* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: संस्कृतीची बांधणी / The construction of culture

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

6/29/26

संस्कृतीची बांधणी / The construction of culture

हजारी वर्षे शेतीप्रधान संस्कृतीत आपल्या आश्रयदात्यांसाठी काम करण्याची जी रूढी होती तिच्या ऐवजी संगीतकार,कलाकार,

रचनाकार आणि लेखक मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत फेकले गेले.दिवसेंदिवस त्यांनी आपले उत्पादन अनामिक गिऱ्हाईकांना 'पेश करण्याचा धडाका लावला.हाच प्रकार दुसऱ्या लाटेच्या प्रभावाखालील सर्व देशांमध्ये घडल्यामुळे कलात्मक सर्जनतेची संपूर्ण धाटणीच बदलूम गेली.

संगीत हे याचे ठळक उदाहरण ठरेल.दुसरी लाट आल्यानंतर लंडन,व्हिएन्ना पॅरिस आणि इतर अनेक ठिकाणी जलशांसाठी मोठमोठे कॉन्सर्ट हॉल निर्माण झाले.त्यांच्याबरोबरच गल्ला पध्दतीचाही जन्म झाला. निर्मात्याला पैसे पुरवणारा उद्योगपतीही आला; संस्कृतीच्या ग्राहकांना तिकिटे विकणेही आले !

जो जास्त तिकिटे खपवेल त्याला सहाजिकच अधिक पैसा मिळू लागला.त्यामुळे जास्तीजास्त खुर्च्या असलेले अधिक मोठे हॉल बांधण्यात येऊ लागले. सर्वांत मागच्या रांगेतही संगीत ऐकू जावे या हेतूने मोठा ध्वनी आवश्यक ठरला.या सर्वांचा परिणाम म्हणजे संगीत,खोलीत मर्यादित न रहाता 'सिफोनिक्' झाले.

हिस्ट्री ऑफ म्युझिकल इन्स्ट्ररुमेंट्स या पुस्तकात करें साख्स (Sachs) याने म्हटले आहे,की 'अठराव्या शतकातील संगीत उमरावी संस्कृतीतून निघून लोकानुवर्ती झाल्यासळे दिवसे दिवस अधिक मोठे हॉल जलशांसाठी तयार झाले.त्यामुळे आवाज अधिक मोठा असण्याची आवश्यकता निर्माण झाली." त्याकाळी ही गोष्ट शक्य करण्यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान अवगत झालेले नव्हते, त्यामुळे आवश्यक तितका मोठा आवाज निर्माण करण्यासाठी अधिकाधिक वाद्ये आणि वादक यांची 'भरती' वाद्यवृंदात होऊ लागली.या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे आधु‌निक सिंफनी ऑर्केस्ट्रा.आणि या औद्योगिक संस्थेसाठीच बीथोवेन,शूबर्ट,ब्राह्मस् इत्यादींनी अप्रतिम रचना निर्माण केल्या.वाद्यवृंदात देखील कारखाना आणि त्याची अंतर्गत रचना प्रतिंबिबित झाली होतीच.सुरुवातीला वाद्यवृंदाला कोणी नेता असत नव्हता.कधी कधी नेतेपण वादकांमध्येच एकाकडून दुसऱ्याकडे जात असे.परंतु नंतर कंडक्टर'च्या हाती सर्व सूत्रे गेली.निरनिराळ्या वाद्य विभागात वादकांची विभागणी (आणि स्थापना) झाली.

आणि एखाद्या कारखान्यातील कामगारांनी किंवा कचेरीतील नोकरांनी कामे करावीत त्यानुसार वादक वाद्यांवर कामे करू लागले;आणि आपला कामाचा वाटा एकूण निर्मितीला,संगीताला अर्पण करु लागले ! समाजग्राहकाला ही संस्था आपली निर्मिती विकू लागली;फोनोग्राफ रेकॉर्डस् विकल्या जाऊ लागल्या. आणि अशा तन्हेने संगीताचा कारखाना जन्माला आला.

दुसऱ्या लाटेच्या सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेल्या जीवनपद्धतीचे,वाद्यवृदांचा इतिहाम हे केवळ एक उदाहरण झाले.तीन प्रमुख संस्थांनी,हजारो विविध संघटनांनी सर्वांनीच औद्योगिक तांत्रिक क्षेत्राच्या पद्धतीचा अंगीकार केला;कारण ती एक प्रमुख गरज होतो.परंतु संस्कृती म्हणजे केवळ तांत्रिक क्षेत्र नव्हे, किंवा त्याला अनुरुप असे सामाजिक क्षेत्रही नव्हे.सर्व संस्कृतीमध्ये उत्पादन आणि वितरणविषयक माहिती प्रस्तुत करण्यासाठी जाहिरात क्षेत्राची आवश्यकता असते.त्यात देखील दुसऱ्या लाटेने लक्षणीय असे बदल केले.

