महाराष्ट्र ही शूर वीरांची व संतांची भूमी आहे.अनेक शूरवीर या भूमीत होऊन गेले.यामध्ये छत्रपती शिवरायांचे नाव सर्वप्रथम घ्यावे लागते.छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या भूमीत एक आदर्श राज्य उभा केले.जे राज्य मध्ययुगीन कालखंडातील सरमंजामशाही संपुष्टात आणून रयतेचे लोककल्याणकारी राज्य निर्माण करणारे ठरले.
जगामध्ये अनेक राजे होऊन गेले.परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आजही लोकांच्या काळजावर कोरले आहे.त्या पाठीमागे त्यांना प्राप्त झालेली शिकवण व संस्कार हे माँसाहेब जिजाऊंचे होते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पायाभरणी शहाजीराजे व माँसाहेब जिजाऊ यांनी केली.म्हणून जिजामाता ह्या केवळ आदर्श पत्नीच नाही तर जगातील आदर्श माता ठरल्या.
आदर्श माता ते राष्ट्रनिर्मात्या हा त्यांचा प्रवास समस्त स्त्री जातीसाठी प्रेरक व आदर्शवत ठरतो.
जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा येथे आई म्हाळसाराणी व वडील लखुजीराजे जाधव यांच्या पोटी झाला.लखुजीराजे सिंदखेड राजा येथील जांगीरदार होते.
महाराष्ट्रातील बलशाली व पराक्रमी सरदार म्हणून त्यांची ओळख होती.लखुजी जाधव यांना चार मुल व एक कन्या होती. जिजाऊ एकुलती एक असल्याने त्यांचे लाड लहानपणापासूनच झाले.एकुलती एक लाडाची लेक म्हणून जिजाऊ वाढू लागल्या.परंतु लखुजीराजे यांनी त्यांच्या शिक्षणाकडे बारकाईने लक्ष दिले.त्यांना युद्ध शिक्षण,राजनीति,तत्त्वज्ञान यासारख्या विषयाचे शिक्षण दिले.विविध भाषांमध्ये त्यांना पारंगत केले.आईने संस्कार दिले.हा सर्व माहेरचा वारसा घेऊन जिजाऊ सन १६१० मध्ये वेरूळ येथे आपल्या सासरी आल्या. वेरूळचे भोसले घराणे पराक्रमी व लोकप्रिय होते. मालोजी राजे यांचे सुपुत्र शहाजीराजे यांच्याशी जिजाऊंचा विवाह झाला.
विचार व आचाराने परिपूर्ण असलेल्या जिजाऊ यांना समंजस,
पराक्रमी,विलक्षण बुद्धिमत्ता असणाऱ्या शहाजीराजांची साथ लाभली.शहाजीराजे व जिजाऊ यांचे स्वभाव एकरूप झाले.
शहाजीराजांनी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा संकल्प जिजाऊंनी केला.तो संकल्प होता स्वराज्य निर्मिती.....
शहाजी राजांचा कारभार वाढत होता.त्यांना कधी आदिलशाही कधी निजामशाही स्वीकारावी लागत होती.परंतु जिजाऊंना शहाजीराजे यांनी पूर्णपणे स्वातंत्र्य दिले होते.दोघांच्या विचार मंथनातून स्वराज्य नावाचे अमृत या महाराष्ट्राच्या मातीत वर आले. शहाजीराजांनी जिजाऊंना त्यांच्या मनातील स्वराज्य उभारणीची प्रेरणा दिली.त्यांना युद्धनीतीतले बारकावे समजावले.महाराष्ट्राचा इतिहास व सह्याद्रीचा भूगोल शिकवला.
