* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: सामूहिक निवासी प्रकल्प / Collective Housing Project

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२३/१२/२५

सामूहिक निवासी प्रकल्प / Collective Housing Project

झाड मोठं झालं की त्याचा इतर जीवसृष्टीला मागल्या प्रकरणात वर्णन केल्याप्रमाणे उपयोग होतोच असं नाही.आताही अजस्र वृक्ष इतरांना राहण्यासाठी जागा देऊ शकतात,पण मात्र स्वखुशीने नाही.वटवाघुळ,मार्टिन पक्षी (पाकोळी प्रजातीचा पक्षी) आणि इतर पक्ष्यांना प्रौढ वृक्षांच्या मोठ्या फांद्या विशेष आवडतात.जाड फांद्या थंडी आणि उष्णतेपासून चांगले संरक्षण देतात.


युरोपमध्ये प्रौढ वृक्षांवर घरकामाची सुरुवात मोठ्या ठिपक्याचा सुतार किंवा काळ्या सुतार पक्ष्यांकडून होते.हे पक्षी खोडात जेमतेम एखाद-दोन इंच मोठं भोक पाडतात.

यासाठी त्यांना कुजलेल्या किंवा वठलेल्या झाडांपेक्षा सशक्त झाडेच आवडतात.जर शेजारी छान नवीन घर बांधता आलं तर आपण एखाद्या पडक्या घरात राहू का? याच विचारातून सुतार पक्ष्यांना आपल्या कुटुंबासाठी भक्कम घर हवे असते.सुतार पक्ष्यांकडे एका बैठकीत मोठं घर बांधण्याची ताकद असते.पण तरीही हे काम ते एकदम संपवत नाहीत.

छोटं भोक पाडून झाल्यावर ते महिनाभर सुट्टी घेतात.या काळात इथे कदाचित बुरशी स्थापित होईल.


बुरशीला साल भेदून आत शिरता येत नाही,म्हणून सुतार पक्ष्याचे हे छोटे भोक त्यांच्यासाठी आमंत्रणच असते या खिंडारीत शिरून ते चटकनलाकडावर आक्रमण करतात. 

झाडाला वाटते की नियोजनबद्ध सहकार्यातून आपल्यावर आक्रमण होत आहे.पण सुतार पक्ष्यासाठी हे केवळ श्रमाचे विभाजन असते.काही काळातच आतल्या लाकडाचे तंतू मऊ पडतात आणि सुतार पक्ष्याला भोक मोठे करता येते.


अखेर तो दिवस येतो की बांधकाम पूर्ण होऊन त्याला गृहप्रवेश शक्य होतो.अशा प्रकारे हा पक्षी अनेक घरं करतो.

एक मुलाची खोली तर एक शयनगृह आणि थोडा बदल मिळावा म्हणून एक छिद्र.याच्या घरात दर वर्षी नूतनीकरण होते.याचा पुरावा झाडाखाली पडलेल्या लाकडाच्या तुकड्यांतून मिळतो.नूतनीकरण करणं गरजेचं बनतं कारण आत घुसलेल्या बुरशीला थांबवणं आता अशक्य असतं.

बुरशी आत शिरत जाते आणि लाकूड मऊ आणि ओलसर करते.अशा वातावरणात कुटुंब वाढवणं योग्य नाही,हो ना? प्रत्येक वेळेस जेव्हा सुतार पक्षी हे ओलसर लाकूड काढून टाकतो तेव्हा त्याचे घर छान मोठं आणि स्वच्छ होत जातं.

काही काळातच घर इतकं मोठं आणि खोल होतं की आपली पहिली भरारी घेण्यासाठी पिल्लांना वर चढून जावं लागतं.

अशी वेळ आली की आता हे घर इतरांसाठी सोडणं योग्य होतं.ज्यांना लाकडावर काहीही काम करता येत नाही,अशांना हे घर आयते मिळते.नटहॅच (शिलींध्री पक्षी) हा पक्षी सुतार पक्ष्यांसारखेच वठलेल्या फांद्यांवर चोची मारून छोट्या किड्यांना बाहेर काढत असतो.सुतार पक्ष्याने सोडलेल्या घरात आपले घरटे करणे नटहॅचला सोपे जाते.पण तिथे एक समस्या असते. झाडाच्या ढोलीचे प्रवेशद्वार फार मोठे असते त्यामुळे त्यांच्या भक्षकांना आत शिरून पिल्लांना खाणे सोपे होते.म्हणून तो पक्षी अतिशय कलात्मक रीतीने या ढोलीवर माती लिंपून हे प्रवेशद्वार छोटे करतो.


