* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२७/१०/२४

उंटाच्या प्रेमात स्त्री A woman in love with a camel

असा बराच काळ लोटला.खार्टुम विद्यापीठातल्या प्राणीवैद्यक विभागातील एका प्राध्यापकाने इल्सेला बोलवून घेतलं.त्याची आणि इल्सेची जुनी ओळख होती. सुदानमधल्या पूर्व सहारातील उंटांवर संशोधन करण्यासाठी इल्सेला शिष्यवृत्ती मिळेल,अशी त्याने व्यवस्था केली होती.सुदानमध्ये उंटांना अजूनही महत्त्व होतं.इल्सेला शिष्यवृत्ती देणारे प्राध्यापक म्हणजे जागतिक किर्तीचे उंटतज्ज्ञ बक्री होते.उंटांवरचं संशोधन कसं असावं,याचे त्यांनी ठरवून दिलेले मापदंड जगन्मान्य होते.त्यांना एक उंटसंशोधन केंद्र प्रस्थापित करायची इच्छा होती.पण उंटांवर जीवन अवलंबून असलेली जगातली कुठलीही जमात कधीच एका जागी फार काळ मुक्कामास नसते,हे पाहता संशोधनकेंद्र नेमकं कुठे प्रस्थापित करावं,याबद्दल त्यांचा निर्णय होत नव्हता.मात्र,इल्सेचा आणि त्यांचा अभ्यास परस्परपूरक असल्याचं दिसल्यावर बक्री,त्यांचा साहाय्यक डॉ. मुहम्मद फादी आणि इल्से यांनी सुदानच्या हद्दीतल्या सहारात जीपमधून शेकडो कि.मी.चा प्रवास केला. त्या भागात त्यांना रशैद बेदूंच्या टोळ्या भेटल्या.त्यांच्याशी बोलण्यातून त्यांना उंटांच्या कळपांची रचना कशी असते,ते कुठल्या वनस्पतींवर जगतात,त्यांच्या प्रजजनातल्या पद्धती आणि अडचणी, त्यांचे विविध आजार आणि त्यांवरचे पारंपरिक उपचार,इत्यादी विषयींची माहिती मिळाली. रशैद बेदू एकोणिसाव्या शतकात सौदी अरेबियातून सुदानमध्ये आले.त्यांनी निरनिराळ्या कामासाठी उंटांचे वेगवेगळे प्रकार आपलेसे केले.त्यांनी अरबस्तानामधून येताना आणलेले उंट आकाराने छोटे,काटक आणि भरपूर दूध देणारे होते.याशिवाय ते स्थानिक मातकट तपकिरी रंगाच्या उंटांची पैदास करू लागले.या उंटांच्या मांसाला (हलीम) इस्लामी जगात खूप मागणी असल्यामुळे हे उंट ते कैरोला कत्तलखान्यात पाठवत असत.याशिवाय ते शर्यतीच्या उंटांचीही पैदास करत होते.इल्सेचा हा अभ्यास चालू असतानाच सुदानमध्ये बंड झालं.सर्वच परकियांचे रहिवास परवाने रद्द झाल्याचं जाहीर करण्यात आलं.

तेव्हा तिला अमेरिकेत परतावं लागलं.परतल्यानंतर इल्सेने एका शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला.संशोधनासाठी तिने 'उंटांच्या सामाजिक,आर्थिक प्रभावाचे आणि उंटपालनाच्या व्यवस्थापनाचे संशोधन'असा विषय निवडला होता.या विषयावर तोपर्यंत फारसं संशोधन झालेलं नव्हतं.तिने मिळवलेल्या उंटविषयक माहितीत तिला दिसून आलं, की उंटपालनात जगात भारत आघाडीवर होता. भारतात केवळ भटक्या जमातीच उंटपालन करत होत्या असं नाही;तर शेतीला जोडधंदा म्हणूनही उंट पाळले जात होते.

भारतातल्या उंटांची संख्या दहा लाखांहून अधिक होती; तिथे 'नॅशनल रिसर्च सेंटर ऑन कॅमल' या संस्थेमार्फत उंटांवर संशोधनही सुरू होतं.इथल्या अभ्यासाचा फायदा आफ्रिकी देशांमधील उंटपालनाला होऊ शकला असता.


इल्सेचा हा प्रस्ताव मान्य झाला.त्याचवेळेस तिच्या पतीला गॅरीला फुलब्राइट शिष्यवृत्ती मिळाली;तो पुण्याला डेक्कन कॉलेजात रुजू झाला;त्यांच्या मुलांना पुण्यातच शाळेमध्ये प्रवेश मिळाला;आणि इल्सेचं कुटुंब पुण्यात राहायला लागलं.कामानिमित्त पुण्यातून राजस्थानात ये-जा करण्याचं तिने ठरवलं.बिकानेर इथल्या उंटसंशोधन केंद्राशी ती आधीपासूनच संपर्कात होती.तिथून तिला भारतीय उंटांबद्दल जी माहिती मिळाली त्यानुसार सोमालिया आणि सुदान या देशांनंतर भारतात जगातील सर्वाधिक उंट होते.इतके उंट असलेल्या देशात उंटांचं प्रजनन,उंटपालन आणि उंटांवर ज्यांची उपजीविका अवलंबून आहे अशा जमाती यांबद्दल कुठेही,कसलेही लेखी अहवाल उपलब्ध नव्हते.


नाही म्हणायला १९०८ साली प्रसिद्ध झालेल्या राजपुताना गॅझेटीअरमध्ये एक नोंद होती - 


'मारवाडमध्ये रेबारी,ज्यांना रायका असंही म्हटलं जातं, त्यांची संख्या सुमारे ३.५% आहे. हे उंटपालनावर जगतात.' त्या नोंदीत शंकर-पार्वतीच्या कथेचाही उल्लेख होता.मात्र याव्यतिरिक्त,राष्ट्रीय उंटसंशोधन केंद्राच्या वार्षिक अहवालात किंवा अलिकडच्या काळातल्या उंटांवरच्या शोधनिबंधांमध्ये सुद्धा उंटपालन, उंटप्रजनन यांचा इतिहास हाती लागत नव्हता.भारतात उंटपालन कधी,केव्हा आणि कसं सुरू झालं,उंट कसे माणसाळवण्यात आले,त्या काळात त्यांचा कसा आणि कशासाठी वापर केला गेला,

त्यांच्या प्रजननपद्धतीत काही सुधारणा केल्या गेल्या का,असे अनेक प्रश्न अनुत्तरितच होते. इल्से हे सारे प्रश्न घेऊन बिकानेरच्या 'नॅशनल रिसर्च सेंटर ऑन कॅमल' इथे दाखल झाली. 


हे संशोधनकेंद्र बिकानेरच्या एका बाह्य उपनगरात आहे. इथे एक उंटपालन केंद्र आहे.त्यात भारतातल्या विविध प्रजातींचे उंट आहेत.कानावर लांब केस असलेले बिकानेरी उंट; मंदगतीने हालचाली करणारे कच्छी उंट; चपळ,लांब पायांचे जैसलमेरी उंट, इत्यादी.यातले कच्छी उंट सर्वाधिक दूध देतात;तर बिकानेरी उंट ओझं वाहण्यासाठी सगळ्यात जास्त उपयुक्त ठरतात. याशिवाय तिथे अरबस्तानातून भेट म्हणून आलेले उंटही होते.हे सगळे उंट सुदृढ होते.त्यांची व्यवस्थित देखभाल होत असल्याचं त्यांच्या सुस्थितीवरून जाणवत होतं.हे उंट वेगवेगळ्या प्रयोगांसाठी वापरले जात होते.कृत्रिम रेतन पद्धतीने गर्भधारणा करण्याचं तंत्र उंटांच्या बाबतीत यशस्वीपणे राबवलं जात होतं.त्याशिवाय 'गर्भ कलमा'चं तंत्र पूर्णत्वास नेण्याचे प्रयोगही या ठिकाणी सुरू होते.

इल्सेला उंटपालांना,त्यातही रायकांना भेटण्याची इच्छा होती.

केंद्राचे संचालक डॉ. खन्ना यांनी तिची ही विनंती मान्य केली.

आणि इल्से प्रथमच एका रायकाला भेटली.त्यावेळी इल्सेला कुठल्याही भारतीय भाषेचा गंध नव्हता.त्यामुळे केंद्रातील कुणीतरी दुभाषाचं काम करत असे.त्या रायकाचं नाव काणाराम असं होतं. "तुमचे उंट कुठं आहेत?" तिने काणारामला पहिला प्रश्न विचारला. "असतील तिकडं कुठंतरी !" पश्चिमेच्या दिशेने हात करत तो म्हणाला.त्या पहिल्या उत्तरानेच इल्सेवर थक्क व्हायची पाळी आली होती.तिच्या चेहेऱ्यावरील विस्मय पाहून तो दुभाषा म्हणाला- "त्याचे उंट इथेच कुठेतरी वीस-पंचवीस किलोमीटरच्या परिसरात चरत असतील.इथलं उंटपालन याचप्रकारे चालतं.फक्त पावसाळ्यात शेतं पिकल्यानंतर उंटांना एकत्र करून गावात आणलं जातं.उंट दिवसाआड पाण्यासाठी गावात परत येतात.इथं उंटांची शिकार करणारे प्राणी नाहीत.या भागात कुणी उंट चोरतही नाही;शिवाय प्रत्येक उंटाच्या पुठ्ठ्यावर त्याच्या गावाची निशाणी उमटवलेली असतेच.समजा एखादा उंट भरकटलाच तर त्याची बातमी त्या निशाणीवरून गावकऱ्यांना कळवली जाते किंवा कुणीतरी त्या उंटाला गावात आणून सोडतो.शिवाय रायका त्या उंटाच्या पावलांच्या ठशावरून त्याचा माग काढू शकतात; ते त्यासाठी प्रसिद्ध आहेत. ही कला ज्यांना अवगत आहे. 