जिजाऊ यांना महाराष्ट्रातील आदिलशाही निजामशाही यांचा होणारा अन्याय स्वस्त बसू देत नव्हता.रयतेची होणारी फरफट सहन होत नव्हती.स्त्रियांवर होणारा अत्याचार व शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक अस्वस्थ करत होती.मराठा सरदारांमध्ये वर्चस्वावरून स्पर्धा लागली होती.एकमेकांच्या विरोधात कटकारस्थान व लढण्यामध्ये धन्य मानत होते.जिजाऊंना या सर्वांना एकत्र आणायचे होते.
जिजाऊंनी आपल्या आयुष्यात संकटावर संकट पाहिली.परंतु त्या संकटाला कधी घाबरल्या नाहीत. भोसले व जाधव घराण्याचे वैर त्यांनी पाहिले.स्वतःचा भाऊ दत्ताजी व चुलत दीर संभाजी यांना गमवावे लागले.सन १६२९ मध्ये वडील व तीन भाऊ यांची दौलताबाद किल्ल्यात निजामाने घडलेली हत्या मनाला भेदणारी होती.माहेरची सर्व कर्ते पुरुष गमावले.एवढा मोठा प्रचंड आघात त्यांनी संयमाने सहन करत त्यातून मार्ग काढला.आपला थोरला पुत्र संभाजी याला युद्धात गमवावे लागले.असे अनेक आघात सहन केले परंतु रयतेविषयीची तळमळ व प्रेम कधीच कमी होऊ दिले नाही.आपल्या मनातील स्वराज्याचा संकल्प याचा कधीच विसर पडू दिला नाही.या सर्वावर मात करण्यासाठी त्यांनी स्वतःला सावरले.खरंच प्रत्येक स्त्रीने जिजाऊ यांचा हा प्रेरणादायी इतिहास वाचला पाहिजे.
१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर माँसाहेब जिजाऊ व शहाजीराजे यांच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला.बाल वयातच माँसाहेब जिजाऊ यांनी शिवबावर संस्कार घातले.त्यांचे व्यक्तिमत्व सुसंस्कृत बनवले.पराक्रम, शौर्य, स्वाभिमान, आत्मविश्वास,निर्भीडपणा,न्यायवृत्ती हे गुण त्यांच्यात रुजवले.बाल वयातच त्यांच्या मनामध्ये समाजाप्रति कळवळ,रयते विषयी तळमळ,अठरापगड जातीतील मुलांसोबत जिव्हाळा,धर्म संविष्णुतेची भावना निर्माण केली.
आई म्हणून भूमिका निभावत असताना माँसाहेब जिजाऊ यांनी आपलं मूल समाजाचं कसं होईल यावर भर दिला.मातेबरोबर मातीचे रक्षण करायला शिकवलं. श्रीमंतीचा अहंकार,सत्तेची मस्ती त्यांच्याजवळ फिरकू दिली नाही.मध्ययुगीन कालखंडात महिलांच्या बाबतीत सत्ताधीशांसाठी कोणतेच कायदे नसताना माँसाहेब जिजाऊंनी मात्र शिवरायांचे व्यक्तिमत्व चारित्र्यसंपन्न बनवले.म्हणूनच भविष्यात शिवरायांची ओळख स्त्रियांचा सन्मान करणारा राजा म्हणून निर्माण झाली.
व्यसनाधिनतेचा लवलेशही लागू दिला नाही.एक आदर्श पुत्र असे शिवरायांचे व्यक्तिमत्व घडवलं.
शहाजीराजांनी सन १६४० च्या दरम्यान कर्नाटकातील बेंगलोर येथे माँसाहेब जिजाऊ व बाल शिवबांना बोलावून घेतले.तेथे शहाजीराजे व जिजाऊ यांनी शिवबांना युद्धनीती,धर्मशास्त्र,
राजनीति,न्यायशास्त्र, अर्थशास्त्र याचे ज्ञान दिले.विविध भाषांमध्ये पारंगत केले.उद्या उभा राहणाऱ्या स्वराज्याचा राजा पराक्रमी व सुसंस्कृत आई-वडिलांच्या छायेखाली घडत होता.
