* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: वाद घालू नका/Don't argue

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

११/७/२४

वाद घालू नका/Don't argue

जिथे विलियम जेचं शरीर पडलं आहे,तिथे योग्य रस्त्यावर चालण्यामुळे तो मेला.गाडी चालवताना तो बरोबर होता,

पूर्णपणे बरोबर;पण तो तितकाच मृत आहे.जशी काही चूक त्याचीच होती.तुम्ही तुमच्या वादाची गाडी जोरात चालवता,तेव्हा तुम्ही पूर्णपणे बरोबर असू शकता;पण समोरच्याची मानसिकता बदलायचा प्रश्न असतो. तुमचे प्रयत्न तितकेच निरर्थक होतील,जसे की,तुम्हीच चूक आहात.फ्रेंडिक एस.पार्सन्स आयकर सल्लागार होते.ते एका सरकारी टॅक्स इन्स्पेक्टर बरोबर एक तास वाद घालत होते.नऊ हजार डॉलरच्या रकमेचा प्रश्न होता.

पार्सन्सचा दावा होता की,ही रक्कम एक बॅड डेब्ट (Bad debt) होती (एक असं कर्ज ज्याच्या भरण्याची मुळीच उमेद नव्हती) आणि याकरता त्यावर टॅक्स नको लावायला.इन्स्पेक्टरचं उत्तर होतं,"बॅड डेब्ट ! अजिबात नाही.यावर तर टॅक्स लागेल."


इन्स्पेक्टर भावशून्य,हट्टी आणि जिद्दी होता.मिस्टर पार्सन्सने आमच्या क्लाससमोर आपली गोष्ट सांगताना म्हटलं की,तर्काचा काही प्रभाव नाही पडला.तथ्याला सांगितल्यावरही तो नाही विरघळला.आम्ही जितका जास्त वाद घातला, तो तितकाच जास्त अडत गेला.

याकरिता मी वादाचा रस्ता सोडून दिला.चर्चेचा विषय बदलला आणि त्याची प्रशंसा करायला सुरुवात केली.


मी त्याला म्हटलं की,मला असं वाटतं की,ही छोटीशी रक्कम तुमच्याकरिता काही खास महत्त्वाची नाही आहे.कारण तुम्हाला तर खूप मोठ्या रकमांचे महत्त्वपूर्ण आणि कठीण गोष्टी निपटाव्या लागतात.खरं तर मी टॅक्सेशनच्या बाबतीत वाचलं आहे;पण माझं ज्ञान पुस्तकी आहे.जेव्हा की तुम्हाला या विषयावर अनेक वर्षं काम करण्याचा अनुभव आहे.मला तर तुमच्या इतका अनुभव असता,तर याच्यामुळे मी बरंच काही शिकू शकलो असतो.हे मी जे सांगितलं ते सगळं खरंच आहे."


यानंतर इन्स्पेक्टर आपल्या खुर्चीवर सरळ झाला.

पाठीमागच्या बाजूला टेकून बसला आणि बऱ्याच वेळापर्यंत मला त्याच्या कामाच्या बाबतीत सांगत राहिला.

त्यांनी मला सांगितलं की,त्यांनी कोणत्या प्रकारे अनेक मोठ्या मोठ्या घोटाळ्यांना पकडलं आहे.त्याचा आविर्भाव हळूहळू मित्रत्वात झाला.थोड्या वेळानंतर तो माझ्याशी आपल्या मुलांबाबत बोलू लागला. जेव्हा तो गेला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, तो या समस्येबाबत थोडा आणखीन विचार करेल आणि काही दिवसांनंतर मला त्याचा निर्णय कळवेल.तीन दिवसांनंतर तो परतून माझ्या ऑफिसमध्ये आला आणि त्यानं मला सांगितलं की,त्यांनी माझ्या टॅक्स रिटर्नला त्याच रूपात स्वीकृती दिली आहे.हा टॅक्स इन्स्पेक्टर खूपच साधारण मनुष्याच्या कमकुमवतपणाचं प्रदर्शन करत होता.प्रत्येक माणसाप्रमाणे त्यालाही महत्त्व हवं होतं.जोपर्यंत मिस्टर पार्सन्स त्याच्या बरोबर वाद घालत राहिले,तोपर्यंत तो प्रबळपणे वाद घालत स्वतःला महत्त्वाचं असल्याचं सिद्ध करत राहिला;पण जेव्हा मिस्टर पार्सन्सनं त्याच्या महत्त्वाला स्वीकारलं,तेव्हा वाद संपला आणि तो सहानुभूतीपूर्ण आणि दयाळू माणूस बनला.


