live
मुख्यपृष्ठ
३१/७/२५
पक्ष्यांच्या जन्माचे गुढ / The mystery of bird birth
२९/७/२५
‘जावा मॅन'चा शोधकर्ता’-’Inventor of Java Man’
पाडांगच्या आजूबाजूच्या भूप्रदेशात फारसे पुराजीव मिळण्याची शक्यता नाही हे कळल्यावर युजीनने सुमात्राच्या राज्यपालांना आर.सी.जोएसनना निखळलेल्या मानवी दुव्याचं महत्त्व सांगणारं एक पत्र पाठवलं.त्यांनी त्याला मदत करायचं आश्वासन दिलं. त्याचबरोबर,युजीनची बदली पाजाकोंबोच्या पठारी प्रदेशात करावी,असं त्याच्या वरिष्ठांना कळवलं. पाजाकोंबो ही एक छोटी छावणी होती.त्यामुळे युजीनला पुराजीव शोधायला भरपूर वेळ उपलब्ध होता. इथेच त्यांच्या मुलाचा जन्म झाला.अॅना मात्र तिथे कंटाळली.कारण तिथे इतर कुठलीही युरोपीय स्त्री नव्हती.युजीन मात्र खुषीत होता.कारण लिडाअडयेर इथे त्याला बरेच पुराजीव सापडू लागले होते.त्यात बरेचसे कपींचेही होते.
त्यामुळे लवकरच मानवी अवशेषही सापडणारच याबद्दल युजीनला खात्री वाटू लागली होती.दरम्यान,युजीनचा एके काळचा सहकारी आणि मित्र मॅक्स वेबर एका शास्त्रीय मोहिमेवर पूर्वेकडील डच वसाहतींमध्ये येऊन गेला होता.त्याने डच प्रशासनाला युजीनच्या संशोधनाचं महत्त्व पटवून दिलं.त्यामुळे हॉलंड सरकारने आदेश काढला, की डच वसाहतींच्या प्रशासनाने युजीनला संशोधनासाठी त्याच्या पगाराव्यतिरिक्त दरमहा २५० गिल्डर द्यावे.दुसरीकडे,द्युबुआ कुटुंबीय अधूनमधून हिवतापाने आजारी पडायला लागले होते.युजीन तर सतत रानावनात फिरत असल्याने एकदा मृत्यूचं दार ठोठावून परतला होता.पाडांग पठारावरचे आदिवासीजन त्याच्या मोहिमांकडे संशयाने पाहू लागले होते.आपल्याला सुमात्रा बेटावर आता नवं यश मिळणं शक्य नाही असं युजीनला वाटू लागल्याने त्याने राज्यपालांना विनंती करून जावा बेटावर बदली करून घेतली होती.२४ नोव्हेंबर १८९० या दिवशी युजीनला बेडोइंग ब्रोयबस इथे मानवी जबड्याच्या खालच्या बाजूचा काही अंश मिळाला.मे १८९२मधे ट्रिनिल नावाच्या खेड्याजवळ युजीनने उत्खनन सुरू केलं.तिथे खणता खणता एका मजुराची कुदळ एका झाडावर आदळली. प्रत्यक्षात ते आदिमानवाच्या मांडीचं हाड असावं असं युजीनला खात्रीपूर्वक वाटत होतं.त्याला जावा बेटावर आदिमानवी स्त्रीचे तीन मानवी जीवाश्म मिळाले होते.
संशोधनाच्या कामात हळूहळू अपेक्षित गोष्टी हाती लागत असताना एकीकडे युजीनच्या संसाराची मात्र वाताहत व्हायला सुरुवात झाली होती.३० ऑगस्ट १८९३ ला अॅना तिसऱ्यांदा बाळंत झाली,पण ती मुलगी मृतावस्थेत जन्मली.अॅना तो मृतदेह कवटाळून बसली. ती मुलगी जिवंत आहे,असं ती सर्वांना सांगत होती.तो मृतदेह पुरल्यानंतर ती भ्रमिष्ट बनली. रात्री जंगलातून वाऱ्याचा आवाज येऊ लागला की 'माझी मुलगी मला बोलावते आहे' असं म्हणत ती बंगल्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत असे.तिला त्यामुळे कोंडून ठेवणं भाग पडू लागलं. यूजीन आणि त्याच्या दोन मुलांवरही यामुळे एक विचित्र सावट पसरलं.या सावटाची छाया दूर करण्यासाठी मग एका स्थानिक मांत्रिकाची मदत घेण्यात आली.युजीन आणि अॅना हे आता आपापल्या वेगळ्याच विश्वात वावरू लागले.त्यांच्यातलं पती-पत्नीचं नातं संपलं होतं.युजीनने 'पिथेकैथ्रॉपस इरेक्टस' ऊर्फ हरवलेल्या दुव्यासंबंधीचा आपला प्रबंध लिहून पूर्ण केला.प्रबंधाच्या प्रती त्याने तत्कालीन प्रमुख पुराजीव शास्त्रज्ञांकडे पाठवून दिल्या. जगभरातून त्याच्यावर स्तुतीचा वर्षाव झाला. १८९४ अखेर त्याला भारतास भेट देण्याचं आमंत्रण मिळालं.
भेटीदरम्यान कलकत्त्याच्या वस्तुसंग्रहालयातील भारतीय जीवाश्मांचा साठा बघण्याची परवानगीही मिळाली.अॅना व मुलांना जावामधेच ठेवून युजीन भारत भेटीवर निघाला.
जानेवारीच्या मध्यास तो कलकत्त्याला पोहोचला.फ्रँक फिन आणि अॅलन अल्कॉक या संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याचं स्वागत केलं.
