* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: वैवाहिक दोष रेषा-Marital fault lines

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१३/९/२४

वैवाहिक दोष रेषा-Marital fault lines

पती : ड्राय क्लिनिंगला दिलेले माझे कपडे आणलेस?


पत्नी : (वेडावून दाखवत) म्हणे ड्रायक्लिनिंगला दिलेले माझे कपडे आणलेस."तूच जा आणि तुझी कामं कर.मला काय तुझी मोलकरीण समजतोस?"


पती : नाहीच नाही;कारण तू मोलकरीण असतीस तर तुलाच माझे कपडे धुता आले असते.


जर हा दूरदर्शनवरील एखाद्या मालिकेतील संवाद असता तर गंमत वाटली असती;परंतु दुर्दैवाने ही दाहक वादावादी एका जोडप्यातील आहे ज्यांनी पुढील काही वर्षांत घटस्फोट घेतला आणि त्यात आश्चर्य काहीच नाही.


वॉशिंग्टन विद्यापीठाचे मानसशास्त्रज्ञ जॉन गॉटमनचा यांच्या एका प्रयोगशाळेत वरील संभाषण घडले आहे.

जॉन गॉटमन यांनी पती-पत्नीला एकत्र बांधून ठेवणारे भावबंध कोणते आणि लग्नविच्छेद घडवून आणणाऱ्या या नात्याला गंज चढवणाऱ्या भावना कोणत्या 

याविषयी त्यांच्या प्रयोगशाळेत अभ्यास केला.


अनेक जोडप्यांच्या संभाषणाची हिडिओ टेप तयार करून या प्रयोगशाळेत तिच्यावर  सखोल विश्लेषण करून त्या संभाषणातील भावनांचा अंदाज घेतला जातो.हा अभ्यास हेच सांगतो कि,विवाहबंधन टिकवून ठेवण्यात भावनिक बुद्धिमत्तेची अत्यंत महत्वाची भूमिका असते.


गेल्या वीस वर्षात गॉटमनने दोनशेपेक्षा जास्त जोडप्यांच्या जीवनातील चढ-उतारांचा अभ्यास केला.त्यापैकी काही जोडपी नवविवाहित होती, तर काहींच्या लग्नाला दशक उलटून गेली होती. वैवाहिक जीवनातील या परस्पर आंतरक्रियांचा अभ्यास इतक्या अचूकपणे केला आहे की, त्यांच्या प्रयोगशाळेत अभ्यास केल्या जाणाऱ्या एका जोडप्याच्या सुरुवातीला कपडे धुण्याच्या बाबतीत दिल्या गेलेल्या पती-पत्नीच्या संभाषणासारखे संवाद साधणाऱ्या बाबतीत अंदाज वर्तवला होता की,हे जोडपे पुढील तीन वर्षात घटस्फोट घेईल अशी ९४ टक्के शक्यता आहे। वैवाहिक जीवनाच्या अभ्यासात इतकी अचूकता अजून तरी ऐकण्यात आलेली नाही!


खोलवर जाऊन कसून अभ्यास करण्याच्या पद्धती वापरून त्यांनी परिश्रमपूर्वक केलेल्या विश्लेषणाच्या बळावर त्यांच्या पूर्वकथनाला ही अचूकता येऊ शकली.

विवाहित जोडप्यांच्या संभाषणाची व्हिडिओ टेप तयार होत असताना त्यांच्यात होणाऱ्या अत्यंत सूक्ष्म,

शारीरिक बदलाची नोंद विद्युत सेन्सॉर घेत असतात.

पॉल एकमनने विकसित केलेल्या भावना ओळखण्याच्या पद्धतीचा वापर करून त्यांच्या चेहऱ्यावर दर सेकंदाला व्यक्त होणाऱ्या भाव-भावनांचे विश्लेषण करून ते अनुभव असलेल्या अतिसूक्ष्म आणि क्षणोक्षणी बदलणारा भावनांचा शोध घेतला जातो. 


पती-पत्नीत झालेल्या प्रत्येक संभाषणानंतर ती दोघ एकट्याने प्रयोगशाळेत येऊन त्यांच्या संभाषणाची व्हिडिओ टेप पाहतात आणि वादावादीचा प्रसंगी त्यांच्या डोक्यात कोणते विचार चालले होते याचे रहस्य उघड करतात. परिणामी शरीराच्या अवयवांच्या क्ष-किरण चित्राप्रमाणे वैवाहिक जीवनाचे क्ष-किरण चित्र (X Ray) तयार होते.