कागदी बर्फवादळ

प्राचीन काळापासून आजपर्यंत सर्व मानवी गट प्रत्यक्ष आणि व्यक्तिगत व अशा दळणवळणावर अवलंबून रहात आलेले आहेत.तरीदेखील दूर अंतरावर संदेश पाठविण्यासाठी काही व्यवस्था निर्माण होण्याची निकडही होतीच.प्राचीन पर्शियन लोकांनी ठिकठिकाणी, स्तंभ उभारलेले होते.या 'आरोळी स्तंभा' वर मोठे आणि कर्कश्य आवाज असणाऱ्या लोकांना ठेवण्यात येत असे.एका स्तंभावरील माणूस पुढच्या स्तंभावरील माणसाकडे ओरडून संदेश पाठवित असे.रोमन लोकांनी विस्तृत अशी संदेशवाहक यंत्रणा कार्यान्वित केलेली होती.या यंत्रणेचे नाव होते cursus publicus. इ. स. १३०५ ते १८ व्या शतकाच्या सुरुवातीच्या भागात संपूर्ण युरोपात हाऊस ऑफ टॅक्सीजचा प्रचार होता.ह्यात तट्टूंच्या सेवेचा भाग होता. इ.स. १६२८ च्या सुमारास २०,००० माणसे संदेश वाहक म्हणून कामावर होती.हे जासूद निळे जरतारी गणवेश धारण करून या खंडातील राजपुत्र,सेनापती,व्यापारी आणि सावकार यांच्या संदेशांची ने आण करीत संचरत असत.पहिली लाट-संस्कृती प्रभावशाली असताना या सर्व व्यवस्था फक्त श्रीमंत आणि बलशाली लोकांसाठी राखून ठेवलेल्या असतः सर्वसामान्य लोकांना इथे रिधाव नव्हता.लॉरिअन शिलिक्स या इतिहासात त्याने म्हटले आहे,की " इतर मार्गांनी ते पत्र पाठविण्याचे कोणी प्रयत्न केल्यास संशयाने त्याकडे पाहिले जात असे..आणि अधिकाऱ्यांकडून त्या गोष्टीला प्रतिबंध केला जात असे.थोडक्यात,समक्ष किंवा स्वतः माहितीची देवाण-घेवाण करणे हे सर्वांसाठी खुले होते. परंतु माहिती पाठविण्याचे किवा मिळविण्याचे नवे मार्ग कुटुंब किंवा खेडी यांच्या मर्यादपलीकडील तसे बंदिस्त आणि ठराविक आवाक्याचे होते.आणि त्यांचा वापर सामाजिक किंवा राजकीय हुकुमतीसाठीच होत होता. आणि पुष्कळदा श्रेष्ठ लोकांकडून त्यांचा वापर एखाद्या शस्त्राप्रमाणे होत असे.

दुसरी लाट जेव्हा देशादेशांतून पसरली,तेव्हा तिने संदेश वहनाच्या या मक्तेदारीचा चक्काचूर करून टाकला. श्रीमंत आणि बलशाली सत्ताधारी एकाएकी परहित दक्ष झाले,आणि त्यामुळे हे घडले असे मात्र नाही.झाले काय,की दुसऱ्या लाटेची तंत्राधिष्ठता आणि कारखान्यांतून होणारे प्रचंड उत्पादन या गोष्टीसाठी तितक्याच प्रचंड वेगात संदेशांची देवाण-घेवाण होणे जरुर होते.आणि या जुन्या पद्धतीनाही गरज पूर्ण करणे शक्यच नव्हते.

प्राचीन आणि पहिली लाट-संस्कृतीच्या समाजातील आर्थिक उत्पादन आणि या संदर्भातील दळणवळण तुलनेने साधे होते.आणि सहसा हाताशी असलेल्याकडून ते करून घेता येत असे.ते सहमा तोंडी किंवा हावभावांनी व्यक्त होणारे असे.या उलट दुसऱ्या लाटेच्या अर्थशास्त्राला अनेक ठिकाणी होणाऱ्या कामात अचूक सुसंवाद आवश्यकच होता.केवळ कच्चा मालच नव्हे, तर मोठ्या प्रमाणात माहिती तयार करुन तिचे काळजीपूर्वक वितरण होणे आवश्यकच होते.