त्यांना 'पगरी' म्हणतात. 'पग' म्हणजे तळपायाचा ठसा.एवढंच नाही तर उंटीण गाभण आहे की नाही, हे सुद्धा त्यांना पायाच्या ठशावरून कळतं."


ही नवी माहिती पचवणं इल्सेला जरा कठीण गेलं.तिने मग दुभाषामार्फत पुढचा प्रश्न विचारला-तुझ्याकडं किती उंट आहेत ?"


"आम्ही तिघं भाऊ आहोत.आमच्या कुटुंबाकडं तीनशे उंट आहेत."


त्यावर इल्सेनं विचारलं, "तीनशे उंट बाळगायचे तर त्यांचा काही उपयोग होत असणार?"


"हो! यातले ८०% उंट माद्या आहेत.त्यांना पिल्लं आहेत.आम्ही ती पिल्लं पुष्करच्या जत्रेच्या वेळी उंटांच्या बाजारात विकतो."


"या उंटांचा इतर काही गोष्टींसाठी तुम्ही वापर करता कां,म्हणजे त्याचं दूध काढणे वगैरे ?" इल्सेने विचारलं.


यावर नकारार्थी मान हलवत काणाराम म्हणाला,"ते कसं शक्य आहे? ते तर दूरवर हिंडत असतात ना? आमच्याकडे एक म्हैस आहे.गायही आहे.त्यांचं दूध आम्ही घरात वापरतो.त्यातून उरतं ते मग विकतो."


आणि उंटाचं मांस - ते तुम्ही खाता का?" हा प्रश्न इल्सेने विचारताच दुभाषानेच मान नकारार्थी हलवत म्हटलं,हा प्रश्न विचारणं म्हणजे रायकांचा अपमान करण्यासारखं आहे.ते हिंदू आहेत आणि ते शाकाहारी आहेत.या प्रश्नाचा त्यांना धक्का बसेल.तेव्हा पुन्हा ही बाब इथं कुणासमोरही बोलू नका.यावर इल्सेने त्या दुभाषाची माफी मागत,तो विषयच बदलला.याच संभाषणात तिला उंटाचा आणखी एक व्यावहारिक उपयोग समजला.रायकांच्या लग्नात उंटांचा हुंडा म्हणून वापर केला जातो.काणारामला लग्नात एक नर उंट आणि २१ माद्या उंट हुंडा म्हणून मिळाल्या होत्या.त्या घटनेला बराच काळ होऊन गेला होता. अलिकडे उंटांचा हुंडा म्हणून वापर बंद झाला होता. त्यावेळी या गावात दोन हजार उंट होते.बदलत्या काळाबरोबर रायकांच्या तरुण पिढीचं उंटप्रेम ओसरू लागलं होतं.एवढे उंट बाळगूनही उंटीणीचं दूध अगदी क्वचित पिण्यासाठी वापरलं जातं.त्याची विक्री केली जात नाही.त्यापासून चीज किंवा दहीही बनवलं जात नाही.ते उंटांच्या पिल्लांसाठीच ठेवलं जातं.उंटांच्या केसांपासून गालिचे आणि उबदार पांघरूणं बनवली जातात;त्यांच्या दोऱ्या वळून चारपाईची नवार म्हणून वापरल्या जातात.उंटांची लीद वाळू आणि मातीत मिसळून भिंती उभारण्यासाठी आणि भिंतीचा गिलावा म्हणून वापरल्या जातात.मेलेल्या उंटांची हाडं कुटून खत करतात.त्यांच्या कातड्यांपासून पिशव्या बनवल्या जातात.नर उंटांना अंगमेहेनतीची कामं करावी लागतात. ओझी वाहणं,गाडे ओढणं,मोटेने पाणी काढणं,वगैरे. तसंच,सीमा सुरक्षा दल सीमेवर पहारा करण्यासाठी उंटांचा वापर करतं.रायकांचं काम उंटपालन करणं; आणि ज्यांना उंटांची गरज असते त्यांना उंट विकणं. राजस्थानी दंतकथांमधून,पारंपरिक प्रेमकथांमधूनही उंटाला फार महत्त्वाचं स्थान होतं.


रायकांशिवाय इतर जमातीही उंट पाळतात.तेव्हा दुभाषामार्फत इल्सेने त्यांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली.तिला कुठेच वेगळी माहिती मिळेना.अनेक गावांना तिने भेटी दिल्या;अखेरीस नोखा नावाच्या गावातल्या रायकांनी तिला 'त्यांचे पूर्वज जैसलमेरच्या महाराजांच्या उंटाची देखभाल करायचे.'अशी माहिती दिली.इतर उंटपालांमध्ये मुस्लिमांचा समावेश होता.ते मात्र उंटांचं दूध प्यायचे.त्यांच्या मते हे दूध खूप पौष्टिक असतं.ते दिवसात तीन वेळा उंटणींचं दूध काढत होते.दररोज प्रत्येक उंटीण आठ ते दहा लिटर दूध देते.ही मुस्लिम उंटपाल मंडळी उंटांच्या शर्यतीसुद्धा आयोजित करतात; तर काही जण उंटांना नाचायला आणि इतर कसरती करायला शिकवतात.उंटाचं मांस मात्र इथेही खाल्लं जात नव्हतं.राजस्थान पिंजून काढताना इल्सेला माहिती मिळाली,की बिकानेरच्या महाराजांनी १८८९ मध्ये एक उंटांची सैन्यतुकडी उभारली होती.त्या तुकडीत ५०० उंटस्वारांचा समावेश होता.

महाराज गंगासिंहांच्या या सैनिकी तुकडीचं नाव 'गंगा रिसाला' असं होतं.ही तुकडी ब्रिटिशांनी चीन,इजिप्त,सोमालीलँड (सोमालिया)आणि अफगाणिस्तानात युद्ध आणि गस्तीच्या कामासाठी वापरली होती.गंगासिंहांच्या राजवाड्याचं आता पंचतारांकित हॉटेलमध्ये रूपांतर झालेलं होतं.जे कागदपत्र उरले होते,त्यांना हात लावताच त्यांचे तुकडे होत होते.ती कागदपत्रं खूप काळजीपूर्वक हाताळून इल्सेला पुढील माहिती मिळाली 'या संस्थानात फार पूर्वीपासून उंटांच्या टोळ्या पाळण्याची प्रथा आहे.या भागात दळवळणाचं दुसरं साधन नसल्यामुळं ही प्रथा पडली.ब्रिटिशांच्या काळात मांडलिक बनल्यानंतर या तुकड्यांसाठी काही कायदे बनवले गेले.रायकांना संस्थानाच्या भूमीत उंट चारायची परवानगी हवी असेल तर प्रत्येक कळपाबरोबर ५० सरकारी उंटांचा समावेश करावा लागेल,अशी अट त्यात होती.रायका याचा गैरफायदा घेतात,असं महाराजांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी ही उंट तुकडीच बरखास्त केली.'


ही माहिती मिळूनही इल्सेचं समाधान झालं नव्हतं. रायकांचे आणि उंटांचे परस्परसंबंध कसे निर्माण झाले, याचं कोडं सुटण्यासाठी हवी असलेली माहिती काही तिला मिळत नव्हती.तिने उंटांचा कळपही बघितला नव्हता.गावकऱ्यांकडचे उंट तिला दिसत;पण चरायला सोडलेल्या कळपांचं दर्शन होत नव्हतंच.त्यात हा भाग भारत-पाकिस्तान सीमेच्या जवळ होता;शिवाय ती परदेशी;त्यामुळे तिला वाळवंटात हिंडून उंटाचे कळप शोधणं किंवा त्यांचं निरीक्षण करणं शक्य नव्हतं.अशा परिस्थितीत,डॉ.देवराम देवासी या रायका तरुणाशी तिची ओळख झाली.त्याने नुकतीच बिकानेर विद्यापीठामधून प्राणीवैद्यकाची पदवी मिळवली होती. विद्यापीठाची पदवी मिळविणाऱ्या मोजक्या रायकांपैकी तो एक होता.


डॉ. देवरामची ओळख झाल्यानंतर खऱ्या अर्थाने इल्सेच्या संशोधनाला दिशा मिळाली.इल्से १९९१ मध्ये प्रथम या भागात आली. नंतर पाच-सहा वर्षं ती पुण्याहून ये-जा करून रायकांचा अभ्यास करत होती. दरम्यान तिच्या पतीची इथल्या शिष्यवृत्तीची मुदत संपली आणि तो अमेरिकेत निघून गेला.नंतर शालेय शिक्षण संपवून मुलंही गेली.इल्सेला मात्र उंट आणि रायकांनी पछाडलं होतं.तिने पुण्याहून आपला मुक्काम हलवला.आता ती साद्री,

जैसलमेर आणि जोधपूर इथे राहू लागली.तिच्या कुटुंबाशी हळूहळू तिचा संपर्क कमी कमी होऊ लागला आणि अखेर संपला.ती उंटांमध्ये अधिकाधिक गुंतत गेली. हिंदी बोलू लागली.


राजस्थानातच राहू लागल्यावर तिने उंटांचा अधिक अभ्यास सुरू केला.राजस्थानामधील उंटांमध्ये एक रहस्यमय आजाराची साथ आली.त्यामुळे रायकांचं जीवन विस्कळीत होऊ लागलं.रायकांची नवी पिढी उंटांना दुरावू लागली,तेव्हा गुरांचीच डॉक्टर असलेल्या इल्सेने त्या रोगाचा छडा लावायचा निश्चय केला.त्या रोगाचं मूळ कारण शोधून त्यावर औषधोपचार केले.



