* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१६/८/२४

पावसाच्या मागावर/ On the trail of rain

१४.०८.२४ या लेखातील पुढील भाग…


अलेक्झांडरने जोसेफना मौसमी पावसाचा चेरापुंजीपर्यंत पाठलाग करण्याची कल्पना सांगितली.त्यांनी अविश्वासाने अलेक्झांडरकडे बघितलं.त्यांच्या म्हणण्यानुसार अलेक्झांडरला चेरापुंजीला जायची परवानगी मिळण्याची खात्री नव्हती.(त्या वेळी ईशान्य भारतात वेगवेगळी आंदोलनं आणि भूमिगत चळवळींचा जोर होता.)मात्र मौसमी पावसाच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेची त्यांनी अलेक्झांडरला अगदी बारकाईने माहिती दिली "मॉन्सून हा शब्द मौसम या अरेबिक शब्दाचा अपभ्रंश आहे.मौसम म्हणजे सीझन (ऋतू).मौसमी पावसाचा अभ्यास सतराव्या शतकात सुरू झाला.त्यावेळचे रॉयल सोसायटीचे अध्यक्ष,'धूमकेतू' फेम एडमंड हॅली यांनी मौसमी पावसाच्या प्रवासाचा एक अद्भुत नकाशा प्रसिद्ध केला.त्या काळातल्या सोयीसुविधा पाहता ते काम खरोखरच अद्वितीय होतं.त्यानंतरच्या काळात मौसमी पावसावर भरपूर संशोधन झालेलं आहे,याचं कारण पृथ्वीच्या वातावरणातील ही सर्वांत महान जलवायुमान प्रणाली आहे (जलवायुमान म्हणजे क्लायमेट).गेली तीनशे ते साडेतीनशे वर्षं संशोधन होऊनसुद्धा या रहस्याचा उलगडा अजून झालेला नाही. 


मौसमी पावसाबद्दल दरवर्षी नवी माहिती पुढे येते.ही प्रणाली मानवी मेंदूसारखंच एक रहस्य आहे." जोसेफ यांचं हे बोलणं अखंड नव्हतं. त्यांना सतत फोन येत होते. यातून वेळ मिळेल तेव्हा ते संभाषणाचा आधीचा धागा पकडून अलेक्झांडरला माहिती देत होते.या रहस्यात आणखी एक तिढा आहे.मौसमी पावसाचे ढग दोन मार्गांनी जातात.एक अरबी समुद्रावरचा आणि दुसरी बंगालच्या उपसागरातला.अरबी समुद्राच्या मार्गाने जाणारा मॉन्सून पश्चिम घाटाला अडतो.त्या ढगांतलं बहुतेक सर्व पाणी पावसाच्या रूपाने कोसळतं.पश्चिम घाट ओलांडून जे ढग पलिकडे जातात त्यात अत्यल्प बाष्प असतं.बंगालच्या उपसागरातील शाखाही याचवेळी कार्यरत होते.आमच्याकडे पाऊस सुरू होतो,त्यानंतर काही दिवसांतच चेरापुंजीत पाऊस पडायला सुरुवात होते.' ते ऐकून अलेक्झांडर म्हणाला,म्हणजे दर उन्हाळ्यात भारताला या दोन ओल्या हातांचा विळखा पडतो तर..."जोसेफना ती भाषा पीत पत्रकारितेची वाटली.त्याबद्दल त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

निसर्गाच्या या भव्य आविष्काराबद्दल असं बोलणं त्यांना अयोग्य वाटलं.मात्र त्यांनी आपलं माहिती देण्याचं काम पुढे सुरू ठेवलं. हे दोन्ही मॉन्सूनचे प्रवाह अखेरीस एकत्र येतात. बंगालच्या उपसागरातील शाखा पश्चिमेकडे वळते,कारण ती हिमालयाला अडते.जेव्हा गंगेच्या खोऱ्यात पाऊस सुरू होतो त्यावेळी तो पश्चिमेकडून आलाय की नैऋत्येकडून हे सांगणं अवघड जातं.हे जलवायुमानाचं चक्र प्रचंड गुंतागुंतीचं आहे; त्यावर बऱ्याच गोष्टींचा परिणाम होत असतो.तिबेटच्या पठाराचं तापणं,दक्षिण गोलार्धातील व्यापारी वारे,जेट प्रवाहाचा मार्ग, सोमाली जेट प्रवाहाची सुरुवात,सहाराच्या दक्षिणेकडून ९० अंशाचा कोन करून आफ्रिकेचा किनारा पार करून या जेट प्रवाहाचा पूर्वेकडे प्रवास सुरू होतो.त्याची उंची आणि वेग हेसुद्धा मौसमी पावसावर परिणाम करतात;असे आणखीही अनेक घटक आहेत.


मुख्य म्हणजे भूमीचं तापमान सागराच्या तापमानापेक्षा जास्त असायला हवं.इतकी माहिती दिल्यानंतर जोसेफ यांनी अलेक्झांडरला बाहेरच्या बागेतलं 'वेदर बलून' दाखवलं.असे बलून्स वातावरणाच्या अभ्यासासाठी हवेत सोडले जातात.त्यांच्यामार्फत हवेच्या प्रवाहाची दिशा, वाऱ्यांचा वेग आणि जेट प्रवाहाचं स्थान आणि वेग,यांची माहिती मिळते...ते म्हणाले,सोमवार,बुधवार,शुक्रवार आयात केलेले परदेशी बलून सोडतात;तर मंगळवार,

गुरुवार,शनिवारी भारतीय बनावटीचे बलून आम्ही वापरतो.भारतीय हवामानाप्रमाणेच हे भारतीय बनावटीचे बलून कधी दगा देतील सांगता येत नाही अशी टिप्पणीही त्यांनी केली. हे बलून्स २५ ते ३० कि.मी.उंच जातात आणि फुटतात.मौसमी पावसाच्या काळात भारतातील ४० वेधशाळा रोज चार बलून आकाशात सोडतात.जे बलून्स समुद्रात जातात,ते परत मिळवता येत नाहीत. जमिनीवर पडण्याची शक्यता असलेल्या बलूनना एक सूचना चिकटवलेली असते- ही भारत सरकारची मालमत्ता आहे.सापडल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात नेऊन द्यावी.पण ते अगदी क्वचित घडतं.


कलकत्त्याच्या डमडम विमानतळावरून सोडलेले बलून्स लोकांनी परत करावेत म्हणून त्यांना तर पेनं,खेळणी,

कोऱ्या कॅसेट आणि भारतीय हवामान खात्याची अधिसूचना असलेली स्टिकर्स असलेली छोटी पिशवी बांधण्यात येते.पण तिथले लोक या वस्तू ठेवून घेतात,

बलूनचं कापड गोठ्यावर घालतात आणि खालचा कंटेनर स्वयंपाकासाठी वापरतात ! बलून कुठून कसा जाईल हे सांगणं अवघडच असतं.तैवान सरकार चीनविरुद्धचं प्रचारसाहित्य असलेले बलून्स सोडतं.त्यांतले काही आसाम आणि बंगालमध्ये सापडले आहेत." जोसेफ माहिती देत होते. "१० मेच्या आधी पडलेला पाऊस मौसमी पावसात गणला जात नाही. केरळातील पाच ठिकाणच्या पाऊसमापन केंद्रांमध्ये सतत दोन दिवस कमीत कमी एक मि.मी.पाऊस पडला की त्याच्या दुसऱ्या दिवशी मौसमी पावसाचं आगमन झाल्याचं जाहीर केलं जात.अर्थात,तेरा अक्षांशापर्यंत म्हणजे पश्चिम घाटाच्या एक तृतियांश भागापर्यंत मौसमी पावसाचे ढग बरसू लागले,की मगच भारतीय लोक सुटकेचा निःश्वास टाकतात.प्रचंड उकाड्यात तग धरून अलेक्झांडर रोज वेधशाळेत जात होता.दोन जूनला त्याच्या तपश्चर्येला यश आलं.जोसेफनी 'उद्या कोचीनला बहुतेक पाऊस येईल असं त्याला सांगितलं. त्यावर अलेक्झांडरने कोचीनला जाण्याचा मनसुबा बोलून दाखवला.पण जोसेफनी त्याला अडवलं आणि ते त्याला म्हणाले,तुला या पावसाची आणि वाऱ्यांची माहिती नाही.तुला तिथे कुणी नेणारही नाही.तू पावसाची वाट बघत इथंच थांब.कोवालम् चौपाटीवर तुला तो पहिला पाऊस अनुभवता येईल.


अलेक्झांडर तिथून बाहेर पडला.शहरातलं वातावरण पूर्णपणे बदललेलं होतं.रस्त्यात लोक गटागटाने उभे राहून आकाशाकडे बघत होते.दरम्यान फ्रेटरला परत त्रास व्हायला सुरुवात झाली होती.त्याच्या दोन्ही हातांना मुंग्या येत होत्या.तो स्थानिक उपचार केंद्रात गेला.मात्र तिथे आपल्याला बराच काळ रहावं लागेल हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने तो नाद सोडून दिला.त्याला मौसमी पावसाचा पाठलाग जास्त महत्त्वाचा वाटत होता.तीन जूनला सकाळी तो उठला.रात्रीच मौसमी पावसाची पहिली सर पडून गेली होती.जोसेफ यांच्या कार्यालयातल्या एका अधिकाऱ्याने त्याला सांगितलं,

मौसमी पाऊस त्याच्या सोयीनं येतो,तू कोचीनला जा,तिथे नक्की भिजशील.या टप्प्यावर या पुस्तकातली सर्वांत मोठी चूक आढळते.अलेक्झांडर आपल्याला मौसमी पावसाची सुरुवात हिमालयाच्या उत्थानामुळे झाली हे बरोबर सांगतो,पण हिमालयाचं उत्थान साठ ते ऐंशी कोटी वर्षांपूर्वी झाल्याचं सांगतो,हे चूक आहे. मायोसीन कालखंडात हिमालयाचं उत्थान व्हायला सुरुवात झाली,हे बरोबर आहे;पण हा कालखंड खूपच अलीकडचा म्हणजे साधारणपणे तीन ते एक कोटी वर्षांपूर्वीचा आहे. हिमालयाच्या उत्थानाला याच्या थोडी आधी सुरुवात झाली आणि त्याला आजचं रूप अडीच ते दोन कोटी वर्षांपासून प्राप्त झालं असावं,असं मानलं जातं.यात पाच-पंचवीस लाख वर्षं इकडे-तिकडे होऊ शकतात,पण अलेक्झांडर म्हणतो त्याप्रमाणे सहाशे मिलियन ते आठशे मिलियन (साठ कोटी ते ऐंशी कोटी) हे आकडे चुकीचे आहेत.ही एक बाब वगळली तर अलेक्झांडरचं हे पुस्तक अगदी आवर्जून वाचावं.


