* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: जंगलाचा शिष्टाचार..! Etiquette of the jungle..!

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१/६/२४

जंगलाचा शिष्टाचार..! Etiquette of the jungle..!

जंगलांमध्ये एक अलिखित शिष्टाचार असतो.यामध्ये झाडांच्या पेहराव आणि वागणुकीच्या नियमसूची असतात.या नियमांप्रमाणे सगळ्या झाडांना आपला पोशाख आणि सर्वमान्य वागणूक ठेवावी लागते.एक प्रगल्भ,चांगली वर्तणूक असणारा पानझडी वृक्ष असा दिसतो,


त्याचा बुंधा सरळसोट आकाशाकडे झेपलेला असतो आणि त्यांच्या लाकडी तंतूंची मांडणी नियमित व शिस्तबद्ध असते.मूळ सर्व दिशेला सारखीच पसरलेली असतात आणि झाडाखालीच जमिनीत गेलेली असतात. तरुणपणी झाडाच्या फांद्या बुंध्यापासून आडव्या पसरलेल्या आणि आखूड असतात. त्या फांद्या आज वठून गेलेल्या असतात.

त्या जागेवर लाकूड आणि साल धरलेलं असतं आणि त्यामुळे आता प्रौढ झाडाचा बुंधा उंच आणि नितळ दिसू लागतो.झाडाच्या वरच्या भागात नजर टाकली तर त्याची प्रमाणबद्ध वाढ झालेली छत्री दिसते.

वरच्या भागातल्या फांद्या आकाशाच्या दिशेने वाढत असतात. असं वाटतं की झाड आभाळाकडे साकडं मागत आहे.अशाप्रकारे प्रमाणबद्ध वाढ झालेल्या झाडाला दीर्घायू लाभू शकतं. जंगलातल्या सूचीपर्णी वृक्षांनाही हाच शिष्टाचार लागू असतो पण त्यांच्या वरच्या भागातल्या फांद्या साधारण जमिनीला समांतर असतात किंवा जराशा जमिनीकडे वळलेल्या असतात.पण या सगळ्यांचं काय प्रयोजन असेल ? झाडाला सौंदर्याची जाण असेल की काय? ते मला नक्की सांगता येणार नाही पण एक मात्र निश्चित की अशा प्रकारच्या आदर्श वाढीमुळे झाडाला स्थिरता मिळते.प्रत्येक विशालवृक्षाच्या छत्रीला वादळी वारे,अफाट पाऊस आणि बर्फाचे वजन अशा गोष्टींना तोंड द्यावं लागतं.अशा परिस्थितीत उन्मळून पडू नये म्हणून झाडाला मुळांचा भक्कम आधार असावा लागतो.त्यासाठी मुळं जमिनीला आणि दगडांना घट्ट पकडून ठेवतात.पण शेंड्याला तीव्र फटका लागला की तो बुंध्यातून खालपर्यंत पोहोचतो.


काही वेळा याची तीव्रता २२० टनाहून जास्त असू शकते.बुंध्यात कुठेही कमकुवत भाग असला तर तिथे झाड मोडू शकते.पण प्रमाणबद्ध वाढीच्या झाडांना हा फटका सहन करता येतो कारण त्यांच्या शरीरातून धक्क्याचा प्रवाह समान होतो आणि कोणत्याही एका भागाला जास्त धक्का लागत नाही.


जी झाडं त्यांचा अलिखित शिष्टाचार पाळत नाहीत त्यांना मात्र धोका असतो. 


उदाहरणार्थ,एखाद्याचं खोड वाकलेलं असेल तर त्याला साधं उभं राहायलाही त्रास होतो. त्याच्या छत्रीचं वजन बुंध्याकडून समप्रमाणात पेललं जात नाही आणि झाड एका बाजूला झुकतं.त्या बाजूने झाड पडू नये यासाठी त्याला तिथल्या लाकडाची अधिक वाढ करावी लागते.ही वाढ यातल्या वाढीच्या वर्तुळांमध्ये गडद रंगाची दिसते.इथे हवा कमी असते आणि लाकडाची घनता अधिक असते.दुपाखी बुंधा असलेल्या झाडांना तर अधिक धोका असतो.फाटा बनत असताना जणू दोन बुंदे एकत्र वाढत असल्याचा भार झाडावर पडतो.दोन्ही बुंधे आपल्या फांद्या आणि छत्री वाढविण्यात व्यस्त असतात. वादळी वाऱ्यामध्ये दोन्ही बुंधे वेगळ्या दिशेने हलतात आणि झाडाच्या मुख्य बुंध्यावर प्रचंड ताण पडतो.जर फाटा इंग्रजी u अक्षरासारखा असेल तर फार धोका नसतो. पण जर का झाडाचा फाटा अक्षरासारखा असला तर मात्र वादळात झाडावर मोठं संकट येऊ शकतं.हा फाटा सर्वांत कमकुवत जागेवर,म्हणजेच त्याच्या जोडापाशी मोडू शकतो.आणि जर असं झालं तर त्याचा झाडावर प्रचंड ताण पडतो.तुटलेल्या भागावर झाड लगेच लाकूड आणि सालाची वाढ सुरू करतात.पण हे नेहमीच यशस्वी होत नाही.त्याच्या आधी किटाणूंची लागवड झाली की जखमेतून काळं द्रव्य बाहेर येत राहतं.पण त्याहून वाईट म्हणजे तुटलेल्या फाट्यामध्ये पाणी साठून राहतं आणि बुंध्यात जाऊ लागतं.काही काळातच बुंधा तुटून जातो आणि झाड अधिकच अस्थिर होतं.असं झाड फारफार तर एक-दोन दशकं जिवंत राहतं कारण कधी भरून न आलेल्या या जखमेवर सूक्ष्म किटाणूंचं सतत आक्रमण चालूच असतं.जंगलातली काही झाडं तर शिष्टाचाराच्या पूर्ण विरोधातच वागतात.


