०१.११.२४ या लेखातील शेवटचा भाग…!
लंकेमधे अचल असे असलेले तारे पश्चिम दिशेस जाताना दिसतात.' किती स्पष्ट शब्दात समजावलंय..! लंकेचा संदर्भ इतकाच की,पूर्वी,म्हणजे ग्रीनविच रेखा ठरवण्यापूर्वी,
भारतीयांचे असे अक्षांश - रेखांश होते,आणि त्यातील विषुववृत्त लंकेवरून जात होते.
पुढे तेराव्या शतकात ज्ञानेश्वर माउली (१२७५ - १२९६) अगदी सहजपणे लिहून जातात.
अथवा नावे हन जो रिगे । तो थडियेचे रुख जातां देखे वेगें ।
तेचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ।।
- श्री ज्ञानेश्वरी ४-९७
आणि उदोअस्ताचेनि प्रमाणें,जैसे न चलतां सूर्याचें चालणें ।
तैसें नैष्कर्म्यत्व जाणे,कर्मीचिअसतां ।।
- श्री ज्ञानेश्वरी ४-९९
ह्या ओव्या म्हणजे आर्यभट्टने दिलेल्या उदाहरणाचे सरळ सरळ प्राकृत स्वरूप आहे.याचाच दुसरा अर्थ, मुस्लीम आक्रमक भारतात येईपर्यंत जी शिक्षणप्रणाली आपल्या देशात होती,त्या प्रणालीत ही सर्व माहिती अंतर्भूत असणार.
खगोलशास्त्राचे हे 'बेसिक सिद्धांत' त्या काळातल्या विद्यार्थ्यांना नक्कीच माहीत असणार.आणि म्हणूनच ज्ञानेश्वरसुद्धा अगदी सहजपणे हा सिद्धांत लिहून जातात.
याचाच दुसरा अर्थ असा की,जे ज्ञान आम्हा भारतीयांना अगदी सहज रूपाने,हजारो वर्षांपासून होते,तेच ज्ञान पंधराव्या शतकात कोपर्निकसने मांडले,आणि साऱ्या जगाने 'जणू काही कोपर्निकसने मोठा थोरला शोध लावला आहे.
अशा स्वरूपात स्वीकार केले.आणि भारतातल्या पिढ्यान् पिढ्या,'हा शोध कोपर्निकसने लावला असं शिकू लागल्या,शिकवू लागल्या..!
किती मोठं दुर्दैव आपलं...!
हे जसं सूर्याच्या केंद्रीय स्थानाबद्दल आहे,तसंच सूर्यप्रकाशाच्या गतीबद्दल ही आहे.
आज तिसरी - चौथीतला मुलगाही शिकतो की, प्रकाशाच्या गतीच शोध डेनिश खगोलशास्त्रज्ञ ओलेरोमर (Olaus Roemer) याने सन १६७ मध्ये अर्थात आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी राजे सिंहासनाधीश्व झाल्यानंतर दोनच वर्षांनी,लावला. अर्थात अगदी अलीकडे.
मात्र खरी परिस्थिती काय आहे..?
युनेस्कोच्या अधिकृत अहवालात म्हटले गेल्याप्रमाणे,
जगातील सर्वांत प्राचीन ग्रंथ हा ऋग्वेद आहे.तो इसवी सनापूर्वी किमान पाच ते सहा हजान वर्षांपूर्वी लिहिला गेला असावा.तर ह्या ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलात पन्नासाव्या सूक्तात,चौथ्या श्लोकात काय म्हटले आहे.
तरणिर्विश्वदर्शतो तरणिर्विश्वदर्शतो ज्योतिष्कृदसि सूर्य ।
विश्वमा भासि रोचनम् ।। ऋग्वेद १.५०.४.
अर्थात हे सूर्या,गतीनं भारलेला (तीव्रगामी) तू, सर्वांना दिसतोस.तू प्रकाशाचा स्रोत आहेस.तू साऱ्या जगाला प्रकाशमान करतोस.पुढे चौदाव्या शतकात,विजयनगर साम्राज्यातील सायणाचार्य (१३३५- १३८७) ह्या शास्त्रज्ञाने ऋग्वेदाच्या ह्या श्लोकाची मीमांसा करताना लिहिले-
तथा च स्मर्यते योजनानां सहस्रं द्वे द्वे शते द्वे च योजने एकेन निमिषार्धेन क्रममाण नमोऽस्तुते ।।
- सायण ऋग्वेद भाष्य १.५०.४
अर्थात
प्रकाशाने पार पडलेले अंतर १ योजन -
२,२०२ योजने (द्वे द्वे शते द्वे..) ९ मैल,११० यार्ड्स ९.०६२५ मैल.