असं आहे.अर्थात,वाचताना अलेक्झांडरचा एक ब्रिटिश म्हणून भारताकडे आणि भारतीयांकडे बघण्याचा विशिष्ट दृष्टिकोन वारंवार प्रत्ययास येतो.अलेक्झांडरने त्याच्या वास्तव्याच्या हॉटेल्सची वर्णनं केलेली आहेत,ती अतिशयोक्तिपूर्ण वाटतात.ब्रिटिश माणूस एखाद्या वृत्तपत्राचं प्रायोजकत्व मिळवून भारतात आल्यावर अशा प्रकारच्या हॉटेलातून वास्तव्य करेल,हे खरं वाटत नाही.

पण त्याने हे पुस्तक पाश्चात्त्य वाचक डोळ्यांसमोर ठेवून लिहिलं आहे,ही बाब इथे लक्षात घ्यायला हवी.भारतीय कारकूनशाही त्याला नडली,असं तो लिहितो.ती कारकूनशाही ब्रिटिशांनी भारतावर लादलेली देणगी आहे,हेही लक्षात घ्यायला हवं.तरीही तो ज्या पद्धतीने मौसमी पावसाचा पाठलाग करत हिंडला आणि अखेरीस चेरापुंजीला जाऊन त्याने पाऊस उपभोगला,त्याला दाद द्यायलाच हवी.या प्रवासादरम्यान अलेक्झांडर ज्या ज्या माणसांना भेटला त्यांच्याशी झालेल्या 'गॉसिप' स्वरूपाच्या गप्पाही पुस्तकात वाचायला मिळतात.त्याचं वर्णन इथे मी मुद्दाम टाळलंय.मात्र,त्याने सांगितलेली ऐतिहासिक माहिती बरीच तथ्य असलेली आणि मनोरंजक आहे. वानगीदाखल एक उदाहरण देतो.कोचीन

बंदरात मौसमी पावसाची वाट बघत असताना अलेक्झांडरला एक इटालियन जहाज दिसलं.तो धागा पकडून 'रोमनांचा मॉन्सूनशी संबंध होता' हे तो आपल्याला सांगतो.मौसमी वाऱ्यांच्या साहाय्याने शिडाची जहाजं भारतात नेणं सोपं आहे,हे लक्षात आल्यावर रोमचा भारताशी व्यापार वाढला. (खरं तर भारतीय नाविक त्याआधीपासूनआफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर जात होते.) मात्र,हा व्यापार अरब नावाड्यांच्या मार्गदर्शनाखाली होत होता,हे सांगायला अलेक्झांडर विसरतो.मलबार किनाऱ्यावर जे अवशेष सापडतात त्यात प्राचीन रोमन नाणी सापडतात.भारतातून काळी मिरी,तलम कापड, रेशमी वस्त्रं,मोती,हस्तिदंत,चंदन,

रक्तचंदन, शिसवी लाकूड,सुपारी,खायची पानं,हिरे,

कासवांच्या पाठी,तांदूळ,तूप,मध,दालचिनी,धने, आलं,नीळ आणि इतरही बरेच पदार्थ रोमला जात;याशिवाय अनेक मौल्यवान आणि अर्ध मौल्यवान रत्नांचे खडेही रोमला जात;नीरोच्या काळात कोचीनला रोममध्ये बरंच महत्त्व प्राप्त झालं होतं;भारतीय वस्तूंचं अंगभर प्रदर्शन हा श्रीमंतीची प्रसिद्धी करण्याचा राजमार्ग होता; रोमच्या सिनेटमध्ये त्यामुळे भारतीय महाराजांचं संमेलन भरल्याचा भास होत असे,असं तो नमूद करतो.

अलेक्झांडरने आपल्या प्रवासात दिल्लीत हवामान

खात्याच्या महासंचालकांची भेट मिळवली.तिथे त्याला भारतीय हवामान खात्यातर्फे मौसमी पावसाचा माग काढण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांबद्दलची माहिती मिळाली.तसंच तोपर्यंत काढल्या मौसमी पावसाच्या अभ्यासाच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांचीही माहिती मिळाली.डॉ.आर.पी. सरकार हे त्या वेळी भारतीय हवामानखात्याचे प्रमुख होते.त्यांनी अलेक्झांडरला सांगितलं, मौसमी पाऊस ही एक जागतिक प्रणाली आहे. सर्वच राष्ट्रांना मौसमी पावसाच्या अभ्यासात रस आहे,

कारण ती एक जागतिक समस्याही आहे. आम्ही जगभर कुठे काय घडतंय याची नोंद ठेवतो.कारण दोन-तीन दिवसांनी ती बाब आमच्यावर परिणाम करू शकते. 


ऑस्ट्रेलियावरील हवेचा दाब,ब्यूनोस आयर्स आणि ताहितीमधलं हवामान,रशियावरील वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाची दिशा,अंटार्क्टिकावर या वर्षी झालेला हिमपात, अशा अनेक घटकांचा आम्ही विचार करत असतो.त्यांनी अलेक्झांडरला एल निनोची माहिती दिली.भारत 'वर्ल्ड मेटिऑरॉजिकल ऑर्गनायझेशन'चा सदस्य असल्याचं सांगून ते म्हणाले,या जागतिक संस्थेचे एकशे साठ सदस्य आहेत.ते सतत एकमेकांच्या संपर्कात असतात. त्यांनी मॉन्सूनच्या उन्हाळी हालचालींचा आढावा घेणारं केंद्र दिल्लीत स्थापन केलेलं आहे (समर मॉन्सून ॲ क्टिव्हिटी सेंटर- 'स्मॅक'). मॉन्सूनच्या अभ्यासासाठी अनेक आंतरराष्ट्रीय प्रयत्न झाले आहेत.

मोनेक्स एकोणऐंशी,मॉन्सून-सत्त्याहत्तर, इस्मेक्स त्र्याहत्तर आणि आयआयओई (इंटरनॅशनल इंडियन ओशन एक्स्पिरिमेंट) हे त्यातले काही आंतरराष्ट्रीय प्रयत्न."


भारतीय हवामानखात्याच्या पहिल्या महासंचालकपदी इ.स. १८७५ मध्ये एच.एफ. ब्लँडफोर्ड यांची नेमणूक झाली. ईस्ट इंडिया कंपनीने अठराव्या शतकात या खात्याची स्थापना केली होती.मात्र,मौसमी पावसाचा अंदाज घेण्याच्या त्यांच्या पद्धती अगदीच प्राथमिक स्वरूपाच्या होत्या.ब्लॅडफोर्डनी मौसमी पावसाच्या अभ्यासाचा शास्त्रीय पाया घातला. त्यांचं सारं आयुष्य त्यांनी या नैसर्गिक घटनेच्या अभ्यासाला वाहिलं.मौसमी पाऊस ही एक गुंतागुंतीची प्रणाली असल्याचं त्यांनी प्रथम जगासमोर आणलं.त्यांच्यावर मॉन्सूनने जी मोहिनी घातली ती कायमस्वरूपी होती.त्यांनी आशिया खंडात हवामानाच्या नोंदी ठेवणारी केंद्रं आणि वेधशाळांचं जाळंच उभारलं.भारत आणि ब्रह्मदेशातून (आता म्यानमार) दैनंदिन नोंदींच्या तारा रोजच्या रोज त्यांच्या कचेरीत पोहोचू लागल्या.त्यांनी पर्वतशिखरांवरही वेधशाळा बांधल्या.याशिवाय पतंगांच्या साहाय्याने वातावरणाचा अभ्यास करणारी केंद्रं जागोजाग निर्माण केली.अनेक भारतीय तरुणांना त्यांनी हवामानखात्यात भरती केलं. त्यांच्या निवृत्तीच्या सुमारास त्यांनी 'द रेनफॉल इन नॉर्दर्न इंडिया' हा ग्रंथ लिहिला. 'द इंडियन मेटिऑरॉलॉजिस्ट्स व्हेड मॅक्कम' या ग्रंथाने त्यांच्या सेवेची सांगता झाली.एकोणिसावं शतक आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे ग्रंथ मौसमी पावसाचे बायबल मानले जात.ब्लॅडफोर्डच्या निवृत्तीनंतर सर जॉन एलियट हे भारतीय हवामानखात्याचे प्रमुख बनले.त्यांच्या काळात मॉन्सूनच्या अभ्यासासाठी आंतरराष्ट्रीय सहकाराची सुरुवात झाली. इ.स.१८९७ मध्ये पहिलं 'आंतरराष्ट्रीय मेघ अभ्यास वर्ष' जाहीर झालं,त्यात भारताचा सहभाग होता.एलियटनी फ्रेंच शास्त्रज्ञ तिसेराँस द बोर्ट यांच्या सहकार्याने भारतात मोठ्या प्रमाणावर वातावरणाचा अभ्यास सुरू केला.द बोर्टनी वातावरणातील स्तरितांबराचा शोध लावला होता.मौसमी पावसाचा अंदाज जाहीर करायची कल्पनाही सर जॉन एलियट यांचीच. (अगदी सुरुवातीला हा अंदाज गुप्त ठेवण्यात येत असे. तो फक्त वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना पाहावयास मिळे.)एलियटनंतर त्यांचा एक सहायक गिल्बर्ट वॉकर यांच्याकडे हवामानखात्याची सूत्रं आली. वॉकरनी मौसमी पावसाच्या अभ्यासास गती दिली.मौसमी पावसाच्या अभ्यासामुळे ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाऊ लागले.भारतीय हवामानखात्याच्या इतिहासातही त्यांचं नाव अग्रणी हवामानशास्त्रज्ञ म्हणून आदराने घेतलं जातं. वॉकर यांना प्रत्येक वैज्ञानिक घटनेचं कुतूहल वाटत असे.प्रत्येक घटनेची कारणमीमांसा केल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे.सर विल्यम विल्कॉक्स या इजिप्तमधल्या जलसाठा नियोजन प्रकल्पाच्या महासंचालकांनी नाइल नदीला येणाऱ्या पुरांचा आणि भारतात पडणाऱ्या पावसाचा काही तरी संबंध असल्याचं म्हटलं होतं.त्या विधानाची सत्यता सिद्ध करण्यासाठी वॉकरनी आकडेवारी गोळा केली.वृक्षतोड आणि मौसमी पाऊस यांचाही त्यांनी अभ्यास केला.सौर डागांचं चक्र आणि मौसमी पाऊस यांचा परस्परसंबंध त्यांनी तपासून बघितला.तसंच भारतातील मौसमी पाऊस आणि जागतिक हवामानचक्राचा संबंधही त्यांनी सर्वप्रथम तपासला. वॉकर यांच्या संशोधनाने त्या काळात बऱ्याच वेळा खळबळ माजली.सिडनी (ऑस्ट्रेलिया) आणि ब्यूनोस आयर्स (अर्जेंटिना) अशा जगाच्या दोन टोकांच्या शहरांच्या हवेचा दाब आणि पश्चिम घाटातील पाऊस,अंटार्क्टिकातील हिमखंड आणि भारतातील पाऊस यांचाही संबंध असावा,असं वॉकर म्हणत.ते सिद्ध व्हायला पुढे शंभर वर्षं लोटावी लागली.


