* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१६/४/२५

गावाकडची जमीन / ‌Village land

सदा मास्तर आल्यापासनं सोप्यातल्या माच्यावरच बसून हुतं.

आल्या आल्या वहिनीनं दिल्याला चहा घोटून कप तसाच हुंबऱ्यावर ठेवला.थोरला भाऊ रानातनं आला की,दोन सबुद बोलायचं आणि परत जायचं,या बेतानं सदा मास्तर आलं हुतं.दिवस मावळून आता बराच वकुत झाला.अंधार पडला तरी भाऊ अजून कसा आला नाय म्हणून मास्तरांच्या मनात सारखी कालवाकालव चाललेली.दारात तपकीर घाशीत बसलेल्या आईला इचारलं,"भाऊ अजून कसा काय आला नाय गं?"


"इल की येवढ्यात.आज वर बाद्यातल्या रानात नांगरी धरलीया.

एकादा कोपरा उरला आसल तर तेवढा उलटा करून येणार.

तेवढ्यासाठी पुण्यांदा औत एवढ्या लांब न्हायचं हुनार नाय."


"बरं आता तर दिसायचंपण बंद झालंया.अंधारात कसलं रान नांगरतुया?"


"म्या तर कवा नांगर धरली नाय,पर जातानाच सांगून गेल्याला.परत यायला वाडूळ हुनार म्हणून.तवर तू तरी कापडं बदल की.असा पोरगी बघायला आलेल्या नवऱ्यागत का नटून बसलायास?"


"भाऊ आला की गाठ घिऊन जाणार हाय मी परत. घरात सगुना एकटीच हाय."


"आणायचं हुतंस तिला बी.गेला असतास सकाळी उठून. इतक्या रातीला परत जाणं बरं दिसतं का?"


"त्येला काय हुतंय.गाडीला उजेड हाय की.म्या शाळेतनं थेट इकडंच ‌आलुया.तिला आणि कुठं वाऱ्यात फिरवित बसू आजारी पडायला आणि विनाकारण दवाखान्याची भर करायला. "


"देवाऱ्यावर पुजून ठेव तिला.जरा म्हणून अंगाला पिळ पडायला नग.गंदपावडर लावून दिसभर घरात भावलीगत बसून काढलं की आजारी पडणारच की. जरा रानात आडवंतिडवं काम केलं,शाण थापलं, वैरणकाडी केली,धारा-पाणी केलं,तर खाल्ल्यालं अंगाला लागल आणि रोगराई बाजूला पण फिरकणार नाय."


"आज-कालच्या शिकलेल्या पोरी रानात काम करायला तयार हुतील का ? शाळेतल्या सगळ्या मास्तरांच्या बायका घरातच असत्यात.पोरांची उठाठेव करण्यातच त्येंचा दिवस जातुया."


"जेची बायकूपण नोकरी करती,ती घर सांभाळून नोकरी करीत पोरास्नी संभाळती.तिनं काय पोरास्नी वाऱ्यावर सोडल्यालं नाय."


"ज्येची-त्येची मर्जी.आता एखादीला नसल रानात जायाचं,तर तिला काय मारून टाकायची का?"


"तू बस बायकूच्या पदराला धरून.बाईला कुठला!" आईनं कोपरखळी हाणली.मायलेकाचं बोलणं चाललं हुतं तवर बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज आला.


गोठ्यात बैलं बांधून वसंता सोप्यात आला.डोक्याला गुंडाळलेला टावेल सोडून तोंडावरचा घाम पुसला आणि झाडून खांद्यावर टाकीत कारभारणीला आवाज दिला, "जरा दिव्यातलं राकील आणि हाळद आन गं."


खाली बसत बसत सदाला विचारलं, "कवा आलास?"


"झालं की तासभर..."


"मग कापडं नाय बदललीस आजून."


"परत जायाच्या बेतानं आलुया.तुजी गाठ घ्यायची.दोन शब्द बोलून जावं म्हणून शाळेतनं तसाच आलुया."


सदा काही बोलणार तवर आई आत आली आणि विचारलं, "वसंता,आंगठ्याला काय करून घेतलंस रं?"


"काय नाय गं,जरा ढेकळात नख उचकाटलं.दिसभर त्यात माती घुसून ठसठसाय लागलंया.जरा राकीलनं पुसलं की हाळद बांधून टाकतू.हुईल चार दिसात बरं."


"त्यापरास दवाखान्यात जा.एखाद धनुर्वाताचे इंजिक्शन टुचून घे.परत सुजाय लागलं की बसशील पाय धरून..." आईनं पोटतिडकीनं सांगितलं तरीपण वसंतानं काय तिचं आईकलं नाय.


"शेतकरी माणसाला असं रोज रानात काय ना कायतरी लागतंया.कवा इळाखुरपं कापणार,कवा सड पायात घुसणार,

काटाकुटा टोचणार म्हणून काय रोज दवाखान्याची भर करायची का?" असं बोलत बोलत वसंतानं अंगठ्याला चिंधी गुंडाळली.


एखाद्या गरवार बाय गत सदा मास्तर मात्र चांगलाच अवघडलेला.एकदाचा मनातला विषय भावाच्या कानावर घालायचा आणि सटकायचं,एवढंच त्येच्या डोक्यात हुतं.

भावाला झालेल्या जखमेशी त्याला काय देणं-घेणं नव्हतं.


वसंत पंधरा-सोळा वर्षांचा असताना बाप वारला. त्यावेळेला सदा दहा-अकरा वर्षांचा हुता.वडलांच्या माघारी शेती करायला कोणतरी पायजे म्हणून वसंतानं शाळा सोडली.हातातली पुस्तकं टाकून कासरा घेतला. शेतं पिकली तर पोटपाणी चालणार.

दावणीला चार जनावरं हायती.त्यांची वैरणकाडी केली पायजे.बाप असताना त्यानं कवा आयला रानाचा बांध चढायला लावला नाय.मग बापाच्या माघारी आईला नीट सांभाळलं पायजे.आपली रानं आपुन पिकीवली तर बरं, नाय तर भावकी बांध इकडं-तिकडं दाबून कवा आर्धीनिम्मी रानं गडप करतील कळायचं नाय.धाकट्या सदाला शिकवून मोठा करू.नोकरीला लागला तर घराला हातभार हुईल या भाबड्या आशेवर वसंतानं सदाला शहरात शिकायला पाठवलं.लागल तेवढा पैसा दिला.नोकरीत कायम करायला रिन काढून पैसा भरला. आता सदा मास्तर झाला.त्याला सात-आठ वरसं झाली. नोकरीला लागल्यावर या-जायला फटफट घेतली. शहरातल्या पोरीसंगं परस्पर लगीन केलं आन् तिथंच संसार थाटला.जोडीदारांनी चारचाकी घेतली म्हणून आपुन बी चारचाकी घेतली.आता गाडीचं हाप्तं भरून झालं पर इतकी वर्षे भावानं काढलेल्या खर्चाला कवा हातभार लावला नाय.शेतात पिकणाऱ्या उसावर सगळं चैनीत चाललं असणार,या भ्रमात कवा विचारपूसपण केली नाय.


भाऊ शिकला.नोकरीला लागला.मोटारसायकल घेतली. चारचाकी घेतली.त्याची प्रगती हुतीया.भावकीत पैपावण्यात कौतुक हुतंया.या गोडगैरसमाजावर वसंत जगत हुता; पण झालं वेगळंच.सदानं थेट मुद्द्यालाच हात घातला.


"भाऊ,म्या शाळेजवळ जागा घिऊन घर बांधावं म्हणतुया.येण्या-जाण्याचा ताप वाचल म्हणून सगळ्या मास्तरांनी मिळून जागा घ्यायचं ठरीवलंय.सगळ्यांच्या संग घरपण हुईल.एकदा मागं पडलं तर पुन्हा हुयाचं नाय.भाडं भरण्यापरास सोताचं घर हुईल."


"एकदमच चांगलं हाय की.शाळंच्या शेजारी आसलं तर गाडीवरणं या-जायाचा घोर नाय.आमचा बी जीव निर्धास्त हुईल." वसंता समाधानानं म्हटला.


"पर जरा पैसं कमी पडत हुतं..." सदानं अडचण बोलून दावली.


"किती लागणार हायती?" आकडा हजारात आसल असं समजून वसंतानं विचारलं.


"म्या सोसायटीतनं दहा लाखाचं कर्ज घेतलंया.वरचं सात लाख लागणार हुतं." पानावर कात-सुपारी मागावी तसंच सदानं सात लाखांची मागणी केली.महिन्याच्या महिन्याला हजारात पगार घेणाऱ्या सदाला ते काय जास्त वाटत नव्हतं.पर दीड हजाराची खताची फरी आणायला दुधाच्या बिलाची वाट बघणारा वसंता चपापला.आकडा आयकून आईपण हुंबऱ्यातनं आत आली.

