* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२४/४/२३

देव अंतराळवीर होते का?

बायबलमध्ये गूढ गोष्टी खूप आहेत आणि परस्पर विरोधीही,जिनिसीस म्हणजे जग निर्मितीची सुरुवात,पण ती अगदी भूरचनेच्या शास्त्राला धरूनच लिहिलेली आहे.हे लिहिणाऱ्याला कसे माहीत होते की प्रथम खनिजे निर्माण झाली,मग वनस्पती जीवन आणि नंतरच प्राणी निर्माण झाले म्हणून ?

मानव प्राण्याच्या निर्मितीची वेळ आल्यावर देव म्हणतो,'आता आपण मानव प्राणी निर्माण करू या की जो अगदी आमचीच प्रतिकृती असेल.'

देव अनेक वचनात का बोलतो?

'मी' नाही, 'आम्ही !'

'माझ्यासारखा' नाही तर 'आमच्यासारखा ! '

जगातला एकमेव देव बोलत असेल तर त्याने एक वचनात

का बोलू नये?

'मग पृथ्वीवरील लोकसंख्या वाढायला लागली आणि मुलीही जन्माला यायला लागल्या.जेव्हा देवपुत्रांनी या मुली पाहिल्या तेव्हा स्वतःच्या बायका म्हणून त्यांनी त्यांचा स्वीकार केला.' एकच अति प्राचीन देव इस्रायलमध्ये असताना हे देवपुत्र कुठून आले?


 पूर्वी पृथ्वीवर धिप्पाड माणसे होती.पृथ्वीवरील स्त्रिया आणि देवपुत्रांची मुलेही तशीच धिप्पाड होती.


सर्व जगातील सर्व देशांच्या महाकाव्यात, टिआहुआन्को,

एस्किमो यांच्या पुराणकथात,सारखे हे धिप्पाड लोक पानापानातून डोकावत असतात.ही धिप्पाड माणसे होती कोण?अजस्त्र दगड सहज एकमेकांवर चढवून प्रचंड इमारती बांधणारे हेच आपले पूर्वज होते ?की तांत्रिक ज्ञानात तरबेज असलेले परग्रहांवरील अंतराळवीर ते हेच?


बायबलमध्ये सोडोम आणि गोमारा या शहरांवर कोसळलेल्या आपत्तीचे अत्यंत खळबळजनक वर्णन आहे.या शहरातले लोक इतके पापी बनलेले असतात की त्यांचा नाश करण्याचे देवाने ठरविलेले असते.मात्र लॉट कुटुंबातील माणसांना वाचविण्याची देवाला इच्छा असते.


शहराच्या वेशीवरच लॉट बसलेला असताना देवाने पाठविलेले दोन 'देवदूत' त्याच्याकडे येतात.हे देवदूत दिसायला तरी माणसांसारखे असावेत;कारण लॉट त्यांना ओळखतो आणि आग्रहाने घरी घेऊन जातो.शहरात अनाचार तर इतका बोकाळलेला की या पाहुण्यांवर सुद्धा सोडोममधल्या लोकांची 'वाईट' नजर पडते.पण पाहुणे पडले शेवटी देवदूतच! त्यांच्यामागे लागलेल्या एका टोळक्यातील सर्वजणांना ते एक फटक्यात आंधळे करून टाकतात.


देवदूत लॉटला सांगतात की,या शहरात तुझी मुले,मुली,

जावई,नातेवाईक वगैरे कोणी असतील तर त्यांना ताबडतोब शहराबाहेर काढ.या शहराचा नाश होणार आहे. लॉट त्याप्रमाणे इतरांना सांगतो पण लॉटची कुणीच नातेवाईक मंडळी लॉटने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवीत नाहीत.सहाजिकच आहे;अशा बातमीवर कोण एकदम विश्वास ठेवणार !


पहाट होते.मग मात्र देवदूत सांगतात की आता तू निदान तुझी बायको आणि दोन मुली यांना बरोबर घे आणि वेळ न दडवता इथून निघ. शहराच्या नाशाची वेळ जवळ येत आहे.तरीही लॉट कांकू करायला लागल्यावर ते या सर्वांचा हात धरूनच शहराबाहेर येतात आणि सांगतात की जीव वाचवायचा असेल तर आता धावत सुटा मागे सुद्धा वळून बघू नका आणि पर्वतात पळून जा.घाई करा.याहून जास्ती आम्ही काहीच करू शकणार नाही.


हे सर्व वाचल्यावर सोडोमच्या रहिवाशांना नव्हती अशी माहिती त्या देवदूतांना होती असे नाही वाटत ? शहराच्या नाशाची वेळ ठरलेली होती. जवळ येत होती.आणि त्याची कल्पना देवदूतांना होती असे नाही वाटत ? 


सोडोमला खरोखर काय घडले ? सर्व शक्तिमान देवाला शहराचा नाश करण्यासाठी वेळापत्रकाची जरुरी का भासावी ? देवदूतांच्या घाईचा दुसरा अर्थ काय लावायचा? घटके घटकेला शहराचा नाश होण्याचा क्षण जवळ येत होता याची पूर्ण जाणीव त्या देवदूतांना होती असे यावरून नाही वाटत? मग ती वेळ निश्चितपणे आधीच ठरलेली असली पाहिजे.


पर्वतांवरच का जायचे? मागे वळून का पहायचे नाही ? गंभीर गोष्टींबद्दल विचारू नयेत असे प्रश्न आहेत खरे हे.


जपानमधल्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब पडल्यापासून त्यांच्या विध्वंसक शक्तीची पूर्ण कल्पना आपल्याला आली आहे.

किरणोत्सर्गाने काय हाहा:कार उड़तो हे आपल्याला ठाऊक आहे.क्षणभर समजा की सोडोम आणि गोमारा या शहरांचा नाश अगदी विचारपूर्वक,ठरवून करण्याचे ठरविले होते.धोकादायक किरणोत्सर्गी पदार्थ आणि त्याचबरोबर शहरातील लोक यांचा नाश करण्याची कालबद्ध योजना आखली होती. त्यामुळेच शहराच्या नाशाचा क्षण अगदी अटळ होता.लॉटसारख्या कुटुंबातील जे लोक वाचावेत अशी देवाची इच्छा होती ते स्फोटाच्या केंद्रबिंदूपासून कित्येक मैल लांब पर्वतात असणेच आवश्यक होते.कारण अणुस्फोटापासून निर्माण होणारा धोकादायक किरणोत्सर्ग पर्वतावरील खडकच शोषून घेऊ शकतात,अडवू शकतात.


तरीही लॉटची बायको मागे वळून पाहते आणि क्षणार्धात मरून पडते.मग गंधक आणि अग्नी यांच्या वर्षावाने देव शहराचा संपूर्ण नाश घडवतो.दुसऱ्या दिवशी एखाद्या भट्टीतून येणाऱ्या धुरासारखा धूर सर्व शहरावर पसरलेला दिसत होता असे वर्णन आहे.


आपल्या पूर्वजांपेक्षा आपण कमी धार्मिक आहोत असे मुळीच नाह.पण अंधश्रद्धा आपल्याकडे कमी आहे.

भोळसटपणाही कमी आहे.देवाने मानवाची निर्मिती केली खरी पण आपल्या कृत्याचा त्याला नंतर पश्चात्तापच झाला असावा.कारण नंतर त्यानेच स्वतःच्या निर्मितीचा नाश केला.अपरंपार दयाळू देवाने पक्षपातीपणा करून त्याच्या आवडत्या काही जणांवर दया दाखवावी आणि इतरांचा नाश घडवून आणावा ही कल्पना आपल्या डोळ्यांसमोर,मनासमोर देवाची म्हणून जी प्रतिमा हजारो वर्षापासून आहे तिच्याशी संपूर्णतः विसंगत आहे असे नाही वाटत?


ओल्ड टेस्टमेंटमध्ये देव किंवा देवदूत प्रचंड आवाज करीत आणि धुराचे लोट सोडीत कसे येत याची अनेक वर्णने आहेत.कल्पकतापूर्ण पण स्पष्ट आणि वास्तव अशी वर्णने इझिकेलची आहेत.


इझिकेल हा एक धर्मगुरू होता.कोणत्याही गोष्टीचे वर्णन करण्याची त्याची हातोटीही विलक्षण होती.त्याच्या शिकवणुकीचा छोटासा भागच पुस्तकरूपाने बायबलमध्ये आहे.


उत्तरेकडून प्रखर प्रकाश पाडीत,धुराचे लोट सोडीत,वाळवंटातील वाळू उडवीत देवांचे चमकदार अंतराळयान कसे येते याचे तो वर्णन करतो.

सर्वशक्तिमान देव आपली अंतराळयाने ठराविक दिशेनेच का आणत होते ? ते सर्वशक्तिमान असतील तर त्यांना केव्हाही, कसेही,कुठेही जाता यायला पाहिजे.सामर्थ्यशाली देवांना काहीच अशक्य नसावे ना? पृथ्वीचे भ्रमण लक्षात घेऊन आज आपण आपली अंतराळयाने ठराविक दिशेने सोडतो आणि परत आणतो पण देवांनासुद्धा ही गोष्ट का लक्षात ठेवावी लागत होती.? देवांचे रथ उतरताना किंवा उडताना होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे वर्णन इझिकेलने केलेले आहे. एवढेच नव्हे तर त्या रथातून दुसरी वाहने कशी बाहेर पडतात यांचीही वर्णने तो करतो. अमेरिकेने वाळवंटात किंवा दलदलीच्या प्रदेशात उपयोगी पडणारी जी वाहने बनवली आहेत,त्या वाहनांचीच आठवण इझिकेलच्या वर्णनावरून येते.


आणि शेवटी एक दिवस इझिकेल अंतराळातून देववाणी ऐकतो, 'मानवपुत्रा ऊठ! मी तुझ्याशी बोलतो आहे.'

आणि इझिकेलने आवाज ऐकले.घोंघावणाऱ्या वाऱ्यासारखे,फडफडणाऱ्या पंखांसारखे आणि निरनिराळ्या चाकांचे.या गोष्टी तरी इझिकेलने अनुभवानेच लिहिल्या आहेत याबद्दल आपल्याला शंका नसावी.


