर आणि हा छळ थांबव. मला मरू देत.' अचानक त्याला जाणवतं,आपल्या शेजारी एक मुलगी झोपली आहे.हा निव्वळ भास आहे हे कळत असूनही त्याचं मन त्या मुलीच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतं.ती कोण आहे,कशी दिसते,कुठून आली हे काहीही माहिती नसतानाही त्याला वाटतं की ती आपल्या जिवाची सहचरी आहे.तिला आपली गरज आहे.

त्याला जाणवतं की ती हमसून हमसून रडतेय.अंगात शक्ती नसतानाही योसी उठून बसतो आणि तिच्या अंगावर ओणवून तिला शांत करायचा प्रयत्न करतो,'घाबरू नकोस,मी आहे तुझ्याबरोबर.आपण लवकरच यातून बाहेर पडणार आहोत.' दुसरीकडे त्याचं मन स्वतःला समजावू लागतं, 'योसी,तू मरणाचा दमलायस हे खरं,पण तिला तुझी गरज आहे.ऊठ,तिला मदत कर.तुलाच जंगलातून वाट काढावी लागणार आहे.'चिखलातून योसी उठतो आणि तिलाही हळूवारपणे उठवतो.'विमानाला आपण दिसलो नाही. आता आपण काय करणार?' ती हताशपणे विचारते.योसी तिला धीर देतो,'विमानातून आपण दिसणं शक्य नाहीये;पण आपण आग पेटवू या. कदाचित त्याचा धूर वरून दिसू शकेल.नाही दिसला तरी मी तुला पुन्हा माणसांत घेऊन जाईन,काळजी करू नकोस.'


शरीर आणि मन पूर्ण खलास झालेल्या योसीला त्याच्या मनाने जगण्यासाठी नवा आधार शोधून दिलेला असतो.


ते दोघं पुन्हा नदीच्या दिशेने चालू लागतात.योसीच्या अंधाऱ्या,पूर्ण निराश झालेल्या मनातल्या शंका-भीती त्या मुलीच्या तोंडातून बाहेर येत राहतात आणि योसीच तिला धीर देत राहतो.आता त्याच्या आयुष्याला एक उद्दिष्ट मिळतं - या मुलीला - आपल्या सहचरीला या वेदनांमधून सुखरूप बाहेर काढायचं आहे.कधी तरी अचानक तो भानावर येतो आणि आपल्या एकटेपणाची जाणीव त्याच्या मनात घुसते;पण भानावर असण्याचा तो क्षण दूर सारून योसी पुन्हा आपल्या भासमय जगात परततो.तिथे तो जास्त सुरक्षित असतो.त्या जगात असतानाच तो एकेक पाऊल पुढे टाकू शकत असतो. कधी कधी त्या जगातही त्याचा धीर सुटतो.तो तिच्यावर ओरडतो, 'रडणं थांबव. तुला कळत नाही का आपण कुठल्या परिस्थितीत आहोत?आपण काय मजा करायला आलोय की काय इथे? जरा खंबीर हो आणि चालत रहा.' तिच्यावर वैतागला की तो पुन्हा दुकट्याचा एकटा होऊन चालू लागतो.


एकदा चालताना योसीला पायाखाली काही तरी वेगळं घडत असल्याचं लक्षात येतं.तो चालत असतो,पण पुढे जाण्याऐवजी तो खाली खाली चाललेला असतो.त्याला जाणवतं की आपण दलदलीत फसत चाललोय.


हीच ती अ‍ॅमेझॉनमधली जीवघेणी दलदल.एखादा इंच हात-पाय हलवणंही मुश्किल व्हावं अशी दलदल.त्या चिकट-घट्ट चिखलात तो छातीपर्यंत आत बुडालेला असतो. कितीही प्रयत्न केला तरी तो त्यातून पुढे सरकू शकत नाही.त्या मुलीला संकटातून बाहेर काढण्यासाठी ओढून ताणून आणलेला त्याचा उसना धीर पुन्हा खचतो.इथून बाहेर पडणं अशक्य आहे हे त्याच्या लक्षात येतं.'याचा अर्थ आपला मृत्यू दलदलीत लिहिलेला होता तर!' तो स्वतःशी विचार करू लागतो. 'कसं असेल इथे आयुष्याचा अंत होणं ? इथे मृत्यूची वाट बघत बसण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. त्यापेक्षा आत्महत्याच का करू नये?सगळ्या वेदना-सगळा त्रास एका क्षणात संपून जाईल.' हा विचार त्याच्या मनाचा ताबा घेतो.नकळत योसी पाठीवरून बॅग काढतो.बॅगेत कसकसल्या गोळ्या असतात.

बहुतेक वेदनाशामक.त्या सगळ्या गोळ्या एकत्र घेऊन टाकल्या की बहुतेक मृत्यू येईल असं त्याला वाटतं.योसी गोळ्या बाहेर काढतो;पण त्या गिळून टाकण्याआधी अचानक त्याच्या डोळ्यांसमोर त्याची आई उभी राहते.आपण आत्महत्या केली हे कळल्यावर तिला काय वाटेल,या विचाराने त्याचं मन कळवळतं.

एवढे दिवस एवढे हाल सोसूनही तगून राहिल्यानंतर हिंमत हरणं बरोबर आहे का,असा प्रश्न त्याही स्थितीत त्याला पडतो.


'पण आता याहून अधिक सहन करणंही शक्य नाही. या दलदलीत फसून मरणाची वाट पाहण्यापेक्षा स्वतःला संपवलेलं काय वाईट?'


योसीच्या मनात दोन्ही विचारांचं द्वंद्व सुरू राहतं;पण अखेर जगण्याची इच्छा बलवत्तर ठरते. 'आणखी कितीही त्रास सहन करावा लागला तरी चालेल,पण मी जगेन.मी सुटकेसाठी प्रयत्न करेन.' तो स्वतःशी बोलतो. तो गोळ्या आत ठेवतो आणि पुन्हा एकदा सगळी शक्ती एकवटून दलदलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागतो.तासभर प्रयत्न करून एकेक इंच पुढे सरकत तासाभराने तो त्या दलदलीतून बाहेर पडतो.तो तास त्याच्या आजवरच्या आयुष्यातला सर्वांत वेदनादायी काळ असतो.


दलदलीपासून थोडं लांब आल्यावर झाडाखालची एक बरी जागा शोधून तिथे तो पामच्या पानांचं अंथरूण तयार करतो.त्यावर झोपू लागणार तेव्हा लक्षात येतं,की आपण स्वतःच्याही नकळत दोघांसाठी अंथरूण घातलंय. 'मूर्ख माणसा,तुझ्यासोबत कोणी नाहीये. एकटा आहेस तू या जंगलात.पूर्ण एकटा !' योसी स्वतःवरच ओरडतो.बूट आणि सॉक्स काढण्याचं भयानक वेदनादायी काम पूर्ण झाल्यावर योसी डोक्यावरून रेनकोट ओढून झोपी जाण्याचा प्रयत्न करत असतो.एखादी डुलकी लागते आणि पुन्हा जाग येते.त्याला जाणवतं,आपण झोपताना लघवीला जायचं विसरलोय.पूर्ण सोलवटलेल्या आणि कुजलेल्या पायांवर उभं राहून चालणं शक्य नसतं आणि आता पुन्हा उठून बूट घालणंही त्याला तितकंच अशक्य वाटतं.बराच वेळ कळ काढल्यावर शेवटी पँटमध्येच मोकळं होण्याशिवाय पर्याय नाही हे त्याच्या लक्षात येतं; पण त्या अवस्थेतही त्याचं मन त्याला राजी होत नाही.


आपल्यावर ही काय वेळ आली आहे,या विचाराने योसी तळमळत राहतो शेवटी नाइलाजाने झोपल्या झोपल्याच तो लघवी करून टाकतो.ते गरम पाण पायांवरून ओघळू लागल्यावर त्याच्या अंगात थोडीशी ऊब येते. रात्रीतून आणखी दोनदा तीच उब त्याला नाईलाजाने अनुभवावी लागते.


