* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: पाश्चिमात्य वैद्यक : रोम Western Medicine: Rome

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१३/९/२३

पाश्चिमात्य वैद्यक : रोम Western Medicine: Rome

रोमनं मेडिटेरियन प्रांतावर राज्य केलं तेव्हा त्यांनी बायॉलॉजीच्या प्रगतीत बराच हातभार लावला होता.त्या वेळच्या तज्ज्ञांनी रोममध्ये असलेलं आधीचं ज्ञान जपून ठेवायला आणि रोम साम्राज्यात त्याचा प्रचार आणि प्रसार करायला सुरुवात केली होती.त्याच वेळी तिसऱ्या शतकात होऊन गेलेला औलुस कॉर्नेलियस सेल्सस (Aulus Cornelius Celsus) (ख्रिस्तपूर्व २६ ते ५०) यानं एक सायन्स सर्व्हेच घेतला घेतला.त्यात त्यानं आतापर्यंत उल्लेखल्या गेलेल्या आणि वापरात असलेल्या सहाशे वनस्पतींची माहिती गोळा केली होती.आणि त्यांच्या औषधी उपयोगांबद्दल लिहिलं होतं. यातून त्याला भलतीच प्रसिद्धी मिळायला लागली होती.यातूनच त्यानं फार्माकोलॉजी (औषधनिर्माण) या बायॉलॉजीच्या शाखेचा पाया घातला.अशा प्रकारच्या एन्सायक्लोपीडियाचं काम रोमच्या इतिहासात आणखी एका महान वैज्ञानिकानं पुढे नेलं.त्याचं नाव होतं गेयस प्लिनियस सेकंड्स (इ.स.२३ ते ७९) यानं याच्या आधीच्या लेखकांनी बायॉलॉजीबद्दल लिहिलेलं जे काही सापडेल ते लिहून ठेवलं. अर्थात,त्या काळी बायॉलॉजीला 'नॅचरल सायन्स' म्हणत होते.त्यामुळे त्यानंही आपल्या खंडांना 'नॅचरल हिस्ट्री' म्हटलं आहे.त्याच्या लिखाणाचे चक्क खंड होते.त्यानं जे काही सापडेल ते सगळं लिहिलं असल्यामुळे त्यात अनेकदा विज्ञानाबद्दलच्या चुकीच्या समजुती आणि भाकडकथाही आल्या होत्या.पण तरीही त्यानं जे काही होतं त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असतं' ही तार्किक कारणमीमांसा कायमच प्रमाण मानली होती. आणि त्याला पाठिंबा दिला होता.त्यामुळेच हे खंड पुढची अनेक शतकं अभ्यासली गेली होती. या माणसाला आता आपण 'प्लिनी' म्हणून ओळखतो.!


ग्रीक परंपरेतला शेवटचा आणि जवळपास सगळ्यात महत्त्वाचा बायोलॉजिस्ट ज्याला म्हणता येईल तो म्हणजे गेलन (१३० ते २००) होता.गेलनचा जन्म आशिया मायनरमध्ये झाला होता.आणि त्यानं आपलं कार्य मात्र रोममध्ये केलं.गेलनच बालपण एका श्रीमंत कुटुंबात पर्गेमॉन या गावात गेलं.त्यामुळे त्याला गेलन ऑफ पर्गेमॉन'असंही म्हटलं जातं.त्याची आई तापट स्वभावाची होती.घरात तिचा सतत आरडाओरडा सुरू असे.त्यांच्या घरी काम करणाऱ्या बायकांनी नीट काम केलं नाही तर ती त्यांचा चक्क चावा घेत असे! गेलनला भाऊ-बहिणी होत्या याविषयी काही माहिती उपलब्ध नाही.गेलनचे वडील निकॉन हे प्रसिद्ध अभियंता आणि वास्तुरचनाकार होते.त्यांना गणित,तत्त्वज्ञान,खगोलशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र अशा अनेक विषयांमध्ये रस होता.गेलननं त्यांची प्रतिभा घेतलेली असली तरीही आईचा भडकपणाही त्याच्या जोडीला उचलला होता! त्या काळात युद्धात शत्रूकडच्या नागरिकांना पकडून विजयानंतर नोकर बनवलं जाई.गेलनच्या घरी असे अनेक नोकर होते. निकॉननं स्वत:च गेलनला लहानपणी शिकवलं.थोडा मोठा झाल्यावर गेलन शाळेत गेला.त्याला अभ्यासाची चांगली गोडी लागली.शाळेतला अभ्यासक्रम पूर्ण करून गेलननं वैद्यकीय अभ्यास सुरू केला.वयाच्या १३ व्या वर्षापर्यंत त्याची ३ पुस्तकंही प्रसिद्ध झाली होती.