वसंतची मालकीण दारामागं उभा राहून हे सारं गप आयकत हुती.


"हे बघ सदा,इतकी मोठी रक्कम तर काय माझ्याजवळ नाय.

त्यापरास तुझ्याकडं जेवढं हायती तेवढ्यात बसंल तसं घर बांध.

सोन्याची सुरी मानंवर घिऊन चालणार नाय." वसंत बोलता बोलता मलुल झाला.


"पर तिथं सगळी घरं एकसारखीच हायती..."


"एवढी मोठी जुळना करायला मला जमल आसं काय वाटत नाय.उगाच तुला आशा लावून ठेवण्यात राम नाय बघ."


"औंदापण कारखान्याला गुदस्ताइतका ऊस गेलाय, त्याची बिलं आली आसतीलच की? आणि लाख रुपयांची बैलं घ्यायला पैसं हायती आन् घर घ्याला नायती,आसं कसं?" सदाचा सूर बदालला.


"हे बघ,उसाचं बिल आलं की पयलं सोसायटीला जातंया आन् बैलं नसली तर रानं पिकवायची कशी? तू फटफटी घेतलीस,चारचाकी घेतलीस तवा मी आडवा पडलो का तुझ्या? एक गाडी असताना दुसऱ्या गाडीची काय धार काढायची हुती का? म्या काय बैलावर बसून जत्रा फिरायला जात नाय.रानात बैलं हायती म्हणून चार दाणं पिकत्यात.

म्हणून पोटाला दोन घास मिळत्यात."


दोघांच्या बोलण्याचा रोख वादाकडं जाईल तसं घरातलं वातावरण तापलं .


"म्या मिळीवतोय,म्या गाड्या फिरीवतोय.तुझ्या ढुंगणाला चटकं बसायचं काम नाय.तुला जर जमणार नसल तर माझ्या वाटणीची रान सांग.मी ती इकून पैसं उभा करतू..." सदा एक घाव दोन तुकडं करण्याच्या बेतानंच आला हुता.


"रानं इकून कुणी घर बांधतंया का? गावाकडची शेतं इकून शहरात घर घ्यायला म्हातारपणी गावाकडं आल्यावर काय चिचुकं खाणार हाईस का?"


"माझ्या हिश्श्याचं रान इकून म्या चिचुकं खाईन नाय तर उपाशी मरीन,तुला काय करायचाय... आणि मला पेन्शन मिळतीया.

म्हातारपणात गावाकडं येऊन रान करणार कोण? सगळी रानं पिकवून तू आजपतूर चार पायली दाणं देतुस.त्यापलीकडं माझ्या हिश्श्याच्या रानात ऊस कवा पिकलाच नाय का? त्येचं बिल कुणी हाडप केलं? " सदा चौताळला.


"आरं, तुझ्या शाळंला आन् नोकरीला इतकं पैसं भरलं, ते काय झाडाला लागलं हुतं का? ऊस काय फटफटीवरनं फिरून पिकत नाय.त्येच्यासाठी गुडघाभर चिखलात राबाया लागतंया..."


"म्या काय चिखलात घुसणार नाय.मला तू माझ्या वाटणीवर कुठली रानं देणार ते सांग.माझं मी रान इकून घर बांधतो."


"रानं इकून घर बांधायचं माझ्या बुद्धीला काय पटत नाय;तरीबी तू आईकणार नसलास तर तुला जे पायजे ते ईकून टाक.उरल्याली रानं पिकवून आमी पोटाला चार घास खातो..." वसंता भावनेच्या भरात बोलून गेला.


"दारात गिऱ्हाईक आल्यावर आडवा पडू नगं म्हंजी झालं..." असं ठेक्यातच म्हणत सदा तडकाफडकी बाहेर पडला.

जाताना आईला येतोपण म्हणाला नाय.त्येच्या पाठमोऱ्या आकृतीकडं बघत आईनं कपाळावर हात मारून घेतला.


आठवडाभरात गावातल्या दारूच्या दुकानदाराबरोबर नदीकाठच्या सगळ्या रानांचा व्यवहार ठरला. भावासाठी सगळी माळाकडची पडीक जमीन सोडली. देणार तर नदीकाठचा आख्खा तळ दे नाय तर नको म्हणून दुकानदारानं गळ घातली हुती.घर विकत घेऊन उरलेल्या पैशात बायकोला चार दागिनं करावं म्हणून सदानं परस्पर व्यवहार ठरविला.एका शब्दानं आईला नायतर भावाला बोलला नाय.वसंतनं गावातल्या शहाण्या माणसाकडनं सांगावा धाडून सदाची समजूत काढायचा प्रयत्न केला;पण घराचं डोहाळं लागलेल्या सदानं कुणाचं काय आईकलं नाय.त्याची बायकोपण घरासाठी तगादा लावून हती.गावाकडची जमीन इकली तर म्हातारपणी गावाकडं जाऊन रान करावंच लागणार नाय.शहरात मस्त आरामात राहू.पेन्शन हाय.पोरं नोकरी करतील.आपण मजा करू.काटी टेकायच्या वयात नांगर धरायला झेपणार नाय.हे सदाच्या मनावर त्येच्या बायकोनं चांगलंच ठशीवलं हुतं.व्यवहारात आडकाठी नको म्हणून वसंत आणि आईनं गपगुमान कागदावर सही केली.


बघता बघता सदाचा बंगला बांधून झाला.वास्तुशांतीला फकस्त आईलाच घेऊन गेला.गावातलं मैतर,जमीन विकत घेणारा दुकानदार,सासुरवाडीचं पैपावणं,सगळ्या मंडळीस्नी आवातनं दिलं;पर पैसं न देणाऱ्या थोरल्या भावाला काय बोलीवलं नाय.मोती पिकणारी नदीकाठाची जमीन गेली.ती डोळ्याम्होरनं जात नव्हती, तवा वसंताला परगावात बांधलेल्या बंगल्याचं काय कौतुक ? माळाकडची रानं पिकीवताना वसंत झिटाललेला.

दुधाच्या पैशावर घर चालवून आईला औषध-पाणी करायचा.जी जमीन वाचवण्यासाठी आर्ध्यावर शाळा सोडून भावाला शिकीवलं त्यो भाऊ मास्तर झाल्यावर गाव सोडून जमीन इकून गेला.आपण पुढं शिकून नोकरी कराय पाहिजे हुती,आसं कवा कवा वसंताला वाटायचं.नोकरीच्या नादात गावाकडची सोन्यासारखी रानं इकायची की पिकल ते खाऊन आई-बापाला सांभाळाणं,यात पुण्याई मानायची? याचं कोडं वसंताला काय केल्या सुटत नव्हतं.


एक दिवस दुपारच्या पारी पोलीसपाटील वसंतच्या घराकडं आलं आणि म्हणालं,"तुझ्या सदा मास्तरच्या गाडीला ट्रकनं ठोकलंय.नवरा-बायको आणि पोरगा सगळी दवाखान्यात हायती.तुला पोलिसांनी बोलिवलया..." हे आयकून वसंतच्या पायाखालची जमीनच सराकली.आईनं तर बडवूनच घ्यायला सुरुवात केली.वसंतच्या घरातला कालवा ऐकून शेजारपाजारी गोळा झालं.जास्त लागल्यालं नाय.खरं तर औषधपाण्याचा खर्च करायला घरचं कोणीतरी पायजे म्हणून सांगितल्यावर हुंदका आवरला.


"हितं तर दातावर मारायला बंदा रुपया नाय. दवाखान्याचा खर्च कोण करणार?" अशा चिंतेत असलेल्या वसंताच्या हातावर आईनं गळ्यातली माळ काढून ठेवली.बायकोनं कानातली फुलं काढून दिली. शेजारच्या दोघा-तिघांनी कोणी शंभर,कोणी पाचशे रुपये वसंतच्या हातात ठेवलं.पलीकडच्या गल्लीतला गण्या सदाचा वर्गमित्र.त्यो मोटारसायकल घिऊन आला. लगबगीनं वसंताला घिऊन दोघं दवाखान्यात आली. आल्याबरोबर नर्सनं औषधाची लांबलचक चिठ्ठी वसंताच्या हातावर ठेवली.उलट दिशेनं येणाऱ्या मोटारसायकलला वाचवण्याच्या नादात सदाची गाडी ट्रकला धडकली हुती.बायकोला आन् सदाला जबर मार लागला हुता.