वॉकरनी सर्वप्रथम पॅसिफिक महासागराचा आणि मौसमी पावसाचा संबंध असल्याचं विधान केलं.पॅसिफिक महासागरावरील हवेचा जास्त दाबाचा पट्टा आणि त्याच वेळी हिंदी महासागरावर कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती,हा कमी दाबाचा पट्टा हिवाळ्यात टिकून राहणं यांचा आणि भारतीय उपखंडात पाऊस मुबलक प्रमाणात पडण्याचा संबंध असावा,असंही वॉकरचं म्हणणं होतं.'सर गिल्बर्ट वॉकर इज फादर ऑफ मॉन्सून स्टडीज' असं यामुळेच म्हटलं जातं. या सर्वच इंग्रज मॉन्सून अभ्यासकांच्या कार्याचं सार अलेक्झांडरच्या शब्दांत सांगायचं तर ते असं सांगता येईल- मॉन्सून कळायला अनेक जन्म घेतले तरी तो कळेल याची खात्री देता येत नाही.जरा काही नवा पैलू उघड करावा तर त्याच्या आड आणखी बरंच काही दडलंय हे लक्षात येतं.' अलेक्झांडरचं पुस्तक अशा माहितीचा खजिनाच आहे.शिवाय ते एक चांगलं प्रवासवर्णन आहे.पुस्तकात शास्त्रीय माहितीबरोबर मौसमी पावसावर अवलंबून असणाऱ्या भारताच्या विविध भागांतील सामाजिक चालीरीतींचंही चित्रण आहे.अशा रंजक वर्णनाच्या साथीने आपणही नकळत केरळ ते चेरापुंजी प्रवास करतो.वाटेतला आपल्या परिचयाचा मॉन्सून अलेक्झांडरच्या नजरेतून नव्याने अनुभवतो.

अलेक्झांडर अखेर चेरापुंजीला कसा पोहोचला ही पुस्तकातली गमंत तर मुळातूनच वाचण्याजोगी आहे. बीबीसीने या पुस्तकावर आधारित माहितीपट तयार केला आहे.ज्यांना मौसमी पावसाबद्दल कुतूहल आहे त्यांनी अलेक्झांडरने केलेला हा आगळावेगळा 'मॉन्सून पाठलाग' अवश्य वाचायला हवा.


लोकांकडे कल्पना नसतात,कल्पनांना लोक असतात.- पॉल बी. रेनी.


१४/८/२४

मौसमी पावसाच्या मागावर/On the trail of monsoon rains

अलेक्झांडर फ्रेटर..!!


एका दुर्मिळ व्याधीने नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या अलेक्झांडर फ्रेटर या ब्रिटिश पत्रकार लेखकाला भारतीय मॉन्सूनने आशेचा किरण दाखवला. आपलं दुःख विसरून तो या मॉन्सूनच्या यात्रेवर निघाला.

त्यांचा हा प्रवास मॉन्सूनचा अभ्यास म्हणून तर रोचक आहेच,पण आपल्याला आपल्याच देशाची नव्याने ओळख करून देणाराही आहे.


भारताच्या अर्थकारणात नैऋत्य मौसमी पाऊस मोठी महत्त्वाची भूमिका बजावतो.या पावसाच्या आगमनाचे अंदाज,त्यानुसारची त्याची वाटचाल याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं असतं. मौसमी पावसाची नियमितता- अनियमितता हा हवामानतज्ज्ञांसाठी मोठा अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय असतो.अलेक्झांडर फ्रेटर या ब्रिटिश लेखक आणि पत्रकारालाही या मौसमी पावसाने वेड लावलं.खरं तर अलेक्झांडर अगदी योगायोगानेच जगातलं सर्वाधिक पावसाचं गाव असणाऱ्या ईशान्य भारतातील चेरापुंजीला येऊन दाखल झाला होता,पण त्यानंतर त्याने इथल्या मॉन्सूनचा चक्क पाठलाग करण्याचा अचाट निर्णय घेतला. मौसमी पाऊस केरळमध्ये अवतरतो त्या सुमारास हा देखील तिथे पोहोचला आणि तिथून चेरापुंजीपर्यंत त्याने पावसाच्या प्रवासाचा मागोवा घेतला.त्या अनुभवांतून साकारलं एक विलक्षण पुस्तक- 'चेझिंग द मॉन्सून'.


अलेक्झांडर फ्रेटर आणि वादळी पाऊस यांची जोडी तशी त्याच्या जन्मापासूनचीच !त्याचे वडील स्कॉटिश मिशनरी डॉक्टर होते. अलेक्झांडरचा जन्म झाला तेव्हा ते वानुताऊ

या दक्षिण पॅसिफिक बेटावर स्थानिकांना वैद्यकीय मदत पुरवण्याचं काम करत होते.त्यादिवशी प्रचंड पाऊस पडत होता आणि वादळवारं सुटलं होतं.त्यावेळीच या बाळाने पहिला टाहो फोडला. घराला पत्र्याचं छप्पर होतं.जन्माला आल्याबरोबर ज्या बाळाने धो धो पावसाचा छपरावर होणाऱ्या आघातांचा आवाज ऐकला,त्याच्याच हातून मौसमी पावसाच्या प्रवासाचा मागोवा घेतला जाऊ

शकतो !त्यावेळी अलेक्झांडरचे वडील पॅसिफिक महासागरातील त्या द्वीपसमूहाच्या एक हजार मैल त्रिज्येच्या परिसरातले एकमेव डॉक्टर होते.बायकोचं बाळंतपण त्यांनीच केलं होतं,दुसरं कोण होतं तिथे ? तिथे होणारा पाऊस,हवेतील आर्द्रता,दिवसाचं आणि रात्रीचं तापमान यांची दैनंदिन नोंदही तेच ठेवत असत. त्यामुळे अलेक्झांडरला सोसायट्याचा वारा, सागरी वादळ वगैरे गोष्टींचं बाळकडूच मिळालं होतं.(पुढे काही वर्षांनी वडिलांनी आपल्या नोंदवह्या बघून 'तू जन्माला आलास त्यादिवशी ७ तास १३ मिनिटांमध्ये २.१ इंच पाऊस पडल्याचं' आपल्या मुलाला ऐकवलं होतं.)


वानुताऊमधल्या त्यांच्या घरात एक पेंटिंग होतं. त्याच्या खाली 'चेरापुंजी, शआसाम,द वेटेस्ट प्लेस ऑन अर्थ' असं लिहिलेलं होतं. हे पेंटिंग फ्रेटरच्या वडिलांना त्यांच्या ग्लासगोमधल्या वॅपशॉट नावाच्या शाळासोबत्याने भेट दिलेलं होतं.वॅपशॉट चेरापुंजीमध्ये स्कॉटिश मिशनमध्ये कार्यरत होता.वॅपशॉट आणि अलेक्झांडरच्या वडिलांचा पत्रव्यवहार म्हणजे हवामानविषयक वार्ताची देवाणघेवाणच असे.वॅपशॉटचं पत्र आलं की बाबा फ्रेटर अंतर्मुख बनत.चेरापुंजीला एका दिवसात पडणारा पस्तीस इंच (एक हजार पन्नास मि.मी.) पाऊस म्हणजे त्यांच्या कल्पनेबाहेरची घटना होती.अलेक्झांडरचे वडील त्या वेळी 'कधीतरी चेरापुंजीला जाऊ या' असं नेहमी म्हणत.त्यांना वाटत असे,की हवामान शास्त्राच्या दृष्टीने चेरापुंजी हे 'व्हॅटिकन' समान आहे आणि तिथे भर मॉन्सूनमध्ये पाऊसमापी घेऊन उपस्थित असणं ही पवित्र तीर्थयात्रा आहे! वॅपशॉटच्या पत्रातल्या आणखी एका घटनेचा त्यांना कायम अचंबा वाटत असे.तिथे पावसामुळे जमिनीची दलदल व्हायची.त्यामुळे मृतदेह पुरणं शक्य होत नसे.मग हे मृतदेह मधाने भरलेल्या पिंपांमध्ये ठेवले जात असत.पावसाळा संपला आणि जमीन कोरडी झाली की मग त्यांचे अंत्यसंस्कार पार पडत.)