गॉटमनला दिसून आले की,लग्नजीवनाला धोका निर्माण झाल्याचे सुचवणारा प्राथमिक संकेत म्हणजे एकमेकांची केलेली कठोर टीका.निरोगी लग्नजीवनात पती-पत्नी परस्परांबद्दलच्या तक्रारी मोकळ्या मनाने मांडतात;परंतु रागाच्या भरात या तक्रारी विघातक स्वरूप घेऊ लागतात


जसे जोडीदाराच्या चारित्र्यावर वार करणे.उदा.पामेला आपल्या मुलीला घेऊन चपलांच्या दुकानात गेली तर तिचा नवरा टॉम पुस्तकांच्या दुकानात शिरला.एका तासानंतर दोघांनी आपापली खरेदी आटपून पोस्ट ऑफिससमोर भेटायचे आणि तिथून सिनेमा पहायला जायचे असे त्यांचे ठरले होते.पामेला वेळेवर पोहोचली; परंतु टॉमचा पत्ता नव्हता.पामेलाने आपल्या मुलीजवळ तक्रार केली,"हा मेलाय कुठे? दहा मिनिटात सिनेमा सुरू होईल.तुझ्या वडिलांना काहीतरी निमित्तच हवे असते." दहा मिनिटांनी टॉम परतला.एक मित्र भेटला म्हणून तो आनंदात होता. उशीर झाल्याबद्दल त्याने पामेलाची माफीही मागितली; परंतु पामेला भडकून वाकड्यात शिरत म्हणाली," ठीक आहे,तुझ्यात तेवढी ताकद आहे की,आपण काहीही ठरवले तरी तसे होऊ द्यायचे नाही.तू दुसऱ्यांचा विचारच करीत नाहीस.पक्का स्वार्थी आहेस!"


पामेलाची तक्रार त्याहून जास्त आहे.तिची टीका त्याच्या वागण्याबद्दल नाही तर ती सरळ त्याच्या चारित्र्यावर वार करीत एक व्यक्ती म्हणून त्याच्यावर टीका करते.खरेतर टॉमने माफी मागितली होती;पण त्याच्याकडून झालेल्या या क्षुल्लक चुकीबद्दल पामेलाने त्याच्यावर अविचारी आणि स्वार्थीपणाचा शिक्का मारला. अनेक जोडप्यांच्या बाबतीत असे घडते की, जोडीदाराने जे 'केले' आहे,

त्याबद्दल तक्रार करताना त्याच्या वागण्यावर नव्हे तर त्या व्यक्तीवरच ठपका ठेवला जातो.त्याच्या वागण्याबद्दल केल्या गेलेल्या तर्कनिष्ठ तक्रारीपेक्षा अशी दाहक व्यक्तिगत टीका तीव्र भावनिक परिणाम करणारी,

दुखावणारी असते. त्यामुळे साहजिकच आपली तक्रार आपला जोडीदार ऐकत नाही किंवा तिच्याकडे दुर्लक्ष करीत आहे असे आपल्या जोडीदारावर प्रत्यक्ष वार करणाऱ्याला वाटू शकते.


तक्रार आणि वैयक्तिक टीका यातील फरक ओळखणे सोपे आहे.पत्नी जेव्हा तक्रार करते तेव्हा ती नेमकं सांगते की,नवऱ्याच्या या गोष्टींमुळे तिला त्रास होत आहे.ती नवऱ्याची नाही तर त्याच्या वागण्याची टीका करते आणि तिला काय वाटले ते कळवते :"धोब्याकडून माझे कपडे आणायला तू विसरलास तेव्हा मला असे वाटले की,तुला माझी पर्वाच नाही."भावनांची ही अभिव्यक्ती मूलभूत भावनिक बुद्धिमत्तेला साजेशी आहे;परंतु पतीवर वैयक्तिक टीका करताना तिच्या कुरबुरीत पतीवर मोघम टीका करतेःतू नेहमीच असा स्वार्थी आणि बेपर्वा आहेस.तू काही बरोबर करशील असा भरोसाच मी बाळगू नये याचाच हा पुरावा आहे." अशा टीकेमुळे त्या व्यक्तीला लाजिरवाणे वाटते, आपल्या जोडीदाराला आपण आवडत नाही, आपल्याला दोषी ठरवले जाते,आपल्यात कमतरता आहे अशी भावना तिच्यात निर्माण होतात.या सगळ्यांच्या परिणामी ती व्यक्ती यापुढे स्वतंत्र सुधारणा घडवून आणील अशी शक्यता तर अजिबात नसतेच उत्तर आता ती स्वतःला वाचवण्याचा,स्वतःचे समर्थन करण्याचा प्रयत्न करू लागते.जेव्हा अशी वैयक्तिक टीका तिरस्काराच्या विध्वंसक भावनेसह केली जाते तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते.तिरस्काराबरोबर राग आपोआपच येतो.हा राग केवल शब्दांतूनच व्यक्त होतो असे नाही तर आवाजालाही धार चढते आणि रागीट अभिव्यक्त केली जाते.मग रागाच्या भरात एकमेकांची कुचेष्टा केली जाते,