त्या रात्री त्याला बरी झोप लागते;पण मध्यरात्री झोपेत असतानाच त्याच्य मांडीला काही तरी चावतं.तो चावा प्रचंड वेदनादायी असतो.थोड्या वेळाने आणखी एक चावा.आधी मांड्यांवर,मग हातांवर,पोटावर,सगळीकडे. अंधारात डोळे फाडून पाहतो तर जखमांनी भरलेल्या त्याच्या शरीरावर मोठाले मुंगळे डसलेले असतात. पायाच्या उघड्या पडलेल्या जखमांमधून ते शरीरात घुसत असतात.योसी वेड्यासारखा रात्रभर अंगावरचे मुंगळे झटकत,मारत,कातडी नसलेल्या पायांमधून त्यांना बाहेर काढत राहतो.तिथून उठून दुसरीकडे जायला हवं हे त्याला कळत असतं,पण पायांत शक्ती नसते.आणि दुसरीकडे म्हणजे कुठे जाणार? सगळीकडे अशा जीवघेण्या किड्यांचंच राज्य असतं.एवढी भयानक रात्र आजवर कुणाच्याही वाट्याला आली नसेल.ही रात्र आपण जिवंत राहणं अशक्य आहे असं योसीला वाटतं; पण अखेर ती रात्रही सरते.सकाळी उठून तो रात्री झोपलेल्या जागेकडे पाहतो,तर ती जागा नाना प्रकारच्या किड्यांनी भरून गेलेली असते.झालं त्याबद्दल दुःख किंवा राग व्यक्त करण्याएवढेही त्राण योसीच्या अंगात उरलेले नसतात.तरीही तो नदीच्या दिशेने चालत राहतो.बधीरपणे.अखेर त्याला नदीचा काठ दिसू लागतो.पण जसं जसं तो आसपासच्या खुणा बघू लागतो तसं लक्षात येतं की आपण फिरून फिरून पुन्हा त्याच जागी येतो आहोत. शेवटी न साहवून तो काठाशी अंग टाकून देतो आणि आकाशाकडे बघत अर्धा ग्लानीत,अर्धा विचारात पडून राहतो.


दिवस संपतो,रात्र होते.तीही संपते,पुढचा दिवस उजाडतो. 'आपल्याला जंगलात हरवून किती दिवस झाले?' योसी हिशोब करण्याचा प्रयत्न करतो. 'आज २० डिसेंबर आहे.म्हणजे तीन आठवडे आपण अ‍ॅमेझॉनमध्ये एकटेच भटकतो आहोत.' त्याच्या मनात विचार भरकटत राहतात. 'आता आपण इथेच पडून राहायचं.बहुतेक इथेच आपल्याला मरण येणार.आपलं काय झालं हे कधीच कुणाला कळणार नाही.आपला मृतदेहही कुणाच्या हाती लागणार नाही.पण असं पडल्या पडल्या माणसाला मरण येतं का? बहुतेक नसावं.म्हणजे आपल्याला अजूनही सुटकेची आशा आहे.आपण नदीजवळ आहोत.कोणी तरी आपल्या सुटकेसाठी येऊ शकतं.'


'आणि समजा,कोणी आलंच नाही तर?' योसी विचार करतो,'कोणी नाही आलं तरी आपण जगू.जंगलातली फळं खाऊन,अंडी खाऊन आपण जगू शकतो.पायाच्या जखमा बऱ्या झाल्या की मी बांबू तोडेन आणि या नदीकाठी छोटं घर बांधेन.मग मला कुणाचीही भीती नाही.कुठून तरी जंगली कोंबड्यांची अंडी मिळवेन.त्या कोंबड्या वाढवेन.त्यांच्यासाठी खुराडं बांधन.मग खाण्याचाही प्रश्न मिटला.मी जंगलचा राजा असेन.अ‍ॅमेझॉनच्या जंगलात एकटा राहणारा टारझन ! मी जगेन.'या विचारांनी त्याला काहीसा दिलासा मिळतो. आता परिस्थिती त्याच्या हातात असते.तो अगतिक नसतो.कोणी सुटका करायला आलं नाही तरी त्याचे तो निर्णय घेणार असतो.त्याचा तो जगणार असतो. 'जंगलातलं जगणं अगदीच काही बोअरिंग नसावं.' योसी विचार करतो.अशा विचारांमध्येच आणखी एक दिवस संपू लागतो.


संध्याकाळी झोपण्याच्या तयारीत असताना योसीला कसला तरी आवाज ऐकू येतो.'विमान किंवा हेलिकॉप्टर.पण काहीही असलं तरी ते आपल्याला शोधून काढू शकणार नाही.शिवाय हा आवाज म्हणजेही भासच असणार.' तो विचार करतो.नंतर त्याला वाटतं, हा आवाज म्हणजे एखादी मोठी माशी असावी. कानाभोवती स्कार्फ घट्ट गुंडाळून तो पुन्हा झोपी जाण्याचा प्रयत्न करतो;तरीही आवाज काही केल्या कमी होत नाही,उलट वाढतच जातो.हा आवाज खराच आहे की काय,असा विचार करत योसी डोकं बाहेर काढून नदीच्या दिशेने बघतो,तर एका होडीत चार माणसं बसलेली त्याला दिसतात.हाहीभासच असणार, असा विचार करून तो डोक पुन्हा आत घालतो पण शंका नको म्हणून पुन्हा एकदा बघतो,तर त्याला पुन्हा तेच दृश्य दिसतं.नदीत खरोखरच होडी असते आणि त्यात खरोखरची माणसं असतात.त्या क्षणी योसी नदीच्या दिशेने धावत सुटतो.आता ना त्याला पायाला वेदना जाणवत असतात ना पळण्याचे श्रम.फक्त छाती भरून आनंद ! योसी हाक मारण्याचा प्रयत्न करतो; पण त्याच्या तोंडून आवाज फुटत नाही.मात्र,त्याच वेळी होडीतल्या चौघांपैकी एक मागे वळून पाहतो.तो केव्हिन असतो.बोट थांबवून तो धावतच योसीकडे येतो आणि त्याला मिठीत घेतो.योसी वाचलेला असतो,माणसांत परत आलेला असतो.जंगलातून सुटका झाल्यावर योसी केव्हिनसोबत ला पाझला परत येतो. तिथे मार्कस आणि कार्ल येऊन थांबले असतील अशी त्यांची खात्री असते,पण प्रत्यक्षात ते तिथे पोहोचलेले नसतात.आसपासच्या कोणत्याच शहरात ते पोहोचलेले नसतात.त्यामुळे योसीला ला पाझमध्येच ठेवून केव्हिन या दोघांच्या शोधात पुन्हा जंगलात जाण्याचं ठरवतो;पण त्या दोघांचा पत्ता लागत नाही.मोहिमेच्या सुरुवातीच्या काळात हे चौघं ज्या ज्या वस्तीवर जाऊन आलेले असतात तिथल्या कोणालाच कार्ल मार्कस पुन्हा भेटलेले नसतात.त्या दोघांचा पुढे कधीच पत्ता लागत नाही.ला पाझमध्ये केव्हिन आणि योसीला कळतं,की कार्ल हा कुप्रसिद्ध गुन्हेगार असून बोलिव्हिया पोलिस त्याच्या शोधात आहेत.ही माहिती ऐकून दोघांनाही धक्का बसतो.त्यांना कार्लबाबत शंका येत असली,तरी तो आपल्याशी चांगलंच वागला,त्याने आपली काळजी घेतली हे दोघांनाही नाकारता येत नाही.पण कार्लने आपल्याला मोहिमेला येण्याचा आग्रह का केला हे मात्र त्यांना कधीच कळू शकत नाही.त्यांना सर्वाधिक वाईट वाटतं ते मार्कसचं.


मार्कसचं ऐकून ते वेळीच मागे फिरले असते तर कदाचित...


आणि नंतर...


अ‍ॅमेझॉनच्या जंगलातल्या तीन आठवड्यांमध्ये शरीरावर झालेला परिणाम भरून काढायला योसी घिन्सबर्गला पुढे तीन महिने लागले.पुढे शिक्षण पूर्ण करून मार्गी लागल्यावरही अ‍ॅमेझॉनचं जंगल योसीच्या मनातून गेलं नाही.आयुष्यातला भीषण काळ अनुभवायला लावणाऱ्या या जंगलाबद्दल त्याच्या मनात खरं तर भीती किंवा घृणा निर्माण व्हायला हवी,पण उलट दहा वर्षांनी तो पुन्हा अ‍ॅमेझॉनकडे ओढला गेला.तिथल्या जंगलाच्या संरक्षण-संवर्धनासाठी काम करू लागला.ज्या गावातल्या आदिवासींनी केव्हिनला योसीची सुटका करण्यासाठी मदत केली त्या सॅन जोसे गावातल्या लोकांना रोजगार मिळावा यासाठी योसीने इंटर-अमेरिकन डेव्हलपमेंट बँकेच्या मदतीने इको-फ्रेंडली कॉटेजेस सुरू करण्यात पुढाकार घेतला.आज योसीला अ‍ॅमेझॉन जंगलाचा आणि सॅन जोसे गावातल्या उचुपियामोनास जमातीचा ब्रँड अँबेसडर मानलं जातं.