अर्थात प्रकाशाचे अंतर - ९.०६२५ द २२०२ २१,१४४.७०५ मैल.
घेतलेला वेळ - अर्धा निमिष = १/८.७५ ०.११४२८ सेकंद
अर्थात प्रकाशाचा वेग आधुनिक गणनेनुसार प्रकाशाचा वेग - १८५,०२५.८१३ मैल / सेकंद १८६,२८२.३९७ मैल / सेकंद
म्हणजे लक्षात घ्या,ओले रोमरच्या किमान पाच हजार वर्षं आधी आपल्याला सूर्यप्रकाशाच्या वेगाची कल्पना होती.या संदर्भातील काही सूत्रं आधीही असतील.पण आज ती उपलब्ध नाहीत. आज आपल्याजवळ आहे तो सायणाचार्य यांनी लिहिलेल्या ऋग्वेदावरील मीमांसेच्या रूपात असलेला खणखणीत पुरावा.ओले रोमरच्या तीनशे वर्षां आधी मोजलेला प्रकाशाचा वेग..!
आणि तरीही आपण पिढ्यान् पिढ्या शिकत राहणार की प्रकाशाच्या - गतीचा शोध हा युरोपियन शास्त्रज्ञ ओले रोमरने लावला..?
असं किती बाबतीत आपण म्हणत राहणार..?
ग्रहण ही संकल्पना कितीतरी जुनी.चिनी वैज्ञानिकांनी २,६०० वर्षांत एकूण ९०० सूर्यग्रहण आणि ६०० चंद्रग्रहण झाल्याची नोंद ठेवली आहे. मात्र ह्या ग्रहणाचं कारण कोणीही सांगू शकत नव्हतं.
पाचव्या शतकात आर्यभटने अगदी स्पष्टपणे सांगितलं की
छादयति शशी सूर्य शशिनं महती च भूच्छाया ।। ३७ ।। - गोलपाद,आर्यभटीय
अर्थात पृथ्वीची सावली चंद्राला झाकोळते तेंव्हा चंद्रग्रहण होते.अगदी आठ हजार वर्षांपूर्वीच्या ऋग्वेदात चंद्राला उद्देशून म्हटले आहे.
ॐ आयं गौ : पृथ्विरक्रमीद सदन्नमातरं पुर : पितरञ्च प्रयन्त्स्वः
ॐ भू : गौतमाय नम : । गौतमायावाहयामि स्थापयामि ।। ४३
अर्थात पृथ्वीचा उपग्रह असलेला चंद्र,हा आपल्या मातृग्रहाभोवती फिरतो,जो त्याच्या (पृथ्वीच्या) प्रकाशमान पितृग्रहाभोवती फिरत असतो.अजून किती स्पष्ट हवं..? लक्षात घ्या,आजपासून सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांना हे माहीत होतं की,पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो..! याच्या हजारो वर्षांनंतर उर्वरित जगाला,आणि विशेष करून पाश्चात्त्य जगाला हे ज्ञान मिळालं.
यात महत्त्वाचं म्हणजे हे ज्ञान आपल्या देशात फार पूर्वीपासून होतं.त्यामुळे ह्या गोष्टी माहीत आहेत, म्हणजे आपल्याला फार कांही मोठं ज्ञानाचं भांडार माहीत आहे,असा अभिनिवेश कुठेही नव्हता. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर किंवा गोस्वामी तुलसीदास अशी महत्त्वाची माहिती सहजगत्या लिहून जातात..!
कित्येक वर्षापासून फटाके न वाजवणारी दोन गावे….!
तमिळनाडूतील तिरुपत्तूर जवळील वेतांगुडीपट्टी आणि पेरिया कोल्लुकुडीपट्टी या दोन गावातील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून फटाके न फोडता दिवाळी साजरी करतात. कारण...
त्यांना पशू-पक्ष्यांना दुखवायचे नसते.