पोरगं मागच्या सीटवर हुतं,त्यामुळं त्येला जरा कमी जखम झाली हुती.धोका नव्हता,पण सदा आजून भानावर आला नव्हता.डोळं उघडत नाय तवर डेंजर हाय असं नर्स सांगत हुती.


चार दिसांनी सदा शुद्धीवर आला.त्याचं दोन्ही पाय मोडलं हुतं.
डोक्याला मोठा मार लागला हुता. बायकोचापण पाय मोडला हुता.तिची आई तिच्या सेवेला आली हुती.सदाच्या शाळेतलं सगळं मास्तर, गावातली मंडळी,पैपावणं,जे जे वास्तुशांतीला आलं हुतं ती समदी मंडळी सदाला भेटायला येऊन हातावर बिस्किटाचा पुडा ठेवून गेली.आता उरला त्यो फकस्त भाऊच.सदाला जनरल वॉर्डात नेल्यावर हालचाल वाढली.पर संडास धुण्यापासून खायला घालण्यापर्यंत समदं काम वसंताला करावं लागत हुतं.सदाच्या तोंडातनं शब्द फुटत नव्हता.आपल्या हिश्श्याची गावाकडची जमीन तर इकली हुती; पण आपली नाती कुणाला इकवणार..?"

१४/४/२५

पूर्णत्व आणि अर्धवटपणा Wholeness and partiality…

तिसरी लाट…१२.०४.२५ या लेखातील तिसरा भाग…


तरी वाढ,क्षय,अचानक होणारी कोलमड,यापासून ते गुंतागुंतीच्या नव्या पातळ्या,अचानक फुसके ठरणारे मोठे बदल,किंवा आधी क्षुद्र भासणाऱ्या परंतु एकदम मोठ्या,स्फोटक शक्तीत रूपांतर पावणाऱ्या घटना अशा गोष्टींचे समाधानकारक स्पष्टीकरण करण्याची त्यांची कुवत नाही.


आज वैश्विक क्रीडांगणाच्या एका कोपऱ्यात न्यूटनचे कोष्टक सोडवले जात आहे.यांत्रिक कार्यकारणभाव ह्या गोष्टीकडे काही घटनांचे स्पष्टीकरण म्हणून पहाण्यात येते.परंतु एकूण एक घटनांना ती लागू पडू शकत नाही. निसर्ग,उत्क्रांती,प्रगती,

काळ,स्थळ आणि भौतिक यांच्याबद्दलच्या आपल्या बदलत्या दृष्टिकोणांमुळे कार्यकारणभाव व अचानकता यांच्याबद्दल नवा दृष्टीकोण जुळवण्याची धडपड जगभरचे शास्त्रज्ञ व विचारवंत करत आहेत.


अनेक शास्त्रज्ञ यांत्रिकपणे न घडणाऱ्या जगणे,मरणे, वाढणे,

उक्रांन्त,क्रांत होणे अशा गोष्टींच्या कार्यकारणभावाच्या स्पष्टीकरणार्थ नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा पुरवठा करीत आहेत.बेल्जिअन,नोबेल पुरस्कार प्राप्त,इलया प्रिगोजाइन यांनी क्रम व गोंधळ, यदृच्छा व आवश्यकता अशा गोष्टींचे धक्कादायक संश्लेषण पुढे करून त्यांचा कार्यकारणभावाशी असणारा संबंध सांगितला आहे.


काही प्रमाणात,तिसऱ्या लाटेच्या संस्कृतीतील कार्यकारणभाव सिस्टिम थिअरीच्या कल्पनेवर आधारलेला आहे.फीडबॅकची कल्पना याचे उत्तम उदाहरण म्हणजे घरात बसवलेला थर्मोंस्टँट याच्याद्वारे घरातील,खोलीतील तापमानाची पातळी एक सारखी राखली जाते.थर्मोस्टँटने भट्टो सुरू केली की तपमान वाढू लागते.

खोली पुरेशी उबदार झाली की ते भट्टी बंद करते.आणि ज्यावेळी तापमान खाली येते त्यावेळी हा बदल त्याला समजतो आणि ते भट्टी पुनःसुरू करते ! इथे फीडबॅक पद्धत वापरलेली आहे.

तिच्यामुळे समतोल राखला जातो.बदलावर मात केली जाते.

कारण इच्छित ठराविक पातळीला तेव्हा धोका निर्माण झालेला असतो.नकारात्मक फीडबॅक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पद्धतीचे काम स्थैर्य राखण्यापुरते मर्यादित असते. इ.स.१९४० या दशकाच्या अखेरीस व इ. स. १९५० च्या सुरूवातोच्या भागात या तत्त्वाची निश्चित कल्पना केली गेली आणि त्याची कसून तपासणो केली गेली.हे काम करणाऱ्या माहिती सैद्धान्तिकांनी व रचनात्रिचारवंतांनी- सिस्टिम थिकर्स या तत्त्वाच्या उदाहरणांचा व सम्यस्थळांचा शोध घेतला, तेव्हा त्यांना प्रत्येक क्षेत्रात भौतिक,शारीर,राजकीय इ.स्थैर्यकारी प्रणाली आढळून आल्या.ही निगेटिव्ह फोडबॅक पद्धत आपल्या भोवती सर्वत्रच चालू आहे.


इ. स. १९६० नंतर प्रो.मारुयाना यांनी असा विचार मांडला,की स्थैर्याचाच जास्त विचार करणे किंवा त्याच्यावर लक्ष केंद्रित करणे ही गोष्ट बदलासाठी पुरेशी नाही.त्यांनी म्हटले,की पॉसिटिव्ह फीडबॅकवर संशोधन होण्याची आता गरज आहे.या विधायक पद्धतीने होत असलेला बदल दबण्याऐवजी वाढवला जाईल.स्थैर्य टिकवून धरण्याऐवजी त्याला आव्हान दिले जाईल,ते चिरडून टाकले जाईल.या विधायकत्वामुळे किंचित मार्गच्युती होऊन ती एकूण रचनेत खूप मोठा आकार धारण करू शकेल.फीडबॅकच्या पहिल्या पद्धतीत बदल कमी केला जात होता,तर दुसऱ्या पद्धतोत तो मोठा केला जातो.त्यामुळे या दोन्हो पद्धतींचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.पूर्वी ज्या कोड्यात टाकणाऱ्या प्रक्रिया होत्या व ज्यांच्यातील कार्यकारणभाव आकलत नव्हते,

त्यांच्यावर विधायक फोडबॅकने प्रकाश पडू शकतो.दुष्ट आणि सुष्ट चक्रांवर त्यांच्याद्वारे प्रकाश पडू शकतो.विधायक फीडबॅक पद्धतीने स्वतः खळबळयुक्त असलेल्या कोणत्याही प्रक्रियेचे स्पष्टीकरण होते.


उदा.शस्त्रस्पर्धा- दरवेळी रशियाने नवे एखादे शस्त्र तयार केले,की अमेरिका त्याच्याहून मोठे तयार करते.त्यानतर पुनः रशियाला त्याच्याहून मोठे शस्त्र तयार करण्याची स्फूति येते. ... जागतिक वेडेपणाचा जणू कळस गाठला जातो !


आपण जेव्हा या दोन्ही प्रकारच्या फीडबॅक पद्धतींचा एकत्रित अभ्यास करतो,तेव्हा या दोन्ही पद्धती मानवी मेंदूपासून अर्थकारणापर्यंतच्या गुंतागुंतीच्या रचनांमध्ये किती प्रभावीपणे कार्यान्वित असतात,हे समजून येते आणि त्यातून आश्चर्यकारक जाणीवा प्रकट होतात. खरोखर गुंतागुंतीच्या असलेल्या रचना किंवा संस्थांमध्ये बदल दडपणांची व बदलांना उत्तेजन देणाऱ्या अशा प्रणाली कळत नकळत कार्य करत असतात:एकमेकींवर परिणाम करत असतात हे आपल्याला समजून चुकल्यानंतर आपण ज्या जगात रहातो आहोत, त्याच्यातल्या गुंतागुंतीच्या एका वेगळ्याच पातळीचे आपल्याला दर्शन होते.कार्यकारण भावाबद्दलची आपली समज प्रगत झालेली आहे.