जंगलातल्या अनुभवावर योसीने आजवर तीन पुस्तकं लिहिली आहेत.त्यातलं एक पुस्तक आज उपलब्ध आहे.या पुस्तकात दक्षिण अमेरिकेत येऊन ठेपल्यानंतरची संपूर्ण गोष्ट योसी सविस्तर सांगतो. सुरुवातीपासूनच हे पुस्तक आपला ताबा घेतं.मोहिमेचे छोटे छोटे तपशील,केव्हिन-मार्कस कार्ल या तिघांचे स्वभाव,मोहिमेच्या सुरुवातीच्या काळातल्या जंगलाची वर्णनं,सारं काही योसीने अशा साध्या पण प्रभावी शब्दांत केलं आहे की जणू आपल्या डोळ्यांसमोर ते सारं काही घडू लागतं.पण त्याहूनही विशेष म्हणजे योसीने शब्दबद्ध केलेला विचारांचा कल्लोळ.जंगलात एकट्याने काढलेल्या २१ दिवसांमध्ये बाहेर काय घडतंय ते जसं आपल्याला कळत राहतं तसंच त्याच्या मनात काय घडतंय हेही.त्या दिवसांमधल्या त्याच्या मनात घडलेल्या उलथा

पालथी आपल्यापर्यंत तितक्याच आवेगाने पोहोचतात आणि आपल्याही आयुष्यात किंचित का होईना,बदल घडवून जातात.


दिनांक २८.०४.२५ या लेखातील शेवटचा भाग..

२८/४/२५

 ते जंगलातील २१ दिवस / That's 21 days in the jungle

संकटांच्या वावटळीत तग धरून राहणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्यांना,मृत्यूच्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या थरारक कहाण्या. इस्रायलमधला एक भटका तरुण साहसाच्या ओढीने अ‍ॅमेझॉनच्या जंगलात जाऊन पोहोचतो;पण हे साहस त्याच्या जिवावर उठतं.एका अपघातामुळे सोबत्यांपासून फारकत होऊन तो एकटाच जंगलात भरटकतो.एक-दोन नव्हे, तर तब्बल २१दिवस.काय घडतं त्या २१ दिवसांत ?


साल १९८१ इस्रायलच्या नौदलात तीन वर्षांची सेवा बजावून बाहेर पडलेला २१ वर्षांचा योसी घिन्सबर्ग दक्षिण अमेरिकेत फिरतोय.

सध्या मुक्काम बोलिव्हिया. योसी बॅकपॅकर आहे.पाठीवर एका पोतडीत मावेल एवढंच सामान घेऊन आव्हानांना सामोरं जात फिरणारा भटक्या.काही काळ आफ्रिकेत घालवून तो आता दक्षिण अमेरिकेत येऊन ठेपलाय.दक्षिण अमेरिकी देशांत अशा बॅकपॅकर्स मंडळींचा बराच राबता आहे.या देशांमधल्या प्राचीन संस्कृती

बरोबरच आकर्षण आहे ते अ‍ॅमेझॉनच्या जंगलाचं.अ‍ॅमेझॉन हे जगातलं सर्वांत मोठं पर्जन्यवन. नऊ देशांना व्यापून असलेलं.

अफाट विस्तार आणि मैलोन्मैल माणसांचा मागमूसही नसलेलं हे जंगल किती तरी भयानक प्राणी-कीटकांचं अन् विषारी वेली-वनस्पतींचं वसतिस्थान आहे.जवळपास वर्षभर कोसळणाऱ्या पावसामुळे जमिनीवर साचलेला पालापाचोळ्याचा थर,पुरामुळे अर्धीअधिक पाण्यात गेलेली अति उंच झाडं आणि वरून जमीन आहे असं भासवत आत खेचणाऱ्या दलदली.


जगण्यासाठी पूर्ण प्रतिकूल असल्यामुळेच की काय,हे जंगल माणसांना स्वतःकडे ओढून घेत असतं.


योसीच्या मनातही हे जंगल बघावं अशी सुप्त इच्छा आहेच.तशी इच्छा असणारे आणखी दोन फिरस्ते त्याला बोलिव्हियाच्या ला पाझ शहरात भेटतात.त्यातला एक अमेरिकेचा केव्हिन आणि दुसरा स्वित्झर्लंडचा मार्कस.दोघंही आपापल्या वाटेने फिरणारे.

या तिघांच्या मनातल्या साहसाच्या इच्छेला धुमारे फुटतात ते कार्ल नावाच्या ऑस्ट्रियन अवलियाच्या भेटीने.आपण अनेक वर्ष अ‍ॅमेझॉनच्या जंगलात संशोधन करण्यात घालवली असून आताही एका मोहिमेवर जंगलात चाललो असल्याचं कार्ल त्यांना सांगतो.

अ‍ॅमेझॉनमध्ये आजवर प्रकाशझोतात न आलेल्या काही आदिम जमातींची वस्ती आहे,तसंच जंगलांत काही ठिकाणी सोनंही सापडतं,असं त्याचं म्हणणं असतं.तो या तिघांना आपल्यासोबत मोहिमेवर येण्याचा आग्रह करतो.कार्ल म्हणतोय ते खरं असेल का,अशी शंका वाटत असूनही या तिघांच्या मनातली साहसाची ओढ त्यांना कार्लसोबत जंगलात जाण्यास प्रवृत्त करते.जंगलात फिरण्यासाठी अत्यावश्यक अशा किमान गरजेच्या वस्तूंची खरेदी करून ही चौकडी जंगलात जायला सिद्ध होते. महिनाभर जंगलात भटकून,अनुभव गाठीला जोडून आपण आपापल्या घरी जायचं असं ठरलेलं असतं.


( योसी घिन्सबर्ग अ‍ॅमेझॉनच्या जंगलात २१ दिवस,मृत्यू पाहिलेली माणसं,गौरी कानेटकर,समकालीन प्रकाशन पुणे )


पण प्रत्यक्षात घडतं ते वेगळंच.अशा काही घटना घडत जातात की चौघांनाही अचानक एकामागून एक संकटांशी सामना करावा लागतो.योसी अक्षरशः मरणाच्या दारातून परत येतो.त्या भयकर अग्निपरीक्षेतून बाहेर पडल्यानंतर योसी हे अनुभव पुस्तकात नोंदवतो. हे पुस्तक आपल्याला पूर्ण उलटंपालट करतं.आपली सहनशक्ती जिथे संपते असं आपल्याला वाटतं तिथून पुढे योसीचा प्रवास सुरू होतो.


तो १९८१च्या नोव्हेंबर महिन्यातला पहिला आठवडा असतो.

रुरेनबाक नावाच्या एका छोट्या गावापासून मजल-दरमजल करत हे चौघं जंगलात प्रवेश करतात आणि सुरू होतो एक गूढ प्रवास

त्या भागातील जंगलाच्या कामचलाऊ नकाशावरून कार्ल त्यांच्या मोहिमेचा मार्ग नक्की करतो.घनदाट जंगलातून तंगडतोड सुरू झाल्यानंतर या तिघांच्या लक्षात येतं,की अ‍ॅमेझॉनच्या या अजस्र रूपाची आपण बाहेर बसून कल्पनाच करू शकलो नसतो.सलग चार पावलं टाकायला आणि सूर्यप्रकाश शिरायलाही जागा नसलेल्या या किर्र झाडीतून आपला मार्ग शोधणं त्यांना अशक्य वाटू लागतं.त्या अफाट पसरलेल्या जंगलातला कोपरान् कोपरा कुणालाच माहिती असणं शक्य नाही याचीही जाणीव होते आणि आपल्या कल्पनेतल्या साहसापेक्षा अ‍ॅमेझॉन हे काहीच्या काही पलीकडचं प्रकरण आहे हे त्यांच्या लक्षात येऊ लागतं.


पण आता माघार घेणं तिघांच्याही मानी मनाला झेपणारं नसतं.शिवाय पुढे काय याची उत्सुकताही असतेच. दिवसभर चालायचं आणि रात्री थोडी मोकळी जागा बघून तंबू ठोकायचे,

सोबत आणलेला शिधा शिजवायचा आणि झोपी जायचं.काहीसा थरार आणि काहीशी धाकधूक अनुभवत त्यांचा प्रवास सुरू राहतो.या प्रवासात कधी कधी आदिवासींच्या छोट्या वस्त्याही लागतात.त्यातल्या गावकऱ्यांना कार्ल ओळखत असतो. अशा वस्त्यांवर विश्रांती घ्यायची,नीट खाऊन-पिऊन घ्यायचं,पुढच्या प्रवासासाठी शिधा घेऊन पुढे चालू लागायचं,असं सुरू असतं.

काही वस्त्यांजवळ कार्ल आणि योसी सोन्याची शोधाशोधही करतात.बरंच खाणकाम केल्यावर योसीला सोन्याचा एक छोटा कण काय तो मिळतो,पण आदिम जमातीच्या वस्तीचा मात्र मागमूसही नसतो.आता मोहिमेला सुरुवात होऊन दहा-पंधरा दिवस होऊन गेलेले असतात.