देव त्याला सांगतात की जगात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे काम आता त्यांचेच आहे. त्यांनी इझिकेलला अंतराळयानातून वर नेऊन सांगितले की त्यांनी मानवजातीचा पूर्ण त्याग केलेला नाही.डोळे असून आंधळेपणाने आणि कान असून बहिरेपणाने वागणाऱ्या लोकांमध्ये तो राहत आहे.एकूण मानवजातीची सुधारणा करण्याचे काम त्यालाच करायला पाहिजे. त्याप्रमाणे त्याला ते सल्ला देतात.या सर्व अनुभवांचा इझिकेलवर झालेला परिणाम नेहमीच त्याच्या लिहिण्यात दिसतो.


इझिकेलशी कोण बोलले? कोणत्या तऱ्हेचे देव होते ते? परंपरेनुसार आपली जी देवांची व्याख्या आहे तसे ते देव नसावेत.कारण ते सर्वशक्तिमान वाटत नाहीत.एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरता त्यांना वाहनांची जरुरी पडत होती. मग कोण होते ते?


मोजेस इजिप्तमधून ज्यू लोकांना घेऊन बाहेर पडतो त्यावेळी इजिप्शियन सेना त्याच्या पाठलागावर असतेच.एकदा समुद्र दुभंगून हे लोक पुढे जातात.आणि तो पुन्हा जोडला जातो आणि पाठलाग करणाऱ्या इजिप्शियन सेनेचा नाश होतो;ही गोष्ट सर्वांना ठाऊक आहे.या संबंध प्रवासात देवाने ज्यू लोकांना कशी मदत केलेली असते?


दिवसा आकाशातील ढगांचा एक स्तंभ ज्यू लोकांना मार्गदर्शन करायचा तर रात्रीच्या वेळी एक अग्निचा स्तंभ की ज्यामुळे त्यांना प्रकाशही मिळत असे.हे काही हवामानाचे चमत्कार नव्हते.आपल्याला देवाने कशी मदत दिली आहे याबद्दल मोजेसने दिलेलीच ही माहिती आहे.


देव जेव्हा सिनाई पर्वतावर उतरतो तेव्हा तो ज्वाळा आणि धूर सोडीतच उतरतो.सर्व परिसर हलल्यासारखा वाटतो.

पुन्हा उतरल्याबरोबर तो मोजेसला सांगतो की या टेकडीभोवती कुंपण घाल म्हणजे कोणीही माझ्याजवळ येऊ शकणार नाही.


या गोष्टीतून देव अंतराळवीर होते असे नाही वाटत? पण बहुधा त्यांची संख्या कमी असावी. त्यांच्याकडे अंतराळयानेही कमी असावीत. नाहीतर या सर्व लोकांना त्यांनी अंतराळयानातूनच हलवले असते की! ढगांचा स्तंभ आणि अग्निचा स्तंभ ही अंतराळयानेच असू शकतात,नाहीतर कित्येक दिवस आणि कित्येक रात्री त्यांनी त्यांच्याबरोबर प्रवास केला नसता.इजिप्शियन सैन्याचा नाश करण्यात त्यांचाही हात होताच.बरेच जण म्हणतात, ओहोटीच्या वेळेला ज्यू लोकांनी समुद्र पार केला.

आणि भरतीच्या समुद्राने इजिप्शियन सैन्याचा नाश झाला.ज्या इजिप्शियन लोकांनी पहिल्या प्रथम वर्षांचे ३६५ दिवस असे भाग पाडले.


ज्यांना नाईल नदीचे पूर वगैरेसारख्या गोष्टींची पुरेपूर माहिती होती,त्यांना भरती ओहोटी आणि त्यांच्या वेळा माहीत नसणे असे म्हणणे अगदी हास्यास्पद आहे,नाही? इजिप्शियन सैन्य वेड्यासारखे त्यांच्या मागे लागल्याने त्यांचा नाश झाला नाही.तर देवाने योजना आखूनच त्यांचा संपूर्ण निःपात घडवून आणला होता.ढगांचा स्तंभ ज्यू लोकांच्या पुढून मागे आला,ढगांच्या स्तंभामुळे इजिप्शियन लोकांना काही दिसेनासे झाले पण ज्यू लोकांच्या मागे असलेल्या अग्निच्या स्तंभामुळे त्यांना मात्र प्रकाशही मिळत होता.हे सर्व वर्णन काय दर्शविते?


निघण्यापूर्वी देव मोजेसला 'आर्क ऑफ दि कव्हेनन्ट' बांधण्याच्या स्पष्ट सूचना देतो आणि ती कशी बांधायची याची प्रतिकृतीही दाखवतो. भक्कम काठ्या किती घ्यायच्या,कुठल्या मापाच्या घ्यायच्या,किती किती अंतरावर बांधायच्या,ती उचलणाऱ्यांनी वस्त्रे कशाची बनवलेली घालायची,चपला कुठल्या घालायच्या याबद्दल अगदी सविस्तर आणि तपशिलवार सूचना देवाने दिलेल्या असतात.


एका तऱ्हेची 'आर्क ऑफ दि कव्हेनन्ट' या नावाने ओळखली जाणारी ही पेटी नेहमीच वेगळ्या तंबूत ठेवली जायची आणि फक्त ठराविक लोकांनाच त्या तंबूत जायची परवानगी होती.इतरांना मज्जाव होता.ही आर्क सर्वांनाच पुढे अत्यंत त्रासदायक आणि धोकादायक ठरते. नंतरच्या कथेप्रमाणे फिलीस्टाईन ही दुसरी जमात एकदा इस्त्रायलच्या ज्यूंचा पराभव करते. या आर्कचे त्यांना किती महत्त्व वाटत असते हे फिलीस्टाईन या दुसऱ्या जमातीने नेहमीच पाहिलेले असते.ती आर्क ते प्रथम 'लुटून' घेऊन जातात.पण ती काय आहे,कशी वापरायची याची त्यांना माहिती नसते.त्यांच्या एकच गोष्ट ताबडतोब लक्षात येते.

तिच्याजवळ जाणारे नेहमी आजारी पडत आहेत तर कधी कधी मृत्युमुखीही पडत आहेत.


तेव्हा ती कोणीच जवळ ठेवेना.प्रत्येक जण ती पुढल्या शहरात पाठवून द्यायला लागला.प्रत्येक शहरात तोच प्रकार घडू लागला.तिच्याशी संबंध येणाऱ्यांचे केस झडत असत,त्यांना ओकाऱ्या ( देव ?छे! परग्रहावरील अंतराळवीर ! बाळ भागवत मेहता पब्लिशिंग हाऊस ) व हालहाल होऊन लोक मरत असत.बघता बघता पन्नास हजार लोक या आर्कचे बळी झाले. ही 'लूट' फिलीस्टाईन जमातीला पचेना.त्यांनी शेवटी ती गाडीत घालून तिला दोन गायी बांधल्या व ती चक्क परत केली.


"आर्क ऑफ दि कव्हेनन्ट' हा खरोखर काय प्रकार होता? इलेक्ट्रॉनिक्स तज्ज्ञ जॉर्ज ससून आणि प्राणीशास्त्रज्ञ रॉडनी डेल यांनी अनेक जुन्या धर्मग्रंथांवरून कसून शोध केला. त्याप्रमाणे त्यांनी ती बांधली व त्यांच्या लक्षात आले की ती पेटी म्हणजे एक प्रकारचे यंत्रच होते.त्याचा उपयोग इजिप्तमधून पळणाऱ्या ज्यू लोकांना अन्नपुरवठा करण्यासाठी केला जात होता.प्रोटीनने समृद्ध असे अन्न ! मन्ना! आणि हे बनवण्याचे यंत्र,मन्ना मशीन- आर्क ऑफ दि कव्हेनन्टमधून नेण्यात येत होते.


हजारो स्त्री,पुरूष,मुले वाळवंटातून प्रवास करीत निघाली.त्यांच्या अन्नपाण्याची काय सोय होती? त्या उजाड वाळवंटात होतेच काय? मग कोणत्या विश्वासावर मोजेस त्यांना घेऊन निघाला होता? कारण एकच! देवांनी (अंतराळवीरांनी) या सर्वांना पोसण्याची आधीपासूनच तयारी केली होती आणि मोजेसला ते माहिती होते. 


(+)५०° सेंटिग्रेड आणि (-) १०० सेंटिग्रेड एवढा उष्णतामानात एका दिवस, रात्रीत फरक करणाऱ्या त्या उजाड वाळवंटात हजारो लोकांना घेऊन जाण्याचा धोका नाहीतर मोजेसने पत्करलाच नसता.

आज आपल्याला माहीत आहे की काही प्रकारच्या बुरशी पेट्रोलसुद्धा गिळंकृत करतात आणि त्यामधून प्रोटीनयुक्त खाण्यालायक अन्न निर्माण करतात.

माणूस शरीरातून जी घाण बाहेर टाकतो त्यातूनही प्रक्रिया केल्यावर प्रोटीनने समृद्ध असे अन्न निर्माण करता येते.


राहिलेला लेख पुढील भागात..

२२/४/२३

गौतम बुद्ध - त्रिपिटक (इ.स.पू.पहिलं शतक) भाग २

'त्रिपिटक' या ग्रंथामध्ये आयुष्य चांगल्या रीतीनं कसं जगावं याविषयी सांगितलं आहे.बुद्धानं दुःख,

समुदय,निरोध आणि मार्ग अशी चार आर्यसत्ये सांगितली आहेत.बुद्धानं सांगितलेल्या आर्य

सत्यांमध्ये पहिल्यांदा दुःख आहे.त्यानंतर त्या दुःखाचा समुदय म्हणजेच त्या दुःखाची कारणं आहेत आणि नंतर त्या दुःखाचा निरोध म्हणजेच त्या दुःखाचं निवारण आहे.त्या दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग म्हणजे दुःख निवारणाचा मार्गही सांगितला आहे. बुद्ध म्हणतात,आनंद दोन प्रकारचे असतात.

