* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: स्नेह झाडांचा.. Love trees.. 🌳

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३/१/२४

स्नेह झाडांचा.. Love trees.. 🌳

झाडं आपलं जीवन संथपणे जगत असतात,हे त्यांच्या प्रजोत्पादन प्रक्रियेकडे पाहूनही जाणवतं.

त्यांच्यामध्ये प्रजननाचे नियोजन सुमारे एक वर्ष आधी सुरू होतं.पण सर्वच झार्ड आपला प्रणय वसंत ऋतूत सुरू करीत नाहीत.हे कोणत्या ऋतूत होणार ते त्यांच्या प्रजातीवर अवलंबून असतं.


सूचीपर्णी वृक्ष दरवर्षी एकदा तरी बीजोत्पादन करतात,

पण पानझडी वृक्षांचं तसं नसतं.येत्या वसंतात फुलायचं का एखादा वर्ष धीर धरायचा, यावर पानझडी जंगलात एकमत झालेलं असतं. एकाच वेळी फुलणं जंगलातील वृक्षांना पसंत असतं, कारण अशा परिस्थितीत योग्य प्रकारे जनुकीय देवाणघेवाण होऊ शकते. याबाबतीत पानझडी आणि सूचीपर्णी वृक्षांत साम्य आहे. पण पानझडी वृक्षांना आणखी एका गोष्टीचा विचार करावा लागतो,ती म्हणजे रानडुक्कर आणि हरणांसारखे पाला भक्षक!


या दोन्ही प्राण्यांना बीचचे दाणे आणि ओक वृक्षाच्या बिया पसंत असतात कारण त्यांचे सेवन करून छान चरबी चढते.तीव्र थंडीपासून बचाव करण्यासाठी चरबी उपयोगी पडते.या दाण्यांमध्ये पन्नास टक्के तेल आणि पिष्टमय पदार्थ असतात,जे इतर कोणत्याही खाद्यातल्या प्रमाणापेक्षा जास्त आहे.


त्यामुळे वसंत ऋतूत जंगलात पडलेल्या बिया जनावरां

कडून पूर्णपणे फस्त केल्या जातात आणि पुढल्या ऋतूत बीच किंवा ओकचं एकही रोपटं रुजत नाही.आणि म्हणून झाडं एकमताने आपल्या प्रजननाचे नियोजन आगाऊ करून ठेवतात.दरवर्षी न फुलण्याचा फायदा असा की त्यावर्षी शाकाहारी प्राण्यांचा अन्नपुरवठा कमी होतो,

ज्यामुळे गरोदर जनावरांना पोषण कमी मिळतं.अशा परिस्थिती प्राण्यांच्या पैदासावर अंकुश लागतो.पुढल्या वर्षी जेव्हा बीच आणि ओक वृक्ष फुलतात त्या वेळेस जनावरांची संख्या कमी असल्यामुळे काही बिया तरी शिल्लक राहतात आणि रुजून नवीन रोपटी जन्म घेऊ शकतात.ज्या वर्षी बीच आणि ओक वृक्षांना बिया धरतात त्या वर्षाला 'मास्ट वर्ष' म्हणतात


या काळात मुबलक अन्नपुरवठा असल्यामुळे रानडुकरांची पैदास तिप्पट होऊ शकते.याचा फायदा घेत पूर्वीचे युरोपियन शेतकरी रानडुकरांचेच नातेवाईक म्हणजे पाळीव डुकरांना जंगलात नेऊन त्यांना बियांवर ताव मारू देत असत.भरपूर बिया खाऊन लठ्ठ झालेल्या पाळीव डुकरांची मग कत्तल केली जात असे.मास्ट वर्षानंतरच्या वर्षात बीच आणि ओक वृक्ष फुलोत्पादनाला सुट्टी घेत असल्यामुळे रानडुकरांची संख्या कमी होत असे.पण जर का या वृक्षांनी सलग काही वर्षं प्रजनन प्रक्रियेला सुट्टी दिली तर मात्र कीटकांच्या,विशेषतः मधमाश्यांच्या संख्येवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता असते.

भाकड वर्षात जे संकट रानडुकरावर येतं तेच मधमाशांवरही ओढवलं जातं.पण पानझडी जंगलात मधमाशा फार मोठ्या प्रमाणात प्रजनन करून ठेवत नाहीत, कारण उत्तम प्रतीच्या जंगलाला या चिमुकल्या मदतनीसांची फार गरज नसते,काही वर्ष फुलोत्पादन न झाल्यामुळे कमी संख्येने जिवंत असलेल्या मधमाशा परागीभवनात कितीशी मदत करणार? बीज किंवा ओक वृक्षांसाठी परागीभवनाची सशक्त आणि भरवशाचीच पद्धत हवी.मग यासाठी वाऱ्यापेक्षा अधिक योग्य काय असेल? सूक्ष्म परागकणांना वारा दूर-दूर घेऊन जातो.