राजस्थानातले उंट मांसासाठी चोरून बांग्लादेशमध्ये नेले जात होते.त्या चोरट्या मार्गाचाही तिने शोध घेतला. अधिकृतरित्या बांग्लादेशी हे नाकारत होते.त्याच सुमारास भारताच्या सीमा सुरक्षा दलाने हा चोरटा व्यापार करणाऱ्यांना पकडलं.त्या काळात बांगलादेशी सैनिकांनी गोळीबारही केला.या बातम्या मग वृत्तपत्रात झळकल्या; आणि हा चोरटा व्यापार चव्हाट्यावर आला.इल्सेने तिचं आयुष्यच आता भारतीय उंट आणि रायका यांच्या सेवेस वाहून घेतलं आहे.एक जर्मन पशुवैद्य सुरक्षित आणि आरामाचं जीवन सोडून पुरातत्व उत्खननात भाग घ्यायला जाते,तिथे प्रथमच उंट बघते, मग उंटांच्या प्रेमाने झपाटून दुर्गम वाळवंटांमध्ये वावरू लागते हे सगळंच अगम्य आणि अद्भुत वाटतं. म्हणूनच आदरानं म्हणावंसं वाटतं,'हॅट्स ऑफ टूयू, इल्से'!



माझे जीवनातील ध्येय केवळ जगणे नाही तर भरभराट करणे आहे; आणि काही उत्कटतेने, काही करुणेने, काही विनोदाने आणि काही शैलीने असे करणे.- माया अँजेलो


समाप्त धन्यवाद ..!

२५/१०/२४

उंटाच्या प्रेमात स्त्री A woman in love with a camel

इल्से कोहलर-रोलेफसन या महिलेने जॉर्डनच्या वाळवंटात काम करत असताना प्रथम उंट हा प्राणी पाहिला.वाळवंटी जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या प्राण्याने ती भारावून गेली.त्यानंतर तिने उंटांवरच्या संशोधनाला वाहून घेतलं.राजस्थानातल्या वास्तव्यावर आधारित तिच्या पुस्तकातून तिचं मनस्वी झपाटलेपण समोर येतं.उंटांच्या प्रेमात पडलेली स्त्री इल्से कोहलर रोलेफसन


 'संगीत रणदुदुंभी' या जुन्या काळातल्या नाटकात एक गाणं होतं-जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सारा त्या गाण्यात माणसाला लागू शकणाऱ्या अनेक वेडांची यादी होती.कनक,

कामिनी,राजसत्ता,देशभक्ती,असे कैक प्रकार.ही सर्व वेडं पुरुषांना लागतात,असं त्या गाण्यात ध्वनीत होतं;पण स्त्रियांनाही अशी वेडं लागू शकतात याचीही अनेक उदाहरणं आहेत.त्यातलंच एक उदाहरण म्हणजे इल्से कोहलर-रोलेफसन.


इल्सेला उंटांनी वेड लावलं.तिने उंटांवरच्या संशोधनाच्या कामी स्वतःला वाहून घेतलं.तिचं संशोधनकार्य विशेषतः भारतातल्या उंटांवर आधारलेलं आहे.त्या अनुभवांवर तिने नंतर एक पुस्तक लिहिलं- 'कॅमल कर्मा- वेंटी इयर्स अमंग इंडियाज कॅमल नोमॅड्स!' या पुस्तकाला जोधपुरचे महाराज दुसरे गणराजसिंह यांची प्रस्तावना आहे.२०१४ मध्ये प्रसिद्ध झालेलं हे पुस्तक बाजारात सहज उपलब्ध आहे.या पुस्तकाची सुरुवात एका पुराणकथेने होते.ही कथा अशी - पार्वतीने एकदा गंमत म्हणून मातीचा एक प्राणी तयार केला.तो ओबडधोबड होता;त्याला पाच पाय होते. हा प्राणी जिवंत कर असा हट्ट पार्वतीने शंकराकडे धरला.शंकराने आधी या गोष्टीला नकार दिला.असला विद्रूप प्राणी जगात टिकाव धरू शकणार नाही,असं शंकराला वाटत होतं.पण पार्वतीने तिचा हट्ट सोडला नाही.अखेर शंकराने नमतं घेतलं;मात्र त्या प्राण्यात प्राण फुंकण्यापूर्वी शंकराने त्याचा पाचवा पाय मुडपून त्याची पाठीवर वशिंड म्हणून स्थापना केली;त्यानंतर त्याने त्या प्राण्याला 'उठ' अशी आज्ञा दिली.त्या विचित्र प्राण्याची काळजी कोण घेणार,हा प्रश्नच होता.तेव्हा शंकराने स्वतःच्या त्वचेचा काही भाग सोलून त्यापासून माणूस बनवला.तो पहिला 'रायका' तेव्हापासून उंट आणि रायका हे एकमेकांच्या सहवासात राहू लागले.


भारतीय पुराणकथांमधले उंटांचे संदर्भ अभ्यासण्याइतकी इल्से उंटांच्या विश्वाशी एकरूप झालेली होती,हे यावरून ध्यानात येऊ शकतं. वास्तविक,इल्से ही मूळची जर्मन प्राणी उपचारतज्ज्ञ.ती एका खेड्यात 'गुरांची डॉक्टर' म्हणून काम करत होती. तिचा उंट या प्राण्याशी किंवा रायकाशी संबंध यायचं कुठलंही कारण नव्हतं.पण,आपल्याकडे 'पूर्वसंचित' नावाची एक कल्पना आहे.

इल्से आपल्या पुस्तकात म्हणते, 'या संकल्पनेत काही तथ्य असावं,असं मला आता वाटू लागलंय.' सलग दहा-बारा वर्षं प्राण्यांवरच्या उपचारांचं काम केल्यावर इल्सेला काहीतरी बदल हवा होता.म्हणून तिने उत्तर जॉर्डनमधल्या वाळवंटातल्या एका पुरातत्वीय उत्खननात प्राण्यांचे अवशेष ओळखण्याची नोकरी स्वीकारली.प्राण्यांच्या शरीरशास्त्राचा अभ्यास असल्यामुळे तिला ही नोकरी मिळाली होती.त्या कामात ती लगेचच खुलली.कारण तिथे रोज नवीन आव्हानं समोर येत होती.पगार नगण्य होता कामाचे तास सूर्योदय ते रात्री उशिरापर्यंत केव्हाही, असे होते;पण कामाचा आनंद जास्त होता.त्यांचा तळ जॉर्डन नदीच्या खोऱ्याच्या सुरुवातीच्या भागात होता. त्या नदीच्या उगमाजवळ ७००० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या मानवी वस्तीची शहानिशा करण्यासाठी ते उत्खनन चालू होतं.


उत्खननाच्या मुख्य तळाजवळ एका ओॲसिस होतं. तिथे भरपूर झाडी होती;पाण्याचा साठा होता.एक दिवस इल्से सकाळी उत्खननाच्या दिशेने चाललेली असताना वाडीच्या पलिकडे तिला कसलीतरी हालचाल जाणवली.वाडीच्या पलिकडे डोंगराचा कडा होता. त्यावरून एका मागोमाग एक असे अनेक उंट वाडीच्या दिशेने उतरत होते.त्यांच्या बरोबर काही माणसंही होती. इल्से थांबून तिकडे लक्षपूर्वक बघू लागली.उंटांची संख्या शंभराच्या आसपास तरी होती.ते सारे अत्यंत शिस्तीत एका मागोमाग एक उतरत होते.बहुतेक सर्व माद्याच होत्या.त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची केसाळ आणि गुबगुबीत पिल्लं चालत होती.ती पिल्लं अजिबात मस्ती करत नव्हती.त्या कळपातला नर उंट मात्र रुबाब करत होता;माद्यांभोवती चकरा मारत होता;मधूनच गुळण्या केल्यासारखे आवाज काढत होता.त्याच्या तोंडाच्या एका बाजूने त्याची जीभ बाहेर आली होती.या कळपाबरोबर पायघोळ तपकिरी अंगरखा आणि तांबड्या चौकटी असलेला कुफिया (अरबी पद्धतीचं डोक्यावरचं आवरण) घातलेला एक माणूस होता.


उंट पाण्याजवळ आले तेव्हा इल्सेला एक अद्भुत दृश्य पाहायला मिळालं.त्या उंटांनी पाण्याजवळ गर्दी न करता आणि अजिबात ढकलाढकली न करता एका वेळेस पाच अशा पद्धतीने पाणी प्यायला सुरुवात केली. आधीच्या गटाचं पाणी पिऊन होईपर्यंत मागचे सर्व उंट शांतपणे वाट बघत उभे होते.आधीचे उंट बाजूला झाले की तो बेदु उंटपाळ पुढच्या उंटांना पाणी प्यायला सांगायचा.

तोपर्यंत ते जागचे हलत नसत. 


इल्से म्हणते, 'हा देखावा माझ्या दृष्टीनं हृदयस्पर्शी ठरला.'ती शिस्त, एवढ्या मोठ्या कळपाचं नियंत्रण करणारा तो एकमेव माणूस,ती हवीहवीशी वाटणारी उंटाची गुबगुबीत पिल्लं, उंटांचा समजूतदारपणा यामुळे हा सर्व पौर्वात्य जादूभऱ्या वातावरणाचा परिणाम असावा,असं इल्सेला वाटून गेलं.