त्याच्या गावात अस्कुलअ‍ॅपेअसच एक भलंमोठं देऊळ होतं.दंतकथेनुसार अस्कुल अ‍ॅपेअस हा वैद्यकीय बाबतींमधला एक ग्रीक देव होता,आणि तो सच्चाईनं वागणं आणि आजारातून बरं होणं यांचं प्रतीक असलेल्या अपोलो या देवाचा मुलगा मानला जाई.तसंच अस्कुलअ‍ॅपे असला काही जण जगातला पहिला डॉक्टर मानायचे.तो त्याच्या उपचारांनी मृतांनाही जिवंत करू शके म्हणे.! त्याच्या नावानं बांधलेल्या या देवळात आजार आणि रोगामुळे ग्रासलेले लोक यायचे. या देवळातल्या पुजाऱ्यांना वैद्यकीय बाबींचीही जाण असे.ते मग या रुग्णांवर उपचार करायचे. बहुतेकदा त्यांचे उपचार म्हणजे विविध प्रकारचे चहा बनवून देणं हे असायचे.काही वेळा मात्र शस्त्रक्रियाही व्हायच्या.पण त्यात बव्हंशी वेळा रुग्ण मरायचाच.कारण एक तर माणसाच्या शरीराबद्दल अजून नीटसं कुणालाच माहिती नव्हतं आणि दुसरं म्हणजे शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्यात वापरली जाणारी हत्यारं निर्जंतुक केली पाहिजेत हे अजून कळायचं होतं. रुग्णांना पडलेल्या स्वप्नांवरून त्यांच्यावर काय उपचार केले पाहिजेत याचा अंदाज मग ती पुजारी डॉक्टर मंडळी घ्यायची.कधीकधी तर म्हणे त्या रुग्णांच्या स्वप्नात अस्कुलअ‍ॅपेअस स्वतःच येऊन त्यांना आश्चर्यकारकरीत्या बरं करून टाकायचा! मग रुग्णांची आणि त्या माध्यमातून समाजाची सेवा करावी या हेतूनं अनेक प्रतिष्ठित लोकही त्या देवळात अधूनमधून राहायचे.असंच एकदा निकॉन त्या देवळात राहिला होता. तेव्हा त्याच्या स्वप्नात अस्कुल

अ‍ॅपेअस आला आणि गेलन एक महान डॉक्टर होईल असा दृष्टान्त त्यानं निकॉनला दिला. त्यामुळे गेलन १६ वर्षांचा झाल्यावर निकॉननं त्याला डॉक्टर करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकली.अस्कुलअ‍ॅपअसचं देऊळ हीच गेलनचं वैद्यकशास्त्र शिकायची पहिली कर्मभूमी होती. सेतारस आणि रेफिनस हे दोघं डॉक्टर्स गेलनच्या आधी तिथे रुग्णांवर उपचार करायचे.त्यांच्या मागे मागे फिरत त्यांच्या कामाचं निरीक्षण करणं अशी गेलन आणि त्याच्या सहाध्यायांची शिकायची पद्धत असे.त्या वेळच्या काही उपचारपद्धती आज आपल्या अंगावर काटा आणतील अशा होत्या.उदाहरणार्थ,कुणाच्या अंगावर फोड आलेले असतील तर हंस पक्ष्यांच्या तीक्ष्ण चोची त्या फोडांवर ते फुटेपर्यंत जोरजोरात टोचवल्या जात! जखमा बऱ्या करण्यासाठी देवळातल्या कुत्र्यांना त्या चाटायला लावल्या जात.! आता डॉक्टरांच्या गळ्यात स्टेथोस्कोप असतो तसा त्या काळातल्या डॉक्टरांच्या गळ्यात पवित्र साप असायचा! त्यामुळेच आज एकमेकांना विळखा घातलेले दोन साप हे वैद्यकाची निशाणी म्हणून दाखवत असावेत.! आणि असं बरंच काही. एकूण तो काळच भीषण होता हे खरं!


