अनेक विशेषज्ञांचे मत आहे,की महत्त्वपूर्ण होण्याची जाणीवच माणसांना वेडं करून सोडते यात जे लोक वेडे होतात ते वेडेपणातच,स्वप्नलोकात स्वतःला महत्त्वपूर्ण मानतात.ते स्वतःलाच महत्त्व देतात,जे त्यांना वास्तव जगात मिळत नाही.अमेरिकेत जितके मनोरुग्ण आहेत त्यांची संख्या इतर आजारांनी पीडित असलेल्या रुग्णांपेक्षा जास्त आहे.
वेडेपणाचे कारण काय असते? या प्रश्नाचे कुणीही योग्य उत्तर देऊ शकणार नाही.पण आम्हाला हे नक्की माहीत आहे,की सिफीलिससारखा रोग मेंदूच्या पेशी नष्ट करतो आणि याचा परिणाम म्हणजेच वेडेपणा असतो.खरे तर जवळपास अर्धे मानसिक रोग शारीरिक कारणांनी होतात.उदा.मानसिक आघात,
दारु,मादक किंवा विषारी पदार्थ आणि अपघात;पण उरलेले अर्धे आयुष्य हा या कहाणीचा सर्वांत भयंकर हिस्सा आहे - उरलेल्या अर्धवेड्या लोकांच्या मेंदूच्या पेशींमध्ये कुठलीच शारीरिक गडबड झालेली नसते.पोस्टमॉर्टेम परीक्षणांमध्ये जेव्हा मरणाऱ्या रुग्णांच्या मेंदूच्या पेशी मायक्रोस्कोपखाली बघितल्या गेल्या तेव्हा त्या तेवढ्याच निरोगी होत्या जेवढ्या तुमच्या-माझ्या असतात.
मग हे लोक वेडे का होतात ?
मी हा प्रश्न चार प्रमुख मनोचिकित्सालयातल्या एका प्रमुखाला विचारला.या प्रमुखाला आपल्या विषयातल्या ज्ञानासाठी अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले होते. त्याने स्पष्टपणे मला सांगितले की,लोक वेडे का होतात हे त्यालां माहिती नाही.कुणीच याचे पूर्णपणे कारण जाणत नाही.परंतु तो असेही म्हणाला,की जे लोक वेडे होतात त्यांच्यापैकी बरेचजण वेडेपणाच्या अवस्थेत त्या महत्त्वपूर्ण भावनेचा अनुभव घेतात,जी त्यांना वास्तव जगात मिळत नाही.या तज्ज्ञाने मला एक कहाणी ऐकवली-
"माझ्या एका स्त्री रुग्णाच्या विवाहाचा दुःखद अंत झाला होता.तिला प्रेम,शारीरिक समाधान,मुले आणि सामाजिक प्रतिष्ठा हवी होती.पण जीवनाने तिच्या या आशांवर पाणी फिरवले.तिचा पती तिच्यावर प्रेम करीत नव्हता.तो तिच्याबरोबर जेवणसुद्धा करीत नसे.तिला त्याचे जेवण वरच्या मजल्यावरच्या त्याच्या खोलीत वाढायला सांगत असे.त्यांना मुलेबाळे नव्हती आणि तिला सामाजिक प्रतिष्ठाही नव्हती.ती वेडी झाली आणि आपल्या कल्पनेत तिने आपल्या पतीला घटस्फोट दिला आणि पुन्हा एकदा आपल्या लग्नाआधीचे नाव लावायला लागली.तिला आता असे वाटतेय,की ती एका श्रीमंत माणसाची पत्नी झाली आहे आणि ती स्वतःला इतरांनी लेडी स्मिथ म्हणावे असा आग्रह धरते.
मुलांबद्दल बोलायचं तर ती अशी कल्पना करते,की प्रत्येक रात्री ती एका नव्या बाळाला जन्म देते.जेव्हा मी तिला बघायला जातो तेव्हा ती म्हणते, 'डॉक्टर, काल रात्री मी एका बाळाला जन्म दिलाय.'
तिच्या भ्रमाचे जहाज वास्तवाच्या खडकावर आपटून चक्काचूर झाले आहे.पण वेडाच्या काल्पनिक प्रदेशात ती आपली स्वप्नं खरी करते आहे." हे दुःखदायी आहे का? मला माहीत नाही.तसे या डॉक्टरने असे पण म्हटले,"काश! मी तिचे वेड दूर करून एकवार पुन्हा तिची विचार करण्याची,समजण्याची शक्ती परत आणू शकलो असतो.पण कदाचित मी तसे केले नसते.ती आज जेवढी आनंदी / आहे तेवढी या आधी कधीच नव्हती."