इल्से ती उभ्या असलेल्या टेकडीवरून उतरून त्या बेदुला भेटायला पुढे गेली.ती म्हणते,'कुठल्या तरी अनामिक आकर्षणानं मी तिकडे खेचली गेले.'तिला अरबी भाषेतले दहा-बारा शब्दच माहीत होते.तरीही तिने त्या बेदुशी संवाद साधायचा प्रयत्न केला.त्या प्राण्यांबद्दल तिला कुतूहल वाटतंय,असा आश्चर्यकारक प्राणी अजूनपर्यंत तिने बघितलेला नाही,वगैरे सांगायचा ती प्रयत्न करत होती.त्या माणसाने कुठलीही विस्मयाची भावना चेहऱ्यावर न आणता तिला आपल्या तंबूत येण्याचं निमंत्रण दिलं.त्याच्या पत्नीचे आणि इल्सेचे सूर जुळले.तिचं नाव उम्म जुमा असं होतं.त्यांची अस्वच्छ पण गुटगुटीत मुलं तिथेच खेळत होती.तो तंबू,काही गालीचे,फोमची गादी,स्वयंपाकाची काही भांडी ही त्यांची ऐहिक संपत्ती; हो,तो उंटांचा कळप हा त्यांच्या संपत्तीचा ठेवा होता.कुटुंब आनंदी होतं.हसत- खेळत दैनंदिन उद्योग सुरू ठेवून त्यांनी तिला चहाचे अनेक कप प्यायला दिले.त्यानंतर वेळ मिळेल तेव्हा इल्से त्या उंटाचं निरीक्षण करण्याकरता त्या कळपाभोवती फिरू लागली.वसंत ऋतूची सुरुवात होती.अनेक प्रकारच्या खुरट्या वनस्पती फुलल्या होत्या.गवत वाढलेलं होतं. त्या उंटमाद्या वाकून त्यांना हवं तेवढं गवत खाण्यात मग्न असायच्या.त्यांची वशिंडं पुन्हा जोमाने वाढू लागली होती.ते दृश्य इल्सेला भारून टाकत होतं.उंटाची पिल्लं त्यांच्या आयांभोवती खेळत असायची.

त्यांच्या लुटुपुटूच्या मारामाऱ्या,पळापळ आणि मधूनच दूध प्यायला आईजवळ धाव घेणं,या गोष्टींचं निरीक्षण करण्यात वेळ कसा निघून जातो,हे तिला कळत नव्हतं. ते करताना तिला एक आत्मिक सौख्य लाभत होतं.


एक दिवस अचानक ते कुटुंब त्यांच्या उंटांसकट नाहीसं झालं.

त्यानंतर जॉर्डनच्या वास्तव्यात इल्सेला पुन्हा उंटाचं दर्शन झालं नाही.त्या उत्खननाचं काम संपल्यानंतर ती घरी परतली;तिचा व्यवसाय परत सुरू झाला;तरीही तिचं उंटाबद्दलचं कुतुहल शमलं नव्हतं. तिने उंटाबद्दल मिळेल तिथून माहिती मिळवायला सुरुवात केली.अरबस्तानात पूर्वीच्या काळी भटकंती केलेल्या युरोपी प्रवाशांच्या हकीकती आणि प्रवासवर्णनं तिने अधाशासारखी वाचून काढली. बेदूईंच्या जीवनातलं उंटाचं महत्त्व हळूहळू तिच्या लक्षात येऊ लागलं.बेदूईंचं सामाजिक आणि आर्थिक जीवन उंटाभोवती उभं होतं;त्यांचं खाणं-पिणं उंटावर अवलंबून होतं.परमेश्वराने उंट त्यांच्यासाठीच निर्माण केले आहेत,हा समज त्यांच्यात दृढ होता;कारण त्यांचं अस्तित्वच उंटावर अवलंबून होतं.


उंटाला अरबी भाषेत 'जमाल' म्हणतात. (या शब्दाचा दुसरा अर्थ 'अत्यंत सुंदर' असाही आहे.) 


मात्र,केवळ अरबस्तानच्या वाळवंटातच उंटाचा आणि संस्कृतीचा परस्पर संबंध आहे,असं नाही;तर उत्तर आफ्रिकेतील तुआरेगांच्या संस्कृतीचा आधारही उंट हाच आहे.त्यांच्या संस्कृतीत उंट म्हणजे जिव्हाळा,उंट म्हणजे प्रेम,उंट म्हणजे सुबत्ता.इथिओपियाच्या आफार जमातीत 'मूल मेलं तर चालेल,पण उंट मरता कामा नये,'अशा अर्थाची म्हण आहे.केन्यामधल्या रेंडिल आणि गाब्रा जमातीच्या सर्व परंपरा आणि धार्मिक कर्मकांडं उंटकेंद्रित असतात.या सर्वांपेक्षाही उंटाला अधिक जवळचा मानणारी संस्कृती म्हणजे सोमाली.त्यांचं महाकाव्य म्हणजे उष्ट्रपालनाचा माहितीकोष असून त्यात उंटाची जन्मापासून मृत्यूपर्यंत कशी देखभाल केली तर ऐहिक सुखात कशी भर पडते,याची माहिती मिळते.वाळवंटाशी संबंध नसणाऱ्या प्रदेशातील लोकांना उंटाचं महत्त्व कळत नाही;मग ते उंटांबद्दल तुच्छतेने बोलतात.

संस्कृत साहित्यातही उंटाची कुरूप म्हणून अवहेलना करण्यात आली आहे. युरोपी मंडळीसुद्धा उंटाला तुच्छ लेखण्यात मागे नव्हती,असं इल्सेला अनुभवायला मिळालं.सुदैवाने सर्वच युरोपी या मताचे नव्हते.ज्यांचा वाळवंटी भूप्रदेशाशी प्रत्यक्ष संबंध आला होता त्यांना उंटाचं महत्त्व पटलं होतं.अशा लोकांनी वाळवंटी प्रदेशातील लोकांचे आणि उंटांचे परस्पर संबंध आणि या वाळवंटी जहाजाचे गुण यांच्याबद्दल खूप लिहिलं होतं.विल्फ्रेड ब्लंट,विल्फ्रेड थेसिजर यांनी त्यांच्या वाळवंटी प्रवासाच्या यशाचं सर्व श्रेय उंटांना दिलं होतं.त्यांच्या मते ज्या माणसांना वाळवंटात आयुष्य कंठायचं असतं त्यांच्यावर उंट निर्माण करून देवाने अनंत उपकार करून ठेवले आहेत. जर उंट हा प्राणी नसता तर वाळवंटात माणूस जगूच शकला नसता. वाळवंटी लोकही त्यामुळे उंटाला देवाची देणगीच मानतात.उंट वाळवंटातील काटेरी झुडुपं काट्यांसकट खाऊन जगतो.या क्षारयुक्त आणि निरुपयोगी वाटणाऱ्या वनस्पतींचं तो सकस अन्नात रूपांतर करतो आणि त्यांच्यापासून उर्जा मिळवतो. या वनस्पतींवर जगणाऱ्या उंटमाद्या वर्षभर अतिशय दर्जेदार आणि शक्तिवर्धक दूध देतात;वाळवंटातल्या माणसांचं ते वर्षातील बराच काळ प्रमुख अन्न असतं. काही वेळा या माणसांना तेवढंच अन्न उपलब्ध असतं. या शिवाय उंटाचं मांस,उंटाची लोकर आणि उंटाचं शेण हे वाळवंटात जगणाऱ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आणि उपयुक्त पदार्थ असतात.


वाळवंटी परिस्थितीचा अभ्यास करणाऱ्या परिस्थितिकी तज्ज्ञांनी उंटावर स्तुतीसुमनांचा वर्षावच केलाय.त्यांच्या मते उंट ही निसर्गाची कमाल आहे.वाळवंटात जगणारं ते एक आश्चर्यजनक यंत्र आहे.उंट परिसराच्या तापमानानुसार आपलं शारीरिक तापमान बदलू शकतो. त्यामुळे त्याला कमीत कमी घाम गाळावा लागतो आणि तो पाण्याची बचत करू शकतो.मुख्य म्हणजे उंटाच्या तांबड्या पेशींची पाणी साठवण्याची क्षमता अफाट असते.उंट जेव्हा पाणी पितो तेव्हा या पेशी त्यांच्या मूळ आकाराच्या २४० पट फुगू शकतात.बाकी कुठल्याही प्राण्याला ही किमया साध्य नाही.अशी माहिती गोळा करता करता इल्से उंटांमुळे अधिकाधिक प्रभावित होत गेली.तिने उंट आणि पुरातत्व हे दोन्ही विषय एकत्रित करून अभ्यास करण्याचं ठरवलं.आपल्या डॉक्टरेटसाठी तिने 'उंट कसा आणि केव्हा माणसाळला?' हा विषय निश्चित केला.आजच्या पाळीव प्राण्यांचे पूर्वज एकेकाळी वन्यप्राणी होते.तसं बघायला गेलो तर माणूसही एके काळी वन्यजीवच होता.तो वस्ती करून राहायला लागल्यावर हळूहळू त्याला कळत गेलं,की काही प्राणी आपल्याला उपयुक्त ठरू शकतात.मानवी वस्तीजवळ राहून अन्न आणि संरक्षण या दोन्ही गोष्टी सहज उपलब्ध होतात,हे काही प्राण्यांनाही हळूहळू लक्षात येऊ लागलं. वन्यप्राण्यांचे पाळीव प्राणी होताना हळूहळू त्यांच्यात काही सूक्ष्म असे बदल घडत गेले.माणसाने त्या प्राण्यांचं नियंत्रित प्रजनन केलं.त्यामुळे त्यांच्या दुधाची लोकरीची प्रतवारी,आक्रमकपणा आणि असेच इतरही गुणधर्म कालांतराने बदलत गेले.ज्या लोकांनी आणि जनसमूहांनी त्यांच्या परिसरातल्या प्राण्यांना माणसाळवलं,त्या समाजाच्या सामूहिक चालीरीती आणि परंपरांमध्ये ते प्राणी सामावून घेतले गेले. आपल्याकडे गायीच्या बाबतीत हे घडून आलं,तर वाळवंटात उंटाच्या बाबतीत ते घडलं.उंट,घोडा आणि शिडाची जहाजं यांच्यामुळे माणूस पृथ्वीवर सर्वदूर पसरला. उंट नसते तर चीनपासून निघणारा रेशीम मार्ग (सिल्क रूट), दक्षिण अरबस्तान आणि भूमध्यसागराभोवतालचे प्रदेश यांच्यातील सुगंधी मार्ग (इन्सेन्स रूट), आणि भारतातून युरोपात मसाले नेणारे मार्ग, तसंच सहाराचा भूप्रदेश अशा ठिकाणी माणूस कधीच पोचला नसता. वाळवंटी युद्ध आणि वाळवंटातून होणारा व्यापार तसंच अरबांमार्फत पूर्वेचं ज्ञान पश्चिमेत पोचण्यामागे उंटांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.उंट माणसाळल्यामुळे उंटाचं प्रजनन करणाऱ्या जनसमूहाची एक नवी संस्कृती उदयास आली.जगाच्या वेगवेगळ्या भागांतल्या उंटकेंद्रित जमातींमध्ये एक मूलभूत साम्य आहे.एक म्हणजे बहुतेक सर्व जमाती भटक्या आहेत.दुसरी एक महत्त्वाची गोष्ट,म्हणजे उंटांचा जननदर इतर बऱ्याच पाळीव प्राण्यांच्या मानाने खूप मंदगती असल्याने या जमातींनीही त्यांचा जननदर कमी करण्याचे काही मार्ग शोधलेले आहेत.या जमातींनी कुटुंब नियोजनाचे मार्ग शोधले नसते तर त्यांच्या संख्येला आवश्यक तेवढे उंट उपलब्ध झाले नसते आणि त्यांना वाळवंटात जगणं अवघड झालं असतं.