या संग्रहालयात तेव्हा थॉमस हॉलंड,मॉल यांच्यासारखे भूशास्त्रज्ञही काम करत होते.त्यांना युजीन भेटल्यामुळे आनंद झाला.आपल्या संशोधनाची कीर्ती भारतात आणि युरोपात पसरली आहे हे युजीनला प्रथमच कळत होतं.तो जवळजवळ सहा महिने भारतात राहिला.त्यादरम्यान तो शिवालिक टेकड्यांमध्ये पोहोचला.भारतातच त्याला 'नेचर' या वैज्ञानिक नियतकालिकाने त्याच्या प्रबंधाचं केलेलं परीक्षण वाचायला मिळालं.त्या वेळी अंदमान बेटावरच्या काही आदिवासींना कलकत्त्यात आणण्यात आलं होतं,तेही त्याला पाहायला मिळालं.युजीन भारतात असताना त्याचा मित्र आणि उत्खननातील सहकारी अॅनडाम प्रेंटीस याचे आणि अॅनाचे संबंध असल्याची कुणकुण त्याच्या कानावर आली होती.तो डच ईस्ट इंडियात परतला तेव्हा संशयाचं धुकं दाट झालेलं होतं;पण प्रत्यक्षात तसं काही नव्हतं.तरीही युजीन परत हॉलंडला जायला निघाला तेव्हा प्रेंटीसने त्याला प्रत्यक्ष भेटून निरोप घेण्याचं टाळलं.आपल्या एखाद्या शब्दाचा नाही तर वाक्याचाही युजीनकडून गैरअर्थ लावला जाईल अशी त्याला भीती वाटत होती.त्याने युजीनला एक पत्र लिहून तो मुद्दा स्पष्ट केला आणि पत्रातूनच त्याचा निरोप घेतला.
अॅनाला नवऱ्याने आपल्यावर अनाठायी संशय घेतल्याचा जो राग आला होता तो पुढे कधीच कमी झाला नाही.त्यातून त्यांच्यातला दुरावा आणखी वाढला. त्यांच्या परतीच्या प्रवासातल्या एका घटनेमुळे या दुराव्यात भरच पडली.त्यात ना युजीनची चूक होती ना अॅनाची.झालं असं,की परतीच्या प्रवासात युजीनने गोळा केलेले सर्व महत्त्वाचे जीवाश्म त्यांच्या केबिनमध्ये इतर सामानासोबतच ठेवण्यात आलेले होते.जहाज हिंदी महासागरातून सुवेझच्या दिशेने निघालेलं असताना एका जबरदस्त सागरी तुफानात सापडलं.प्रचंड पाऊस पडत होता.वादळाचा जोर,लाटांची उंची आणि जहाजाचे हेलकावे वाढत होते.अखेरीस प्रवाशांनी जीवरक्षक नौकामध्ये जाऊन बसावं,असं कप्तानाने फर्मान काढलं.अजून या नौका सागरात उतरवायचा निर्णय झाला नव्हता;तरी असं केल्याने उतारूंना तयारी करायला वेळ मिळाला असता.हळूहळू सर्व उतारू आवश्यक तेवढं सामान घेऊन त्या नौकांमध्ये येऊन बसले.
त्यात द्युबुआ कुटुंबाचाही समावेश होता.अचानक युजीन त्या जीवरक्षक नौकेतून उडी मारून जहाजावरच्या आपल्या केबिनकडे पळाला.निदान पिथेकँथ्रॉपसचे अवशेष त्याला वाचवणं आवश्यक वाटत होतं.त्याच्या आयुष्याच्या धडपडीचं ते सार होतं.ते या जहाजाबरोबर सागरतळी गेलं असतं तर त्याचे सर्व परिश्रम खरोखरच पाण्यात जाणार होते.तो का पळाला ते अॅनाच्या लक्षात आलं.बायको-मुलांपेक्षाही युजीनला 'जावा मॅन'चे जीवाश्म महत्त्वाचे वाटत होते.अॅनाने त्या अनोख्या बेटांवर कसे दिवस काढले याच्याशी त्याला काहीही देणंघेणं नव्हतं.तो उत्खननाला गेला असताना स्थानिकांच्या साहाय्याने तिने काढलेल्या खस्तांना त्याच्या लेखी किंमत नव्हती.त्याच्या दृष्टीने काही लाख वर्षांपूर्वी मेलेल्या त्या स्त्रीची हाडं त्याला फार महत्त्वाची वाटत होती.
थोड्याच वेळात ते जीवाश्म असलेली पेटी छातीशी कवटाळून युजीन परतला आणि अॅनाला म्हणाला,"अॅना मला काही झालं तर तू मुलांची काळजी घे.मला या जीवाश्मांची चिंता आहे." तो पट्टीचा पोहणारा होता.जीवरक्षक नौकेला काही झालं असतं तर तो आपले ते लाडके जीवाश्म वाचवायचा प्रयत्न करणारा होता.अॅना मुलांना जवळ घेऊन निमूट बसून राहिली.तिच्या डोळ्यांत अश्रू होते.युजीनला ते लक्षात येतीलच याची तिला खात्री नव्हती.हे सागरी वादळ शमलं;कप्तानाने सर्व उतारूंना केबिनमध्ये जायचा आदेश दिला.युजीनने ते जीवाश्म परत सुखरूप केबिनमध्ये ठेवले.सागरी वादळ शमलं,पण एक प्रचंड विध्वंसक वादळ अॅनाच्या मनात थैमान घालू लागलं. युजीनला त्याचा पत्ताच नव्हता.द्युबुआ कुटुंब 'द नेदरलँड्स'ची राजधानी 'द हेग' इथे राहू लागलं.इथेही त्यांना शांतता लाभली नाही. त्यालाही 'जावा मॅन'ची हाडंच कारणीभूत होती.युजीनने आणलेले जीवाश्म अत्यल्प आहेत,त्यावरून 'हरवलेला दुवा' सापडला असं म्हणणं योग्य होणार नाही,असं काही विरोधक म्हणत होते;तर रुडॉल्फ व्हर्चेसारखे काही संशोधक ही हाडं माणसाचीच आहेत हेच मान्य करायला तयार नव्हते.सुदैवाने लेआँस-पीएर मॅनुव्रिएसारखे काही शास्त्रज्ञ युजीनच्या बाजूचे होते. या वादात घर लावणं, घरखर्च भागवणं, मुलांच्या शिक्षणाची सोय करणं या बाबींकडे लक्ष द्यायला युजीनला वेळच नव्हता.