आपल्या आकलनात आणखीही भर टाकणारी गोष्ट म्हणजे बदल थांबवणारे किंवा कमी करणारे,तसेच ते वेगाने वाढते ठेवणारे घटक मुळात असतातच असे नाही.जीवशास्त्रीय किंवा सामाजिक संस्थात नंतरही ते प्रकट होऊन वाढीला लागू शकतात,हया गोष्टीची जाणीव होते.त्यामुळे अचानक घडणाऱ्या बदलांच्या विलक्षण घटनांची संगती लावणे आपल्याला शक्य होते. काही बदलांचा मागोवा घेणे कठीण का असते.हेही समजते.सरळ धीम्या गतीने चालणाऱ्या प्रक्रियेत अचानक होणारा आश्चर्यजनक बदल किंवा विलक्षण वेगाने अचानक धारण केली गेलेली शांतता का घडू शकते याबद्दल उलगडा होण्यास मदत होते.सुरुवातीला सारख्याच असणाऱ्या अवस्थांमधून घडणारे परिणाम एकदम वेगवेगळे असण्याबाबतचे स्पष्टीकरण होते.


तिसऱ्या लाटेतील कार्याकारणभावाला हळूहळू आकार येत चालला आहे.आणि त्याद्वारे या जगात गुंतागुंतीच्या असलेल्या एकमेकांवर परिणाम करणाऱ्या शक्तींचे जगात घडणाऱ्या आश्चर्यांचे,विश्वाच्या टेबलावरती चाललेल्या घटनांच्या बिलियर्ड बॉल्सच्या नर्तनाचे आणि इतर कितीतरी गोष्टींचे सष्टीकृत दर्शन घडते दुसऱ्या लाटेच्या कल्पनेतल्या साध्या यांत्रिक जगापेक्षा हे जग कितीतरी विलक्षण आहे.


तिसऱ्या लाटेतील कार्यकारणभाव जुन्या अचानकपणा अवश्यभाव अशा प्रकारच्या विरोधाभासाबद्दल काही नवीन खळबळजनक गोष्टी सांगून जातो.आणि याद्वारेच तात्विक संक्रमण घडू शकते.


नवा धडा…


फ्री युनिव्हर्सिटी ऑफ ब्रुसेल्स आणि युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास,ऑस्टिन येथे काम करणाऱ्या डॉ.इलया प्रिगोजाइन व त्यांच्या सहकाऱ्यांनी दुसऱ्या लाटेच्या काही गृहीतकांवर जेव्हा रासायनिक किंवा इतर रचना वैविध्याकडे व गुंतागुंतीकडे अधिक झे घेतात तेव्हा ते योगायोग व आवश्यकता यांच्या मिश्र परिणामामुळे होते असे दाखवून देऊन हल्ला केला.


अंतर्गत चलबिचल किंवा बाह्यशक्तींचा,किंवा दोन्हीचाही परिणाम होऊन जुना तोल ढळतो,आणि त्याचा परिणाम म्हणून नेहमीच गोंधळ माजतो किंवा कोलमड निर्माण होते असे नाही,तर पुष्कळदा एका अतिशय उच्च पातळीला पोचणारी संपूर्णतया नवी रचना उभारली जाते.ही नवी रचना जुन्या रचनेहून अधिक भिन्न असते, तिच्यातही अंतर्गत क्रिया-प्रतिक्रिया चालू असतात आणि तो गुंतागुंतीही असते.त्यामुळे तिला स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी अधिक ऊर्जा व माहिती व इतर साधनमय आधाराची आवश्यकता निर्माण होत असते.


प्रिगोजाइन म्हणतात की खुद्द उत्क्रांती हो गोष्ट अधिकाधिक गुंतागुंतीची व वैविध्यपूर्ण होत जाणारी जीवशास्त्रीय किंवा सामाजिक प्रक्रिया म्हणून ओळखली जावी.या प्रक्रियेचे फलित म्हणून नवोनच उच्च प्रतीची रचना घडते.म्हणजेच प्रिगोजाइनच्या कल्पनेप्रमाणे - राजकीय,तात्त्विक व शास्त्रीय दृष्टीकोणातून आपण चंचलतेतून शिस्त निर्माण करत असतो.म्हणजेच गोंधळातून सुव्यवस्था निर्माण करत असतो.


परंतु एक गोष्ट खरी,की आपण उत्क्रांतीला साचेबंद चौकटीत जखडून टाकू शकत नाही.प्रिगोजाइनच्या अभ्यासात यदृच्छा व आवश्यकता यांची केवळ युतीच सुचवली गेली नसून त्यांचे एकमेकांशी असणारे संबंध अत्यावश्यक बाब म्हणून दर्शवण्यात आले आहेत.


प्रिगोजाइननी असा निष्कर्ष काढला आहे,की कार्यकारणभावाचे कडक नियम आजच्या संदर्भात आपल्या विशिष्ट अवस्थांमध्ये बद्ध करणारे असेच आहेत.केवळ विशिष्ट परिस्थितीमधील विशिष्ट बाबींनाच ते लागू पडतात.बदलाच्या वर्णनांची ते जणे चेष्टाच करतात... गुंतागुंतीचे शास्त्र एका नव्याच दृष्टीकोणाप्रत आपल्याला घेऊन जाते.... शिवाय नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अस्थैर्याची शक्यता असते.आणि तिच्यातूनच नवीन यांत्रिकतेचा जन्म होतो.


खरे म्हणजे सारे विश्व आपल्यापुढे खुले ठाकलेले आहे. (आपल्या जिज्ञासेला भरपूर आव्हान आहे.)


जे उद्यमवास्तव एकेकाळी अतिशय प्रभात्री,परिपूर्ण, सर्वसमावेशक आणि विश्व व त्याचे घटक कशा प्रकारे एकत्र 'जुळवले गेलेले आहेत' याचे स्पष्टीकरण करणारे असे वाटत होते,ते खरोखरच अतिशय उपयुक्त ठरले. परंतु वैश्विकतेबाबतचे त्याचे ठाम विचार आता हादरून जात आहेत.उद्या आपण मागे वळून पाहू लागलो तर दुसऱ्या लाटेचा उच्च आदर्शवाद हा केवळ दुसऱ्या लाटेच्याच संपूर्ण पात्रतेचा होता असे आढळून येईल.


दुसरी लाट मरत चालल्यामूळे आज लाखो लोकांची अवस्था गोंधळल्यासारखी झालेली आहे.हातातून निसटून चाललेले काही ना काही पकडून ठेवण्याची त्यांची केविलवाणो धडपड चालू आहे.नव्या जगासाठी नवीनच सुयोग्य अशी संस्कृती उभारण्याऐवजी,या बदलत्या परिस्थितीत जुन्याच कल्पना आणून रोवण्याचो,मूलतः अगदी वेगळ्या परिस्थितीत आयुष्य जगलेल्या पूर्वजांच्या,जुन्या खुळचट कल्पनांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी त्यांचा आटापिटा चालू असतो !


दुसऱ्या लाटेचा उच्च आदर्शवाद कोसळत चालला आहे. ह्या आदर्शवादाचे प्रतिबिंब औद्योगिकीकरणाने ज्या रीतीने जगाची रचना मानली व मांडली त्या रीतीत पडलेले आढळते.निसर्गाची उभारणी सुट्या,वैशिष्ट्यपूर्ण कणांतून झाली असल्याबाबतचो प्रतिमा,कल्पना सुट्या स्वयंपूर्ण देशांतून प्रकट होणाऱ्या याबाबतच्या कल्पनांतून झालेली आढळून येत असे.आता निसर्ग व भौतिक याबाबतची आपली प्रतिमा बदलून गेली आहे. देशाबाबतच्या कल्पनेतही बदल होत चालला आहे. घडत असलेला हा बदल हे तिसऱ्या लाटेच्या संस्कृतीकडे टाकलेले आणखी एक अर्थपूर्ण पाऊल ठरत असल्यास नवल नाही !


१२/४/२५

भवितव्य काळाचे… / Future tense…

तिसरी लाट…१०.०४.२५ या लेखातील दुसरा भाग….


पूर्वी ' आणि ' नंतर' या गोष्टीला प्रत्येकाच्या दृष्टीतून वेगळा अर्थ आहे.


आजचे पदार्थविज्ञान बाहेरून विकसित होणारे तसेच आतूनही विकसित होणारे आहे,समावेशकही आहे. सिद्धान्ताला प्रतिसिद्धान्त हजर असतो.एक उदाहरण देण्यासारखे आहे : कृष्ण विवराबाबत आता पुष्कळांना माहिती झालेलो आहे.ते आपल्या आतील केंद्राकडे, आपल्या आवाक्यात येणाऱ्या प्रकाशासह - प्रत्येक वस्तु खेचून घेत असते... 