इल्सेचा अभ्यास सुरू झाला.उंटाच्या रानटी अवस्थेतून पाळीव अवस्थेत येण्याचे पहिले टप्पे अज्ञातच होते, असं तिच्या लक्षात आलं.याचं कारण वाळवंटात म्हणावं तितकं पुरातत्त्वीय संशोधन झालेलं नाही,त्यामुळे याबद्दलचे पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत.मग इल्सेने वाळवंटी उत्खननांचे यापूर्वीचे सर्व अहवाल शोधून त्यात काही पुरावे दडले आहेत का,हे शोधणं सुरू केलं. 


उंटाची हाडं,उंटांच्या मूर्ती,उंटांसंबंधी भित्तीचित्रं, गुहांमधली चित्रं,मुलांच्या खेळण्यांच्या अवशेषांमधली उंटकेंद्री खेळणी,

मडक्यांच्या खापरांवरील चित्रं आणि अशाच आणखी काही गोष्टींचा शोध तिने घेतला.यामुळे अगदी प्रागैतिहासिक काळापासून उंट आणि माणूस यांचा परस्पर संबंध कसा होता,हे स्पष्ट होण्यास मदत झाली.त्यावरून इल्सेने जे अंदाज बांधले त्यानुसार इ.स.पूर्व तीन हजारच्या आसपास म्हणजे सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी कधी तरी उंट (म्हणजे ड्रोमडेरी,अर्थात एका वशिंडाचा उंट) मानवाचा साथी बनला. 


साधारणपणे त्याच सुमारास बॅक्ट्रियन कॅमल म्हणजे दोन वशिंडांचा उंट उत्तर इराण आणि तुर्कमेनिस्तानमध्ये माणसाचा साथी बनला.


यथावकाश इल्सेला पीएचडी मिळाली.त्यानंतर पुढे काय हा प्रश्न तिच्यासमोर होताच.त्याचवेळी तिला जॉर्डनमधल्या बेदूंच्या आणि उंटांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली.पण तिला जॉर्डन सरकारने संशोधनासाठी आवश्यक ती परवानगी नाकारली.त्यासाठी दिलं गेलेलं कारण तसं विचित्रच होतं.अधिकृत माहितीनुसार जॉर्डनमध्ये कुठेही तंबूत राहणारे बेदू अस्तित्वात नव्हते;कुठलेही बेदू किंवा अरब उंटांवर अवलंबून नव्हते किंवा उंट वापरतसुद्धा नव्हते. हे खरंतर धादांत असत्य होतं;पण ते मान्य करणं इल्सेला भाग होतं.मग तिने पुन्हा पुरातत्त्वीय संशोधनात भाग घ्यायला सुरुवात केली.याच सुमारास गॅरी रोलेफ्सन हा मानवशास्त्रज्ञ तिच्या जीवनात आला. त्यांचा प्रेमविवाह झाला.नंतर वर्षभरातच तिला जुळं झालं.त्यावेळी ती अम्मानमध्ये होती.तिच्या आयुष्यातून उंट हद्दपार झाल्यातच जमा होते.हे जोडपं मग कॅलिफोर्नियामध्ये सॅन डिएगोला वास्तव्यास गेलं तिथल्या कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये गॅरी मानवशास्त्राचा प्राध्यापक म्हणून रुजू झाला;तर इल्से पुरातत्व शिकवू लागली.


महत्वाची नोंद - हटके भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन पुणे,जगातल्या सर्व भटक्यांना… १८३ पानांचे व १७ अज्ञात भटक्यांची प्रेरणादायी,जीवनगाथा या पुस्तकात आहे,पुढील लेख हा लेखाचा शेवटचा भाग.त्याचसोबत पुस्तकाचाही शेवट…आपण बघता बघता थोडं थोडं करून संपूर्ण पुस्तक वाचले. 


प्रत्येक प्रवासाची सुरुवात एका पावलाने होते. आपल्या सर्वांचे आभार व धन्यवाद

२३/१०/२४

अभ्यासाचे महत्त्व / Importance of study 

अभ्यासाचे महत्त्व खूप मोठे आहे,कारण अभ्यास हा यशाचा पाया आहे.जेव्हा एखादी व्यक्ती नियमितपणे अभ्यास करते,

तेव्हा ती ज्ञान मिळवते,कौशल्य विकसित करते आणि आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्याची क्षमता वाढवते.


अभ्यासाचे काही मुख्य फायदे असे आहेत:


१. ज्ञानवृद्धी:अभ्यासामुळे विषयाचे सखोल ज्ञान मिळते,

ज्यामुळे कोणत्याही क्षेत्रात प्रगती करणे शक्य होते.


२.आत्मविश्वास: योग्य अभ्यासामुळे व्यक्तीला आत्मविश्वास मिळतो.विषयाची समज वाढल्याने परीक्षांमध्ये किंवा व्यावसायिक जीवनात यश मिळवणे सोपे होते.


३.समस्या सोडवण्याची क्षमता:अभ्यासामुळे विचारशक्ती वाढते आणि समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता विकसित होते.


४.शिस्त आणि एकाग्रता:नियमित अभ्यासामुळे शिस्त येते,आणि व्यक्ती अधिक एकाग्रतेने काम करू शकते.


५.कार्यक्षमता:अभ्यास केल्यामुळे कार्यक्षमता वाढते, ज्यामुळे कमी वेळात जास्त कामे करता येतात.


अभ्यास हा सतत करण्याचा एक प्रक्रिया आहे,जो यशाच्या दिशेने नेणारा प्रमुख घटक आहे.


 नवीन संधी:अभ्यासामुळे नवीन संधी निर्माण होतात.उदाहरणार्थ,

उच्च शिक्षण,चांगली नोकरी आणि वैयक्तिक विकासासाठी नवीन दरवाजे उघडतात.


 आर्थिक स्थिरता:शिक्षण आणि कौशल्य विकासामुळे आर्थिक स्थिरता प्राप्त करणे सोपे होते.


समाजात योगदान: अभ्यासित व्यक्ती समाजाच्या विकासात अधिक प्रभावीपणे योगदान देऊ शकते.


आयुष्यभर शिकणे:अभ्यास हा केवळ शालेय जीवनापुरता मर्यादित नाही.आयुष्यभर शिकणे हे सतत विकासासाठी आवश्यक आहे.


 तणाव कमी करणे: अभ्यासामुळे व्यक्ती अधिक आत्मविश्वासपूर्ण बनते,ज्यामुळे तणाव आणि चिंता कमी होते.


अभ्यास असा करावा…!


नियमित वेळापत्रक:अभ्यासाचे एक निश्चित वेळापत्रक तयार करा आणि त्याचे पालन करा.


 शांत वातावरण:अभ्यासासाठी एक शांत आणि स्वच्छ वातावरण निवडा.

 

लक्ष केंद्रित करा:अभ्यास करताना मोबाइल आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टी दूर ठेवा.


 समूह चर्चा: मित्रांसोबत विषयाची चर्चा करा.


 विराम घ्या: नियमितपणे छोटे-छोटे विराम घ्या.अभ्यास हा एक प्रवास आहे,एक गंतव्य नाही.त्यामुळे, सतत शिकत रहा आणि आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहा.


अभ्यासाबद्दल तज्ञांची अभ्यासपूर्ण मते…


१. मल्कम ग्लॅडवेल -आपल्या "Outliers" या पुस्तकात ग्लॅडवेलने १०,००० तासांचे नियम मांडले आहेत.त्याच्या मते,कोणत्याही क्षेत्रात तज्ज्ञ होण्यासाठी साधारणतः१०,००० तासांच्या सातत्यपूर्ण अभ्यासाची आवश्यकता असते.


२.अँडर्स एरिक्सन - या मानसशास्त्रज्ञाने "सजग अभ्यास" (deliberate practice) या संकल्पनेचा विचार मांडला आहे.

त्याच्या मते,गुणवत्तापूर्ण आणि लक्षपूर्वक अभ्यास केल्यास कौशल्य अधिक तीव्रतेने वाढते. 