दुसरीकडे,घरी त्याच्या कार्याचं महत्त्व समजेल अशी कुणीही व्यक्ती नव्हती.आठ वर्षांपूर्वी निघताना त्याचं वडिलांशी भांडण झालं होतं.वडिलांना अभिमान वाटेल असा शोध आपण लावल्याने परतल्यावर ते मागचा राग विसरतील असं त्याला वाटत होतं;पण त्याचे वडील आता हयात नव्हते.युजीनने आपल्यामुलाचा,जाँचा प्रतिरूप म्हणून वापर करून एक पुतळा तयार केला होता.
त्याच्या चेहरेपट्टीत आणि शरीरयष्टीत हवा तसा बदल करून हा पिथेकैथ्रॉपॉसचा पुतळा त्याने इ.स. १९०० मधल्या पॅरिस इथल्या प्रदर्शनात पाठवला.जाँला तो पुतळा यूजीनचाच आहे असं वाटायचं.तसं तो इतरांना सांगतही असे.
शालेय शिक्षण संपताच युजीनच्या मुलांनी उच्च वसाहतींमध्ये जायचं ठरवलं.त्यांना लगेच नोकऱ्याही मिळाल्या.त्यांना निरोप देताना युजीन म्हणाला,"तुम्ही ज्या भागात जाताय त्या भागातल्या प्राण्यांच्या कवट्या मला पाठवा.सध्या मी कवट्यांच्या आकारावर संशोधन करतोय." मुलांनीही पुढच्या काळात वडिलांची आज्ञा शिरोधार्ह मानली.युजीन द्युबुआ विसाव्या शतकात ४० वर्षं जगला.या काळात त्याने बरंच संशोधन केलं. त्याच्या संशोधनाशी खेळ करणाऱ्यांशी आणि त्याचं संशोधन खोटं ठरवणाऱ्यांशी झगडण्यातच त्याला बहुतेक काळ खर्च करावा लागला.अनेकांनी त्याच्या संशोधनाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.पहिल्या महायुद्धकाळात भूशास्त्र आणि मानवशास्त्राकडे कुणीच फारसं लक्ष दिलं नाही.नंतरच्या काळात वयोमानामुळे युजीनची वाद घालण्याची क्षमता ओहोटीस लागली. नवी पोरं लबाड्या करतात,हे त्याने दाखवूनही उपयोग नव्हता.तो एकटा एकटा राहू लागला.दुसरीकडे फॉन कोएनिग्जवाल्ड, वायडेनरिख आणि बोनर्ट हे मानसशास्त्रज्ञ म्हणतील तेच सत्य,असं युरोपात म्हटलं जाऊ लागलं.नोव्हेंबर १९४० मध्ये युजीनने या तिघांमुळे मानवशास्त्राचं नुकसान होतंय,असं लिहिलं खरं;पण युद्धाच्या धामधुमीत त्याच्याकडे कुणाचं लक्ष जाणार ?
१६ डिसेंबर १९४० या दिवशी डॉयुजीन द्युबुआचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आणि मानवी वंशाचा दुवा शोधणारा हा अवलिया शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड गेला.
२७.०७.२५ या लेखातील दुसरा शेवटचा भाग..
२७/७/२५
जावा मॅन'चा शोधकर्ता’-’Inventor of Java Man’
उत्क्रांती आणि मानवशास्त्राच्या संशोधनक्षेत्रात डार्विन-वॉलेसनंतर नाव येतं ते डॉ.युजीन धुबुआचं. १९ व्या शतकाच्या अखेरीस त्याने उत्खननांतून लावलेल्या एका क्रांतिकारी शोधाने त्याचं नाव या क्षेत्रात अजरामर झालं.
वैयक्तिक पातळीवर मात्र या संशोधनाची त्याला फार मोठी किंमत मोजावी लागली.त्याच्या खडतर प्रवासाबद्दल...