आपल्याला हवं ते मिळालं की आनंद होतो.खरं तर हा आनंद क्षणिक असतो आणि काही क्षण यात आनंद मिळाल्याचा केवळ भास होतो.खरं तर आपण या क्षणिक आनंदाच्या हव्यासासाठी दुःखालाच आमंत्रण देत असतो आणि दुसरा आनंद समाधी अवस्था प्राप्त झाल्यावर मिळतो.हा खरा आनंद असल्याचं बुद्ध सांगतो.तसंच दुःखाचं कारण मनुष्य नेहमीच दुसऱ्याकडे बोट दाखवून सांगतो.दुसऱ्या कोणामुळे तरी आपल्याला दुःख भोगावं लागतंय असं त्याला वाटत राहतं.तो नेहमी याबाबतीत दुसऱ्याला दोष देत राहतो.मात्र आपली स्वतःची न संपणारी तृष्णा आणि भूक हेच खरं तर दुःखाचं कारण असतं आणि तेच मनुष्याला समजत नाही.

त्याला जे हवं,ते मिळाल्यावर त्यानं सुखी व्हायला हवं;पण प्रत्यक्षात तसं होत नाही.ती गोष्ट मिळाल्या

नंतर पुन्हा दुसऱ्या गोष्टीची तहान त्याच्या मनात निर्माण होते.तसंच इतरांपेक्षा मी जास्त चांगला आहे असं दाखवत राहणं या हव्यासापोटीदेखील मनुष्य दुःखाला आमंत्रण देत राहतो.त्यामुळे बुद्ध सांगतात की,इतरांना दोष न देता,स्वत:च्या अंतर्मनात माणसानं डोकावून बघायला हवं.'मी' आणि 'माझा' हे शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाकले पाहिजेत आणि अंतर्मनात डोकावून बघितलं तर दुःखाचं निवारण करण्याचा मार्ग सहजपणे सापडतो. 


दुःखाच मूळ कारण समोरचा नसून आपणच आहोत हे सत्य जेव्हा मनुष्याला कळतं,तेव्हा त्याला त्या दुःखाला दूर करण्याचा मध्यम मार्ग किंवा उपायही सापडतो.


गौतम बुद्धांनी 'त्रिपिटक' या ग्रंथामध्ये अष्टांग योगाविषयी सांगितलं आहे.खरं तर महर्षी पतंजलीनं या अष्टांग योगाविषयी पहिल्यांदा माहिती दिली.यम,नियम,आसन,

प्रत्याहार, प्राणायाम,ध्यान,धारणा आणि समाधीविषयी सांगितलं;पण सर्वसामान्य लोकांना समाधी म्हणजे काय हे नीटपणे समजलं नव्हतं.ते बुद्धानं त्यांना अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितलं.बुद्धान आयुष्यात येणाऱ्या दुःखाविषयी वक्तव्य केलं.त्यानं दुःखाच्या निवारणासाठी अष्टांग मार्ग (उपाय) सांगितले.

पहिला अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी!बुद्धानं प्रत्येक वेळी 'सम्यक' हा शब्द वापरला आहे. सम्यक या शब्दाचा अर्थ म्हणजे मध्यम मार्ग होय,तर पहिला अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी म्हणजे जे आहे ते तसंच बघणं.आपले पूर्वग्रह, आपली समजूत त्यामध्ये न आणता निरपेक्षपणे ती गोष्ट बघणं.दुसरा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक संकल्प ! जे करण्यायोग्य आणि करण्यासारखं आहे त्याचा संकल्प करणं.तिसरा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक वाक् होय.जसं आहे तसं आणि तेच बोलणं.थोडक्यात,मनात एक आणि बाहेर एक असं बोलायचं नाही.चवथा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक कर्म.याचा अर्थ आपलं अंतःकरण जे सांगतं त्याप्रमाणे कृती करणं. इतरांचं ऐकून कुठलीही गोष्ट न करणं.पाचवा मार्ग सम्यक जीविका,सम्यक जीविका म्हणजे उपजीविकेसाठी उत्पन्न मिळवण्याचा मार्ग शोधणं.मात्र हे करताना कुठल्याही हानिकारक मार्गाचा अवलंब न करणं.

सहावा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक प्रयास,सम्यक प्रयास म्हणजे कुठल्याही कामासाठी आळस न बाळगता आवश्यक ते प्रयत्न करणं.सातवा अष्टांग

मार्ग म्हणजे सम्यक स्मृती,सम्यक स्मृतीनुसार योग्य गोष्टी लक्षात ठेवाव्यात आणि निरर्थक गोष्टी विसरून जाव्यात.आठवा अष्टांग मार्ग म्हणजे सम्यक समाधी,

सम्यक समाधी म्हणजे कुठल्याही मादक द्रव्याचा आधार न घेता समाधीवस्थेला पोहोचणं होय.


'त्रिपिटक' या ग्रंथामध्ये बुद्धकाळातल्या भारताची राजनीती,अर्थनीती,सामाजिक आहेत.व्यवस्था,

शिल्पकला,संगीतकला,वेशभूषा, पेहराव,रीतिरिवाज,

ऐतिहासिक,भौगोलिक आणि व्यापाराची परिस्थिती असे अनेक विषय मांडले आहेत.तसंच बौद्ध भिक्खूंनी कसं आचरण केलं पाहिजे याविषयीचे नीतिनियमही यात सांगितले आहेत.यात जातककथाही सामील आहेत.हिंदू धर्मामध्ये रामायण आणि महाभारत यातल्या कथांना जे महत्त्व किंवा जे स्थान आहे,तेच स्थान बौद्ध धम्मामध्ये जातक कथांना आहे.जातक गोष्टींचा आधार घेऊन सांगितला आहे.यातून माणसाला अनेक दृष्टांत दिले आहेत.या कथांचं साहित्यिक मूल्यही खूप महत्त्वाचं आहे.जातक कथा एक प्रकारे बोधकथाच आहेत.जातक कथा आज जगभर पसरल्या.गौतम बुद्धानं कुठल्याही चमत्कारांकडे माणसाचं लक्ष वेधलं नाही. आकाशात कुठली तरी शक्ती आहे किंवा कुठला तरी गुरू बसलेला आहे किंवा कुठल्या तरी मंत्राचं पठण करा,अशा कुठल्याही गोष्टींचं अवडंबरसुद्धा बुद्धानं सांगितलं नाही.

अशा गोष्टी करून सगळं काही आलबेल होईल,अशी खोटी आशा बुद्धानं दाखवली नाही,तर प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपलीच असल्याचं बुद्धानं सांगितलं.आपली चूक निस्तरणं,आपली चूक कळल्यावर ती पुन्हा न करणं या गोष्टी आपल्याच हातात असतात,असं बुद्ध सांगतो. स्वर्ग,नरक आणि पुनर्जन्म अशा गोष्टींना बुद्धानं पूर्णपणे नाकारलं आहे.


बौद्ध धम्म ईश्वर आणि आत्मा अशा संकल्पनांवर विश्वास ठेवत नाही.आपलं कर्म हेच आपल्या जीवनात सुख आणि दुःख आणतं,असं बौद्धधम्मीय मानतात.'क्रोधाला प्रेमानं,वाईटाला चांगुलपणानं,

स्वार्थाला औदार्यानं आणि खोटारड्या व्यक्तीला खरेपणानं जिंकलं जाऊ शकतं,असं बुद्धानं सांगितलं. 

चांगल्या आणि आपल्याला आवडणाऱ्या कामाचा शोध घ्या आणि त्या कामात स्वतःला झोकून द्या आणि मग बघा तुम्हाला निर्भेळ आनंद कसा भरभरून मिळतो,असंही बुद्ध म्हणत असे.


गौतम बुद्धानं जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श करत त्यावर सखोल भाष्य केलं आहे.मनुष्याचा आहार कसा काय आणि किती असला पाहिजे यावरही त्यानं 'त्रिपिटक'मध्ये सांगितलं आहे. खरं तर,सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शेती आणि शेतकरी,या विषयात बुद्धाचा अभ्यास आजही चकित करणारा आहे असं म्हटलं जातं,की राजा शुद्धोधन हा शाक्यवंशीय असल्यानं ही मंडळी व्यापक प्रमाणात शेती करत आणि त्यामुळे राजपुत्र सिद्धार्थचा बराच काळ शेतजमिनीवरची निरीक्षणं करण्यात गेला होता. 'त्रिपिटक' या ग्रंथात चांगली पिकं येण्यासाठी कशा प्रकारची जमीन असायला हवी याविषयी बोलताना त्यानं सुपीक आणि नापीक जमिनीविषयी सांगितलं आहे.तसंच शेतजमिनीतले आठ प्रकारचे दोष सांगितले आहेत.कधी,कुठल्या प्रकारची पिके घ्यायला हवीत,त्यात पाण्याचं प्रमाण कसं असायला हवं इथपासून अनेक बारीकसारीक गोष्टी गौतम बुद्धानं सांगितल्या आहेत.त्यामुळेच बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी गौतम बुद्धाला 'भूमिपुत्र' असं म्हटलं आहे. 'भूमिपुत्र', 'तथागत' प्रमाणेच गौतम बुद्धाला 'सुगत' या नावानंही संबोधलं जातं.ज्यानं सत्यापर्यंत, सर्वोत्तम ध्येयापर्यंत सम्यक रीतीनं गमन केलं आहे त्याला 'सुगत' असं म्हटलं जातं! व्यापाराविषयीदेखील बुद्धान 'त्रिपिटक' मध्ये सविस्तर विवेचन केलं आहे.स्त्री-पुरुष समानतेचा स्पष्ट उल्लेखही त्यानं या ग्रंथात केला आहे.


जगविख्यात मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम यानं 'टू हॅव ऑर टू बी' या आपल्या ग्रंथात गौतम बुद्धाविषयी सातत्यानं गौरवोद्गार काढले आहेत.दुःखाच्या प्रश्नावर बोलताना एरिक फ्रॉमनं आवर्जून बुद्धाच्या विचारांचा दाखला घेऊन मांडणी केली आहे.