वडिलांच्या अशा चिकित्सक,जिज्ञासू छत्रछायेखाली अलेक्झांडर वाढत होता.तो पाच वर्षांचा असताना जपानने फिलिपीन्समध्ये सैन्य उतरवलं.फ्रेटर कुटुंबीय राहत होते त्या भागातल्या सर्व ब्रिटिश नागरिकांना ऑस्ट्रेलियात हलवण्यात आलं.त्यात अलेक्झांडर,त्याची आई आणि बहीण हेदेखील होतेच.अलेक्झांडरच्या वडिलांनी मात्र ऑस्ट्रेलियात जायला नकार दिला.युद्ध संपेपर्यंत ते अमेरिकी सैनिकांवर उपचार करत युद्धक्षेत्रातच वावरले.युद्ध संपलं. युद्धात जपान्यांशी लढता लढता कोहिमा इथे वॅपशॉट मारला गेल्याची बातमी फ्रेटरना मिळाली.बातमीसोबतच वॅपशॉटची अखेरच्या दिवसांतली पत्रंही त्यांच्याकडे आली.वॅपशॉटचं प्रेत ब्रिटिश उपायुक्तांच्या बंगल्याच्या आवारात पुरलेलं होतं.वॅपशॉटलाही मधाच्या बुधल्यात ठेवला होतं का,हा प्रश्न अलेक्झांडरला ती बातमी कळल्यावर पडला होता;

पण त्या शंकेचं निरसन करून घ्यायचं त्याने टाळलं होतं. 


अलेक्झांडरच्या वडिलांनी त्यानंतर मरेपर्यंत एकदाही चेरापुंजीचं नाव पुन्हा तोंडातून काढलं नाही.त्यांनी युद्धकाळात केलेल्या सैनिकांच्या सेवेबद्दल त्यांना 'एमबीई सिव्हील' ही पदवी आणि पदक मिळालं.ते पाचव्या वर्गाचं होतं.ते पाचव्या वर्गाचं का,दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्गाचं का नाही,हा प्रश्नही अलेक्झांडरला पडत असे; पण त्याचं उत्तरही त्याने कधी शोधण्याचा प्रयत्न केला नाही.मोठेपणी अलेक्झांडर वृत्तपत्रलेखन करू लागला.पंच,न्यूयॉर्कर यासारख्या प्रतिष्ठित नियतकालिकां

साठी त्याने लेखन केलं.आपल्या लेखनकामाचा एक भाग म्हणून त्याला चिनी तुर्कस्तानातून प्रवास करावा लागला.

सागरी सपाटीपासून सरासरी दहा हजार फुटांवर असणाऱ्या भूभागातून त्याने जीपचा चित्तथरारक प्रवास केला.तिथलं काम उरकून तो काही दिवसांसाठी लंडनला आला असता एक दिवस त्याच्या पायांमधल्या संवेदनाच नाहीशा झाल्या.बूट खूप घट्ट बांधल्यामुळे किंवा वेडंवाकडं झोपल्यामुळे असं होत असावं,असा त्याने निष्कर्ष काढला.पहिल्या दिवशी फक्त पावलं बधीर होती,दुसऱ्या दिवशी गुडघ्यापर्यंतच्या पायांमधली जाणीव नष्ट झाली, तेव्हा हे काहीतरी वेगळं आहे हे त्याला जाणवलं. तरीही तो डॉक्टरकडे जायची टाळाटाळ करत होता.कारण त्याच्या मते पाकिस्तानातून काराकोरम महामार्गावरून काशगरला जाऊन परत येतानाच्या प्रवासात विषाणूबाधा होणं अशक्य नव्हतं.शिवाय त्यात कुठे तरी 'आपल्याला काय होणार?' हा फाजील आत्मविश्वासही होताच.


मात्र,ज्या वेळी हातापायांत,पाठीत आणि छातीतही मुंग्या यायला लागल्या तेव्हा मात्र अलेक्झांडर हादरला.त्याने रुग्णालयात जायचा निर्णय घेतला.प्राथमिक वैद्यकीय तपासणीनंतर त्याला 'नॅशनल हॉस्पिटल फॉर नर्व्हस डिसीझेस'मध्ये दाखल करण्यात आलं.चेतासंस्थेचे इंग्लंडमधील एक ख्यातनाम तज्ज्ञ जॉन मॉर्गन-ह्यूज आणि त्यांच्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी त्याची प्राथमिक तपासणी केली. अलेक्झांडरच्या मणक्यांमधला द्रव काढून त्याचीही तपासणी करण्यात आली.इतरही (त्याच्या मते) भयावह चाचण्या करण्यात आल्या.

त्यावरून असं निदान केलं गेलं,की अलेक्झांडरला अरनॉल्ड-चिआरी नावाची एक अत्यंत दुर्मिळ आनुवंशिक व्याधी होती आणि हिंदकुश-काराकोरम

मधील जीपच्या प्रवासातील धक्क्यांनी ती आणखी त्रासदायक बनली होती.या व्याधीवर उपाय नाही असं तज्ज्ञांचं मत बनलं.अलेक्झांडरला गळापट्टा वापरण्याचा सल्ला दिला गेला.त्याने जीपचा प्रवास टाळायला हवा,

असंही वापरण्यात आले. मात्र घरी जाण्यापूर्वी चेतासंस्थेचे शल्यशास्त्रज्ञ डॉ.डेव्हिड ग्रेट त्याला तपासतीलअसंही सांगण्यात आलं.ग्रँटनी त्याचे सर्व वैद्यकीय अहवाल काळजीपूर्वक वाचले आणि शस्त्रक्रियेने अलेक्झांडर बरा होण्याची पन्नास टक्के शक्यता वर्तवली.मात्र,शस्त्रक्रियेमुळे कायमस्वरूपी सुधारणा होईलच याची खात्री देता येत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.अलेक्झांडरला नैराश्याने ग्रासलं.त्याचं कामातलं लक्ष उडालं.साध्या साध्या गोष्टीही पूर्ण करणं त्याला कठीण होऊ लागलं.एकदा तो नेहमीप्रमाणे तपासणीसाठी गेलेला असताना तिथे त्याला एक उत्कृष्ट इंग्रजी बोलणारी बाप्टिस्टा नावाची गोव्याची स्त्री भेटली.तिच्या नवऱ्यालाही असाच त्रास होत होता.


हे जोडपं खानदानी श्रीमंत होतं.दर पावसाळ्यात तो केरळात उपचाराला जायचा आणि मौसमी पावसाचं स्वागत करायचा.अशी व्याधी जडलेली असूनही तो निराश मात्र वाटत नव्हता. अलेक्झांडरने त्या दोघांशी गप्पा मारायला सुरुवात केली.पाहता पाहता त्यांच्या गप्पा रंगल्या.गप्पांदरम्यान त्या स्त्रीने फ्रेटरला भारतातल्या मौसमी पावसाळ्यातल्या वाऱ्यांबद्दल ऐकवलं.तिच्या पतीने त्या वाऱ्यांचा फायदा घेऊन ग्लायडिंग क्षेत्रात केलेला पराक्रम ऐकवला.त्या ओघात मुंबईचा पाऊस,

गोव्याचा पाऊस यांची माहितीही आलीच.अलेक्झांडरने भारतातल्या पावसाचा एकदा तरी अनुभव घ्यायलाच हवा,असं आवर्जून सांगितलं.'मॉन्सून हा प्रचंड सेक्सी असतो'.तो अलेक्झांडरला म्हणाला,मॉन्सूननंतर मार्चमध्ये अनेक अनौरस मुलं जन्माला येतात.पुढे त्याच्या बायकोने पुष्टी जोडली,पावसाने पुनरुज्जीवनाचा आनंद मिळतो.

बाप्टिस्टा पती-पत्नीकडून अलेक्झांडरला कळलं,की


 एक जूनला मॉन्सून केरळात दाखल होतो,नैऋत्य मौसमी वारे त्याला उत्तरेकडे ढकलत नेतात,तो हिमालयापर्यंत प्रवास करतो आणि चेरापुंजीला कळस गाठतो. दिल्लीला मॉन्सून एकोणतीस जूनला पोहोचतो,हे फ्रेटरला सांगताना 'त्याची शाश्वती देता येत नाही' हे त्याला सांगायलाही दोघं विसरले नाहीत.


हे सारं ऐकून अलेक्झांडरची उत्सुकता चाळवली गेली आणि त्याच्या डोक्यात मॉन्सूनचा पाठलाग करण्याची कल्पना चमकून गेली. त्याने तसं त्या दोघांना बोलून दाखवल्यावर त्यांनी चमकून त्याच्याकडे पाहिलं.त्यात अवघड असं काही नाही,पण त्यासाठी त्रिवेंद्रमला सुरुवात करावी लागेल.मग त्याच्याबरोबर धावायचं.ते म्हणाले. त्यांनी आपलं व्हिजिटिंग कार्ड अलेक्झांडरला दिलं आणि त्याचा निरोप घेतला.डोक्यात चमकून गेलेल्या त्या एका कल्पनेने अलेक्झांडर इतका उत्तेजित झाला,की तो तपासणीसाठी डॉक्टरांसमोर गेला तेव्हा त्याचा आनंदी चेहरा पाहून त्यांनाही आश्चर्य वाटलं.


मान कशी आहे?" त्यांनी विचारलं


"ती आहे तशीच आहे! तिची सवय होतेय."तो म्हणाला.तो हे प्रथमच कोणाकडे तरी कबूल करत होता;पण ते खरं होतं.डॉक्टरांनी त्याची तपासणी केली.मग विचारलं,तू मधला काळ काय करत होतास?फारसं काही नाही. ओढवलेल्या परिस्थितीला सामोरं कसं जायचं याचा विचार करत होतो.स्वतःची कीव करत होतो.


आणि आता ?


आता मी भारतात जायची तयारी करतोय!

तो म्हणाला.


पावसाच्या प्रदेशात जायचंय,हे मनात आल्यानंतर अलेक्झांडरच्या मेंदूतल्या काही सुप्त पेशी जागृत झाल्या.त्यांनी त्याच्या बऱ्याच निद्रीस्त स्मृतींना खडबडून जागृत केलं. बालपणीच्या चेरापुंजीच्या पावसाच्या स्मृतींनी भारतात जाऊन पावसात भिजायची त्याला ओढ लागून राहिली.


