* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: चूक कबूल करा..Admit your mistake..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

७/६/२४

चूक कबूल करा..Admit your mistake..

२२.०५.२४ या लेखातील शेवटचा भाग…


तेव्हा त्याने कर्मचाऱ्याला सांगितले की,तो त्याच्या पुढच्या पगारातून ही पूर्ण रक्कम कापेल. कर्मचाऱ्याने विरोध केला की,पूर्ण रक्कम एकदमच कापल्यामुळे तो गंभीर आर्थिक समस्येमध्ये फसेल,यामुळे थोडी थोडी कापली जाणं उचित ठरेल.असं करण्याकरता हार्वेला आपल्या सुपरवायझरकडून अनुमती घेण्याची आवश्यकता होती.

हार्वेने सांगितलं,"आणि मला माहीत होतं की असं केल्याने साहेब खूपच रागवेल.कारण की,हा सारा गोंधळ माझ्या चुकीमुळे झाला होता,यामुळे मी हा निर्णय घेतला की,मी साहेबांसमोर आपली चूक कबूल करेन."मी साहेबांच्या केबिनमध्ये गेलो आणि त्यांना सांगितलं की,माझी एक चूक झाली आहे आणि यानंतर मी त्यांना पूर्ण गोष्ट सांगितली.साहेबांनी विस्फोटक आवाजात सांगितलं की,ही माझी नाही,तर पर्सनल डिपार्टमेंटची चूक आहे. मी परत म्हणालो नाही,ही माझीच चूक आहे. यावर साहेबांनी याला अकाउंटिंग डिपार्टमेंटची बेपर्वाई आहे म्हणून सांगितलं.परत एकदा साहेबांनी माझा बचाव करायला याचा दोष दोन लोकांवर थोपला;पण प्रत्येक वेळी मी परत परत म्हटलं की,चूक माझीच आहे.शेवटी,साहेबांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हटलं : 'अच्छा,ही चूक तुमचीच आहे.आता जा आणि चूक दुरुस्त करा.'चूक ठीक केली गेली आणि कोणाला त्रासही झाला नाही.मला खूप छान वाटलं कारण की,मी एका तणावाच्या परिस्थितीला चांगल्या पद्धतीने दूर करण्यात यशस्वी झालो होतो आणि मी बहाणे बनवायच्याऐवजी 'खरी गोष्ट सांगण्याचं साहस' हा पर्याय निवडला होता. 


या घटनेनंतर बॉसच्या नजरेत माझी इज्जत पहिल्यापेक्षा जास्त वाढली.कोणी पण मूर्ख आपल्या चुकांकरता बहाणे बनवू शकतो आणि जास्त करून मूर्ख असे करतातही; पण तुमच्या चुका कबूल केल्यामुळे तुम्ही गर्दीपासून वेगळे पडता आणि यात तुम्हाला आनंद व प्रतिष्ठेचा अनुभवही मिळतो.


उदाहरणार्थ,इतिहासात रॉबर्ट ई.ली.बाबतीत जी सगळ्यात रोचक गोष्ट सांगतो ती ही की,त्यांनी स्वतःला आणि फक्त स्वतःला गेटिसबर्गच्या युद्धात पिकेटच्या आक्रमणाच्या नंतर होणाऱ्या पराजयामुळे अपराधी मानलं.


याच्यात काही शंका नाही की पिकेटचं आक्रमण पश्चिमी जगताच्या इतिहासात सगळ्यात शानदार आणि दर्शनीय आक्रमण होतं.जनरल जॉर्ज ई. पिकेट यांनी आपले केस इतके वाढवले होते की, ते त्यांच्या खांद्याला स्पर्श करत होते. नेपोलियनच्या पद्धतीने ते रणभूमीवर बहुतेक रोज भावनापूर्ण,उत्कटतापूर्ण प्रेमपत्र लिहायचे. त्यांच्या निष्ठावान सैनिकांनी त्या जुलैच्या दुपारी त्यांचा जोश वाढवत नारे लावले.पिकेट युनियन लाइन्सच्या दिशेने भराभरा पुढे गेले आणि पूर्ण सेना त्यांच्या मागे मागे गेली.


हे एक बघण्यासारखे दृश्य होते.साहसपूर्ण भव्य युनियन लाइन्समध्ये ज्यांनी हे दृश्य बघितलं,त्यांनी याची तारीफ केली.पिकेटची सेना सहजपणे पुढे चालली आणि एका खंदकाला पार करून पुढे निघाली.यामध्ये पूर्ण वेळ शत्रूच्या तोफेचे गोळे सेनेवर निशाणा साधून पडत होते; पण ती सेना न घाबरता,न थांबता पुढे जातच राहिली.

