live
मुख्यपृष्ठ
३१/१०/२५
तुझं की माझं ? Yours or mine?
२९/१०/२५
शुक्राची चांदणी / Moonlight of Venus
२७/१०/२५
मी आस्तिक का नाही / Why I am not a believer
२५/१०/२५
सामने,युद्ध,देव ! / Front,war,God !
पण पायवाट-वारुळाचं सैन्य अजूनही बरचसं शाबूत होतं.एकूण प्रजेपैकी पंधराएक टक्के सैनिक होते. मजबूत चिलखती पायदळ होतं,हे.साधारण कामकरी मुंगीच्या दुप्पट आकार असायचा,
सैनिकांचा.सैनिक मुंग्यांचा बाह्य सांगाडा जाड आणि चिवट असायचा. त्यात खड्डे आणि उंचवटे घडून मजबुती आणिकच वाढलेली असे.शरीराच्या मध्याच्या चिलखतापासून दोन दणकट काटे कंबरेला संरक्षण द्यायला निघालेले असत. आणखी दोन काटे पुढे मानेला संरक्षण देत.डोक्याचा सांगाडा शिरस्त्राणासारख्या रचनेचा असे.जर कोणी या हत्यारबंद चिलखतधारी सैनिकांवर हल्ला केला,तर सैनिक शिंगं आणि पाय चिलखतात ओढून,अंग आक्रसून पूर्ण शरीराचीच ढाल करत असत.
साध्या कामकरी मुंग्यांनाही लढता येत असे,पण त्यांचं चिलखत हलकं असे.त्या नेटानं उभं ठाकून लढत नसत. त्यांचा मुख्य गुण म्हणजे वेगवान,चपळ हालचाली करता येणं.शत्रूभोवती रिंगण धरून पळताना मध्येच कमकुवत भागावर हल्ले करणं.एखादा पाय,एखादं शिंग धरून शत्रूला जखडून ठेवणं.असं शत्रूला जेरबंद केलं, की वारुळातल्या इतर मुंग्या येऊन शत्रूला दंश करायच्या,
त्याचे लचके तोडायच्या,त्याच्यावर विषारी द्रव्यं फवारायच्या,आणि शेवटी अनेक लहानशा मुंग्या मिळून मोठ्या शत्रूला मारून टाकायच्या.एखाद्या मोठ्या सांबराला किंवा नीलगाईला रानकुत्रे मारतात,तसेच डावपेच कामकरी मुंग्या वापरतात.
माणसांमध्ये हलक्या पायदळानं शत्रूच्या मशीन-गन ठाण्यांवरचे हल्लेही याच तंत्रानं केले जातात.
तर राणी मुंगी मेली तेव्हा पायवाट वारुळापाशी अशी दहा हजार सैनिक-कामकरी फौज होती.राणी मेल्यावर मात्र नवे सैनिक,नवे कामकरी घडणं संपलं.जे सैनिक, कामकरी होते ते वयस्क,म्हातारे व्हायला लागले. पायवाट वारुळाचं सगळ्यात शेजारचं वारूळ म्हणजे ओढ्याकाठचं वारूळ,ते पायवाट वारुळापेक्षा वयानं आणि आकारानं लहान होतं.आता मात्र ते शेजाऱ्याच्या दबळेपणातून फायदा कमवायला सज्ज झालं.एका पहाटे ओढ्याकाठच्या वारुळातनं एक अभिजन मूंगी निघाली.तिच्यामागे साध्या कामकरी मुंग्यांचा एक गट होता.ओढा अभिजन मुंगीन पायवाट वारुळाची स्थिती तपासायचं ठरवलं होतं.नेमकी स्थिती तपासणं सोपं नव्हतं.दोन वारुळांमध्ये सुमारे वीस मीटर अंतर होतं,
दोन हजार मुंग्याइतक म्हणा.सरळ वाटेनं हे अंतर एखादी मुंगी सहाएक मिनिटात ओलांडू शकली असती. पण वाट सोपी नव्हती.एक सेंटिमीटर लांब मुंगीच्या नजरेन पाहिलं तर मोठाले अडथळे होते.माणसांना झाडोऱ्याचं बेट दिसतं तसा एखादा गवताचा पुंजका मुंग्यांना दिसायचा.काड्याकाटक्या रस्त्यात पडलेल्या ओंडक्यांसारख्या दिसायच्या. माणसांना सपाट वाटणारी वाळू खडकाळ जमिनीसारखी वाटायची.
पाऊस ही तर मोठीच आपत्ती.मुंग्यांच्या अंगावर एक थेंब पडणं,आणि माणसांना अग्निशामक दलानं जोरदार नळाच्या झोतानं हाणणं,हे सारखंच समजायला हवं.एखादा बारका ओघळही मुंग्यांना एरवी कोरड्या पात्रातल्या महापुरासारखा वाटायचा.ओढा-अभिजन मुंगीला पायवाट वारुळाच्या क्षेत्राचा रस्ता आठवत होता,कारण ती एकदा तिकडे गेली होती. पण आता तिनं पूर्वी आखलेली फेरोमोन वासाची वाट पुसली गेली होती.
आता तिचा भर होता सूर्याची जागा पाहून वाट आठवण्यावर.आता सूर्य उगवतो आणि मावळतो.दिवसभर त्याची जागा सतत बदलत असते. पण मुंग्यांच्या मेंदूंमध्ये घड्याळ असावं तशी काळ मोजायची क्षमता असते.माणसांच्या मेंदूंना न जमणाऱ्या नेमकेपणानं मुंग्या सूर्याच्या बदलत्या जागांवर लक्ष ठेवू शकतात.बदलत्या जागेप्रमाणे कोन कसेकसे बदलतात, हेही मुग्या जाणू शकतात.आपल्या नोकोबीच्या जंगलात सूर्य दिवसभरात कसा प्रवास करतो.हे मुंग्याना माहीत असतं.तो पूर्वच्या तळ्याकाठच्या झाडांमधून उगवतो, आणि वारुळांच्या थेट वरून पश्चिमेच्या जंगलात मावळतो.कोणत्यावेळी तो कुठे असेल,हे मुंग्यांना नेमकं माहीत असतं.पण तरीही मुंग्या अधूनमधून थांबतात, आणि आजूबाजूचा भाग डोळ्यांनी तपासतात. आठवणीतल्या खुणा तपासून आपण कुठे आहोत याचा अंदाज घेतात.एकदोन शेजारीशेजारी वाढलेली रोपटी, पानांमधून गोलाकार दिसणारा,आकाशाचा तुकडा, एखादी दाट सावली,अशा या खुणा असतात. आणि सोबतच वास-चवीचं वातावरणही असतं, आधीच्या फेऱ्यांमधून आठवणारं.या एका आठवणींच्या प्रकाराबाबत आपण माणसं फार कल्पनाही करू शकत नाही.