द हिडन लाईफ ऑफ ट्रीज

पी ट र वो ह्ल ले बे न

अनुवाद - गुरुदास नूलकर

अरविंद घनश्याम पाटकर

 मनोविकास प्रकाशन


भक्षकांवरून एक गोष्ट आठवली.आपल्या भाडेकरूंना झाडांकडून एक विशिष्ट सेवा मिळते. लाकडाच्या गुणधर्मामुळे हे शक्य होते.लाकडाच्या तंतूंमधून ध्वनिप्रवाह छान होतो आणि म्हणूनच व्हायलीन किंवा गिटारसारख्या अनेक वाद्यांमध्ये लाकूड वापरले जाते.याचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला एक प्रयोग करता येईल.जमिनीवर पडलेल्या फांदीच्या निमुळत्या भागाला कान लावा आणि दुसऱ्या बाजूने तुमच्या मित्राला दगडाने हळूवार घासायला सांगा काय वातावरण शांत असल्यास कान लांब केला तरीही तुम्हाला हा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येईल.लाकडाच्या या गुणधर्माचा वापर करून झाडाच्या ढोलीत राहणाऱ्या पक्ष्यांना धोक्याचा संकेत मिळू शकतो. मार्टिन किंवा खारी आपल्या नखाने खरवडण्याचा आवाज त्यांना उंच झाडावरही टिपता येतो.यामुळे पक्ष्यांना निसटून जाता येते. जर घरट्यामध्ये पिले असली तर ते भक्षकांचे लक्ष वेधून त्यांची दिशाभूल करतात.पण हा प्रयोग सहसा यशस्वी होत नाही. पण जरी पालकांना उडून जाता आल तरीही पुन्हा प्रजनन करून ते नुकसान भरपाई करू शकतात.


या सस्तन प्राण्यांच्या काही प्रजातींना आपल्या पिलांना वाढवण्यासाठी अनेक पण अशा प्रकारच्या ध्वनिप्रवाहाचा वटवाघळांना काहीच उपयोग नसतो.छिद्रांची गरज असते.युरोप आणि पश्चिम आशियामध्ये सापडणाऱ्या बेकस्टाईन वटवाघुळाच्या माद्या आपल्या पिलांना समूहात वाढवतात.थोडे दिवसच ते एका ठिकाणी थांबतात. नंतर दुसऱ्या ठिकाणी निघून जातात. त्यांच्यावर जगणाऱ्या सजीवांपासून वाचण्यासाठी असे केले जाते.जर वटवाघळाने पूर्ण मौसम एकाच ठिकाणी वास्तव्य केले तर अशा सजीवांची संख्या प्रचंड वाढते आणि वटवाघळांना त्याचा त्रास होतो.पण एका ठिकाणी थोडेच दिवस वास्तव्य केल्याने हे टळू शकते.घुबडांना मात्र सुतार पक्ष्यांच्या छिद्रांची जागा पुरत नाही,त्यांना काही वर्ष धीर धरावा लागतो. कालांतराने झाड कुजू लागतं आणि एखादी फांदी दुभंगून त्याचं प्रवेशद्वार मोठं होतं.जर त्यात सुतार पक्ष्यांनी अनेक छिद्रं करून ठेवलेली असतील तर घुबडाचं काम सोपं होतं.म्हणजे सुतार पक्ष्यांची एकावर एक रचलेली अपार्टमेंट्स असतात. लाकूड कुजण्याची प्रक्रिया चालू झाली की ही अपार्टमेंट्स एकमेकांना जोडली जातात.आणि असं झालं की मग टॉनी घुबडाची सोय होते. तो आता आपल्या मित्रमंडळींसोबत इथे येतो.पण त्या झाडाचे काय? स्वसुरक्षा करण्याचे त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ होतात.आणि आता बुरशीवर आक्रमण करण्याची वेळ निघून गेलेली असते कारण भगदाडे मोठी झालेली असतात.पण जर का आपल्या बाहेरच्या जखमांवर झाडाला इलाज करता आला तर मात्र त्याचं आयुष्य वाढू शकतं. आतून कुजण्याची प्रक्रिया चालू राहिली तरी बाहेरून ते धडधाकट दिसतं आणि पोकळ स्टीलच्या नळीसारखे उभे राहून अजून एखादे शतक गाठू शकते.सुतार पक्ष्यांनी केलेल्या भोकाच्या जागी फुगवटा दिसला की झाड स्वतःला सावरण्याच्या प्रयत्नात असल्याचा पुरावा दिसतो. तरीही प्रचंड प्रयत्न करूनसुद्धा आपल्या खोडावरचे मोठे प्रवेशद्वार मात्र त्यांना बंद करता येत नाहीत. सुतारपक्षी निदर्यापणे नवीन झाडावर भोकं पाडतच राहतो.आता त्या कुजणाऱ्या खोडामध्ये अनेक प्रकारच्या सजीवांची वस्ती होते.लाकूड मुंग्या येऊन बुरसटलेले लाकूड खाऊ लागतात आणि त्यापासून कागदासारखी घरटी बनवायला सुरुवात करतात. घरट्याच्या भिंतीला अफिडने सोडलेले गोड द्रव लिपून घेतात.यावर बुरशी धरते आणि आपले जाळे पसरवून मुंग्यांचे घरटे मजबूत करते.दमट ओलसर छिद्रात अनेक प्रकारचे कीटक आकर्षित होतात. त्यांना अळ्या होण्यासाठी अनेक वर्षे लागतात त्यामुळे त्यांचा झाडाशी दीर्घकाळ संबंध टिकणारा असतो.कीटकांच्या अळ्यांमुळे बुरशी आणि इतर कीटकांना आमंत्रण मिळते आणि लाकडाचा भुसा सतत बाहेर जमिनीवर पडत राहतो.