अपशब्द वापरून टिंगल केली जाते.शिवाय ज्या देहबोलीसह हे शब्द उच्चारले जातात तीदेखील तितकीच दुखवणारी असते. विशेषतःतुच्छतादर्शक आविर्भावात नाक मुरडणे, किती वीट आला आहे किंवा घृणा वाटत आहे हे दाखवून देणारे मुडपलेले ओठ किंवा "अरे देवा!" असा भाव व्यक्त करीत डोळे फिरवणे असे हावभाव शब्दांपेक्षा जहाल परिणाम करतात.


डोळे आभाळाकडे वळवत ओठांची महिरप सहसा डाव्या बाजूला मुडपली जाते,तेव्हा त्यातून तिरस्कार,तुच्छता सहज झळकते.जेव्हा एका जोडीदाराच्या चेहऱ्यावर हे हावभाव येतात तेव्हा दुसऱ्या जोडीदाराला त्याचा गर्भितार्थ लक्षात येऊन त्याच्या हृदयाचे दोन किंवा तीन ठोके दर मिनिटाला वाढतात.या छुप्या संवादाची किंमत शरीराला मोजावी वा लागते.गॉटमनला आढळून आले आहे की,जर नवरा नियमितपणे असा तिरस्कार व्यक्त करीत असेल तर पत्नीला स्वास्थ्याशी निगडित नाना समस्या सतावतात.यामध्ये वारंवार ती सर्दी- खोकला होण्यापासून पोटाचे पचनासंबंधी,

आतड्याच्या संसर्गासंबंधी,यकृतासंबंधी अनेक आजारांचा समावेश होतो.जेव्हा पत्नी तिरस्काराशी मिळता जुळता,वीट आल्याचा,घृणेचा हावभाव पंधरा मिनिटांच्या संभाषणात चारदा किंवा त्यापेक्षा जास्त वेळेला व्यक्त करते तेव्हा त्याला या गोष्टीचे मूक चिन्हे समजावे की, येत्या चार वर्षांत हे जोडपे विभक्त होण्याची शक्यता आहे.अर्थातच घृणा किंवा तिरस्कार कधीतरी व्यक्त होत असेल तर त्यामुळे लग्नजीवनाला हानी पोहोचणार नाही.अर्थात असे भावनिक गोळीबार व चकमकी धूम्रपान आणि रक्तातील वाढलेल्या चरबीच्या पातळीसारखे असतात.जसे दीर्घकाळ हे दोन्ही घटक तीव्रपणे अस्तित्वात असले तर जसा हृदयरोगाचा धोका संभवतो;तसेच घृणा व तिरस्कार तीव्र स्वरूपात असतील आणि वारंवार व्यक्त होत असतील तर मात्र ते सहजीवनाला मारक ठरू शकते.


घटस्फोटाच्या वाटेवरील जोडप्यांसाठी यापैकी एखादा घटक वाढत्या दुःखाचा अंदाज वर्तवू शकतो.टीका करण्याची, घृणा आणि तिरस्कार व्यक्त करण्याची सवय धोक्याचे चिन्ह ठरते.या गोष्टी असे सुचवतात की,एका जोडीदाराने दुसऱ्याच्या बाबतीत मूकपणे वाइटात वाईट निर्णय घेऊन टाकला आहे.पती किंवा पत्नीला वाटते की,आपल्या जोडीदाराला सतत शिक्षा करायला हवी.

अशा नकारात्मक आणि शत्रुत्वाच्या विचारसरणीमुळे स्वाभाविक आहे की,त्या व्यक्तीचा जोडीदार शाब्दिक हल्ला चढवतो किंवा त्याच्या ( इमोशनल इंटेलिजन्स,

डॅनिअल गोलमन,अनुवाद-प्रा.पुष्पा ठक्कर,साकेत प्रकाशन.)जोडीदाराने केलेल्या वाराचा प्रतिवाराने बदला घ्यायला सज्ज होतो.अशा वादावादीत समोरची व्यक्ती एक तर लढाईचा पवित्रा घेते किंवा मुकाट्याने माघार घेते.