ह्यासाठीच दुसरी लाट भरात येत असतानाच प्रत्येक देशाने अहमहमिकेने पोस्ट सेवा उभारली.

खरोखरच पोस्ट ऑफिस हा देखील सरकी दूर करण्याच्या किंवा सूत तयार करण्याच्या यंत्राइतकाच अपूर्व शोध होता आणि आज आपण विसरलो,पण एकेकाळी त्यानेही आनंद व उल्हास निर्माण केला होता.तो मात्र मात्र आता नाहीसा झाला आहे.अमेरिकन वक्ता एडवर्ड एव्हर्ट यांनी म्हटले आहे," मला हे मान्य करावे लागेल,की ख्रिस्ती धर्माखालोखाल, आपल्या आधुनिक संस्कृतीचा पोस्ट ऑफिस हा उजवा हात आहे.'पोस्ट ऑफिसने औद्योगिक युगाच्या दळणवळणाला खूप मोठे क्षेत्र खुले करुन दिले.इ.स.१८३७ च्या सुमाराला ब्रिटिश पोस्ट ऑफिस केवळ श्रेष्ठीचे संदेशवहनच करत नव्हते,तर दरसाल सुमारे ८८ दशलक्ष वस्तूंची वाहतूक करीत होते.त्या काळाच्या मानाने हा वाहतुकीचा अक्षरशः

भडिमारच नव्हे काय? इ.स. १९६० च्या सुमाराला,म्हणजे जेव्हा ओद्योगिक युगाने कळस गाठला होता आणि तिसरी लाट उसळू लागली होती, अशा वेळी हाच आकडा १० महापद्म पर्यंत जाऊन पोचला होता.याच वर्षी अमेरिकेतील पोस्ट खात्याने देशातील प्रत्येक पुरुष,स्त्री व मूल यांना सरासरी ३५५ घरगुती वस्तू पोचवल्या !

दुसऱ्या लाटेच्या संदर्भात,औद्योगिक क्रांतीसह आलेले हे पोस्ट संदेशवहनाचे उधाण,ही तेव्हा होत असलेल्या संदेशवहनाची एक चुणुक म्हणावी लागेल.मोठ्या संस्थांमध्ये यापेक्षाही कितीतरी अधिक प्रमाणात संदेश 'मायक्रो-पोस्टल सिस्टिम्स' द्वारा दिले-घेतले जात होते. मेमो म्हणज सार्वजनिक दळणवळणात कधीही न जाणारी पत्रे होत.इ. स. १९५५ मध्ये,अमेरिकेत,दुसरी लाट उत्तुंग झालेली असताना,तीन मोठ्या कॉर्पोशन्सच्या दप्तरात हूवर कमिशन डोकावत होते तेव्हा त्याला असे आढळून आले,की या तीन कॉर्पोशन्समध्ये अनुक्रमे ३४,०००,५६,०००, व ६४,००० दस्तऐवज व मेमो नोकरीवर असलेल्या प्रत्येकासाठी दप्तरबद्ध होते !औद्योगिक समाजाच्या वाढत्या संदेशवहनविषयक गरजा लेखी स्वरूपात भागवल्या जात होत्या असे नाही.

यामुळे टेलिफोन व तारांचे शोध १९ व्या शतकात वाढत्या संदेशवहन संदर्भातला आपापला भार त्यांनी उचलावा म्हणून लावण्यात आले. इ. स. १९६० च्या सुमाराला अमेरिकन माणसे दररोज २५६ दशलक्ष टेलिफोन कॉल्स करीत होती अतिशय प्रगत अशा टेलिफोन संस्था व त्यांचे जगातले जाळे नेहमीच अतिभारित होत राहिले

ह्या सर्व पद्धती मुख्यतः एक संदेश प्रेषक व तो घेणारा एक संदेश ग्राहक यांच्यासाठी होत्या.परंतु ज्या समाजात प्रचंड उत्पादन होत होते आणि उत्पादित वस्तु प्रचंड प्रमाणात वापरल्या जात होत्या,तिथे संदेशवहनही गठ्याने होणे आवश्यक होते. शिवाय एका संदेश प्रेषकाने दिलेला संदेश एकाच वेळी अनेक ग्राहकांना मिळणे ही गोष्टही आवश्यक झाली.ओद्योगिकपूर्व समाजातील मालक त्याच्या मोजक्याच नोकरांना व्यक्तिशःगरज पडल्यास त्यांच्या घरी जाऊनही,भेटू शकत होता.परंतु औद्योगिक मालकाला त्याच्या हजारो नोकरांच्या संदर्भात ही गोष्ट शक्यच नव्हती;

