* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: लॉटरी ती ही झाडांची.. The lottery is that of trees

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

७/१/२४

लॉटरी ती ही झाडांची.. The lottery is that of trees

झाडं आपलं आंतरिक संतुलन सांभाळून असतात.

आपल्या शक्तीचा वापर ते अत्यंत काळजीपूर्वक करतात आणि ऊर्जेचा वापर काटकसरीने होतो.

यामुळे आपल्या सर्व गरजा ते पुरवू शकतात.आपली वाढ करण्यात त्यांची काही ऊर्जा खर्च होते.बुंध्याचा घेर आणि आपली उंची झाडाला वाढवायची असते. त्यासाठी फांद्या वाढायला हव्यात आणि वाढतं वजनही त्यांना सांभाळायचं असतं.या कामासाठी ऊर्जा वापरून झाली की स्वसुरक्षेसाठी काही ऊर्जा राखून ठेवली जाते. या ऊर्जेचा वापर करून त्यांना आपल्या भक्षकांवर रासायनिक मारा करून थोपवता येतं. आणि यानंतर प्रश्न उरतो तो आपल्या वंशवाढीचा.


ज्या प्रजाती दरवर्षी फुलतात,त्यांना वंशवृद्धीच्या दुष्कर उपक्रमाचे नियोजन करताना ऊर्जेचा सांभाळून विचार करावा लागतो.दोन-पाच वर्षातून एकदाच फुलणाऱ्या बीच आणि ओक सारख्या प्रजातींसाठी प्रजोत्पादनाचा काळ त्यांचं ऊर्जेचं गणित बिघडवू शकतं.जवळपास सर्वच ऊर्जा जीवनावश्यक कामांसाठी वापरली गेलेली असते आणि त्याउपर त्यांना मोठ्या प्रमाणात

बीजोत्पादनही करायचं असतं.आणि मग फुलं फुलवण्यासाठी फांद्यांमध्ये जागेची चढाओढ चालू होते.भरगच्च फांद्यांवर फुलांसाठी अजिबात जागा नसली तरी ती करावी लागते. जेव्हा पानं कोमेजून गळून पडतात तेव्हा झाडं अगदी ओसाड दिसू लागतात.अशा जंगलाकडे बघणाऱ्याला वाटेल की झाडांची अवस्था अगदीच बिकट आहे.पण जंगल आजारी नसतं, या काळात ते फक्त हळवं होतं.

आपली सर्व शक्ती पणाला लावून बीजोत्पादन करण्याच्या प्रयत्नात झाड असतं आणि त्यात झाडाला पानं कमी असतात त्यामुळे साखरेचे उत्पादनही कमी होतं.आणि असलेली साखर बियांमधील तेल आणि चरबी वाढवण्यात खर्ची पडते.त्यामुळे दैनिक गरजा भागवण्यासाठी,

थंडीपासून सुरक्षेसाठी आणि आजारांना प्रतिकार करण्यासाठी फारशी साखर उरत नाही.


अनेक कीटक याच क्षणाची वाट पाहत असतात. उदाहरणार्थ,बीच वृक्षावर'लिफ माइनिंग वीव्हील'नावाचा कीटक येतो आणि कोवळ्या हतबल पानांवर त्याची मादी आपली लाखो अंडी घालून जाते.अंड्यातून बाहेर पडलेली अळी पानाच्या दोन पृष्ठभागांमधल्या भागावर ताव मारते आणि खाता खाता तपकिरी रंगाचे पानाचे अवशेष सोडून पुढे जाते.मोठे झाल्यावर यांचे किडे पानाला भोकं पाडत पान खात सुटतात. बघणाऱ्याला वाटेल की पानांमधून बंदुकीची गोळी गेली की काय.एखाद्या वर्षी मोठ्या प्रमाणात कीटकांची पैदास होते तेव्हा बीचचे जंगल हिरवे न दिसता तपकिरी दिसू लागतं. सर्वसाधारणपणे यांच्यापासून सुरक्षा करण्यासाठी झाड आपली पानं कडवट करतात खरे,पण सर्व ऊर्जा फुलोऱ्यात खर्च झाल्यामुळे या वेळेस त्यांना शांतपणे भक्षकांची मेजवानी सोसावी लागते.