आपल्यावर झालेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर या दोनपैकी एका मार्गाने देते. 


'अरे' ला 'कारे' म्हणणे हा मार्ग उघडच असतो. रागाने व्यक्ती जिभेचे फटकारे मारते.हा मार्ग जोडप्याने स्वीकारला म्हणजे त्याचा शेवट निरर्थक आरडा-ओरडा करण्यात होतो.दुसरा पर्याय,तिथून दूर जाणे,पळ काढणे;परंतु जेव्हा व्यक्ती माघार घेत स्वतःभोवती अबोल्याची अभेद्य भिंत उभी करते तेव्हा मात्र भांडण्यापेक्षा सौम्य वाटणारा हा पर्याय अपायकारकच ठरतो.अबोल्याच्या द‌गडी किल्ल्यात स्वतःला कोंडून घेणे हा अंतिम बचाव असतो.अशी व्यक्ती संभाषणातून अंग काढून घेत भावनाशून्य बनून जाते.प्रतिक्रियेच्या रूपात देते केवळ थंड, थिजलेले मौन.ही परिस्थिती समोरच्या व्यक्तीला अस्वस्थ करून टाकणारा जबरदस्त संदेश देते. तिची निर्विकार वृत्ती म्हणजे उष्माहीन अंतर, श्रेष्ठता आणि नावड यांचे मिश्रण असते.ज्यांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ लागल्या आहेत अशा जोडप्यांच्या बाबतीत मौनाची ही दगडी भिंत रचलेली दिसून येते.जेव्हा पत्नी पतीशी तिरस्काराने वागून त्याची टीका करते तेव्हा ८५ टक्के प्रकरणात पती स्वतःभोवती अशी मौन थंडपणाची अभेद्य भिंत रचताना दिसतो.


 बाप्पा मोरया


बाबा गणपती घेऊन आला,आई त्याच्या पायावर दूधपाणी घालायला एक पाऊल बाहेर आली आणि वाऱ्याने आपलं काम केलं…!.


धडामकन दार लागलं…!


गणपती सकट आई बाबा घराबाहेर...आणि घरात सहा महिन्याची मनूडी एकटी!


नुकती आंघोळ ऊरकून दुपट्यावर शांत निजलेली दाराच्या आवाजाने ती दचकली, आणि तिने टाहो फोडला.विघ्नहर्ता हातात असताना घरावर विघ्न आलं…!


तशी मनुडी खरंच शहाणी होती.पण,कधी रडली तर वेळीच शांत करावी लागायची.नाहीतर तिला श्वास कोंडून धरायची खोड होती.


चौदाव्या मजल्यावर घर होतं.


ब्रह्मांडाचा नायक हातात असताना,दोघांना त्याचा विसर पडला.दोघं फक्त मनुडीचा टाहो ऐकत होते.आई तर रडायलाच लागली.बाबाचे तर मुर्ती धरून हात भरून आले होते. रावणासारखी त्याची अवस्था झाली.शास्त्राच्या नावाखाली अर्धवट माहीती होती,मुर्ती आणली की स्थानापन्न करायच्या आधी खाली ठेवायची नसते,असं त्याने ऐकलं होतं.विषाची परीक्षा कोण घेणार? तुची माता, तुची पिता, तुची बंधू , तुची सखा...म्हणताना त्याच्याच बद्दल इतकी भिती...


भिती कसली? तर तो कोपेल याची.क्षणात सगळं आठवलं.घरच्यांच्या मनाविरूद्ध केलेलं लग्न,सगळ्यांशी तोडलेले संबंध…!


दोघं दोघंच जगताना कधी शेजारीही डोकाऊन पाहीलं नव्हतं.त्यात शेजारच्या फ्लँटमधे अठरा पगडचे पेअींग गेस्ट राहतात म्हटल्यावर बघायचा प्रश्नच नव्हता.

पण,आईचं रडणं ऐकल्यावर आपसूक शेजारचं दार ऊघडलं गेलं.सहा सात मुलांचा घोळका बाहेर आला.


व्हाँट हँपंडचा गलका झाला.एकाने पटकन बाबाच्या हातातली मुर्ती जबाबदारीने आपल्या हातात घेतली.