जर अनेकजण महत्त्व मिळण्याच्या भावनेसाठी इतके भुकेले आहेत की ते त्यापायी खरोखरीच वेडे होऊ शकतात,तर जरा विचार करा की तुम्ही आणि मी आपल्या आसपासच्या लोकांची खरी प्रशंसा करून किती मोठा चमत्कार करू शकतो आणि किती तरी प्राप्त करू शकतो.
चार्ल्स श्वाब अमेरिकन उद्योगधंद्याच्या त्या पहिल्या व्यक्तींपैकी एक होते,ज्यांना एका वर्षात दहा लाख डॉलर्सपेक्षाही जास्त पगार (तेव्हा आयकर नसे आणि दरमहा ५० डॉलर्स कमावणारा माणूस श्रीमंत समजला जायचा) मिळत होता.त्यांना अँड्रयू कार्नेगीने १९२१ मध्ये युनायटेड स्टेटस् स्टील कंपनीचे पहिले अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आणि त्यावेळी श्वाबचे वय फक्त ३८ होते.(नंतर श्वाब यू.एस.स्टील सोडून गोत्यात आलेल्या बेथलेहम स्टील कंपनीचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी तिला अमेरिकेतील सर्वाधिक लाभदायक कंपन्यांमधील एक बनवली).
कार्नेगीने चार्ल्स श्वाबला एका वर्षात दहा लाख डॉलर्स किंवा दररोज तीन हजार डॉलर्सपेक्षा अधिक पगार का दिला ? श्वाब अतिशय हुशार होते म्हणून? नाही.मग काय ते स्टील उद्योगातले सर्वांत मोठे माहीतगार होते म्हणून ? नाही.स्वतः श्वाबचे हे मानणे होते की त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या अनेक लोकांना त्यांच्यापेक्षा स्टील बनवण्याबद्दल जास्त ज्ञान होते.
श्वाब म्हणतात की त्यांना इतका जास्त पगार मिळण्याचे सर्वांत मोठे कारण हे होते,की ते लोकांबरोबर व्यवहार करण्याच्या कलेत निपुण होते.मी त्यांना हे कसे काय शक्य झाले असे विचारले.मी त्यांचे रहस्य त्यांच्याच शब्दात सांगतो.असे शब्द,जे सुवर्णाक्षरात लिहून प्रत्येक शाळा, घर, दुकान आणि ऑफिसात टांगून ठेवायला हवेत. असे शब्द जे मुलांनी पाठ करून टाकायला हवेत. जे जीवनात कधीही कामी येणार नाहीत असे ग्रामर किंवा ब्राझीलचे वार्षिक पर्जन्यमान पाठ करण्यापेक्षा, तुमचे व माझे जीवन आमूलाग्र बदलून जाईल असे ते शब्द…
असे आहेत श्वाब यांचे शब्द...
"मी मानतो की माझी सर्वांत मोठी हातोटी आपल्या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्याची कला आहे आणि स्तुती व प्रोत्साहनाद्वारे लोकांकडून सर्वोत्तम काम मी करवून घेतो.वरिष्ठांच्या टीकेपेक्षा या जगात दुसरी कुठलीच गोष्ट अशी नाही जी कोणाच्याही महत्त्वाकांक्षेला पायदळी तुडवू शकेल.मी कधीच कुणाची निंदा करीत नाही.मी प्रोत्साहन देण्यावर विश्वास ठेवतो जेणेकरून कर्मचारी काम करायला प्रेरित होतील.म्हणूनच मी स्तुती करायला तत्पर असतो आणि चूक काढण्यात कंजूषी करतो.जर मला एखादी गोष्ट पसंत पडली तर मी मनापासून तारीफ करतो आणि मुक्त कंठाने प्रशंसा करतो."
तर श्वाब असे करीत.पण सामान्य लोक काय करतात? अगदी याच्या उलट.जर त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही तर ते आपल्या कर्मचाऱ्यांवर तोंडसुख घेतात.जर त्यांना एखादी गोष्ट आवडली तर मात्र ते त्याबद्दल काहीही बोलत नाहीत.एक जुनी म्हण आहे : "मी एक चुकीचे काम केले,ज्यासाठी मला नेहमीच दोष दिला गेला.मी दोनदा चांगले काम केले, परंतु त्याबद्दल मला कधीच कुणी ऐकवले नाही."
श्वाबचे म्हणणे होते,"जीवनाच्या माझ्या दीर्घ प्रवासात मी जगातल्या अनेक देशांच्या महान व्यक्तींना भेटलो आहे.आजपर्यंत अशी व्यक्ती भेटली नाही,मग ती कितीही उच्च पदावर असेल,जी टीकेऐवजी स्तुतीच्या वातावरणात जास्त चांगले काम करू शकत नसेल."श्वाबच्या मते अँड्रयु कार्नेगीच्या अपूर्व यशाच्या प्रमुख कारणांपैकी हे एक कारण होते.कार्नेगी आपल्या सहकाऱ्यांची समूहात,तसेच खासगीमध्येही नेहमी प्रशंसा करत.