४.जेम्स क्लीअर - "Atomic Habits" या पुस्तकात क्लीअरने सवयी आणि अभ्यासावर भर दिला आहे. त्याच्या मते,लहान पण नियमित सुधारणा अभ्यासात मोठे बदल घडवू शकतात.सतत लहान पाऊल उचलल्यास दीर्घकाळात मोठे परिणाम दिसून येतात.


४.कारोल ड्वेक - ड्वेकच्या "Growth Mindset" या सिद्धांतानुसार,लोकांच्या शिकण्याच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास आणि मानसिकता मोठा प्रभाव टाकते.तिने सुचवले की,जर एखादी व्यक्ती निरंतर प्रयत्न आणि सुधारणा यावर विश्वास ठेवेल तर ती अभ्यासाच्या माध्यमातून अधिक प्रगती करू शकते.


प्रेरणादायक कथा:


१.थॉमस एडिसन:


थॉमस एडिसनला त्याच्या संशोधनांमध्ये अनेक अपयश आले,

विशेषतः विजेचा बल्ब तयार करण्याच्या प्रयोगात.असे म्हणतात की त्याने बल्ब तयार करण्यासाठी १००० पेक्षा अधिक प्रयोग केले.जेव्हा त्याला अपयशाबद्दल विचारले गेले,तेव्हा त्याने उत्तर दिले,मी अपयशी झालो नाही,तर मी १००० मार्ग शोधले की बल्ब कसा तयार होत नाही. एडिसनच्या या सातत्यपूर्ण अभ्यासातून सिद्ध झाले की अपयश हा केवळ यशाकडे जाण्याचा एक टप्पा आहे.


२. अभ्यासात यशस्वी झालेला अर्जुन (महाभारत):


महाभारतातील अर्जुनाची एक प्रसिद्ध कथा आहे,जिथे गुरु द्रोणाचार्याने सर्व शिष्यांना पक्ष्याच्या डोळ्यावर बाण मारण्याचे आव्हान दिले.सर्व शिष्यांनी विविध गोष्टी पाहिल्या—पक्षी, झाड,

आकाश—परंतु अर्जुनाने फक्त पक्ष्याचा डोळाच पाहिला.त्याच्या एकाग्रतेमुळे त्याला लक्ष्य भेदता आले.ही कथा दाखवते की सराव आणि एकाग्रता केवळ यशाच्या दिशेने नाही,तर उत्कृष्टतेच्या दिशेने देखील नेते.


३.ब्रुसली ची शिस्त:


जगप्रसिद्ध मार्शल आर्टिस्ट ब्रुस लीने कधीही सातत्याने सराव करणे थांबवले नाही.त्याची प्रसिद्ध म्हण होती,मी त्या व्यक्तीला घाबरत नाही जी १०,०००विविध प्रकारचा सराव करते,परंतु मला त्या व्यक्तीची भीती वाटते जी १०,००० वेळा फक्त एकाच प्रकारचा सराव करते." ब्रुस लीच्या या म्हणीतून दिसते की,त्याच्या यशाचे रहस्य फक्त तंत्रज्ञानात नाही,तर शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण सरावात होते.


४. बेथोवेन:


जगप्रसिद्ध संगीतकार लुडविग वॉन बेथोवेन हे ऐकू येणे जवळपास पूर्णपणे गमावून देखील आपली कला शिकण्यात आणि सर्जनशीलतेत गुंतलेले राहिले.त्यांनी त्यांचा संगीतातील अभ्यास अखंड चालू ठेवला आणि काही महान रचना तयार केल्या,ज्या आजही प्रेरणादायी मानल्या जातात.त्याचे यश हे त्याच्या असामान्य कौशल्यापेक्षा,त्याच्या अविरत अभ्यासामुळे मिळाले.


५.मायकेल जॉर्डन:


मायकेल जॉर्डन हा इतिहासातील सर्वात महान बास्केटबॉल खेळाडूंपैकी एक आहे,परंतु एकदा त्याला हायस्कूलच्या बास्केटबॉल संघातून वगळण्यात आले होते.या अपयशाने त्याला खूप मोठा धक्का बसला, परंतु त्याने हार न मानता अविरत अभ्यास सुरू ठेवला.जॉर्डन म्हणतो,मी माझ्या आयुष्यात ९,०००पेक्षा अधिक वेळा चूक केली आहे,३०० पेक्षा अधिक सामने हरलो आहे.यामुळेच मी यशस्वी झालो." त्याच्या कथेतून समजते की अभ्यास हा अपयशावर मात करण्याचा मार्ग आहे.


मनोरंजक कथा:


१.अब्राहम लिंकन:


अब्राहम लिंकनचे बालपण अत्यंत गरीब परिस्थितीत गेले.

त्यांच्याकडे ना योग्य पुस्तके होती,ना शाळा.तरीही, लिंकन यांना शिकण्याची प्रचंड इच्छा होती.ते कोणतेही पुस्तक जिथे सापडेल तिथून वाचायचे आणि रात्रभर अभ्यास करायचे.ते ज्या लाकडी घरात राहत होते, त्याच्या दिव्याच्या प्रकाशात त्यांनी आपले शिक्षण घेतले.या कठीण परिश्रमामुळे ते अमेरिकेचे एक महान अध्यक्ष बनले.


२.फरारी आणि चिकट नोट्स:


3M कंपनीत काम करणारे स्पेन्सर सिल्वर यांनी १९६८ मध्ये एका प्रकारचे कमजोर चिकट पदार्थ शोधले,परंतु त्याचा कोणताही वापर तेव्हा दिसत नव्हता.काही वर्षांनंतर,आर्थर फ्राय नावाच्या शास्त्रज्ञाने त्या चिकट पदार्थाचा वापर करून पुस्तकात पानांसाठी चिकट नोट्स तयार केल्या.हे एक चांगले उदाहरण आहे,की काही वेळा सतत चुकांमधूनच उपयोगी वस्तू शोधल्या जातात.त्यांनी हा प्रयोग शिकायला घेतला आणि चिकट नोट्स (Post-it) एक प्रचंड यशस्वी उत्पादन बनले.


३.आयझॅक न्यूटनचे सफरचंद:


एकदा आयझॅक न्यूटन एका झाडाखाली बसलेले होते आणि अचानक त्यांच्या डोक्यावरून एक सफरचंद पडले.या साध्या घटनेने न्यूटनच्या मनात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताचे बीज पेरले.त्यानंतर त्यांनी या घटनेवर बारकाईने अभ्यास करून गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला.या कथेतून आपल्याला दिसते की, साध्या गोष्टींमध्येही जिज्ञासा आणि अभ्यासातून महान शोध लागू शकतात.


४. हेलन केलरची कथा:


हेलन केलर जन्मतःच अंध आणि मूक होत्या. बालपणात त्यांना ना बोलता येत होते,ना ऐकता.पण, शिक्षक ऍन सुलिव्हन यांच्या मदतीने आणि स्वतःच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे त्यांनी शिकण्याचे कौशल्य आत्मसात केले.शेवटी,त्या जगभरात प्रसिद्ध लेखिका आणि प्रेरणादायक वक्त्या बनल्या.हेलन केलरची कथा दाखवते की,केवळ सातत्य,मेहनत आणि अभ्यासाच्या माध्यमातून कठीण परिस्थितीतही यशस्वी होता येते.


५.जॉन किचिंगचे माजीजीषी अभ्यास:


जॉन किचिंग यांनी फोटोग्राफीचा अभ्यास करत असताना फोटोनिक फिल्टर वापरून दैनंदिन वस्तूंचे जवळून फोटो काढण्यास सुरुवात केली.एकदा त्यांनी माजीजीषी (dandelion) फुलाचे जवळून फोटो काढले,ज्याने संशोधकांना या फुलाच्या रचनेविषयी नवी माहिती मिळाली.या लहानशा अभ्यासाच्या शोधामुळे विज्ञान क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण योगदान मिळाले.


अशा रंजक कथा शिकवतात की,अभ्यास हा केवळ ज्ञान मिळवण्याचा मार्ग नाही,तर तो कल्पनाशक्ती आणि जिज्ञासेने यश मिळवण्याचे साधन आहे.


खालील काही तत्त्वे आणि यशस्वी व्यक्तींच्या अभ्यासाच्या वेळांचा आढावा:


१.१०.००० तास नियम:


मल्कम ग्लॅडवेलच्या "Outliers" पुस्तकानुसार, कोणत्याही क्षेत्रात तज्ज्ञ होण्यासाठी साधारणतः १०,००० तासांचा सराव किंवा अभ्यास आवश्यक आहे. याचा अर्थ असा की,जर एखादी व्यक्ती दररोज ३ तास अभ्यास किंवा सराव करते,तर तिला १० वर्षे लागतील तज्ज्ञ होण्यासाठी.अर्थातच,हे एक साधारण गणित आहे,

परंतु यशस्वी व्यक्तींनी त्यांच्या अभ्यासात दीर्घकाळ घालवला आहे.


२. एलोन मस्क:


टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक एलोन मस्क हे स्वतःची अभ्यास आणि शिकण्याची प्रक्रिया सातत्याने चालवतात.त्यांच्या मते,ते आठवड्यातून ८०-१०० तास काम करतात,ज्यात सतत शिकण्याचा आणि नवीन गोष्टींचा अभ्यास करण्याचा समावेश असतो.त्यांनी स्वतःच रॉकेट विज्ञान आणि इतर तांत्रिक कौशल्ये अभ्यासातून आत्मसात केली आहेत.


३.बिल गेट्स:


मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स हे वाचनाच्या प्रचंड चाहत्यांपैकी एक आहेत.ते दररोज किमान एक तास वाचन करतात,आणि दरवर्षी ५० पुस्तके वाचतात. अभ्यास आणि वाचनाच्या सवयींमुळेच ते सतत नवीन कल्पना शिकून त्यांचे व्यवसाय वाढवू शकले.