रॉजर पेनरोज नावाच्या पदार्थविज्ञानाच्या प्रसिद्ध अभ्यासकाने आता श्वेत विवराची कल्पना मांडलेली आहे... कृष्ण विवरातील एक क्षण म्हणजे पृथ्वीवरची लाखो वर्षे असू शकेल! ज्यावेळी विश्वाच्या अनंतत्वाकडून आपण सूक्ष्माकडे जातो,तेव्हाही कोड्यात टाकणाऱ्या घटना घडत असल्याचे आपल्याला आढळून येते.कोलंबिया विद्यापीठातील डॉ.जेराल्ड फेनबर्ग यांनी टॅच्यॉन्स (Tachyons) नावाचे कण भारित केलेले आहेत ह्या कणांची गती प्रकाशापेक्षाही अधिक आहे.काही शास्त्रज्ञांच्या मते त्यांच्यासाठी काळाची गती उलट होते !


एक पदार्थशास्त्रज्ञ एफ्.काप्रा म्हणतो,की 'विश्वाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गतीने कालक्रमणा होत असते.' आपण काळाबद्दल एकवचन वापरणे योग्य होणार नाही.काळ अनेकविध असल्याने त्यांचा निर्देशही अनेकवचनी व्हावयास हवा.


काळाच्या सामाजिक वापरातही आता मूलभूत स्वरूपाची पुनर्रचना होते आहे हे आपण पाहिले आहेच.उदा.फ्लेक्स् टाइम कल्पनेचे आगमन इ.


काळाबद्दल सैद्धान्तिक शोध लागत आहेत. त्यांचा व्यवहारात काय उपयोग ? अणु विस्फोटाबाबतचा सिद्धान्त देखील एकेकाळी अव्यवहार्य वाटत होता !


काळाबाबतच्या कल्पनेतील या बदलांमुळे आपल्या स्थळविषयक कल्पनांना भगदाडे पडू लागली आहेत. कारण या दोन्ही गोष्टींचा एकमेकींशी अनेकविध संबंध आहे.परंतु काळापेक्षाही स्थळाबाबतच्या कल्पनांतील बदल लवकर घडत जाणारा असा आहे.


आपण रहातो त्या,काम करतो त्या,खेळतो त्या जागा आपण बदलतो आहोत.आपण कामाच्या जागी कसे, किती दूर,किती वेळा जातो या गोष्टीचा आपल्या स्थळ विषयक अनुभवांवर परिणाम होतो.हे सर्व बदलले जात आहेत.तिसऱ्या लाटेने स्थळ कल्पनेशी असलेल्या मानवाच्या संबंधात बदल घडवून नवीन टप्पाच सुरु केला आहे.तिसऱ्या लाटेने दुसऱ्या लाटेच्या युगात एकत्र गठ्ठा बनलेली लोकसंख्या विखरून टाकीत आपला अनुभव बदललेला आहे.जगाच्या ज्या भागात अजून औद्योगिकरण चालू आहे,तिथे लाखो लोक आजही एकवटत आहेत.परंतु तंत्रज्ञानात अतिशय पुढच्या टप्प्याची प्रगती करणाऱ्या देशात परिस्थिती याच्या उलट आहे.टोकिओ,लंडन,झुरिच,ग्लासगो आणि अशाच काही प्रचंड शहरांतील लोकसंख्या हळूहळू कमी होते आहे. आणि या उलट मध्यम आकारांच्या शहरांची सख्या वाढत चालली आहे.


अमेरिकन कौन्सिल ऑफ् लाइफ इन्शुअरन्सच्या मते ' अमेरिकेतील मोठे शहर ही आता भूतकालीन गोष्ट झाली आहे.'


हे विखुरणे आणि लोकसंख्येचे विकेंद्रीकरण यांच्या योगाने आपल्या जगाविषयीच्या गृहित कल्पना आणि अपेक्षा बदलत जाणार आहेत.वैयक्तिक वापराच्या व मालकीच्या या कल्पना,

स्वीकृत अंतरे,घरांची दाटी, आणि इतर बाबतीत,बदलून जाणार आहेत.अशा बदलाप्रमाणेच तिसऱ्या लाटेने असा विवक्षित दृष्टिकोण निर्माण केला आहे,की ज्याद्वारे माणूस आपल्या स्वतःचा,

आपल्या जमातीचा,आपल्या शेजारपाजाऱ्यांचा म्हणजेच स्थानिक विचार करत राहील.आणि तोच माणूस त्याचवेळी वैश्विक विचार करील.पृथ्वीवर आपल्यापासून हजारो मैलांवर घडत असणाऱ्या घटनांबाबत व निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत त्याला विचार पडेल,काळजीही वाटेल.दळणवळण अतिशय मोठ्या प्रमाणात,

प्रगत अवस्थेत उपलब्ध आहे.आपण आता परत आपल्या घरीच,इलेक्ट्रॉनिक कॉटेजमध्ये, काम करण्यास सुरुवात करत आहोत.अशावेळी आपण अशा दुहेरी विचारकेंद्राना प्रोत्साहन द्यायला हवे. घराच्या व कुटुंबाच्या निकट राहतील आणि त्याच वेळी त्यांची मने दूरदूरच्या ग्रहांवर व त्यांच्याहून दूर अनंत विश्वात भ्रमण करून येऊ शकतील.तिसऱ्या लाटेत अशाप्रकारे जवळपणा आणि दूरपणा एकवटलेला असेल.आपल्या स्थलविषयक कल्पना अधिक स्पष्ट करणाऱ्या अधिक प्रभावी आणि सापेक्ष अशा प्रतिमा देऊ शकणारे प्रगत विज्ञान आज आपल्या सोबत आहे.


माझ्या ऑफिमध्ये न्यूयॉर्क आणि त्याचा परिसर चित्रित करणारी खूप मोठी छायाचित्रे लावलेली आहेत.उपग्रह आणि यु-२ यांनी घेतलेली ही छायाचित्रे इतको सुस्पष्ट आहेत,की त्यात मेट्रोपोलिटन म्युझिअम आणि ला गार्डीया विमानतळावर उभे केलेले एकूण एक विमाने देखील अगदी स्पष्ट दिसतात.या विमानांच्या स्पष्ट दिसण्याचा उल्लेख करून मी नासाच्या एका अधिकाऱ्याला विचारले,'फोटो आणखी मोठे केले तर या विमानांच्या पंखांवर रंगविलेले पट्टे आणि चिन्हे दिसतोल का ?'तो अधिकारी या प्रश्नाशी देखील खूप सहनशीलतेने वागून,किंचित हसून माझ्या बोलण्यात दुरुस्ती करत म्हणाला, " रिबीट देखील."


आपण काही केवळ स्थिरचित्रणाबाबतच्या प्रभुत्वावरच थांबणार नाही,तर यापुढे कदाचित् चलत् नकाशेही तयार होण्याला वेळ लागणार नाही.दशकाभरातच आपल्याला सजीव नकाशे एखाद्या शहराचे किंवा देशाचे पहायला मिळतील,ज्याद्वारे तेथे होत असलेल्या घडामोडी आपल्याला सजीवपणे पहायला मिळतील ! एखाद्या दशकाचाच अवकाश ! असे घडल्यावर नकाशे हे स्थिरचित्र असणार नाही,तर चलच्चित्र असेल. त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग,

आपल्याला तेथे चाललेल्या घडामोडींसह,स्थरशः ही दिसेल.

एखाद्या पातळीच्या खालील उंचीवर किंवा वरील उंचीवर काय चालले आहे हेही समजू शकेल इतकी प्रगती तंत्र करेल.


दुसऱ्या लाटेच्या युगात सर्वत्र प्रचलित असलेल्या परंपरागत मर्केटर नकाशा-विरुद्ध नकाशा निर्मात्यांनी आवाज उठवलेला आहे.मर्केटरच्या पद्धतीतील अनेक त्रुटी त्यांनी दाखवल्या आहेत आणि आपल्या प्रतिपाद्य पद्धतीत त्या त्रुटी रहाणार नाहीत याची देखील काळजी घेतलेली आहे.पूर्वीच्या नकाशात स्कँडिनेव्हिया हिंदुस्थानापेक्षाही मोठा दिसतो.वास्तविक हिंदुस्थानच स्कँडिनेव्हियापेक्षा तिप्पट मोठा आहे ! आता अशा चुका होणार नाहीत याची कसून काळजी घेतली जाते आहे.