मौसमी पावसाचा पाठलाग करण्याचा निश्चय झाल्यानंतर अलेक्झांडरने प्रामुख्याने मौसमी पाऊस आणि थोड्याफार प्रमाणात भारताबद्दल जी मिळेल ती माहिती वाचायला सुरुवात केली. त्या वाचनातून त्याच्या एक लक्षात आलं,की भारतात त्या आधीची दोन-तीन वर्षं मौसमी पाऊस खूप अनियमित झाला होता.लंडनमधील वृत्तपत्रांनी त्या वर्षीही पावसाची लक्षणं ठीक नाहीत,

त्यामुळे भारतात दुष्काळ पडू शकतो, अशी शक्यता वर्तवली होती.भारताच्या काही भागांत गेल्या काही वर्षांत नेहमीपेक्षा कमी पाऊस होत होता,काही भागात तो अजिबात झालेला नव्हता,तीच परिस्थिती याही वर्षी असेल,असं या बातम्या वर्तवत होत्या.


या वाचनाच्या जोडीला अलेक्झांडरने पावसासाठी भारतात कोणते उपाय केले गेले, याचीही माहिती मिळवली.पुस्तकात अलेक्झांडर अशा ऐकीव माहितीद्वारे कळलेल्या सरकारी जलसंपदा खात्यातर्फे एका योगसाधना करणाऱ्या साधूला पाऊस पाडण्यासाठी बोलावलं जाणं,व्याघ्रचर्मावर बसून त्या साधूने दोन तास चार मिनिटं ध्यान लावणं,त्यानंतर मुसळधार पाऊस होण्याचं भाकीत वर्तवण योगायोगाने त्याचवेळी कोचीनमधे मुसळधार पाऊस होणं,मग बंगलोरमधल्या अधिकाऱ्यांनी त्याला त्याबद्दल जाब विचारल्यावर त्याचं चिडणं,वगैरे वगैर अलेक्झांडरने असंही नमूद केलं आहे,की 'तो साधू भारतीय प्रशासनाने भारतीय अवकाश कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणूनही अधिकृतरित्या नेमलेला होता. भारताच्या पहिल्या अग्निबाणाचं प्रक्षेपण अयशस्वी झालं.तेव्हा त्याची नेमणूक झाली. त्याच्या आशीर्वादाने दुसरं प्रक्षेपण यशस्वी झालं.'अलेक्झांडरने लिहिलेल्या या माहितीचं मात्र मी इथे खंडन करू इच्छितो.मी गेली कित्येक दशकं मौसमी पाऊस आणि भारतीय अवकाश संशोधनाच्या बातम्या गोळा करत आलो आहे.

आकाशवाणीतर्फे श्रीहरीकोटा इथे जाऊन भारतीय अवकाश कार्यक्रम आणि एसएलव्ही-३ चं प्रक्षेपण यासंबंधी 'नवे सीमोल्लंघन' हा कार्यक्रम तयार करण्याची संधी मला मिळाली होती.त्यावेळी 'नारळ फोडणे' हा विधी सोडला तर कुठल्याही साधू वगैरेचा उल्लेख कुणी केल्याचं मला आठवत नाही. 


त्यामुळे अलेक्झांडरचं पुस्तक प्रथम वाचल्यावर मी हा विषय माझ्या परिचितांकडे काढला. त्यावेळी 'असं काहीही झालेलं नाही.डॉ. गोवारीकरांना असली थोतांडं मान्य नव्हती.असं मला सांगण्यात आलं.असो.


आवश्यक ती माहिती मिळवून मग नाणेफेक करून एक दिवस अलेक्झांडरने भारतात जायचं ठरवलं.ही गोष्ट आहे १९८७ सालची.मुंबईत उतरल्यावर त्याने प्रथम 'इंडियन एक्स्प्रेस' हे इंग्रजी वृत्तपत्र विकत घेतलं.त्यात पहिल्याच पानावर मौसमी पावसाची बातमी होती.नैऋत्य मौसमी वारे वाहायला सुरुवात झाली होती. दक्षिण अंदमानच्या आणि त्याला लागून असलेल्या सागरावरून हे वारे वाहत असले तरी ते अगदीच क्षीण होते.नेहमी मॉन्सून अंदमान द्वीपसमूहावर वीस मेच्या सुमारास जोर धरतो. या वर्षी त्याला एक आठवडा उशीर होईल,असा अंदाज वर्तवलेला होता.एअर इंडियाच्या विमानाने अलेक्झांडर त्रिवेंद्रमला पोहोचला तेव्हा मे महिन्याचा अखेरचा आठवडा होता.

अशा त-हेने केरळमध्ये मौसमी पाऊस यायच्या आधी तेरा दिवस तो केरळमध्ये येऊन दाखल झाला होता.त्यावेळी सात राज्यांत दुष्काळी परिस्थिती होती.बऱ्याच ठिकाणी दोन दिवसांतून एकदा पाणी येत होतं.


दरवर्षी भारतातील अनेक प्रमुख वृत्तपत्रांचे प्रतिनिधी त्रिवेंद्रममध्ये मौसमी पावसाच्या वार्तांकनासाठी गोळा होतात.त्यामुळे त्रिवेंद्रमची वेधशाळा जगभर प्रसिद्ध आहे.ही वेधशाळा इ.स.१८४० मध्ये त्रावणकोरच्या महाराजांनी बांधली. त्यांना पाश्चात्य विज्ञान प्रगतीबद्दल खूप कुतूहल होतं.त्रिवेंद्रममधल्या एका टेकडीच्या माथ्यावर ही वेधशाळा उभी करण्यात आली आहे.ती बांधली गेली तेव्हा नागरी वस्तीपासून दूर होती.ती उंच ठिकाणी बांधल्यामुळे पूर्वीच्या काळी जेव्हा रडार यंत्रणा किंवा उपग्रहाने घेतलेल्या प्रतिमा उपलब्ध नसत. त्यावेळी व्हरांड्यात उभं राहून दूरदर्शीच्या साहाय्याने वेधशाळेच्या कर्मचाऱ्यांना मौसमी पावसाच्या ढगांचं निरीक्षण करता येत असे. आजही भारतात मौसमी पावसाचं आगमन झाल्याची घोषणा सर्वप्रथम इथूनच केली जाते.१८५२ ते १८६९ या कालावधीत जॉन ॲलन ब्राऊन हे खगोलशास्त्रज्ञ या वेधशाळेचे प्रमुख होते.त्यांच्या प्रयत्नांनी त्रिवेंद्रमची वेधशाळा वायव्य आशियातील सर्वांत महत्त्वाची वेधशाळा बनली,असं अलेक्झांडर नमूद करतो.हटके भटके,निरंजन घाटे,

समकालीन प्रकाशन(अलेक्झांडर जरी या वेधशाळेला वायव्य आशियातील सर्वांत महत्त्वाची वेधशाळा म्हणत असला तरी एकेकाळी ती आशिया खंडातील सर्वांत प्रगत वेधशाळा होती.योगायोगाने

ती पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्तावर प्रस्थापित झाली.खरंतर ती दक्षिण आशियातील वेधशाळा आहे.)जॉन ॲलन ब्राऊन यांनी या ठिकाणी कार्यरत असताना दरवर्षी पाच ते सात जून दरम्यान मृग नक्षत्रावर (याला अलेक्झांडर मॉन्सून स्टार असं म्हणतो) या ठिकाणी पाऊस येतो, याची नोंद केली.अलेक्झांडर त्रिवेंद्रमच्या या वेधशाळेत ज्युलियस जोसेफ यांना भेटला.त्यावेळी जोसेफ हे दिल्लीतील विविध मंत्रालयांना आणि जगभरच्या वृत्तपत्रप्रतिनिधींना तसंच बीबीसी

सारख्या इतर माध्यमांना मौसमी पावसाच्या प्रगतीची माहिती देत होते.पाऊस त्यावेळी श्रीलंकेच्या उत्तर भागात होता.तो केव्हाही केरळात प्रवेश करेल अशी परिस्थिती होती.जोसेफना सतत दूरध्वनीवरून होणाऱ्या चौकशांना तोंड द्यावं लागत होतं.त्यातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते अलेक्झांडरशी बोलत होते. 'हे क्षेत्र फारच नाजूक पण खदखदतं क्षेत्र आहे. मी शास्त्रज्ञ म्हणून अलिप्तपणे बोलायचा, वागायचा प्रयत्न करतो;पण लोकांच्या भावना याबाबतीत गुंतलेल्या असतात.'हे त्यांचं म्हणणं खरं होतं.

कोट्यवधी भारतीयांचं जगणं,देशाची अर्थव्यवस्था यांचा मौसमी पावसाशी घनिष्ट संबंध असतो.एकादा शब्द चुकीचा वापरला गेला तर भारतभर खळबळ माजण्याची शक्यता असते.

१२/८/२४

प्रेमानं बोला / Speak with love…!

थिओडर रूझवेल्टच्या सर्व पाहुण्यांना त्याच्या विविध क्षेत्रांतील नेत्रदीपक ज्ञानाचे नवल वाटत असे.त्याचा पाहुणा काऊबॉय असो किंवा न्यूयॉर्कमधील राजकारणी धुरंधर असो;पण रूझवेल्टला कोणाशी काय आणि कसे बोलावे हे अचूकतेने उमजत असे आणि रूझवेल्ट यासाठी काही विशेष करत असे का?नाही,पण तो आवर्जून आदल्या रात्री त्या पाहुण्याची कुंडली मांडून बसत असे म्हणजे त्याचे कामाचे क्षेत्र, त्याची पार्श्वभूमी,

त्याचे शिक्षण,त्याच्या आवडीनिवडी वगैरेची माहिती घेत असे.एखाद्याला प्रिय असणाऱ्या गोष्टींविषयी बोलण्यातूनच त्याच्या अंतरंगाशी संवाद साधता येतो,हे इतर सगळ्या नेत्यांप्रमाणे रूझवेल्टलाही माहिती होते.