तापमान सुमारे ५३ अंश फॅरनहाईट झालं की मधमाशा बाहेरही पडत नाहीत. पण या थंडीतही वारा परागी

भवनाचे काम करू शकतो,हा त्याचा मोठा फायदा आहे.

मगाशी म्हटल्याप्रमाणे सूचीपर्णी झाडं साधारण दरवर्षी फुलतात.मधमाशांना जर दरवर्षी खाद्य मिळालं तर त्या हमखास परागीभवन करत राहतात. सूचीपर्णी झाडं उत्तरेकडे जास्त आढळतात आणि तिथे मधमाशांना सहन न होणारी थंडी असते.आणि म्हणूनच बीच आणि ओकची झाडं वाऱ्यावरच विसंबून राहतात.बीच आणि ओक सारखे दरवर्षी न फुलण्याचे तंत्र सूचीपर्णी झाडांना आत्मसात करायची गरज नसते,कारण त्यांना रानडुकरं आणि हरणांकहून काही धोका नसतो.स्प्रूस वृक्षाच्या कोन मधल्या बारीक बिया मधमाशांना फार पोषण पुरवू शकत नाहीत.इथे रेड क्रॉसबिल सारखे काही पक्षी असतात जे आपल्या वाकड्या चोचीने स्प्रूसचा कोन अलगदपणे उघडून आतल्या बिया खाऊ शकतात.असं असलं तरी ह्या झाडांना पक्ष्यांचा तितकासा त्रास होत नाही.स्प्रूसच्या बियांना एक छोटा पंख असतो.सूचीपर्णी बिया थंडीसाठी साठवून ठेवून खाणारे कोणीच प्राणी इथे नाही त्यामुळे ही झाडं आपल्या बिया बिनधास्तपणे वाऱ्याबरोबर सोडून देतात.त्यांच्या फांद्यांवरून अलगदपणे या बिया खाली पडू लागतात तेव्हा हळूच एखाद्या वाऱ्याची झुळूक त्यांना दूरवर नेऊन सोडते.स्प्रूसचे वृक्ष प्रचंड संख्येत परागाचे उत्पादन करतात.जणू त्यांना पानझडी वृक्षांच्या स्पर्धेत बाजी मारायची असते.त्यामुळे थोडा जरी वारा आला की सूचीपर्णी जंगलातून परागाचे ढग निघाल्यासारखे दिसतात.झाडांच्या छत्री खाली आगीची धग असल्या

सारखे हे दृश्य दिसते.पण इथे प्रश्न उद्भवतो की अशा परिस्थितीत इनब्रीडिंग म्हणजे निषिद्ध प्रजनन कसं टाळता येईल? पृथ्वीच्या इतिहासात आजपर्यंत झाडांनी तग धरली आहे कारण त्यांनी आपली जनुकीय विविधता उत्तम रीतीने प्रगत केली आहे.

जंगलातून मोठ्या संख्येने एकाच वेळी पराग सोडले गेले की ते एकमेकांत मिसळून जातात.एका झाडाने सोडलेल्या परागकणांचे पुंजके झाडाजवळच जास्त प्रमाणात असल्याने ते स्वतःच्याच मादी फुलांना फलित करून घेण्याचा धोका असतो.पण झाडांना हे नको असतं,त्यामुळे असं होऊ नये यासाठी त्यांच्याकडे अनेक युक्त्या आहेत.


स्प्रूस सारख्या काही प्रजाती वेळेचा अचूक वापर करतात.

नर आणि मादी फुलं काही दिवसांच्या फरकाने उमलतात त्यामुळे मादी फुलांना इतर झाडांचे पराग मिळणं शक्य होतं.ही गोष्ट बर्ड चेरी वृक्षांना करता येत नाही कारण ते परागीभवनासाठी कीटकांवर अवलंबून असतात.

या झाडांमध्ये नर आणि मादी जननेंद्रिय एकाच फुलात असतात.जंगलात सापडणारी ही झाडं मधमाश्यांकडून परागीभवन करून घेतात.फुलात शिरताना मधमाश्या पराग उधळून लावतात.पण यातून निषिद्ध प्रजनन होऊ नये यासाठी बर्ड चेरी वृक्ष सावध असतात.ज्या वेळेस परागाचा कण स्टिग्मावर पडतो तेव्हा त्याचे जनूक कामाला लागतात आणि एक नाजूक नळकांड तयार होतं जे अंड्याच्या शोधात निघतं. हे चालू असताना झाड त्या परागाची जनुकीय चाचणी करतं.