▶ डॉ.युजीन द्युबुआ हे नाव मानवशास्त्राच्या इतिहासात प्रसिद्ध आहे ते त्यांनी लावलेल्या एका शोधामुळे.कपी (एप) आणि मानव यांच्यातील हरवलेल्या दुव्याचा हा शोध 'जावा मॅन' म्हणून प्रसिद्ध आहे.लहानपणापासूनच युजीननी हा दुवा शोधण्याचं वेड बाळगलं होतं.त्यासाठी त्यांनी अपार मेहनत आणि धडपड केली.युजीन यांनी आपलं ध्येय गाठण्यासाठी अपरंपार त्याग केले.युजीन द्युबुआचा जन्म २८ जानेवारी १८५८ चा.हे वर्ष विज्ञानातल्या एका महत्त्वाच्या कालखंडातलं आहे. त्याच वर्षी डार्विन-वॉलेस यांनी उत्क्रांतिवाद मांडला. त्याआधी दोन वर्षं,म्हणजे १८५६ साली जर्मनीत निअँडर खोऱ्यात काही मानवी अवशेष मिळाले होते.हाच निअँडरथल मानव.या शोधामुळे उत्क्रांतीच्या वादाची तीव्रता वाढीस लागली होती.पुढे डार्विननी १८७१ साली 'डिसेंट ऑफ मॅन' हा ग्रंथ प्रसिद्ध करून आपल्या 'ओरिजिन ऑफ स्पेसीज' या ग्रंथाने पेटवलेल्या वणव्यात तेल ओतलं.अशा काळात युजीन द्युबुआचा जन्म झाला.त्या वेळी हा मुलगा मानवशास्त्रात आणि उत्क्रांतिवादात संशोधनपूर्वक भर टाकेल असं कुणालाही वाटलं नसेल.
युजीनचे वडील जाँ जोसेफ बाल्थाझार द्युबुआ आजच्या भाषेत बोलायचं तर वैद् होते.ते पारंपरिक ज्ञान वापरून औषधं देत.ते बऱ्यापैकी लोकप्रिय असावेत,कारण ते हॉलंडच्या दक्षिण भागातल्या आयस्डेन या खेड्याचे नगरपाल म्हणून काम करत होते.तिथेच युजीनचा जन्म झाला होता.त्याच्या वडिलांच्या मेयरपदास कधीही कुणी आव्हान दिलेलं नव्हतं.त्यांच्या घराण्याचं बोधवाक्य 'सरळ आणि सामुग्रीची वर्तणूक' अशा अर्थाचं होतं. हे घराणं सनातनी आणि धार्मिक वृत्तीचं होतं.
युजीन वैद्यकीय शिक्षण घेत असताना डार्विनच्या विचारांचा परिणाम होऊन निरीश्वरवादी आणि कट्टर नास्तिक बनला.तेव्हा त्याच्या धाकट्या भावाचं आणि त्याचं कडाक्याचं भांडण झालं होतं;पण त्याच्या आई-वडिलांना आपला मुलगा यौवनोन्मादात बहकलाय आणि तो काही काळाने ताळ्यावर येईल अशी आशा वाटत होती.वैद्यकात पदवी मिळवल्यानंतर युजीन एका मुलीकडे आकृष्ट झाला;पण त्या मुलीने एका चिनी वैद्यक विद्यार्थ्यांशी लग्न ठरवलं.त्याने युजीनला काहीसं नैराश्य आलं आणि तो अॅना गट्ठरीडा लोयेंगाशी लग्न ठरवून मोकळा झाला.अॅना ही साधीसुधी मुलगी होती. ती अतिशय सुंदर दिसायची.तिची वृत्ती खेळकर होती. मात्र,तिला कसलीही महत्त्वाकांक्षा नव्हती.
नवऱ्याबरोबर राहावं,मौजमजा करावी,संसार फुलवावा आणि घर सजवावं यापलीकडे तिच्या मनात कसलेही विचार येत नसत.तिच्या दृष्टीने युजीनचं संशोधन हा त्याला बढती मिळण्यासाठीचा एक आवश्यक भाग होता.
युजीन दहा वर्षांचा असताना प्रथम डार्विनच्या विचारांशी त्याचा परिचय झाला.त्या वेळी कार्ल व्होग्ट या ख्यातनाम जर्मन जीवशास्त्रज्ञाने युरोपभर एक व्याख्यान दौरा काढला होता.डार्विन-वॉलेस उत्क्रांतिवाद जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता.त्या व्याख्यानाचा वृत्तान्त दुसऱ्या दिवशी युजीनने त्यांच्या बागेतल्या आपल्या एका आवडत्या वृक्षाच्या फांदीवर बसून वाचला होता.त्या काळात उत्क्रांतिवादाने युरोपला ढवळून काढलं होतं.त्यामुळे शाळकरी पोरांनादेखील त्याची तोंडओळख झालेली होती.व्होग्टने सादर केलेले पुरावे दहा वर्षांच्या युजीनला कितपत कळले असतील हे सांगणं तसं अवघड आहे; पण डार्विनच्या विचारांनी आणि उत्क्रांतीच्या बाजूच्या पुराव्यांनी तो प्रभावित झाला हे निश्चित.व्होग्टच्या व्याख्यानाच्या त्या एका वृत्तपत्रीय बातमीने युजीनच्या पुढील आयुष्याची दिशा ठरली,असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.युजीनने यामुळेच उच्च शिक्षणासाठी विज्ञानशाखेची निवड केली.
वैद्यकाची पदवी घेतल्यानंतर त्याने उत्क्रांतीकडे लक्ष वळवलं.त्याच सुमारास,म्हणजे जुलै १८८७ मध्ये मॅक्स लोहेस्ट या बेल्जियन भूशास्त्रज्ञाने आपल्या सहकाऱ्यांच्या साहाय्याने बेल्जियममधल्या 'स्पी' या गावाजवळ निअँडरथल मानवाचे दोन सांगाडे उघड केले.या शोधांवरून फार वाद झाला.त्याने एकीकडे युजीन फार अस्वस्थ झाला.आपण वैद्यकातील पदवी घेऊन चूक केली,आता डार्विनच्या सिद्धांताचा अभ्यास आपण कसा करणार,एप व मानव यांतला हरवलेला दुवा शोधायचं वयाच्या दहाव्या वर्षांपासून जपलेलं आपलं स्वप्न केव्हा पूर्ण करणार,या विचारांनी त्याला चैन पडेना.याच काळात त्याने हैकेलचं 'हिस्टरी ऑफ क्रिएशन' हे पुस्तक वाचायला घेतलं.त्यातला एक मुद्दा त्याला फारच आवडला - मानव आणि इतर प्राण्यांमधील महत्त्वाचा फरक म्हणजे स्वरयंत्र.जर मानवाला स्वरयंत्र कसं प्राप्त झालं हा प्रश्न सुटला तर मानवी उत्क्रांतीचं कोडं सहज उलगडता येईल,असं हैकेलचं म्हणणं होतं..