कवी परमानंद म्हणतो की,जिजाऊ अमर्याद गुणांनी युक्त होत्या.त्या विजयवर्धिनी होत्या.म्हणजेच त्या स्वराज्याच्या प्रेरक होत्या.त्यांनी आपल्या ठायी असलेले शील,सत्यप्रियता,
वाक्चातुर्य,गांभीर्य,दक्षता,जागृती, मनोधैर्य,निर्भयता,शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा स्वराज्यस्वप्न इत्यादी प्रकारच्या सर्व गुणांची संपदा शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वात जाणीवपूर्वक संक्रान्त केली.
बेंगलोर येथे संपूर्ण शिक्षण पूर्ण झाल्यावर शहाजीराजांनी जिजाऊ व शिवराय यांना पुणे सुपे जहागिरीसाठी पुण्याकडे पाठवले.
पाठवत असताना राजमुद्रा,विश्वासू माणसे,मोजके सैन्य देऊन पाठवले.आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव याने बेचिराख केलेले पुणे पुन्हा वसवण्यासाठी व स्वराज्याची मुहूर्त मिळवण्यासाठी माँसाहेब जिजाऊ शिवरायांना घेऊन पुण्यात दाखल झाल्या.
बाल शिवबांच्या हातात सोन्याचा नांगर देऊन स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.अपशकुनाची पार फेकून महाराष्ट्राच्या मातीतून अंधश्रद्धेला मुठमाती दिली. वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून रयतेचे हित जपणारे राज्य शिवरायांच्या रूपाने उभा केले.
लोककल्याणकारी राजासाठी आवश्यक असणारे सर्व गुण शिवरायांमध्ये निर्माण केले.एका राष्ट्रासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी राजा,मंत्रिमंडळ, खजिना,भूप्रदेश,सैन्य,किल्ले,राजमुद्रा,न्यायिक कायदे व ध्वज शिवरायांच्या हाती देऊन जगाला आदर्शवत ठरेल असे लोक कल्याणकारी राज्य निर्माण केले.
सार्वभौम राष्ट्राची सर्व मूल्य रुजवली. ६ जून १६७४ रोजी रायगडाच्या माथ्यावर ३२ मनाच्या सोन्याच्या सिंहासनावर रयतेचा राजा बसवला.जो न्यायप्रिय, प्रजाहितदक्ष,
संवेवेदनशील मनाचा, स्त्रियांचा सन्मान करणारा व शेतकऱ्यांना उभा करणारा राजा होता.
सर्व जाती-धर्मांच्या लोकांसाठी एक विहीर खुली करून सामाजिक समतेचा विचार पेरला.शेतकऱ्यांना स्वतःच्या खाजगी खर्चातून मदत करून उभा करण्याचे काम केले.शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह लावून त्यांना आधार दिला.मध्ययुगातल पहिल सहकार जिजाऊंनी निर्माण केले.
छत्रपती शिवरायांच स्वराज्य सुरळीत सुरू झाल्याचे पाहिल्यानंतर माँसाहेब जिजाऊ यांनी १७ जून १६७४ रोजी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे या जगाचा निरोप घेतला.एक आदर्शमाता ते राष्ट्रनिर्मात्या असा प्रवास करणाऱ्या माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.....!
आदर्शमाता ते राष्ट्रनिर्मात्या माँसाहेब जिजाऊ
हा लेख दैनिक गोदातीर मधून प्रसिद्ध झाला आहे.
लेखक - सुभाष बाबाराव ढगे चाटोरीकर सहशिक्षक,बाल विद्यामंदिर हायस्कूल,परभणी
महत्वाची नोंद - ६ जून १६७४ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला.या दिवशी
सूर्य नगारखान्याच्या कमानीतून उगवला होता आणि त्याचे पहिले किरण सिंहासनावर पडले होते.मध्यान्हाच्या वेळी सूर्य सरळ सिंहासनाच्या चौथऱ्यावर सूर्य येणार होता.