विल्यम फेल्प्सने ह्युमन नेचर या निबंधात लिहिले आहे की,आठ वर्षांचा असताना माझ्या शाळेला सुट्टी लागली म्हणून मी स्ट्रॅटफोर्डमध्ये राहणाऱ्या माझ्या आत्याकडे गेलो होतो,तेव्हा तेथे येणाऱ्या एका मध्यमवयीन गृहस्थांना चेष्टा-मस्करी करण्याची खूप आवड होती,असे माझ्या लक्षात आले.बाकी सगळ्यांशी हास्यविनोद करून झाले की ते त्यांचा मोर्चा माझ्याकडे वळवायचे.त्यावेळी मला बोटींविषयी खूप आकर्षण वाटायचे आणि ते सद्‌गृहस्थसुद्धा फक्त बोटींविषयीच बोलायचे.जणू काही त्यांनाही बोटीमध्येच रस होता.ते गेल्यावर एकदा मी माझ्या आत्याजवळ त्यांचे खूप कौतुक केले.मी म्हणालो,किती छान माणूस आहे! तेव्हा ती म्हणाली की,ते न्यूयॉर्कमधील एक मोठे वकील आहेत आणि त्यांचा बोटींशी काहीही संबंध नाही.बोटींमध्ये त्यांना रससुद्धा नाही.मी आश्चर्याने विचारले,मग इतका वेळ ते माझ्याशी बोटींबद्दल का बोलले ? तेव्हा मला कळले की मला खूष करण्यासाठी ते माझ्या आवडीच्या विषयावर बोलले.त्यांनी स्वतःला माझ्याशी सहमत करून घेतले.विल्यम फेल्प्स पुढे लिहितात : माझ्या आत्याने त्यावेळी केलेले तिचे मतप्रदर्शन मी आयुष्यात कायम लक्षात ठेवले.हे प्रकरण लिहायला सुरुवात करताना मला खलिफ नावाच्या व्यक्तीचे एक पत्र मिळाले होते.

मुलांच्या स्काउटमध्ये विशेष कार्यरत असणाऱ्या खलिफने लिहिले होते एके दिवशी, मला मदतीची खूप गरज भासत होती,कारण स्काउटची एक मोठी रॅलीच युरोपमध्ये आली होती आणि अमेरिकेतील एवढ्या मोठ्या कार्पोरेशनच्या प्रेसिडेंटकडून यातील एका मुलाचा तरी युरोप ट्रीपचा खर्च भागवला जावा, असे मला वाटत होते.सुदैवाने मी त्या प्रेसिडेंटकडे जातानाच नेमके ऐकले की,त्याने आत्तापर्यंत लाखो डॉलर्सचे चेक्स मदतीसाठी दिले आहेत आणि जो चेक रद्द झाला तो फ्रेम करून लावला आहे.त्याच्या ऑफिसमध्ये गेल्यावर मी तो चेक पाहण्याची इच्छा दर्शवली. लाखो डॉलर्सचा चेक ! मी म्हणालो की,इतका मोठा चेक लिहिणारे तुम्हीच एकटे आहात आणि म्हणूनच माझ्या स्काउटच्या मुलांना मला हे सांगायचे आहे की,एवढ्या मोठ्या आकड्यांचा चेक मी प्रथमच पाहिला आहे.त्याबरोबर प्रेसिडेंटने आनंदाने तो चेक मला दाखवला.मी त्याची खूप स्तुती केली व मी पुन्हा त्याला त्या चेकबद्दल अधिक माहिती विचारली.


मि.खलिफने संभाषणाची सुरुवात स्काउट बॉईजपासूनही केली नाही किंवा युरोपमध्ये आलेल्या त्याच्या रॅलीपासूनही केली नाही.त्या माणसाला ज्याच्यात रस होता त्या विषयालाच त्याने हात घातला,हे तुमच्या लक्षात आले असेलच ! परिणामी असे झाले की,तो प्रेसिडेंट स्वतःहून म्हणाला,अरे हो,तुम्ही मला भेटायला का आलात त्याबद्दल बोलाल का? मग खलिफने त्याला सारे सांगितले.मि.खलिफ पुढे म्हणाले,मला आश्चर्याचा धक्काच बसला.मी ज्याबद्दल गळ घातली,ती माझी मागणी तर त्याने ताबडतोब मान्य केलीच आणि त्याशिवाय स्वतःहून एक नाही तर तब्बल पाच मुलांचा ट्रीपचा खर्च,शिवाय माझासुद्धा ट्रीप-खर्च दिला आणि एक हजार डॉलर्सचे क्रेडिट दिले. युरोपमध्ये सात आठवडे राहायला परवानगी दिली.शिवाय निरनिराळ्या ठिकाणी ओळखीची पत्रे दिली.शिवाय तो स्वतः आम्हाला पॅरीसला भेटून सर्व शहर दाखवेल असे सांगितले.त्यानंतर आमची आर्थिक परिस्थिती वाईट होती तेव्हा त्याने नोकरीसुद्धा दिली.अजूनही आमचा हा ग्रुप त्याच्या संपर्कात आहे.


त्याला कशात रस आहे हे जर मला आधी समजलं नसतं,

तर मी कदाचित थेट माझा मुद्दा मांडून मोकळा झालो असतो आणि मग, कदाचित आत्ता जशी भरभरून मदत मिळाली त्याच्या एक दशांशसुद्धा मिळाली नसती.


व्यवसायातसुद्धा हे तंत्र वापरणे फायद्याचे आहे. हेन्री दुवेन रॉय यांची दुवेन रॉय ॲन्ड सन्स ही न्यूयॉर्कमधील घाऊक मालाची बेकरी होती. दुवेन रॉय हे न्यूयॉर्कमधील एका विशिष्ट हॉटेलला ब्रेड विकण्याच्या प्रयत्नात होते.तेथील सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमांना ते हेतुपुरस्सर जात असत.आपल्याला अधिक धंदा मिळावा म्हणून तो मॅनेजर ज्या हॉटेलमध्ये उतरत असे,तेथेसुद्धा दुवेन रॉयने राहून पाहिले; पण व्यर्थ ! यश मिळाले नाही.


मि.दुवेन रॉय नंतर म्हणाले,मानवी नातेसंबंधांचा थोडा अभ्यास केल्यावर माझ्या असे लक्षात आले की हे कुलूप उघडायला वेगळ्या किल्ल्या वापरायला हव्यात.या माणसाचे रसविषय कोणते याचा मग मी शोध घेतला आणि मला समजले की,हॉटेल ग्रीटर्स ऑफ अमेरिका या हॉटेल - व्यवसायातील उच्च अधिकाऱ्यांच्या सोसायटीचा हा सभासद होता. फक्त सभासदच नव्हता,तर त्याच्या उदंड उत्साहामुळे तो त्या सोसायटीच्या प्रेसिडेंटपदी पोहोचला होता.तो आंतरराष्ट्रीय ग्रीटर्सचासुद्धा प्रेसिडेंट होता! त्या सोसायटीच्या संबंधातल्या सर्व कार्यक्रमांना तो जातीने हजर राहत असे.म्हणून दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मी माझ्या संभाषणाचा रोख ग्रीटर्सकडे वळवला आणि मग मला अवर्णनीय प्रतिसाद मिळाला.आम्ही अर्धा तास ग्रीटर्सबद्दलच बोलत होतो.तो भरभरून बोलत होता.माझ्या लक्षात आले की,ही सोसायटी म्हणजे त्याची निव्वळ आवड नव्हती, तर ते त्याच्या जीवनाचे ध्येय होते.त्या दिवशी त्या सोसायटीचे सभासदत्व त्याने मला विकले होते.या सगळ्या वेळात मी त्याच्याशी एकदाही ब्रेडबद्दल बोललो नाही,पण थोड्याच दिवसात त्याच्या एका आचाऱ्याने मला फोन केला की, माझ्या ब्रेडचे सँपल किमतीसह घेऊन या.


त्या आचाऱ्यालापण माझे खूप कौतुक वाटले. कारण त्याला कळत नव्हते,मी त्या माणसावर काय जादू केली! पण मी जिंकलो होतो !


जी गोष्ट घडवून आणण्यासाठी मी चार वर्षे या माणसाचा पाठपुरावा केला होता,पण उपयोग झाला नव्हता.त्याला कशात रस होता आणि कशाबद्दल बोलणे आवडत होते,हे समजून घेतल्यामुळेच माझे काम झाले.


आणखी एक उदाहरण पाहा.एडवर्ड हॅरीमन हा मेरीलँडमधील एक निवृत्त मिलिटरी ऑफिसर होता आणि त्याने निवृत्त झाल्यावर कंबरलँड येथील सुंदर खोऱ्यात राहायचे ठरवले.दुर्दैवाने त्या काळात फारसे काम उपलब्ध नव्हते.थोडेसे शोधल्यावर त्याच्या लक्षात आले की, त्या भागातील जवळपास सगळ्या कंपन्या फंकहाउझर नावाच्या माणसाच्या मालकीच्या किंवा त्याच्या ताब्यात असणाऱ्या होत्या.हा माणूस अत्यंत गरिबीतून आपल्या मेहनतीवर इथपर्यंत पोचला होता.हे ऐकल्यावर हॅरीमनला त्याला भेटावेसे वाटू लागले,पण फंकहाउझर कोणा बेकार माणसांना भेटत नसे.हॅरीमन लिहितो : - फंकहाउझरला कशात रस आहे हे जाणून घेण्यासाठी मी खूप चौकशी केली.मला असे कळले की त्याला त्याने मोठ्या कष्टाने मिळवलेल्या पैशामध्ये व सत्तेमध्ये रस आहे.एक कडक,तुसड्या स्वभावाची त्याची सेक्रेटरी त्याला लोकांपासून दूर ठेवण्याचे काम चोख करण्यासाठी ठेवली होती.मी तिचीही ध्येये, आवडीनिवडी यांची माहिती काढली आणि मुद्दामच अचानकपणे सरळ त्या सेक्रेटरीला गाठले.पंधरा वर्षांपासून ती त्याची डायरी व इतर वैयक्तिक कामे सांभाळत होती.माझ्याकडे फंकहाउझरसाठी आर्थिक फायद्याचे व सत्तेचे राजकारण करणारी एक योजना आहे असे जेव्हा मी तिला सांगितले,

तेव्हा ती उत्साहाने माझे बोलणे ऐकू लागली.मी तिला तिच्या फायद्याच्याही काही गोष्टी सांगितल्या.आमचे हे संभाषण झाल्यावर तिने माझी फंकहाउझर

बरोबर भेट निश्चित केली.