अपुरं खाणं,दिवसभराची तंगडतोड,रात्री किडे डास आणि प्राण्यांच्या भीतीमुळे होणारी अर्धवट झोप यामुळे चौघांच्याही शरीरावर परिणाम दिसू लागलेला असतो.शिधा संपत चालल्यामुळे अनेकदा त्यांच्यावर प्राणी मारून खाण्याची वेळ येते.एकदा कार्ल एक माकड मारतो आणि रात्री तंबूसमोरच्या आगीवर भाजून खातो. केव्हिन आणि योसी मनाविरुद्ध का होईना,त्याचं मांस खातात,पण मार्कस ते खाऊ शकत नाही.

एकुणातच हे रौद्र जंगल त्याला सोसवत नाही.तो हळवा होतो.प्राणी मारायला तो विरोध करत राहतो.त्यातच त्याच्या पायावर मोठाले फोड उठतात आणि वेदनांनी त्याला चालणं अशक्य होत जातं.जंगलातल्या त्या प्रचंड थकवणाऱ्या आणि भीतिदायक प्रवासाला प्रत्येकाचा प्रतिसाद वेगळा असतो.तो समजून घेऊन एकत्र राहण्याएवढी ना सर्वांची ओळख असते ना तेवढी पक्वता.केव्हिन आणि मार्कस २९ वर्षांचे असतात,तर योसी अवघा २१ वर्षांचा.संकटं समोर येतात तेव्हा माणसांचे स्वभाव कसे बदलून जातात ते लक्षात येतं.एकमेकांसोबत सतत मतभेद सुरू होतात.केव्हिन आणि योसी भेदरलेल्या मार्कसला टाळू लागतात,कार्लवर शंका घेऊ लागतात,तर मार्कसच्या मनात मोहीम पुढे सुरू ठेवावी की नाही याबाबत गंभीर प्रश्न तयार होतात.चौघं एकत्र चालत असतात खरे,पण तो प्रवास आता एकजिनसी उरलेला नसतो.


या भटकंतीमध्ये पुढचा प्रवास अ‍ॅमेझॉनची उपनदी असणाऱ्या तुईची या नदीकाठून होणार असतो.नदीच्या किनाऱ्यावरचे पुढचे मुख्य टप्पे कार्लला माहिती असतात.नदीकाठाने किंवा नदीतून खाली उतरत गेलं की आधी क्युरिप्लाया या आदिवासींच्या हंगामी गावात आणि नंतर सॅन जोसे नावाच्या एका गावात आपण पोहोचू आणि तिथे आपल्याला मोहीम संपवता येईल, असं कार्ल म्हणतो.योसी आणि केव्हिनचं म्हणणं पडतं की नदीतून प्रवास करण्याचा अनुभव घ्यावा.खरं तर तुईची ही अ‍ॅमेझॉन जंगलातली मोठी आणि सर्वांत धोकादायक नदी.कुठे ती तळ्यासारखी शांत असते,तर कुठे प्रचंड वेगाने खळाळत डोंगरकड्यावरून खाली कोसळते.कुठे तिच्या काठी थोडी मोकळी जागा आणि किनारा असतो,तर कुठे निव्वळ डोंगरकडे आणि त्यावर पसरलेलं घनदाट जंगल.पण या बिचाऱ्या साहसवीरांना त्यातल्या धोक्याची कल्पनाही नसते.एका वस्तीतल्या लोकांच्या मदतीने ते लाकडाचा तराफा तयार करतात आणि नदीत उतरतात.


हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही हे त्यांना लवकरच कळून चुकतं.थोड्या अंतरावरच नदीच्या प्रवाहाला प्रचंड वेग असतो तिथे त्यांचा तराफा जवळपास उलटा होतो.नशिबाने चौघंही वाचतात आणि एका किनाऱ्याला लागतात.या अनुभवामुळे पुन्हा एकदा चौघांमध्ये पुढे काय करायचं याबाबत मतभेद सुरू होतात.कार्लचं म्हणणं असतं,परत फिरावं किंवा पायी प्रवास सुरू ठेवावा,तर योसी-केव्हिनला नदीतून पुढे जाण्याची ओढ असते.जखमी पायांमुळे मार्कस कार्लबरोबर परत फिरण्याचा निर्णय घेतो.

ख्रिसमसच्या आधी ला पाझमध्ये भेटायचं असं ठरवून योसी-केव्हिन दुसऱ्या जोडीचा निरोप घेतात.


जंगलाबद्दल ओ की ठो माहिती नसणारे योसी-केव्हिन जगातल्या सगळ्यात मोठ्या जंगलात आता एकटेच शिरलेले असतात.


तुईची नदीच्या प्रचंड पात्रातून तराफा वल्हवणं सोपं नसतं.

सुरुवातीला एक-दोन अवघड वळणं पार करत योसी केव्हिनचा तराफा शांतपणे प्रवास करत असतो. तेवढ्यात तुईची पुन्हा एकदा प्रचंड वेग घेत असलेली समोर दिसते.योसी-केव्हिन त्यातून तराफा वल्हवण्याचा प्रयत्न करतात;पण तराफा एका मोठ्या खडकाला थडकतो आणि दोघंही त्या वेगवान प्रवाहात फेकले जातात.

केव्हिन कसाबसा किनाऱ्यापर्यंत पोहोचतो,पण योसी मात्र त्या अथांग प्रवाहात एखाद्या लाकडी ओंडक्यासारखा वाहत जातो.

नदीच्या पूर्ण तळापर्यंत जाऊन तो पुन्हा वर येतो.हाच तो आपल्या मृत्यूचा क्षण असं वाटत असतानाच त्याच्या हाताला दगड लागतात.बघतो,तर तो नदीच्या काठाला लागलेला असतो.तिथे किनारा असा नसतोच.दोन्ही बाजूंनी पंधरा-वीस फूट उंच गेलेले कडे आणि त्यावर घनदाट जंगल.त्यातून एखाद्या कॅनॉलमधून वाहिल्यासारखी तुईची वाहत असते.झाडांचा आणि दगडांचा आधार घेत योसी वर चढतो.किमान वाचलो तरी.आता थोड्याच वेळात केव्हिनही आपल्यापर्यंत पोहोचेल,असा विचार करत तो पडून राहतो.आता पहिली गरज असते ती तराफ्यावर बांधलेली सामानाची बॅकपॅक शोधण्याची.त्या बॅगखेरीज आपण जंगलात जिवंत असूनही मेल्यासारखे आहोत हे योसीला माहिती असतं. नशिबाने संध्याकाळ होण्यापूर्वी त्याला बॅग सापडते.


बराच वेळ होऊनही केव्हिनचा पत्ता नाही म्हटल्यावर योसी त्याला शोधत उलट्या दिशेने चालायला सुरुवात करतो;पण केव्हिनचा काहीच मागमूस नसतो.आपली ताटातूट नक्की कुठे झाली हेही योसीला कळू शकत नाही.हळूहळू अंधार व्हायला लागतो आणि योसीला जाणीव होते,की आजची रात्र आपल्याला एकट्यानेच काढावी लागणार आहे.सोबत लायटर असल्यामुळे योसीला आग पेटवता येते.बॅगेतल्या शिध्यातला थोडा तांदूळ आणि घेवडे शिजवून ते खाल्ल्यावर योसी अंगावर मच्छरदाणी आणि रेनकोट पांघरून तिथेच लवंडतो.आजूबाजूला नाना प्रकारच्या किड्यांचा वावर सुरू झालेला असतो.जंगलातल्या प्राणी-पक्ष्यांचे आवाज टिपेला पोहोचलेले असतात.एवढी भीती,एवढं एकटेपण आजवर योसीने कधीच अनुभवलेलं नसतं;


पण तरीही तो स्वतःला समजावत राहतो,'उद्या आपल्याला केव्हिन भेटेल.तो भेटला की दोघं जंगलातून पुढे चालत जाऊ. मग सगळं ठीक होईल. फक्त आजचीच रात्र...'


पण तसं घडणार नसतं.


सकाळी उठून पुन्हा केव्हिनचा शोध घेणं सुरू होतं.ज्या अर्थी केव्हिन अजूनही आपल्यापर्यंत पोहोचला नाही त्या अर्थी त्याचं बरं-वाईट झालं नाही ना,या विचाराने योसी पछाडला जातो.त्यातच त्याच्या लक्षात येतं,की जंगलात आवश्यक असणारं सगळं सामान आपल्याच बॅगमध्ये आहे... लाकडं तोडण्यासाठीचा कोयता, लायटर,शिधा,मच्छरदाणी.या सगळ्याशिवाय केव्हिन कसा जगणार? केव्हिनचा शोध घेण्याची तातडी आणखी तीव्र होते.स्वतःच्या भीतीवर मात करण्यासाठी त्याला केव्हिनची सोबत हवी असतेच,आता केव्हिनच्या काळजीचीही जोड मिळते.दुसऱ्या दिवशीही केव्हिनचा पत्ता लागत नाही.त्यातच पावसाला सुरुवात होते. 'अ‍ॅमेझॉनमध्ये डिसेंबरात पूर येतात,'योसीला कार्लने दिलेल्या माहितीची आठवण येते.रेनकोट घालून तो दिवसभर चालत राहतो.पण रात्री?दलदल आणि पानांच्या ओल्या थरांनी व्यापलेल्या या जंगलात रात्री झोपणार कसं? रात्र पडली तरी पाऊस थांबत नाही. त्यातल्या त्यात बरी जागा बघून योसी पथारी पसरतो. झोप लागणं शक्य नसतं.अफाट पसरलेल्या त्या जंगलात योसी कुठेतरी एकटाच हरवून गेलेला असतो.


