तुमच्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी सर्वात आधी वेगळ्या पद्धतीने विचार करायला सुरुवात करा. - नॉर्मन व्हिंसेंट पील.
२८ जुलै,२००६.अटलांटा,जॉर्जिया.एका भल्या मोठ्या बॉलरूममधील माझे व्याख्यान मी नुकतेच संपविले होते.
आठवड्याच्या शेवटास असलेल्या या चर्चासत्रास शेकडो लोक अटलांटा येथे आले होते, ज्यामध्ये व्यक्तिगत विकास या क्षेत्रातील जिम रॉन आणि बॉब प्रॉक्टर यासारखे उत्कृष्ट वक्ते सहभागी झाले होते.तुम्हाला कदाचित माहीत असेल की,जिम रॉन आणि बॉब प्रॉक्टर यांना व्यक्तिगत स्वमदत उद्योगातील एक 'आख्यायिका'च म्हणता येईल. गेल्या ४० हून जास्त वर्षांमध्ये जगभरातील लाखो लोकांपुढे,प्रत्येकाने सादरीकरण केलेले आहे.
तुमच्या वृत्तीत बदल करा आणि तुमचे जीवनच बदलेल ! दृष्टिकोन म्हणजे सर्वकाही,अनुवाद - डॉ.मोहन उसगावकर,
ॶॅटिट्यूड इज एव्हरिथिंग,मुळ लेखक - जेफ केलर,प्रकाशक - साकेत प्रकाशन,प्रा.लि.पुणे
जेव्हा सर्वांनी ते सभागृह सोडले रूम सोडली तेव्हा मी माझ्या सर्व गोष्टी गोळा करायला सुरुवात करणार होतो; पण काही कारणासाठी मी क्षणभर थांबलो होतो.मी सन १९८५ मध्ये मागे गेलो जेव्हा मी माझ्या अभ्यासिकेत निराश आणि नकारार्थी विचारांना कवटाळून बसलो होतो.
त्यावेळेस,मी जिम रॉन आणि बॉब प्रॉक्टर यांचे ध्वनिफितीवरचे कार्यक्रम ऐकण्यास सुरुवात केली होती.
आता २० वर्षानंतर,त्यांच्याबरोबर एका व्यासपीठावर व्याख्यान करायचा मान मला लाभला होता.
"हे कसे घडले?" असा माझा मीच विचार करीत होतो. मला स्पष्ट आणि मोठ्या आवाजात माझेच उत्तर मिळाले,'मी माझी वृत्ती बदलली.'
हे पाहा,जेव्हा तुम्ही तुमची वृत्ती बदलता तेव्हा तुमचे विश्वच चमकून जाते.तुम्ही चैतन्यमय होता.तुम्हाला नव्या शक्यता दिसू लागतात.तुम्ही चैतन्यमय होता. तुम्ही कृतिशील बनता.तुम्ही असामान्य परिणाम साध्य करता.म्हणून मी म्हणतो,'जेव्हा तुम्ही तुमची वृत्ती बदलता तेव्हा तुमचे जीवनच बदलते!'
जर मी तुम्हाला सांगितले की,गेली २० वर्षे ही माझी यशाची केवळ एक माळ होती.तर मी तुम्हाला खोटे सांगतोय असे होईल.खरं तर सर्व बाबी यशापासून दूर होत्या.या वाटचालीत माझ्या पराजयांचा आणि पिछेहाटींचाही सहभाग होता;परंतु या पुस्तकात मी ज्या यशाच्या तत्त्वाबद्दल बोललेलो आहे त्या तत्त्वांनी मला असे धाडस,मार्गदर्शन आणि बळ दिले की,ज्यामुळे माझी पुढील वाटचाल चालू राहिली.
तुमच्या आयुष्यावर ताबा मिळवा..
हे पुस्तक वाचण्यासाठी वेळ दिल्याबद्दल मी तुमची प्रशंसा करतो.यावरून हे दिसून येते कीतुमचे अविश्वसनीय मनोबल विकसित करण्यामध्ये तुम्हाला खरंच रुची आहे.तरीसुद्धा,हे पुस्तक वाचणे ही फक्त, तुम्हाला जसे जगावयाचे आहे,तसे वागण्याची पहिली पायरी आहे.तुम्ही जेव्हा या कल्पनांवर लक्ष केंद्रित करून-अमलात आणण्यासाठी कृती कराल तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात विलक्षण घडामोडी घडवून आणण्याच्या मार्गावर असाल.