ओढा-अभिजन मुंगीचं शरीर खालच्या जमिनीच्या दोनेक मिलिमीटर वर होतं.ती आपली शिंगं खाली वाकवून,जमिनीजवळ नेऊन वेगानं धावत होती.शिंगं डावीउजवीकडे वळवत होती.
वास,त्यांचं मिश्रण,ते तीव्र होताहेत की मंदावताहेत,सारं नोंदून तिच्या बारीकशा मेंदूत एक नकाशा उमटत होता.
सडणारा,कुजणारा पाचोळा,त्यावर जगणाऱ्या बुरश्या आणि जिवाणू,या प्रत्येक गोष्टीचा स्वतःचा वास असतो.मुंग्यांना तो 'दिसतो'.दर चौरस मीटरमध्ये अशा अडीच-तीन लाख वासांचं मिश्रण असतं,आणि मुंग्यांना ते वास येतात आणि आठवतातएखादा वास सांगतो, "इथे अन्न आहे." दुसरा सांगतो,"इथे धोका आहे."सगळ्या संदेशांचा अर्थ क्षणोक्षणी लावत मुंग्या जगत असतात.
त्या अर्थ लावण्यातूनच त्यांचं टिकून राहणं आणि मरून जाणं ठरत असतं.आणि आपल्याला ह्या प्रचंड तपशिलानं भरलेल्या विश्वाची जेमतेम कल्पना करता येते.ओढा-अभिजन मुंगी पायवाट वारुळाच्या दिशेनं चालली होती,पण तिला त्या वारुळात जायचं नव्हतं.तिची 'मंझिल' होती,एक दोन्ही वारुळांमधलं मैदान.मैदान फारतर दीड-दोन वितींचं होतं,पण मुंग्यांच्या मापांत ते प्रचंड मोठं होतं.आणि या मैदानात ओढा-अभिजन मुंगी आणि तिचे साथीदार यांना भेटले पायवाट अभिजन मुंगी आणि तिचे साथीदार.पायवाट अभिजन मुंगीनं राणीचा मृत्यू पाहिला होता.नंतरच्या सत्तास्पर्धेतून स्वतःचं वारूळ जरासं स्थिरावताना पाहिलं होतं.आता ती अन्न शोधत आपल्या वारुळाच्या क्षेत्राच्या अगदी बाहेरच्या सीमेवर आली होती.हे दोन वारुळांमधले मुंग्यांचे गट भेटले,आणि त्यांच्यात एक किचकट नाच चालू झाला.हा माणसांमध्ये असतो तसा नाच नव्हता.खरं तर तो एक सामना होता, दोन वारुळांमधल्या स्पर्धेसारखा.दोन्ही बाजूच्या मुंग्या पुढ्यातल्या बाजूची ताकद आजमावत होत्या.दुसऱ्याची ताकद तपासतानाच स्वतःच्या ताकदीची जाहिरातही केली जात होती.असं करण्यात कोणत्याच मुंगीला धोका वाटत नव्हता.
मृत्यूचा तर नाहीच,पण जखमांचाही धोका नव्हता.शत्रूला जोखणं आणि आपली शक्ती दाखवणं होतं हे;पहेलवानांनी एकमेकांपुढे शड्डू ठोकण्यासारखं.त्यातनं आपली सुरक्षा वाढेल,असं दोन्ही वारुळांच्या मुंग्यांना वाटत होतं.
या सामन्याच्या वेळी ओढ्याकडेचं वारूळ पूर्ण जोमात होतं.
आसपासच्या कोणत्याही वारुळाला हरवू शकेल, इतकी त्याची ताकद होती.मरू घातलेल्या पायवाट वारुळाला हरवण तर फारच सोपं होतं.ओढा-राणी सहा वर्षांची होती.माणसांच्या मापात तीसेक वर्षांची.भरपूर अंडी देत असायची.वारूळभर तिच्या राजस फेरोमोन्सचा सुगंध होता.वारुळाची जागाही चांगली,
सहज न खचणारी होती.एक बाजू ओढ्यानं, आणि दूसरी बाजू एका कोरड्या घळीनं सुरक्षित होती. इतर कोणतं वारूळ जवळ येणार नाही,असे तेज उतार वारुळाचं रक्षण करत होते.हे काही ठरवून झालं नव्हतं. केवळ योगायोगानं ओढा-राणीला मोक्याची जागा सापडली होती.जागा निवडण्याची बुद्धी राणी मुंग्यांमध्ये नसते.तर ओढा-अभिजन आणि तिचे साथीदार,पायवाट-अभिजन आणि तिचे साथीदार,असा मोठा जमाव मैदानात आला.दोन्ही बाजूंकडून साधारण सारख्याच संख्येनं मुंग्या होत्या.दोन्ही वारुळांच्या काही मुंग्या मात्र आपापल्या घरी जाऊन आणखी कुमक आणायच्या प्रयत्नांत होत्या.सगळ्या मैदानाभोवती लहान-लहान खड्यांवर चढून दोन्हीकडच्या मुंग्या शत्रूवर लक्ष ठेवत होत्या.घराकडे परतणाऱ्या प्रत्येक मुंगीला सौम्यसा शत्रूचा वास येत होता.त्यामुळे ती कोणाशी लढायला बोलावते आहे,ते कळत होतं.आता नुसत्या अभिजन आणि कामकरी मुंग्याच नव्हेत,तर सैनिक मुंग्याही मैदानावर येऊन पोचायला लागल्या. तासाभरात मैदान दोन्हीकडच्या शेकडो मुंग्यांनी फुलून गेलं.पण ही युद्धाची सुरुवात नव्हती.माणसांची सैन्यं जशी एकमेकांना घाबरवायला मिरवणुका काढतात, आपापसातच सराव-युद्धं खेळतात,तसा हा प्रकार होता. भारत-पाक सीमेवर 'वाघा बॉर्डर' ठाण्यावर जसे रोज थाडथाड पाय आपटत दोन्हीकडचे सैनिक एकमेकांवर गुरकावतात,तसा हा खेळ.दोन्ही वारुळांना आपली ताकद दुसऱ्याला दाखवायची होती,एवढंच.