अ‍ॅमेझॉनमध्ये एकटं पडल्याला पाच दिवस होऊन गेलेले असतात.या पाच दिवसांत योसीने फारसं काही खाल्लेलं नसतं.जंगलात चालून कपडे फाटू लागलेले असतात.अंगभर ओरखडे आणि जखमा झालेल्या असतात.कपाळावर एक मोठा फोड वाढत चाललेला आणि त्या फोडाखाली कसली तरी हालचाल होत असलेली जाणवू लागलेली असते.पाय आगीतून चालल्यासारखे जळत असतात.बूट काढून पायाला नेमकं काय झालंय ते पाहण्याचीही शक्ती योसीकडे नसते.एके रात्री पाऊस थोडा थंडावल्यावर योसी बूट काढतो.सॉक्स काढू लागतो,तर त्याबरोबर पायाची त्वचाही निघून येऊ लागते.त्याच्या पायालाही मार्कससारखेच प्रचंड फोड येऊन जखमा झालेल्या असतात.बोटं एकमेकांना चिकटून त्यांच्यामध्ये मांस, रक्त आणि पू यांचा लगदा तयार झालेला असतो.त्या वेदना सहन करताना त्याच्या लक्षात येतं,की आपण मार्कसच्या त्रासाकडे किती अलिप्तपणे पाहत होतो ! पाय कोरडे व्हावेत यासाठी योसी आग पेटवून त्यावर ते शेकण्याचा प्रयत्न करतो.पण सकाळी उठल्यावर पुन्हा सॉक्स आणि बूट घालण्याशिवाय पर्याय नसतो.


पुस्तकातलं हे वर्णन वाचताना आपणही योसीसोबत चालत राहतो आणि त्याच्या पायांच्या वेदना आपल्या पायांवर अनुभवतो.आता उद्याच्या सकाळी तरी त्याचा हा त्रास संपू दे,अशी मनोमन प्रार्थना करत राहतो.आता याहून आणखी वाईट काय होऊ शकतं,असं मनात येत असतानाच योसी शांतपणे आपल्याला पुढच्या अग्निपरीक्षेत घेऊन जातो.


पाऊस हा जंगलातला एकमेव धोका नसतो.ज्या जंगलाचं आजवर योसीला आकर्षण वाटत आलेलं असतं ते आता त्याच्यावर चाल करून यायला लागतं. एका संध्याकाळी एका झाडावरची फळं काढत असताना लक्षात येतं की हाताच्या अंतरावर एक विषारी साप आहे.तो ओळखू येण्याचं कारण कार्लने सांगितलेलं असतं : हा साप लांबूनही माणसाच्या डोळ्यांत विष टाकून त्याला आंधळं करतो.एक क्षण भीतीने योसी थिजतो,पण दुसऱ्या क्षणी भीतीचं रूपांतर रागात होतं.एक भला मोठा दगड घेऊन तो त्या सापाचं डोकं ठेचून काढतो.जणू तो फक्त सापावरच नव्हे,तर स्वतःच्या हतबलतेवर राग काढतोय.रोज रात्री प्राण्यांचे आवाज त्याला घाबरवून टाकतात.मनात भीती घर करून बसलेली असल्यामुळे अनेकदा पालापाचोळ्यातून साप येत असल्याचा भास होतो,तर कधी प्राण्यांच्या दबक्या हालचाली ऐकू येतात. 


हे आपल्याच मनाचे खेळ आहेत की खरोखरच आपल्या आसपास प्राणी फिरताहेत हेही त्याला अनेकदा कळेनासं होतं.कोणी प्राणी आलाच तर काय करायचं याचेही अनेक प्लॅन्स योसी आखतो.

लायटर पेटवून त्यावर जवळचा मॉस्किटो रिपेलंट स्प्रे मारला की आगीचा एक लोट तयार होईल आणि प्राणी त्याला घाबरून पळून जाईल,असा त्याचा अंदाज असतो.


एके रात्री त्याला अशीच खसफस ऐकू येते.हा भास आहे की नाही याचा विचार करत योसी डोळे न उघडता बसून राहतो;पण नंतर त्याला जाणवतं की खरोखरच आपल्या जवळ कुठला तरी प्राणी आलेला आहे.डोळे उघडून पाहतो तो त्याच्यापासून दहा-बारा फुटांवर अ‍ॅमेझॉनमधला खूँखार पँथर जॅग्वार उभा असतो.आधी योसी त्याच्या अंगावर फ्लॅशलाइट टाकून पाहतो.पण त्याला ना तिथून जाण्याची घाई असते ना योसीजवळ येण्याची.तो शांतपणे योसीकडे पाहत राहतो.आधीच भीतीने गोठलेल्या योसीला जणू त्या अजस प्राण्याची भुरळ पडते.तो किती तरी वेळ जॅग्वारकडे नुसताच बघतच राहतो.भानावर आल्यावर त्याला लायटर आणि स्प्रेचं शस्त्र आठवतं.पण मनात विचारांचा कल्लोळ माजलेला. 'काय करावं? त्या आगीमुळे हे शांत जनावर चिडलं तर? कदाचित काही न करता हा जॅग्वार इथून जाईलही.' पण दुसरं मन म्हणतं,'तसं न होता तो पुढे माझ्याच दिशेने चालून आला तर काय करायचं?'अखेर न राहवून योसी लायटर काढून त्यावर स्प्रे मारतो. जॅग्वारच्या दिशेने आगीचा एक लोट जातो.लायटर बंद होतो तेव्हा जॅग्वार गेलेला असतो.त्याचा निर्णय योग्य ठरलेला असतो.


जंगलामध्ये योसीला सर्वाधिक त्रास होतो तो या द्विधा मनःस्थितीचा.काय करावं आणि काय करू नये याचे निर्णय घेणं सर्वाधिक अवघड ठरतं.आपण पुढे चालत राहिलो आणि आपली सुटका करण्यासाठी येणारी माणसं त्याच्या विरुद्ध दिशेला शोधत असली तर? आपण इथेच थांबलो आणि केव्हिन आपली पुढे वाट पाहत असेल तर?आपण नदीच्या काठाने चालत राहिलो आणि जंगलात आतल्या दिशेला एखादं गाव असेल तर? डोकं ताळ्यावर ठेवणं आणि योग्य निर्णय घेणं अशक्य होऊन बसतं.काय योग्य,काय अयोग्य याचे निकषच इथे बदललेले दिसतात.


जंगलातलं भरकटणं सुरू असताना योसीच्या मनात सतत आठवणी दाटून येत राहतात.आपण कार्लचं का ऐकलं नाही,

आपण मार्कसची थट्टा का केली,नसतं धाडस करत बसण्यापेक्षा आपण जंगलातल्या एखाद्या वस्तीतच का राहिलो नाही,असे नाना प्रश्न त्याच्या मनात सतत गर्दी करतात.रात्री झोप लागू लागली की मार्कस त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहतो.जणू योसी त्याला सोडून का गेला,

असा जाबच तो विचारत असतो. कोणतंच सामान नसताना केव्हिन जंगलात भटकतो आहे नि आपण त्याचा शोध न घेता स्वार्थीपणे पुढे पुढे चाललोय असं त्याला वाटतं आहे,असे विचार योसीच्या मनात येऊ लागतात.त्याला स्वप्न पडतं,की तो झोपेत असताना केव्हिन एक मोठा कोयता घेऊन त्याच्या कवटीचे दोन तुकडे करतोय.झोपेत,दिवसा चालता चालता तो केव्हिनशी बोलत राहतो,'मी तुला सोडून गेलेलो नाही,

प्लीज माझ्यावर विश्वास ठेव.'


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…

२६/४/२५

४.१ स्पॉटेनियस जनरेशन / 4.1 Spontaneous Generation 

सतराव्या शतकाच्या मध्यात मायक्रोस्कोप्स आणि मायक्रोस्कोपिस्ट्स यांनी माणसाला आतापर्यंत न दिसलेलं सजीवांचं जग खुलं करून दिलं.पण त्यामुळे सजीव आणि निर्जीव यांच्यातला फरक कमी झाला आणि त्यामुळे पुन्हा एकदा सजीवांच्या उगमाचा प्रश्न उपस्थित झाला.