युजीनने सस्तन प्राण्यांच्या घशातील अस्थींवर याआधीच संशोधन सुरू केलं होतं.माशांच्या श्वसन कल्ल्यांमध्ये सुधारणा होत होत एके काळी पाण्यातून ऑक्सिजन वेगळा करणारी यंत्रणा मानवात ध्वनी निर्माण करू लागली,या निष्कर्षाप्रत तो आला होता.
त्याने हा सिद्धांत मांडण्यापूर्वी त्याचे प्राध्यापक आणि वरिष्ठ सहकारी मॅक्स फुरब्रिंगर यांच्याकडे तपासायला म्हणून दिला.
तेव्हा फुरब्रिंगरनी ती कल्पना त्याआधीच व्याख्यानांमधून मांडल्याचा दावा केला.ते ऐकल्यावर 'माझ्या प्रबंधात अधिक सुधारणा करायला हव्यात' असं सांगून युजीनने प्रबंध परत घेतला आणि तो वेळकाढूपणा करू लागला.फुरब्रिंगर आपल्या संशोधनावर आज ना उद्या डल्ला मारणार याची जाणीव झाल्यावर युजीनने विद्यापीठातील नोकरीचा राजीनामा द्यायचं ठरवलं;पण त्यापूर्वी त्याने खूप विचार केला. त्याच्यावर आता बायको आणि मुलीची जबाबदारी होती.तरीही,आपण जर एप आणि मानव यांच्यातील हरवलेला दुवा शोधून काढला तर आपल्याला कीर्ती मिळेल आणि फुरब्रिंगरच्या दडपणास आपण यशस्वीपणे तोंड देऊ शकू असं त्याला वाटू लागलं.
हा दुवा कसा आणि कुठे सापडेल यावरही युजीनने खूप विचार केला होता.हा दुवा सापडत नाही याचं कारण या क्षेत्रातल्या संशोधकांनी त्याचा शोध घेण्याचा पद्धतशीर प्रयत्न केलेला नाही अशी त्याची खात्री पटलेली होती.निअँडरथल मानव खूपच उत्क्रांत होता; तो जवळ जवळ माणूसच होता;यामुळेच पूर्वीच्या काळी कुठल्या तरी विकाराने हाडांमध्ये विकृती निर्माण झालेल्या माणसांचे हे सांगाडे असावेत,असं मत त्या काळात प्रचलित होऊ लागलं होतं.काही शास्त्रज्ञ याला विरोध करत असत.त्यांच्यामते निअंडरथल मानव हा आजच्या मानवाचा पूर्वज असला तरी त्याच्यात आणि आधुनिक मानवात फारसा दुरावा नव्हता. (आता निअँडरथल मानव ही मानवी वंशवृक्षाची आपल्या
सारखीच एक प्रगत शाखा होती आणि ३० ते ३६ हजार वर्षांपूर्वी ती नष्ट झाली असं मानण्यात येतं.)
इतरांनी पद्धतशीरपणे प्रयत्न केला नाही,त्यामुळे त्यांना योग्य ठिकाणी शोध करता आला नाही,असं युजीनला वाटलं खरं;
पण त्याला तरी योग्य ठिकाण कसं सापडणार होतं ? तो डार्विनभक्त होता हे आपण पाहिलंच. 'डिसेंट ऑफ मॅन' या ग्रंथात डार्विननी पहिला मानव विषुववृत्तीय पर्जन्यारण्यात अस्तित्वात आला असावा,अशी शक्यता वर्तवलेली होती.
त्यामुळे युरोपमध्ये शोध घेणाऱ्या संशोधकांना मानवाचं मूळ सापडणं शक्य नाही असं युजीनला वाटू लागलं होतं. डार्विन यांच्या मते चिंपांझी आणि गोरिला सापडतात त्या आफ्रिकेच्या विषुववृत्तीय भागामध्ये माणसाचा शोध घेतला गेला तर ते अधिक फायदेशीर ठरण्याची शक्यता होती.
युजीनला हे म्हणणं तत्त्वतः मान्य असलं,तरी आफ्रिकेत शोध घेऊ नये असं त्याला वाटत होतं.याला एक वेगळंच कारण होतं.चिंपांझी आणि गोरिलांमध्ये नर हा मादीपेक्षा आकाराने जवळजवळ दुप्पट मोठा असतो.त्याचे सुळे खूप तीक्ष्ण आणि लांब असतात. तसंच चेहऱ्याची अतिशयोक्त वाढ झाल्याने या नरांचे चेहरे खूप बटबटीत दिसतात.कुठल्याही प्रचलित आदिम मानव जमातींमध्ये निसर्गाने स्त्री-पुरुष यांच्यामध्ये इतका भेदभाव केलेला नाही,असं युजीनचं म्हणणं होतं. त्यामुळे मानवी पूर्वजांचा शोध घेण्यासाठी आफ्रिकेत जाण्यास तो तितकासा उत्सुक नव्हता.