शक्तिप्रदर्शन करणारी प्रत्येक मूंगी आकारानं मोठी दिसायचा प्रयत्न करत होती.पोटात द्रव भरून पोट फुगवली जात होती.पाय ताठ करून जास्त उंच दिसायचा प्रयत्न केला जात होता.कोणी तर खड्यांवर चढून आणिकच उंच होत होत्या.असं 'छाती फुगवून' चालताना दुसऱ्या वारुळाच्या मुंग्यांना मुद्दाम घासत जाणं,धक्के देणं,सारं सुरू होतं.आणि काही लहानशा मुंग्या शत्रूचा हिशेब मांडत होत्या.दुसऱ्या वारुळाकडे किती मुंग्या आहेत,त्यांची ताकद किती आहे, खाऊन-पिऊन जोमदार आहेत की नाहीत,सगळं नोंदलं जात होतं.जर शत्रूच्या मुंग्या आपल्याकडच्यांपेक्षा जास्त वाटल्या,तर आणखी मुंग्या बोलावल्या जात होत्या.हे जर जमलं नाही,तर शत्रूला आपोआप आपला दुबळेपणा कळण्याचा धोका होता.पायवाट-वारूळ राणी मुंगी मरण्याआधीही जरा दुबळं वाटायला लागलं होतं.त्यांचा प्रयत्न असायचा,की सामने आपल्या वारुळाजवळ व्हावेत;म्हणजे जास्त संख्याबळ दाखवणं सोपं जाईल.विशेषतः सैनिकांना जर लवकर मैदानात उतरवता आलं,तर शक्तिप्रदर्शन सोपं व्हायचं. अर्थात,शत्रूची ही पीछेहाट ओढा-मुंग्यांना पायवाट वारुळाची खरी स्थिती सांगतच असायची.आता तर पायवाट-वारुळाकडे पर्यायच नव्हता.त्यांना घराजवळ राहणं सक्तीचं होतं;आणि यानं त्यांचं अन्न शोधायचं क्षेत्राही कमी होत होतं.
१३.१०.२५ या लेखातील भाग क्रमश:हा क्रम मागे पुढे आहे…धन्यवाद
२३/१०/२५
एक खिडकी अचानक उघडते / A window suddenly opens
तर सगळी जुळवाजुळव झाली.तालमी सुरू झाल्या. कॉलेज-कॅण्टीनची नवी टुमदार इमारत होती. संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर ती मोकळीच असायची. ती जागा तालमींना मिळाली.
तालमी सुरू झाल्या आणि दोन चार दिवसांतच माझ्या लक्षात आलं की दिग्दर्शक काहीच करत नाहीयेत नुस्ते खुर्चीवर बसून राहताहेत. दोन वेळा चहा पिऊन निघून जातायत ! स्कूलचे दोन तीन अनुभवी नट सोडले तर आम्ही सारेच नवीन होतो. नुस्ते एका जागी उभे राहून भाषणे वाचीत होतो. स्कूलच्या ज्येष्ठ नटांना विचारलं तर ते म्हणाले, 'हे नेहमी असंच नाटक बसवतात.आम्ही आपापसातच हालचाली वगैरे ठरवतो.' मी घाबरलोच.मी म्हणालो,'
मग आपण दुसऱ्या कुणाला तरी दिग्दर्शक देऊ या.' तर हे म्हणतात, 'इतक्या वर्षांत आमची कुणाला छाती झाली नाही - तूही त्या भानगडीत पडू नको.मेडिकलची नाटकं त्यांना पिढीजात आंदण दिली आहेत असं ते मानतात.ते दुखावले गेले तर नाटक बंदसुद्धा पाडतील !' मी भलताच हवालदिल झालो.मला नाटकात काम करण्याचा अनुभव नसला तरी एव्हाना मी खूप नाटकं पाहिली होती.'नाटकं बसवावी लागतात','प्रयोग बांधेसूद असावा लागतो' वगैरे शब्द मी भालबांच्या तोंडून अनेक वेळा ऐकलेले होते.आमच्या शाळेतले फाटक परचुरे सरांनी बसवलेले 'बांधेसूद' प्रयोग मी पाहिलेले होते.पुढे रांगणेकरांची नाटकं पाहून तर 'नाटक बसवणं' म्हणजे काय याचा बऱ्यापैकी अंदाज मला आलेला होता.भालबांची आठवण झाल्याबरोबर मला एकदम आशेचा किरण दिसला.मी भालबांच्या घरी जाऊन दाखल झालो आणि त्यांना सगळी परिस्थिती सांगितली.ते म्हणाले,"एक दिग्दर्शक असताना मी होऊन मधे लुडबूड करणे मुळीच बरे नाही.माझे आणि त्या दिग्दर्शकाचे फार चांगले संबंध आहेत.ते दुखावले जातील." मी म्हटले,"ते दुखावले जातील म्हणून नाटकाचा चुथडा होऊ द्यायचा का ? तुम्ही त्यांच्या नकळत तालमी घ्या ! त्यांना पत्तासुद्धा लागणार नाही याची जबाबदारी मी घेतो.आमच्या कॅण्टीनला दोन खोल्या आहेत.एका खोलीत आमच्या अधिकृत तालमी चालतात.तुम्ही गुपचूप दुसऱ्या खोलीत भूमिगत तालमी घ्या !"नाटकाचा चुथडा होण्याचा माझा मुद्दा भालबांना पटला.आणि ते अनिच्छेने का होईना माझ्या कटात सामील झाले.आमच्या दुहेरी तालमी सुरू झाल्या.