झाडाच्या इतर भागाने कष्टाने सरळसोट वाढ केल्यानंतरही त्याच्या काही फांद्या केळी सारख्या बाहेर येतात.काही वेळा जंगलाचा एक भाग शिष्टाचार पाळत नाही.याला काय म्हणावं? हा भाग निसर्गाचे नियम धाब्यावर टाकतोय की काय? नक्कीच नाही! कारण हे निसर्गाचं प्रयोजन असतं,ज्यामुळे काही झाडांत अशी वाढ होते.


उदाहरणार्थ,एका विशिष्ट उंचीनंतर डोंगरावर झाड दिसत नाहीत.तिथल्या तीव्र उतारावर वाढणारी झाडंही अशाच प्रकारे शिष्टाचार न पाळून बंडखोरी करतात.या उंचीवर थंडीत बर्फाचे ढीग रचले जातात.

ते अस्थिर असतात कारण उतारावरून अगदी संथ गतीने ते खाली सरकत असतात.हे मोठे ढिगारे जेव्हा सरकतात तेव्हा रोपटी आणि लहान झाडं त्यांच्यामुळे वाकली जातात, तरीही झाडं मरत नाहीत.पण दहा-एक फूट वाढलेल्या झाडांची खोडं मात्र दुखावली जातात.काही वेळेला खोड तुटून जातं.जी तुटत नाहीत ती खोडं तिरकस राहतात. झाडाची वाढ वरच्या टोकातून होत असल्यामुळे वर वाढणारं खोड सरळ आकाशाकडे जाऊ लागतं आणि खालचा भाग मात्र वाकडाच राहतो.बर्फाचा जोर काही वर्ष असाच सुरू राहिला तर झाडाचं खोड एखाद्या तलवारीसारखं वक्राकार दिसू लागतं.काही वर्षांनी जेव्हा खोड धष्टपुष्ट होतं त्यानंतर मात्र बर्फाचा लोड त्याला सावरता येतो पण तोपर्यंत बुंध्याचा खालचा भाग तलवारी सारखाच असतो आणि वरचा मात्र सरळसोट.बर्फ नसलेल्या डोंगर उतारावरच्या झाडांनाही अशाच प्रकारचा ताण पडू शकतो.इथे मातीच काही वेळा खाली सरकत असते.यामुळे झाडं थोडी खाली सरकतात आणि तशीच सरळ आकाशाकडे वाढू लागतात.अशी खूप बदल झालेली झाडं अलास्का आणि सायबेरियात दिसतात. 


जागतिक तापमान वाढीमुळे इथला बर्फ वितळत आहे.इथली माती भुसभुशीत असल्यामुळे झाडं अस्थिर होतात.प्रत्येक झाड वेगळ्या दिशेला ढकललं गेलं असल्यामुळे इथली जंगलं कशीही वाढलेली दिसतात.शास्त्रज्ञ यांना 'दारूडी जंगलं' म्हणतात.

जंगलाच्या कडेला वाढणाऱ्या झाडांसाठी मात्र नियम थोडे शिथिल केलेले असतात.इथे सूर्यप्रकाश बाजूनेही येऊ शकतो.कारण शेजारी मोकळी जागा किंवा एखादा तलाव असतो जिथं झाडांनी सूर्यप्रकाश अडलेला नसतो. 


छोट्या झाडांना आणि रोपट्यांना त्या दिशेने वाढता येतं.पानझडी वृक्ष याचा नक्कीच फायदा करून घेतात.जर आपल्या मुख्य खोडाची वाढ जमिनीला जवळजवळ समांतर केली तर त्यांना आपला पसारा तीस फुटांपर्यंत वाढवता येतो.अर्थातच जोरदार बर्फवृष्टीमध्ये फांद्या मोडण्याची त्यांना भीती असतेच.

कारण फांद्यांच्या टोकाला बर्फाचं वजन पडतं आणि फांदीचा तरफा होऊन तुटण्याची शक्यता वाढते.

तरीही अल्पायुषी असूनही सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेमुळे आपली प्रजा वाढवणं झाडाला शक्य होतं.पानझडी वृक्ष जसे सूर्यप्रकाशाकडे झेप घेतात तसे मात्र सूचीपर्णी वृक्ष अजिबात करत नाहीत.

त्यांची वाढ सरळ तरी होते नाहीतर खुंटलेली राहते.

गुरुत्वाकर्षणाच्या विरोधातच त्यांची वाढ चालू असते.त्यामुळे मोठी झाडं सरळसोट वाढतात आणि स्थिरावतात.त्यांच्या काही फांद्या जमिनीला समांतर फक्त जाणवतील किंवा दिसतील एवढ्याच जाडीचे बुंधे घेऊन पसरलेले असतात,सूर्यप्रकाश शोधण्याच्या प्रयत्नात ! पण त्यांना तेवढीच काय ती परवानगी असते.याचा अपवाद म्हणजे पाईन झाड. आपला सगळा घेर ते बेफिकिरीने सूर्यप्रकाशाकडे वाढवतात.

कदाचित त्यामुळेच सूचीपर्णी जंगलात पाईनची झाडं सर्वाधिक तुटलेली दिसतात.


१७.०३.२४ या लेखातील पुढील लेख...



..मित्र माधव गव्हाणे (सॉक्रेटिस) माझ्यासाठी सावलीचं झाडं..!