त्या काळात रिचर्ड लिडेकर या ब्रिटिश पुराजीव शास्त्रज्ञाला हिमालयातील शिवालिक टेकड्यांमध्ये काही अवशेष मिळाले होते.यांत एपसारखे प्राणी होते. यांना सुरुवातीस 'ट्रॉग्लोडायटिस सिव्हालेन्सिस' असं नाव देण्यात आलं होतं; पण त्यांचं एपशी असलेलं साम्य,तरीही आधुनिक कपींमध्ये आणि त्यांच्यामधे असलेला फरक स्पष्ट व्हावा म्हणून लिडेकरनी त्यांचं नाव 'अँथ्रपोपिथेकस सिव्हालेन्सिस' असं बदललं होतं. म्हणजे 'मानवाप्रमाणे दिसणारे शिवालिकमधील कपी.' मात्र,त्या काळात नेदरलँड आणि ब्रिटन यांचं सख्य नव्हतं.युजीन डच असल्याने ब्रिटिश वसाहत असलेल्या भारतात त्याला मोकळेपणाने वावरता येईल याची खात्री देता येत नव्हती.
याच वेळी डच ईस्ट इंडिजमध्ये (म्हणजे आताचा इंडोनेशिया) कपींचे अवशेष मिळू लागले होते. या भूप्रदेशात विषुववृत्तीय अभयारण्य होतं.तिथे युजीन द्युबुआ मोकळेपणाने वावरू शकणार होता.याच सुमारास कार्ल मार्टिनने रादेन साल्हेला सापडलेल्या मानवी अवशेषात आणि भारतात सापडलेल्या अवशेषात साम्य होतं.दोन्ही अवशेष एक लाख वर्षांपूर्वीचे होते,आणि यामुळे १८७६ साली आल्फ्रेड रसेल वॉलेस यांनी प्रसिद्ध केलेल्या 'द जिओग्राफिकल डिस्ट्रिब्युशन ऑफ अॅनिमल्स' या ग्रंथातील माहितीची सत्यता पडताळून पाहता येत होती.वॉलेसनी नकाशावर जावा बेटाच्या पूर्वेस एक रेषा आखली.या रेषेच्या पश्चिमेकडे जावा-बाली बेटांपासून ते भारतापर्यंत एकमेकांशी साम्य असलेले सस्तन प्राणी सापडतात,तर या रेषेच्या पूर्वेस ऑस्ट्रेलियातील शिशुधानी प्राण्यांशी साम्य असलेले प्राणी सापडतात.ही वॉलेस रेषा बाली आणि लोंबोक या दोन बेटांच्या मधून जाते.
याचा अर्थ डच ईस्ट इंडिजमध्ये सुमात्रापर्यंत मानवासह इतर सस्तन प्राण्यांचे अवशेष असणार हे यूजीनच्या लक्षात आलं आणि तो लष्करी वैद्यकीय अधिकारी होण्याचा निर्णय घेऊन पत्नी व मुलीसह जावाला जाण्यास निघाला.त्यासाठी त्याने चालू नोकरीतलं वरिष्ठ व्याख्यातापद आणि काही वर्षांत प्राध्यापक बनण्याची खात्री,यावर पाणी सोडायचं ठरवलं.
(हटके भटके,निरंजन घाटे,अज्ञाताचा शोध घेत फिरणाऱ्या अवलियांच्या कहाण्या,समकालीन प्रकाशन)
युजीनच्या या निर्णयाला त्याच्या वडिलांचा आणि मित्रमंडळींचा विरोध होता; पण अॅनाने मात्र लगेच जावाला जायची तयारी सुरू केली होती.युजीन फुरनिंगरचा निरोप घ्यायला गेला.त्या विभागातील त्याचे इतर सहकारीही त्या वेळी उपस्थित होते.
सर्वांनीच युजीनचं मन वळवायचा प्रयत्न केला;पण अत्यंत
धीरोदात्तपणे युजीन म्हणाला,"तुम्ही निवृत्त झाल्यावर मी प्राध्यापकपद भूषवणार आहे,हे मला मान्य असलं तरी डच ईस्ट इंडिजमध्ये जाऊन निखळलेला मानवी दुवा मीच शोधायला हवा असं मला वाटतं.इथे राहून प्राण्यांची आणि माणसांची शवं तपासणं,त्यांचं विच्छेदन करणं,त्यावर शोधनिबंध लिहिणं आणि प्राध्यापक बनणं अवघड नाही हे मला मान्य आहे;पण त्यात कसलंच आव्हान नाही." फुरब्रिंगरनी त्याचा राजीनामा स्वीकारला.द्युबुआ कुटुंबाचा डच ईस्ट इंडिजचा प्रवास सुरू झाला तेव्हा त्यांची मुलगी युजिनी सात महिन्यांची होती आणि अॅनाला पुन्हा दिवस गेलेले होते.
गर्भारपणातल्या उलट्या आणि बोट लागणं यामुळे प्रवासात अॅनाचे फार हाल झाले. युजीन मात्र ठणठणीत होता.तो माले भाषा शिकत होता.तसा तो भाषातज्ज्ञही होताच.तो इंग्रजी,फ्रेंच,
लॅटिन,ग्रीक आणि जर्मन भाषा मातृभाषेइतक्याच सफाईने लिहू व बोलू शकत होता. त्यात आता मालेची भर पडली.