अधिकृत तालमीत चाललेल्या प्रवेशात ज्यांचे काम नसायचे ते तिथून हळूच सटकायचे आणि मागल्या खोलीत जाऊन भूमिगत तालमीत सामील व्हायचे.तिथे भालबा त्यांची तालीम घ्यायचे ! दुसऱ्या दिवशी त्या पात्रांत झालेली सुधारणा पाहून अधिकृत दिग्दर्शक खूश व्हायचे ! 'वंदे मातरम्'चा आमचा प्रयोग बऱ्यापैकी बांधेसूद झाला.मी आयुष्यात प्रथमच स्वेच्छेने ('अक्कल हुशारीने' म्हणता येईल - पण 'नशापाणी न करता' असं म्हणता येणार नाही कारण नाटकांची चांगलीच नशा तोपर्यंत चढली होती.) केलेला पहिला नाटकाचा प्रयोग पुण्यात लिमये मांडववाल्याच्या 'लिमये नाट्य-चित्र मंदिरात' (आजचे विजय टॉकीज) डिसेंबर १९४६ मध्ये झाला.मी स्वतः ड्रामा सेक्रेटरी असल्यामुळे प्रत्यक्ष प्रयोगाच्या आधी दोन-चार दिवस माझी प्रचंड धावपळ चाललेली होती.लिमयांकडे जाऊन पडदे निवड,नवयुग स्टुडिओतून सर्व पात्रांचे कपडे भाड्याने आण,घरोघर हिंडून नाटकात वापरलं जाणारं सगळं सामान गोळा कर.अनंत कटकटी.माझ्या भूमिकेवर एकाग्र होणं वगैरे अशक्यच होतं.
सगळ्या धावपळीत रात्री प्रयोग केव्हा सुरू झाला आणि केव्हा संपला तेही कळलं नाही.पण सुरू झाला,व्यवस्थित झाला आणि संपलाही ! लोकांना चक्क आवडला ! प्रयोग संपला आणि मग मात्र मी दीक्षित सरांच्या सिगरेटच्या धुरासारखा एकदम हलका झालो.सरळ अंतराळातच गेलो तरंगत ! खूप जणं विशेषत: दीक्षित सर आत येऊन शाबासकी देऊन गेले पण मी हवेतच । इतकी वर्षं जिवाचं पाणी करून टाकणारी भीती एकदम कुठे नाहीशी
झाली ? कशी नाहीशी झाली ? क्वचितच कुठेतरी दबा धरून बसलीही असेल.एखाद्या पडद्याच्या मागे.पण तिच्याकडे लक्ष द्यायला आपल्याला उसंत कुठे होती ? नाटकाचा पडदा वर जायच्या आधी आपण ड्रामा-सेक्रेटरी होतो आणि पडदा वर गेल्याबरोबर आपण 'त्रिभुवन' झालो.ती भीती श्रीराम लागूला शोधत राहिलेली असणार । म्हणजे सुरवंटाला.आता बैस म्हणावं शोधत.आता तो मुळी सुरवंट राहिलेलाच नाही -फुलपाखरू झालाय ! तालमींच्या वेळी आपण ड्रामा सेक्रेटरी असल्यामुले आपल्याला अधिकृत तालीम सोडून कधी जाताच आलं नाही.मग आज एवढं सराइतासारखं त्रिभुवनचं काम आपण कसं केलं ? अरे हा कसला प्रश्न ? आपण स्टेजवर असताना आपले सगळे गुरू अवतीभवतीच तर होते.पॉल म्यूनी, कोल्मन,
सोहराब मोदी,जागीरदार,इन्ग्रिड बर्गमन,नानासाहेब,
गणपतराव सगळे आपल्याला हाताला धरून नेत नव्हते का ? असं काय काय डोक्यात काहूर माजलं होतं.त्या धुंदीत मी रात्रभर कुठेकुठे भटकत राहिलो.धुंदी ! हा शब्द मी नुसता वाचत होतो, ऐकत होतो.त्या रात्री ती अवस्था प्रत्यक्ष अनुभवली.
दुसऱ्या दिवशीचा प्रयोग मी प्रचंड आत्मविश्वासाने केला.
ग्रॅहम ग्रीननं म्हटलं आहे की प्रत्येकाच्या बालपणात किंवा पौगंडावस्थेत एक क्षण असा येतो की एक खिडकी अचानक उघडते आणि सारा भविष्यकाळ आत येतो! मला वाटतं ती खिडकी त्या क्षणी उघडली होती.
एम.बी.बी.एस.च्या शेवटच्या वर्षात असताना गॅदरिंगला 'पुण्यप्रभाव' नाटक केलं. फायनल परीक्षा तीन महिन्यांवर आली असताना आणि नापास होण्याची खात्री समोर दिसत असतानाही 'वृंदावन' करण्याची संधी हातातून टाकून देणं शक्यच नव्हतं.
कदाचित ते आयुष्यातलं शेवटचं काम असणार होतं.नानासाहेब फाटकांचा 'वृंदावन' पाहिला होता आणि त्यानं मला चांगलंच पछाडलं होतं.तेव्हा खूप मन लावून मी वृंदावन' केला आणि ठरल्याप्रमाणे एप्रिलमध्ये नापास झालो ! ऑक्टोबरच्या परीक्षेत मात्र पास व्हायचंच या निश्चयानं मग जोरात अभ्यासाला लागलो.पण पहिली चिंता हीच की आता कॉलेज सुटणार -तर आता नाटकं कुठे करायची ! जयंत धर्माधिकारी त्याच वर्षी फर्ग्युसनमधून बी.ए. झाला होता.त्याचीही हीच समस्या होती कॉलेज सुटलं,आता नाटकं कुठे करायची। तो कॉलेजच्या नाटकात नेमानं कामं करायचा. त्यालाही नाटकाचं चांगलंच वेड होतं.
एक दिवस तो आणि भालबा हॉस्टेलच्या माझ्या खोलीवर आले.
काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय म्हणाले. आम्ही तिघं समोरच्या इराण्याकडे जाऊन बसलो. जयंतानं कुठल्याशा वृत्तपत्राचं एक कात्रण बरोबर आणलं होतं.दादर (मुंबई)ला 'दादर नाट्यकलोपासक' नावाची एक हौशी नाट्यसंस्था होती.तिनं हौशी नाट्यसंस्थांकरता एक नाट्यस्पर्धा आयोजित केली होती.प्रथम क्रमांकाच्या नाट्यप्रयोगाला एकशे एक रुपये बक्षीस मिळणार होतं ! जयंता आणि भालबा चांगलेच उत्तेजित झालेले होते.