घुबड, वटवाघूळ आणि उंदरांची विष्ठा ही त्या अंधार कोठडीत पडत असते.यामुळे लाकडाला पोषणद्रव्य मिळत राहतात आणि ब्लड नेक्ड् क्लिक बीटल, युरोपियन हरमिट बीटल आणि मोठा काळा बीटल या कीटकांची दीड इंचापर्यंत वाढ होते.परमिट बीटलना अंधार आवडतो त्यामुळे ते कुजणाऱ्या खोडाच्या बुंध्याशी राहतात.हे कीटक फारसे चालत किंवा उडत नाहीत त्यामुळे त्यांच्या अनेक पिढ्या एकाच झाडात राहू शकतात.वृद्ध वृक्षांना जपण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे.जंगलातून वठलेले वृक्ष काढून टाकले तर या छोट्या काळ्या किड्यांचा अधिवास निघून जातो आणि त्यांना दुसरे झाड शोधण्याइतकी शक्ती नसते.


एखादे झाड जर वादळात तुटून पडले तरीही त्याच्याकडून मोठी समाजसेवा झालेली असते.जरी संशोधकांकडून यावर फार अभ्यास झालेला नसला तरीही आपल्याला एक गोष्ट नक्की माहीत आहे की, जंगलात अधिक वैविध्य असल्यास परिसंस्था संतुलित राहू शकते. जितक्या जास्त प्रजाती तितक्या कुणा एका प्रजातीचे वर्चस्व जंगलावर होण्याची शक्यता कमी, कारण त्याच्यावर नियंत्रण ठेवणारे त्याचे शत्रू तिथे असतात. आणि यामध्ये पडलेल्या झाडाच्या खोडाची मदत मिळते. सतराव्या प्रकरणात पाहिल्याप्रमाणे अशा वठलेल्या खोडापासून जंगलात पाण्याच्या उपलब्धतेवर नियंत्रण ठेवले जाते.



जीवनात विजयी करणारी गोष्ट..!


तो अगदी निवांतपणे गुरूंसमोर उभा होता.गुरू त्याच्या जाणकार नजरेने त्याला तपासत होते. नऊ-दहा वर्षांचा मुलगा,त्याला लहान मूल समजा.त्याला डावा हात नव्हता,तो बैलाशी झालेल्या भांडणात तुटला होता.तुला माझ्याकडून काय हवे आहे.गुरुने त्या मुलाला विचारले.त्या मुलाने गळा साफ केला.धैर्य एकवटले आणि म्हणाले - मला तुमच्याकडून कुस्ती शिकायची आहे. एक हात नाही आणि कुस्ती  शिकायची आहे ? विचित्र गोष्ट आहे. का? शाळेतील इतर मुले मला आणि माझ्या बहिणीला दादागिरी करतात. मला टुंडा म्हणतात.सगळ्यांच्या मेहरबानीने माझे आयुष्य उध्वस्त केले आहे गुरुजी.मला माझ्या हिंमतीवर जगायचे आहे.कोणाच्याही दयेची गरज नाही. माझे आणि माझ्या कुटुंबाचे संरक्षण कसे करावे हे मला माहित असले पाहिजे.योग्य गोष्ट आहे.पण आता मी म्हातारा झालोय आणि कोणाला शिकवत नाही.तुला माझ्याकडे कोणी पाठवले? मी अनेक गुरूकडे गेलो. मला कोणी शिकवायला तयार नाही.एका ज्येष्ठ गुरूने तुमचे नाव सांगितले.फक्त तेच तुला शिकवू शकतात.कारण त्यांच्याकडे फक्त वेळ आहे आणि शिकायला कोणी नाही,म्हणून त्यांनी मला सांगितले.