त्याच्या दिमाखदार भव्य ऑफिसमध्ये जाताना मी मनाशी पक्की खूणगाठ बांधली होती की,मी माझ्या नोकरीबद्दल एक चकार शब्दही काढणार नाही.फंकहाउझर एका मोठ्या,शिसवी कोरीवकाम केलेल्या टेबलमागे बसला होता आणि मला लवकरात लवकर कटवण्याचा त्याचा विचार त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.मी म्हणालो,मि.फंकहाउझर मला विश्वास वाटतो की,मी तुम्हाला अधिक पैसे मिळवून देईन.तर त्याने मला जवळ बसवून घेतले.मी माझ्याकडे असलेल्या सगळ्या योजना त्याला सांगितल्या.तसेच माझी गुणवत्ताही त्या ओघात कथन केली आणि या योजनांमुळे त्याला निश्चित व्यावसायिक यश कसे मिळेल ते सांगितले.


आता तो मला नावाने हाक मारू लागला होता. 

(मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी, मंजुल प्रकाशन..)तो लगेच म्हणाला- आरजे,चल,तू आजपासून माझ्याकडे काम कर.आजतागायत वीस वर्षे मी त्याच्याकडेच काम करतो आहे आणि आम्ही दोघांनीही भरपूर पैसा कमावला आहे.समोरच्या माणसाची आवड जाणून त्या विषयी बोलून, बोलणारा व ऐकणारा अशा दोघांनाही फायदा होतो.एक यशस्वी उद्योजक हॉवर्ड हा उत्तम संवादकर्ताही आहे.तो हे तत्त्व तंतोतंत पाळतो. त्याला याचा काय फायदा होतो असे विचारण्यात आले तेव्हा हॉवर्ड म्हणाला,


प्रत्येक माणसाकडून मला प्रत्येक वेळी वेगवेगळे बक्षीस तर मिळालेच.पण त्याचबरोबर त्यांना प्रिय असलेल्या गोष्टी प्रत्येकवेळी त्यांच्याशी बोलत राहिल्यामुळे मला दीर्घायुष्य लाभले.


थोडक्यात समोरच्याला जे प्रिय आहे तेच बोला..!



१०/८/२४

प्रेमाकडून संशोधनाकडे From love to research

सर्पदंशानंतर अण्णा वाचला खरा,पण त्याला हात गमवावा लागला याचं दुःख मोठं होतं. त्याच्यावर वेळीच आणि योग्य उपचार झाले असते तर कदाचित त्याचा हात वाचू शकला असता.माझ्याबरोबरच माझ्या मित्रांनाही याची खंत होतीच.एवढंच नव्हे,तर लवकरच मला कळलं, की ससूनमधल्या काही डॉक्टरांनाही त्याची रुखरुख लागून राहिली होती.डॉ.डी.एन. जोशी आणि डॉ.डी.बी. कदम हे त्यातलेच दोघं.हे दोघं उत्साही तरुण नुकतेच बी.जे.मेडिकल कॉलेजमधून पोस्ट - ग्रॅज्युएशन करून तिथेच लेक्चरर म्हणून लागले होते.


अण्णाच्या सर्पदंशाच्या वेळी दोघंही ज्युनियर विद्यार्थी होते.अण्णाच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये काही तरी चुकतंय असं दोघांनाही तेव्हाच समजलं असावं.

त्यामुळे किमान यापुढे ससूनमध्ये येणाऱ्या सर्पदंशाच्या प्रत्येक केसचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करायचा असं त्या दोघांनी ठरवलं होतं.

त्यातून कदाचित उपचाराची नवी सुधारित पद्धती तयार होऊ शकेल आणि पर्यायाने सर्पदंशाने मृत्यू होण्याचं किंवा हातपाय गमावावे लागण्याचं प्रमाण कमी होईल अशी त्यांना आशा होती.त्यांच्या कामाबद्दल कळल्यावर मी आपणहून या संशोधनात सहभागी व्हायचं ठरवलं.त्या वेळी टेल्कोमध्ये माझी कायम फर्स्ट शिफ्ट असायची.दुपारी घरी आलो की मी लगेचच ससूनला पळायचो.१९८७ सालच्या जानेवारी महिन्यात आमच्या संशोधनाला सुरुवात झाली.त्यासाठी मेडिसिन विभागाचे प्रमुख,कॉलेजचे डीन आणि ससून हॉस्पिटलचे सुपरिंटेंडन्ट अशा अधिकाऱ्यांची परवानगी मिळवली.


पहिल्या टप्प्यात आम्ही १९८६ या संपूर्ण वर्षभरात सर्पदंशाने दाखल झालेल्या रुग्णांच्या केस स्टडीज करायला सुरुवात केली.पुढचे दोन महिने त्या वर्षातील सर्पदंशाच्या सगळ्या रुग्णांचे केसपेपर नीट तारीखवार लावून घेण्यातच गेले.आता अनेक शिकाऊ डॉक्टरांनी हाताळलेले,अनेकविध हस्ताक्षरांत टिप्पणी केलेले,अमुकतमुक उपचार, उपाय आणि तपासण्या करण्याचे आदेश, त्यावरचे उपचार आणि कार्यवाही अशा असंख्य केसपेपरचा अभ्यास करण्याचं डोईजड काम पुढे होतं.

अभ्यासाला सुरुवात कुठून करावी हे आमच्यापैकी कुणालाच सुचत नव्हतं.तीन-चार दिवस असेच गेले.एका संध्याकाळी आम्ही तिघं कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चहा घेत असताना डी. बी.ताडकन उठला आणि निघाला.मी आणि डी. एन.त्याच्या मागोमाग गेलो.पहिला केसपेपर खसकन् ओढून डी.बी.बारकाईने पाहू लागला. आम्ही जमवलेल्या केसपेपरवर त्याने त्याची अभ्यासू नजर रोखली आणि तो म्हणाला, "कळलं!आपण पहिल्यांदा जेंडरपासून सुरू करू यात.पेशंट स्त्री होती की पुरुष,मग वय,मग भौगोलिक स्थान आणि मग बाकी क्लिनिकल डीटेल्स."आम्ही तत्परतेने कामाला लागलो. अशा रीतीने आमच्या नव्या रिसर्च प्रोजेक्टची सुरुवात झाली.


बी.जे.मेडिकलचे इतरही काही लेक्चरर्स स्वतःहून आम्हाला मदत करू लागले, तर काहीजणांनी हेटाळणीही चालवली;पण आम्ही अर्थातच त्याकडे लक्ष न देता आमचं काम सुरू ठेवलं.सुमारे सातशे केसपेपर्सचा अभ्यास करायला तीन-चार महिन्यांचा काळ लागला.या सर्व माहितीचा तर्कसुसंगत अभ्यास करून नेमकं अनुमान काढण्याचं आणि त्यावर विश्लेषण करण्याचं मुख्य काम अद्यापही बाकी होतं.एकदा डीबी आणि डीएनचे सीनियर मित्र डॉ.श्याम बावीकर सहजच आमच्या रूमवर आले.


आम्ही लिहिलेल्या पत्रावळ्या त्यांनी निरखून पाहिल्या आणि तिथलीच कात्री घेऊन नवीन कागदाच्या उभ्या पट्ट्या कापायला सुरुवात केली.

त्यांना डिंक लावून आमच्या पत्रावळ्या मागच्या बाजूने एकापुढे एक अशा संगतवार पद्धतीने चिकटवायला घेतल्या.त्यांच्या या नव्या कल्पनेमुळे आमच्या कामात खूपच सुसूत्रता आली.आम्ही चौघांनी अशा पद्धतीने डाटा कम्पायलेशन करायला घेतलं. पुढच्या तीन-चार दिवसांतच अख्ख्या खोलीभर आमचं डाटा शीट तयार झालं.त्यामुळे आता तिथे पायही ठेवायला जागा उरली नव्हती.

आता आमच्या अभ्यासात आणखी मजा येऊ लागली.शिरूर परिसरातून आलेले घोणसदंशाचे रुग्ण;भोर, वेल्हा परिसरातील मण्यारदंश,मुळशी-मावळातील नागदंश,पावसाळ्याच्या सुरुवातीचे फुरशांचे दंश आणि एखाद-दुसरा ट्रेकवर गेलेल्या शहरी तरुणाला झालेला चापड्याचा (बांबू पिट व्हायपर) दंश अशा विविध प्रकारचे दंश झालेल्या व्यक्तींची वयं,त्यांचे व्यवसाय आणि कामाचं स्वरूप अशी खूपमाहिती आमच्याकडे जमा होऊ लागली.


घोणसाचा दंश प्रामुख्याने दिवसा होतो,तर मण्यारीचा रात्री.नागाचा कधीही आणि फुरशाचा मात्र कधीतरीच. 


सर्पदंश हे प्रामुख्याने २८ ते ४० या वयोगटातील शेतीचं काम करणाऱ्या पुरुषांना झाले असल्याचंही आमच्या लक्षात आलं.त्यातूनही पायापेक्षा हाताला जास्त सर्पदंश झाले होते. अशा सर्वच रुग्णांवर केली गेलेली उपाय योजना,त्यात अनवधानाने राहिलेल्या त्रुटी अशा सर्वच बाबींचा सविस्तर अभ्यास करायला मिळाला आणि त्यातूनच सर्पदंश उपाययोजनेमध्ये विशिष्ट मापदंड ठरवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो.


त्याच दरम्यान डीएनला कुठून तरी समजलं की सिंगापूर विद्यापीठात सर्पविष व सर्पदंश या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे.तिथे आम्ही आमच्या शोधनिबंधाचं प्रारूप पाठवून दिलं,आणि ते चक्क स्वीकारलंही गेलं.

एवढंच नव्हे,तर हा शोधनिबंध सादर करण्यासाठी सिंगापूरला येण्याचं आमंत्रणही आम्हा तिघांना मिळालं.आम्ही आनंदाने अक्षरशः वेडे झालो. निमंत्रण आम्हा तिघांनाही होतं,पण त्याचा प्रवासखर्च आयोजक देणार नव्हते.त्यामुळे तिघांनी जाणं परवडणारं नव्हतं.पण आमच्यापैकी कोणीच एकट्याने जायला तयार होईना.


मेडिसिन डिपार्टमेंटला कामाचा खूप लोड आहे,अशी सबब पुढे करून डीबी मागे हटला. त्याच्या या निर्णयामुळे मी आणि डीएन असं दोघांनीच जायचं निश्चित झालं. 


मुंबई-सिंगापूर-मुंबई अशा विमानखर्चाच्याच किमतीमध्ये आमच्या एका ट्रॅव्हल एजंट मित्राने आम्हाला बँकॉक-पटाया-सिंगापूर अशी पर्यटन सहलच बुक करून दिली.विमानाच्या तिकिटांसाठी घरच्यांकडून आणि मित्रांकडून पैसे जमवले.