सशक्त झाडांना याचा फारसा त्रास होत नाही कारण त्यांना पुन्हा तब्येत सुधारण्यासाठी काही वर्षं मिळणार असतात.पण जर एखादं बीच झाड कीटकांच्या आक्रमणाच्या आधीच आजारी असेल तर मात्र त्याचं काही खरं नाही.याची जाणीव असतानाही झाड फुलोरा फुलवण्यात काटकसर करीत नाही.जंगलातील झाडांचा मृत्युदर वाढलेला असताना असं दिसतं की सर्वांत जास्त बाधित वृक्षांवर सर्वाधिक फुलोरा असतो.वढून आपली जनुकीय परंपरा संपून जाण्यापेक्षा आपल्या फुलांतून प्रजोत्पादन करून काही टिकून राहावी असं त्यांच प्रयोजन असणार. एखादा अपवादात्मक तीव्र उन्हाळा आला तर जंगलाचं चित्र असंच काहीसं होतं.कोरडा दुष्काळ पडून गेला की बरीच झाडं मरणपंथाला लागतात.पण ती सगळी या अवस्थेतही पुढल्या वर्षी सर्व शक्ती एकवटून फुलारतात.मोठ्या प्रमाणात बीजोत्पादन झालेलं वर्ष इतकंच सांगून जातं की इथे गतवर्षी काय परिस्थिती होती.येणारा हिवाळा कसा असेल याचा अंदाज त्यावरून लागत नाही. पुढे येणाऱ्या पानझडीच्या ऋतूत या झाडांच्या कमकुवत सुरक्षा क्षमतेचा परिणाम त्यांच्या बीजातून दिसून येतो.लिफ मायनर कीटक बीच फुलाबरोबरच त्याच्या फळावरही ताव मारतात.त्यामुळे जरी बीचच्या दाण्याची टरफले दिसू लागली तरी आत दाणा तयार होत नाही.


जेव्हा झाडातून बीज जमिनीवर पडतं तेव्हा त्याने कधी रुजावं याची प्रत्येक प्रजातीची वेगळी चाल असते.ते कसं? जर बीज मऊ,ओलसर जमिनीवर पडलं तर सूर्यप्रकाश मिळून ते उबदार झालं की त्याला लगेच रुजावं लागतं,नाहीतर एखादं भुकेलं रानडुक्कर किंवा हरिण त्याला फस्त करून टाकेल.

बियांची कवचं जंगलात विखुरलेली असतात आणि काही काळाने कुजून जातातं.बिजांचं रूपांतर लगेच रोपात झालं तरच भक्षकांपासून बिया सुरक्षित राहतात.बीज रुजण्याची ही चाल बीच आणि ओकसारखी मोठी झाडं खेळतात.या मोठ्या झाडांकडे फक्त ही एकच चाल असते त्यामुळे सूक्ष्म किटाणू आणि बुरर्शीपासून संरक्षणासाठी त्यांच्याकडे काहीही दूरगामी उपाययोजना नसते.


पण इतर काही प्रजाती आपल्या बियांना रुजण्यासाठी एक-दोन वर्षंही देतात.या चालीत बिजाला खाऊन टाकलं जाण्याचा धोका असतोच,पण या चालीचे फायदेही

आहेत. उदाहरणार्थ,जर पाऊस झाला नाही तर रुजलेल्या बीचं रोपटं मरून जातं आणि झाडांची सगळी मेहनत वाया जाते किंवा एखादं हरिण परिसरात चरायला आलं असेल तर त्या बिजाचं कोवळं रोप चटकन त्याच्याकडून खाल्लं जाऊ शकतं.याउलट जर एखाद्या झाडाचं बीज एक-दोन वर्षं जमिनीवर न रुजता तसंच राहिलं तर त्याचा धोका थोडा कमी होतो आणि किमान काही बिया रुजून त्यांची रोपं तरी मोठी होऊ शकतात.बर्ड चेरीच्या झाडाच्या बिया पाच वर्षांपर्यंत जमिनीवर नुसत्याच पडून राहू शकतात.अनुकूल परिस्थितीची ते शांतपणे वाट बघतात.बर्ड चेरी आद्यप्रवर्तक प्रजातीचे झाड असल्यामुळे ही चाल त्यांच्या दृष्टीने सगळ्यात कमी जोखमीची असते. 