मोठे जीव आपल्या आईच्या पोटातून किंवा अंड्यातून आपल्या लहानग्यांना जन्म देऊन आपली पुढची पिढी निर्माण करतात हे तर सगळ्यांनाच माहीत होतं.मग डोळ्यांना न दिसणारे हे सूक्ष्मजीव आपली प्रजा कशी निर्माण करतात आणि मुळात म्हणजे ते नेमके येतात तरी कुठून? धूळ-माती-दलदल,घाण,खराब झालेलं अन्न अशा ठिकाणी सापडत असतील तर ते कदाचित त्याच पदार्थांपासून तयार होत असावेत असं आता काहींना वाटायला लागलं होतं.त्यातूनच अशा निर्जीव घटकांपासून सूक्ष्मजीव,अळ्या,लहान किडे तयार होतात या संकल्पनेला 'स्पॉटेनियस जनरेशन' असं नाव मिळालं.अनेक वैज्ञानिक हे सिद्धही करून दाखवत होते.आपल्याच स्वयंपाकघरातल्या उरलेल्या अन्नामध्ये काहीच दिवसांत अळ्या किंवा लहान किडे तयार होतात,यावरून हे स्पॉटेनियस जनरेशन सिद्ध होत होतं.! आता जवळपास सगळ्याच बायॉलॉजिस्ट्सनी ही संकल्पना स्वीकारली होती.


पण रक्ताभिसरणामध्ये धमन्या आणि शिरा यांना जोडणाऱ्या अतिसूक्ष्म नळ्या (कॅपिलरीज) असाव्यात असं भाकीत करणाऱ्या विल्यम हार्वे यानं कदाचित हे सूक्ष्मजीव त्यांच्याही

पेक्षा लहान बिया किंवा अंड्यांतून तयार होत असावेत असा अंदाज केला होता ! 


पण त्या वेळच्या लोकांना जो माणूस अशा अतिसूक्ष्म नळ्यांचं (कॅपिलरीज) भाकीत करतो,तो काय कशाचंही भाकीत करेल,असं त्याच्याबद्दल वाटत होतं आणि त्यांनी हार्वेकडे फारसं लक्ष दिलं नाही.पुढे या कॅपिलरीज खरोखर असतात असं त्याचाच शिष्य माल्पिघी यानं सिद्ध केलं.


सजीवांचं वर्गीकरण,सजीव,अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन


या स्पॉटेनियस जनरेशनबद्दल हार्वेनं जे लिहून ठेवलं होतं,ते इटालियन वैज्ञानिक फ्रान्सिस्को रेडी (Francesco Redi) (१६२६ ते १६९७) याच्या वाचनात आलं आलं.


 'सूक्ष्मजीवांचीही अंडी किवा बीज असावेत काय?' या कल्पनेनं तो भारावूनच गेला आणि त्यानं या गोष्टीवर आणखी संशोधन करायचं ठरवलं.१६६८ मध्ये त्यानं हा प्रयोग हाती घेतला.त्यानं वेगवेगळ्या प्रकारचं मांस असलेल्या परीक्षानळ्या तयार केल्या.त्यातल्या त्यानं सील केल्या आणि तशाच उघड्या ठेवल्या. उघड्या परीक्षानळ्यांमधल्या मांसावर माश्या बसू शकत होत्या आणि बंद परीक्षानळ्यांवर माश्या बसू शकत नव्हत्या,हवाही जाऊ शकत नव्हती.उघड्या परीक्षानळ्यांत काहीच दिवसांत अळ्या तयार झाल्या आणि बंद परीक्षा नळ्यांतलं मांस तसंच राहिलं.त्यात अळ्या झाल्या नाहीत.पुन्हा रेडीनं आणखी काही परीक्षानळ्यांत मांस ठेवलं आणि त्यांना कापसाचे बोळे लावले.आता या नळ्यांमध्ये हवा येऊ जाऊ शकत होती,पण त्यांतल्या मांसावर माश्या बसू शकत नव्हत्या. याही मांसामध्ये अळ्या तयार झाल्या नाहीत.त्यातूनच मग या अळ्या मांसातून नाही तर माश्यांच्या अंड्यांतून तयार होतात असं सिद्ध झालं.


किमान लहान जिवांसाठी तरी स्पॉटेनियस जनरेशन लागू होत नाही हे सिद्ध झालं होतं.गंमत म्हणजे हा शोध लावणारा रेडी हा मुळात काही वैज्ञानिक नव्हताच ! तो एक कवी होता.१६८५ मध्ये प्रसिद्ध झालेलं त्याचं 'बॅको इन टॉस्काना' हे काव्य त्या काळातलं इटलीतलं सर्वश्रेष्ठ काव्य मानलं जातं !


रेडीनं जवळपास १८० पॅरासाइट्सचा (परोपजीवींचा) अभ्यास केला होता.त्यानं अर्थवर्म्स आणि हेल्मिंथ्स या सजीवांचे दोन वेगळे गट असतात हेही दाखवून दिलं आणि रेडीच्या या प्रयोगांमुळे रेडी पॅरासायटॉलॉजीचा प्रणेता मानला जातो.


पॅरासाइट्सच्या याच अभ्यासावरून पॅरासाइट्स बारीक बारीक अंडी घालतात,त्यातून त्यांच्या अळ्या बाहेर येतात आणि मग अळ्यांपासून पुढे मोठे पॅरासाइट्स तयार होतात हे रेडीनं पाहिलं होतं.


त्यातूनच त्याला स्पॉटेनियस जनरेशनचे प्रयोग सुचले असं मानलं जातं. पण काहीही असलं तरी सजीव हा आधीच्या धूळ, माती,घाण यांच्यापासून आपोआप निर्माण होतो या पूर्वापार चालत आलेल्या धारणेला स्वतः प्रयोग करून सत्य काय आहे ते पडताळून पाहणारा रेडी हा पहिलाच वैज्ञानिक होता.


याच दरम्यान लेव्हेनहूकनं माश्या आणि अळ्यांपेक्षा कितीतरी लहान असलेल्या प्रोटोझुआचा शोध लावला होता.प्रोटोझुआ त्या मानानं फारच साधे जीव होते. किमान त्यांनी तरी स्पॉटेनियस जनरेशननं प्रजनन करायला हवं होतं.यावरही अनेक प्रयोग झाले. 


सुरुवातीला प्रोटोझुआ नसलेल्या मांसाच्या सूपमध्ये नंतर प्रोटोझुआ तयार होताहेत असं लक्षात आलं.या प्रयोगानं रेडीनं स्पॉटेनियस जनरेशनच्या आधीच्या ठाम समजतीला चांगलंच आव्हान दिलं होतं.आता मात्र या प्रश्नानं चांगलीच उचल घेतली आणि वैज्ञानिकांचे चक्क स्पॉटेनियस जनरेशनच्या बाजूनं आणि स्पॉटेनियस जनरेशनच्या विरुद्ध असे दोन गट पडले.


स्पॉटेनियस जनरेशनच्या बाजूनं बोलणाऱ्यांचं तत्त्व स्पष्ट होतं.जर्मनीचा डॉक्टर जॉर्ज अर्स्ट स्टाल (Georg Ernst Stahl) (१६६० ते १७३४) हा या बाजूनं होता. त्याची फ्लॉजिस्टॉनची थिअरी प्रसिद्ध होती.


या थिअरीमध्ये त्याचं असं म्हणणं होतं,की सगळ्याच पदार्थांत फ्लॉजिस्टॉन असतं आणि तो पदार्थ जळायला लागल्यावर किंवा लोखंडासारखा गंजायला लागल्यावर त्या पदार्थांतलं फ्लॉजिस्टॉन त्यातून बाहेर पडतं.गंमत म्हणजे गंजल्यावर लोखंडाचं वजन वाढत असेल तर काहींनी या फ्लॉजिस्टॉनचं वजन ऋण असावं असंही सुचवलं होतं.त्यामुळेच लोखंडातून फ्लॉजिस्टॉन निघून गेल्यावर लोखंडाचं वजन वाढत असावं ! गंमत म्हणजे पूर्ण अठराव्या शतकात ही थिअरी योग्यच आहे असं मानलं जात होतं !


स्टालनं इतरही अनेक विषयांवर लिखाण आणि संशोधन केलं होतं.त्यात त्यानं सूक्ष्म सजीवांना वेगळेच नियम लागू होत असावेत असंही विधान केलं होतं. त्यांना माणूस आणि इतर प्राण्यांचे नियम लागू होत नाहीत असं त्यानं म्हटलं होतं.स्टालच्या अशा भंपक विधानांना डच डॉक्टर हर्मन बोर्वे (Hermann Boerhaave) (१६६८ ते १७३८) यानं आक्षेप घेतला होता.त्याच्या काळातला तो खूपच प्रसिद्ध डॉक्टर होता. त्याला डच हिप्पोक्रॅट्स म्हटलं जायचं. आपल्या स्वतःच्या पुस्तकात त्यानं मानवी शरीराचं खूपच सविस्तर वर्णन केलं होतं आणि मानवी अवयवांना केमिस्ट्री आणि फिजिक्स यांचे नियम कसे लागू होतात हे दाखवून दिलं होतं.