काम असे करा की ते असफल होणं अशक्य असेल. - डोरोथी बँडे
तुम्ही कदाचित आकडेवारी पाहिली असेल की जी सांगते,
लोकसंख्येच्या फक्त ५ टक्के लोक यशाची उच्च पातळी गाठतात,असे का बरे? २० वर्षांच्या संशोधनानंतर मला ते पटलेले आहे की,ते असे का असते.या पुस्तकात नमूद केलेली यशाची तत्त्वे,एखादी व्यक्ती दैनंदिन पातळीवर अमलात आणेल अशी व्यक्ती क्वचित असेल.क्वचितच एखादी व्यक्ती सातत्याने
सकारात्मक वृत्ती मनी बाळगते की,त्यामुळे त्याचे विचार ही त्याची सत्यता बनू शकेल.क्वचित एखादी व्यक्ती, स्वतः वापरलेल्या शब्दांकडे लक्ष ठेवते,ते हे लक्षात घेऊन की ती तिच्या मनाची तयारी सर्वसाधारण किंवा अपयश यासाठी करीत आहे.
अशीही एखादी व्यक्ती क्वचितच असते की जिच्यात,तिला समोर येणाऱ्या भीतींना तोंड द्यायचे धाडस असते, कारण त्यामुळेच ती ज्या गोष्टी करायला घाबरते,त्याच गोष्टी करून तिची कुवत विकसित होते.
क्वचित एखादीच व्यक्ती अशी असते जी प्रत्येक काळ्या ढगामध्ये चंदेरी किनार शोधत असते.
आणि क्वचितच एखादी व्यक्ती निर्धार करते, सकारात्मक वृत्तीने पाठपुरावा करते.... आणि तिच्याकडेच काम करून घेण्याची चिकाटी असते.
अशा अत्यंत दुर्मीळ व्यक्तींपैकी तुम्ही एक असावयास हवे,असे मी तुम्हाला आव्हान करतो.
तुम्ही कधी पाहिलेल्या स्वप्नापेक्षा जास्त काही बनण्याची कुवत तुमच्यात असते.तुमच्यात महानता आहे... आणि तुमची वृत्तीच,
तुमच्या क्षमतेला वाट करून देणारी गुरुकिल्ली आहे.माझी वृत्तीच बदलल्याने,माझे जीवनच बदलले आणि जर चांगली वृत्ती माझ्या जीवनात चमत्कार घडवू शकली तर तुमच्या जीवनामध्येही ती चमत्कार घडवू शकते !
डॉ.चार्लस् स्विन्डॉल यांचे हे शब्द मला तुम्हाला सांगायचे आहेत.डॉ.स्विन्डॉल यांनी वृत्तीबाबतची मुख्य लक्षणे शोधून,ती आपल्या जीवनाच्या दिशेवर कसे नियंत्रण ठेवतात,ते सांगितले आहे.
" जितके जास्त दिवस मी जगेन,तेवढाच जीवनावर होणाऱ्या वृत्तीचा प्रभाव मला जास्त समजेल.दृष्टिकोन हा वास्तवापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो,असे मला वाटते.दृष्टिकोन हा भूतकाळ,शिक्षण,पैसा,परिस्थिती,अपयश,यश,इतर लोक जो विचार करतात किंवा बोलतात किंवा काय करतात;या सर्व बाबींपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे.तो बाह्य रंगरूपापेक्षा,
पात्रतेपेक्षा किंवा कौशल्यापेक्षा महत्त्वाचा आहे.दृष्टिकोन हा संस्था,चर्च,घर बनवते किंवा मोडते सुद्धा!
"लक्षणीय बाब ही आहे की,आपल्याला त्या दिवशी कुठली वृत्ती स्वीकारायची,याबाबतची पसंती आपण रोजच्या रोज करू शकतो.आपण आपला भूतकाळ बदलू शकत नाही...
आपण हे तथ्यपण बदलू शकत नाही की,लोक एका विशिष्ट पद्धतीने काम करतील. अपरिहार्य बाबी,आपण बदलू शकत नाही.फक्त एकच गोष्ट आपण करू शकतो की,आपल्याकडे
असलेल्या एकाच दोरीवर आपण खेळू शकतो आणि ती म्हणजे आपला दृष्टिकोन.
"मला हे पटले आहे की,जीवन म्हणजे १० टक्के ते आहे जे माझ्याबाबत घडून गेलेले आहे आणि माझा त्याला कसा प्रतिसाद असतो ते ९० टक्के आहे. आणि म्हणून ते आपल्याच हातात आहे... आपल्या वृत्तींवर आपलाच ताबा असतो.
खूप प्रभावी शब्द आहेत ना? डॉ.चार्लस स्विन्डॉल जे सुचवित आहेत तसे करा आणि " तुमच्याकडे असलेल्या एका दोरीवरच खेळा ".आता हीच वेळ आहे,तुमच्या वृत्तीवर नियंत्रण ठेवण्याची ! आता हीच वेळ आहे,तुमच्या स्वतःच्या आयुष्यात चमत्कार घडविण्याला सुरुवात करण्याची!
पुढे जात रहा.स्वतःवर विश्वास ठेवा.तुमची स्वप्ने साकारण्यासाठी धाडस आणि चिकाटी असू द्या.आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे 'दृष्टिकोन म्हणजे सर्वकाही!' हे कधीही विसरू नका…(समाप्त )
चारोळी (प्रारंभ)
"गणित जिथं खेळासारखं वाटे,
तिथं शिक्षक असतो दीपकसारखा वाटे,
ज्ञानाची मशाल पेटवणारा प्रकाश,
नागावचा दीप,ज्ञानासाठी खास!"
