* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: औषधांशिवाय आरोग्य / Health without drugs

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१९/१/२५

औषधांशिवाय आरोग्य / Health without drugs

आंतरिक आरोग्याची कसोटी


आंतरिक आरोग्याकडे लक्ष देताना प्रश्न येतो की त्याचं मोजमाप कसं करायचं ?


शारीरिक क्षमता मोजण्यासाठी जसं आपण चपळता,

वेग,लवचिकता,तोल सांभाळता येणे, वजन उचलता येणे असे मापदंड वापरू शकतो, तसे आंतरिक आरोग्याचे मापदंड कोणते ?


यामध्ये काही महत्त्वाचे मापदंड हे मोजता येण्यासारखे आहेत.इतर काही मोजायला अवघड पण अनुभवाने नक्की सांगता येण्यासारखे आहेत - दिवसभर उत्साही वाटणे,शांत झोप लागणे, चिडचिड कमी होणे इत्यादि.


आता मोजता येण्यासारखे जे सर्वमान्य मापदंड आहेत ते बघू. [३] हे १८ वर्षांवरील सर्वांना लागू आहेत.


१. पोटाचा घेर :


पुरुषांसाठी हा ४० इंचापेक्षा कमी,आणि स्त्रियांमध्ये ३५ इंचापेक्षा कमी असावा.हा घेर नाभीपाशी (बेंबीपाशी) मोजायचा आहे आणि ते करताना श्वास ओढून पोट आत घ्यायचं नाही!(आणि मुद्दाम फुगवायचंही नाही.)

शिवाय,पोटाचा घेर म्हणजे पँट साईझ नाही.बेंबीपाशी मोजलेला घेर घ्यायचा.


तुम्हाला लक्षात येईल की लहान चणीच्या,कमी उंचीच्या माणसांमध्ये धोकादायक पातळीचा लठ्ठपणा असेल तरी पोटाचा घेर ४० इंचाच्या आत असू शकतो.त्यामुळे उंची हा घटक लक्षात घेतला पाहिजे. उदाहरणार्थ, सहा फूट उंचीच्या आणि पाच फूट उंचीच्या अशा दोन व्यक्तीसाठी हा मापदंड थोडासा वेगळा असला पाहिजे.


म्हणूनच,हा मापदंड जास्त चांगल्या पद्धतीने असा सांगता येतो,की पोटाचा घेर हा उंचीच्या निम्मा किंवा त्याहून कमी असावा.(स्त्रिया आणि पुरुष दोघांसाठीही.)


उदाहरण म्हणून,जर कोणाची उंची ५ फूट ४ इंच असेल म्हणजे ६४ इंच असेल तर त्यांच्या पोटाचा घेर ६४ चा निम्मा म्हणजे ३२ इंच (किंवा त्यापेक्षा कमी) असावा.कोणी ५ फूट ८ इंच उंच असेल म्हणजे ६८ इंच उंच असेल तर पोटाचा घेर जास्तीत जास्त ३४ इंच असावा.


पोटाचा घेर हा आपल्या धडातला लठ्ठपणा (Cen- tral Obesity) दाखवतो.आपलं शरीर चरबी साठवताना दोन वेगवेगळ्या प्रकारे साठवतं. त्वचेखालील चरबी (Subcuta- neous Fat) आणि पोटाच्या आसपास,महत्त्वाच्या अंतर्गत अवयवांच्या आजूबाजूला साठवलेली चरबी (Visceral Fat).एका मर्यादेपलीकडे ही दुसऱ्या प्रकारची चरबी धोकादायक असते.ह्या चरबीचं घरच्या घरी करता येणारं सोपं मोजमाप म्हणजे पोटाचा घेर.


२. रक्तदाब :


साधारण स्थितीत मोजलेला रक्तदाब हा १३०/८५ पेक्षा कमी असावा.रक्तवाहिन्यांमधून वाहत असताना वाहिन्यांवर जो रक्ताचा दाब पडतो, तो म्हणजे रक्तदाब.हे दोन आकड्यांनी दर्शवलं जातं.