११ डिसेंबर १८८७ ला द्युबुआ कुटुंब सुमात्रा बेटावरील पाडांग बंदरात उतरलं.पाश्चात्त्यांना पहिल्यांदा जेव्हा आशियाई भूप्रदेशाचं दर्शन घडतं तेव्हा आवाज,धूळ आणि अस्वच्छता यामुळे ते अस्वस्थ होतात.द्युबुआ कुटुंबही याला अपवाद नव्हतं.त्यातच अॅना छोट्या युजिनीचं संगोपन आणि येणारं बाळंतपण यामुळे रडकुंडीस आली.बरं,नवरा आपल्या वैद्यकीय कर्तव्यांमुळे सतत कामात गुंतलेला आणि सुटीदिवशी पुरातन हाडांच्या शोधात फिरणारा.मुलीला स्थानिकांवर सोपवताना अॅनाचा जीव वरखाली व्हायचा.विषुववृत्तीय पर्जन्यारण्याच्या प्रदेशात पाश्चात्त्यांचा सर्वांत मोठा शत्रू म्हणजे हिवताप.त्याच्याशीही सामना करणं भागच होतं.द्युबुआ प्रथम सुमात्रा बेटावर आले तेव्हा पावसाळा चालू होता.इतका जबरदस्त पाऊस आणि असं कुंद, बाष्पभारित वातावरण त्यांनी यापूर्वी कधीच अनुभवलेलं नव्हतं.शिवाय चिखल हादेखील त्यांच्या दृष्टीने एक नवाच अनुभव ठरला होता.
शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…!
२५/७/२५
बेडूक-बाबा / frog-daddy
२३/७/२५
बेडूक-बाबा / frog-daddy
लेबर डेच्या सुट्टीला अजून दोन आठवडे होते.रॅफेल सेमीज कोडी ऊर्फ रॉफ आणि त्याचा चुलतभाऊ जूनियर,हे दोघं रॉक्सीज आईस्क्रीम पॅलेसमध्ये बसले होते.दोघंही बदाम आईस्क्रीम खात होते,बटरस्कॉच सायरपनं झाकलेलं,आणि वर अक्रोडांचे तुकडे घातलेलं.मेक्सिकोच्या आखातावरून कुंद,दमट आलेली हवा फ्लॉरिडा पॅन्हॅडलच्या उष्णतेनं आणिकच जड झाली होती.गाव होतं क्लेव्हिल्,अॅलाबामा.पावसाची आशा जागवतीलसे ढगही नव्हते आकाशात.आईस्क्रीम पॅलेसमध्ये शिरणारा प्रत्येक जण अंगाला घामानं चिकटलेले कपडे सोडवत बसलेला असायचा.
"काय गरमी आहे!" एक पातळसा सूट पेहेरलेला माणूस आत येत म्हणाला.
"हो! आग्या मुंग्यांपेक्षा गरम !" एक शेतकरी हसत उत्तरला.
जूनियर आणि रॅफेलला उन्ह-उकाड्याचा धाक नव्हता. जूनियरला तर चिकोबी नदीतला महाकाय अजगर पाहायची इच्छा होती.गेल्या शतकभरात शेकडो स्थानिक लोकांनी चिकोबीच्या डोहात काहीतरी गूढ, अजस्र,सापासारखा जीव पाहिला होता म्हणे.मोठी प्रसिद्ध दंतकथा होती ही,त्या भागातली.
रॅफ नाराज होता. "ए! माझे आईबाबा मारतील मला. त्यांना वाटतं की तू मला बहकवतोस."
('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )
असं. मग तर झालं?" जूनियरपाशी रॅफच्या अडचणींना उत्तरं होती."आपण त्यांना सांगू नोकोबी तलावात मासे पकडायला जातो आहोत,
दोन दिवसांनी सकाळी आठला जूनियर आला.दोन्ही मुलांनी रॅफच्या आईला भरघोस आश्वासनं दिली,अमुक करू आणि तमुक करणार नाही,अशी.मग दोघही सायकली घेऊन बाहेर पडले.गावाच्या वायव्येला जायचं होतं.फार वाहतूक नव्हती.दोन टोमॅटो लादलेल्या ट्रक्स फक्त भेटल्या,गावाकडे जाणाऱ्या.जॉन्सनच्या शेताजवळ दोघांनी सायकली झुडपांत लपवल्या आणि ते जंगलकडेच्या ओढ्यात उतरले.बुटांच्या लेसेस बांधून गळ्यात अडकवल्या.पँटी गुडघ्यांपर्यंत दुमडल्या.छान वाटत होतं,बारीक खड्यांवरनं वाहणाऱ्या थंड,स्वच्छ पाण्यात.ओढ्यासोबत दोघं चिकोबी नदीला भेटायला जात होते.छोटेछोटे मासे किनाऱ्याजवळच्या गवतात लपायला पळत होते.एक चिखलातलं कासव पाठीवरचं शेवाळ सांभाळत दगडासारखं बसलं होतं.एक बारका साप झाडाच्या फांदीवरनं पाण्यात उडी मारून पळून गेला.एक लाल खांदे असलेली घार कर्कश ओरडत उडाली. "घरटी बांधायचा मोसम संपलाय." रॅफ म्हणाला. त्याच्या ओळखीची होती या जंगल-ओढ्याची प्रजा.मैलाभरात ओढा रुंदावला व गुडघ्यांपेक्षा खोल झाला.जवळ कॅट्टेल पाणगवत होतं.
पाण-ओक,सायप्रेस वगैरे नेहमीचे वृक्ष होते,विरळ पसरलेले.मुलं ओढ्यातला चिखल टाळून चालत होती. "दलदल सांभाळ!" जूनियर म्हणाला.रॅफेल त्याच्या मागून चालायला लागला.काही गडबड झालीच,तर जूनियर आधी अडकेल !
