१९१५ मध्ये अमेरिकेमध्ये दहशतीचं वातावरण होतं.
विश्वयुद्ध एक वर्षापेक्षा अधिक काळ सुरु होतं.युरोपातले देश एकमेकांना निष्ठुरपणे मारत होते.मानवाच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर हिंसा कधी झाली नव्हती.शांततेचं वातावरण पुन्हा स्थापन होऊ शकणार होतं का? कुणाला ठाऊक नव्हतं.परंतु वुडरो विल्सनने एकदा प्रयत्न करून पाहायचं ठरवलं.त्यांनी युरोपच्या शासकांकडे व सेनापतींकडे शांती-संदेश घेऊन एक व्यक्तिगत प्रतिनिधी,एक शांतिदूत पाठवण्याचा निर्णय घेतला.विल्यम जेनिंग्ज ब्रायन,जे सेक्रेटरी ऑफ स्टेट होते,ते शांतीदूत बनून जायला तयार होते.त्यांना मानवतेची सेवा करायची इच्छा होती व त्यामुळे आपलं नाव इतिहासात अमर व्हावं असं त्यांना वाटत होतं.परंतु विल्सनने आपला जिगरी दोस्त आणि सल्लागार कर्नल एडवर्ड एम हाउस याला शांतिदूत बनवून पाठवून दिलं.ही बातमी ब्रायनला ऐकवण्याची जबाबदारीही कर्नल हाउसवर सोपवली गेली,ज्यामुळे त्यांना वाईट वाटू नये.
कर्नल हाउसने आपल्या रोजनिशीत लिहिलं आहे,"जेव्हा ब्रायनने ऐकले की मला शांतिदूत बनवून युरोपला पाठवले जातेयतेव्हा ते उघडपणे निराश झाले.ते म्हणाले की,'हे काम मी स्वतः करू इच्छित होतो." यावर मी उत्तर दिलं-'राष्ट्रपतींना असं वाटत होतं की शांतिदूताच्या रुपात जर आपण गेला असता तर सगळ्या जगाचे लक्ष या गोष्टीकडे आकर्षित झाले असते आणि लोकांना नवल वाटले असते की आपणे तिथे का गेलात?'तुम्हाला इशारा समजला? हाउसने ब्रायनला एका तन्हेने हे सांगितले,ते काम इतकं महत्त्वपूर्ण नव्हतं की त्यांच्यावर सोपवले जावे.ब्रायनचं समाधान झालं.कर्नल हाउसपाशी दुनियादारीची समज होती,अनुभव होता आणि कूटनीतीचे ज्ञानही होते.
त्यांना हा अमूल्य नियम माहीत होता.समोरच्या व्यक्तीवर कुठलेही काम अशा तऱ्हेने सोपवा,की तो खुश होऊन तुम्ही सांगितलेले काम करेल.
वुडरो विल्सनने जेव्हा विलियम गिब्ज मॅकाडूला आपला कॅबिनेट सदस्य बनवले,तेव्हा त्यांनीही हीच नीती वापरली.हा तो सर्वोच्च सन्मान होता, जो ते कुणालाही देऊ शकले असते.पण विल्सनने हा प्रस्ताव अशा तऱ्हेने मांडला की ज्यामुळे मॅकाडूला दुप्पट महत्त्व मिळेल. मॅकाडूच्या स्वतःच्या शब्दातच ही कहाणी ऐका.
" त्यांनी (विल्सननी) म्हटलं की ते आपली कॅबिनेट बनवताहेत आणि जर मी वित्तमंत्री बनलो तर त्यांना खूप आनंद होईल.त्यांची बोलण्याची तन्हा खूप सुखद होती.त्यांनी असं दाखवलं की त्यांचा प्रस्ताव स्वीकार करून मी त्यांच्यावर उपकार करतोय."
दुर्भाग्याने विल्सन नेहमी अशा व्यवहारकुशलतेने वागले नाही.जर त्यांनी असं केलं असतं तर आज इतिहास काही वेगळाच झाला असता. उदाहरणार्थ,अमेरिकेला लीग ऑफ नेशन्समध्ये सामील करण्याचाच मामला घ्या.
विल्सनने सीनेट व रिपब्लिकन पार्टीला या प्रकरणात खुश ठेवले नाही.एलिहू रूट वा चार्ल्स इव्हान्स ह्यूज किंवा हेन्री कॅबॉट लॉज यांना आपल्या बरोबर घेऊन गेले नाही.त्याऐवजी त्यांनी आपल्या पार्टीच्या अनोळखी सदस्यांना शांती-वॉनॅनला बरोबर नेलं.त्यांनी रिपब्लिकन्सला अपमानित केलं आणि त्यांना ही गोष्ट जाणवून दिली की लीगचा विचार रिपब्लिकन पार्टीचा नसून खुद्द विल्सनचा आहे.विल्सनने त्यांना स्पर्शसुध्दा करू दिला नाही.मानवी संबंधांना इतक्या वेगळ्या प्रकारे हाताळल्यामुळे त्यांनी आपल्या कारकिर्दीचा सत्यानाश केला,आपली तब्येत बिघडवून घेतली,आपलं आयुष्य कमी करून घेतलं.यामुळेच अमेरिकेला लीगच्या बाहेर राहावं लागलं आणि विश्वाचा इतिहास बदलला.