बुद्धांनी म्हटलं आहे,'द्वेष द्वेषाने नाही,तर प्रेमाने संपतो.'गैरसमजही वादांनी नाही तर समजदारी,

कूटनीती,सद्भावना,दुसऱ्यांच्या नजरेने बघण्याची इच्छा ठेवल्यावर संपतो.


लिंकन यांनी एकदा एका तरुण आर्मी ऑफिसरला आपल्या सहयोगीबरोबर मोठ्या वादात अडकल्यावर फटकारलं होतं.'जी व्यक्ती जीवनात आपल्या क्षमतांचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्याकरिता संकल्पवान आहे, त्याच्याजवळ व्यक्तिगत विवादाकरता वेळच राहत नाही.

याशिवाय तो परिणामांना झेलण्याकरताही तयार नाही होत.त्या मोठ्या गोष्टींना सोडून द्या,झेलण्यावर तुमचा दुसऱ्या इतकाच अधिकार आहे.त्या छोट्या गोष्टींना सोडून द्या,जी स्पष्टपणे तुमचीच आहे. जर एखादा कुत्रा तुमच्या रस्त्यात आला आहे, तर त्याच्याशी भांडायच्याऐवजी चांगलं हेच आहे की,तुम्ही त्याच्याकरिता रस्ता मोकळा करा. कुत्र्याला नंतर तुम्ही मारलं तरी त्यानं चावलेल्या ठिकाणाचे घाव भरणं संभव होत नाही.'


बिटस् अँड पीसेस नावाच्या पत्रिकेने एक लेख छापला होता.त्याच्यात काही विचार सुचविले गेले होते की,

असहमती वादात बदलण्यापासून कोणत्या प्रकारे रोखता येईल.


असहमतीचं स्वागत करा.लक्षात ठेवा,'जर दोन्ही पार्टनर नेहमी सहमत होत असतील,तर त्यांच्यातल्या एकाची गरज नाही आहे.'जर तुम्हाला एखादा नवा पैलू दाखवला,

ज्याच्या बाबतीत तुम्ही कधीच विचार केला नव्हता,तर कृतज्ञ राहा की,त्याकडे तुमचं लक्ष वेधलं गेलंय. असं होऊ शकतं की,ही असहमती एक संधी असेल,ज्यात तुम्ही गंभीर चूक करण्याच्या आधीच चूक सुधारू शकता.

आपल्या पहिल्या भावनेवर भरोसा करू नका.जेव्हा आमच्या समोर कठीण परिस्थिती येते,तेव्हा आमची पहिली प्रतिक्रया सुरक्षिततेची असते.सावधान राहा.शांत डोक्याने विचार करा आणि आपल्या पहिल्या प्रतिक्रियेवर नजर ठेवा.होऊ शकतं की, या वेळी तुम्ही सर्वश्रेष्ठ रूपात नसून,आपल्या निकृष्ट रूपात असाल.आपल्या रागावर काबू ठेवा.लक्षात ठेवा की,कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव या गोष्टीवर मोजला जाऊ शकतो की, त्याला कोणत्या गोष्टीवर राग येतो.पहिल्यांदा पूर्ण गोष्ट ऐका.आपल्या विरुद्ध असलेल्यांना बोलण्याची संधी द्या.त्यांना आपली पूर्ण गोष्ट सांगू द्या.त्यांना विरोध करू नका.वाद घालू नका. स्वतःचा बचाव करू नका.यामुळे भिंत उभी राहते.याच्या उलट समजदारीचा पूल बनवायचा प्रयत्न करा.गैरसमजाची उंच भिंत उभी करू नका.समजुतीचा भाग शोधा.जेव्हा तुम्ही तुमच्या विरोधकांची पूर्ण गोष्ट ऐकाल तेव्हा त्या बिंदूपासून बोलायला सुरुवात करा,