असे भौगोलिक महत्व लक्षात घेऊनच ६ जून १६७४ ही तारीख ठरवण्यात आली असावी असे वाटते.त्या दिवशीचा सूर्याचा मार्ग समजून घेण्यासाठी solar path app च्या मदतीने आजही शोधून काढता येते.
-मिलिंद पराडकर (दुर्ग अभ्यासक)
माधव गव्हाणे यांनी दिलेली ही अधिकची माहिती…
लोकांचे निस्वार्थी वाचणावर व माझ्यावरील प्रेम..
मॅट्रिक फेल विजयीजी, आपणास जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
शुभेच्छा जरी उशिरा आल्या तरी चालतील,
कारण विजय हा वेळेवर नाही तो नेहमी मनात असतो..
मनातील त्या विजयाच्या निर्धारातूनच आम्ही अहमदपूर ते अयोध्या
१२९० किमी सायकल प्रवास सहज पूर्ण केला.
कारण आमच्या मनात होते
विजयाचे विचार विजयीजींची प्रेरणा!
आपण मित्रांना केवळ साथ दिली नाही, तर विचारांनी जगण्याची नवी दिशा दिलीत.त्या विजयाच्या विचारांना सोबत घेऊन
आम्ही अयोध्या गाठली
हेच आपल्या संस्कारांचे फळ आहे.वाचनाची आवड, चिंतनशील वृत्ती
आणि सकारात्मक विचारांची लाट
या जगात अधिकाधिक पसरावी, हीच प्रभूचरणी प्रार्थना!अशा महान विचारांच्या व्यक्तिमत्त्वास
पुन्हा एकदा मनःपूर्वक
जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
आपला मित्र,
बरूरे सर
अहमदपूर, जि. लातूर
साहेब,प्रथमता वाढदिवसाच्या शुभेच्छा धकाधकीच्या आणि घाईगडबडीच्या जीवनात मेंढरा सारखं पळत सुटलो आहे.त्यामुळे आपल्यासारख्या एका महान माणसाचा जन्मदिवस विस्मरणात गेला चुकीला माफी असावी.
या जन्मदिनी मयान ला खूप सारे आशीर्वाद व त्याच्या बाबाला जन्मदिवसाच्या मनःपूर्वक अनेक अनेक शुभेच्छा.Sorry for late
गणेश खंदारे,परभणी
आदरणीय विजय दादा गायकवाड कोल्हापूर यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..
काही माणंस काळजात घर करून जातात परंतु काही माणंस काळीजच होतात. असच व्यक्तीमत्व म्हणजे आमचे मित्र विजय दादा होय.
एक दहावी फेल विधार्थी ते कंपनीतील मजूर व्हाया पुस्तकाचे झाड अशी ओळख निर्माण करणारे आमचे दादा....
आज ज्ञानाचे विद्यापीठ बनले आहेत. वाचक, लेखक, वक्ता व विचारवंत असा प्रवास हा प्रेरणादायी व आदर्शवत ठरला आहे.
पुस्तकांनी त्यांच व परभणीकरांच अतुट नातं निर्माण केल आहे. मनाला भावलेल अस व्यक्तीमत्व आपल्यात एकजीव कधी झाले हे कळालेच नाही.
दादा आज आपला वाढदिवस आमच्या साठी प्रेरणादायी आहे. दादा आपले लेखन, वाचन, ज्ञान हे समाजाची प्रेरणा व्हावी ते अधिक अधिक वृद्धींगत व्हावे व आपल्याला उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना - सुभाष बाबाराव ढगे चाटोरीकर सहशिक्षक,बाल विद्यामंदिर हायस्कूल,परभणी
आदरणीय विजयजी,
तुमच्या आयुष्याची प्रत्येक नवीन गोष्ट एका नवीन पुस्तकासारखी रोमांचक असो', 'तुमच्या स्वप्नांची पुस्तके लवकर पूर्ण होवोत', 'वाचनाच्या या जगात तुम्हाला नेहमी आनंद मिळो'
तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देताना, मला आठवतं की तुम्ही नेहमीच पुस्तकांच्या दुनियेत हरवलेला असता. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक नवीन दिवस एका नव्या पुस्तकासारखा रोमांचक असो, अशी माझी इच्छा आहे.
तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप आनंद, यश आणि समाधान मिळो. तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरू दे आणि तुमच्या आयुष्यात नेहमीच एक सकारात्मक 'कथा' घडत राहो. तुमच्या चेहऱ्यावरील हास्य असेच कायम राहो आणि तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक नवीन पुस्तकासोबत तुमचा आनंद वाढत राहो.पुस्तकांच्या या जगात तुम्हाला नेहमीच नवी दिशा आणि नवी ऊर्जा मिळो,हीच सदिच्छा!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचा स्नेहांकित,
सुनील घायाळ (होशिंग) आणि परिवार
शब्दांशी प्रामाणिक राहिलेला माणूस
— विजय गायकवाड साहेब
जगात खूप लोक शिकवतात,
पण फार थोडे लोक जगणं शिकवतात…
विजय गायकवाड साहेब हे त्यातलेच एक.
त्यांनी कधी मोठेपणाचा दिखावा केला नाही,
कधी अपयशाची लाज बाळगली नाही,
आणि कधीही शब्दांशी अप्रामाणिकपणा केला नाही.
म्हणूनच त्यांच्या लेखनात दिखावा नसतो,
असतो तो फक्त अनुभवांचा प्रामाणिक ठेवा.
विजय साहेब म्हणजे पद, प्रतिष्ठा किंवा शिक्षणाची मिरवणूक नव्हे,
तर संघर्षातून घडलेलं खरं व्यक्तिमत्त्व.
"मॅट्रिक फेल" हा समाजाने लावलेला शिक्का
त्यांनी आपल्या लेखणीने कधीच स्वीकारला नाही,
उलट त्याच शिक्क्याला
शब्दांच्या ताकदीने अर्थपूर्ण करून दाखवलं.
ही केवळ एक वेबसाईट नाही,
ती कधीही न संपणारी एक वही आहे…
ज्यात वेदना आहेत,
अनुभव आहेत,
सामान्य माणसाचं जगणं आहे
आणि आयुष्यावरचा नितांत विश्वास आहे.
रात्री न झोपता लिहिलेल्या ओळी,
मनात साठवलेली सत्य कथा,
आणि "एक जरी वाचक मिळाला तरी मी लिहित राहीन"
हा ठाम निर्धार —
यातूनच आज
६० हजारांहून अधिक वाचक,
२३९ भाषा
आणि २० पेक्षा अधिक देशांपर्यंत
त्यांचं लेखन सन्मानाने पोहोचलं आहे.
विजय साहेबांचं लिखाण
कुणाला शहाणपण शिकवत नाही,
कुणावर बोट दाखवत नाही…
ते फक्त एवढंच सांगतं —
"मी तुझ्यासारखाच आहे."
म्हणूनच त्यांच्या लेखनात
वाचक स्वतःला पाहतो,
स्वतःचं दुःख ओळखतो
आणि हळूहळू सावरायला शिकतो.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त
फक्त शुभेच्छा देणं पुरेसं नाही,
तर त्यांच्या लिहित्या प्रवासाला सलाम करणं
हीच खरी भावना आहे.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा विजय गायकवाड साहेब!
तुमचं लिखाण असंच अखंड सुरू राहो,
तुमच्या शब्दांना नेहमी वाचक मिळत राहोत,
आणि तुमचं आयुष्य
तुमच्या लेखनासारखंच
साधं, खरं आणि माणूसपणानं भरलेलं राहो.
🔍 जरूर भेट द्या .. www.vijaygaikwad.com
जिथे शब्द थांबत नाहीत… आणि माणूसपण जिवंत राहतं.
— आपला
विष्णू गाडेकर