आर्को पीटर्स याचा नकाशा दिसायला विचित्र असतो, कारण तो नेहमीच्या पठडीतला नाही.त्यातील यरोप आकसलेला वाटतो,तर अलास्का पसरलेला व चपटा वाटतो,कॅनडा व रशिया यांचीही तीच गत.द.अमेरिका, आफ्रिका,अरेबिया व भारत लांबलचक दिसतात ! तरी त्याच्यातील काही अचूकपणामुळे त्याच्या साठ हजाराहून अधिक प्रतींचे ' अविकसित' अनौद्योगिक देशांत वितरणही झाले आहे.ह्या विरोधाभासातून हेच स्पष्ट होते,की कुठलाही एक नकाशा 'बरोबर नाही.स्थलविषयक भिन्न प्रतिमा भिन्न उपयोगितेच्या आहेत.

शब्दशःच,असे म्हणणे खरे ठरेल,की तिसऱ्या लाटेने जगाकडे पहाण्याचा एक नवाच दृष्टिकोण दिलेला आहे.


पूर्णत्व आणि अर्धवटपणा…


दुसऱ्या लाटेने कोणत्याही बाबीचा स्वतंत्रपणे विचार करण्यावर भर दिला होता,तर तिसऱ्या लाटेच्या संस्कृतीत संदर्भ,संबंध आणि पूर्णत्वाच्या विचारावर भर दिला जातो.


इ. स. १९५० नंतर अभ्यासाला व संशोधनाला वेगळीच चालना मिळाली.दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 'संशोधन मोहिमा' हातात घेतल्या गेल्या.परंतु त्याच्यापुढे नंतर फार प्रगती झाली.

स्वयंचलिताच्या क्रांतीला सुरूवात झाली आणि तिसऱ्या लाटेतील कारखाने व कचेऱ्या यांच्यातील कामासाठी एका नवीनच मूलभूतप्रणालीचा, तंत्राचा नव्याच प्रकाराचा जन्म झाला.

विचाराची नवी पद्धत सुरू झाली.या पद्धतीला 'सिस्टीम्स् ॲप्रोच' म्हणण्यात येते.या पद्धतीचा भर समस्येकडे पहाताना तिच्यातील छोट्या छोट्या विभागाला महत्त्व देण्याऐवजी संपूर्ण,सर्वांगीण अवलोकनाला महत्त्व देण्यावर असतो. घटकांचे एकमेकांतील संबंध,त्यांच्यातून निर्माण झालेल्या संपूर्णाशी असलेले त्यांचे संबंध,फीडबॅक संबंध,यांचा अभ्यास या पद्धतीत केला जातो.तिची भाषा आणि तिच्यातील विचार समाजशास्त्री व मानसशास्त्री,

तत्त्वज्ञ आणि परराष्ट्र व्यवहार विश्लेषक, तार्किक व भाषातज्ज्ञ,

स्थापत्य विशारद आणि प्रशासक यांच्याद्वारे वापरण्यात व योजण्यात येतात.


सिस्टिम थिअरीवादी आणि इतरही प्रणालींच्या पुरस्कर्त्यांनी समस्यांकड पहाण्याच्या अधिक एकात्मिक पद्धतीबाबतची आच प्रकट केली आहे.अव्यापक दृष्टीकोण दाखवणाऱ्या अतिविशिष्टीकरणाविरूद्धच्या उठावाला परिसरवाद्यांकडून मोठा पाठिंबा मिळाला. त्यांची भूमिका एकाच छोट्या बाबीची सोडवणूक करण्याची नसते,तर संपूर्णातील तोल राखण्याची असते.मानव आणि निसर्ग यांच्यातील विचार करणाऱ्यांचा आणि सिस्टीमवाद्यांचा प्रश्नाकडे पहाण्याचा दृष्टीकोण सारखाच आहे.ज्ञानाचे संमीलन आणि एकात्मता.


बौद्धिक जीवनातील हे बदल संस्कृतीच्या इतर अंगातही प्रतिबिबीत झालेले आहेत.पूर्वी,पूर्वेकडील धर्मांबद्दल फार थोड्या प्रमाणात आस्था दाखवली जात होतो. आता,दुसऱ्या लाटेचा भर ओसरू लागल्यावर पाश्चिमात्य तरुण लोक हिंदू स्वामींचे भक्त बनलेले आढळतात.एका सोळा वर्षाच्या गुरूचे प्रवचन ऐकायला,रागदारी ऐकायला,हिंदू पद्धतीच्या शाकाहारी रेस्टॉरंटचे उद्घाटन करायला आणि फिफ्थ ॲव्हेन्यूवरून नाचत,गात जायला त्यांची एकच गर्दी उसळलेली दिसते.ते गातात.त्यांच्याबरोबर जगही गाते.पूर्णत्वाचे पोवाडे.एकत्वाचे गान.मानसारोग्याच्या प्रांतात मानसोपचारतज्ज्ञांनी 'संपूर्ण मानवा'ला बरे करण्याचे मार्ग शोधून काढले.गेस्टाल्ट उपचार पद्धतीचा अवलंब त्यासाठी केला.लवकरच या पद्धतीचा अवलंब सर्वत्र करण्यात येऊ लागला.या पद्धतीनुसार व्यक्तीच्या जाणीवेतील जागरूकता,

आकलन व बाह्य जगताशी असलेल्या संबंधाबाबतच्या मानवी कार्यशक्तीची वृद्धी, एकात्मितेच्या प्रक्रियेचा अवलंब करून केली जाते.


औषधांच्या प्रांतात 'होलिस्टिक हेल्थ' नावाची चळवळ सुरू झालेली आहे.ती या कल्पनेवर आधारलेली आहे, की माणसाचे स्वास्थ्य शारीर,आत्मिक आणि मानसिक मेळावर अवलंबून असते.'सायन्स'ने म्हटले आहे,की " काही वर्षांपूर्वी एखाद्या लोकशाही सरकारने श्रद्धा उपचार,इरिडॉलॉजी, ॲक्युप्रेशर,बुद्धमार्गीय ध्यान आणि इलेक्ट्रो मेडिसिन अशा विषयांनी युक्त अशा आरोग्य परिषदांना आश्रय देणे ही गोष्ट अकल्पनीयच होती.परंतु अशा पर्यायी उपचारपद्धतीबद्दल अतिशय मोठ्या प्रमाणात उत्सुकता आणि आस्था निर्माण झाली आहे.आणि या सगळयांचे नामकरण होलिस्टिक हेल्थ असे करण्यात आले आहे.


या प्रकारची प्रत्येक चळवळ,चूस आणि सांस्कृतिक धारा वेगवेगळी,स्वतंत्र अशी आहे.परंतु तिच्या मागचे तत्त्व एकच असल्याचे स्पष्ट दिसून येते.सुट्या भागांचा अभ्यास केल्याने मळ संपूर्ण समजते,या गृहीतकावरचा हल्ला त्यातून प्रतीत होतो.


भागाशःकिंवा विश्लेषणात्मक विचारावरचा हल्ला इतका तीव्र झालेला आहे.की अखंड वस्तूच्या विचारांच्या फार मागे लागल्यामुळे तिच्यात काही भाग असतात याचाही विसर पडत चालला आहे.त्यामुळे अखंडत्वाचा,संपूर्णत्वाचा विचारहीं खंडशः होऊन त्याला अर्धवटपणाची झाक प्राप्त झालेली आहे !


परंतु अधिक विचारवंत असलेले लोक दुसऱ्या विश्लेषणात्मक कौशल्याचा,संश्लेषणात्मक अभ्यासाला महत्त्व देत त्याच्याशी,तोल साधू पहात आहेत.


दुसऱ्या लाटेच्या संस्कृतीच्या बौद्धिक परिसरावरचा हा हल्ला कार्यकरणभावाबाबतच्या एका नव्या दृष्टिकोणाला जन्म देत आहे.


दुसऱ्या लाटेच्या संस्कृतीने आपल्याला घटना का घडतात हे आपल्याला समजू शकते असा एक सुखद विश्वास दिला होता.तिने आपल्याला असे सांगितले होते,की प्रत्येक घटनेला विशिष्ट,सुनिश्चित असे स्थलकालनिबद्ध ठिकाण ठरलेले असते.तिने आपल्याला असे सांगितले की ठराविक गोष्टींचे नेहमी ठराविकच परिणाम होतात.तिने आपल्याला असे सांगितले,की विश्वात सर्वत्र कार्यकारणभाव,कारण व परिणाम यांच्या विशिष्ट संयोगाची दाटी झालेली आहे.


कार्यकारणभावाबद्दलचा हा का काहीसा यांत्रिक दृष्टिकोण अत्यंत उपयुक्त ठरला व अजूनही ठरत आहे. त्याची आपल्याला रोग निवारणात,गगनचुंबी इमारती उभारण्यात,

विलक्षण कल्पक यंत्रांचे आराखडे करताना, मोठ्या रचनांची जुळणी करताना मदत होते.परंतु साधे यांत्रिक स्पष्टीकरण करण्यास तो जरी समर्थ असला,


शिल्लक भाग १४.०४.२५ या लेखामध्ये…




१०/४/२५

मनाचा भोवरा \ Whirlwind of the mind

आपल्या सर्वांचे शतशःआभार व धन्यवाद...