ते उद्धट उत्तर कोणी दिले असेल हे गुरूना समजले.

अशा गर्विष्ठ लोकांमुळेच वाईट स्वभावाचे लोक या खेळात आले,हे गुरूना माहित होते.ठीक आहे.उद्या सकाळी उजाडण्यापूर्वी आखाड्यात पोहोचा माझ्याकडून शिकणे सोपे नाही,हे मी आधीच सांगत आहे. कुस्ती हा प्राणघातक खेळ आहे.स्वतःचे रक्षण करण्यासाठी त्याचा वापर करा.मी जे शिकवतो त्यावर पूर्ण विश्वास ठेव.आणि माणसाला या खेळाची नशा चढते.त्यामुळे डोकं थंड ठेव समजले?


होय गुरू.समजले आपण म्हणसाल त्या प्रत्येक गोष्टीचे मी पालन करीन.मला तुमचा शिष्य करा. त्या मुलाची इच्छा पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. गुरूंच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले.गुरु आपल्या एकुलत्या एक शिष्याला शिकवू लागले.माती तुडवली गेली,मुग्दुलवरून धूळ झटकली गेली आणि या एक हाताच्या मुलाला कसे शिकवायचे या विचारात गुरूचे डोळे लागले.गुरूने त्याला फक्त एक डाव शिकवला आणि दररोज मुलाला प्रशिक्षण देण्यास भाग पाडले.सहा महिन्यांसाठी दररोज फक्त एक डाव.एके दिवशी सद्गुरूंच्या वाढदिवशी शिष्याने पाय दाबताना प्रकरण छेडायला सुरुवात केली.गुरुजी,सहा महिने झाले आहेत,मला या डावाचे बारीकसारीक मुद्दे चांगले समजले आहेत आणि मला काही नवीन डाव देखील शिकवा.गुरू तिथून उठले आणि निघून गेले.त्याने गुरूला नाराज केल्याने मुलगा परेशान झाला. मग गुरूच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तो शिकत राहिला.

अजून काही शिकायचे आहे.असे त्याने कधीच विचारले नाही.गावात कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यात मोठी बक्षिसे होती.प्रत्येक आखाड्यातील निवडक पैलवान स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आले होते. गुरुजींनी उद्या सकाळी शिष्याला बैलांसह गाडी घेऊन बोलावले.जवळच्या गावात जायचे आहे. सकाळी तुला कुस्तीच्या डावात सहभागी होण्यासाठी जायचे आहे.हात नसलेल्या या मुलाने कुस्तीचे पहिले दोन सामने जिंकले.तसेच विरोध करणाऱ्या सर्व गुरूचे चेहरे उतरले.बघणारे थक्क झाले.हात नसलेले मूल कुस्तीत कसे जिंकू शकते? कोणी शिकवले?आता तिसऱ्या कुस्तीत समोरचा खेळाडू नवशिक्या नव्हता.पण मुलाने ही कुस्ती सुद्धा आपल्या नीटनेटक्या चालीने जिंकली आणि बाजी मारली.