एकरकमी एकशे एक रुपये मिळणं हे १९५१ साली चांगलंच आकर्षक होतं. (ते आपल्याला मिळणार असं आम्ही गृहीतच धरलं होतं.) पण त्याहीपेक्षा,नाटक करायला मिळणार हे जास्त महत्त्वाचं होतं.मग त्याकरता संस्थेचं पाठबळ हवं. आम्ही तर सगळेच कॉलेज शिक्षण संपलेले सडेफटिंग. तर मग आपण संस्था स्थापन करायची! त्यात काय ?
खरं म्हणजे त्या वेळी पुण्यात 'सोशल क्लब' आणि 'महाराष्ट्रीय कलोपासक' अशा दोन प्रतिष्ठित हौशी नाट्यसंस्था बरीच वर्षं काम करीत होत्या.त्यांची नाटकं आम्ही पाहिलेली होती.भालबा तर तोपर्यंत पुण्यातल्या सगळ्याच कॉलेजात नाटकं बसवायला जात होते आणि जयंत काय किंवा मी काय,सतत चार-पाच वर्षं कॉलेजच्या नाटकांत कामं करून बक्षिसं मिळवत असल्यानं हौशी नाट्यक्षेत्रात बऱ्यापैकी मांहीत झालेलो होतो.तेव्हा या दोन्ही संस्थांनी आम्हांला त्यांच्यात ओढायचा प्रयत्न केलेला होता.पण एक तर त्या संस्थांमध्ये सगळी बुजुर्ग मंडळी होती आणि मुख्य म्हणजे त्यांची नाटक सादर करण्याची पद्धत आम्हांला फार भडक,जुनाट वाटायची.त्यामुळे आम्ही त्यांना टाळत होतो.
आम्हांला काही तरी वेगळं करायचं होतं ! म्हणजे नेमकं काय करायचं होतं ते माहीत नव्हतं.पण तिथं जे चाललं होतं त्याबद्दल तीव्र असमाधान होतं. आणि आपल्याला काही तरी वेगळं – अधिक वास्तवदर्शी असं काहीतरी करायचं आहे अशी एक निश्चित खूणगाठ मनाशी होती.तेव्हा आपण आपली स्वतःची संस्थाच काढली पाहिजे असं काही तरी स्वप्नाळू बोलणं आमच्यात मधूनमधून व्हायचंही.आता या नाट्यस्पर्धेत प्रयोग करण्याची संधी आली आहे तर संस्था स्थापन करूनच टाकू या म्हणून आम्ही इराण्याच्या संगमरवरी टेबलाभोवती बसून चहाचा पाचवा कप पितापिता संस्था स्थापन करून टाकली.आचार्य अत्र्यांचं 'उद्याचा संसार' नाटक करायचं हेही त्यातल्या सगळ्या भूमिकांसह ठरवून टाकलं.तीन चार तास उत्साहानं फसफसून चर्चा करून एवढा महत्त्वाचा निर्णय एकमतानं घेतला म्हणून सगळेच खूश होतो.मी फक्त हिरमुसलो.
कारण परीक्षेच्या अभ्यासापायी मला 'बॅ.विश्राम' करायला मिळणार नव्हता !भालबा केळकर वाडियाचे,जया फर्ग्युसनचा,मी मेडिकलचा,लीला देव एस.पी.
कॉलेजच्या,ताराबाई घारपुरे तर बी.ए. होऊन बरीच वर्षं झालेल्या.तेव्हा संस्थेचं नाव ठेवलं 'इंटर कॉलेजिएट ड्रॅमॅटिक असोसिएशन !' त्या वेळी इंग्रजी नाव ठेवायची पद्धत रूढ होती.भालबांनी नेहमीप्रमाणे अगदी मन लावून,खूप मेहनत घेऊन 'उद्याचा संसार' बसवलं,आणि मुंबईला जाऊन मंडळींनी स्पर्धेत प्रयोग करून चक्कच पहिलं बक्षीस मिळवलं ! पण ते दोन संस्थांत विभागून ! म्हणजे हातात पन्नास रुपये आठ आणे.पहिल्याच प्रयत्नात पहिलं बक्षीस मिळणं म्हणजे फारच उत्साहवर्धक होतं. सगळ्यांना संस्थेविषयी एकदम आपुलकी,अभिमान वगैरे वाटायला लागला.आणि पहिल्याच फटक्याला संस्थेकडे साडेपन्नास रुपये भांडवल होतं ! मग काय ? तातडीनं पुढच्या नाटकाची तयारी सुरू झाली.एवढ्या काळात माझी परीक्षा होऊन मी एम.बी.बी.एस. झालो होतो. (पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या 'लमाण' या आत्मचरित्रातून)
प्रगतिपुस्तक…!
विद्यार्थ्यांचे नाव : डॉ. श्रीराम लागू
जन्म : १६ नोव्हेंबर १९२७
परीक्षेचा निकाल : चौथीत नापास
प्रगतीची वाटचाल : 'वेड्याचं घर उन्हात', 'उद्ध्वस्त धर्मशाळा',
'नटसम्राट','हिमालयाची सावली' इत्यादी नाटकांतील आणि 'सामना','सिंहासन' ह्या चित्रपटातील भूमिका गाजल्या.हिंदी सिनेमात अनेक महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. 'लमाण' हे आत्मचरित्र प्रसिद्ध,सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत महत्वपूर्ण सहभाग.अनेक महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित…. समाप्त
२१/१०/२५
एक खिडकी अचानक उघडते / A window suddenly opens
" ग्रहम ग्रीननं म्हटलं आहे की प्रत्येकाच्या बालपणात किंवा पौगंडावस्थेत एक क्षण असा येतो की एक खिडकी अचानक उघडते आणि सारा भविष्यकाळ आत येतो." - डॉ.श्रीराम लागू
शाळा म्हणजे खासगीवाल्यांचा वाडा.काळेकभिन्न कोरीव काम केलेले खांब,तुळया,कमानी आणि त्यांनी बंदिस्त केलेल्या अंधेऱ्या खोल्या.खोल्यांत काही बाकडी आणि मास्तरांची टेबल-खुर्ची.