'त्रिपिटक' ग्रंथ अभ्यासला,तर मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा केलेला अभ्यास यात सापडतो.'आळस आपल्याला आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू देत नसल्यानं तो टाळा.कोणी निंदा केली तर वाईट वाटून घेऊ नका,कारण स्वत:चा शोध


गौतम बुद्धानं कुठल्याही चमत्कारांकडे माणसाचं लक्ष वेधलं नाही.आकाशात कुठली तरी शक्ती आहे किंवा कुठला तरी गुरू बसलेला आहे किंवा कुठल्या तरी मंत्राचं पठण करा,अशा कुठल्याही गोष्टींचं अवडंबरसुद्धा बुद्धानं सांगितलं नाही.अशा गोष्टी करून सगळं काही आलबेल होईल,अशी खोटी आशा बुद्धानं दाखवली नाही,तर प्रत्येक गोष्टीची जबाबदारी आपलीच असल्याचं बुद्धानं सांगितलं. आपली चूक निस्तरणं,आपली चूक कळल्यावर ती पुन्हा न करणं या गोष्टी आपल्याच हातात असतात.

असं बुद्ध सांगतो.


स्वर्ग,नरक आणि पुनर्जन्म अशा गोष्टींना बुद्धानं पूर्णपणे नाकारलं आहे.बौद्ध धम्म ईश्वर आणि आत्मा अशा संकल्पनांवर विश्वास ठेवत नाही. आपलं कर्म हेच आपल्या जीवनात सुख आणि दुःख आणतं, असं बौद्धधम्मीय मानतात. 'क्रोधाला प्रेमानं, वाईटाला चांगुलपणानं, स्वार्थाला औदार्यानं आणि खोटारड्या व्यक्तीला खरेपणानं जिंकलं जाऊ शकतं, असं बुद्धानं सांगितलं. चांगल्या आणि आपल्याला आवडणाऱ्या कामाचा शोध घ्या आणि त्या कामात स्वतःला झोकून द्या आणि मग बघा तुम्हाला निर्भेळ आनंद कसा भरभरून मिळतो, असंही बुद्ध म्हणत असे.


गौतम बुद्धानं जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला स्पर्श करत त्यावर सखोल भाष्य केलं आहे. मनुष्याचा आहार कसा काय आणि किती असला पाहिजे यावरही त्यानं 'त्रिपिटक'मध्ये सांगितलं आहे. खरं तर, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शेती आणि शेतकरी. या विषयात बुद्धाचा अभ्यास आजही चकित करणारा आहे.असं म्हटलं जातं,की राजा शुद्धोधन हा शाक्यवंशीय असल्यानं ही मंडळी व्यापक प्रमाणात शेती करत आणि त्यामुळे राजपुत्र सिद्धार्थचा बराच काळ शेतजमिनीवरची निरीक्षणं करण्यात गेला होता.'त्रिपिटक' या ग्रंथात चांगली पिकं येण्यासाठी कशा प्रकारची जमीन असायला हवी याविषयी बोलताना त्यानं सुपीक आणि नापीक जमिनीविषयी सांगितलं आहे.तसंच शेतजमिनीतले आठ प्रकारचे दोष सांगितले आहेत.कधी, कुठल्या प्रकारची पिके घ्यायला हवीत,त्यात पाण्याचं प्रमाण कसं असायला हवं इथपासून अनेक बारीकसारीक गोष्टी गौतम बुद्धानं सांगितल्या आहेत.त्यामुळेच बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी गौतम बुद्धाला 'भूमिपुत्र' असं म्हटलं आहे. 'भूमिपुत्र', 'तथागत' प्रमाणेच गौतम बुद्धाला 'सुगत' या नावानंही संबोधलं जातं.ज्यानं सत्यापर्यंत, सर्वोत्तम ध्येयापर्यंत सम्यक रीतीनं गमन केलं आहे त्याला 'सुगत' असं म्हटलं जातं! व्यापाराविषयीदेखील बुद्धान 'त्रिपिटक' मध्ये सविस्तर विवेचन केलं आहे.स्त्री-पुरुष समानतेचा स्पष्ट उल्लेखही त्यानं या ग्रंथात केला आहे.


जगविख्यात मानसशास्त्रज्ञ एरिक फ्रॉम यानं 'टू हॅव ऑर टू बी' या आपल्या ग्रंथात गौतम बुद्धाविषयी सातत्यानं गौरवोद्गार काढले. आहेत. दुःखाच्या प्रश्नावर बोलताना एरिक फ्रॉमनं आवर्जून बुद्धाच्या विचारांचा दाखला घेऊन मांडणी केली आहे. 'त्रिपिटक' ग्रंथ अभ्यासला, तर मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा केलेला अभ्यास यात सापडतो. 'आळस आपल्याला आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू देत नसल्यानं तो टाळा.कोणी निंदा केली तर वाईट वाटून घेऊ नका,कारण स्वत:चा शोध घेण्याची ती एक चांगली संधी आहे असं समजा,'असं बुद्धानं म्हटलंय. 


आपल्या मतांच्या बाबतीत दुराग्रही न राहता लवचीक राहण्याचा सल्ला बुद्ध देतो.'अत्तदीप व्हा,'असं गौतम बुद्धानं म्हटलं.याचा अर्थ अत्तदीप म्हणजे हा माणसाला स्वतःचा कणा देणारा विचार असून जीवन जगण्यासाठी स्वतः च्या प्रत्येक कृतीची जबाबदारी माणसानं स्वत च घेतली पाहिजे आणि निर्भयपणे,प्रसन्नपणे जीवनाला सामोरं गेलं पाहिजे.'मी सांगतो म्हणून त्यावर विश्वास ठेवू नका,तर कुठल्याही प्रश्नाची चिकित्सा करा,प्रश्न विचारा आणि त्यानंतर डोळसपणे निर्णय घ्या'असंही बुद्ध म्हणतो. आपल्या वाणीची चार दुश्चरितं बुद्धानं सांगितली आहेत.ती म्हणजे खोटं बोलणं,चहाडी करणं,कठोर बोलणं आणि वायफळ बोलणं! याउलट वाणीची चार सुचरितं म्हणजे सत्य बोलणं,चहाडी न करणं,मधुर बोलणं आणि अर्थपूर्ण बोलणं.! विख्यात भारतीय इतिहासकार डी. डी. कोसंबी यांनी बोधिसत्त्व हे बुद्ध आणि त्यांच्या धम्मावर मराठीतून नाटक लिहिलं आणि १९४५ मध्ये ते ग्रंथरूपात प्रसिद्धही केलं.हे नाटक चार अंकी आहे.इतिहासातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातल्या अनेक धर्माचा खोलवर अभ्यास केला आणि त्यांना बौद्ध धम्मातल्या तत्त्वांची व्यापकता भावली. त्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी अस्पृश्यतेचा कलंक मिटवत बौद्ध धम्माचा स्वीकार केला. ज्या वेळी स्त्रिया आणि शूद्र यांना समाजात अतिशय दुय्यम स्थान होतं,अशा वेळी बौद्ध धम्मानं या वर्गाला आपलंसं केलं,त्यांच्यात समतेचं मूल्य पेरलं.आज जगभरात ५३. कोटी इतकी बौद्धधम्मीय लोकांची लोकसंख्या आहे. एकूण लोकसंख्येच्या ७% लोक बौद्धधम्मीय आहेत.बौद्ध धर्माचा प्रसार करण्यात सम्राट अशोकाचं प्रचंड मोठं योगदान आहे.भारत,चीन, जपान,इंडोनेशिया,कंबोडिया असा हा जगभर पसरलेला एक मोठा आणि महत्त्वाचा आणि तिसऱ्या क्रमांकाचा धम्म आहे.म्हणूनच बौद्ध धम्माचे संस्थापक गौतम बुद्ध आणि 'त्रिपिटक' या ग्रंथाला मार्गदर्शक मानून बौद्ध धम्माचे अनुयायी आज वाटचाल करतात!


एक क्षण एका दिवसाला बदलू शकतो. एक दिवस एक जीवन बदलू शकतो आणि एक जीवन संपूर्ण जगाला बदलू शकतं.


गौतम बुद्ध


समाप्त..

२०/४/२३

गौतम बुद्ध - त्रिपिटक (इ.स.पू.पहिलं शतक)

'एक क्षण एका दिवसाला बदलू शकतो.एक दिवस एक जीवन बदलू शकतो आणि एक जीवन संपूर्ण जगाला बदलू शकतं,'असं म्हटलंय गौतम बुद्धानं ! 


गौतम बुद्धाची विचारधारा अंतर्भूत असलेला 'त्रिपिटक' हा बौद्ध धर्माचा अत्यंत महत्त्वाचा आणि अतिशय प्राचीन असा ग्रंथ आहे.हा ग्रंथ अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेला असून बुद्धाचं महापरिनिर्वाण होईपर्यंतची सगळी प्रवचनं यात संग्रहित केली गेली आहेत.या ग्रंथाची रचना इ.स.पूर्व ५०० ते इ.स.पूर्व १०० मध्ये केली गेली असून हा ग्रंथ कोणा एका व्यक्तीनं लिहिला नसून या ग्रंथनिर्मितीची कहाणी खूपच रोचक आहे.


'त्रिपिटक' या ग्रंथामध्ये आयुष्य चांगल्या रीतीनं कसं जगावं याविषयी सांगितलं आहे.दुःख, समुदय,निरोध आणि मार्ग अशी चार आर्यसत्यं बुद्धाने सांगितली आहेत.

'त्रिपिटक' ग्रंथ अभ्यासला,तर मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा केलेला अभ्यास यात सापडतो.'आळस आपल्याला आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू देत नसल्यानं तो टाळा.कोणी निंदा केली तर वाईट वाटून घेऊ नका,

कारण स्वतःचा शोध घेण्याची ती एक चांगली संधी आहे,' 

असं बुद्धाने म्हटलंय.