तो एकेकट्याला भेटू शकत नव्हता.मोठा व्यापारी, किंवा वितरक याला एकेका ग्राहकाशी संबंध ठेवणे हे त्याहूनही अशक्य होते.आणि म्हणून दुसऱ्या लाटेने एकच संदेश एकाच वेळी अनेक लोकांना,कमी खर्चात, आणि विश्वसनीयरीत्या पोचविण्याचे प्रभावी मार्ग शोधले.

पोस्ट सेवा एकच संदेश लाखो जणापर्यन्त पोचवू शकत होती.परंतु अपेक्षित वेगाने नाही.टेलिफोन द्वारे संदेश वेगाने पोचवता येत होते.परंतु त्याद्वारे एकाच वेळी लाखो लोकांना संदेश पोचविता येत नव्हते.ही त्रुटी वृत्तमाध्यमानी भरुन काढली.

अर्थात आजमितीला औद्योगिक राष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वर्तमानपत्रे हा आवश्यक भाग होऊन गेलेला आहे.मोठ्या प्रमाणात त्यांची प्रसिध्दी आणि विक्री होत असते.परंतु राष्ट्रीय पातळीवर या प्रकाशनांची जी उन्नती झाली,त्यात अनेक नव्या औद्योगिक तंत्रांच्या एकाच दिशेने झालेल्या घडणींचे आणि समाज रचनांचे प्रतिबिंब आढळते.

युरोपाच्या आकाराच्या एखाद्या संपूर्ण देशात एका दिवसात प्रकाशने पोचावीत या उद्देशाने आगगाड्यांचा उपयोग करुन घेण्यात आला.काही तासांच्या अवधीत, कोट्यवधी प्रती छापणारे रोटरी छापखाने आले. टेलिफोन आणि तारांचे जाळे उभे राहिले,शिक्षण सक्तीचे झाले आणि त्याद्वारे लोकांना साक्षर करण्यात आले.उद्योगाला आपले उत्पादन जनतेपर्यंत पोचण्याची आवश्यकता होती.

वृत्तमाध्यमातही आपल्याला पुनाःकारखाना तत्त्वाचा अनुभव येतो.वृत्तपत्रे, रेडिओ, सिनेमा, टेलिव्हिजन यांच्या पसाऱ्यातही तत्त्व तेच.कारखान्याचे.लाखो मेंदूवर ह्या सर्व गोष्टी एकाच प्रकारचे संदेश ठसवत रहातात. कारखान्यात उत्पन्न झालेल्या,लाखो घरात वापरल्या जाणाऱ्या एकसारख्या वस्तूंवर नाही का शिक्के किंवा ठसे उमटवण्यात येत ? प्रमाणीभूत,प्रचंड प्रमाणात निर्माण झालेल्या वस्तू ज्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे अशा काही केंद्रीभूत कारखान्यातून निर्माण होतात,आणि लाखो ग्राहकांकडे त्यांचा ओघ वहात रहातो. अशा विस्तृत, शक्तिशाली जाहिरात माध्यमाच्या मदतीखेरीज औद्योगिक संस्कृतीने आकार घेणे अगर ती विश्वसनीयरीत्या कार्यान्वित होणे शक्य नव्हते.

सर्व भांडवलशाही आणि त्याचप्रमाणे समाजवादी समाजातून यानुसार एक गुंतागुंतीचे माहिती क्षेत्र उत्तरले;त्याच्याद्वारां वैयक्तिक आणि सामूहिक संदेशाचे वितरण तयार वस्तूंप्रमाणे किवा कच्च्या मालाप्रमाणे अतिशय कार्यक्षमतेने केले जात असे.हे जाहिरात क्षेत्र तांत्रिक क्षेत्राच्या आणि सामाजिक क्षेत्राच्या बरोबर जणू विणले गेले होते आणि कार्य करत होते;त्याद्वारे त्याने आर्थिक उत्पादन आणि खाजगी वर्तणूक यांच्यात एकतानता आणि एकसूत्रता आणली.या क्षेत्रांनी मोठ्या क्षेत्रात फार महत्त्वाच्या भूमिका बजावल्या.लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ही क्षेत्रे आपल्या एकट्याच्या बळावर इतरांशिवाय अस्तित्वात येऊच शकली नसती.तांत्रिक क्षेत्राने उत्पादन केले आणि संपत्ती तयार ठेवली;सामाजिक क्षेत्राने एकमेकांशी संबंधित अशा हजारो संस्थांसह कार्य करीत प्रत्येक व्यक्तिला विहित कार्य दिले.आणि माहिती क्षेत्राने,एकूण प्रणाली कार्यान्वित रहाण्याच्या दृष्टीने नेहमीच माहिती तयार ठेवली.