अतिशय मारकुटे आणि परपीडनात आसुरी आनंद घेणारे मास्तर.बास. शाळेतल्या चार वर्षांत काही शिकल्याचे आठवतच नाही.परीक्षाही आठवत नाही.पण चौथीच्या परीक्षेत नापास झालो एवढे नक्की ! कारण त्यामुळेच माझी शाळा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
मी मराठी चौथीत नापास झालो तेव्हा आमच्या म्युनिसिपल शाळेच्या हेडमास्तरांनी आमच्या वडिलांना बोलावून घेऊन त्यांना सांगितले होते म्हणे की,"मुलाचे शिक्षण नीट करायचे असेल तर त्याला म्युनिसिपल शाळेतून काढून दुसऱ्या चांगल्या शाळेत घाला.मात्र मराठी चौथीचे वर्ष त्याला पुन्हा करू द्या !" वडिलांनाही ते पटले.कारण त्यांना व्यवसायामुळे माझ्या अभ्यासाची चौकशी करायलाही कधी वेळ मिळत नसे.
म्युनिसिपल शाळेतून भावे स्कूलमध्ये मला अक्षरशः अंधार
कोठडीतून स्वच्छ प्रकाशमय जगात आल्यासारखे वाटले.मोड्डी थोरली,लांबलचक तीन मजली दगडी इमारत.अर्ध्या भागात मुलांची शाळा आणि अर्ध्या भागात मुलींची शाळा.प्राथमिक शाळेच्या चार इयत्ता - प्रत्येकीच्या तीन-तीन तुकड्या.प्राथमिक शाळा मात्र मुलांमुलींची एकच होती.हायस्कूलच्या सात इयत्ता प्रत्येकीच्या तीन-तीन तुकड्या.प्रत्येक तुकडीला वेगळा वर्ग आणि वर्गावर झोकदार पाटी 'इ. ४ थी अ.' आणि प्रत्येक वर्गात प्रकाश म्हणजे किती ? अगदी डोळे दिपून जायचे.मराठी चौथीच्या वर्गात पुन्हा बसावे लागले याचे मला काहीच सोयरसुतक नव्हते । नव्या शाळेवर मी एकदमच खूश होतो.आणि त्या वेळी लक्षात आले नाही, पण पहिल्या शाळेतल्या चार वर्षांत माझा नकळत काहीतरी अभ्यास झाला असणार ! कारण म्युनिसिपल शाळेत 'ढ' समजला गेलेला मी नव्या शाळेच्या चौथीच्या वर्गात एकदम 'स्कॉलर' म्हणून ओळखला जाऊ लागलो ! मी खूश होतो ! शिकवायला बाई होत्या. छान दिसायच्या,खूप छान शिकवायच्या,पण त्यांचे कुंकू नसलेले कपाळ फार केविलवाणे वाटायचे.
मराठी चौथीची परीक्षा मी हां हां म्हणता पास झालो आणि इंग्रजी पहिलीत गेलो. (STD. IA) अशी इंग्रजीतली पाटी वर्गाच्या दारावर होती ! आमचे वर्गशिक्षक मुंडले नावाचे होते.इंग्रजी,मराठी दोन्ही छान शिकवायचे.शिकवताना छान छान गोष्टी सांगायचे.
दिवाळीच्या सुट्टीत 'फराळाचं काय काय खाल्लं,सिनेमा कुठला पाहिला ?' असले प्रश्न विचारायचे म्हणजे अभ्यासाशी काही संबंध नसलेले - त्यामुळे अगदी घरच्यासारखे वाटायचे.
एक दिवस ते तासाला आले आणि त्यांनी एकदम घोषणा केली की,"शाळेचं गॅदरिंग जवळ आलेले आहे आणि त्यात करमणुकीच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला एक 'नाटिका' करायची आहे !" नाटिका म्हणजे काय हे आम्हांला कुणालाच माहीत नव्हतं.मग त्यांनी पेंडसे आणि सुखात्मे,आणि मी तिघांना उभं राहायला सांगितलं आणि म्हणाले, "तू (म्हणजे मी) गोपाळ कृष्ण गोखले व्हायचंस,तू लोकमान्य टिळक आणि तू दादाभाई नौरोजी."अशी तिघांना तीन कामं वाटून दिली आणि पुढे म्हणाले,"तुम्ही तिघांनी संवाद पाठ करायचे आणि मी सांगीन तसे एका पाठोपाठ म्हणायचे. आणखी एक 'सरोजिनी नायडू' लागेल.ती मुलींच्या शाळेतून आणू." मुलींची शाळा आमच्या शाळेला लागूनच होती.गॅदरिंगला चांगला महिनाभर अवकाश होता.मुंडले सरांनी स्वतःच ती नाटिका लिहिलेली होती. ( नापास मुलांचे प्रगतिपुस्तक,संपादन अरुण शेवले, प्रकाशक - ऋतुरंग प्रकाशन मुंबई)
आणि स्वतःच ते बसवणार होते.बसवणार म्हणजे काय तर आमच्याकडून भाषणं पाठ करून घेणार ! मला पाठांतराची सवय होती कारण घरी रोज संध्याकाळी 'शुभंकरोति', 'शांताकारम्', 'रामरक्षा', 'भीमरूपी' वगैरे देवासमोर बसून म्हणायला लागायचंच,मुंडले सर वर्गात तर नाटिका आमच्याकडून पाठ करून घ्यायचेच पण दुसऱ्या एखाद्या वर्गावर तास घेत असले आणि तास घ्यायचा कंटाळा आला की आम्हां तिघांना आमच्या वर्गातून बोलावून घ्यायचे आणि त्या वर्गातल्या मुलांसमोर उभे राहून आमच्याकडून भाषणं पाठ म्हणून घ्यायचे.आम्हांला आमचा तास चुकला (विशेषतः तो गणिताचा असला) तर मजाच वाटायची.क्वचित 'सरोजिनी नायडू' ही शेजारच्या शाळेतून बोलावली जायची.तिचं नाव मात्र आता आठवत नाही.लहानपणी पाठांतराला वेळ लागत नाही.त्यामुळे लवकरच आमची चौघांचीही ती सबंध नाटिकाच पाठ झाली !