समोरच्या व्यक्तीवर कार्य अशा त-हेने सोपवा की ती खुश होऊन तुमच्या म्हणण्याप्रमाणे काम करेल.ही नीती केवळ राजनेते किंवा कूटनीतीज्ञच वापरत नाहीत.फोर्ट वेन, इंडियानाचे डेल ओ.फेरियरने आम्हाला सांगितले की त्यांनी कसे आपल्या छोट्या मुलाकडून आनंदाने सोपवलेले काम करून घेतले.
" जेफवर झाडावरून पडलेल्या पिअर्स गोळा करण्याचे काम सोपवले गेले होते,जेणेकरून हिरवळ कापायला आलेल्या माणसाला थांबून त्या उचलाव्या लागू नयेत.
त्याला हे काम पसंत नव्हतं आणि बहुतेक वेळा हे काम होतंच नसे किंवा द्याल तर इतक्या वाईट त-हेने व्हायचे की हिरवळ कापणाऱ्याला अनेकदा थांबून थांबून खाली पडलेल्या पिअर्स गोळा कराव्या लागत. सरळ रागावण्याऐवजी मी एक दिवस त्याला म्हटलं,"जेफ, मी तुझ्याशी एक तडजोड करीन म्हणतो.पिअर्सने भरलेली एक टोपली उचलण्यासाठी मी तुला एक डॉलर देईन.पण तुझं काम संपल्यावर मला एकही फळ जमिनीवर दिसलं तर मी प्रत्येक पिअर्समागे एक डॉलर तुझ्याकडून परत घेईन.बोल,सौदा मंजूर आहे? तुमच्या लक्षात आलंच असेल की त्यानंतर एकसुध्दा पिअर्स जमिनीवर पडलेली आढळली नाही.तो केवळ जमिनीवर पडलेल्या सर्व पिअर्स वेचून घेत नसे तर मला त्याच्यावर नजर ठेवावी लागत असे की कुठे तो झाडावरची फळं तोडून आपली टोपली भरत तर नाही ना!"
मी अशा एका व्यक्तीला जाणतो जी भाषणाचा आग्रह,
मित्रांची आमंत्रणं अशा प्रकारे अस्वीकार करायची की लोक नाराज होत नसत.त्याची पध्दत काय होती ? तो आपण खूप व्यग्र आहोत अन् त्याला हे काम करायचं,ते काम करायचं असं न सांगता,आधी तर तो आमंत्रणासाठी धन्यवाद देत असे.मग ते आमंत्रण स्वीकार करायला तो कसा असमर्थ आहे हे सांगून दुसऱ्या एखाद्या वक्त्याचं नावही सुचवत असे. दुसऱ्या शब्दात,तो समोरच्या व्यक्तीला आपल्या अस्वीकृतीबद्दल अप्रसन्न होण्याची संधीच देत नसे.तो ताबडतोड समोरच्या व्यक्तीच्या विचारप्रवाहाला कुणा अन्य वक्त्याकडे वळवून देत असे,
जो त्याचं आमंत्रण स्वीकार करण्याच्या स्थितीत असे.
गुंटुर स्किमित्झ पश्चिम जर्मनीत आमच्या अभ्यासक्रमात भाग घेतला.त्यांनी आपल्या फूड स्टोरमधील एका कर्मचाऱ्याचे प्रकरण सांगितले.ही कर्मचारी जिथे वस्तु दर्शनी फळ्यांवर ठेवलेल्या असतात,त्यांना किंमतीचे लेबल लावण्याच्या कामात निष्काळजीपणा करीत होती.
यामुळे समस्या निर्माण व्हायची आणि ग्राहक तक्रार करायचे.वारंवार समजावून, फटकारून आणि वाद घालूनसुध्दा फारसा फायदा झाला नाही.शेवटी स्किमित्झने तिला आपल्या ऑफिसात बोलावले आणि म्हणाले, 'मी तुझी दुकानात लेबल लावायच्या कामावर सुपरवायझर म्हणून नेमणूक करतोय.भविष्यात तुला ह्यावर लक्ष ठेवावे लागेल की सगळ्या वस्तूंना लेबलं लावली आहेत की नाही.' या नव्या जबाबदारीने वक्षबदललेल्या पदनावामुळे तिचा व्यवहार पूर्णपणे बदलून गेला आणि त्यानंतर ती आपले काम व्यवस्थित करू लागली.काय म्हणता? हा पोरकटपणा आहे? कदाचित असेलही.पण जेव्हा नेपोलियनने 'लिजन ऑफ ऑनर'च्या सन्मानार्थ आपल्या शिपायांना १५,००० क्रॉस वाटले,आपल्या अठरा अधिकाऱ्यांना 'मार्शल ऑफ फ्रान्स'चे सन्मान दिले आणि आपल्या सेनेला 'ग्रँड आर्मी' असे संबोधित केले,तेव्हा त्यालाही पोरकट समजण्यात आले होते.नेपोलियनची यावरून निंदा केली गेली.