या गावातील रहिवाशी म्हणतात..!
आम्ही या गावात पक्ष्यांसाठीच फटाके फोडत नाही. पक्षी हे आपल्या पाळीव प्राण्यासारखे आहेत म्हणून आम्ही फटाके फोडणे पूर्णपणे टाळतो.आमच्या मुलांनाही पक्ष्यासाठी फटाके फोडण्यापासून दूर ठेवले आहे.कित्येक वर्षे झाली आहेत,आम्ही कधीही फटाके वाजवून दिवाळी साजरी केलेली नाही.
त्यामुळे आज...वेतांगुडी हे पक्ष्यांचे अभयारण्य झाले आहे.हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास झाले आहे.हे पक्षी स्वित्झर्लंड,रशिया,इंडोनेशिया आणि श्रीलंका येथून उड्डाण करतात.या अभयारण्यात वर्षाला १५,००० पक्षी आकर्षित होतात.जवळपास अर्ध्या शतकापासून स्थलांतरित पक्ष्यांच्या २०० हून अधिक प्रजातींसाठी सुरक्षित आणि संरक्षित प्रजनन स्थळांपैकी ही गावे व तेथील अभयारण्य मानले गेले आहे.
हे पक्षी अनेक वर्षांपासून वेतांगुडी,पेरिया कोल्लुकुडी पट्टी आणि चिन्ना कोल्लुकुडी पट्टी येथील सिंचन तलावांवर येत असतात.
फटाक्यांमुळे त्यांच्या मनात भीती निर्माण होऊन त्यांच्या येण्यावर परिणाम होऊ लागला.तेव्हापासून स्थानिक ग्रामस्थ फटाके
विरहित उत्सव साजरा करू लागले.
आता पशू-पक्षी येथे शांततेत राहतात.
ग्रामस्थ म्हणतात, आम्ही दिवाळीतच नव्हे,तर इतर सण,उत्सव,
लग्न यामध्येही फटाके फोडत नाही... आम्ही फटाके फोडणे टाळतो,कारण ते पशू-पक्ष्यांना त्रास देतात.इथे येणार्या पक्ष्यांना आम्ही आपली घरची मुलं म्हणून पाहतो.
ग्रामस्थांच्या या निर्णयाचे कौतुक म्हणून वनविभागाच्या वतीने प्रत्येक दिवाळीला गावांतील रहिवाशांना अर्धा किलो मिठाईचे वाटप केले जात असते.
हे अभयारण्य मदुराईपासून ५१ किलोमीटर अंतरावर आहे.
मागील रविवारी कोलकत्ता-इडनगार्डन्स येथे सामन्यानंतर झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे पोलीस ड्युटीवरील घोड्याचा झालेला मृत्यु अनेक संवेदनशील मनांना हेलावून गेला.
हवाप्रदूषण - ध्वनिप्रदूषण याचे चटके मानवाला आता बसू लागले आहेत.तरीही काहीजण अजूनही डोळ्यावर घोड्यासारखी झापडे लावून आहेत.
अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. आपली संस्कृती-परंपरा यांचे जतन करणे महत्त्वपूर्ण आहेच.पण आनंदाचा हा सण साजरा करताना---
निसर्गाचा वरदहस्त असलेल्या आपल्या देशात ध्वनिप्रदूषण,
हवाप्रदूषण वाढवून,आपण आपल्याच भावी पिढीला अंधारात ढकलत आहोत याचे भानही येणे गरजेचे आहे आणि.... सोबत फटाक्यांना ठामपणे नाही म्हणण्याची ठोस कृती.
वेतांगुडीपट्टी आणि पेरिया कोल्लुकुडीपट्टी या गावातील सुजाण ग्रामस्थांप्रमाणे.
आपण ही आपलं गाव प्रदूषण मुक्त करूया.., फटाके फोडू
नका…! तुमचा क्षणिक आनंद कुणाचा जीव घेतो याचे भान राखु या ....मी माझ्या घरामध्ये गेली सात वर्षे फटाके न उडवता आनंदात दिवाळी साजरी करतो आणि दिवाळीच्या सात्विक आनंद घेतो आपणही घ्या ही नम्र विनंती.
लेखन व संकलन : डॉ.दिपक शेटे,महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त,गणितायन लॅब निर्मिती.