गॅदरिंगचा दिवस उजाडला.शाळेच्या चारी बाजूंनी दगडी इमारतींच्या मध्यभागी भला थोरला चौक होता.त्याच्या एका बाजूला स्टेज बांधले होते आणि समोर चौकात प्रेक्षकांना बसायला,पुढे भारतीय बैठक आणि मागे खुर्चा अशी व्यवस्था होती.पाचएकशे प्रेक्षक मावत असत.दुपारी तीन-चारच्या सुमारास कार्यक्रम सुरू व्हायचा होता.आम्ही एक वाजल्यापासूनच हजर होतो. प्रेक्षागृह रिकामेच होते.आम्ही 'कलाकार' मंडळी स्टेजच्या मागच्या बाजूला जमलो.मास्तरांनी आम्हांला स्टेजवर नेऊन स्टेज दाखवले.लाकडाच्या फळ्यांचे स्टेज केलेले होते.वर एक सतरंजी टाकलेली होती.मागे कसल्या तरी देखाव्याचा भव्य पडदा लावलेला होता. स्टेजवर एक कोच आणि एक खुर्ची मांडलेली होती. पुढच्या बाजूला लाल रंगाचा दुपाखी पडदा होता.त्या पलीकडे प्रेक्षक बसणार होते.पण पडदा पडलेला असल्याने प्रेक्षागृह दिसत नव्हते.स्टेजच्या डाव्या-उजव्या बाजूला झाडांची चित्रे काढलेल्या विंगा होत्या. त्यांच्यामधून स्टेजवर प्रवेश करायचा किंवा बाहेर जायचे.आम्ही स्टेजवर बागडलो,कोचावर हुंडदलो, मास्तरांनी आमच्याकडून एकदा नाटिका म्हणवून घेतली.कुठे कुणी बसायचे,कुणी उभे राहायचे हे सांगितले.सगळे खेळीमेळीत चालले होते.दोन तास कसे गेले कळलेही नाही.
चारच्या सुमारास कार्यक्रम सुरू झाला.पहिलीच नाटिका आमची होती.नाटिकेच्या सुरुवातीला टिळक, दादाभाई आणि सरोजिनी स्टेजवर असतात.गोखले (म्हणजे मी) आत विंगेत उभे असतात.
पडदा वर गेला की स्टेजवर तिघांचे संभाषण सुरू होते.थोडा वेळ त्यांचे संभाषण झाले की गोखले प्रवेश करतात आणि पुढे बाकीची नाटिका होते.प्रत्यक्ष पडदा वर जाऊन नाटिका सुरू होण्याच्या वेळी मी विंगेत उभा राहून माझ्या प्रवेशाची वाट पाहत होतो. मनावर दडपण कसलंच नव्हतं.ठरावीक वाक्यानंतर प्रवेश करायचा आणि पुढचे संवाद बोलायचे.पाठांतर चोख होते.पण पडदा वर गेला मात्र आणि विंगेतून मला, समोर बसलेला प्रचंड समुदाय दिसला ! जगातली सगळी माणसे पोरे बनून तिथे कोलाहल करताहेत आणि मी दिसल्याबरोब्बर झडप घालून ती मला गिळंकृत करणार अशी दरदरून भीती मला वाटली. क्षणार्धात हातपाय गारठले,तोंड कोरडे पडले,जीभ टाळ्याला लागली.जीव वाचवण्याच्या आदिम प्रेरणेने माझा संपूर्ण कब्जा घेतला आणि मी विंगेला घट्ट धरून थरथरत उभा राहिलो.
थोड्या वेळाने लक्षात आले की स्टेजवरचे माझे सहकारी माझ्याकडे पाहून मला जोरजोराने हातवारे करून प्रवेश करण्याकरिता खुणावताहेत.समोरच्या विंगेत हातात शिट्टी घेऊन सर उभे होते.तेही जोरजोराने खुणावताहेत.माझ्या डोक्यात स्टेजवरच्या संवादाचा एक शब्दही शिरला नव्हता.डोक्यात घोंघावत होता समोर बसलेल्या प्रेक्षकांचा भयानक कोलाहल.
स्टेजवरचा संवाद थांबलाच होता कारण माझ्या प्रवेशाशिवाय नाटिका पुढे जाणे शक्यच नव्हते.समोरच्या विंगेतले सर एकदम दिसेनासे झाले.ते मागच्या पडद्याच्या मागून धावत माझ्या विंगेत आले.त्यांनी मला बकोटीला धरून विंगेपासून ओरबाडून काढले आणि एखाद्या मांजराच्या पिल्लाला फेकतात तसे एकदम स्टेजवर फेकून दिले.मी स्टेजवर धडपडत उभा राहिलो.समोर लाखो हिंस्र जनावरांचा समुदाय,त्यांच्या लसलसत्या लाल जिभा आणि भीषण गोंगाट.कोणत्या क्षणी मला फाडून मटकावून टाकतली याचा नेम नाही ! मला नाटिकेतील एक शब्द आठवेना.मी घाबरण्याच्याही पलीकडल्या अवस्थेला गेलो होतो - बधिर झालो होतो.स्टेजवर लोकमान्य टिळक,दादाभाई नौरोजी,सरोजिनी नायडू माझ्याकडे पाहून प्रचंड हातवारे,खुणा करत होते.त्यांचे ओठ हलताना दिसत होते पण ऐकू काहीच येत नव्हते. टाळ्याला चिकटलेली जीभ सुटत नव्हती.असा किती वेळ गेला कुणास ठाऊक.शंभर दोनशे वर्षं असावीत बहुधा ! नाटिका थांबून राहिली होती.पुढे जात नव्हती. मी बोलू लागल्याशिवाय पुढे जाणे शक्य नव्हते.
आणि मग एकदम कसे कुणास ठाऊक,मला भाषण आठवले.