अचानक सीमेट्री रिजच्या दगडांच्या भिंतीमागून संघीय सेना प्रकट झाली,जी इथे लपली होती आणि त्यांनी पिकेटच्या पुढे जाणाऱ्या सेनेवर गोळीबार सुरू केला.

पहाडाचं शिखर या वेळी एका ज्वालामुखी सारखं जळत होतं,असं वाटत होतं की,जसं हे कत्तलीचं मैदान आहे.

काहीच मिनिटांत एकाला सोडून पिकेटचे सगळे ब्रिगेड कमांडर मृत्यूच्या दाढेत गेले आणि पाच हजार सैनिकांच्या सेनेमधून फक्त एक हजार सैनिकच जिवंत राहिले.


जनरल ल्युइस ए.आर्मिस्टीडने शेवटी चढाई करताना सैनिकांचं नेतृत्व केलं.ते समोर पळाले, दगडी भिंतीवर चढले आणि आपल्या तलवारीच्या टोकावर आपल्या कॅपला हलवत ते ओरडले,"माझ्या बहादूर शेरांनो त्यांना तुमची हिंमत दाखवा." सैनिकांनी तसंच केलं.त्यांनी भिंतीला पार केलं.आपल्या शत्रूवर बंदुकीने प्रहार केला आणि सीमेट्रीवर दक्षिणचे झेंडे गाडले.हे झेंडे फक्त एका क्षणाकरता तिथे राहिले;पण हा क्षण मग तो कितीही छोटा असो, इतिहासात कायमस्वरूपी कोरला गेला.


पिकेटचं आक्रमण अद्भुत आणि साहसाचं असूनही ती शेवटची सुरुवात होती.ते असफल झाले.ते उत्तर दिशेला भेदू शकले नाहीत आणि ते ही गोष्ट जाणत होते.


दक्षिणेची हार निश्चित होती.ली इतके दुःखी होते, इतक्या धक्क्यात होते की,त्यांनी त्यांचा राजीनामा पाठवून दिला आणि संघाच्या प्रेसिडेंट जेफरसन डेविडला सांगितलं की,त्यांच्या जागी एखाद्या 'युवा आणि अधिक योग्य' व्यक्तीला नियुक्त करावं.गेटिसबर्गच्या युद्धात पराजया करता जनरल लींना जर बहाणे बनवायचे असते, तर ते खूपच गोष्टींना बहाणा बनवू शकले असते. त्यांच्या अनेक डिव्हिजन कमांडर्सनी त्यांना धोका दिला होता.


पायदळाच्या सैनिकांच्या आक्रमणाच्या वेळी मदत करण्याकरता वेळेवर घोडेस्वारांची सेना पोहोचली नव्हती.ही गोष्ट चुकीची झाली होती,त्या गोष्टीत गडबड झाली होती.परंतु जनरल इतके महान होते की,त्यांनी कोण्या दुसऱ्याला दोष नाही दिला.जेव्हा पिकेटचे हारलेले आणि रक्तबंबाळ झालेले शिपाई परत आले तेव्हा रॉबर्ट ई.ली.त्यांना भेटायला एकटेच गेले आणि त्यांचं स्वागत मनापासून केलं,ज्यात त्यांची महानता झळकत होती.

त्यांनी सांगितलं,सगळी चूक त्यांचीच होती. मी आणि फक्त मीच या सगळ्या हरण्याला जबाबदार आहे." इतिहासात खूपच कमी सेनापतींनी इतक्या साहसपूर्ण आणि चारित्रिक दृढतेचा परिचय दिला आहे.


माइकेल च्यांग आमचा कोर्स हाँगकाँगमध्ये शिकवत होते.त्यांनी आम्हाला सांगितलं की, कशा प्रकारे चीनची संस्कृती अनेक वेळा काही विशेष समस्यांना निर्माण करते आणि कोणत्या तऱ्हेने जुन्या परंपरेला कायम ठेवण्याऐवजी आम्हाला नव्या सिद्धान्ताना स्वीकारल्यावर लाभ होतो.त्यांच्या वर्गात एक मध्यम वयाचा माणूस होता.ज्याचे अनेक वर्षांपासून आपल्या मुलाबरोबर मतभेद चालले होते.वडिलांना अफूची सवय होती,जी आत्ता सुटली होती. चीनमध्ये ही परंपरा आहे की,मोठे लोक माफी मागायला पहिलं पाऊल उचलत नाहीत.