पाली भाषेत धर्म या शब्दाला धम्म,भिक्षू शब्दाला भिक्खू,गौतमाला 'गोतम' आणि ' त्रिपिटक या शब्दाला 'तिपिटक' असं संबोधलं गेलंय आणि त्यामुळेच बौद्ध धर्म न म्हणता 'बौद्धधम्मीय' अशा पाली भाषेतल्या शब्दांचाच प्रयोग करतात.'त्रिपिटक' या ग्रंथानुसार धम्म म्हणजे परस्परसापेक्ष आणि परस्परनिरपेक्ष यांच्यामध्ये योग्य असं संतुलन ठेवून व्यक्ती,कुटुंब आणि समाज यांचं सर्वोत्तम कल्याण साधणारी आणि त्यांना निकोप आनंद देणारी जीवन

शैली म्हणजे तथागतांचा धम्म ! ज्यानं यथार्थ ज्ञान प्राप्त केलं आहे त्याला पाली भाषेत 'तथागत' असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच गौतम बुद्धाला

देखील 'तथागत' या नावानंही संबोधलं जातं.


गौतम बुद्धांचं मूळ नाव सिद्धार्थ.हा सिद्धार्थ होता तरी कोण ?


फार फार पूर्वी भारत देश जंबुद्वीप या नावानं ओळखला जायचा.महासागरांनी वेढलेल्या प्रदेशाला जंबुद्वीप असं म्हणत.जंबुद्वीपात भारत,पाकिस्तान,श्रीलंका,

अफगाणिस्तान,नेपाळ, तिबेट,भूतान,बांगलादेश,ब्रह्मदेश (आजचं म्यानम्यार) हे देश समाविष्ट होते.भारताच्या ईशान्य कोपऱ्यात त्या काळी शाक्य वंशाच्या राजांची सत्ता होती.राजा शुद्धोधन आणि राणी महामाया यांच्या पोटी इ.स.पूर्व ५६३ मध्ये राजपुत्र सिद्धार्थाचा जन्म लुंबिनी इथे झाला होता.सिद्धार्थचा जन्म होताच सातव्या दिवशीच त्याच्या आईचं निधन झालं आणि राजा शुद्धोधनानं बाळ सिद्धार्थचं संगोपन चांगलं व्हावं म्हणून महामायाची बहीण गौतमी हिच्याशी विवाह केला.वयाच्या १९ व्या वर्षी सिद्धार्थचा विवाह राजकुमारी यशोधरा हिच्याशी झाला.सिद्धार्थ ते गौतम बुद्ध या प्रवासाची गोष्ट सांगताना अनेक दंतकथांचा वापर करण्यात आला आहे.


या दंतकथांमधली एक कथा म्हणजे : लहानपणापासून सिद्धार्थचं जीवन खूप लाडाकोडात गेलं होतं.दुःख म्हणजे काय असतं याची यत्किंचितही कल्पना सिद्धार्थला नव्हती.एके दिवशी राजकुमार सिद्धार्थ राज्यातून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडला असताना त्याला रस्त्यात जराजर्जर अवस्थेतला एक वृद्ध, रोगानं ग्रस्त एक मनुष्य,मृत व्यक्ती आणि एक संन्यासी अशा चार व्यक्ती दिसल्या.त्यांना पाहून सिद्धार्थला खूपच धक्का बसला.

जसा माणसाचा जन्म होतो,तसाच त्याचा मृत्यूही अटळपणे होतोच;या जन्ममरणाचा फेरा कुणालाच चुकलेला नाही,ही गोष्ट आपल्या बरोबर असलेल्या सैनिकांशी बोलताना त्याला कळली. सिद्धार्थला त्याच वेळी यशोधरेला राहुल नावाचा पुत्र झाल्याची बातमी कळली.एकीकडे तो मृत्यूचं दृश्य बघत होता,तर दुसरीकडे जन्माचा आनंद साजरा होत होता.हे सगळं बघून सांसारिक गोष्टींमधली निरर्थकता त्याच्या लक्षात आली.राजपुत्र सिद्धार्थच्या मनात जीवनाबद्दलचे अनेक प्रश्न निर्माण झाले आणि या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी वयाच्या २९ व्या वर्षी एके दिवशी तो आपली राजवस्त्रं आणि सगळ्या सुखसुविधा यांचा त्याग करून बाहेर पडला.


बुद्धाच्या जन्माची आणखी एक दंतकथा प्रसिद्ध आहे.जगाला वाचवण्याची जबाबदारी ज्याच्यावर आहे अशा मुलाचा जन्म झाला आहे,अशी घोषणा करण्यासाठी सगळे देव एकत्र झाले. त्या वेळी महामाया राणीनं एक आठवडाभर चाललेल्या मेजवानीत भाग घेतला होता.

 नंतर ती आपल्या देखण्या वेशात रथात बसलेली असताना तिला झोप लागली.त्या वेळी तिला हिमालयात नेलं गेलं आहे,असं स्वप्न पडलं.तिथे एका सोन्याच्या महालात एका पांढऱ्या हत्तीच्या रूपात तिला भावी बुद्ध स्वप्नात दिसला.त्यानंतर तिथल्या विद्वानांनी आता बुद्धाचा जन्म होईल आणि तोच जगातल्या पापांचं शालन करेल,

अशी भविष्यवाणी केली. त्याप्रमाणे बुद्ध जन्मला,अशी ही दंतकथा सांगितली जाते.


या आणि अशा अनेक दंतकथांवर बौद्ध धर्माचे आणि पाली भाषेचे गाढे अभ्यासक डॉ.धर्मानंद कोसंबी,

डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ.आ. ह.साळुंखे यांसारख्या अनेक विचारवंतांनी अशा दंतकथांची चिकित्सा करून त्यांचं खंडन केलं आहे.


काही कथांप्रमाणे आपल्या शिक्षणातल्या त्रुटी भरून काढण्यासाठी सिद्धार्थ काही विद्वान ब्राह्मणांकडे गेला.त्यांनी सिद्धार्थला हिंदू धर्मातल्या काही गोष्टी शिकवल्या.त्यातून त्याला त्याच्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाली,पण त्याचं पूर्ण समाधान झालं नाही.त्यानं आपल्या वैभवशाली आयुष्याबद्दल प्रायश्चित्त घेण्याचं ठरवलं.स्वतःला शिक्षा म्हणून अत्यंत साधं आणि काटकसरीनं राहणं आणि कंदमुळे आणि फळ हाच आहार ठेवणं,फरशीवर झोपणं आणि अन्य शारीरिक कष्ट उपसणं यात आनंद मानणं असं सगळं सुरू ठेवलं.या काळात त्याला काही शिष्यही मिळाले,पण अद्याप त्याच्या कल्पना परिपक्व झाल्या नसल्यानं त्यातले काही जण निघून गेले.


एका कथेप्रमाणे सहा वर्षे भटकल्यानंतर सिद्धार्थ

गया शहराजवळच्या एका भल्यामोठ्या वृक्षाखाली (बोधिवृक्ष) काहीही अन्नपाणी घेता चक्क ४९ दिवस आणि ४९ रात्री बसून स्वतः चा शोध घेत राहिला,त्या जंगलात काढलेल्या सात आठवडयांच्या कालावधीत त्याच्यात पूर्ण कायापालट झाला आणि सिद्धार्थचा गौतम बुद्ध झाला.


आपल्याला आता काय करायचंय कळल्यानंतर सिद्धार्थ आनंदित झाला.त्यान आता आपले पूर्वीचे अनुयायी गोळा केले.त्यानंतर त्यानं आपलं पहिलं प्रवचन दिलं माणसाला आयुष्यात तीनच पर्याय असतात असं त्यानं सांगितलं.


 पहिला म्हणजे जगातल्या भौतिक सुखाच्या मागे धावणं,सिद्धार्थ आत्तापर्यंत याच स्वार्थी आणि निरर्थक मार्गानंन चालला होता.दुसरा म्हणजे स्वत:तलं चैतन्य नष्ट करणं आणि पूर्वी केलेल्या पापांबद्दल पश्चात्ताप करून स्वत: अपराध्यासारखं वागणं,सिद्धार्थ याही अवस्थेतून गेला होता,पण या अवस्थेतही आत्मक्लेश केल्यानंतरही त्याला आत्मशांती मिळाली नव्हतीच.बुद्धाच्या मते तिसरा पर्याय किंवा तिसरा मार्ग म्हणजे मध्यम मार्ग.या मार्गावरून चालल्यानं सुख आणि शांततामय आयुष्य जगता येणार होतं.


बुद्ध हा मूर्तिपूजेच्या विरुद्ध होता.धार्मिक विधी आणि सण यांच्यावरही त्याचा विश्वास नव्हता. माणूस हाच त्याच्या केंद्रस्थानी होता.आपणच आपलं भविष्य घडवू शकतो.देव नाही.तसंच तो आपल्याच कृत्यानं आणि वागणुकीनं मोक्षापर्यंत जाऊ शकतो,कुठल्याही धार्मिक विधींमुळे नाही, असं तो म्हणे.सिद्धार्थनं केलेली अथक भ्रमंती आणि त्या प्रवासातले अनुभव आणि तपश्चर्या यांनी सिद्धार्थला बिहारमधल्या बुद्धगया या स्थानावर ज्ञानप्राप्ती झाली.राजपुत्र सिद्धार्थचं आता गौतम

बुद्धामध्ये रूपांतर झालं होतं आणि त्यानं जो धम्म स्थापन केला,त्याचं नाव बौद्ध धम्म ! हा बौद्ध धम्म पुढे जगभर पसरला. आपला पहिला उपदेश वाराणसीजवळच्या सारनाथ या ठिकाणी बुद्धानं दिला.या पहिल्या उपदेशपर प्रवचनाला धम्मचक्र प्रवर्तन असं संबोधलं जातं.बौद्ध धम्माचे नीतिनियम,बुद्धानं सांगितलेले विचार एका ग्रंथात समाविष्ट आहेत.आणि या ग्रंथाचं नाव आहे 'त्रिपिटक' किंवा 'तिपिटक' संपूर्ण आयुष्य बुद्ध आपली शिकवण देत राहिला.त्याचं वय ८० पेक्षा जास्त झालं होतं आणि त्याला आपला मृत्यू समोर दिसायला लागला होता.त्याचे शिष्य त्याच्याभोवती जमून रडायला लागले होते. 