टाळ्याला चिकटलेली जीभ सुटली आणि मी भडाभडा बोलायला लागलो.आणि एकदा बोलायला लागल्यावर मला थांबवण्याची कुणाची टाप होती ? मी माझे स्वतःचेच केवळ नव्हे तर इतर सगळ्यांचीही भाषणे न चुकता,धाडधाड नाटिकेच्या शेवटापर्यंत म्हणून टाकली ! टिळक,दादाभाई,सरोजिनी सगळे आ वासून बघायला लागले आणि बघतच राहिले.नाटिका संपली ! पडदा पडला.समोरच्या प्रेक्षकांना काहीच सोयर सुतक नव्हते.सर स्टेजवर आले, 'छान केलंत हं सगळ्यांनी' म्हणाले आणि पुढच्या नाटिकेच्या तयारीला लागले ! नाटिकेत काम करण्याबद्दल आम्हांला प्रत्येकाला दोन दोन लिमलेटच्या गोळ्या मिळाल्या.मला सायकलवरून कुणीतरी घरी पोचवले.मी मात्र इतका हादरलो होतो की मी मनोमन प्रतिज्ञाच करून टाकली,'पुन्हा जन्मात नाटकाच्या आसपाससुद्धा फिरकायचं नाही !'
आमच्या शाळेच्या गॅदरिंगला दर वर्षी दोन नाटके व्हायची.एक आजी विद्यार्थ्यांचे आणि एक माजी विद्यार्थ्यांचे.आमच्या शाळेतले फाटक सर आणि परचुरे सर दर वर्षी फार मेहनतीने ही नाटके बसवायचे.अगदी संगीतासकट.मी जसजसा मोठा व्हायला लागलो तसतसा ही नाटकं पाहायला लागलो.लांब कुठेतरी बसून बघायचं.
मी १९४४ साली मॅट्रिक झालो आणि फर्ग्युसन कॉलेजात गेलो.त्याचं असं झालं,मॅट्रिक झाल्यावर वडिलांनी रीतीप्रमाणे विचारलं,"आता पुढे काय करायचा विचार आहे ?" म्हणून. मी म्हटलं, "मला आर्ट स्कूलमध्ये चित्रकला शिकायला जायचंय." (मी चित्रं बरी काढायचो – आणि एकूणच मला कला विषयामध्ये स्वारस्य होतं.शास्त्रीय विषयांची काही गोडी नव्हती.)वडील क्षणभर अवाक् झाले.एका प्रतिष्ठित डॉक्टरच्या आणि काँग्रेसच्या गांधीवादी पुढाऱ्याच्या मुलाकडून त्यांची ही अपेक्षा सुतराम् नव्हती,काही तरी शिष्टसंमत प्रतिष्ठित व्यवसायाचं मी नाव घेईन अशी त्यांची खात्री असावी.थोड्या वेळानं ते बोलते झाले, "हे पहा,पेंटर बिंटर होणं म्हणजे भिकेची लक्षणं आहेत. तुम्ही यावर काहीच विचार केलेला दिसत नाहीये.
तर मी सांगतो,मॅट्रिक झाल्यावर पुढे कॉलेजात दोन शाखा असतात - आर्टस् आणि सायन्स.आर्टस् घेतलंत तर एक तर वकील व्हाल किंवा प्रोफसर.आजकाल वकील सगळीकडे बेकार हिंडताहेत आणि प्रोफेसर म्हणजे दीडदोनशे रुपये पगारावर आयुष्य काढावं लागेल.तेव्हा आर्ट्सचा विचार डोक्यातून काढून टाका. आता सायन्स.त्यात दोन शाखा - एंजिनिअरिंग आणि मेडिकल.
एंजिनिअरिंगला जायचं म्हणजे गणित फार पक्कं हवं – तुमचा गणितात काय उजेड आहे तो दिसतोच आहे,तेव्हा एंजिनिअरिंग रद्द.आता म्हणजे मेडिकलशिवाय पर्याय नाही.तेव्हा मेडिकलला जायचं !" त्यांच्या वक्तृत्वानं आणि तर्कशुद्ध विश्लेषणानं मी फार प्रभावित झालो आणि फर्ग्युसनला सायन्समध्ये नाव दाखल केलं.
वडील स्वतः डॉक्टर असून राजकारणात रस घेत असल्यामुळे,
आपला व्यवसाय शक्य तितक्या लवकर आपल्या थोरल्या मुलानं चालवायला घेऊन आपल्याला मुक्त करावं असं त्यांना वाटणं अगदी साहजिक होतं !
'एकच प्याला' नाटक करून त्यात मी सुधाकरची भूमिका करावी असा प्रस्ताव मी आमच्या कमिटीपुढे मांडला. (माझ्या बाथरूम-अॅक्टिंगमुळे मी स्वतःला फारच मोठा नट समजू लागलो होतो !) पण एवढं गंभीर,शोकात्म नाटक गॅदरिंगसारख्या आनंदाच्या प्रसंगी लोक - विशेषतः विद्यार्थी – पाहून घेणार नाहीत;तेव्हा काहीतरी विनोदी नाटक करावं असं कमिटीचं मत पडलं.मग मी नाटक निवडलं आचार्य अत्र्यांचं 'वंदे मातरम्'.ते विनोदी तर होतंच पण मुख्य म्हणजे त्यातलं 'त्रिभुवन' हे काम मला करायला फार छान वाटलं ! जुने,स्कूलचे जे विद्यार्थी होते त्यातले काही चांगले,हौस असलेले नट होते.त्यांतले काही आम्हा कॉलेजवाल्यांतले काही असे मिळून नटसंच तयार करण्यात फारशी अडचण आली नाही.
'नटीसंच' जमवताना मात्र फार मुलींचे पाय धरावे लागले ! माझ्या स्वभावात ही पायधरणी बसणारी नव्हती.पण आता नाटक होणे आणि त्यात मी काम करणे हा जीवनमरणाचा प्रश्न झालेला होता.तेव्हा धरले पाय आणि तीन मुली तयार केल्या.दिग्दर्शक शोधण्याचा प्रश्नच नव्हता कारण मेडिकल स्कूलची सगळी नाटकं बरीच वर्षं पुण्याचे एक वयस्क आणि नाटकाचे शौकीन डॉक्टर बसवत असत.ते स्कूलचे माजी विद्यार्थीच होते. त्यांना नुसता निरोप पाठवला की ते येत असत. कुठलंही नाटक त्यांना चालत असे.
….. उर्वरित शिल्लक राहिलेला भाग पुढील लेखामध्ये