कानेंगी तर आपल्या कबरीच्या दगडावरसुध्दा आपल्या कर्मचाऱ्यांची तारीफ करणे विसरले नाहीत.त्यांनी स्वतःसाठी हा स्मृतिलेख लिहून ठेवला होता-"इथे तो मनुष्य झोपला आहे जो जाणत होता की आपल्यापेक्षा जास्त समजदार लोकांना आपल्या आसपास कसे एकत्रित करायचे."प्रामाणिक प्रशंसेचं हेच ते रहस्य,ज्यामुळे जॉन रॉकफेलर इतके यशस्वी झाले.जेव्हा त्यांचे भागीदार एडवर्ड टी.बेडफोर्ड यांच्यामुळे दक्षिण अमेरिकेच्या एका करारामध्ये कंपनीला ४० टक्के नुकसान झाले,तेव्हा रॉकफेलर त्यांच्यावर टीका करू शकत होते.पण ते जाणत होते की बेडफोर्डने त्यांच्याकडून पूर्ण प्रयत्न केला होता.तसेही आता नुकसान तर झालेच होते.म्हणून रॉकफेलरने त्यांचे अभिनंदन करण्याचे कारण शोधूनच काढले.त्यांनी बेडफोर्डचे अभिनंदन करताना म्हटले,"तुम्ही खर्चाची ६० टक्के रक्कम तर वाचवली,हे फार चांगले झाले," पुढे असेही म्हणाले,"आपण आपल्या मेंदूचा वापर नेहमीच इतक्या चांगल्या तन्हेने करू शकत नाही."
आता मी एक कहाणी सांगणार आहे,ज्यात सत्य नक्कीच दडलेले आहे.
"एका खेडुत स्त्रीने दिवसभर काबाडकष्ट करून आपल्या परिवारासमोर जेवणाऐवजी लाकडाचा भुसा ठेवून दिला.जेव्हा पती व मुलांनी या अजब प्रकाराचे कारण विचारले,तेव्हा त्या स्त्रीने उत्तर दिले,"मला वाटलं की तुमचं लक्ष याकडे जातच नाही की तुमच्यासमोर जेवण ठेवलं जातं की भुसा.गेली वीस वर्षे मी तुम्हा लोकांसाठी जेवण बनवते आहे पण तुम्ही मला कधी सांगितलं नाही की तुम्ही भुसा खात आहात."
घरातून पळून गेलेल्या महिलांबाबत काही काळापूर्वी संशोधन झाले.पळून जाण्यामागचे कारण होते 'प्रशंसेचा अभाव' आणि मी पैज लावतो,की हेच कारण घरातून पळून जाणाऱ्या नवऱ्यांचेही असणार! आम्ही बहुतेक वेळा आपल्या जोडीदाराला हे सांगायची तसदीच घेत नाही की आम्ही त्याच्या/तिच्यामुळे प्रभावित आहोत म्हणून.माझ्या वर्गात एका सदस्याने आपल्या जीवनातली एक घटना ऐकवली ज्यामध्ये त्याच्या पत्नीने त्याच्यापाशी एक आग्रह धरला होता.त्याची पत्नी व अन्य महिला चर्चमध्ये एका आत्मसुधार कार्यक्रमात सामील झाल्या.एक दिवस त्याच्या पत्नीने त्याला तिच्यातले सहा दोष काढायला सांगितले,जे सुधारल्याने ती अधिक चांगली पत्नी होऊ शकेल.
तिचा पती हे ऐकून हैराण झाला.तो म्हणाला, "पत्नीच्या अशा आग्रहाने मी आचंबित झालो.खरे पाहिले तर मी सहज तिच्या हातात तिच्यातल्या दोषांची यादी देऊ शकलो असतो,ज्यामध्ये सुधारणेची गरज होती.ईश्वर जाणतो की तीसुध्दा अशा हजार गोष्टींची यादी माझ्या हातात देऊ शकली असती ज्यांमध्ये मला सुधारणेची आवश्यकता होती;पण मी असे केले नाही.मी तिला म्हटलं,"मला याबाबत विचार करायला वेळ दे.मी उद्या सकाळी तुला याचे उत्तर देईन."
दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो आणि फुलवाल्याला फोन करून माझ्या पत्नीसाठी सहा गुलाबांच्या फुलांचा नजराणा पाठवायला सांगितला. सोबत एक चिठ्ठी होती,"मला तुझे सहा दोष माहीत नाहीत,जे सुधारण्याची गरज आहे.तू जशी आहेस तशीच मला फार आवडतेस."
त्या संध्याकाळी जेव्हा मी घरी परतलो तेव्हा तुम्ही सांगू शकाल का की दरवाजात माझं स्वागत कुणी केलं? अगदी बरोबर ! माझ्या पत्नीने ! तिच्या डोळ्यांत अश्रू भरले होते. हे …! अपुर्ण