एकूण,समाजाची मूलभूत बांधणी त्यांनी केली.

थोडक्यात आपल्याला असे आढळून येईल,की दुसऱ्या लाटेखालील देश मुळात कोणत्याही संस्कृतीचे किवा भौगोलिक परिस्थितीतले असले,तरी आणि कोणत्याही मानववंशाचे,धर्माचे असले,तरी समाजवादी असले तरी, वा भांडवलशाही असले तरी त्यांची नवीन बांधणी एकाच धर्तीवर झालेली होती.

ह्या समान रचनांनी रशिया,हंगेरी,पश्चिम जर्मनी,फ्रान्स, कॅनडा- किंवा दुसरा कोणताही दुसऱ्या लाटेखालील देश- या देशात विशिष्ट मर्यादा तयार केल्या,आणि त्या मर्यादा सांभाळतच त्यांच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक भिन्नता प्रकट झाल्या.

प्रत्येक ठिकाणी जुन्या लाटेच्या रक्षणाचे प्रयत्न करणाऱ्यांत आणि नव्या लाटेद्वारां जुने बिकट आणि क्लेशकारक प्रश्न सोडवले जाणार असल्याचे ओळखणाऱ्यांत राजकीय,सामाजिक,आणि आर्थिक झगडे होऊन गेल्यानंतरच त्या समाजरचना उद्भवल्या.

दुसन्या लाटेने आपल्या आगमनाबरोबर मानवी आशा विस्तारल्या.कारण यावेळीच पहिल्यांदा स्त्री पुरुषांना हे ओळखण्याचे धैयं झाले,की दैन्य,भूक,रोगराई आणि अन्याय या उलथून टाकण्याच्या गोष्टी आहेत. आदर्शवादी कल्पनारम्य जगात रमलेल्या कित्येक लेखकांना आणि तत्त्वचितकांना उभरणाऱ्या औद्योगिक संस्कृतीत शांती,एकोपा,सर्वांसाठी नोकरी,संधीची समानता,

जन्मानुसारच्या ज्येष्ठताक्रमाचा शेवट,आणि अक्षरक्ष: हजारो वर्षे शेतीप्रधान संस्कृतीच्या काळात अस्तित्वात असलेल्या व कधीच बदलणार नाहीत आणि शिवाय अमरच आहेत असे दिसणाऱ्या सर्व कष्टप्रद अवस्थांचा शेवटः इतक्या गोष्टी अंतर्भूत असलेल्या दिसल्या ! आज आपल्याला औद्योगिक संस्कृती तितकीशी आदर्शभूत वाटत नाही.असे वाटते,की ती काहीशी दडपशाही वृत्तीची आहे,भयाण आहे.प्राकृतिक दृष्ट्या विभिन्न असणाऱ्या निरनिराळ्या मानवगटांच्या संबंधांबाबत धोकादायक आणि अस्थिर आहे,लढाया करण्यासाठी टपूनच बसलेली आहे,आणि मानसिक दृष्ट्या दडपलेली अशी आहे.परंतु ती तशी का आहे हे आपल्याला समजणे आवश्यक आहे.ही गोष्ट कळण्यासाठी,ह्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला एका प्रचंड विभाजक तत्त्वाकडे लक्ष द्यावयास हवे.या विभाजक तत्त्वाने पाचरीप्रमाणे कठोर चंचुप्रवेश करुन दुसऱ्या लाटेच्या आत्म्याचे दोन प्रतिस्पर्धी तुकडे केलेले आहेत.

संस्कृतीची बांधणी / The construction of culture

हा तीन विभागात प्रकाशित झालेला लेख संपला.तो २४,२६,२८.या तारखांना क्रमशः प्रकाशित झालेला आहे.आपले धन्यवाद व आभार...