डॉ.दिपक मधुकर शेटे – एक दीप जो ज्ञानासाठी तेवत आहे...
शिक्षण म्हणजे केवळ माहिती नव्हे,तर प्रेरणा, आकलन व कृतीचा संगम." – या विचारांची मूर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ.दीपक मधुकर शेटे,कोल्हापूर जिल्ह्यातील नागाव या छोट्याशा गावातून आलेले,परंतु आज राज्यभरातील शैक्षणिक क्रांतीचे एक अग्रगण्य नाव.
साधेपणातून श्रेष्ठतेकडे..
साध्या शेतकरी कुटुंबात जन्म.ग्रामीण शिक्षणाचा पाया. परंतु त्यांच्यात होती एक वेगळी आग – शिक्षण क्षेत्रात काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची!त्यांचे बालपण अभ्यास,प्रयोग,आणि प्रश्न विचारण्याच्या वृत्तीत गेले.
"गणित" हे मित्र करणे.
गणित हा विषय बहुतांश विद्यार्थ्यांना भयावह वाटतो. पण डॉ.शेटेंनी याच विषयाला खेळ,प्रात्यक्षिकं,आणि रोजच्या जीवनाशी जोडत विद्यार्थ्यांना "गणितासोबत मैत्री" करायला शिकवलं.त्यांनी तयार केलेली 'गणितायन प्रयोगशाळा'ही महाराष्ट्रातील एक आगळीवेगळी संकल्पना ठरली आहे.
संस्कृत श्लोक जो त्यांच्या कार्याशी साजेसा आहे:
"विद्या ददाति विनयं,विनयाद् याति पात्रताम्।
पात्रत्वात् धनमाप्नोति, धनात् धर्मं ततः सुखम्॥"
(विद्या विनय देते,विनय पात्रता देते, पात्रता धन देते, धनाने धर्म,आणि धर्माने सुख मिळते.)
ही संकल्पना त्यांनी त्यांच्या शिक्षणात जीवंत केली आहे.
विद्यार्थ्यांना विद्या,विनय आणि उपयुक्तता यांचा संगम घडवला.
प्रयोगशीलतेचा शिक्षक..
गणितायन लॅब ही केवळ प्रयोगशाळा नाही,ती विद्यार्थ्यांच्या मनामनांतील भीती दूर करून,जिज्ञासेला चालना देणारी ज्ञानाची कार्यशाळा आहे.त्यात –
स्थानिक वस्तूंनी बनवलेली उपकरणं
खेळातून संकल्पना शिकवणं.
"करून बघा,समजेल" या तत्वाचा अवलंब
या सर्व गोष्टींमुळे आज त्यांच्या लॅबला राज्यभरातून अभ्यासदौरे येतात.
महान विचारवंतांची संगती
"Innovation is seeing what everybody has seen and thinking what nobody has thought." – Dr. Albert Szent-Györgyi
डॉ.शेटे यांचं कार्य या विचाराशी पूर्णपणे साजेसं आहे. त्यांनी खेड्यात बसून अशा गोष्टी केल्या,ज्या शहरी संसाधनांनी संपन्न शिक्षकांनाही सुचल्या नसतील.
नवोपक्रम आणि कृती संशोधन
त्यांनी केलेल्या कृती संशोधन प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांची गणितातील अचूकता वाढली,संकल्पनांचा गाभा स्पष्ट झाला आणि अभ्यासात रस निर्माण झाला.ते सतत प्रयोग करतात,निरीक्षण करतात आणि त्यातून नवे उपाय शोधतात.
समाजाप्रती बांधिलकी
ते केवळ शिक्षक नाहीत,तर एक प्रेरणादायी नेतृत्व आहेत.त्यांनी पालक,शिक्षक,शाळा समिती आणि समाज यांना एकत्र आणत सामूहिक शैक्षणिक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे.
पुरस्कार आणि गौरव
राज्यस्तरीय शिक्षक सन्मान
गणित विषयातील नवोपक्रम पुरस्कार
विविध प्रशिक्षणांतून मार्गदर्शन
गुणवत्ता शिक्षणासाठी सतत योगदान
हा शेवट नाही,सुरुवात आहे...
डॉ.शेटे यांचं कार्य म्हणजे एका दिव्याची ज्योत दुसऱ्या दिव्याला लागवून उजेड वाढवणं.ते विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागवतात आणि शिक्षकांमध्ये शिक्षण हे साधन नव्हे,साधना आहे ही भावना रुजवतात.
चारोळी (समारोप)
"गणिताचं बीज रुजवणारा,प्रयोगांनी ते फुलवणारा,
दीपक सर हे शिक्षक नाही,ते एक विचारांचा दरवळ!
झोळीत नाही संपत्ती,पण ज्ञानाचा आहे महासाठा,
नागावच्या मातीतला हिरा,महाराष्ट्राचा खरा दागिना!"