तिसरी लाट अलविन टॉफलेर यांच्या Third Wave या पुस्तकाचा अनुवाद शरदिनी मोहिते यांनी केला आहे तर,प्रकाशक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुणे नोव्हेंबर १९९१ हे आहेत.याच पुस्तकातील लेख तीन भागामध्ये देत आहे. - विजय गायकवाड



यापूर्वी कधीही इतक्या देशांमधले इतके लोक बौद्धिक दृष्ट्या हताश,जणू बुडत चाललेल्या स्थितीत,नव्हते. कारण ते आता कल्पनांच्या झगड्यांच्या,गोंधळांच्या आणि विसंवादी कल्पनांच्या प्रचंड भोवऱ्यात सापडलेले आहेत.आपल्या मानस विश्वावर परस्परविरोधी दृष्टिकोणांचा अक्षरशः मारा होतो आहे.दररोज काहीतरी नवीच टूम निघते आहे,नवीन शोध लागत आहे.धार्मिक चळवळ सुरू होते आहे,नवीन घडामोड होते आहे,किंवा कशाची तरी नवीन अभि-व्यक्ती होते आहे.जाणिवांच्या पटलावर गूढवादी किंवा शास्त्रीय प्रवाह,उपप्रवाह वेगाने वहात आहेत,त्या प्रत्येकाला त्याच्या शास्त्रीय किंवा मानसिक गुरूचा, त्याच्या पुण्याईचा पाठिंबा लाभलेला आहे.कशाचा ना कशाचा,किंवा कशाचाही म्हणा,सतत शोध घेतला जातो आहे, इतकी एकूण अस्वस्थता निर्माण झालेली आहे.


या एकूण गोंधळापैकी बराचसा गोंधळ वेगाने येत असलेल्या तिसऱ्या लाटेने तीव्र करत आणलेल्या सांस्कृतिक झगड्यातून निर्माण झालेला आहे. औद्योगिक युगातल्या प्रमुख कल्पनांची अवनती होते आहे,वजावट होते आहे,अपकीर्ती होते आहे.एका तात्विक क्रांतीद्वारा त्यांची तीनशे वर्षापूर्वीची कारकीर्द उलथून टाकण्याच्या दिशेने सुरूवातीची पावले पडू लागलेली आहेत.


शास्त्र,शिक्षण,धर्म व इतर हजारो क्षेत्रात विचारवंत सुधारकांनी शेतीप्रधान संस्कृतीच्या कैवाऱ्यांशी, प्रतिगाम्यांशी लढा देत औद्योगिक संस्कृती पुढे आणली, आता त्यांच्यावरच बचावाची वेळ आणली आहे !



निसर्गाची नवी प्रतिमा…


कल्पनाविश्वात उठलेल्या वादळाचे उत्तम उदाहरण म्हणजे निसर्गाची बदलती प्रतिभा.पृथ्वीची प्रकृती धोक्यात येत चालली आहे हे पाहून गेल्या दशकापासून परिसर-वाद्यांची चळवळ जगभर सुरू झालेली आहे.या चळवळीने प्रदूषण,अन्न टिकविण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने,अणुभट्टचा,महामार्ग,एरोसोल्सची दाटी, केस रंगविण्याची साधने इत्यादींना विरोध करून त्या प्रवृत्तींवर आघात करण्यापेक्षाही अधिक काही केले.


आता आपल्या निसर्गावलंबित्वाबद्दल पुनविचार करण्याची वेळ आली आहे.या विचारातील मूलभूत बदलामुळे निसर्गांची कत्तल करण्यात दंग रहाण्याऐवजी आपण एका ताज्या दृष्टीकोणातून पृथ्वीशी,निसर्गाशी सुसंवाद राखीत त्याच्या सर्वतोपरी बचावाला सिद्ध झालो आहोत.आपण विरोधाची भूमिका सोडून सहयोगाच्या भूमिकेकडे आलो आहोत.


निसर्गात असलेल्या पुनरावृत्त चक्रांचा,पुनर्नवता क्षमतेचा,आणि धारणा क्षमतेचा शास्त्रीय अभ्यास करून त्याचा आपण आपल्या स्वतःच्या जीवनासाठीही आणि समाजाच्या पुनर्आखणोसाठीही उपयोग करून घेऊ लागलो आहोत.या गोष्टीचे प्रतिबिंब आपल्या निसर्गाबाबतच्या दृष्टीकोणात पडलेले आढळून येते. आपल्या बहुतेक कृतीतून आणि कलांतून निसर्गाविषयी आपणाला पुनःवाटू लागलेला आदरच प्रकट होतो.


लाखो शहरवासीयांना ग्रामीण परिसराची ओढ वाटू लागलेली आहे.ग्रामीण परिसरातील वस्तीत होत असलेली वाढ लक्षणीय आहे.नैसर्गिक अन्न,नैसर्गिक प्रसूति,स्तनपान,जैविक लय,शरीराची काळजी या गोष्टींचे महत्व समजून येऊन त्याच्या महत्त्वाचे मनापासून समर्थनही होऊ लागलेले आहे.निसर्गाचे संरक्षण झालेच पाहिजे,त्याच्यावर अत्याचार होऊ नयेत यासाठी प्रचार चालू झालेला आहे.तंत्रज्ञानाचे निसर्गावर होणारे विपरीत परिणाम टाळायला हवेत,त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये असा विचार बळ धरू लागला आहे.


दुसऱ्या लाटेच्या संस्कृतीत कोणी कल्पनाही केली नसेल इतकी निसर्गसंपत्तीची नासधूस झालेली आहे.पृथ्वी दुबळी होत चालली आहे.दिवसेदिवस विकास पावणाऱ्या आणि गुंतागुंतीच्या होत जाणाऱ्या विश्वाच्या पसाऱ्यात तिचा ठिपका लहान होत होत नाहीसा होईल की काय अशी भीति निर्माण झालेली आहे.


सुमारे २५ वर्षापूर्वी तिसरी लाट सुरू झाल्यापासून शास्त्रज्ञांनी,नव्या उपकरणांचा संपूर्ण संच,निसर्गाच्या दूरदूरच्या आवाक्याची कल्पना येण्यासाठी,तयार केलेला आहे.लेसर रॉकेट प्लाझ्मा,छायाचित्रणाच्या क्षेत्रात लावलेले विलक्षण शोध,

कॉम्प्युटर्स,किरणयुक्त साधणे या सर्वांनी आजवरच्या आपल्या समजुतींचा भोळा आवाका कमकुवत ठरवला आहे.


आपण मोठ्यात मोठ्या आणि छोट्यात छोट्या घटनांकडे आता पाहू शकतो.आणि त्या पहाण्यातील गतीही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.दुसऱ्या लाटेच्या मानाने आपली कुवत फार वाढली आहे. 


शोध घेण्यासाठी खुणावणाऱ्या विश्वाचा पसारा कमीत कमी १००,०००, ०००,०००,०००,०००, ०००, ००० इतक्या मैलांइतका आहे,त्याच्यातील १।१,०००,०००,०००,०००,००० व्या सेंटिमीटर क्षेत्रातील घडा-मोडींची आपण अचूक नोंद घेऊ शकतो.आपण सेकंदाच्या १।१०,०००,०००,०००,

०००,०००,०००,००० व्या भागात घडणाऱ्या घटनेचा अभ्यास करू शकतो;या तुलनेत पहा- आपले खगोलशास्त्री आपल्याला सांगतात, की विश्वाचे वय सुमारे २०,०००,०००,००० वर्षांचे आहे !


आणि गरगरायला लावणाऱ्या या विस्तारात, आपल्याला सांगण्यात येते की,जीवसृष्टी अस्तित्वात असलेले पृथ्वी हे एकच ठिकाण नाही.दूरच्या ताऱ्यांजवळ असणारे ग्रह, पग्रह,त्यांच्या उष्णतेबाबतचा अंदाज,त्यांच्यातील ओलाव्याचा अंदाज असे अनेक अभ्यास करून सांगण्यात येते,की इतरत्र ही जीवसृष्टी असण्याचा संभव आहे.