सिस्टॉलिक म्हणजे जेव्हा हृदयाचा ठोका पडतो आणि हृदय पंपाप्रमाणे शरीराकडे रक्त पाठवतं, तेव्हाचा रक्तदाब हा रक्तदाब १३० च्या खाली असावा.डायस्टॉलिक,म्हणजे हृदयाच्या दोन ठोक्यांच्या मधल्या काळात असलेला रक्तदाब,जो ८५ च्या खाली असावा.


१३०/८५ च्या वर रक्तदाब असेल तर उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. (Hypertension) असं मानलं जातं.यातून आपल्याला काही शक्यता दिसतात उदा.हृदयावर ताण येतो आहे,

रक्तवाहिन्या काही अंशी आकुंचन पावल्या आहेत,रक्ताचा पातळपणा (Viscosity) योग्य नाही,इत्यादि. म्हणून रक्तदाब मोजणं महत्त्वाचं आहे.


जर रक्तदाब १००/७० पेक्षा कमी असेल, तर कमी रक्तदाबाचा त्रास आहे. (Hypotension) असं साधारणतः मानलं जातं.


३. रक्तातील साखर (ग्लुकोज) आणि इन्सुलिन :


तिसरा मापदंड म्हणजे ३ मापदंडांचा गट आहे. ते असे


ⅰ) उपाशीपोटी रक्तातील साखरेची (ग्लुकोज) पातळी १०० पेक्षा कमी असावी. [२४, २५, २६, २७]


ii) उपाशीपोटी रक्तातील इन्सुलिनची पातळी ६ पेक्षा कमी असावी.


iii) HbA1C हे ५.६ किंवा त्याहून कमी असावं.


मुळात आपल्याला बहुतेक कुठेच इन्सुलिनची पातळी मोजायचा सल्ला मिळत नाही.ह्यात भर म्हणजे,

रक्तचाचणीच्या अहवालात इन्सुलिन हे २४.९ इतक्या पातळीपर्यंत असलं तरी चालेल अशी मर्यादा दिलेली असते.वास्तविक,६ ही पातळी योग्य आहे आणि त्यामागच्या शास्त्रीय कारणांवर मी वेगळा लेख लिहिलेला आहे. [४१] अडचण अशी आहे की इन्सुलिनच्या अमुकपातळीला शरीरात काय होत असतं हे विश्लेषण रक्तचाचणी अहवालात नसतं.जे आपण या पुस्तकात पुढे बघणार आहोत.त्यामुळे रक्त चाचणी अहवालात दिलेली मर्यादा बघून गाफील न राहता ६ ही योग्य पातळी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.


हे तीन मापदंड जर योग्य असतील तर तुम्हाला मधुमेह नाही असं म्हणता येतं.तुमच्या लक्षात येईल की फक्त साखरेच्या पातळीवरून मधुमेह,न ठरवता,त्यात इन्सुलिनची पातळीही जर लक्षात घेतली,तर अधिक परिणामकारक निदान करता येतं.पुढे आणखी खोलात आपण याचं महत्त्व बघणार आहोत.इन्सुलिन एक महत्त्वाचं संप्रेरक (Hormone) आहे, जे शरीरभर अनेक कामं करतं.त्यातलंच एक काम म्हणजे रक्तातील अतिरिक्त साखर आपल्या विविध पेशींपर्यंत पोचवणं.ह्याने रक्तातील साखरेची पातळी मर्यादित राहते.

साखरेबरोबर इन्सुलिनची पातळीही मोजल्याने हे काम करताना किती इन्सुलिनची गरज भासते आहे हे कळतं,ज्याने अधिक चांगल्या पद्धतीने तपासणी आणि रोगनिदान करता येतं.