'तुमच्यानंतर तुमची जागा कोणीच घेऊ शकणार नाही,'असं ते त्याला म्हणाले,तेव्हा बुद्ध त्यांना म्हणाला, 'माझी जागा कोणी घेण्याची गरजच नाही.माझे विचारच आता जगाला दिशा दाखवतील!'


ज्या वेळी गौतम बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं, त्या वेळी सुभद्र नावाच्या भिक्खूनं आता आपल्याला बुद्धानं सांगितलेले विचार पाळायची काही आवश्यकता नाही,असं इतरांना म्हटलं. त्याचं बोलणं ऐकून इतर बौद्ध भिक्खू खूपच चिंतित झाले.कुठलेही नीतिनियम न पाळता सुभद्रच्या ( जग बदलणारे ग्रंथ,दीपा देशमुख मनोविकास प्रकाशन ) म्हणण्याप्रमाणे स्वैरपणे जगायचं हे या इतर भिक्खूंना मान्य नव्हतं.त्यामुळे ५०० भिक्खूंनी एकत्र येऊन बुद्धाचे विचार आणि बुद्धानं केलेला उपदेश हे सगळं काही संग्रहित करायचं ठरवलं.सगळ्यांनी एकत्र येऊन सहा ते सात महिने अहोरात्र काम करून 'पहिली बुद्ध धम्मसंगती' तयार केली.म्हणजेच त्रिपिटक या ग्रंथाची निर्मिती केली.यानंतर १०० वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा ७०० बौद्ध भिक्खू एकत्र आले आणि त्यांनी सहा महिने काम करून 'दुसरी धम्मसंगती' तयार केली.या दुसऱ्या धम्मसंगतीत पहिल्या धम्मसंगतीचं मजबूत करण्याचं काम केलं गेलं होतं.थोडक्यात, पहिल्यापेक्षा दुसरी धम्मसंगती जास्त अपडेटेड व्हर्जनमध्ये होती. त्यानंतर २३६ वर्षांनी 'तिसरी धम्मसंगती' तयार करण्यात आली आणि ही तयार करण्यात सम्राट अशोकानं पुढाकार घेतला होता.सम्राट अशोकानं १००० भिक्खूंना एकत्रित करून ही धम्मसंगती तयार केली.हिला तयार करण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागला. त्यानंतर श्रीलंकेचा राजा वटगामणी यानं 'चवथी धम्मसंगती' ५०० भिक्खूंना घेऊन सहा महिन्यांच्या कालावधीत तयार केली. यानंतर १८७१ साली बर्मा (आणि आताचं म्यानम्यार) देशाच्या राजान 'पाचवी धम्मसंगती' तयार करण्यात पुढाकार घेतला आणि ही धम्मसंगती मंडाले पर्वतावर तयार झाली.यानंतर 'सहावी धम्मसंगती' पुन्हा बर्मा देशाचे तत्कालीन पंतप्रधान बुनो यानं अपडेट केली.बुनोनं भारत, चीन,जपान,थायलंड अशा जगभरातल्या देशांमधल्या २५०० बौद्ध भिक्खूंना निमंत्रित केलं आणि दोन वर्षांच्या कालावधीत पहिल्या पाच धम्मसंगतीपेक्षाही ही 'सहावी धम्मसंगती' आणखीनच बळकट केली.इतकंच नाही तर बुनोनं 'त्रिपिटक' ग्रंथाची छपाईदेखील केली.

आणि त्यानंतर मात्र ही सहावी धम्मसंगती किंवा 'त्रिपिटक' हा ग्रंथ सर्वत्र वापरला गेला.'त्रिपिटक' या ग्रंथात एकूण १७ ग्रंथांचा समावेश आहे. म्हणजेच बुद्धधम्माच्या 'त्रिपिटक'ची निर्मितीची सुरुवात ५०० भिक्खूंपासून सुरू झाली आणि त्यात पुढे अनेक जण सामील झाले.


… अपूर्ण 


१८/४/२३

शोधायचं आहे प्रत्येकाला आपल्यापुरतं उत्तर - " तत्वमसि "

परवा पुण्याला नरभक्षकाच्या मागावर या पुस्तकाचे लेखक संजय बापट यांना खास भेटण्यासाठी गेलो.छान गप्पा झाल्या,सोबत खाणं झालं.नरभक्षकाच्या मागावर या पुस्तकाच्या निर्मिती बद्दल उत्कंठावर्धक माहिती मिळाली.

त्याचबरोबर त्यांनी काही आपल्या कविता म्हणून दाखवल्या.येताना सोबत त्यांचं भरपूर प्रेम व काही पुस्तक त्यांनी भेट म्हणून दिली.जी त्यांनी माझ्यासाठी राखीव ठेवली होती.त्यातीलच एक पुस्तक परवा वाचून हाता वेगळे केलं.हे मूळ पुस्तक गुजराती लेखक ध्रुव भट्ट यांचे आहे.मराठी अनुवाद अंजनी नरवणे यांनी केलेला आहे तर मेहता पब्लिशिंग हाऊस प्रकाशक आहेत.


प्रोफेस ररुडॉल्फ,सुपरिया,ल्युसी,जिमी,गुप्ताजी,

बित्तबुंगा,पार्वती माँ,कालेवाली,माँ,पुरिया,झुरको,

वनिता,नारदी अशा व्यक्ती आहेत.ज्या आपले जीवन सहजपणे सांगत आहेत.


भारतवर्षाच्या उत्तर आणि दक्षिण भागांना जोडणाऱ्या,एकत्र बांधणाऱ्या,उभयान्वयी, भुवनमोहिनी महानदी नर्मदेला हे पुस्तक समर्पित केलेले आहे.


नदी काठावर झुकलेली झाड रंगीबेरंगी रत्नासारखे गोल दगड पसरलेला किनारा आणि सृष्टीच्या निर्मितीपासून अबोल असलेल्या टेकड्यांमधून अखंड वाहत राहिलेले हे स्वच्छ निर्मळ पाणी (पाणी हेच जीवन या सिध्दांताची ओळख करुण देणारे सतिश खाडे यांची या ठिकाणी प्रखरतेने याद आली.) या सर्वाच्या साक्षीने ज्याला आरंभ नाही आणि अंतही नाही अशा एखाद्या महाकाव्यासारखे हे शब्द दे आणि घे ही अनंत म्हणून इथं एवढ्यातच कुठेतरी वाहत असतात.प्रोफेसर रुडॉल्फ यांनी आदिवासींमध्ये मिसळून त्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी निवडलेला तरुण व त्याचा प्रत्यक्ष जिवंत अनुभव जो जागोजागी इथे मिळतो.

गंगा,यमुना,ब्रह्मपुत्रा या भारतातल्या मोठ्या नद्या आहेत.त्या नद्या कुठे उगम पावतात ते ठाऊक असलं,तरी कुठून वाहत जाऊन,किती अंतर कापून मग समुद्राला मिळतात,याबद्दल माहिती नाहीच.तेव्हा आता भारतातल्या मोठ्या,लांब नद्यांच्या यादीत,या तीन नद्यांशिवाय आणखी एक नाव आज नवं आलं - नर्मदा ! नर्मदा परिक्रमणा समजावून सांगण्याचे कार्य हे पुस्तक करतं.फिजिक्सचा एखादा सिद्धांत समजावून सांगत असताना.ल्युसी म्हणते


एवढं मोठं हे अनंत विश्व एकाच मूलतत्त्वातून उत्पन्न झाले हा विचार किती रोमांचकारी आहे नाही?


गुप्ता,हीच गोष्ट विचार करण्यासारखी आहे.ज्या कोणी हा देश,ही संस्कृती जिवंत ठेवली आहे, त्यांनी धर्माला जीवनाचा पाया मानलेला नाही !"

शास्त्रीजी बोलता बोलता थांबले.नर्मदेकडे बघत राहिले.त्यांना काय म्हणायचं होतं ते मला समजत नव्हतं.शिवाय रोज न चुकता टिळा लावणारा हा ब्राह्मणच हे बोलतोय,याचंही आश्चर्य वाटत होतं.'श्रीहरि' म्हणून गुप्ताजी गप्प बसून राहिले.शास्त्रीजी गंभीर स्वरात पुढे म्हणाले,"बिहारी,ते काय किंवा मी काय,आपण ईश्वराचे भक्त आहोत,धर्माचे नाही आणि हा सारा देशही त्याचप्रमाणे जगतो." दूरच्या एका खडकाकडे बोट दाखवत मग ते पुढे म्हणाले, "तो समोर खडक दिसतोय ना? जा,त्याच्यावर शेंदूर लाव आणि देऊन टाक त्याला कुठलंही देवाचं नाव आणि कर एक नवा संप्रदाय सुरू! तुला कोणी अडवलं किंवा तुला अनुयायी नाही मिळाले,

तर मग येऊन सांग मला,माझं चूक होतं म्हणून!"


स्तब्ध होऊन ऐकत असताना पुढील विचार ऐकून थोडावेळ मी थांबलो.


दिवसातून दोनदा संध्या आणि पूजा करणारा एकांतात राहणारा हा ब्राह्मण आज मला काही वेगळाच वाटला.शास्त्रीजी पुढे म्हणाले, "हे बघ बिहारी,मी काय विचारतोय ते नीट ऐक आपल्या ऋषीमुनींनी जर धर्माला आपल्या आयुष्याशीच जोडलं असतं,तर आपण आपल्याच धर्मामध्ये इतके सगळे संप्रदाय उभे होऊ दिले असते का?"

एवढं विचारून शास्त्री थांबले आणि नंतर ते जे म्हणाले, ते बोलणं मला एक नवीच दिशा दाखवून गेलं! शास्त्री म्हणाले, "धर्म एकत्र आणतो.आज्ञा देतो,असं करा,असं करू नका, यावर श्रद्धा ठेवा,यावर श्रद्धा ठेवू नका वगैरे शिकवतो बिहारी,तुम्ही सगळी तर मुक्तीची लेकरं आहात,परम मुक्तीची;आणि जी मुक्तीची संतानं आहेत,ती बंधनं आणि आज्ञा,यांना जीवनाचं मूलभूत ज्ञान समजून वागतील,असं कसं होईल? शास्त्री पुन्हा थांबले.