ज्यावर तुम्ही तुमच्या विरोधकाबरोबर सहमत आहात. इमानदार राहा.त्या बिंदूचा शोध लावा ज्यात तुम्ही तुमच्या चुका मानू शकाल आणि तसं सांगा.तुमच्या चुकांकरता माफी मागा.यामुळे तुमचे विरोधक थंड पडतील.


असं वचन द्या,की तुम्ही आपल्या विरोधकांच्या विचारांवर लक्ष देऊन विचार कराल.होऊ शकतं की,तुमचे विरोधक बरोबर असतील.हे जास्त सोपं आहे की,तुम्ही त्यांच्या विचारांवर विचार करायला सहमत व्हा.याऐवजी तुम्ही जोरात पुढे व्हाल आणि अशी चूक कराल ज्यात तुमच्या विरोधकांना नंतर हे सांगण्याचा मोका मिळेल की,'आम्ही तुम्हाला समजवायचा खूप प्रयत्न केला होता;पण तुम्ही आमचं एकपण ऐकलं नाही.' समस्येमध्ये रुची घेण्याबाबत आपल्या विराधकांचे मनापासून धन्यवाद मना.जो तुमच्याबरोबर वाद करण्याकरिता वेळ देतो आहे,

त्याच्याही आवडीचा विषय आहे.त्याला एक अशी व्यक्ती समजा जी खरंच तुमची मदत करू इच्छिते.या प्रकारे तुम्ही तुमच्या विरोधकांना मित्र बनवू शकाल.दोन्ही बाजूंनी विचार केल्यावरच काम करा. 


तुम्ही समोरच्याला त्याच दिवशी नंतर किंवा दुसऱ्या दिवशी मीटिंग करता सांगू शकता,तेव्हा पूर्ण तथ्यांवर विचार विमर्श केला जाऊ शकतो. या मीटिंगच्या तयारीसाठी स्वतःला काही कठोर प्रश्न विचारा.हे होऊ शकतं का की माझे विरोधक खरे आहे? थोड्याशा प्रमाणात खरे? काय त्यांच्या नजरेत या तर्कामध्ये खरेपणा किंवा दम आहे? काय मी खरंच समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय की स्वतःचा राग काढतो आहे? माझ्या प्रतिक्रियेमुळे माझे विरोधक दूर जाताहेत की ते माझ्या जवळ येत आहेत? मी जे करतो आहे,त्याने माझी प्रतिष्ठा वाढेल? मी जिंकेन किंवा हरेन ? जर मी जिंकलो तर मला याची काय किंमत चुकवावी लागेल? जर मी याबाबतीत शांत राहिलो तर काय ही असहमती संपेल ? काय ही कठीण परिस्थिती कुठल्याही प्रकारे माझ्याकरिता एक स्पर्धा बनू शकेल ?


ऑपेरा स्टार जॉन पियर्स आपल्या पन्नास वर्षांच्या वैवाहिक जीवनाच्या सफलतेचं गुपित सांगताना म्हणतात,"माझी पत्नी आणि मी आम्ही खूप आधी एक तडजोड केली होती. आम्ही एकमेकांबरोबर कितीही रागावलेला असो,आम्ही या तडजोडीला निभावलं.जेव्हा एक खूप रागावतो आणि ओरडत असतो,तेव्हा दुसरा त्याची शांतपणे बडबड ऐकेल कारण जर दोघे जण ओरडायला लागले,तर संवाद होऊ शकत नाही.घरात हल्ला आणि वादावादी शिवाय काहीही नाही होणार."


वाद घालू नका,वादापासून स्वतःचा बचाव करा..!


०९.०७.२४ या लेखातील शेवटचा दुसरा भाग संपला…