४. रक्तातील स्निग्ध पदार्थ : वाक्य १ः


चौथा मापदंड हा देखील ३ मापदंडांचा गट आहे. ते असे


i) HDL ज्याला आपण रूढार्थाने "चांगलं कोलेस्टेरॉल" म्हणतो,ते पुरुषांमध्ये ४५ पेक्षा जास्त आणि स्त्रियांमध्ये ५० पेक्षा जास्त असावं.


ii) Triglycerides (TG) जे रक्तातले एक प्रकारचे स्निग्ध पदार्थ असतात ते १५० पेक्षा कमी असावेत.


iii) TG : HDL हे गुणोत्तर (Ratio) २ पेक्षा कमी असावं.


ह्या चौथ्या मापदंडाचा जवळचा संबंध हृदयरोगाशी आहे.कोलेस्टेरॉल जास्त असल्यामुळे हृदयविकारांचा धोका वाढतो असं विधान आपण अनेकदा ऐकतो.खरं तर,

हृदयरोगाच्या चर्चेमध्ये कोलेस्टेरॉल उगाचच बदनाम झालं आहे!


कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीरातला एक अत्यंत महत्त्वाचा रेणू आहे.आपल्या शरीरातल्या बहुतेक सर्व पेशींचं आवरण हे कोलेस्टेरॉलने बनलेलं असतं.शरीरातली अनेक महत्त्वाची संप्रेरकं (Hormones) बनवायला कोलेस्टेरॉल लागतं. उदा.टेस्टोस्टेरॉन.कोलेस्टेरॉल हे इतकं महत्त्वाचं आहे की आपण जर पुरेसं कोलेस्टेरॉल आहारातून घेतलं नाही,तर आपलं यकृत (Liver) शरीरात ते बनवू शकतं आणि त्याची उणीव भरून काढली जाते.✓


हृदयरोगासाठी कोलेस्टेरॉलला का दोषी धरलं गेलं, ते आपण पुढे पाहूच.


सध्या एवढं लक्षात ठेवूया की,TG:HDL हे गुणोत्तर हृदयविकाराच्या धोक्याचं सर्वोत्तम निदर्शक आहे. जर ते २ पेक्षा जास्त असेल,तर ते खाली आणणे ही प्राधान्याने करण्याची गोष्ट होऊन जाते.पुढे आपण ते खाली कसं आणायचं ते ही पाहणार आहोतच.


HDL हे कोलेस्टेरॉल नसून,खरं तर ते एक प्रथिन (प्रोटीन) आहे. HDL = High-Density Lipoprotein.तसंच LDL = Low-Density Lipoprotein.


कोलेस्टेरोल हा स्निग्ध पदार्थ आहे आणि आपलं रक्त हे ५०% पाणी आहे. त्यामुळे, रक्तामधून कोलेस्टेरोल स्वतः प्रवास करू शकत नाही. त्याला प्रथिनांमधून प्रवास करावा लागतोः ही प्रथिनं म्हणजेच HDL, LDL, इत्यादि. कोलेस्टेरोल हा प्रवासी आहे आणि HDL, LDL ह्या त्याला रक्तामधून घेऊन जाणाऱ्या बसगाड्या आहेत.


HDL ला "चांगलं कोलेस्टेरॉल" आणि LDL ला "वाईट कोलेस्टेरॉल" हे शब्द रूढ झाले आहेत.ते तितकेसे बरोबर नाहीत,हे तुमच्या लक्षात येऊ लागलं असेल.हृदयरोगाच्या कारणांची चर्चा करताना याबद्दल अजून गमती बघूयात.


आंतरिक आरोग्याचे ४ मापदंड आपण पाहिले. त्यामागची कारणं खोलात जाऊन बघितली पाहिजेत. त्यासाठी आधी आपल्या शरीरातल्या काही मूलभूत प्रक्रिया,संप्रेरकांचं काम थोडंसं समजावून घेऊया.


१७.०१.२५ या लेखातील दुसरा शेवटचा भाग..।