आणि या कल्पनेद्वारा,दुसरोकडेही जीवसृष्टी असण्याच्या शक्यतेद्वारा,आपले निसर्गविषयक आकलन आणखीनच बदलते.इ. स. १९६० पासून शास्त्रज्ञ दूरदूरच्या अज्ञातातून आपल्याला काही संदेश मिळतील अशी अपेक्षा बाळगून बसले आहेत.आता या यानांच्या रूपाने आपले आधुनिक यंत्रांनी आणि साधनांनी नटलेले दूत दूर अज्ञाताचा वेध घेण्यासाठी वेगाने झेपावू लागलेले आहेत.


तिसऱ्या लाटेच्या उदयानिशी आपला स्वतःचाच ग्रह आपल्याला खूप लहान व क्षुद्र वाटू लागला आहे. विश्वाच्या पसाऱ्यात आपले स्थान काही फारसे आदरणीय नाही याची जाणीव होते आहे,आणि आपण एकटे नसून आणखी कोणी तरी,कुठे तरी अस्तित्वात आहे ही कल्पना काळजाचा ठोकाच चुकवते.


निसर्गाबद्दल झालेली आपली कल्पना पूर्वीसारखी राहिलेली नाही.


उत्क्रान्तीची योजना…


उत्क्रांतीबद्दलच्या तर कल्पनेतच काय,खुद्द उत्क्रांतीतही बदल घडू लागला आहे !


जीवशास्त्रज्ञ,पुरातत्त्वज्ञ,मानववंशतज्ज्ञ उत्क्रांतीबाबतची रहस्ये शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.त्याचवेळी त्यांना असे आढळून येते आहे,की पूर्वी आपण कल्पना केलेल्या जगापेक्षा हे जग कितीतरी मोठे आणि गुंतागुंतीचे आहे.एके काळी जे नियम वैश्विकता व त्रिकालाबाधितता पावले होते,ते म्हणजे काही विशिष्ट बाबी-बद्दलचे,घटनांबद्दलचे निष्कर्ष होते.त्यांचा आवाका फारच छोटा होता.


" डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धान्त मांडल्यानंतर जीवशास्त्रज्ञांनी उत्क्रांतीच्या यांत्रिकतेचा एक आराखडाच तयार केला.आणि त्याच्या आधारे त्यांनी सर्वच उत्क्रांतीचे चित्रण करण्याचा प्रयत्न केला-वैश्विक,रासायनिक,सांस्कृतिक,सामाजिक कल्पनांच्या उत्पत्तिशास्त्रविषयक सर्वांची एकाच यांत्रिकतेने उत्क्रांती झाली अशी त्यांनी कल्पना करून घेतली.परंतु या सर्व ज्ञानाचा शेवट होईल असे,प्रत्येक पातळीवर,नियम बदलत गेले. " असे प्रसिद्ध अनुवांशिकता शास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक विजेता,फ्रँकोइस जेकब यांनी म्हटले आहे.


पूर्वापार मानण्यात आलेली अनेक गृहीतके हादरून गेली आहेत.उत्क्रांती ही सुरळित प्रक्रिया न रहाता अचानक घडून येणाऱ्या घटनांतून उत्पन्न होणारी असल्या-मुळेच इतिहासात घडलेल्या 'खंडां'ची आणि 'झेपां'ची उपपत्ती लावता येणे शक्य होते;असे शास्त्रज्ञ म्हणतात.अचानक घडणाऱ्या रचनात्मक बदलांचा काही जण अभ्यास करतात.



या ज्ञानशाखेतील अनेक परस्परविरोधी घटना खुज्या ठराव्यात अशी गोष्ट इ. स. १९५३ मध्ये घडली.या आश्चर्यकारक घटनेने जणू या शाखेतील ज्ञानाला ऐतिहासिक वळण दिले.इंग्लंडमधील केंब्रिज येथील एका शास्त्रज्ञाने,फॅन्सिस क्रिक याने,दावा केला की, आम्हाला जीवनाचे रहस्य सापडले आहे. DNA ची रचना क्रिक व त्या शास्त्रज्ञ मिग जॉन बॅटसन याने स्पष्ट केली.यानंतर होत गेलेल्या अभ्यासातून आणि संशोधनातून इतकी प्रगती झाली की आज जगातील प्रयोगशाळांतून काम करणाऱ्या अनुवांशिकता शास्त्रज्ञांनी,आपण उत्क्रांतीवादाचा शेवट केला आहे असा दावा केला.


कारण संपूर्णतया नवे जैविक आकार ते आता तयार करू शकतात.त्यांनी पेशींतील अनुवंशिकता बदलण्यात यश मिळविले आहे.तिसऱ्या लाटेतील विचारवंतांनी ह्या गोष्टीला तोंड दिले पाहिजे की आपण उत्क्रांतीचो योजना करू शकतो.आराखडा तयार करून त्यानुसार कार्यवाही करू शकतो.उत्क्रांती आता कधीच पूर्वीसारखी असणार नाही.उत्क्रांती या प्रक्रियेचेही पुनर्कल्पनाविष्करण झाले आहे.


प्रगती….


प्रगती विषयीच्या आपल्या कल्पनांचेही पुनर्मूल्यांकन करण्याची वेळ आलेली आहे.दुसऱ्या लाटेच्या युगात लागणारा प्रत्येक शास्त्रीय शोध व सुधारित उत्पादन हे मानवाच्या पूर्णतेकडे पडणारे प्रगतीचे आणखी एक पाऊल समजले जात होते.परंतु नंतर हे चित्र पालटले, आशावादाची जागा निराशेने आणि हताशपणाने घेतली.


चित्रपट,नाटके,कादंबऱ्या,कला यांच्यातून हा निराशावाद प्रकट होऊ लागला.तंत्रज्ञानाचे चित्रण प्रगतीचे इंजिन असे होण्याऐवजी मानवाचे स्वातंत्र्य आणि त्याची परिस्थिती,परिसर नष्ट करून टाकणारी एक विध्वंसक शक्ती म्हणून होऊ लागले.

परिसरवाद्यांच्या दृष्टीने 'प्रगती' ही एक शिवीच होऊन बसली.


प्रगतीच्या सरळसोट मार्गाची अपरिहार्यता,जी उद्यमवास्तवाचा एक आधार स्तंभ होती,तिचे फार थोडे कैवारी,औद्योगिक युगाचा शेवट येऊन ठेपल्यावर,उरले.


आता जगभर असे मानले जाऊ लागले आहे,की आता प्रगती केवळ तंत्रज्ञान किवा ऐहिक जीवनमानाच्या स्तरानुसार गणली जाणार नाही;तर जो समाज नैतिक दृष्ट्या, सौंदर्याभिरुची दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या किंवा परिस्थिती दृष्ट्या जर खालावलेला असेल तर त्याला केव्हाही सुधारलेला म्हणता येणार नाही;मग तो कितीही श्रीमंत असो,किंवा आधुनिक बनलेला असो.प्रगतीच्या बाबतची कल्पना आता अधिक बहुव्याप्त झालेली आहे. समाज अनेक मार्गांनी बहुव्याप्त विकास करून घ्यायला समर्थ झालेला असला पाहिजे. गेल्या काही दशकांकडे पाहिल्यावर आपल्याला असे आढळून येईल की निसर्ग,उत्क्रांती व प्रगतीबाबतच्या कल्पनांचा आपल्याला पुनःविचार करणे भाग पडले.या कल्पना काळ,स्थळ,भौतिक वस्तु,कार्यकारणभाव याबाबतच्या गृहीतकांबर आधारलेल्या होत्या.तिसरी लाट ही पूर्वीची गृहीतके विरघळून टाकत आहे.दुसऱ्या लाटेने धारण केलेली बौद्धिक झळाळीच नाहीशी करून टाकत आहे.


भवितव्य काळाचे…


नव्याने उदय पावत असलेली प्रत्येक संस्कृती दैनंदिन जीवनात लोकांनी काळाची हाताळणी करण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणतेच,शिवाय काळाबद्दलच्या मानसिक नकाशातही बदल घडवून आणते.तिसरी लाट देखील असे कालनिर्देशक नकाशे पुनः एकवार नव्याने तयार करत आहे.दुसऱ्या लाटेच्या अगोदर काळाची कल्पना चक्राकार होती.नंतर,विशेषतः न्यूटन नंतरच्या काळात काळ एका सरळ रेषेत गती घेणारा ठरला. आणि जगाच्या सर्व भागात आणि सर्व काळात तो एकसारखाच असून त्याचा प्रत्येक तुकडा मागील पुढील भागासारखाच हुबेहूब असणार याची खात्री वाटत होती.


शतकबदलाच्या सुमाराला ऑइन्स्टाइन याने कालसापेक्षतेचा सिद्धान्त मांडला.


शिल्लक राहिलेला भाग १२.०४.२५ या लेखामध्ये…