बीच आणि ओक वृक्षाच्या फळांचे दाणे आपल्या आईच्या छायेतच पडलेले असतात.तिथे त्यांना अपेक्षित हवामान आणि परिस्थिती मिळाल्यामुळे त्यांची रोपं तिथंच वाढतात.पण बर्ड चेरीच्या बिया मात्र कुठेही जाऊन पडतात. याची फळं पक्षी खातात आणि बियांना त्यांच्या विष्टेच्या रूपातील सेंद्रिय खताच्या पाकिटात बंद करून जमिनीवर सोडतात.या पाकिटांच्या नशिबात जर कोरडी हवा आणि कडकडीत ऊन असलं तरी काही वर्षं पाकिटातच बिया जिवंत राहू शकतात आणि अनुकूल परिस्थिती येताच त्यातील थोड्या तरी बिया पुनरुज्जीवित होऊ शकतात.


पण नुसतं रुजून काय उपयोग? त्यापैकी किती जण मोठे होतील आणि पुढची सुदृढ पिढी जंगलात उभी राहील,

याचा हिशोब तसा सोपा आहे.सांख्यिक भाषेत बोलायचं तर प्रत्येक झाडाला आपली जागा घेण्यासाठी एकतरी पिल्लू मोठं करायचं असतं.ज्यांना मोठं होता येत नाही त्या बियांची रोपटी काही वर्षं तग धरतील खरी,पण कालांतराने त्यांची ताकद संपेल.अनेक झाडांच्या पायथ्याशी अशी शेकडो रोपटी असतात जी काही वर्षं तग धरतात आणि कुजून पुन्हा मातीचा घटक होऊन जातात.

मोकळ्या जागेत येऊन पडलेली काही थोडीच नशीबवान रोपटी प्रौढत्वाला पोहोचतात.


आपण हा सांख्यिक खेळ जरा पुन्हा पाहू.एक बीच वृक्ष किमान तीस हजार दाणे तरी बनवतो (हवामान बदलामुळे सध्या दर दोन-तीन वर्षांनी असं होत आहे,पण त्याच्याबद्दल आत्ता बोलायला नको).साधारण वयाच्या ऐंशी ते दीडशे वर्षांच्या काळात त्याला प्रजोत्पादन शक्य असतं.वाढ होत असताना झाडाला किती सूर्यप्रकाश मिळाला,यावर हे अवलंबून असतं. समजा,एक झाड चारशे वर्षांपर्यंत जगलं तर किमान साठ वेळा फळाला येऊन सुमारे अठरा लाख बिया बनवेल.यातून फक्त एकच विशाल वृक्ष होणार असतो.जंगल परिसंस्थेच्या संदर्भात हा यशाचा दर उत्तमच आहे.म्हणजे त्या नशीबवान रोपट्याला लॉटरी लागण्यासारखंच आहे.इतर सर्व इच्छुक रोपटी भक्षकांकडून खाल्ली जातात किंवा सूक्ष्म किटाणूंनी त्यांना कुजवून टाकलेलं असते.अशाच पद्धतीने प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणत्याही रोपट्याचं वृक्ष होण्याची शक्यता काय आहे,ते आता पाहू.यासाठी पॉपलर झाडाचं उदाहरण घेऊ.एक मोठा पॉपलर वृक्ष दरवर्षी साधारण साडेपाच कोटी बिया बनवतो.१७ त्यातून तयार झालेल्या इवल्याशा पॉपलर रोपट्यांना बीचच्या रोपट्यांची जागा घेण्याची नक्कीच इच्छा होत असेल.पण संख्याशास्त्रानुसार पॉपलरच्या रोपट्यांमधूनही फक्त एकच विशाल वृक्ष होऊ शकतो.


०३.०१.२४ या लेखातील पुढील लेख..