युद्धाच्या आगीत होरपळलेल्या सैनिकांच्या हातात त्याने खेळणी किंवा खुळखुळे दिल्याची टिका करण्यात आली.यावर नेपोलियनने उत्तर दिले," मानवावर खेळण्यांनीच शासन केले जाऊ शकते."
पदवी देऊन नेपोलियनला उपयोग झाला होता, हे तुमच्याही उपयोगी पडू शकेल.उदाहरणार्थ,स्कार्सडेल,न्यू यॉर्कमध्ये राहणारी माझी एक मैत्रीण अर्नेस्ट जेंट या गोष्टीने त्रस्त होती की काही मुले तिच्या हिरवळीवर धावून ती खराब करतात.
तिने मुलांना धमकावले,लालूच दाखवली,पण काही फरक पडला नाही.मग तिने त्या टोळीच्या पुढाऱ्याला बोलावले आणि त्याला एक पदवी बहाल करून त्याला महत्त्वपूर्ण होण्याचा अनुभव दिला.तिने त्याला आपला 'हेर' म्हणून नेमलं.तिने आपल्या 'हेराला' सांगितले की तो हिरवळीचं रक्षण करेल अन् अनधिकृत लोकांना तिथे घुसण्याची परवानगी देणार नाही. यामुळे तिची समस्या सुटली. तिच्या 'हेराने' मागच्या अंगणात एक शेकोटी पेटवली. तो लॉनवर येणाऱ्या मुलांना भाजून राख करण्याची धमकी देत असे.
जेव्हा तुम्ही आग्रह कराल तेव्हा समोरच्याला अशा त-हेने सांगा की ते त्याच्या किती फायद्याचे असेल.आपण कटू आदेश देऊ शकतो,"जॉन, उद्या ग्राहक येणार आहेत आणि मला स्टॉकरूम स्वच्छ हवी.म्हणून व्यवस्थित केर काढ,स्टॉक नीट फळीवर लावून ठेव आणि काऊंटर स्वच्छ पुसून घे." किंवा आपण याच विचारांना अशा त-हेने व्यक्त करू शकतो,की जॉनला त्याचे फायदे समजून येतील,जे त्याला हे काम करण्यामुळे प्राप्त होतील.
" जॉन,आपल्याकडे एक काम आहे,ते ताबडतोब करायला हवंय. जर ते लगेच केलं तर आपल्याला नंतर कठीण जाणार नाही.मी उद्या काही ग्राहकांना आपला माल दाखवायला आणणार आहे.मी त्यांना स्टॉकरूम दाखवू इच्छितो,पण त्याची अवस्था फार चांगली नाहीये.जर तू ती रूम झाडून घेशील,माल फळीवर रचून,काऊंटर स्वच्छ करशील तर सर्वकाही व्यवस्थित दिसेल आणि कंपनीची प्रतिमा उंचावण्यात तुझे महत्त्वाचे योगदान राहील."
तुम्ही सुचवलेली कामं पूर्ण करून जॉन खूश होईल का? कदाचित फार नाही खुश होणार, पण आताची सांगण्याची पद्धत ऐकून नक्कीच खूश होईल. तेव्हा तुम्ही त्याला फायदे सांगितले नव्हते.आम्ही जर असं धरून चाललो की जॉनला आपल्या स्टॉकरूमच्या प्रतिमेचा अभिमान वाटतो,आणि तो कंपनीची चांगली प्रतिमा बनवण्यात योगदान देण्यास इच्छुक आहे तर त्याची काम करायची भूमिका अधिक सहयोगपूर्ण असेल याची शक्यता जास्त आहे. जॉनला हेसुद्धा सांगायला हवं की,ते काम आता नाही तरी नंतर करायचेच आहे. काम आत्ताच उरकले तर नंतर करावे लागणार नाही.
एक महत्वाची सुचना …!
भारताचे नौकानयन शास्त्र..Navigation of India.. हा दिनांक १४.०२.२३ रोजी लिहिलेल्या लेखामध्ये एका आफ्रिकन दुभाष्याला घेऊन हा,त्या भारतीय जहाजाच्या मालकाला भेटायला गेला.हे वाक्य एका आफ्रिकन दुभाष्याला घेऊन हा,( वास्को डी गामा ) त्या भारतीय जहाजाच्या मालकाला भेटायला गेला.असे वाचावे.