गुप्ताजींच्या विचारात गढलेल्या चेहऱ्याकडे बघितलं; शेजारच्या कळशीतून थोडं पाणी घेऊन प्यायले आणि पुढे म्हणाले, "अरे, जी संस्कृती तुम्हांला इतकं स्वातंत्र्य देते, ती संस्कृती धर्माला जीवनाचा पाया मानते, असं कसं म्हणता येईल ?"

मला त्यांचं बोलणं ऐकण्यात खूप गोडी वाटत होती. गुप्ताजी जरा वेळ विचारात मग्न राहिले. मग म्हणाले, "गणेश, तू जो कहे सो.भाई, में तो धरम तू ध्याननो आदमी लागुं हुं. बीजा मन्त्रे समज ना आवे." ("गणेश, तू काही म्हण.बाबा रे, मी आपला पूजाअर्चा मानणारा माणूस, मला हे दुसरं काही समजत नाही.")

"तू तर येता जाता 'श्रीहरि' म्हणत असतोस की! तेच तर कळत नाही,की तुझा तर रोजच त्याच्याशी संबंध आहेच की! एक गोष्ट लक्षात घे बिहारी,आपला या देशातल्या प्रत्येकाचा संबंध सरळ ब्राह्मतत्त्वाशी आहे.मघाशी मी म्हटलं, तशी मुक्तीची लेकरं आहोत आपण.हा देश टिकून आहे ना,तो अध्यात्मावर,धर्मावर नाही." गुप्ताजींचा हात हातात घेऊन शास्त्री पुढे म्हणाले, "अरे, तुझा श्रीहरीही ब्रह्माचंच स्वरूप आहे. ईश्वराला जन्म घ्यावा लागलाय या देशात, आपल्याबरोबर,आपल्यामध्येच राहून आपली सुखदुःखं अनुभवावी लागली आहेत.

आईची अंगाई गीतं ऐकत ईश्वर इथं लहानाचा मोठा झाला आहे.ज्या देशातल्या आया मुलाच्या रक्तात परमब्रह्माच्या संदेशाचंच सिंचन करत असतील,

त्या देशाला धर्म आणि निषेधाचा देश म्हणायचंय कसं? ऐक बिहारी,तू तर व्यापारी आहेस,शिकलेला आहेस.जरा विचार करून बघितलंस,तर तुझ्या लक्षात येईल,की या देशातल्या अडाणी आणि लहानातल्या लहान माणसाला हे उपजतच माहीत असतं की हे जग ब्रम्हांडातून उत्पन्न झालं आहे आणि त्याच्यामध्ये लय पावणार आहे.आपल्या रक्तातच ही उमज आहे.गुप्ताजी व शास्त्रीजी यांच्यातील संवाद विचार करायला लावणारा आहे.


साऱ्या जगा व प्रेम करायला शिकलेली माणसं स्वतःच आपल्याच माणसांबद्दल इतका तिरस्कार मनात कसा ठेवू शकत असतील हे एक न उलघडलेलं कोडं आहे.


अगदी स्वच्छ समजलं,की या भोळ्याभाबड्या आदिवासींनी जे गहाण टाकलेलं असतं,ते घर नसतंच.घर हे आपलं नावापुरतंच.हे लोक गहाण टाकतात स्वतःलाच! कर्जदार घर नसतं,कर्जदार असतं गुप्ताजींकडे पैसे,धान्य,कापड असं काहीतरी आणायला,आपल्या पायांनी चालत आलेलं त्या आदिवासीचं अस्तित्व आणि त्याचं नाव.ते अस्तित्व आणि ते नाव,हे बंधन मानतं,की त्यानं स्वत:ला असलेलं कर्ज आणि व्याज दोन्ही फेडायचं आहे! पौर्णिमेच्या दिवशी जंगलं तुडवत चालत येऊन रस्त्याच्या कडेला थांबण्याची आज्ञा त्यांना त्यांच्या अंतरात्म्यातूनच मिळत असते; दुसरं कोणी सांगत नाही.


"सुमारे दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.मी एका कॉन्फरन्ससाठी दिल्लीला आलो 'होतो.तिथल्या एका बँकेत मी गेलो आणि सही करून चेक दिला." - प्रोफेसर हळूहळू बोलत होते,मी ऐकत होतो.

"बँकेच्या कारकुनानं चेक मला परत देत म्हटलं, 'बॉलपेननं केलेली सही चालत नाही,तुम्हांला शाईनं सही करावी लागेल." बिचारे प्रोफेसर रूडॉल्फ! त्याचं काय मत झालं असेल असं माझ्या मनात येत होतं,तेवढ्यात त्यांचे पुढचे शब्द ऐकू आले.


"ते ऐकून मला आनंद झाला.जगातली एक तरी प्रजा अशी आहे, की जे काही नवं येईल, ते डोळे मिटून स्वीकारत नाही.सुरुवातीला विरोध करेल,मग ज्ञान पारखून बघेल,विचारपूर्वक समजून घेईल,आणि मग स्वीकारण्यायोग्य वाटलं,तर आवडीनं स्वीकारेल."


बोलताना प्रोफेसर जरा थांबले असावेत.टेप जराशी नुसतीच पुढे गेली आणि मग पुन्हा त्यांचा आवाज आला - "आज पुन्हा इथं आलो आहे, तेव्हा बघतो तर तुम्ही सगळेच बॉलपेन वापरायला लागले आहात.पूर्ण विचारांती आता तुम्ही त्याचा स्वीकार केला आहे. इथल्या प्रजेच्या या गुणानं मला नतमस्तक करून विचारात टाकलं आहे."अशा प्रजेचीच संस्कृती हजारो वर्षांची असू शकते.'ती स्वत:ची परंपरा टिकवून धरू शकते. इथून पुढे संपूर्ण जगामध्ये खूप वेगानं परिवर्तन होत जाईल.संस्कृत लोप होण्याची भीती फक्त येथेच उभी होईल असं नाही, सर्वत्रच तसं होणार आहे."


"जे आर्थिकदृष्ट्या निर्बल आहेत,त्यांना ही भीती जास्त आहे.कदाचित मजूर म्हणून किंवा माणूस म्हणून असे लोक टिकून राहतील,पण एक प्रजा म्हणून त्यांची संस्कृती टिकून राहील किंवा नाही, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.म्हणून तुम्हा तरुणांना माझी अशी सूचना आहे,की अशा या प्रजेच्या संस्कृतीला अनुरूप असे उद्योग तुम्ही शोधा.असे काही तुम्ही जर करू शकलात, तर ते तुम्ही स्वतःसाठीच काहीतरी केलंत असं म्हणता येईल.

आफ्रिकेत आम्ही अशी कामं हाती घेतली आहेत आणि तिथल्या तरुण पिढीलाच या कामात गोवलं आहे.बदल हेच जीवन आहे हे यातून समजले.


बित्तबुंगा हे एक व्यक्तीचे नाव नाही तर ते दोघा व्यक्तींची नावे आहेत.ही जरा कडमडी आहेत.म्हणजे त्यांनी शिकुन वेगळपण जपल आहे.व्याध ग्रह व दोन ठिपके या अकल्पित,आश्चर्यकारक आकृत्या या दोघांनीच काढल्या होत्या.त्यांच्याबाबतीत एक गमतीशीर प्रसंग आहे.


या दोघांना एक डॅम तयार करायचा होता.या डॅमसाठीची सर्व सामग्री ही अरण्यं विनामूल्यच पुरवतील ! पण तो लोखंडाचा दरवाजा तर इथं कोणी बनवू शकणार नाही.!त्यासाठी हे दोघं चौदा किलोमीटर चालत शहरात जातील आणि पैसे तर दरवाजासाठी द्यावेच लागतील.लक्षात

घेण्यासारखी महत्त्वाची गोष्ट ही होती,की डॅमसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूचं नाव बित्तुबंगाला माहीत होतं,पण त्या वरखाली होणाऱ्या दरवाजाला काय म्हणायचं,ते ठाऊक नव्हतं!आणि ते कोणाला जाऊन विचारलं,तर ते बित्तुबंगा कसले? स्वत:च त्याचं नाव ठेवून दिलं - 'गलसंटा !' अशा तऱ्हेनं सारं जग ज्याला डॅमचा दरवाजा म्हणतं त्या रचनेला नवं नाव मिळालं 'गलसंटा'!


यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी एक पत्र महत्त्वाचे आहे.


प्रिय ल्यूसी,

आपण एकमेकांना विसरून गेलो आहोतसं वाटावे,इतक्या दिवसांत तुला मी पत्र लिहिले नाहीये,तुझ्या मनांनाही मी उत्तर पाठवली नव्हती.आज अचानक त्यांची उत्तरं मिळाली, म्हणून पत्र लिहायला घेतलंय,गेले

कित्येक महिने मी इथे बित्तबुंगाच्या गावात आहे.आज त्यांच्या घरी राहणार आहे.बित्तुची बायको तिचं छोटंसं शेणामातीचं घर स्वच्छ करत होती.तिथे सामानात मला एक लांबट आकाराची लाकडाची पेटी दिसली.त्या पेटीवर ते मृगनक्षत्र आणि व्याध असे कोरलेले आहे.पेटीमध्ये सुतारकामाची,कोरीव कामाची आणि अशीच काही आणखी हत्यार आहेत,जी नेहमी सगळ्यांच्या वापरात असतात,त्याहून काहीशी वेगळी आहेत.जोगाला ती त्या पेटीबद्दल विचारलं,तर तिनं सांगितलं,की साठसाली

जातीच्या आदिवासींनी ही पेटी बित्तुची आई नारदी हिला तिच्या लग्नात माहेरून येणाऱ्या स्त्रीधनासारखी भेट म्हणून दिली होती.नारदी तर आता हयात नाही,पण जोगानं काही खूपच महत्त्वाची माहिती सांगितली.