आपल्या जनुकाशी ती जुळली तर नळी बंद केली जाते आणि थोड्या वेळाने पराग वाळून निकामी होतो.फक्त परकीय जनुकांना आत घेतलं जातं.पण बर्ड चेरीची झाडं 'माझं' आणि 'तुझं' कसं ओळखतात ? या गोष्टीची आपल्याला पूर्ण माहिती नाही,पण इतकं माहिती आहे की जनुकांना सक्रिय व्हावं लागतं आणि झाडाची चाचणी यशस्वीपणे पार करावी लागते. यासाठी झाड त्या जनुकांना अनुभवतं असं कदाचित म्हणता येईल.आपण माणसंसुद्धा प्रेमाने होणाऱ्या शारीरिक संबंधाच्या वेळी मज्जातंतूंमार्फत होणाऱ्या संवेदनांपलीकडचंही काही अनुभवत असतो,तसंच काहीसं झाडांच्या प्रजोत्पादनावेळीही होत असावं.झाडं संभोगाचा अनुभव कसा घेतात,याची आपल्याला अजून काही काळ फक्त कल्पनाच करावी लागेल.


काही प्रजातींमध्ये निषिद्ध प्रजनन टाळण्याची आणखी एक युक्ती असते.त्यांच्या प्रत्येक झाडाला एकाच लिंगाची फुलं असतात. उदाहरणार्थ,विलो वृक्ष केवळ नर किंवा मादी असतात.त्यामुळे स्वतःचं परागीभवन स्वतःमध्ये होऊ शकत नाही.पण असं म्हणतात की विलो हे खऱ्या अर्थाने जंगलातलं झाड नव्हे.जंगलाचं आच्छादन नसलेल्या भागातून त्यांचं प्रजनन होतं.इथे हजारो प्रकारच्या छोट्या वनस्पती असल्यामुळे कीटक आणि मधमाश्यांचं सारखं येणं- जाणं असतं.त्यांच्या सेवांचा फायदा बर्ड चेरीप्रमाणे विलो वृक्षही घेतात.पण या झाडांना सावधगिरीने राहावं लागतं,कारण परागीभवन करणारा किडा आधी नर विलो या फुलावरून मग मादी फुलावर जायला हवा.जर उलट झालं तर फलन होणारच नाही.पण जर नर आणि मादी विलो एकाच वेळी फुलले तर झाडांना हा अडथळा कसा पार करता येईल? शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की विलोचे वृक्ष मधमाश्यांना एका मोहक सुवासाने आकर्षित करतात.

एकदा का मधमाशी झाडाजवळ आली की दृश्य संकेताचा वापर नर विलोकडून केला जातो. आपली फुले गडद पिवळ्या रंगाची दिसावीत म्हणून नर विलो मेहनत घेतो आणि मधमाशीला आधी आपल्याकडे आकर्षित करतो.या फुलांच्या गोड मकरंदावर ताव मारला मग त्या मधमाशा मंद हिरव्या मादी फुलांकडे आकर्षित होतात.


द हिडन लाईफ ऑफ ट्रीज पी ट र वो ह्ल लेबेन,

अनुवाद-गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन


सस्तन प्राण्यांच्यात रक्ताच्या नात्यामध्ये होणाऱ्या प्रजननाला निषिद्ध प्रजनन म्हटलं जातं. या प्रकारचे निषिद्ध प्रजनन झाडांच्या वरील तिन्ही युक्त्यांनी कधी कधी टळू शकत नाही.म्हणूनच वारा आणि मधमाश्यांची भूमिका महत्त्वाची असते.हे दोघेही झाडांचे पराग दूरवर नेऊन सोडतात त्यामुळे किमान काही जनुक तरी दूर जाऊ शकतात आणि जनुकीय वैविध्य टिकून राहू शकतं.पण एखादा अगदी एकटा पडलेला वृक्षांचा समूह असला तर मात्र बाहेरचे जनुक त्यांच्यापर्यंत पोहोचणं अवघड होत जातं. कालांतराने जनुकीय वैविध्य कमी होत जात आणि समूह कमकुवत होत जातो.काही शतकांमध्येच हा समूह लुप्त होण्याची भीती निर्माण होते.