४. वॉरेन बफेट:


प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट दररोज ५-६ तास वाचन करतात.

त्यांनी स्वतः सांगितले आहे की,ते त्यांच्या दिवसाच्या ८० टक्के वेळ वाचण्यात घालवतात, जे मुख्यतः अर्थशास्त्र,व्यवसाय,

आणि गुंतवणुकीवरील पुस्तके असतात.वाचन हे त्यांचे महत्त्वाचे यशस्वी होण्याचे साधन आहे.


५.अल्बर्ट आइन्स्टाईन:


महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन आपल्या संशोधन आणि गणितीय सिद्धांतांवर सतत काम करत असायचे. त्यांच्या अनेक तासांच्या अभ्यासामुळेच त्यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला.


६.सचिन तेंडुलकर:


क्रिकेटच्या सरावाच्या तासांसाठी प्रसिद्ध असलेले सचिन तेंडुलकर दररोज ६-८ तास सराव करायचे. त्यांचा क्रिकेटमधील अभ्यास केवळ शारीरिक सरावावरच नव्हे,तर मानसिक तयारीवरही आधारित होता.या सातत्यामुळे ते एक महान क्रिकेटपटू बनले.


७.मार्क झुकरबर्ग:


फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी सुरुवातीच्या काळात दररोज अनेक तास कोडिंग आणि तांत्रिक शिक्षण घेतले.त्यांनी सतत तांत्रिक कौशल्यांचा अभ्यास केला,ज्यामुळे त्यांनी एक मोठी तांत्रिक कंपनी निर्माण केली.


८. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम:


भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम हे त्यांच्या कठोर अभ्यास आणि सातत्यपूर्ण कामामुळे ओळखले जातात.

त्यांची वाचन आणि शास्त्रीय अभ्यासाची सवय त्यांना महान वैज्ञानिक बनवण्यात मदत झाली.


सामान्य तत्त्वे:


यशस्वी व्यक्ती ४-६ तास सराव किंवा अभ्यास दररोज करतात,

परंतु ते केवळ किती तास करतात यावर नाही, तर त्यात किती लक्ष केंद्रित करतात हे महत्त्वाचे आहे


सारांशतः,यशस्वी व्यक्तींच्या अभ्यासाची वेळ ठरलेली नाही,परंतु त्यांनी सातत्य,लक्ष केंद्रित अभ्यास,आणि आत्मविकासासाठी वेळ दिल्यामुळेच ते यशस्वी झाले आहेत.


अभ्यासामुळे यशस्वी झालेले अनेक जागतिक व्यक्तिमत्त्व आहेत.

त्यांच्या यशस्वी प्रवासामागील एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांनी केलेला अथक अभ्यास आणि ज्ञानार्जन,येथे काही उदाहरणे आहेत:



 मेरी क्युरी: दोन वेळा नोबेल पुरस्कार विजेत्या या शास्त्रज्ञांनी रेडियम आणि पोलोनियम या दोन मूलद्रव्यांचा शोध लावला.त्यांचे संपूर्ण जीवन शास्त्रज्ञ म्हणून अभ्यास आणि संशोधनाला समर्पित होते.


अल्बर्ट आईनस्टाइन:आपल्या सापेक्षता सिद्धांतासाठी प्रसिद्ध असलेले आइनस्टाइन एक महान भौतिकशास्त्रज्ञ होते.त्यांनी शास्त्राच्या क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण योगदान दिले.


 वारेन बफेट: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बफेट एक यशस्वी गुंतवणूकदार आहे.त्यांनी पुस्तके वाचून आणि इतर गुंतवणूकदारांकडून शिकून आपले ज्ञान वाढवले.


 ओपरा विनफ्री: एक अमेरिकन टीव्ही होस्ट,अभिनेत्री आणि उद्योजिका असलेली ओपरा विनफ्री ही जगातील सर्वात प्रभावशाली महिलांपैकी एक आहे.त्यांनी स्वतःच्या शिक्षणाकडे लक्ष दिले आणि आपल्या कौशल्यांवर काम केले.


  बिल गेट्स: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक असलेले बिल गेट्स एक प्रसिद्ध उद्योजक आहेत.त्यांनी संगणक शास्त्रात आपले ज्ञान वाढवले आणि त्याचबरोबर व्यवसायाचे मूलभूत तत्वज्ञान शिकले.


या व्यक्तींमधून आपण काय शिकू शकतो.?


 अभ्यास हा यशाचा एक महत्त्वाचा घटक आहे: कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी अभ्यास आणि ज्ञानार्जन आवश्यक आहे.


 नियमितपणे अभ्यास करा: थोडा थोडा नियमितपणे अभ्यास करणे हा दीर्घकालीन यशासाठीचा उत्तम मार्ग आहे.


 विविध स्रोतांमधून शिका: पुस्तके वाचा,व्याख्यान ऐका,इतर लोकांकडून शिका.


 स्वतःला प्रेरित ठेवा: यशस्वी होण्यासाठी स्वतःला प्रेरित ठेवणे महत्त्वाचे आहे.


अपयशापासून शिका: आपल्या चुकांपासून शिका आणि पुढील प्रयत्नात सुधारणा करा.


या व्यक्तींप्रमाणे आपणही आपल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी अभ्यास करू शकतो.अभ्यास हा केवळ परीक्षेसाठी नाही,तर आपल्या जीवनभरासाठी उपयोगी पडणारा एक कौशल्य आहे.


तुम्ही कोणत्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे आहे?


मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला प्रेरित करेल.

अभ्यासातील दीपस्तंभ म्हणजे असे आदर्श व्यक्तिमत्व किंवा सिद्धांत जे अभ्यासात मार्गदर्शन करतात,प्रेरणा देतात आणि यशाच्या दिशेने मार्गदर्शन करतात.अशा काही व्यक्ती आणि सिद्धांत आहेत ज्यांनी त्यांच्या अभ्यासाने किंवा विचारसरणीने जगाला दिशा दिली आहे:


१. स्वामी विवेकानंद:


स्वामी विवेकानंदांनी अभ्यासाला एक साधना म्हणून पाहिले.त्यांनी सांगितले की,ज्या गोष्टीला तुम्ही अभ्यासाच्या क्षेत्रात प्राप्त करू इच्छिता,त्यासाठी संपूर्ण लक्ष द्या.त्यांची शिकवण प्रेरणा देते की,सातत्य, आत्मविश्वास,आणि साध्य करण्याची जिद्द यामुळे अभ्यासाचे फलित होते.स्वामी विवेकानंदांचे विचार आजही अनेक विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ आहेत.


२.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम:


डॉ.कलाम यांचा जीवनप्रवास म्हणजे परिश्रम,सातत्य आणि अभ्यासाचा उत्तम आदर्श आहे.ते म्हणायचे, सपने वे नहीं जो हम सोते वक्त देखते हैं,सपने वे हैं जो हमें सोने नहीं देते। अभ्यासात सातत्य ठेवून त्यांनी वैज्ञानिक संशोधनात मोठी प्रगती केली आणि ते भारताचे राष्ट्रपती बनले.त्यांचे जीवन अभ्यासाचा दीपस्तंभ ठरले आहे.


३.महात्मा गांधी:


महात्मा गांधी यांचे जीवन ही एक शिस्तबद्ध अभ्यासाची कथा आहे.त्यांनी स्वतःच्या आत्मचिंतनातून आणि अनुभवांमधून शिकण्याची प्रवृत्ती ठेवली.त्यांनी सांगितले की,जीवनातील खरे शिक्षण आत्मपरीक्षण आणि अनुभवांतून येते.त्यांच्या विचारसरणीने अभ्यासाला आत्मशुद्धी आणि आत्मसाक्षात्काराचे साधन म्हणून पाहिले आहे.


४.रवींद्रनाथ टागोर:


रवींद्रनाथ टागोर हे शिक्षण आणि कलात्मक अभ्यासाचे मोठे उदाहरण आहेत.त्यांच्या मते,शिक्षण हे ज्ञानाच्या सखोलतेतून येते,केवळ माहिती गोळा करण्याने नाही.टागोर यांनी शांतीनिकेतनची स्थापना करून शिक्षणाच्या क्षेत्रात नवीन प्रयोग केले,ज्यामुळे शिक्षणाच्या संकल्पनेला एक नवीन दिशा मिळाली.


५. सर आईझॅक न्यूटन:


न्यूटन यांना त्यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामुळे ओळखले जाते,परंतु त्यांचा अभ्यास हा फक्त एक शास्त्रीय कार्य नव्हे,तर सतत संशोधन आणि प्रयोगांची दीर्घकालीन प्रक्रिया होती.न्यूटन यांच्या एकाग्रतेच्या आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच शास्त्रीय विश्वाला नवी दिशा मिळाली.


६.मदर टेरेसा:


मदर टेरेसा यांचे कार्य अभ्यासाच्या क्षेत्रात नसले तरी त्यांनी सेवा आणि करुणेच्या अभ्यासात एक आदर्श घालून दिला आहे.त्यांनी सांगितले की,सेवा हीच सर्वश्रेष्ठ शिक्षण आहे.त्यांनी मानवतेची सेवा करून शाश्वत मूल्यांचे पालन केले.


७.अल्बर्ट आइन्स्टाईन:


अल्बर्ट आइन्स्टाईन यांचे विज्ञान आणि तत्त्वज्ञानातील योगदान खूप मोठे आहे.ते म्हणायचे,मी विशेष बुद्धिमान नाही,मी फक्त उत्सुक आहे.त्यांची सतत शिकण्याची वृत्ती आणि कठीण प्रश्नांवर काम करत राहण्याची तयारी ही यशस्वी अभ्यासाचा उत्तम आदर्श आहे.