सुरुवातीला त्यानं ग्लॅडिएटर्स म्हणजे मानवी योद्ध्यांचा सर्जन म्हणून काम केलं होतं.त्यांना झालेल्या दुखापती आणि जखमा यांच्यावर तो उपचार करायचा.त्यामुळेच त्याला मानवी शरीराच्या आतमध्ये काय असतं याचा अभ्यास करणं शक्य झालं.त्यामुळेच तो शरीरावरच्या जखमांना शरीराच्या आतमध्ये डोकावण्याच्या खिडक्या म्हणत असे! शिवाय जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा त्यानं कुत्रे,माकड,मेंढी आणि इतरही अनेक प्राण्यांचं डिसेक्शन केलं होतं.त्यातून त्यानं झूऑलॉजीचा प्रचंड अभ्यास केला.त्यानं कोणत्याही प्राण्याच्या शरीरातले कोणते अवयव काय काम करतात याबद्दल त्यानं सखोल अभ्यास केला होता.त्यामुळेच आजही बायॉलॉजीच्या शास्त्रात आणि वैद्यकाच्या शास्त्रात गेलनचं नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं.इतका की त्याच्या हातून कधी काही चूक होऊ शकते यावर पुढची अनेक शतकं कुणाचा विश्वासच बसत नव्हता! गेलन डुकरांच्या शरीराचा अभ्यास करून त्यावरून माणसांच्या शरीराविषयी अंदाज बांधे ! त्यासाठी वर्षातून एकदा तो आणि त्याचे विद्यार्थी एका मेलेल्या डुकराचं शरीरविच्छेदन करायचे. रोममधल्या धार्मिक प्रथेनुसार मृत माणसाचं शरीरविच्छेदन करणं निषिद्ध मानलं जात असल्यानं खरं म्हणजे गेलनकडे दुसरा पर्यायही नव्हता.पण डुकराचं आणि माणसाचं शरीर यांच्यात अनेक महत्त्वाचे फरक असतात,पण त्यामुळे डुकराच्या शरीरातल्या गुणधर्मांवरून माणसाच्या शरीराबद्दल निष्कर्ष काढणं म्हणजे अचाटच होतं.! त्यातून हे निष्कर्ष पडताळून बघायला हवेत.पण त्यासाठी माणसाचं शरीर आणणार कुठून? ते शक्य नसल्यानं मग गेलन त्याला जमतील तसे अंदाज बांधायचा.अर्थातच बरेचदा ते चुकीचेही असायचे!