याकरता वडिलांना वाटत होतं की, मुलानेच पहिलं पाऊल पुढे उचलायला हवं. सुरुवातीच्या सत्रात त्यांनी वर्गाला सांगितलं की, त्यांनी त्यांच्या नातवाचं तोंडसुद्धा बघितलं नव्हतं आणि त्यांना खूप इच्छा होती की,त्यांच्यात आणि त्यांच्या मुलांमध्ये समझोता झाला पाहिजे.क्लासचे सगळेच विद्यार्थी चीनचे होते आणि त्यांना हे माहीत होतं की,त्यांच्या इच्छा आणि पुरातन काळापासून चालत आलेली परंपरा यांच्यात किती जबरदस्त संघर्ष चालतो आहे.वडिलांना हे वाटत होतं की,तरुण पिढीला जुन्या पिढीचा सन्मान करायला पाहिजे आणि त्या कारणाकरिता ते आपल्या इच्छेच्या अनुसार पाऊल न उचलण्याला बरोबर ठरवत होते आणि वाट बघत होते की,त्यांचा मुलगा येईल आणि त्यांची माफी मागेल.


कोर्सच्या शेवटी वडिलांनी परत एकदा आपल्या वर्गाला संबोधित केलं.त्यांनी म्हटलं, "मी समस्येवर चांगल्या त-हेने विचार केला आहे." डेल कार्नेगी म्हणतात,'जर चूक तुमची असेल, तर तत्काळ आणि पूर्णपणे तुमची चूक कबूल करा.' खरंतर माझ्याकरिता तत्काळ चूक मान्य करण्याची वेळ कधीच निघून गेली आहे;पण मी माझी चूक पूर्णपणे तर मानूच शकतो.मी आपल्या मुलावर अन्याय केला आहे.यात त्याचा दोष नाही आहे की,तो मला परत बघू इच्छित नाही.यात त्याचा दोष नाही आहे की,त्यानं मला जीवनातून काढून टाकलं.खरंतर आपल्यापेक्षा लहानांसमोर माफी मागणं ही आमच्या इथं लाजिरवाणी गोष्ट समजली जाते;पण चूक माझी होती आणि ती कबूल करण्याची जबाबदारीही माझीच आहे." वर्गाने टाळ्या वाजवून त्यांच्या गोष्टीचं स्वागत केलं आणि त्याला आपलं पूर्ण समर्थन दिलं.पुढच्या वर्गात त्यांनी सांगितलं की, कसा तरी तो आपल्या मुलाच्या घरी गेला,त्यांनी माफी मागितली आणि आता त्यांचं नातं सुधारलं आहे.आता त्यांची सून व नातू त्यांना पसंत करू लागले आहेत.त्यांना भेटण्यात ते यशस्वी झालेत.


अल्बर्ट हबार्ड देशाचे खूपच प्रतिष्ठित लेखक होते.

बऱ्याचदा त्यांच्या बोचऱ्या शब्दांनी लोकांच्या भावना भडकायच्या;पण हबार्डमध्ये लोकांच्या बरोबर व्यवहार करण्याची ती दुर्लभ कला होती ज्याच्या कारणामुळे ते आपल्या शत्रूलाही मित्र बनवायचे.


उदाहरणार्थ,जेव्हा कोणी वाचक चिडून त्यांना लिहायचा की,तो त्यांच्या अमुक अमुक लेखामधल्या व्यक्त केलेल्या विचारांबरोबर सहमत नाही.तर अल्बर्ट हबार्ड त्या पत्राला उत्तर साधारण या प्रकाराने द्यायचे -


जर विचार केला,तर मी आजच्या तारखेला आपल्या त्या लेखाच्या विचारांच्या बाबतीत पूर्णपणे सहमत नाही आहे.एका दिवसात मी जे लिहितो ते दुसऱ्या दिवशी मलाच स्वतःला चांगले वाटत नाही.मला या विषयी तुमचे विचार ऐकून आनंद झाला.पुढच्या वेळीही तुम्ही या बाजूला याल,तेव्हा आपण भेटून याबाबत सविस्तरपणे चर्चा करू शकतो,तर सद्यः परिस्थितीत मी तुमच्याशी दुरूनच हात मिळवू शकतो.जो माणूस पत्राचं या प्रकारे उत्तर देईल,त्याच्या बाबतीत तुम्ही काय म्हणू शकता ?


जेव्हा आपलं बरोबर असतं,तेव्हा आमचा प्रयत्न हा व्हायला हवा की आम्ही हळुवारपणे आणि कूटनीतीने लोकांना मनवायचा प्रयत्न करू आणि जेव्हा आम्ही चूक असू तेव्हा आपण आपल्या चुकीचा तत्काळ आणि उत्साहानी स्वीकार करायला पाहिजे.या तंत्राचे न फक्त आश्चर्यजनक परिणाम मिळतील;परंतु विश्वास ठेवा,यामुळे आपल्याला स्वतःचा बचाव करण्याच्या तुलनेत जास्त आनंदही मिळेल.


जुनी म्हण आठवा -भांडणांनी तुम्हाला सर्व काही नाही मिळत;पण हार मानून तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं.


जर चूक तुमची असेल,तर तत्काळ आणि पूर्णपणे ती मान्य करा…