८.बेंजामिन फ्रँकलिन:


बेंजामिन फ्रँकलिन हे एक शास्त्रज्ञ,लेखक,तत्त्वज्ञ आणि राजकारणी होते.त्यांची शिकण्याची आणि स्वतःला सुधारण्याची वृत्ती त्यांना एक दीपस्तंभ बनवते.त्यांनी आत्मसुधारणेसाठी १३ सद् गुण तयार केले आणि त्यावर सातत्याने काम केले.


८.चाणक्य:


चाणक्य हे प्राचीन भारतातील एक महान तत्त्वज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ होते.त्यांनी अर्थशास्त्र या ग्रंथाद्वारे राज्यशास्त्र आणि प्रशासनात मार्गदर्शन केले.त्यांचे विचार आणि तत्त्वज्ञान अभ्यासाच्या प्रत्येक क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरतात.त्यांच्या मते,विद्या हे सर्वात मोठे सामर्थ्य आहे.


१०.लिओनार्डो दा विंची:


लिओनार्डो दा विंची हे जगातील सर्वांत प्रतिभावान व्यक्तींमध्ये गणले जातात.ते एकाच वेळी शिल्पकार, चित्रकार,अभियंता,

संशोधक,आणि तत्त्वज्ञ होते.त्यांच्या जीवनाचे मुख्य तत्त्वज्ञान होते की सतत नवीन गोष्टी शिकत राहणे,शोध घेणे,आणि जगाच्या गूढांना उलगडणे.


अभ्यासासाठी मुख्य सिद्धांत (Deepstambh Principles):


१.सतत शिकण्याची वृत्ती: जगात यशस्वी झालेल्या प्रत्येक व्यक्तीने शिकण्याची,नवीन ज्ञान मिळवण्याची सततची जिज्ञासा ठेवली आहे.


२. सातत्य आणि समर्पण: अभ्यासातील सातत्य हा कोणत्याही यशाचा पाया असतो. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समर्पणानेच यश मिळते.


३.आत्मपरीक्षण आणि सुधारणा: प्रत्येक यशस्वी व्यक्तीने आपले आत्मपरीक्षण केले आहे आणि स्वतःला सतत सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.


४.लक्ष केंद्रित करणे: यशस्वी व्यक्तींचे एकाग्र लक्ष हे त्यांच्या अभ्यासाच्या यशाचे प्रमुख कारण असते.


५.धैर्य आणि चिकाटी: अभ्यासातील यश हे अपयशाच्या काळात धैर्य आणि चिकाटीने टिकून राहण्यामुळेच मिळते.


अभ्यासातील प्रेरणादायी कथा 


१.थॉमस एडीसन:


थॉमस एडीसन, जगातील सर्वात प्रसिद्ध शोधकांपैकी एक, त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

त्यांचा शाळेतला अनुभव चांगला नव्हता;शिक्षकांनी त्यांना "असामान्य" म्हणून बाहेर काढले.पण एडीसनने हार मानली नाही.

त्याने स्वतः शिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि प्रयोगांद्वारे शिक्षण घेतले.त्याच्या कष्टामुळे त्याने १,००० हून अधिक पेटंट्स मिळवले.एडीसनच्या यशाची गोष्ट शिकवते की, अपयशामुळे तुमचं धैर्य कमी होऊ नये;अपयशाने शिकून पुढे जावे लागते.


.डॉ.अब्दुल कलाम:


डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे जीवन हे कष्ट, साधेपण,आणि शिक्षणाचे आदर्श उदाहरण आहे. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, तरी त्यांनी शिक्षणाची महत्वता समजून घेतली.त्यांनी एकटेच अभ्यास केला आणि कठोर परिश्रम घेतले. त्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) काम केले आणि शेवटी भारताचे राष्ट्रपती बनले.कलाम यांची कथा आम्हाला शिकवते की,कठीण परिस्थितीतही आपले स्वप्न पूर्ण करणे शक्य आहे.


३.मालाला युसूफजई:


मालाला युसूफजई एक पाकिस्तानी शिक्षिका आणि समाजसेविका आहेत.ती शिक्षणाच्या हक्कासाठी लढण्यासाठी प्रसिद्ध आहे.तिला शिक्षणासाठी झगडणाऱ्या मुलींच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचे धाडस होते.तिला तालिबानने अडचणीत आणले,पण तिने आपली मते व्यक्त करण्याचे थांबवले नाही.तिची लढाई आणि धाडस अनेक मुलींसाठी प्रेरणादायी आहे. आज ती सर्वांच्या प्रेरणास्त्रोत आहे.तिची कथा शिकवते की,शिक्षणाची महत्ता आणि यासाठी लढण्याचे धाडस असले पाहिजे.


४. स्टीव्ह जॉब्स:


स्टीव्ह जॉब्स,एप्पलच्या सह-संस्थापक,यांनी आपल्या यशासाठी शिक्षणाचे महत्वाचे योगदान दिले.त्यांनी आपल्या कॉलेजमधील शिक्षण सोडले,पण त्याने आपल्या आवडत्या विषयावर लक्ष केंद्रित केले.डिझाइन आणि तंत्रज्ञान.जॉब्सच्या अनोख्या दृष्टिकोनामुळे, एप्पलने उच्च गुणवत्ता आणि इनोव्हेटिव्ह उत्पादने विकसित केली.त्यांनी सांगितले की,आपल्या कार्यावर प्रेम करा,तेव्हा तुम्ही यशस्वी होऊ शकता.याने शिकवले की,तुमच्या आवडत्या गोष्टीत काम करणे म्हणजे यशाचे एक मोठे साधन आहे.


५.आर्थर अश:


आर्थर अश एक प्रसिद्ध टेनिस खेळाडू आहेत.त्यांचे जीवन म्हणजे प्रेरणादायी कथा आहे,कारण त्यांना जन्मत:च एका हाताला अपंगत्व आले.पण त्याने टेनिसच्या क्षेत्रात त्याची ओळख निर्माण केली.त्याने अनेक ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आणि खेळाची धारणा बदलली.त्यांच्या यशामुळे दाखवले की,अपंगता हे यशाच्या मार्गात अडथळा नाही,तर ते साध्य करण्यासाठी एक प्रेरणा असू शकते.


६.रवींद्रनाथ ठाकूर:


रवींद्रनाथ ठाकूर,भारतीय कवी आणि लेखक,यांनी आपले जीवन शिक्षणाच्या महत्त्वावर आधारित घालवले.त्यांनी त्यांच्या कवीतेद्वारे,शिक्षणाच्या विविध पैलूंवर चर्चा केली.आदर्श शिक्षण हे विद्यार्थ्याला विचारण्यास प्रवृत्त करते.असे त्यांनी म्हटले आहे.त्यांचे विचार शिकवतात की,विचारशक्ती आणि जिज्ञासा वाढवणे शिक्षणाचे महत्त्वाचे घटक आहेत.


७.इर्विन गार्डनर:


इर्विन गार्डनर हा एक सामान्य विद्यार्थी होता,ज्याला शिक्षणात चांगले यश मिळवण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.त्याने शालेय जीवनात अनेक अपयशांचा सामना केला,

परंतु त्याने कधीही हार मानली नाही.त्याने अध्ययनाची पद्धत सुधारली,अभ्यासाची गती वाढवली,आणि शेवटी तो एक यशस्वी वैज्ञानिक झाला.इर्विनच्या कहाणीने शिकवले की,अपयश हे यशाच्या दारात एक पायरी आहे.


८.नेल्सन मंडेला:


नेल्सन मंडेला,दक्षिण आफ्रिकेतील एक महत्त्वाचा नेते, यांनी शिक्षणाला खूप महत्त्व दिले.त्यांनी सांगितले, शिक्षण हा सर्वांत शक्तिशाली शस्त्र आहे,ज्याद्वारे आपण जग बदलू शकतो.त्यांनी २७ वर्षे तुरुंगात घालवली,पण शिक्षण घेतले आणि समाजात बदल घडवले.त्यांची कथा दाखवते की,शिक्षणानेच समाजात परिवर्तन शक्य आहे.


९.जेक मा:


अलिबाबाच्या संस्थापक जेक मा,त्यांच्या शालेय जीवनात अनेक अपयशांचा सामना करावा लागला. त्याला दोन वेळा कॉलेजात प्रवेश मिळाला नाही,पण त्याने हार मानली नाही.त्याने कष्ट घेतले,आणि शेवटी अलिबाबा तयार केला,जो आज एक जागतिक व्यवसाय आहे.जेक माची कहाणी शिकवते की,अपयश किंवा अडचणी येऊ शकतात, पण त्यावर विजय मिळवण्यासाठी कष्ट आणि समर्पण महत्त्वाचे आहे.


१०.छत्रपती शिवाजी महाराज:


छत्रपती शिवाजी महाराज हे एक अद्वितीय नेतृत्वाचे प्रतीक होते.त्यांनी खूप लहान वयात आपल्या कुटुंबातील एकटा राजा होण्याची स्वप्न पाहिली.त्यांनी थोड्या वेळात अनेक आव्हानांचा सामना केला,पण आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित ठेवून तो राजकारण आणि युद्ध यामध्ये अद्वितीय यश मिळवले.त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात की,शौर्य,कष्ट,आणि धैर्याने कोणतीही अडचण पार केली जाऊ शकते.


या कथा विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन त्यांच्या ध्येयांच्या मागे धावायला प्रोत्साहित करतात.शिक्षणाच्या क्षेत्रात विविध व्यक्तींच्या संघर्ष आणि यशाची गोष्टी शिकवतात की, कोणतीही गोष्ट साध्य करणे शक्य आहे,जर तुमच्यात धैर्य आणि चिकाटी असेल.


संकलन - डॉ.दिपक शेटे,गणितायन लँब,(महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त)