दुसऱ्या शतकात,म्हणजे आजपासून २००० वर्षांपूर्वी गेलननं चार रोमन राज्यांच्या दरबारी वैद्य म्हणून सेवा केली.तलवारीचे वार,बाणामुळे झालेल्या जखमा आणि हिंस श्वापदांनी केलेले हल्ले,यांसारख्या घटना त्या काळी सतत घडायच्या.त्यावर तातडीनं उपचार करणं गरजेचं असे.ही जबाबदारी गेलनवर असे.त्यानं अनेक औषध आणि उपचारपद्धती शोधून काढल्या. पण गेलन हा वैद्यकशास्त्रातला ॲरिस्टॉटलच म्हटला पाहिजे.सुमारे १५०० वर्ष त्याचा शब्द त्याच्या नंतरची मंडळी प्रमाण मानणार होती! गेलनचा जन्म व्हायच्या सुमाराला रोमन लोकांनी युरोपमधला बराच भाग,आफ्रिकेतला काही भाग,मध्य पूर्वेकडचे देश आणि आशियातला काही प्रदेश या सगळ्यांवर आपला कब्जा केला होता.गेलनच्या काळात तो एकटाच डॉक्टर होता असं नाही,पण त्या काळात डॉक्टर्सना योग्य प्रशिक्षण कुठून मिळणार ? त्यामुळे बहुतेक सगळे डॉक्टर्स इतर डॉक्टर्सचं निरीक्षण करूनच या व्यवसायाची तंत्रं शिकायचे.तसंच आपण डॉक्टर आहोत अशी घोषणा केली की झालं, त्या माणसाला डॉक्टर मानलं जाई ! त्यासाठी अमुक अमुक पदवी किंवा अनुभव असावा अशी पात्रता चाचणीच नव्हती!थोडे दिवस हा धंदा करून बघायचा,चालला तर बरंच आहे,नाहीच चालला तर तो सोडून दुसरं काहीतरी करायचं अशी गंमत चाले! त्या काळातही आपल्याला आज होतात त्यांपैकी अनेक आजार आणि रोग व्हायचे.पण आजच्यासारखी आधुनिक उपचारपद्धती तेव्हा नव्हतीच. लसूण आणि मध हे अतिशय आरोग्यदायी पदार्थ मानले जायचे. जवळजवळ प्रत्येकजण लसूण नुसता किंवा भाजून खायचे.लोक लसणीचा रस प्यायचे, लसूण अंगाला चोळायचे आणि लसणीच्या माळा गळ्यात घालायचे!मधाचंही तेच.ते खायचे किंवा कुठेही लावायचे! [सजीव,अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन]


डॉक्टरांना रोगांबद्दल अगदी बाळबोध माहिती असे.या सगळ्यामुळे माणसाचं शरीर कशाचं बनलं आहे,ते कसं चालतं,या सगळ्या गोष्टी अजून गुलदस्त्यातच होत्या.

माणसाच्या शरीरात काही आत्माबित्मा असतो की काय हे लोकांना कळत नव्हतं.त्यांना अनेक प्रश्न पडायचे. उदाहरणार्थ,माणसाच्या हृदयाचं काम नक्की काय असतं? माणूस कसा विचार करतो हे हृदयच ठरवतं का? का रक्त गरम करण्यासाठी हृदय म्हणजे माणसाच्या शरीरातली भट्टी होती का? रक्त कुठून येतं? किंबहुना रक्त बनण्याची सुरुवात कुठे होते? ते शरीरात एकीकडून दुसरीकडे कसं जातं ? रक्ताचे अनेक प्रकार असतात का? शरीरात हवा असते का? असते तर ती कुठे असते?ती रक्तवाहिन्यांमध्ये असते का? फुफ्फुसांचं काम काय असतं ? ते हृदय थंड ठेवायला मदत करतं का? यकृतामधल्या कुठल्या तरी भागामुळे आपण शूर बनतो का? आपली औदासीन्याची भावना आपल्या पोटाच्या केंद्रस्थानी एकवटलेली असते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायचा गेलननं विडाच उचलला होता.त्यानं शरीरशास्त्राचा अभ्यास केला, त्याविषयी खूप लिहिलं आणि शिकवलंही.पण मृत माणसाच्या शरीराचं विच्छेदन करणं हा त्या माणसाचा मृत्यूनंतर होणारा अपमानच आहे असं मानलं जाईल त्यामुळे मग गेलं वर बैल कुत्री माकडा आणि डुकरं यांच्या शहरांचा अभ्यास करून त्याचे आधारे माणसाच्या शरीरात बदल अंदाज बांधावे लागायचे त्यामुळे अर्थातच त्यात असंख्य चुका व्हायच्या.


.. अपुर्ण..