वरखर्चासाठी मात्र आमच्याकडे पैसे नव्हते.


त्यामुळे प्रवासात पैशाची काटकसर करण्याशिवाय इलाज नव्हता.सर्वप्रथम बँकॉकला पोहोचलो,तिथून पटाया गाठलं.तिथे दोन दिवस राहिलो.इतर पर्यटक भरपूर पैसे खर्च करून वॉटर स्पोर्ट खेळत होते. आम्ही मात्र तिथल्या टेकडीवजा डोंगरावर छोटासा ट्रेक करण्याचा निर्णय घेतला.टेकडीवर पोहोचून सगळ्यांचे 'वॉटर स्पोर्ट्स' पाहत बसलो. बँकॉकमध्ये सोन्याचा बुद्ध,झोपलेला नव्वद फुटी बुद्ध,नदीतला बाजार वगैरे पाहिलंच,पण आम्हाला मुख्य आकर्षण होतं ते तिथल्या सर्प उद्यानाचं.तिथे आशिया खंडात आढळणारे अनेक रंगीबेरंगी,आकर्षक पण विषारी असे पिट व्हायपर साप पाहिले.भला थोरला किंग कोब्रा तिथले कामगार लीलया हाताळत होते.तीन-चार प्रकारच्या मण्यारीही बघायला मिळाल्या. तिथल्या अधिकाऱ्यांना भेटलो.ओळखी करून घेतल्या.तिथे आलेल्या पर्यटकांना ते लोक सतत निरनिराळ्या सापांचे विष काढून दाखवत होते आणि ते विष ताबडतोब प्रयोगशाळेत पाठवलं जात होतं.

त्यापासून अँटिव्हेनम लस बनवून ती जगभर निर्यात केली जात होती.ओळख काढल्यामुळे ही सर्व प्रक्रिया जवळून बघता आली.या ओळखीमुळेच पुढे आमच्या सर्वोद्यानामध्ये किंग कोब्राच्या विषासाठी लागणारं अँटिव्हेनम आम्हाला त्यांच्याकडून मिळवता आलं.अर्थात ती बरीच नंतरची गोष्ट.सिंगापूरला पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी विद्यापीठ गाठलं.

कॉन्फरन्समध्ये विविध देशांतील जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ, सर्पविषतज्ज्ञ,फिजिशियन्स,क्लिनिशियन्स आणि काही शल्यविशारदही सहभागी झाले होते.

आमच्या शोधनिबंधाचा प्रथम लेखक डॉ.डी. एन.

जोशी असल्याने तो सादर करण्याची जबाबदारी त्याचीच होती.आमच्या प्रेझेंटेशनची वेळ आली तशी त्याची छाती धडधडू लागली. डीएनने आपल्या खास पुणेरी इंग्लिशमध्ये प्रेझेंटेशनला सुरुवात केली तेव्हा तो किती प्रभावी बोलू शकेल याबद्दल मला शंकाच होती; पण अतिशय शांतपणे आणि सोप्या भाषेत माहिती सांगत त्याने लवकरच सगळ्यांची मनं जिंकली.मी स्लाइड्स बदलण्याचं काम करत होतो.

आम्ही जवळपास पस्तीसेक स्लाईड्स दाखवल्या.

प्रत्येक स्लाइडवर डीएन अत्यंत आश्वासकपणे आमचे निष्कर्ष मांडत होता. व्याख्यान संपल्यावर त्याला जोरदार टाळ्या पडल्या आणि भरपूर प्रश्नोत्तरं झाली.प्रश्नांनाही त्याने समाधानकारक उत्तरं दिली.मी तर चाट पडलो.


मराठमोळ्या वातावरणात वाढलेल्या डीएनने परिषद गाजवली.सर्वच देशांच्या प्रतिनिधींनी त्याच्या आणि पर्यायाने आम्हा सर्वांच्याच संशोधनाला पावती दिली होती.चार दिवसांच्या या परिषदेमध्ये आम्हाला खूप काही नवं शिकायला मिळालं.सर्पदंश आणि उपचार या विषयामध्ये पारंगत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिकारी व्यक्तींशी ओळखी झाल्या. माझ्यासाठी तर पुढच्या कामाच्या दृष्टीने ही मोठीच पर्वणी होती.आमच्याकडे पैसे इतके कमी होते की जवळपास चारही रात्री आम्ही काही न खाता उपाशीपोटीच झोपून गेलो. परतण्याच्या दिवशी हॉटेलचं बिल चुकवलं आणि पैसे मोजले तर जेमतेम विमानतळावर पोहोचण्याएवढी आणि पुढे मुंबई-पुणे बसप्रवासाएवढीच शिल्लक सोबत होती.

 विमानतळावर खाण्याचे प्रचंड पदार्थ डोळ्यांसमोर नाचत होते,पण पैसे नसल्याने खाता येत नव्हतं.


अखेर विमानात बसलो. टेक-ऑफपूर्वी एक हवाईसुंदरी गोळ्या चॉकलेट्सनी भरलेला ट्रे सर्वांसमोर नाचवत आमच्या जवळ आली.


आम्ही दोघांनी हावरटासारख्या दोन्ही मुठी भरून घेतल्या आणि अक्षरशः अधाशासारखे खाऊ लागलो.त्यानंतर पुढ्यात आलेले खाद्यपदार्थही अधाशासारखे चापले.वर दोन-दोन कप कॉफी मारली आणि आत्मा शांत केला.पण असं असलं तरीही आम्ही खूष होतो.या कॉन्फरन्सने आम्हाला वेगळाच आत्मविश्वास दिला होता.- सोयरे वनचरे,अनिल खैर,समकालीन प्रकाशन..!


लवकरच आम्हाला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली.सर्पविष आणि सर्पदंश या विषयावर अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या 'टॉक्सिकॉन' या जगप्रसिद्ध शोध नियतकालिकातही आमच्या शोधनिबंधाची दखल घेण्यात आली होती.त्यातूनही या क्षेत्रात आम्हाला भरपूर प्रसिद्ध मिळाली आणि ओळखी वाढल्या.पुढे डॉ.डी.एन.जोशी परदेशी गेला आणि डॉ.डी.बी.कदम बी.जे.मध्ये आधी प्राध्यापक आणि पुढे विभागप्रमुखही झाला.



एक वाचणीय नोंद - शिवाजीराजांचे वकील : १६७२ मध्ये पोर्तुगीजांशी चौथाईच्या वसुलीबाबत बोलणी करण्यासाठी शिवाजीराजांनी पाठवलेले ते वकील म्हणजे पितांबर शेणवी,जिवाजी शेणवी आणि गणेश शेठ.१६७७ मध्ये रामनगर आणि कोळी राजांचा संपूर्ण मुलूख शिवाजीराजांच्या ताब्यात आला.

त्यानंतर दमणच्या सीमेवर सैन्य ठेवून दमणला लुटारूंचा उपद्रव होणार नाही याची काळजी शिवाजीराजांनी घेतली आणि त्या बदल्यातल्या चौथाईची मागणी पोर्तुगीजांकडे केली.ही मागणी रास्त असल्याचे दमणच्या नगपालिकेने ठरविले आणि त्याबाबत पोर्तुगीज विजरईसही कळविण्यात आले.१० जानेवारी १६७८ रोजी विजरईने शिवाजीराजांचा हा हक्क मान्य केला व तसे त्यांना कळविले.त्यापूर्वी १५ सप्टेंबर १६७७ रोजी त्याने वसईच्या जनरलला लिहिलेल्या पत्रात आज्ञा केली आहे की 'चौथाईची रक्कम वसूल करून ठेवावी व चौथिया राजांशी ह्या बाबतीत जसा करार केला होता तसाच करार शिवाजींशी करावा.पण शिवाजीस द्यावयाची चौथाईची रक्कम त्याने रामनगरचे संपूर्ण राज्य हस्तगत केल्यापासूनच द्यावी.त्यापूर्वी देऊ नये.' त्यानंतर हे वकील बोलणी करण्यासाठी आले होते.त्याबाबत कॅरे यांनी ही नोंद केली आहे.पण तारीख चुकली आहे.वसईचा कॅप्टन दों मानुयेल लोबु द सिल्व्हैर यांच्याकडे चौथाईसंबंधाने विचारविनिमय करण्यासाठी शिवाजीराजांनी मे १६७७ मध्ये आवजीपंत ह्याला पाठवले होते. ही चौथाई शिवाजीराजांना देण्याचे पोर्तुगीजांनी कबूल केले परंतु अनेक सबबी सांगत पोर्तुगीजांनी ही रक्कम अखेरपर्यंत दिली नाहीच.उलट सदर रकमेपैकी तेरा हजारांपेक्षा अधिक रुपये गुप्तपणे रामनगरकरास दिले.तेही शिवाजीराजांविरुद्ध लढा सुरू ठेवण्यासाठी.ह्याचा उल्लेख गोव्याच्या हंगामी गव्हर्नरच्या दि.१२ मे १६७८च्या पत्रात आढळतो.पण लिस्बन येथील आज्युदच्या ग्रंथसंग्रहालयातील एका हस्तलिखितानुसार दमण प्रांतातील चौथाईचे उत्पन्न दरसाली १२९९५ असुर्प्या असून त्यापैकी १८९८असुर्प्या वतनदारासंबंधीचा खर्च वजा जाता चौथिया राजास ९०७७ असुर्प्या राहतात,अशी ४ जून १६८३ ची नोंद आहे.ह्यावरून शिवाजीराजास पोर्तुगीजांकडून चौथाईबद्दल दरवर्षी ही रक्कम येणे होते.१६८१ च्या अखेरपर्यंत ह्या चौथाईपैकी अनामत ठेवलेली रक्कम ११७३८असुर्प्या होते अशीही नोंद आढळते.ह्यावरून १६८१ पर्यंत ही रक्कम वसूल झाली नव्हती असे दिसून येते.


असरफी हा 'सेराफिन' ह्या पोर्तुगीज चांदीच्या नाण्याचा अपभ्रंश.एक रुपया म्हणजे १.४ सेराफिन तर १० रुपये म्हणजे १३