लवकरच खुद्द चिकोबी नदी आली.संथ,सुस्त वाहणारी. सकाळच्या उन्हात हिरवी निळी,चंदेरी लाटा असलेली. पाण्यातल्या काड्या संथपणे चालणाऱ्या माणसाच्या वेगानं वाहत होत्या.मध्येच किनाऱ्याची जमीन उंच चढत गेली.उंचीवरच्या झाडांवरून कळत होतं,की मोठ्यात मोठे पूरही तिथे पोचत नव्हते.या टेकाडाच्या नदीकडच्या बाजूला तेज उतार होता,झाडी नसलेला आणि पिवळट मातीचा.इतर तीन बाजूंचे उतार मात्र जास्त सपाटसर होते.या टेकाडाजवळ 'तमालपत्रा'च्या झाडांना बांधून ठेवलेल्या पाचसहा होड्या होत्या.झाडी उंच होती. म्हणजे पाणी चढलं तरी बांध्यांना काही न होता होड्या पाण्यावर तरंगल्या असत्या.या भागात पाणी चढणं-उतरणं नेहमीचं होतं,आणि बांधायची पद्धतही सगळ्यांच्या ओळखीची होती.
जूनियर एका बोटीजवळ जाऊन तिला बांधणारा दोर सोडू लागला.तिच्यात दोन वल्ही आणि बसायला फळीही होती.
"कुणाची रे?" रॅफनं विचारलं. "कुणास ठाऊक." जूनियर गाठ सोडत म्हणाला.रॅफनं त्याच्या हातावर हात ठेवला. "ए! चोरायची नाही आहे, बोट!" "चोरतं कोण आहे ? उसनी घेतो आहोत,आपण पोटोमो धक्क्यावर ठेवून देऊ.नेहमीच करतात असं,सगळे जण." खरं तर जूनियरच्या या बोलण्यावर रॅफचा विश्वास नव्हता. पोटोमोपासून इतक्या वर प्रवाहाच्या उलटं वल्हवत आणणं अवघड होतं.पण बोटीच्या मागे आऊटबोर्ड मोटर बसवायला जागा होती,आणि आणि मजा येत होती! खुद्द चिकोबी नदी जवळ होती,आणि एखादे वेळी तो अजगरही आसपासच होता !
रॅफ जूनियरपेक्षा लहान होता,आणि "मला ह्यानं भरीला पाडलं" म्हणणं सोपं होतं. मग जूनियरनं काय तो बचाव दिला असता.
जूनियरनं बोट सोडवली,आणि चिखलातून ओढत, ढकलत दोघांनी ती प्रवाहात नेली.आता दोघही उड्या मारून चढले.बोटीत,किनाऱ्याला धरून धरून ते प्रवाहासोबत वल्हवत होते.संपूर्ण नदीवर इतर एकही बोट नव्हती,ना खाली जाणारी,ना वर जाणारी.
"नेहमी दोनतीन जण तरी मासे पकडताना दिसतात." जूनियर म्हणाला. "बाबांनी आणलं होतं मला आणि ताईला एकदा."
"आश्चर्यच आहे,आज कोणी नाही हे.किती छान जागा आहे! मासेही भरपूर असणार." रॅफ म्हणाला.
"चिखल ! चिखलाला कंटाळतात सगळे जण.बहुतेक लोक चिकोबी टाळून दक्षिणेला एस्कांबिया नदीत जातात.तिच्यावर धक्के वगैरेही जास्त आहेत."
रॅफ नदीकडेचं जंगल पाहत होता.चांगलं दाट होतं. एका मासेमाराचं झोपडं दिसलं,तेही रिकामं.एका झाडाच्या फांदीला एक दोर बांधला होता."पोरं लटकून, झोके घेऊन उड्या मारतात पाण्यात." जूनियर म्हणाला.
ओंडक्यांवर दोनतीन कासवं बसली होती,उन्हं खात. बोट जवळ आल्यावर पाण्यात शिरली.
एक साप किनाऱ्याकडे पोहत गेला.किनाऱ्याच्या वाळूत एक निळसर बगळा माशांची वाट पाहत ध्यानस्थ उभा होता.दोन बदकं सरळ रेषेत उडत गेली,नदीच्या खालच्या भागाकडे.एक गिधाड उष्ण हवेसोबत चकरा मारत उंच,उंच जात होतं.ठिपक्यासारखं दिसेल इतकं उंच गेलं ते.
दोन लांब दुहेरी शेपट्यांचे घारींसारखे पक्षी नदीपलीकडच्या झाडीवर विहरत होते. "स्वॉलोटेल घारी असतील त्या!" रॅफ म्हणाला. "मी पहिल्यांदाच पाहतो आहे. झाडांवरचे साप खातात त्या."
जूनियर,रॅफ,दोघंही वर पक्षी पाहत होते,पण खरं लक्ष होतं नदीकडे,चिकोबीचा अजगर दिसायच्या आशेनं. दिवसाढवळ्या दिसणं कठीण होतं,पण तरी आशा असतेच ना! आणि एकाएकी दार उघडावं तसं कडेचं जंगल उघडलं.वाळूच्या पट्ट्यावर धक्क्याला बांधलेली एक लहानशी बोट होती.मागे एक पायवाट,पन्नास पावलं आतल्या एका घराकडे जाणारी.रंगवलेलं नव्हतं घर.लाकडी आणि टिनाचं छत असलेलं.एका बाजूच्या फळ्या ताज्या दिसत होत्या,नव्यानं ठोकलेल्या.जोतं तीन पायऱ्या उंच होतं.एक लहानसा व्हरांडा.दारालगत एक खिडकी.तिच्यावर बोट वाळूत टेकली,
शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…