खूप वर्षांपूर्वी,जेव्हा नारदी लहान होती तेव्हा,तिनं साठसाली जातीच्या एका लहान मुलाला,लांडग्याच्या तोंडून वाचवला होता.त्याच्या जखमा बांधून मग स्वत: जाऊन ती मुलाला त्याच्या आईबापांकडे सोपवून आली.आता तुला तर साहजिकच वाटेल,की यात काय मोठंसं? पण इथली ही माणसं,जातीजातींमधले भेदभाव, त्यांचे संशय, शंका आणि अंधश्रद्धा यांच्या जाळ्यांमध्ये अशी काही गुंतलेली आहेत,की दुसऱ्या जातीच्या जखमी झालेल्या लहान मुलाला थेट त्यांच्याच वस्तीत पोचतं करायला एकटं जाण्यात नारदीनं जी हिंमत दाखवली,ती खरोखरच प्रशंसनीय आहे.पुरियाचं काय झालं, ते तू वाचलं असलंस,तर नारदीच्या या साहसाचं तुला नक्कीच कौतुक वाटेल.तेव्हापासूनच नारदीला साठसाली आदिवासींच्या प्रमुखानं स्वत:ची मुलगी मानली.

सणावारांना नारदी साठसालींकडे राहायलाही जायची आणि मग नारदीचं लग्न झालं,तेव्हा साठसालींनी तिला ही पेटी भेट म्हणून दिली होती.जोगा म्हणते,की साठसाली लोकांचे रीतिरिवाज खूप वेगळे असतात,असं नारदी सांगायची.मी जोगाला विचारलं,की ही अशी चित्राकृती साठसाली लोक काढतात का,त्यावर ती 'होव' म्हणाली.

जोगाला अगदी संपूर्ण माहिती नाही, पण नारदीनं तिला सांगितलं होतं,की आकाशातला कुठला तरी एक तारा,हा साठसाली लोकांचा देव आहे.त्या ताऱ्याचं नावही साठसाली आहे आणि साठसालींचा प्रमुख तीनदा वीस-वीस,एवढ्या (म्हणजे साठ) वर्षांचा झाला,की तो या देवाच्या नावानं उत्सव करतो.


ल्सूसी,मला वाटायचं,की 'साठसाली' या शब्दाला काही अर्थ असा नसेल.पण आता एवढं ठाऊक झालं आहे,की साठ वर्षांच्या कालावधीचा या जातीच्या नावाशी नक्कीच काहीतरी संबंध आहे. जोगाला सगळं ठाऊक नाही,

त्यामुळं तिला आणखी काही विचारलं, की लगेच म्हणते, 'मुं नीं जाणुं हुं' म्हणजे I do not know ! मी साठसालींच्या जंगलात जाणार आहे,तिथे जे काही समजेल,ते नक्की कळवेन.हे एवढं मला समजलं.ते तुला कळवलं.बित्तुबंगांमध्ये जे कलाकुसरीचं कसब आहे,ते त्यांची आई नारदी हिच्याकडून मिळालेलं आहे,हेही आता लक्षात आलं आहे.लहानपणापासून या पेटीतल्या लहान मोठ्या अवजारांशी खेळून त्यांच्यातला तो गुण विकास पावला असणार."


पुढील प्रसंग प्रार्थना समजावून सांगणारा आहे.


सुपरिया क्रॉसजवळ गेली आणि गुडघ्यावर बसून,पदर पसरून तिनं डोकं टेकवलं.तिला अशी प्रार्थना करताना मी प्रथमच बघत होतो. चर्चमध्ये प्रार्थना करण्याची पद्धतही अशी नसते, पण या घटकेला आम्ही सर्वचजण प्रणाम आणि प्रार्थनांच्या वेगवेगळ्या पद्धतींचा विचार करण्याच्या पलीकडे जाऊन पोचलो होतो.एक सुजाण,

समंजस हिंदू स्त्री प्रभू येशूचे आशीर्वाद मागेल,तेव्हा धर्म आपोआप मार्ग दाखवेल हे स्वाभाविक होतं.अशा वेळी कोण कुठल्या धर्माचं आहे,याची कुंपणं नसतात,धर्मांच्या व्याख्या नसतातशकसल्याही सीमा नसतात.असते फक्त एक इच्छा,अशा कुठल्यातरी दैवी शक्तीच्या आशीर्वादाची,

जी घायाळ आणि आर्त मनानं प्रार्थना करणाऱ्या माणसाला त्याच्या दुःखामध्ये शांती देईल आणि त्याला हिंमत देईल.ती शक्ती मग ईश्वराची असो,कुठल्या जिंदा सागबानच्या सावलीची असो,एखाद्या डॉक्टरच्या हाताची असो,मित्राच्या हृदयातून आलेली असो की अश्वमेधपुन्या नर्मदेच्या पाण्याची असो कुठूनही मिळत असो.


अरण्यात वणवा पेटतो.अशाच पेटलेल्या वणव्याचे वर्णन मनाला वेदना देवून गेले.


पेटलेली अरण्यं भडभडणाऱ्या ज्वाळांच्या आवाजात स्वतःचा विनाशकारी आवाजही मिसळतात.

गवत,पानं,फांद्या आणि कोण जाणे आणखी काय काय,पेट घेण्यापूर्वी स्वतःच्या अस्तित्वाची अखेरची ओळख दिल्यासारखी एक भयानक किंचाळी फोडतात.

प्रचंड आग तिच्या नुसत्या पेटण्याच्या आवाजानंही भीती उत्पन्न करते.आत्ता या मध्यरात्री तिचं असं दर्शन आणि श्रवण किती भयानक वाटतंय,ते मी शब्दांमध्ये कधीही पूर्णपणे वर्णन करू शकणार नाही!


वेड्या फकिरानं सुरुवात केली.


मैं हूं बंदा तेरा, मैं हूं आशिक तेरा 

मैं तो दीवाना हूं मेरे सिजदों का क्या ? 

मैं नमाजी बनूं, या शराबी बनूं 

बंदगी मेरे घरसे कहां जायेगी ?


(भक्त-भगवान, सेवक-स्वामी, पामर-परम या सर्व नात्यांना छेद देणाऱ्या अशा मस्तीपूर्ण साध्या,सरळ मैत्री संबंधात त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असतं.या देशाच्या संस्कृतीचा पाया कशात आहे? या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधातला एक महत्त्वाचा दुवा त्याला सापडला असता.ब्रह्म या संकल्पनेशी असा साधा,सरळ प्रेम करण्याचा,भांडायचा,रुसण्या-मनवण्याचा, अंगाई गीत गाऊन पाळण्यात झोके देण्याचा संबंध,हा या प्रजेला एका दोरीनं बांधून ठेवणाऱ्या अदृश्य धाग्याचा एक तंतू आहे,हे त्याच्या लक्षात आलं असतं. 'बंदगी मेरे घरसे कहां जायेगी'च्या मस्तीत हिंडणारे सुफी संत,'ना मैं कोई क्रिया करम में'चा संदेश हातमागावर विणणारे महामानव, 'अंते तो हेमनुं हेस' म्हणत सर्व भेदभाव विसरून सर्व चराचराकडे एकाच भावनेनं बघणारी मानवरत्नं - या सर्वांचे या प्रजेवर अनंत उपकार आहेत. हजारो वर्षांची संस्कृती जिवंत ठेवण्याची कुवत या प्रजेत आणण्याचं काम अशा ज्ञात आणि अज्ञात अनेकांनी केलं आहे.)


निसर्ग व मानवाचं अनादी आहे.


निसर्गाच्या मांडीवरच बागडत मोठ्या होणाऱ्या या माणसांना निसर्गानं मुक्त आनंदाचं महान दान दिलं आहे.देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा,या आनंदाची मुळं सापडतीलच.निसर्गाशी असलेला हा तादात्म्य भाव प्रत्येक भारतीयाला,प्रत्येक पिढीत,वारशातच मिळत आला आहे.

कदाचित या अशा मनाच्या गाभ्यात असणाऱ्या आनंदालाच आध्यात्मिकता म्हणत असतील? तसंही असेल,पण एवढं खरं,की प्रत्येक माणसाच्या मनात ही भावना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात असतेच.कुठेतरी एखाद्या मनुष्यात हा आनंद त्याच्या परम स्वरूपात प्रकट होतो,तेव्हा तो मनुष्य दैवत्व घेऊन उभा होतो आणि म्हणतो, "अहं ब्रह्मास्मि!" असा माणूस पूजा,धर्म, विधी,कर्मकांड या सर्वांच्या पलीकडे जाऊन पोचतो.तो स्वत:ही निसर्गासारखाच निर्मल आणि श्रद्धावान होऊन जातो. मग तो नमाज पढो,किंवा न पढो,बंदगी त्याला सोडून जाऊच शकत नाही! 'अहं ब्रह्मास्मि' समजावतानाच हेही समजतं,की खरोखर 'अहं' असं काही अस्तित्वातच नाही! जे काही आहे,ते सगळंच 'तत्त्वमसि' आहे!


 "तुम्ही जर झाडाचे पान झालात तर झाड तुम्ही होईल."


जाता.. जाता.. निरोप घेण्यापूर्वी शेवटचा घटना प्रसंग


 " 'Beautiful!" ल्यूसी म्हणाली आणि तिनं नकाशा उघडला.लक्षपूर्वक नर्मदेचं स्थान बघत ती म्हणाली, "सबंध भारताचे बरोबर मध्यावर दोन भाग करते नर्मदा." "माझं मत वेगळं आहे." शास्त्री म्हणाले,"ही या देशाला जोडते.उत्तराखंड आणि दक्षिणपथाला जोडून एकत्र ठेवते रेवा." शास्त्री जरा थांबले आणि दूरवर बघत पुढे म्हणाले, "बेटा,अमरकंटकहून निघून समुद्राला जाऊन मिळते,

तोपर्यंत ही नदी किती श्रद्धा, किती सांत्वना,किती प्रेम, किती आदर,किती पुण्यं आणि अगणित दंतकथांचं सर्जन करते. सर्व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या घरात बसून स्नान करणारे लोकही या नदीचं नाव घेत अंगावर पाणी ओतत असतात.


माणसाचं आयुष्य ही एक मूल्यवान गोष्ट आहे.हीच गोष्ट हे पुस्तक शेवट पणे सांगत आहे.