आता या मुलाचा आत्मविश्वास वाढला आहे. संपूर्ण मैदान आता त्याच्यासोबत होते.मीही जिंकू शकतो,ही भावना त्याला प्रबळ करत होती.काही वेळातच तो अंतिम टप्प्यात पोहोचला.ज्या आखाड्याने त्या मुलाला या म्हाताऱ्या गुरुकडे पाठवले होते,त्या गर्विष्ठ पैलवानाचा शिष्य शेवटच्या कुस्तीत या मुलाचा प्रतिस्पर्धी होता.हा कुस्तीपटू तेवढ्याच वयाचा असूनही ताकद आणि अनुभवाच्या बाबतीत तो या मुलापेक्षा वरचढ होता.त्याने अनेक मैदाने मारली होती.तो या मुलाला काही मिनिटांत चित करेल हे स्पष्ट होते.पंचांनी सल्ला दिला,कुस्ती घेणे योग्य होणार नाही.कुस्ती ही बरोबरीची असते.मानवता आणि समानतेनुसार ही कुस्ती रद्द करण्यात आली आहे.बक्षीस दोघांमध्ये समान विभागले जाईल.पंचांनी त्यांचा हेतू उघड केला.कालच्या या मुलापेक्षा मी खूप अनुभवी आणि बलवान आहे.ही कुस्ती मीच जिंकणार, ही गोष्ट सोळा आणे खरी आहे.त्यामुळे मला या कुस्तीचा विजेता बनवायला हवे.तेथें स्पर्धक अहंकारनी बोलला.


मोठ्या भावापेक्षा मी नवीन आणि अनुभवाने लहान आहे.माझ्या गुरूनी मला प्रामाणिकपणे खेळायला शिकवले आहे. न खेळता जिंकणे हा माझ्या गुरुचा अपमान आहे. माझ्या सोबत खेळा आणि माझ्यासाठी जे आहे ते द्या.मला ही भिक्षा नको आहे. त्या देखण्या तरुणाचे स्वाभिमानी शब्द ऐकून लोकांनी टाळ्या वाजवल्या.अशा गोष्टी ऐकणे चांगले पण हानिकारक असते. पंच निराश झाले. काही कमी की जास्त झाले तर?आधीच एक हात गमावला आहे,अजून काही आणखी नुकसान होऊ नये? मूर्ख कुठला.!


कुस्ती सुरू झाली आणि उपस्थित सर्वजण थक्क झाले.

संधीच्या शोधात मुलाने टाकलेला डाव आणि बाजी त्या मोठ्या स्पर्धकाला झेलता आली नाही.तो मैदानाबाहेर पडला होता.कमीत कमी प्रयत्नांत त्या नवशिक्या स्पर्धकाने त्या जुन्या स्पर्धकाला धूळ चारली होती.आखाड्यातत पोहोचल्यावर शिष्याने आपले पदक काढून सद्गुरूंच्या चरणी ठेवले. सद्गुरूंच्या पायाची धूळ कपाळावर लावून त्याने आपले डोके मातीने माखले.


गुरुजी, मला एक गोष्ट विचारायची होती. विचारा... मला फक्त एक डावच माहित आहे. तरीही मी कसा जिंकलो?


तू दोन डाव शिकला होतास.त्यामुळेच तू जिंकलास.कोणते दोन डाव गुरुजी?


पहिली गोष्ट,तु हा डाव इतक्‍या चांगल्या प्रकारे शिकलास की त्यात चुकीला वाव नव्हता.मी तुझ्याशी झोपेत कुस्ती लढवली तरीही तू या डावात चूक करत नाहीस.तुमच्या प्रतिस्पर्ध्याला हे माहित होते की तुम्हाला हा डाव माहित आहे, पण तुम्हाला फक्त हा एकच डाव माहित आहे हे त्याला थोडे माहीत होते का? आणि गुरू,दुसरी गोष्ट काय होती? दुसरी गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. प्रत्येक डावासाठी प्रतिडाव आहे! असा कोणताही डाव नाही ज्याची तोड नाही.असा दावा केला जाऊ शकत नाही.तसेच या डावाचा ही एक तोड होता.मग माझ्या प्रतिस्पर्ध्याला तो डाव कळणार नाही का? हे त्याला माहीत होते. पण तो काही करू शकला नाही.तुम्हाला माहीत आहे का? कारण त्या तोडीत डाव टाकणाऱ्या स्पर्धकाचा डावा हात धरावा लागतो! आता तुम्हाला समजले असेल की हात नसलेला साधा मुलगा विजेता कसा झाला? ज्या गोष्टीला आपण आपली दुर्बलता समजतो, तिला आपले सामर्थ्य बनवून जगायला शिकवतो,विजयी तोच खरा सद्गुरू.आतून आपण कुठेतरी कमकुवत आसतो,अपंग आहोत.त्या कमकुवतपणावर मात करून जगण्याची कला शिकवणारा गुरु हवा आहे.आपल्याकडे दोन हात आहेत... एक स्वतःला मदत करण्यासाठी आणि दुसरा इतरांना मदत करण्यासाठी आजपासून इतरांवर अवलंबून न राहता स्वतःची आणि इतरांची मदत केली पाहिजे.