त्यामुळे फिजिक्स आणि केमिस्ट्री यांचे नियम सजीव आणि निर्जीव या सगळ्यांमध्ये सारखेच चालतात असाही एक सूर या काळात उमटत होता.आणि जर सूक्ष्मजीव हे निर्जीव घटकांमधून निर्माण होत असतील तर ते सजीव आणि निर्जीव यांना जोडणारा दुवा असण्याची शक्यता होती.


त्याच वेळेस सूक्ष्मजीव हे असे निर्जीव पदार्थांपासून तयार होत नाहीत असंही अनेकांचं म्हणणं होतं.पण बायबलमध्ये कुठेतरी स्पॉटेनियस जनरेशनचा उल्लेख केलेला असल्यामुळे हे वैज्ञानिक त्या विरुद्ध बोलायला धजावत नव्हते.कारण त्या काळी धर्माविरुद्ध काही बोलणं म्हणजे जबर शिक्षेला आपणहून आमंत्रण दिल्यासारखंच होतं.


त्याचं असं झालं,१७४८ मध्ये जॉन टर्बेविल्हे निडहॅम (John Turberville Needham) (१७१३ ते १७८१) या इंग्लंडमधल्या कट्टर दैववादी वैज्ञानिकानं एक प्रयोग केला.त्यानं मटनाचं सूप उकळवलं आणि ते टेस्ट ट्यूबमध्ये भरलं.टेस्ट ट्यूबला बूच लावून त्यानं ती बंद केली.त्यानंतर काहीच दिवसांनी या सूपमध्ये सूक्ष्मजीव तयार झाले.त्यानं तर ते सूप उकळवून घेतल्यामुळे ते त्यानं 'स्टराइल' केलं होतं असंच त्याला वाटत होतं. त्यामुळे निडहॅमचा स्पॉटेनियस जनरेशनवर विश्वास बसला. शिवाय,

महत्त्वाचं म्हणजे त्यानं आपले निष्कर्ष चक्क रॉयल सोसायटीला पाठवून दिले आणि आपल्या सामाजिक वजनाच्या जोरावर रॉयल सोसायटीचं मानद सदस्यत्वही त्यामुळे या गोष्टीवर आक्षेप घ्यायला कुणी धजावणारंच नव्हतं.


पुढची तब्बल वीस वर्ष अशीच गेली.१७६८ मध्ये इटालियन बायॉलॉजिस्ट लझारो स्पॅलान्झानी (१७२८ ते १७९९) स्पॉटेनियस जनरेशन या गोष्टीचा पुरावा पाहण्याच्या वेडानं झपाटून गेला होता.जगातल्या सगळ्या गोष्टींचा जन्म होण्यासाठी पालकांची गरज असतेच का,की त्यातल्या काही गोष्टी आपोआप जन्मतात ? या प्रश्नानं भेडसावलं होतं. 


इटलीतल्या स्कँडिआनोमध्ये १७२९ साली लझारो स्पॅलान्झानी जन्मला.त्या काळातल्या समजुतींनुसार कित्येक प्राण्यांना जन्मासाठी आई-वडिलांची गरज नसायची!काही दैवी शक्तींमुळे बरेचसे जीव जन्मतात असं अनेकांना वाटायचं.उदाहरणार्थ-समजा, आपल्याला मधमाश्यांचं एक पोळं हवं असेल तर एका बैलाच्या डोक्यावर प्रहार करून त्याला मारायचं आणि त्याचा मृतदेह जमिनीतून त्याची शिंगं बाहेर येतील असं उभंच पुरायचं.मग एका महिन्यानं त्याची शिंगं तोडून टाकायची,की झालं,मधमाश्या तयार!असल्या वाट्टेल त्या पाककृती हवे ते प्राणी तयार करण्यासाठी त्या काळी प्रचलित असायच्या!पण स्पॅलान्झानीचा मात्र या सगळ्या भाकडकथांवर अजिबात विश्वास बसत नसे.हे सगळं झूठ आहे हे त्याला सिद्ध करून दाखवायचं होतं.


दरम्यान,त्याला निडहॅमच्या प्रयोगांबद्दल कळलं होतं. त्याला निडहॅमच्या प्रयोगातलं सूप पुरेसं उकळलंच गेलं नसावं असं वाटलं.त्यानं आपला प्रयोग करताना अशाच प्रकारचं सूप अर्धा-पाऊण तास चांगलं उकळवून घेतलं आणि मग त्यानं ती टेस्ट ट्यूब सील केली.आता या वेळी मात्र त्यात सूक्ष्मजीव तयार झाले नाहीत.आता यातून कोणतेही जीव हे निर्जीव पदार्थांतून अचानक जन्म घेत नाहीत असं जवळपास सिद्ध झालं होतं.पण स्पॉटेनियस जनरेशनवर विश्वास ठेवणाऱ्या शंकेखोर लोकांनी त्यातूनही वाद निर्माण केला आणि स्पॅलान्झानीनं ते सूप खूपच उकळवल्यामुळे जीवनाला आवश्यक असलेलं व्हायटल प्रिन्सिपल त्यातून हवेत उडून गेल्यामुळे त्यात कोणताच जीव जन्म घेऊ शकत नाही असा युक्तिवाद केला.स्पॅलान्झानीनं मग काचेच्या काही भांड्यांमध्ये मटनाचं सूप,अन्नपदार्थ असं काही काही घेतलं आणि ती भांडी उकळवण्यापूर्वी बंद केली. म्हणजे व्हायटल प्रिन्सिपल नावाचं काही असेल तर ते या वेळी भांड्यातून उडून जाणार नाही.त्यानं त्या भांड्यांचं तोंड चक्क ती भांडी वितळवूनच सीलबंद केलं,या कामात त्याचे हात भाजले तरी त्यानं आपलं काम थांबवलं नाही.मग त्यानं ही काचेची सीलबंद भांडी आणि आतलं सूप गरम केलं.ती तापवण्याचा आणि आतले जीव मरायचा काही संबंध आहे का हे तपासण्यासाठी त्यानं एक भांडं थोडाच वेळ तर दुसरं चांगलं तासभर गरम केलं.तसंच ज्यातून हवा जाऊ शकेल असं नुसतंच बूच लावलेलं एक भांडंही त्यानं असंच तापवलं.मग त्यानं ही सगळी भांडी काही दिवस तशीच ठेवली.त्यानंतर काही काळानं त्यानं ती अतिशय काळजीपूर्वक उघडली तेव्हा पूर्णपणे सीलबंद करून तासभर तापवलेल्या भांड्यात त्याला भिगातून पाहताना एकही सुक्ष्मजीव आढळला नाही,पूर्णपणे सीलबंद करून थोडाच वेळ तापवलेल्या भांड्यात त्याला थोडे सूक्ष्मजीव तरंगताना आढळले,मात्र नुसतंच बूच लावलेल्या भांड्यात त्याला कित्येक जीव पोहताना दिसले.याचाच अर्थ हे सगळे जीव त्या भांड्यांमध्ये आधीच असणार आणि ते तसेच जिवंत राहिले असणार किंवा मग ते भांडं पूर्णपणे बंद केलेलं नसल्यामुळे बाहेरच्या हवेतून ते आत घुसले असणार.पण निडहॅम म्हणतो तसं ते काही त्या भांड्यातच तयार झालेले नसणार हे नक्की,अशी खूणगाठ त्यानं मनाशी बांधली.