बावचळून गेलेल्या बाबाच्या ते लक्षातही आलं नाही.थकल्यासारखा तो मटकन खालीच बसला आणि पुढच्या क्षणी त्याच्या नकळत अनावर होत त्याने आपल्या मोठ्या भावाला फोन केला.आवाजावरून भावाने त्याची अवस्था ओळखली.तो फोनवर बोलत असताना शेजारच्या मुलांना कळलं.त्यानी आधी दोघांना घरात बोलावलं.बघतात तर त्यांच्या घरीही गणपति विराजमान होता.सगळे दोघांना त्यांच्या परीने धीर देत होते.


एका चुणचणीत मुलाने विचारलं,"आपके बेडरूम की विंडो खुली है क्या?


चौदावा मजला....!


"विंडो ओपन असून काय ऊपयोग?" ती म्हणाली.


"दरवाजा तोड देते है"


 पण ते ही लगेच होणारं काम नव्हतं.


आईशी बोलत बसायच्या आधीच दोघांनी त्यांच्या गॅलरीतून ढांग टाकली होती…!


चौदाव्या मजल्यावर थरारक धाडस दाखवत ती दोघं पॅरेफीटवरून मनुडीच्या बेडरूमपाशी पोहोचली.

एकमेकाला हात देत दोघं खिडकीतून आत गेली.बघतात तर मनुडी कोणीतरी खेळवत असल्या सारखी खेळत होती खिदळत होती....! मनूडीच्या रडण्याचा आवाज थांबल्यावर आई बाबाला वाटत होतं,मनुडीने डोळे फिरवले असतील... मन चिंती ते वैरी नं चिंती म्हणतात तसा अनुभव ते घेत होते.मनुडी बाकी कशाला नाही...पण एकटं रहायला घाबरते हे त्यांच्या लक्षात आलं होतं...


भोवती माणसांचा वावर असेल तर तासंतास मुठी चोखत ती एकटी खेळत असायची.पण, जरा जरी एकटेपणाची जाणीव झाली,तर भोकाड पसरून ती आपली दखल घ्यायला लावायची.म्हणून तर आई घरी राहूनच कामाचा व्याप सांभाळत होती.बाबापण मनूडीच्या ओढीनं घरी धाव घेत होता शिवाय एक मावशी बाईही मनुडीसाठी ठेवली होती.


सकाळी येउून ती रात्री जात असे.पण,नेमकी तिनेसुद्धा दोन दिवस गणपतीची सुट्टी मागितली होती.या दोन्ही मुलांनी आधी घरात प्रवेश मिळवून मनुडीला उचलली आणि धाडकन बंद झालेलं दार ततपरतेनं उघडलं...

त्यांच्याकडेवर खुदू खुदू हसणाऱ्या मनुडीला बघून आई बाबाला काय वाटलं हे शब्दात सांगत बसायचा अट्टाहास मी करणार नाही…!


पण,मनूडी एकटी असतानाही खेळत होती,यावर दोघांचा विश्वास बसेना.त्यांना काय माहीत ती एकटी होती? की कोणी गब्दूल पाहूणा मनुडीशी लडीवाळपणे खेळत होता? तो दिसायला भाग्य हवं किंवा ते कळायला तेवढीच श्रद्धा…!


इतक्यात याच्या फोनमुळे मोठा भाऊ मोठेपणाने नात्याचा मान राखत आई बाबांसह घरी पोहोचला…! दूरावा असा कुठे राहीलाच नाही. मनुडीला बघून आजी आबांना गहीवरून आलं. तो मन मिलाप बघून शेजारच्या सडाफटींग मुलानाही उचंबळून आलं.मग मोठ्याने पूजा सांगितली धाकट्याने मनोभावे पूजा केली. दणक्यात आरती झाली.मोदकांची दिलेली आँर्डर ऐनवेळी वाढवण्यात आली आणि मग त्या गजाननासमोर भलीमोठी पंगत जेवायला बसली...प्रत्येकजण आपआपल्या भाषाबोली सहीत त्यात सहभागी झाला होता.मनुडीच्या आनंदाला तर ऊत आला होता.


लहान मूलं म्हणजे देवाचंच रूप म्हणतात.हे खर मानलं,

तर मनुडीच्याच रूपाने तो विघ्नहर्ता खुदू खुदू हसत होता.सार्वजनीक गणपतीची मूळ संकल्पना आणि मुख्य उद्देश हाच असेल नाही?


गणपती बाप्पा मोरया