स्पॅलान्झानीनं आपले निष्कर्ष रॉयल सोसायटीला कळवून बुचकळ्यातच पाडलं.निडहॅमचं म्हणणं खोटं असेल की काय हे त्यांना आता समजेना.पण निडहॅमनं आपला दावा काही सोडला नाही.उलट तो पॅरिसला आपल्या मटनाच्या सूपमधून जन्मलेल्या जिवांविषयी व्याख्यानं द्यायला गेला आणि तिथल्या एका उमरावाशी त्याचं सूत चांगलंच जमलं.आता निडहॅम प्रयोग करायचा आणि हा उमराव त्या प्रयोगांची वर्णनं लिहायचा.हे करताना तो उमराव प्रयोगशाळेतसुद्धा आपल्या रेशमी कपड्यांना कुठेसुद्धा घाण लागू नये तसंच त्यांना घडी पडू नये याची काळजी घ्यायचा.स्पॅलान्झानीचं म्हणणं खरं आहे हे कळत असूनही कुठल्या तरी दैवी शक्तीमुळे आपल्या मटनाच्या सूपमध्ये जीव निर्माण होतात असा दावा त्यांनी आता केला.रॉयल सोसायटीनं निडहॅमला मानद सदस्यत्व देऊन स्पॅलान्झानीच्या चिडचिडीत आणखीनच भर टाकली.पण तेवढ्यात निडहॅमनंच एक घोळ केला.त्यानं स्पॅलान्झानीवर टीका करताना 'तू तुझ्या भांड्यांना एक तासभर गरम करून त्यातली दैवी शक्ती नष्ट करतोस' असा त्याच्यावर आरोप केला.मग स्पॅलान्झानीनं अनेक भांडी घेऊन त्यात पाणी आणि वेगवेगळ्या बिया टाकून त्या भांड्यांना आधी बूच लावलं आणि नंतर ती तापवली.एक तर त्यानं ती सीलबंद केली नव्हती आणि दुसरं म्हणजे ती तापवायचा काळ वेगवेगळा होता.काही भांडी त्यानं अर्धा तासच तापवली तर काही एक तास,तर काही दोन तास.आता जर निडहॅमचं म्हणणं खरं असेल तर एक तास किंवा त्याहून जास्त वेळ तापवलेल्या भांड्यांमधली सगळी 'व्हायटल प्रिन्सिपल' नष्ट झाल्यामुळे एकही सूक्ष्मजीव दिसायला नको होता.पण तसं न घडता सगळ्याच भांड्यांमध्ये सूक्ष्मजीव मस्त वळवळ करत होते की!म्हणजेच भांड्यांवर लावलेली बुचं सीलबंद प्रकारची नसली की बाहेरच्या हवेतून त्यांच्यामध्ये सूक्ष्मजीव जातातच हे स्पॅलान्झानीचं म्हणणं खरं ठरत होतं आणि निडहॅम आणि कंपनीला दैवी शक्तीचं थोतांड बंद करणं भाग होतं.


स्पॅलान्झानीनं आपले निष्कर्ष पुन्हा रॉयल सोसायटीला कळवले आणि या वेळी मात्र त्यांच्या भुवया एकदम विस्फारल्याच ! पण एवढ्यानं स्पॅलान्झानीचं समाधान झालं नव्हतं.हे सूक्ष्मजीव कसे जन्मतात याचा विचार करता करता त्यानं आपलं लक्ष इतर सजीवांकडे वळवलं.नर बेडूक फक्त नव्या जिवाला जन्म देण्यासाठीच अतिशय तीव्र भावनेनं मादीशी रत होतो की त्यामागे दुसरंही काही कारण असतं असे प्रश्न त्याच्या डोक्यात पिंगा घालत होतेच. ्त्यांचा विचार करता करता त्यानं एकदा एक नर बेडूक मादीशी समागम करत असताना त्याचे मागचे दोन्ही पाय चक्क कापून टाकले आणि तरीही मरता मरता त्या बेडकानं आपली मादीवरची पकड काही सैल केली नाही. यावरून स्पॅलान्झानीनं काढलेल्या निष्कर्षात त्या बेडकामध्ये बिनडोक भावना नसून,प्रचंड कामभावना असल्यामुळे असं होत असल्याचं लिहिलं.हे असले विचित्र आणि क्रूर प्रयोग त्यानं फक्त प्राण्यांवरच केले असं नाही.

आपल्या पोटात अन्नाचं पचन कसं होतं हे पाहण्यासाठी त्यानं लाकडाच्या लहान सच्छिद्र पेटीत मांस भरून ती पेटी गिळली आणि त्यातल्या अन्नाचं काय झालं हे पाहण्यासाठी थोड्या वेळानं पुन्हा उलटी काढून ती पेटी बाहेर काढली !


स्पॅलान्झानीनं काळोखातही वटवाघूळ कसं न अडखळता उडू शकतं यावरही अनेक प्रयोग केले होते. आधी त्यानं काही पक्ष्यांवर प्रयोग केले.त्या प्रयोगांमध्ये अंधार झाला की इतर पक्षी अडखळून पडत तरी होते किंवा कशाला तरी धडकत तरी होते.पण आपल्या डोळ्यांत बोट घातलं तरी आपल्याला कळणार नाही इतका अंधार केल्यानंतरही वटवाघळं मात्र एकदाही धडकले नाहीत,की कशाला अडखळून पडले नाहीत. यावरून स्पॅलान्झानीनं जो आपल्याला अंधार वाटतो तो निश्चितपणे संपूर्ण अंधार नसावा,कारण प्रकाशाच्या अभावी वटवाघळांना दिसणं शक्यच नाही.असं त्यानं आपल्या नोंदींमध्ये लिहिलं होतं.यातून त्यानं चूकून का होईना,पण माणसाला न दिसणाऱ्या पण अस्तित्वात असणाऱ्या मानवी दृष्टीच्या पलीकडच्याही प्रकाशाचे स्पेक्ट्रम असण्याची शक्यताच वर्तवली होती !


पण गंमत म्हणजे वटवाघळं समोर अडथळा आहे की नाही हे समजायला डोळ्यांचा किंवा प्रकाशाचा वापर करत नाहीत हे त्याला पुढच्या प्रयोगांतून कळलं. पुढच्या प्रयोगात त्यानं वटवाघळांच्या डोळ्यांना पट्टी बांधली तरी ते वटवाघूळ व्यवस्थित उडत होतं. त्यानंतरच्या प्रयोगात तर त्यानं त्या वटवाघळाचे डोळेच चक्क ऑपरेशन करून काढून टाकले आणि आता पुन्हा त्याला उडवलं.तरीही ते वटवाघूळ छानपैकी उडालं आणि दोन इंच रुंदीच्या फटीत जाऊन व्यवस्थित लपलं! त्यानंतर त्यानं वटवाघळांच्या कानांत चक्क मेण, रॉकेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे कानांचे बोळे वापरून उडायला लावलं तेव्हा मात्र ती वटवाघळं खरोखरच अडखळली आणि वाट चुकायला लागली.

त्यातूनच स्पॅलान्झानीनं वटवाघळांना कानांनी अडथळे समजतात हा बायॉलॉजीतला खूपच महत्त्वाचा निष्कर्ष काढला.


काही काळानं स्पॅलान्झानीचं महत्त्व सगळ्यांनी मान्य केलं आणि त्याला मानाची पदंही मिळाली.निडहॅमच्या बंडल प्रयोगांना आणि निष्कर्षांना गुंडाळून ठेवण्यात आलं.


सुक्ष्मजीव आपल्या डोळ्यांना सहज दिसत असलेल्या प्राण्यांसारखेच असतात हे सिद्ध करण्यासाठी स्पॅलान्झानीनं त्या सूक्ष्मजीवांवर जळत्या तंबाखूचा धूर तसंच विजेचे लोळ सोडून बघितले.या सर्वांपासून बचाव करण्यासाठी हे जीव माणसं किंवा प्राण्यांसारखेच धडपडतात असं त्याला आढळून आलं.तसंच एका सूक्ष्मजीवातून दुसरा कसा जन्म घेतो याचा शोध अजून त्याला लागलेलाच नव्हता.म्हातारपणातही हे शोधून काढण्याची त्याची धडपड सुरूच असायची.


स्पॉटेनियस जनरेशनवर १८५९ मध्ये शतकात लुई पाश्चरनं प्रयोग केले होते.त्यानं एका लांब नळीसारख्या आडव्या एस च्या आकाराच्या निमुळत्या तोंडाच्या चंबूमध्ये (फ्लास्कमध्ये) सूपचं मिश्रण घेतलं आणि आधीचे जंतू मारण्यासाठी उकळवलं.पण त्यात हवा जाऊ शकत नसल्यामुळे त्या चंबूमध्ये सूक्ष्मजीव निर्माण झाले नाहीत.पण त्यानं आता फ्लास्क थोडं तिरकं केल्यानंतर त्यातलं सूप त्या फ्लास्कच्या निमुळत्या तोंडामध्ये जिथपर्यंत हवा आत येऊ शकते,तिथपर्यंत आलं तर मात्र त्यात सूक्ष्मजंतू वाढतात हे त्यानं दाखवून दिलं.या सगळ्या प्रयोगांतून स्पॉटेनियस जनरेशन शक्य नाही हे लुई पाश्चरनं १९व्या शतकात पुन्हा दाखवून दिलं आणि कोणताही जीव हा निर्जीव गोष्टींपासून जन्म घेऊ शकत नाही या निष्कर्षानं स्पॉटेनियस जनरेशनच्या प्रश्नावर कायमचा पडदा पडला!पण थोड्याच काळात बायॉलॉजीच्या रंगमंचावर 'पृथ्वीवर पहिला जीव केव्हा आणि कसा निर्माण झाला?' या प्रश्नानं प्रवेश करून पुढे येणाऱ्या काळातल्या वैज्ञानिकांना आव्हान दिलं होतं.